गोनिदा...................
उद्या १ जुन.......गोनिदा जाउन अठरा वर्ष होतिलं. १ जुन १९९८ ला पुण्यात ते अख्ख्या महाराष्ट्राला पोरकं करुन मोठ्या प्रवासाला निघुन गेले...कायामचे! आज जर अप्पा ( गोनिदांना) असते, अर्थातच ते आजही आपल्यातच आहेत...आठवनींच्या रूपात, त्यांच्या लिखाणाच्या रूपात, पण जर हयात असले असते तर येत्या ८ जुलैला १०० वर्षांचे झाले असते..असो. आज सहजच त्यांची आठवण आली आणि लिहीता झालो. अप्पांच्या अठराव्या स्म्रुतिदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्याबद्दल अगदी अल्प अशा आठवणी सांगणारा हा लेख त्यांनाच अर्पण....
==========================================================================================
गोपाळ निळकंठ दांडेकर...नावच भारदस्त वाटत. वयाच्या अवघ्या १२-१३ वर्षापासुन जि भिंगरी या माणसाच्या पायाला चिकटली ती कायमचीच. ८ जुलै १९१६ साली अप्पांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यात झाला. अवघ्या १२-१३ व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होन्यासठी घरही सोडलं. पाय चालु लागले, नव्या दिशा बघु लागले, माणसं न्याहाळु लागले. कालातंरानं गाडगेबाबांच्या संपर्कात आले. त्यांच्या बरोबरसुद्धा खूप हिन्डले. इतकेच नाहीत तर त्यानंतर त्यांनी गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी ते गावोगाव हिंडले.'सोपे लिहिणे व बोलणे ही गाडगेबाबांची देणगी;' असे गोनीदां म्हणत. अप्पांना हळुहळु गड खूणाउ लागले. छत्रपतींचा वारसा दिसु लागला. ते अनेक गड, जागा ज्या राजांच्या पदस्पर्शानं पावन झाल्या होत्या त्या सगळ्या फिरले. आपल्या प्रत्येक वाढदिवसाला कोणत्या ना कोणत्या गडावर असण्याचा त्यांचा कल असे मात्र जेव्हा शेवटी प्रक्रुती मूळं त्यांना हे झेपत नसे याचा प्रचंड त्रास होइ.
१९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला. खरं सांगायच तर मराठीतला हा पहीला असंस्क्रुत लेखक...ज्यानं जगायला शिकवलं. लिहीतना त्यांना आपल्या भटकंतीचा, अनुभवाचा फार उपयोग झाला.
नर्मदेची पायी परिक्रमा हा गोनीदांच्या जीवनातला एक रोमहर्षक भाग होता.'आमचे राष्ट्रगुरू' ही लहान मुलांसाठी पुस्तिका हे त्यांचे पहिले लेखन. 'साभार परत' हा शब्द माहीत नसलेला मी लेखक आहे, असे गोनीदा म्हणत. 'बिंदूची कथा' ही त्यांची पहिली कादंबरी. मग त्यांनी 'माचीवरला बुधा', 'पूर्णामायेची लेकरं' (ही वऱ्हाडी बोलीतील पहिली कादंबरी),'आम्ही भगीरथाचे पुत्र', 'मोगरा फुलला', 'पडघवली', 'शितू', 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'मृण्मयी' अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या.
'मृण्मयी' अप्पांची सर्वात आवडती कादंबरी. 'पडघवली'पासून आपल्याला लेखनशैली सापडली, असे ते म्हणत. 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत' या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. 'पवनाकाठचा धोंडी'ला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला. 'शितू', 'कुणा एकाची भ्रमणगाथा', 'पवनाकाठचा धोंडी', 'पडघवली' या कादंबऱ्यांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले.
दूर्गप्रेम-शीवप्रेम त्यांच्या नसानसात भिनलं होतं. आपल्या मृत्युपत्रात त्यांनी लिहिले आहे, 'मी मेल्यावर माझी रक्षा सहयाद्रीतील शिवछत्रपतींच्या रायगडावर, बाजीप्रभूंच्या पावनखिंडीत, आणि सिंहगडाच्या तानाजी कडयावर, उधळून टाकावी. हे काम श्री. बाबासाहेब पुरंदरे यांनी करावे.' या माणसाची शेवटची इच्छाही शिवरायांच्या गड-किल्ल्यात माती बनून कायमचे मिसळून जावे, अशीच होती. यापेक्षा अधिक कोणता पुरावाहवा त्यांच्या उत्कट शिवभक्तीचा?
मृत्यूविषयी त्यांच्या स्वत:च्या कल्पना होत्या. ''माचीवरला बुधा' हे एक माझ्या मरणाचे मी पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपायचे असेल तर ते बुधासारखे संपावे,' असे ते म्हणाले होते.'जोपर्यंत मी राजगडावर जाऊ शकतो, तोपर्यंत दिवा विझलेला बरा. मी विनाकारण भारभूत होऊन जगू इच्छित नाही. माझ्याभोवती भरपूर माणसे आहेत; पण त्यांना भार होऊन बसणे बरे नव्हे.', अशी भावना गोनीदांनी त्यांची ७१ वर्षे पूर्ण झाल्याच्या वेळी 'सकाळ'ला मुलाखत देताना व्यक्त केली होती.
जेवढ प्रेम महराजांवर तेवढच मरठीवर सुद्धा होतं.ते स्वत: सर्व प्रांत हिंडलेले असल्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यात ती बोलीभाषा उमटे. प्रादेशिक कादंबरीचे दालन गोनीदांनी समृध्द केले, ते त्यांच्या या अंगामुळे. मराठीच्या कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, मावळ, अहिराणी, ठाकरीअशा बोलीभाषांतील लेखन वाचकाला थेट भिडायचे.अप्पांची पंचाहत्तरी १९९० मध्ये उत्साहात साजरी झाली. तेंव्हापासून त्यांनी मराठीतील एका उत्कृष्ट साहित्यकृतीला पाच हजार रूपयांचा 'मृण्मयी पुरस्कार' सुरू केला. शेवटी शेवटी ते 'मराठी मायबोलीला वाचवा. तुकाराम-ज्ञानेश्वरांची मराठी समजणारे वाचक झपाटयाने कमी होत चालले आहेत,' अशी खंत व्यक्त करीत.
अखेर काळ हाच सर्वश्रेष्ठ असतो हे कुणीच नाकारु शकत नाही. अखेर ती वेळ सुद्धा आली जेव्हा तमाम दूर्गप्रेमी पोरके झाले. मृत्यूविषयी त्यांच्या स्वत:च्या कल्पना होत्या. ''माचीवरला बुधा' हे एक माझ्या मरणाचे मी पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपायचे असेल तर ते बुधासारखे संपावे,' असे ते म्हणत. तसं व्हायला हव होतं खरतर पण....असो!
अप्पांना जाउन आज १८ वर्ष होतील, पण अप्पा आजही १८ जुनच्या शिवराज्याभिषेकाला उपस्थीत असतील .....अद्रुष्य स्वरूपात...आपल्याबरोबर... आणि उद्यासुद्धा!!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान लेख !
हो...
परवानगी बद्दल धन्यवाद !
पण
आह्ह, छान लिहिलेय अगदी.
छान लिहिलेय पण थोडक्यात
छान लिहिले आहे!!
त्या तिथे रूखातळी- भीवगडाच्या
पूर्णामायची लेकरं- निव्वळ भाषासौंदर्यासाठी हे पुस्तक वाचावं. संग
पूर्णामायची लेकरं- निव्वळ भाषासौंदर्यासाठी हे पुस्तक वाचावं. संग्रही ठेवावं. खरंय वल्ली, नुकतंच हे पुस्तक हातावेगळ केलं पण याची जादू काय अजूनही उतरली नाही.मोगरा फुलला
एक बदल
आप्पा ..
सताठ (सात आठ)
भाग्यवान आहात!
...