वात्रटिका - झिंगाट प्रेम

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
31 May 2016 - 9:55 pm

हिरव्या शालूत
कळी लाजली
फुलपाखराचे जी
झिंगाट झाले जी.

फिरफिर नाचला
शिट्टी वाजवली
झिंगत म्हणाला
आय लव यू.

झिंग झिन झिंगाट
झिंग झिन झिंगाट.

प्रिन्स चिमण्याने
डाव साधला
बेसुध फुलपाखरू
चोचीत धरला.

फुलपाखरू खाऊन
चिवताई खुश
चिवचिव प्रिन्स
आय लव यू.

झिंग झिन झिंगाट
झिंग झिन झिंगाट.

दूर झाडावर काळा कावळा त्यांचे प्रेमाचे चाळे बघत होता,.......

फ्री स्टाइलबालगीतमुक्तकविडंबन

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण..२

अक्षय१'s picture
अक्षय१ in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 9:14 pm

ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.

टीपः वरील भाषण संपादित स्वरुपात आहे.
(स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)

इतिहाससमाजविचार

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण.१

अक्षय१'s picture
अक्षय१ in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 9:07 pm

२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे.

इतिहाससमाजविचार

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण...

अक्षय१'s picture
अक्षय१ in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 9:02 pm

…माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे.

इतिहाससमाजविचार

महापुरुषांच्या जयंती निमित्त सोरा गावाने घालून दिला नवा आदर्श.(महापुरुषांची एकत्र जयंती)

विशाल चंदाले's picture
विशाल चंदाले in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 8:00 pm

सध्या दुष्काळावर बरीच चर्चा चालू आहे आणि सगळीकडेच त्याच्या उपाययोजनांवर चर्चा आणि कामे सुद्धा चालू आहेत. असंच एक काम हाती घेतलं होतं सोरा (ता. अहमदपूर, जि. लातूर) गावातील तरुणांनी. ह्या कामाचं विशेष म्हणजे निमित्त होतं ते महापुरुषांच्या जयंतीचं. गावातील तरुणांनी महाराणा प्रताप सिंह, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांच्या जयंती वेगवेगळ्या साजऱ्या न करता एकत्र साजऱ्या करायचा संकल्प केला होता. तो या वर्षी त्यांनी पूर्णत्वास नेला आणि दिनांक २४ मे रोजी एकत्रित जयंती साजरी झाली.

समाज

राणीचा वाढदिवस

प्रणवजोशी's picture
प्रणवजोशी in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 7:37 pm

उद्या आपल्या लाडया राणीचा वाढादिवस. गेली ८०+वर्षे सेवा देणारी ही राणी अपवादात्मक परिस्थिती वगळता नेहमीच धावली आहे. मधे रेल्वेने हिचा डायनर कार डबा काढल्यावर लोक संतापली पण आता पुन्हा जोडलाय डबा. बाकी राणीची शान हल्ली जरा झाकोळलेली वाटते आता राणीला नव्हे तिच्या मालकांना राणीवर जाहिराती लावुन पैसे कमवायची दुर्बुद्धी झाल्ये.

असो.तर महत्वाच हे की ऊद्या पुणे येथे सकाळी ७ वाजता राणीचा वाढदिवस साजरा होणार आहे.तसाच सोहळा छशिट येथेही आसतो का हे विचारणे हा आहे.जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत.

टिप- हा लेख केवळ जिलबी टाकावी म्हणुन लिहलेला नाही.

जीवनमान

पार्टी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 7:25 pm

सायंकाळी मित्रा समवेत घरी पार्टी चा बेत ठरला होता..
बीअर मद्य आदी आणुन ठेवले्लेच होते..
मटण आणायचे होते....
दुपारच्या रणरणत्या उन्हात तो खाटकाच्या दुकानांत आला..
१ किलो मटण अशी ऑर्डर दिली..
अन त्याचे लक्ष बाजुला बांधलेल्या उन्हाच्या चटक्यात पाण्याविना तळमळ्णा-या बक-या कडे गेली..
व त्याचे मन हेलावले...
पण तो क्षणांत भानावर आला
अन विचार करु लागला....
मी संवेदना क्षम व्यक्ति आहे का दांंभिक????

मुक्तक

धन्यवाद गानू…

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 6:56 pm

"संध्याकाळची वेळ... ७.१० झाले असतील...

एक माणूस बॅंकेत आला... गार्ड म्हणाला बैंक बंद झाली आहे ७ वाजताच, आता उद्या या, तो माणूस काय ऐकायला तयार नाही.

गार्ड आला माझ्याकडे म्हणाला एक माणूस आलाय, म्हणतोय अर्जन्ट आहे, पैसे काढायचेत...
मी म्हणालो, ठीके पाठव आत..

मांडणीप्रकटन

गोनिदा...................

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 4:34 pm

उद्या १ जुन.......गोनिदा जाउन अठरा वर्ष होतिलं. १ जुन १९९८ ला पुण्यात ते अख्ख्या महाराष्ट्राला पोरकं करुन मोठ्या प्रवासाला निघुन गेले...कायामचे! आज जर अप्पा ( गोनिदांना) असते, अर्थातच ते आजही आपल्यातच आहेत...आठवनींच्या रूपात, त्यांच्या लिखाणाच्या रूपात, पण जर हयात असले असते तर येत्या ८ जुलैला १०० वर्षांचे झाले असते..असो. आज सहजच त्यांची आठवण आली आणि लिहीता झालो. अप्पांच्या अठराव्या स्म्रुतिदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्याबद्दल अगदी अल्प अशा आठवणी सांगणारा हा लेख त्यांनाच अर्पण....

==========================================================================================

साहित्यिकसद्भावना

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ७: काही अज्ञात पर्यावरणप्रेमी!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 12:26 pm
संस्कृतीधर्मसमाजजीवनमानतंत्रविज्ञानविचारलेख