शिवाय

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
30 Oct 2016 - 5:46 pm

अभिनेता अजय देवगण हे आता दिग्दर्शक बनले असून कारकिर्दीतील या नव्या टप्प्यात प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन आले असून, शिवाय हे त्याचे नाव. कोणत्याही नवीन दिग्दर्शकाची पहिली कलाकृती जेंव्हा प्रेक्षक बघायला जातात तेंव्हा दिग्दर्शकांचे मूळ कल्पनेशी\कहाणीही\कन्सेप्टशी एकनिष्ठ राहण्याच्या प्रयत्नात कहाणीची होणारी वाताहत हा एक कॉमन सिन असतो. कौतुकास्पदरित्या अजय यातून सुटला असून एका वेगळ्या पण कदाचित मेनस्ट्रीम चित्रपटांशी फटकून असणाऱ्या कहाणीही एकनिष्ठ राहूनही अन मुख्य अभिनेता असूनही त्याची कहाणीवरील पकड अजिबात ढिली होत नाही.

चित्रपटसमीक्षा

काहीच्या काही - मधु आणि मधुमाशी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
30 Oct 2016 - 4:29 pm

मला मधुमाश्यांची भयंकर भीती वाटते. कारण हि तसेच आहे, बालपणीची गोष्ट १२-१३ वर्षांचा असेल. दिल्लीच्या बिर्लामन्दिराच्या मागे असलेल्या जंगलात मित्रांसोबत फिरत होतो. अचानक समोरून मधुमाश्यांचे भले मोठे सैन्य चालून येताना दिसते. कुणीतरी बहुधा त्यांची खोड काढली असावी. पण मधुमाश्यांच्या न्यायच अजब, गुन्हेगार कुणी का असेना, जो समोर दिसेल त्याला डसा. जीव मुठीत घेऊन पळालो. बहुधा उसेन बोल्टचा रिकार्ड सुद्धा मोडला असेल. ओलम्पिक असते तर नक्कीच सुवर्णपदक मिळाले असते. तरीही शरीरावर कित्येक ठिकाणी मधुमाश्यांच्या चुंबनांचे वेदानामयी काटे उमटलेच.

विडंबनविरंगुळा

ये दिल है मुश्किल - रिव्यू (स्पॉईलर सहित)

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
30 Oct 2016 - 2:01 pm

मी नवीन हिंदी चित्रपट पाहत नाही पण एका आप्ताने दिवाळी निमित्त प्रायव्हेट स्क्रीनिंग साठी बोलावले असल्याने जावे लागले. म्हणून हा चित्रपट पहिला गेला. रेड सिग्नल तोडल्यावर जसे काही वेळ वाईट वाटते तसे वाटत आहे.

नाट्यसमीक्षा

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ३)

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
30 Oct 2016 - 6:28 am

सुम्याच्या लहानपणातल्या प्रेमासंबंधाच्या सतावणार्‍या त्या आठवणी

सुम्या,तिची मुलगी आणि नवरा घाईगर्दीने कोकणात गेली होती कारण,सुम्याची आई बरीच आजारी होती.एक महिना तीं कोकणात राहिली.आईला मुंबईला आणून चांगल्या डॉक्टरला दाखवायचं असा त्यांचा विचार होता.पण हा विचार ऐकून आई खूप नाउमेद झाली.आणि दोन दिवसातच तिचा अंत झाला. सुम्याला आता बेत बदलावा लागला.म्हातार्‍या वडीलाना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन जाण्याचा विचार त्यांनी केला.आणि त्याप्रमाणे कोकणातलं घर बंद करून वडीलांना घेऊन मुंचईला आले. जाताना गुरूनाथच्या आईवडीलांकडे त्यानी घराची चावी दिली आणि घरावर लक्ष ठेवायला विनंती केली.

कथालेख

मिर्च मसाला

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
30 Oct 2016 - 2:42 am

चल बे गां# दो भेल बना..

रात्रीच्या शांततेत झालेल्या शिवीगाळाने मी जरा दचकलो. अचानक विचारांची तंद्री तुटल्याने नाही म्हटले तरी जरा चरकलो.

हात धोता है क्या भो#&के, कही खुजलीवाले तो नही है ..
माझे लक्ष जाई पर्यंत तिथून आणखी एक शिवी आली होती..

दोन बेवडे एका भेल विकणारया बारा चौदा वर्षाच्या मुलावर 'चढत' होते. काहीतरी मोठा जोक झाल्यासारखे खिदळत होते. टपली मारल्यासारखे त्याला हूल देत होते.

कथालेख

जीवनातील चंद्रकोर

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
30 Oct 2016 - 1:40 am

प्रत्येकाच्या जीवनात असते, एक चंद्राची कोर,
हृदयाच्या कोपर्यात दडते ती, जणु निरागस पोर ।

कधी नटखट कधी चंचल, कधी लाजाळूचे पान,
तिच्या गालाच्या खळीपुढे, हरपते मनाचे भान ।

हृदय चोरून नेते ती, जाणते मनाचे बोल,
ती आहे माझ्यासाठी, चांदणे अनमोल ।

भारावून टाकते मनास, तिची नखरेल अदा,
तिच्या मनमोहक रूपापुढे झाला, माझा जीव फिदा ।

स्वप्नातील ती परी आता, बनली आहे मनाची आस,
सतत तिचेच विचार असतात, सतत तिचाच लागे ध्यास ।

कविताप्रेमकाव्य

तू ........

विनायकपाटील८९'s picture
विनायकपाटील८९ in जे न देखे रवी...
29 Oct 2016 - 9:12 pm

अवखळ अवखळ या भावना...।
तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।।

तू साद दे
मी ऐकतो...
बघता तुला
मी हरवितो...
ही स्पंदने.....तुझीच आता.....।।

अवखळ अवखळ या भावना...।
तुझ्याविना जिव माझा आहे रिकामा ।।

शोधत होतो तुला, चारही दिशा जरी ।
कळले ना कधी, होते जवळी तरी ।।

शब्द जेव्हा तुझे, येती कानावरी ।
प्रेमळ दवबिंदू जणू, बनती पानावरी ।।

श्रावण सरीनीं मला भिजु दे आता ।
भेटल्याचा तू आनंद कळू दे जगा ।।

परी समान स्पर्श तुझा जाहला मना ।
परीस स्पर्श ऐकून होतो मिळाला पुरावा ।।

प्रेम कविताकविता

सहज सुचलं म्हणून

वटवट's picture
वटवट in लेखमाला
29 Oct 2016 - 9:09 pm

सहज सुचलं म्हणून सुचून जाते एखादी ओळ...
अपेक्षित असते साधीच ठिणगी, उठतो युगांचा लोळ...

मग भांबावून जातो आपणच अन् होतं कसंनुसं...
प्रश्न पडतो आपल्यालाच.. हे असलं सुचलं कसं??

पण एकदा सुचल्यावर हात नाही झटकता येत..
मुळात कविता आपला हात सहजासहजी नाही कोणाच्या हातात देत..

मग ह्या असल्या सुचण्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते..
आणि ही बया त्यावर फार विचित्र गोष्टींचं दानही मागते..

कधी चंद्र, कधी रात्र... आणि अश्रू तर ठरलेलेच..
साधं सरळ काहीच नाही... सार्‍यांच्या पोटी मुलखाचे पेच..

शुभ दीपावली

रातराणी's picture
रातराणी in लेखमाला
29 Oct 2016 - 9:07 pm

p4

सहस्रधारा प्रकाशाच्या लेवुन अवतरली दीपावली
प्रसन्नतेने सजते मनोमनी आज आनंदाची रंगावली

दरवळला मृदुल सुगंध उटण्याचा भारावुनी दशदिशा
अभ्यंगस्नात लज्जित तारका नभी शोभते नवउन्मेषा

सौंदर्याची करीत उधळण उजळली ही धरा देखणी
अवघा आसमंतही गातसे चैतन्याची सुमधुर गाणी

अंधकाराचे करीत निर्दालन भूतली प्रकटे तेजोवलय
सकल जनांत नांदो शांती आशिष हाच मागते हृदय

बंगळी

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in लेखमाला
29 Oct 2016 - 9:06 pm

सपरीवर झुलत रायते एकटी बंगळी बही
झुल्वत जात होते तिले हात थे थांबले कई?

माह्या बी घराले कुलूप लागला गाव सामसूम
चिमन्या बी मयालीत आता बसून रायल्या नही

जीवच काडते गा असे सोंग झाले सनाइचे
डीजे वाजते, कापते भीत थरथर तई तई

दोस्तीची जुनी येल सुकते असी लागते नजर
का होते? जडीसीन कोनी कसा टाकते मही?

मारा एक चक्कर घराची तुमी फुरसतीत जी
गझलेतून पूरी कथा येल का आमची कई?

- संकेत