अनवट किल्ले १४: खोल खोल पाणी , वल्लभगड, हरगापुर ( Vallabhgad, Haragapur) आणि गंधर्वगड (Gandharvgad )
पुणे -बेंगळुरू मार्गावरून बेळगावच्या दिशेने निघालो कि कोल्हापुरनंतर येणारे महत्वाचे गाव म्हणजे संकेश्वर. संकेश्वरच्या आधी तीन कि.मी. वर एक छोटीसी टेकडी दिसते, त्यावरच तटबंदीची शेलापागोटे चढवून त्याला किल्ल्याचे रुप दिले आहे, हा आहे "हरगापुर". पायथ्याशी असलेल्या वल्लभगड गावच्या सानिध्याने त्याला "वल्लभगड"असेही म्हणतात.