मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

​आणि... हॉस्टलर मुलांकरिता सुपरफास्ट गाडी स्टाॅपेज नसलेल्या स्टेशनावर थांबली...

महामाया ·

सौंदाळा 26/12/2024 - 15:13
भारीच स्टेशन मास्तर देव माणुसच म्हणायला पाहिजे. तुमचे कन्व्हींसिंग स्किल्स पण भारीच असणार हे नक्की.

सौंदाळा 26/12/2024 - 15:13
भारीच स्टेशन मास्तर देव माणुसच म्हणायला पाहिजे. तुमचे कन्व्हींसिंग स्किल्स पण भारीच असणार हे नक्की.
रेलवेच्या आठवणी असाच एका कामानिमित्त बहिणीकडे भोपाळला गेलो होतो... भोपाल- बिलासपुर अमरकंटक एक्सप्रेसनी परत येत होतो... (वाटेत लागणारया जबलपुरला थांबलेली माझी आई तिथूनच आमच्या सोबत पुढे येणार होती.) गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती... दोन दिवसानंतर दिवाळी होती. म्हणून गाडीत सगळी हॉस्टलर मुला-मुलींची ही गर्दी होती... भोपाळला शिकायला आलेली ही मंडळी सणावारासाठी आपापल्या घरी परत जात होती... आमच्या जवळपास बसलेल्या मुलं-मुलींच्या बोलण्या वरुन समजलं की ते या गाडीने जबलपुरपर्यंत जातील. तिथून दुसरी गाडी ‘इस्पात नगरी...’ पकडून पुढे जातील... ती गाडी रात्री साढे दहाला होती...

अपघात टळला तो प्रवास

पराग१२२६३ ·

आता कोणताही प्रवास कोणत्याही वाहनाने सुरक्षित राहिलेला नाही. जीव मुठीत धरुनच आयुष्याचा प्रवास करायचा. लिहिण्याची शैली सुरेख असते. लिहिते राहा. पुढील लेखनास शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

आता कोणताही प्रवास कोणत्याही वाहनाने सुरक्षित राहिलेला नाही. जीव मुठीत धरुनच आयुष्याचा प्रवास करायचा. लिहिण्याची शैली सुरेख असते. लिहिते राहा. पुढील लेखनास शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
फोटो एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

गाथा इराणी (ऐसी अक्षरे -२१)

Bhakti ·

कंजूस 04/12/2024 - 04:27
हे पुस्तक वाचलं आहे. प्रदेश पर्यटनाची मीना प्रभू यांची बरीच पुस्तकं आहेत. ती वाचली तेव्हा कळलं की त्या डॉक्टर असल्याने आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी जोडलेल्या असल्याने तिकडच्या स्थानिक लोकांची मदत होते पर्यटन दौरा आखण्यात. सामान्य पर्यटकाला हे काही मिळत नाही. स्वतः जाणे किंवा पर्यटन आयोजकांतर्फे जाणे यात स्थळे, वेळ आणि पैशांचे बंधन पडते. ( पुस्तकातील चित्रांना प्रताधिकार असणार.)

छान लेख. इराण म्हटले की नॉट विदाऊट माय डॉटर हा चित्रपट आठवतो.
सुसंस्कृत पुढारलेले शहा यांच्याकाळातील इराण ते कडवे इस्लामिक खोमेनी खोमनेई यांचे इराण याविषयी त्या सतत नागरिकांशी चर्चा करत राहतात, जे खूपच धाडसाचे वाटते.
अयातुल्ला खोमेनी अगदीच धर्मांध होता यात अजिबात शंका नाही. पण तो खोमेनी सत्तेत यावा यासाठी अनुकूल परिस्थिती कोणी निर्माण केली? तर ती अमेरिकेने. १९५१ मध्ये इराणमध्ये निवडणुक झाली होती आणि मोहंमद मोसादेघ इराणचे पंतप्रधान झाले. तेल विहिरींमधून तेल काढण्याबद्दल सरकारला किती रॉयल्टी द्यायची यावरून वर उल्लेख केलेल्या ब्रिटिश पेट्रोलियमशी मोसादेघ यांच्या सरकारचे वाजले. इराण सरकार अधिक रॉयल्टीची मागणी करत होते तर त्याला ब्रिटिश पेट्रोलियम तयार नव्हती. मग मोसादेघने ब्रिटिश पेट्रोलियमला त्यांच्या देशातून हाकलून देऊन सगळा तेल उद्योग इराण सरकारच्या मालकीचा (राष्ट्रीयीकरण) केले. मग इंग्लंड अमेरिका खवळले. मोसादेघना सत्तेवरून खाली खेचायचा चंग त्यांनी बांधला. त्यावेळेस जगात कम्युनिस्ट जगात शिरजोर होतील ही भिती अमेरिकन्सना होती. त्यातून मग मोसादेघ हे कम्युनिस्ट आहेत असा अपप्रचार अमेरिकेने सुरू केला. तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले तरी मोसादेघ कम्युनिस्ट नव्हते. पण आपण म्हणू तसे न करणार्‍या राज्यकर्त्याला कम्युनिस्ट म्हणणे अमेरिकेच्या सोयीचे होते. मग सी.आय.ए ने इराणमधील पत्रकार, विचारवंत यांना चारापाणी टाकून मोसादेघ कसे हुकूमशहा आहेत, कसे वाईट आहेत, कसे अमुक आहेत, कसे तमुक आहेत असे लेख इराणी वर्तमानपत्रात यायला लागले. मग हळूहळू असेच पैसे दिलेले लोक मोसादेघ सरकारविरोधात रस्त्यावर आले. रस्त्यावर आलेल्या लोकांना बघून मोसादेघ खरोखरच वाईट आहेत असे वाटून आणखी काही लोक रस्त्यावर आले, मग आणखी काही असे करत करत डॉमिनो इफेक्ट झाला आणि सरकारविरोधात मोठी निदर्शने वगैरे झाली. हा सगळा सी.आय.ए ने घडवून आणणेला manufactured dissent होता. शेवटी मोसादेघना सत्ता सोडावी लागली आणि राजे शहा पेहलवी यांच्याकडे सर्वाधिकार आले. एकूण झाले काय की अमेरिकेने काड्या घातल्या आणि त्यातून अमेरिकाविरोधी वातावरण इराणमध्ये आले त्याचा फायदा खोमेनीसारख्या धर्मांधाने घेतला. रझा पेहलवी अमेरिका सांगेल तसे करत होते म्हणून ते खूप सुसंस्कृत वगैरे त्यांचे कौतुक झाले. नंतरच्या काळात सत्तेत आलेले खोमेनी पाहता त्यातुलनेत पेहलवी नक्कीच आधुनिक आणि सुसंस्कृत होते. पण अमेरिकेने काड्या घातल्या त्यातूनच खोमेनी सत्तेत यायला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. अमेरिकेने घडवून आणणेला हा पहिला रेजिम चेंज. साधारण त्याच काळात अमेरिकेने ग्वातेमालामध्येही असाच नालायकपणा केला होता. इराणमध्ये ब्रिटिश पेट्रोलियमशी सरकारचे वाजले तर ग्वातेमालामध्ये अमेरिकन फ्रुट कंपनीशी सरकारचे वाजले. दोन्ही ठिकाणी परिणाम तोच झाला. त्यानंतर ग्वातेमाला कित्येक वर्षे अस्थिर होता. हे रेजिम चेंजचे खटलं २०२४ मध्ये बांगलादेशापर्यंत चालू आहे. म्हातारड्या थेरड्या जो बायडनने भारतातही शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तोच किळसवाणा प्रकार करायचा प्रयत्न केला असे दिसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 09/12/2024 - 13:20
खुप चांगली माहिती दिली.योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे. ,यातल पहिलं प्रकरण ब्रिटिश - अमेरिका तेल धोरण विरोधात लढणारा पहिला तेलिया इराणीय मोसादेघ यावरच आहे.एकदम हीच माहिती आणखिन सविस्तर आहे.

In reply to by Bhakti

माझ्या बॅग मध्येही एका तेलियानेर पडून आहे पण सध्या मी दुसऱ्या महायुद्धात श्री. हिटलर ह्यांच्या सोबत बीसी असल्याने त्याला स्पर्श केलेला नाही.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 09/12/2024 - 13:40
योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे.
'एका तेलियाने' हे पुस्तक अवश्य वाचा... आणि मग त्या पुस्तकाच्या लेखकाचे लोकसत्तातले गेल्या दशकातले सगळे संपादकीय लेख वाचा. गिरीश 'कुबेर' हे लेखक महोदय पुढे वैचारिकदृष्ट्या इतके 'दरिद्री' कसे काय झाले असतील हा प्रश्न पडल्याशिवाय रहाणार नाही! मालक सांगेल त्यावर भुंकायचे अशी भूमिका संपादकाने स्वीकारली की काय होते ह्याचे (मदर टेरेसा नामक भंपक संतावर लिहिलेला लेख मागे घेणारे) गिरीश कुबेर हे गेल्या दिडेक वर्षातले पहिले उदाहरण... दुसरे कुठले ते सांगायची गरज आहे असे वाटत नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

लोकसत्ता, मटा, सकाळ इथे पण संपादकीय खूप काही वैचारीक लिहीत नाहीत. आमचे बाबा महाराज दोंबोलीकर म्हणतात की, "दिगू कधीच वेडा झाला."

आवडला. नवनवीन पुस्तक ओळखीमुळे वाचनाची आवड आणखीन वाढत आहे. धन्यवाद. काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे. त्यांचेही आभार.

In reply to by कर्नलतपस्वी

"काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे." पण , काही वयाने वाढलेल्या पण अज्ञानी लोकांचे प्रतिसाद वाचतांना मनोरंजन पण होते. त्यामुळे, मिपा हे ज्ञाना बरोबर मनोरंजनाचे पण उत्तम साधन आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्यामुळे सुरुवात, "माझे लंडन" ह्या पासून कर. लेखिकेचा जीवनप्रवास समजला की ह्यांचे प्रवासवर्णन वाचायला जास्त मजा येईल. शक्यतो, ह्यांची पुस्तके विकत घे. काही पुस्तकांच्या बरोबर, CD पण आहे. पुस्तक वाचता वाचता, CD वरील फोटो बघत जायचे.

मनो 08/12/2024 - 08:40
काही सुधारणा ताई, काही उच्चार थोडे चुकले आहेत, ते सांगतो. हफ्ट - हे हफ्त हवे, जसे हिंदीत आठवडा, सात दिवस याला हफ्ता म्हणतात. व्हिनेगर ( पर्शियन : سرکه , रोमनीकृत : सेर्क ) हे सिरका हवे, शेवटचा ह silent म्हणून आ उच्चार होतो. सफरचंद ( पर्शियन : سیب , रोमनीकृत : sib ) हे सेब, आपले हिंदी सफरचंद! फार पूर्वीपासून अरबी आणि इतर भाषा, फार्सी, संस्कृत इत्यादींत अक्षर मूल्ये आकड्यात असण्याची पद्धत आहे. ती वापरून एक कविता करून त्याचा कालश्लेश बनवतात. म्हणजे 'ही इमारत अमक्या तमक्याने बनवली ' यातील अक्षरांच्या मूल्याची बेरीज केली की त्या प्रसंगाचे वर्ष येते. बिस्मिल्ला ... या कुराणातील पहिल्या आयाचे अक्षर मूल्य ७८६ येते म्हणून त्या आकड्याला काही मुसलमान शुभ मानतात. प्रभू बाईंचे लंडन मला आवडले होते, त्यानंतर त्यांनी एकच छापाची भाराभर पुस्तके लिहिल्याने ते एकसुरी प्रवास वर्णन वाचण्याचा कंटाळा येऊन वाचन सुटले. असो, लेख उत्तम झाला आहे, अजून काही लिहा!

In reply to by मनो

Bhakti 09/12/2024 - 13:23
धन्यवाद मनो नौरूजची माहिती मी विकिपीडियाहून कॉपी पेस्ट केली.पुस्तकात तुम्ही लिहिल्याप्रमाणे आहे.अक्षरमूल्य कन्सेप्ट सध्या तरी समजली नाही,पुढे कधीतरी नक्की समजून घेउन.

चामुंडराय 08/12/2024 - 09:26
छान लेख ! का कोणास ठाऊक परंतु इराण बद्दल नेहेमीच आकर्षण आणि उत्सुकता वाटत आली आहे. एका इराणी कलीग बरोबर बऱ्याचदा इराण बद्दल चर्चा होत असते. वरती एका प्रतिसादात चंसूकु ह्यांनी "नॉट विदाऊट माय डॉटर" ह्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे (त्याच चित्रपटाच्या नावाचे) ते माझ्या संग्रही आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका इराणी माणसाबरोबर लग्न केलेल्या अमेरिकन स्त्री ची कथा आहे. तिला आणि मुलीला तो इराणला फक्त भेटीसाठी जाऊ असे सांगून घेऊन जातो. इराणमध्ये गेल्यावर मात्र तिचा पासपोर्ट ताब्यात घेऊन डांबून ठेवतो, इस्लामिक रितीरिवाज आणि वेशभूषा तिच्यावर लादतो. ती इराण मधून पळून जाण्याचा प्रयत्न करते. तिथले एजन्ट तिला सांगतात तुला आम्ही बाहेर पडायला मदत करू परंतु तुझ्या लहान मुलीला बरोबर नेणे शक्य नाही. ती मुलीला न घेता एकटी बाहेर पडायला तयार होत नाही. "नॉट विदाऊट माय डॉटर" असे स्पष्ट सांगते. पुढे ती लहान मुलीबरोबर अनेक प्रसंगानं तोंड देत, चालत, हाल अपेष्टा सहन करत इराणची सरहद्द ओलांडते आणि अमेरिकन एम्बसी मध्ये आश्रय घेते व अमेरिकेला परतते. त्या अनुभवांवर तिने ते पुस्तक लिहिले आहे. अतिशय थ्रिलिंग आहे, जरूर वाचावे.

In reply to by चामुंडराय

Bhakti 09/12/2024 - 13:26
"नॉट विदाऊट माय डॉटर "मी १२ वर्षांपूर्वीच हे पुस्तक वाचले आहे.या प्रकारची गोष्ट घेऊन एक हिंदी सिनेमा आला होता 'शक्ती'!एखादा इंग्लिश सिनेमाही असावा.

कंजूस 04/12/2024 - 04:27
हे पुस्तक वाचलं आहे. प्रदेश पर्यटनाची मीना प्रभू यांची बरीच पुस्तकं आहेत. ती वाचली तेव्हा कळलं की त्या डॉक्टर असल्याने आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी जोडलेल्या असल्याने तिकडच्या स्थानिक लोकांची मदत होते पर्यटन दौरा आखण्यात. सामान्य पर्यटकाला हे काही मिळत नाही. स्वतः जाणे किंवा पर्यटन आयोजकांतर्फे जाणे यात स्थळे, वेळ आणि पैशांचे बंधन पडते. ( पुस्तकातील चित्रांना प्रताधिकार असणार.)

छान लेख. इराण म्हटले की नॉट विदाऊट माय डॉटर हा चित्रपट आठवतो.
सुसंस्कृत पुढारलेले शहा यांच्याकाळातील इराण ते कडवे इस्लामिक खोमेनी खोमनेई यांचे इराण याविषयी त्या सतत नागरिकांशी चर्चा करत राहतात, जे खूपच धाडसाचे वाटते.
अयातुल्ला खोमेनी अगदीच धर्मांध होता यात अजिबात शंका नाही. पण तो खोमेनी सत्तेत यावा यासाठी अनुकूल परिस्थिती कोणी निर्माण केली? तर ती अमेरिकेने. १९५१ मध्ये इराणमध्ये निवडणुक झाली होती आणि मोहंमद मोसादेघ इराणचे पंतप्रधान झाले. तेल विहिरींमधून तेल काढण्याबद्दल सरकारला किती रॉयल्टी द्यायची यावरून वर उल्लेख केलेल्या ब्रिटिश पेट्रोलियमशी मोसादेघ यांच्या सरकारचे वाजले. इराण सरकार अधिक रॉयल्टीची मागणी करत होते तर त्याला ब्रिटिश पेट्रोलियम तयार नव्हती. मग मोसादेघने ब्रिटिश पेट्रोलियमला त्यांच्या देशातून हाकलून देऊन सगळा तेल उद्योग इराण सरकारच्या मालकीचा (राष्ट्रीयीकरण) केले. मग इंग्लंड अमेरिका खवळले. मोसादेघना सत्तेवरून खाली खेचायचा चंग त्यांनी बांधला. त्यावेळेस जगात कम्युनिस्ट जगात शिरजोर होतील ही भिती अमेरिकन्सना होती. त्यातून मग मोसादेघ हे कम्युनिस्ट आहेत असा अपप्रचार अमेरिकेने सुरू केला. तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले तरी मोसादेघ कम्युनिस्ट नव्हते. पण आपण म्हणू तसे न करणार्‍या राज्यकर्त्याला कम्युनिस्ट म्हणणे अमेरिकेच्या सोयीचे होते. मग सी.आय.ए ने इराणमधील पत्रकार, विचारवंत यांना चारापाणी टाकून मोसादेघ कसे हुकूमशहा आहेत, कसे वाईट आहेत, कसे अमुक आहेत, कसे तमुक आहेत असे लेख इराणी वर्तमानपत्रात यायला लागले. मग हळूहळू असेच पैसे दिलेले लोक मोसादेघ सरकारविरोधात रस्त्यावर आले. रस्त्यावर आलेल्या लोकांना बघून मोसादेघ खरोखरच वाईट आहेत असे वाटून आणखी काही लोक रस्त्यावर आले, मग आणखी काही असे करत करत डॉमिनो इफेक्ट झाला आणि सरकारविरोधात मोठी निदर्शने वगैरे झाली. हा सगळा सी.आय.ए ने घडवून आणणेला manufactured dissent होता. शेवटी मोसादेघना सत्ता सोडावी लागली आणि राजे शहा पेहलवी यांच्याकडे सर्वाधिकार आले. एकूण झाले काय की अमेरिकेने काड्या घातल्या आणि त्यातून अमेरिकाविरोधी वातावरण इराणमध्ये आले त्याचा फायदा खोमेनीसारख्या धर्मांधाने घेतला. रझा पेहलवी अमेरिका सांगेल तसे करत होते म्हणून ते खूप सुसंस्कृत वगैरे त्यांचे कौतुक झाले. नंतरच्या काळात सत्तेत आलेले खोमेनी पाहता त्यातुलनेत पेहलवी नक्कीच आधुनिक आणि सुसंस्कृत होते. पण अमेरिकेने काड्या घातल्या त्यातूनच खोमेनी सत्तेत यायला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. अमेरिकेने घडवून आणणेला हा पहिला रेजिम चेंज. साधारण त्याच काळात अमेरिकेने ग्वातेमालामध्येही असाच नालायकपणा केला होता. इराणमध्ये ब्रिटिश पेट्रोलियमशी सरकारचे वाजले तर ग्वातेमालामध्ये अमेरिकन फ्रुट कंपनीशी सरकारचे वाजले. दोन्ही ठिकाणी परिणाम तोच झाला. त्यानंतर ग्वातेमाला कित्येक वर्षे अस्थिर होता. हे रेजिम चेंजचे खटलं २०२४ मध्ये बांगलादेशापर्यंत चालू आहे. म्हातारड्या थेरड्या जो बायडनने भारतातही शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तोच किळसवाणा प्रकार करायचा प्रयत्न केला असे दिसते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 09/12/2024 - 13:20
खुप चांगली माहिती दिली.योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे. ,यातल पहिलं प्रकरण ब्रिटिश - अमेरिका तेल धोरण विरोधात लढणारा पहिला तेलिया इराणीय मोसादेघ यावरच आहे.एकदम हीच माहिती आणखिन सविस्तर आहे.

In reply to by Bhakti

माझ्या बॅग मध्येही एका तेलियानेर पडून आहे पण सध्या मी दुसऱ्या महायुद्धात श्री. हिटलर ह्यांच्या सोबत बीसी असल्याने त्याला स्पर्श केलेला नाही.

In reply to by Bhakti

टर्मीनेटर 09/12/2024 - 13:40
योगायोगाने आता 'एका तेलियाने' पुस्तक हाती आले आहे.
'एका तेलियाने' हे पुस्तक अवश्य वाचा... आणि मग त्या पुस्तकाच्या लेखकाचे लोकसत्तातले गेल्या दशकातले सगळे संपादकीय लेख वाचा. गिरीश 'कुबेर' हे लेखक महोदय पुढे वैचारिकदृष्ट्या इतके 'दरिद्री' कसे काय झाले असतील हा प्रश्न पडल्याशिवाय रहाणार नाही! मालक सांगेल त्यावर भुंकायचे अशी भूमिका संपादकाने स्वीकारली की काय होते ह्याचे (मदर टेरेसा नामक भंपक संतावर लिहिलेला लेख मागे घेणारे) गिरीश कुबेर हे गेल्या दिडेक वर्षातले पहिले उदाहरण... दुसरे कुठले ते सांगायची गरज आहे असे वाटत नाही 😀

In reply to by टर्मीनेटर

लोकसत्ता, मटा, सकाळ इथे पण संपादकीय खूप काही वैचारीक लिहीत नाहीत. आमचे बाबा महाराज दोंबोलीकर म्हणतात की, "दिगू कधीच वेडा झाला."

आवडला. नवनवीन पुस्तक ओळखीमुळे वाचनाची आवड आणखीन वाढत आहे. धन्यवाद. काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे. त्यांचेही आभार.

In reply to by कर्नलतपस्वी

"काही मिपाकरांचा सखोल अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडत आहे." पण , काही वयाने वाढलेल्या पण अज्ञानी लोकांचे प्रतिसाद वाचतांना मनोरंजन पण होते. त्यामुळे, मिपा हे ज्ञाना बरोबर मनोरंजनाचे पण उत्तम साधन आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्यामुळे सुरुवात, "माझे लंडन" ह्या पासून कर. लेखिकेचा जीवनप्रवास समजला की ह्यांचे प्रवासवर्णन वाचायला जास्त मजा येईल. शक्यतो, ह्यांची पुस्तके विकत घे. काही पुस्तकांच्या बरोबर, CD पण आहे. पुस्तक वाचता वाचता, CD वरील फोटो बघत जायचे.

मनो 08/12/2024 - 08:40
काही सुधारणा ताई, काही उच्चार थोडे चुकले आहेत, ते सांगतो. हफ्ट - हे हफ्त हवे, जसे हिंदीत आठवडा, सात दिवस याला हफ्ता म्हणतात. व्हिनेगर ( पर्शियन : سرکه , रोमनीकृत : सेर्क ) हे सिरका हवे, शेवटचा ह silent म्हणून आ उच्चार होतो. सफरचंद ( पर्शियन : سیب , रोमनीकृत : sib ) हे सेब, आपले हिंदी सफरचंद! फार पूर्वीपासून अरबी आणि इतर भाषा, फार्सी, संस्कृत इत्यादींत अक्षर मूल्ये आकड्यात असण्याची पद्धत आहे. ती वापरून एक कविता करून त्याचा कालश्लेश बनवतात. म्हणजे 'ही इमारत अमक्या तमक्याने बनवली ' यातील अक्षरांच्या मूल्याची बेरीज केली की त्या प्रसंगाचे वर्ष येते. बिस्मिल्ला ... या कुराणातील पहिल्या आयाचे अक्षर मूल्य ७८६ येते म्हणून त्या आकड्याला काही मुसलमान शुभ मानतात. प्रभू बाईंचे लंडन मला आवडले होते, त्यानंतर त्यांनी एकच छापाची भाराभर पुस्तके लिहिल्याने ते एकसुरी प्रवास वर्णन वाचण्याचा कंटाळा येऊन वाचन सुटले. असो, लेख उत्तम झाला आहे, अजून काही लिहा!

In reply to by मनो

Bhakti 09/12/2024 - 13:23
धन्यवाद मनो नौरूजची माहिती मी विकिपीडियाहून कॉपी पेस्ट केली.पुस्तकात तुम्ही लिहिल्याप्रमाणे आहे.अक्षरमूल्य कन्सेप्ट सध्या तरी समजली नाही,पुढे कधीतरी नक्की समजून घेउन.

चामुंडराय 08/12/2024 - 09:26
छान लेख ! का कोणास ठाऊक परंतु इराण बद्दल नेहेमीच आकर्षण आणि उत्सुकता वाटत आली आहे. एका इराणी कलीग बरोबर बऱ्याचदा इराण बद्दल चर्चा होत असते. वरती एका प्रतिसादात चंसूकु ह्यांनी "नॉट विदाऊट माय डॉटर" ह्या चित्रपटाचा उल्लेख केला आहे. हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे (त्याच चित्रपटाच्या नावाचे) ते माझ्या संग्रही आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका इराणी माणसाबरोबर लग्न केलेल्या अमेरिकन स्त्री ची कथा आहे. तिला आणि मुलीला तो इराणला फक्त भेटीसाठी जाऊ असे सांगून घेऊन जातो. इराणमध्ये गेल्यावर मात्र तिचा पासपोर्ट ताब्यात घेऊन डांबून ठेवतो, इस्लामिक रितीरिवाज आणि वेशभूषा तिच्यावर लादतो. ती इराण मधून पळून जाण्याचा प्रयत्न करते. तिथले एजन्ट तिला सांगतात तुला आम्ही बाहेर पडायला मदत करू परंतु तुझ्या लहान मुलीला बरोबर नेणे शक्य नाही. ती मुलीला न घेता एकटी बाहेर पडायला तयार होत नाही. "नॉट विदाऊट माय डॉटर" असे स्पष्ट सांगते. पुढे ती लहान मुलीबरोबर अनेक प्रसंगानं तोंड देत, चालत, हाल अपेष्टा सहन करत इराणची सरहद्द ओलांडते आणि अमेरिकन एम्बसी मध्ये आश्रय घेते व अमेरिकेला परतते. त्या अनुभवांवर तिने ते पुस्तक लिहिले आहे. अतिशय थ्रिलिंग आहे, जरूर वाचावे.

In reply to by चामुंडराय

Bhakti 09/12/2024 - 13:26
"नॉट विदाऊट माय डॉटर "मी १२ वर्षांपूर्वीच हे पुस्तक वाचले आहे.या प्रकारची गोष्ट घेऊन एक हिंदी सिनेमा आला होता 'शक्ती'!एखादा इंग्लिश सिनेमाही असावा.
गाथा इराणी -लेखिका मीना प्रभू A इराण हा देश आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत गाजत आला आहे. सर्वप्रथम या विषयी भयावह भावनाच येते. तिथे झालेल्या 'इस्लामिक क्रांती' १९७९ नंतर हा देश खूपच गूढ झाला. हळू हळू वाचनातून समजत होतेच की इराण हा आर्याचा देश होता.

गोरक्षनाथ गड प्रदक्षिणा

Bhakti ·

घर,नवरा,मुले बाळं,नोकरी,दुनिदारी सांभाळून स्वांनंदाचचे क्षण शोधणाऱ्या भक्ती उर्फ दुर्गेश नंदिनी आपले ट्रेक पुर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. सुंदर प्रची आणी माहीती. नाथ संप्रदायातील सन्यासी पुर्वी खुप दिसायचे. संप्रदायातील प्रत्येक नाथांची जन्म कथा आणी कार्य विलक्षण आहे. पुण्यात बोपदेव घाटात कानिफनाथ यांचे सुंदर मंदिर आहे. जैववैविध्य प्रचूर असल्याने बरेच लोक जातात. पण संध्याकाळ नंतर मात्र तो भाग असुरक्षित आहे. लेख आवडला.

कंजूस 28/11/2024 - 11:17
चांगली केली प्रदक्षिणा. मी पंधरा वर्षांपूर्वी गेलो होतो गोरखगडावर. म्हणजे अर्धीच चढाई करता आली. हरिहर / कलावंतिण गडासारख्या उभ्या पायऱ्यांची वाट आहे. वर गुहा आहेत. पण चक्कर येऊ लागली मग खाली आलो. (मच्छिंद्रगड याहूनही अवघड आहे म्हणतात. ) काही लोक वर जात होते ते म्हणाले मदत करतो या वर. पण विचार केला एकट्यानेच जाणार , वर राहणार आणि दुसरे दिवशी खाली येणार हे काही जमणार नाही. परावलंबीपणा नकोच.

In reply to by कंजूस

प्रचेतस 28/11/2024 - 12:39
तुम्ही म्हणताय तो गोरखगड हा नव्हे, तो उभा पायऱ्यांचा गोरखगड आहे कशेळे जवळ. सिद्धगड, गोरख आणि मच्छिंद्र सुळका. ह्या गोरखगडावर गुहा आणि शेवटी अवघड सुळकेवजा शिखर आहे. भक्ती म्हणतायत तो गोरखगड नगर जिल्ह्यातला आहे.

In reply to by प्रचेतस

कंजूस 28/11/2024 - 12:52
त्या सिद्धगडावरही जायचा प्रयत्न केला होता. वाटेत एक गुहा आहे तिथे एक साधू ( संसारी साधू, कल्याणचा ) राहतो. त्याला भेटलो. त्याने मला सावध केले. वाट सोपी आहे पण धोकादायक आहे. कशी? तर वाटेच्या एका बाजूस कडा आणि दुसऱ्या बाजूस दरी. वाटेवरचे दगड गोटे हे मातीत आहेत आणि कातळखडकातले नाहीत. पाय ठेवल्यावर गोटा मातीतून निसटतो आणि गोट्यासह आपण दरीत कोसळतो. मी थोडे वर जाऊन या गोष्टीचा अनुभव घ्यायचे ठरवले. पायाने धोंडे हलवून पाहिले. ते निसटून खाली पडायचे, वाटेला भगदाड पडायचे. परत गुहेत आलो. साधूचा पाहुणचार घेतला. रात्री डाळ भाताचं जेवण, पेटी वाजवून त्याने केलेलं गायन आणि सकाळी चहा बिस्कीटे. आंघोळीसाठी गरम पाणी. मजा आली. एकूण तिन्ही नाथगड घातकी आहेत. ते योगीच चढू जाणे.

कंजूस 28/11/2024 - 13:00
तुमची भटकंतीची आवड पाहून सुचवतो - माथेरान. मी बऱ्याचदा जातो आणि या https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=cDJxnXXwrmG-LWZ- विडिओतून चानेलने चांगला आढावा घेतला आहे. शनिवार रविवार सोडून जाणे हे मात्र खरे आहे. यातून ८०% माथेरान सादर केलं आहे. तसं एकाच भटकंतीत सर्व करूच नये. पुन्हा जावे आणि नवीन जागा पाहाव्यात. परत परत जाण्यासारखे हिल स्टेशन नक्कीच आहे. तिन्ही ऋतूत वेगळे आणि जाण्यासारखे. थोड्याच जागा पण निवांतपणे फिरण्यात गंमत आहे.

मार्गी 01/12/2024 - 11:51
अरे वा! वेगळाच ट्रेक. अभिनंदन. नवीन परिसराची‌ व क्षेत्रांची माहिती मिळाली. आधी प्रश्न पडला की, गोरखगड तर किती‌ दुर्गम, त्याला परिक्रमा किती दुर्गम असेल. मुरबाड जवळचा गोरखगड वाटला आधी. पण नंतर कळालं की हे स्थान व हा रूट वेगळा आहे.

टर्मीनेटर 01/12/2024 - 18:26
भारी झाली 'ट्रेकेथॉन'...👍 एप्रिल २०२२ मध्ये (आपला नगर कट्टा झाला होता तेव्हा) इथे गेलो होतो तेव्हा मंदिराच्या आतल्या भागाच्या आणि पायरी मर्गाच्या डागडुजीचे काम सुरु होते! 1 आता लेखातल्या पहिल्या फोटोत रंगरंगोटीचे काम पुर्ण झाल्यावर आणि वरच्या 'ॐ शिव गोरख' मधली गळालेली अक्षरेही लावल्यावर मंदिर अजुन छान दिसत आहे...

घर,नवरा,मुले बाळं,नोकरी,दुनिदारी सांभाळून स्वांनंदाचचे क्षण शोधणाऱ्या भक्ती उर्फ दुर्गेश नंदिनी आपले ट्रेक पुर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. सुंदर प्रची आणी माहीती. नाथ संप्रदायातील सन्यासी पुर्वी खुप दिसायचे. संप्रदायातील प्रत्येक नाथांची जन्म कथा आणी कार्य विलक्षण आहे. पुण्यात बोपदेव घाटात कानिफनाथ यांचे सुंदर मंदिर आहे. जैववैविध्य प्रचूर असल्याने बरेच लोक जातात. पण संध्याकाळ नंतर मात्र तो भाग असुरक्षित आहे. लेख आवडला.

कंजूस 28/11/2024 - 11:17
चांगली केली प्रदक्षिणा. मी पंधरा वर्षांपूर्वी गेलो होतो गोरखगडावर. म्हणजे अर्धीच चढाई करता आली. हरिहर / कलावंतिण गडासारख्या उभ्या पायऱ्यांची वाट आहे. वर गुहा आहेत. पण चक्कर येऊ लागली मग खाली आलो. (मच्छिंद्रगड याहूनही अवघड आहे म्हणतात. ) काही लोक वर जात होते ते म्हणाले मदत करतो या वर. पण विचार केला एकट्यानेच जाणार , वर राहणार आणि दुसरे दिवशी खाली येणार हे काही जमणार नाही. परावलंबीपणा नकोच.

In reply to by कंजूस

प्रचेतस 28/11/2024 - 12:39
तुम्ही म्हणताय तो गोरखगड हा नव्हे, तो उभा पायऱ्यांचा गोरखगड आहे कशेळे जवळ. सिद्धगड, गोरख आणि मच्छिंद्र सुळका. ह्या गोरखगडावर गुहा आणि शेवटी अवघड सुळकेवजा शिखर आहे. भक्ती म्हणतायत तो गोरखगड नगर जिल्ह्यातला आहे.

In reply to by प्रचेतस

कंजूस 28/11/2024 - 12:52
त्या सिद्धगडावरही जायचा प्रयत्न केला होता. वाटेत एक गुहा आहे तिथे एक साधू ( संसारी साधू, कल्याणचा ) राहतो. त्याला भेटलो. त्याने मला सावध केले. वाट सोपी आहे पण धोकादायक आहे. कशी? तर वाटेच्या एका बाजूस कडा आणि दुसऱ्या बाजूस दरी. वाटेवरचे दगड गोटे हे मातीत आहेत आणि कातळखडकातले नाहीत. पाय ठेवल्यावर गोटा मातीतून निसटतो आणि गोट्यासह आपण दरीत कोसळतो. मी थोडे वर जाऊन या गोष्टीचा अनुभव घ्यायचे ठरवले. पायाने धोंडे हलवून पाहिले. ते निसटून खाली पडायचे, वाटेला भगदाड पडायचे. परत गुहेत आलो. साधूचा पाहुणचार घेतला. रात्री डाळ भाताचं जेवण, पेटी वाजवून त्याने केलेलं गायन आणि सकाळी चहा बिस्कीटे. आंघोळीसाठी गरम पाणी. मजा आली. एकूण तिन्ही नाथगड घातकी आहेत. ते योगीच चढू जाणे.

कंजूस 28/11/2024 - 13:00
तुमची भटकंतीची आवड पाहून सुचवतो - माथेरान. मी बऱ्याचदा जातो आणि या https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=cDJxnXXwrmG-LWZ- विडिओतून चानेलने चांगला आढावा घेतला आहे. शनिवार रविवार सोडून जाणे हे मात्र खरे आहे. यातून ८०% माथेरान सादर केलं आहे. तसं एकाच भटकंतीत सर्व करूच नये. पुन्हा जावे आणि नवीन जागा पाहाव्यात. परत परत जाण्यासारखे हिल स्टेशन नक्कीच आहे. तिन्ही ऋतूत वेगळे आणि जाण्यासारखे. थोड्याच जागा पण निवांतपणे फिरण्यात गंमत आहे.

मार्गी 01/12/2024 - 11:51
अरे वा! वेगळाच ट्रेक. अभिनंदन. नवीन परिसराची‌ व क्षेत्रांची माहिती मिळाली. आधी प्रश्न पडला की, गोरखगड तर किती‌ दुर्गम, त्याला परिक्रमा किती दुर्गम असेल. मुरबाड जवळचा गोरखगड वाटला आधी. पण नंतर कळालं की हे स्थान व हा रूट वेगळा आहे.

टर्मीनेटर 01/12/2024 - 18:26
भारी झाली 'ट्रेकेथॉन'...👍 एप्रिल २०२२ मध्ये (आपला नगर कट्टा झाला होता तेव्हा) इथे गेलो होतो तेव्हा मंदिराच्या आतल्या भागाच्या आणि पायरी मर्गाच्या डागडुजीचे काम सुरु होते! 1 आता लेखातल्या पहिल्या फोटोत रंगरंगोटीचे काम पुर्ण झाल्यावर आणि वरच्या 'ॐ शिव गोरख' मधली गळालेली अक्षरेही लावल्यावर मंदिर अजुन छान दिसत आहे...
अ नाथ संप्रदायाचे महत्त्व,हठयोग,उपासना भारतभर अनेक ठिकाणी नित्यनेमाने होत असते.त्यातही महाराष्ट्रात गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते डोंगरकिन्ही (ता.

भोरगिरी ते भीमाशंकर

Bhakti ·

कंजूस 12/11/2024 - 08:39
एक महिन्यात वाटा वाळलेल्या दिसताहेत. भीमाशंकरला गर्दी शनिवार रविवारी असते बहुतेक. भोरगिरीला गाडी ठेवल्याने परत तिकडेच आलात का ट्रेक करत? जुन्नरच्या मोठा बाजार रविवारी असतो. पुढच्या वेळेस तिकडून या. पूर्वी डाळी स्वस्त मिळत असतं.

In reply to by कंजूस

Bhakti 12/11/2024 - 10:37
हो सर्व वाटा,ओढे कोरडे होते.एक दोन ठिकाणीच पाणी होते. नाही गाडी भीमाशंकरला बोलावली.मग तिकडून डिंभेला गेलो.खुप उशीर झाला होता आणि नारायणगावला मावशीकडे जायचं होतं म्हणून ओझर , जुन्नर केलं नाही. इंद्रायणी ६५ / किलो ठीक मिळाला का ? का महाग मिळाला?

In reply to by Bhakti

प्रचेतस 13/11/2024 - 09:06
५० ते ५५ रुपयात मिळायला हवा. डिंभ्यातून वरती गेलं तर तासा भरात आहुपेसारख्या नितांत सुंदर ठिकाणी जाता येतं.

खेड,राजगुरुनगर येथे रहात असल्यामुळे दर शिवरात्रीला भोभी ट्रेक जरूर व्हायचा. त्यावेळेस या पेक्षा घनदाट जंगल होते. वाड्याला, अर्थात जुने वाडा येथे संघाच्या दिवाळी शिबीरासाठी जायचो. पुढे दुष्काळ पडला व मॅट्रिक पास असल्याने कळमोडी येथे मिस्त्री म्हणून काही दिवस राज्य शासना करता सेवा दिली. तेव्हां पाझर तलावाचे काम होते पुढे त्याचे कळमोडी धरणात रूपांतर झाले. आता हा जल साठा बर्‍याच लोकांसाठी जीवनदायी ठरत आहे. एका मोठ्या धरणाच्या पायाभरणीचे श्रेय चित्रगुप्ताने माझ्या खात्यावर नक्कीच नोंदवले असेल. स्वर्गात जागा पक्की केली असावी. या भागात बरेच वर्षात गेलो नाही. पुढे ३१ ऑक्टोबर १९८५ ला मंचर,घोडेगाव मार्गे डिंभे धरणाच्या परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तात्पुरत्या नोकरांच्या वसाहतीत गेलो होतो. धरणाचा पायाभरणी व इतर बांधकाम चालू होते. आमचे काका तीथे हिशोबनवीस होते. तारीख पक्की लक्षात कारण इंदिरा गांधी यांचा खून झाला व क्रिकेट मॅच बंद पडली होती. आपल्या भटकंतीने जुन्या आठवणींचे मोहळ फुटले. लेख छान आहे पण घाई घाईत त्रोटक लिहील्या सारखा वाटतो.फोटो छान आहेत.आमच्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मधे पायवाटा होत्या. डेहणे गावापर्यंत लालपरी व नंतर आकरा नंबरची एक्स्प्रेस.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 12/11/2024 - 12:04
खुप छान आठवणी आहेत. मला अजूनही डिंभे धरणाच्या बांधकामाच्या आठवणी सांगणारे मंचरमधले लोकं भेटतात.

चौथा कोनाडा 12/11/2024 - 14:34
व्वा.. सुंदर भटकंती.... फोटो छानच... वर्णन मात्र आणखी विस्तृत चालले असते .. हा परिसर निसर्गरम्य..सुंदर आहे.. ट्रेकिंग ला बेस्ट, फॅमिली ट्रेकिंगला ही उत्तम मे-जून महिन्याच्या आसपास इथं करवंद फुलते.. काळी मैना करवंदाची मोठी मेजवानी मिळते.. काय टपोरी असतात फळं..

नठ्यारा 12/11/2024 - 19:15
भक्तीताई, पदभ्रमण ( ट्रेक ) आटोपशीर दिसतंय. आमच्यासारख्या कोकणातनं चढून येणाऱ्यांच्या नशिबी हे सुख वा दु:ख नाही. :-) ते साड्यांचं कुंपण घालून रानडुकरं, माकडं वगैरे पासून पिकांचं रक्षण कसं होत असेल याविषयी उत्सुकता आहे. शेवटी, तुम्ही खरोखरीच ताई आहात हे पाहून आनंद झाला. मी तुम्हांस स्त्रीनामधरी पुरुष समजून चाललो होतो. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

Bhakti 12/11/2024 - 20:27
ते साड्यांचं कुंपण घालून रानडुकरं, माकडं वगैरे पासून पिकांचं रक्षण कसं होत असेल याविषयी उत्सुकता आहे.
ते मलापण समजलं नाही,पण घरचे सांगत होते, त्यासाठीच हे कुंपण असेल.
शेवटी, तुम्ही खरोखरीच ताई आहात हे पाहून आनंद झाला. मी तुम्हांस स्त्रीनामधरी पुरुष समजून चाललो होतो.
हो ,अनेकदा माझ्या थेट बोलण्यामुळे नवरा म्हणतो तू चुकून मुलगी झाली आहेस ;) आणि अहो, मी ताई आहे हे केव्हाच सिद्ध झालंय.

प्रचेतस 13/11/2024 - 09:05
छोटेखानी वृत्तांत आवडला. भीमाशंकर जंगलांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड मोठमोठे उंच वृक्ष, शेकरूंना घरटी करण्यास आदर्श असे. गुप्त भीमशंकर वाट सुंदर आहे, मात्र मंदिराच्या मागच्या बाजूला खूप कचरा आहे.

कंजूस 12/11/2024 - 08:39
एक महिन्यात वाटा वाळलेल्या दिसताहेत. भीमाशंकरला गर्दी शनिवार रविवारी असते बहुतेक. भोरगिरीला गाडी ठेवल्याने परत तिकडेच आलात का ट्रेक करत? जुन्नरच्या मोठा बाजार रविवारी असतो. पुढच्या वेळेस तिकडून या. पूर्वी डाळी स्वस्त मिळत असतं.

In reply to by कंजूस

Bhakti 12/11/2024 - 10:37
हो सर्व वाटा,ओढे कोरडे होते.एक दोन ठिकाणीच पाणी होते. नाही गाडी भीमाशंकरला बोलावली.मग तिकडून डिंभेला गेलो.खुप उशीर झाला होता आणि नारायणगावला मावशीकडे जायचं होतं म्हणून ओझर , जुन्नर केलं नाही. इंद्रायणी ६५ / किलो ठीक मिळाला का ? का महाग मिळाला?

In reply to by Bhakti

प्रचेतस 13/11/2024 - 09:06
५० ते ५५ रुपयात मिळायला हवा. डिंभ्यातून वरती गेलं तर तासा भरात आहुपेसारख्या नितांत सुंदर ठिकाणी जाता येतं.

खेड,राजगुरुनगर येथे रहात असल्यामुळे दर शिवरात्रीला भोभी ट्रेक जरूर व्हायचा. त्यावेळेस या पेक्षा घनदाट जंगल होते. वाड्याला, अर्थात जुने वाडा येथे संघाच्या दिवाळी शिबीरासाठी जायचो. पुढे दुष्काळ पडला व मॅट्रिक पास असल्याने कळमोडी येथे मिस्त्री म्हणून काही दिवस राज्य शासना करता सेवा दिली. तेव्हां पाझर तलावाचे काम होते पुढे त्याचे कळमोडी धरणात रूपांतर झाले. आता हा जल साठा बर्‍याच लोकांसाठी जीवनदायी ठरत आहे. एका मोठ्या धरणाच्या पायाभरणीचे श्रेय चित्रगुप्ताने माझ्या खात्यावर नक्कीच नोंदवले असेल. स्वर्गात जागा पक्की केली असावी. या भागात बरेच वर्षात गेलो नाही. पुढे ३१ ऑक्टोबर १९८५ ला मंचर,घोडेगाव मार्गे डिंभे धरणाच्या परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तात्पुरत्या नोकरांच्या वसाहतीत गेलो होतो. धरणाचा पायाभरणी व इतर बांधकाम चालू होते. आमचे काका तीथे हिशोबनवीस होते. तारीख पक्की लक्षात कारण इंदिरा गांधी यांचा खून झाला व क्रिकेट मॅच बंद पडली होती. आपल्या भटकंतीने जुन्या आठवणींचे मोहळ फुटले. लेख छान आहे पण घाई घाईत त्रोटक लिहील्या सारखा वाटतो.फोटो छान आहेत.आमच्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मधे पायवाटा होत्या. डेहणे गावापर्यंत लालपरी व नंतर आकरा नंबरची एक्स्प्रेस.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 12/11/2024 - 12:04
खुप छान आठवणी आहेत. मला अजूनही डिंभे धरणाच्या बांधकामाच्या आठवणी सांगणारे मंचरमधले लोकं भेटतात.

चौथा कोनाडा 12/11/2024 - 14:34
व्वा.. सुंदर भटकंती.... फोटो छानच... वर्णन मात्र आणखी विस्तृत चालले असते .. हा परिसर निसर्गरम्य..सुंदर आहे.. ट्रेकिंग ला बेस्ट, फॅमिली ट्रेकिंगला ही उत्तम मे-जून महिन्याच्या आसपास इथं करवंद फुलते.. काळी मैना करवंदाची मोठी मेजवानी मिळते.. काय टपोरी असतात फळं..

नठ्यारा 12/11/2024 - 19:15
भक्तीताई, पदभ्रमण ( ट्रेक ) आटोपशीर दिसतंय. आमच्यासारख्या कोकणातनं चढून येणाऱ्यांच्या नशिबी हे सुख वा दु:ख नाही. :-) ते साड्यांचं कुंपण घालून रानडुकरं, माकडं वगैरे पासून पिकांचं रक्षण कसं होत असेल याविषयी उत्सुकता आहे. शेवटी, तुम्ही खरोखरीच ताई आहात हे पाहून आनंद झाला. मी तुम्हांस स्त्रीनामधरी पुरुष समजून चाललो होतो. आपला नम्र, -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

Bhakti 12/11/2024 - 20:27
ते साड्यांचं कुंपण घालून रानडुकरं, माकडं वगैरे पासून पिकांचं रक्षण कसं होत असेल याविषयी उत्सुकता आहे.
ते मलापण समजलं नाही,पण घरचे सांगत होते, त्यासाठीच हे कुंपण असेल.
शेवटी, तुम्ही खरोखरीच ताई आहात हे पाहून आनंद झाला. मी तुम्हांस स्त्रीनामधरी पुरुष समजून चाललो होतो.
हो ,अनेकदा माझ्या थेट बोलण्यामुळे नवरा म्हणतो तू चुकून मुलगी झाली आहेस ;) आणि अहो, मी ताई आहे हे केव्हाच सिद्ध झालंय.

प्रचेतस 13/11/2024 - 09:05
छोटेखानी वृत्तांत आवडला. भीमाशंकर जंगलांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड मोठमोठे उंच वृक्ष, शेकरूंना घरटी करण्यास आदर्श असे. गुप्त भीमशंकर वाट सुंदर आहे, मात्र मंदिराच्या मागच्या बाजूला खूप कचरा आहे.
अ भीमाशंकर हे भीमा नदीचे उगमस्थान आहे.अशा नदीच्या उगम स्थानी सतत पाण्याची खळखळ वातावरणात नादमयता ठेवत असते.सह्याद्रीच्या निसर्ग कुशीत भीमाशंकर ट्रेक हा खरं तर पावसाळ्यात करायला पाहिजे.यंदा पावसाळाही चांगला चार महिने होता पण मला तेव्हा जमलच नाही.तरीही जवळपासचा त्यातही सोपा "भोभी" जंगल ट्रेक काल करायचा ठर

तुंग- तिकोनाजवळच्या अंजनवेलमधील आकाश दर्शनाचा सोहळा!

मार्गी ·
आकाशातला प्रकाशाचा उत्सव! ✪ अखेर धुमकेतूने दर्शन दिलं! ✪ अंधार्‍या आकाशात तार्‍यांची उधळण ✪ गुरू ग्रहावर उपग्रहामुळे पडलेल्या सावलीचा थरार ✪ आकाशात तार्‍यांचा व जमिनीवर दवाचा पाऊस ✪ मोरगिरी किल्ला व घुसळखांब परिसरात भ्रमंती ✪ हजारो वर्षांपूर्वीच्या जगात नेणार्‍या बेडसा लेण्या! ✪ Anjanvel- the week-end spent well! नमस्कार. नुकताच आकाशातल्या प्रकाशाच्या उत्सवाचा अनुभव घेता आला. पवना धरणाच्या परिसरात व तुंग- तिकोना किल्ल्यांमध्ये असलेल्या अंजनवेल कृषि पर्यटनच्या सुंदर ठिकाणी आकाश दर्शनाचा आनंद घेता आला व इतरांसोबत शेअरही करता आला. त्या अनुभवाचं हे वर्णन.

सायकलीवर शिवथरघळ- एक अविस्मरणीय अनुभूती

मार्गी ·

चौथा कोनाडा 11/10/2024 - 20:48
वाह... किती थरारक... अप्रतिम ओघावते जिवंत वर्णन केलेय.. चित्र-पट डोळ्यापुढे घडतोय असं वाटतं... धन्यवाद आम्हाला ही हा थरारक अनुभव दिल्या बद्दल

बाजीगर 12/10/2024 - 18:36
जबरदस्त तुम्ही वाचकांना तुमच्या सायकलवर घेऊन गेलात ! इतकं उत्कट, इतकं साहसी वर्णन वाचून मी थक्क झालो. एकटेपणा तुम्हाला अडचण वाटत नाही. स्वत:शी ,निसर्गाशी संवाद करत तुम्ही निर्धाराने मार्गक्रमण केलेत. तुमची जिद्द, तुमची सौदर्यदृष्टी, तुमचं निश्चयाचे महाबळ, तुमच्या व्यक्तीमत्व खूप देखणं करतयं, खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद

आपणं नेहमीच सायकल सफर करत असता.पण ही शिवथरघळ ची मोहीम खरच साहसी म्हणावी लागेल. मुख्य रस्त्यापासून पुढील रस्ता खुपच अरुंद, तिव्र उताराचा, तिव्र वळणांचा आणि विना संरक्षक कठड्यांचा आहे. एप्रिल महिण्यात कोकणातून महाड मार्गे सोलापूर ला येत असताना घाटात ही शिवथरघळ ची पाटी दिसल्यामुळे पहायला गेलो. समर्थ रामदासांनी ज्या कपारीत बसून दासबोधाची निर्मीती केली तेथे दर्शन घेतले. मठात जाण्यासाठी पायरया आहेत, बसायला जागा भरपूर जागा आहे. मठात दर्शन करायला जाण्याअगोदर पायथ्याशी असलेल्या घरगुती उपहार ग्रुहात जेवणाची ओर्डर दिली होती. मऊसुत तांद्ळाची भाकरी, पिठलं, लोणचं, भात सारं गरमा गरम जेवण फक्त ८०/-. रुपयात मनसोक्त जेवलो. घाटात गरम भजी खाण्याचा मोह आवरला नाही. पाऊस जरी नसला तरी, निसर्ग, डोंगर, दरीतलं भाट्घर धरणाचं पाणी आणि रानमेवा.. केवळ अविस्मरणीय.

मार्गी 14/10/2024 - 13:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! तशी टफ राईड होती. खूप दुर्गम परिसर आहे. तिथे जायला रस्ता आहे हेच खरं तर विशेष आहे. पण येतानाची राईड अजून जास्त खडतर होती. :) @ बाजीगर जी एवढं काही नाही हो! आवड म्हणून. आणि नशीब! @ प्रभू- प्रसाद जी, अच्छा! ओके. @ अनामिक सदस्य जी सायकल चालवताना रेनकोट हा विचारही करता येत नाही. खूप भीषण घाम येतो. पावसाचा आनंद घेत जायचं असतं. सायकल दुरुस्तीचं बेसिक किट नेहमी सोबत ठेवतो व बेसिक बाबी शिकलो आहे. धन्यवाद!

किल्लेदार 16/10/2024 - 06:08
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एवढा पल्ला सायकलने कापणे म्हणजे खरंच कमाल. फार पूर्वी मोटरसायकलने गेलो होतो तेव्हाही प्रवास फार झेपला नव्हता. शिवथघळीत अनुमती वगैरे काही लागत नव्हते. एका सतरंजीवर आरामात ताणून देता आली होती. पहाटेच्या गारठ्यात काकड आरती साठी काकडत उठलो तेव्हा "काकड आरती" चा खरा अर्थ कळला.

चौथा कोनाडा 11/10/2024 - 20:48
वाह... किती थरारक... अप्रतिम ओघावते जिवंत वर्णन केलेय.. चित्र-पट डोळ्यापुढे घडतोय असं वाटतं... धन्यवाद आम्हाला ही हा थरारक अनुभव दिल्या बद्दल

बाजीगर 12/10/2024 - 18:36
जबरदस्त तुम्ही वाचकांना तुमच्या सायकलवर घेऊन गेलात ! इतकं उत्कट, इतकं साहसी वर्णन वाचून मी थक्क झालो. एकटेपणा तुम्हाला अडचण वाटत नाही. स्वत:शी ,निसर्गाशी संवाद करत तुम्ही निर्धाराने मार्गक्रमण केलेत. तुमची जिद्द, तुमची सौदर्यदृष्टी, तुमचं निश्चयाचे महाबळ, तुमच्या व्यक्तीमत्व खूप देखणं करतयं, खूप प्रेरणा मिळाली. धन्यवाद

आपणं नेहमीच सायकल सफर करत असता.पण ही शिवथरघळ ची मोहीम खरच साहसी म्हणावी लागेल. मुख्य रस्त्यापासून पुढील रस्ता खुपच अरुंद, तिव्र उताराचा, तिव्र वळणांचा आणि विना संरक्षक कठड्यांचा आहे. एप्रिल महिण्यात कोकणातून महाड मार्गे सोलापूर ला येत असताना घाटात ही शिवथरघळ ची पाटी दिसल्यामुळे पहायला गेलो. समर्थ रामदासांनी ज्या कपारीत बसून दासबोधाची निर्मीती केली तेथे दर्शन घेतले. मठात जाण्यासाठी पायरया आहेत, बसायला जागा भरपूर जागा आहे. मठात दर्शन करायला जाण्याअगोदर पायथ्याशी असलेल्या घरगुती उपहार ग्रुहात जेवणाची ओर्डर दिली होती. मऊसुत तांद्ळाची भाकरी, पिठलं, लोणचं, भात सारं गरमा गरम जेवण फक्त ८०/-. रुपयात मनसोक्त जेवलो. घाटात गरम भजी खाण्याचा मोह आवरला नाही. पाऊस जरी नसला तरी, निसर्ग, डोंगर, दरीतलं भाट्घर धरणाचं पाणी आणि रानमेवा.. केवळ अविस्मरणीय.

मार्गी 14/10/2024 - 13:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! तशी टफ राईड होती. खूप दुर्गम परिसर आहे. तिथे जायला रस्ता आहे हेच खरं तर विशेष आहे. पण येतानाची राईड अजून जास्त खडतर होती. :) @ बाजीगर जी एवढं काही नाही हो! आवड म्हणून. आणि नशीब! @ प्रभू- प्रसाद जी, अच्छा! ओके. @ अनामिक सदस्य जी सायकल चालवताना रेनकोट हा विचारही करता येत नाही. खूप भीषण घाम येतो. पावसाचा आनंद घेत जायचं असतं. सायकल दुरुस्तीचं बेसिक किट नेहमी सोबत ठेवतो व बेसिक बाबी शिकलो आहे. धन्यवाद!

किल्लेदार 16/10/2024 - 06:08
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एवढा पल्ला सायकलने कापणे म्हणजे खरंच कमाल. फार पूर्वी मोटरसायकलने गेलो होतो तेव्हाही प्रवास फार झेपला नव्हता. शिवथघळीत अनुमती वगैरे काही लागत नव्हते. एका सतरंजीवर आरामात ताणून देता आली होती. पहाटेच्या गारठ्यात काकड आरती साठी काकडत उठलो तेव्हा "काकड आरती" चा खरा अर्थ कळला.
✪ सह्याद्री पर्वतरांग व कोकणाचा संगम असलेली शिवथरघळ! ✪ "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!" ✪ सोलो सायकलिंग नव्हे निसर्गाच्या सान्निध्यातली तीर्थयात्रा! ✪ शेकडो धबधबे, असंख्य डोंगर आणि अजस्र वरांधा घाट ✪ अजस्र धबधबा- जीवंत प्रवाहाचं रमणीय प्रतिक ✪ आयुष्यभराचा अनुभव देणारी १२४ किमीची थरारक सायकल राईड ✪ अनेक किल्ल्यांच्या परिसरातलं निसर्गाचं विराट रूप दर्शन ✪ परतीच्या थरारक प्रवासाची उत्सुकता सर्वांना नमस्कार. २८ सप्टेंबर २०२४! कधी कधी आपल्याला अशी बुद्धी झाली ह्याचा आपल्यालाच विलक्षण आनंद होतो! खूप दिवसांपासून शिवथरघळ सायकल राईड करायची इच्छा होती.

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

पराग१२२६३ ·
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.

कायगाव टोका -प्रवरासंगम

Bhakti ·

"प्रचेतस विद्यापीठ ", सहमत आहे. प्रचेतस यांच्या लेखामधून शिल्प, मंदिरे आणी वास्तूकला यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. असाच अनुभव मला पावागढ आणी कायावरोहण येथील लकुलीश मंदिर बघताना आला. अतिशय बारकाईने मंदिर आणी परिसराचे निरीक्षण व तसेच सक्षम लिखाण. लेख खुपच आवडला. औरंगाबाद सासूरवाडी व मोहनीराज कुलदैवत असल्याने या भागात वारंवार चकरा होतात. पुढच्या वेळेस नक्कीच भेट देईन. मनापासून आभार. ताजा कलम- मिपा चिकित्सकांना चिकित्सा करण्यासाठी कुठलाच स्कोप नाही.

चित्र-१-मुख्य दरवाजा वरती सुंदर नगारखाना दिसत आहे. असे नगारखाने महाराष्ट्रातच दिसतात असे वाटते.

छान ओळख. छायाचित्रेही सुंदर आली आहेत. लिहिते राहा. प्रवरेच्या नदीकाठील या मंदिरातली शिल्प अतिशय सुंदर आहेत. पूर्वी या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पूल नव्हता तेव्हा आम्ही अनेकदा छोट्या होडीचा प्रवास करुन या मंदिरात जात असायचो. आता अनेक पर्यटक श्रद्धाळु या मंदिरास भेट देतात. श्रावणात तर तुडुंब गर्दी असते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 13/08/2024 - 10:29
पूर्वी या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पूल नव्हता तेव्हा आम्ही अनेकदा छोट्या होडीचा प्रवास करुन या मंदिरात जात असायचो.
इथे नौकाविहार पर्यटन विकास व्हायला पाहिजे ‌.पुढे देवगडला गेलो.तिथे नौकाविहार करता येतो.पण मागच्या भेटीचा अनुभव पाहता इतका सेफ वाटला नव्हता. बिरूटे सर तुमच्यासाठी भेट म्हणून आणलेली दोन‌ पुस्तके आणि एक रोप भेट न झाल्याने तशीच परत घरी आली 😅

In reply to by Bhakti

>>> बिरूटे सर तुमच्यासाठी भेट म्हणून आणलेली दोन‌ पुस्तके आणि एक रोप भेट न झाल्याने तशीच परत घरी आली अरे देवा, दोन्ही पुस्तके आणि रोप सांभाळून ठेवा. आपण पुन्हा कट्टा करू डिसेंबरात. वल्लीने निरोप सकाळचा सायंकाळी दिला. माझी कोणा मिपाकरांशी भेट होऊ नये असे त्यास कायम वाटत असते. अनेक मिपाकरांच्या भेटी त्याच्यामुळे टळल्या आहेत. स्वत:मात्र थेट भेटायला येतो. :( -दिलीप बिरुटे

मनो 13/08/2024 - 10:54
मंदिर विष्णू महादेव गद्रे सावकार यांनी उत्तर पेशवाईत बांधले आहे, तसा तारीख असलेला शिलालेख तिथे मंदिरात आहे. > यात पहिल्यांदा एक हत्तीवर बसलेले पेशवे? याच मंदिराची प्रतिकृती असलेले शिल्प आहे. माटे यांच्या पुस्तकात ते थोरले माधवराव पेशवे आहेत असे दिले आहे, परंतु हा रामायण/महाभारत/पुराणातील प्रसंग असेल का (माट्यांची चूक झाली आहे का) हे मात्र वल्लीशेठच सांगू शकतील.

In reply to by मनो

प्रचेतस 14/08/2024 - 09:42
माटे यांच्या पुस्तकात ते थोरले माधवराव पेशवे आहेत असे दिले आहे, परंतु हा रामायण/महाभारत/पुराणातील प्रसंग असेल का (माट्यांची चूक झाली आहे का) हे मात्र वल्लीशेठच सांगू शकतील.
नाही,ते शिल्प म्हणजे ही ह्या मंदिराची प्रतिकृतीच असून हत्तीवर बसलेले पेशवेच आहेत असा तर्क मी ही माझ्या लेखात केला होताच, फक्त ते पेशवे माधवरावच आहेत की नाही हे मी नक्की सांगू शकत नाही. माटेंचे म्हणणे मात्र बरोबरच असावे.

Bhakti 13/08/2024 - 20:42
लेख वाचून आमच्या शास्त्री काकांचा फोन आला.कायगाव टोके हे त्यांचे बालपणीचे गाव होतं.त्यांच मूळ आडनाव 'टोकेकर' पण त्यांचे गावात मोठे विद्वान त्यामुळे त्यांना तत्कालीन राणीने?(आता त्यांनाही आठवत नाही) त्यांना 'शास्त्री' उपाधी दिली आणि मेहकर (नीट नाव समजले नाही) गावात जहागिरदारी दिली.सिद्धेश्वराला लांब असल्याने कमी जाणं व्हायचं,तिथली मोठी घंटा ही लहानपणीची ओळख आठवते.नदीच्या थडीपाशी वांगी पिकवली जातं,ज्याची चव या प्रवरेच्या गोड पाण्यामुळे अप्रतिम लागत असे.१९५६ साली नदीला खूप मोठा पूर आला होता.पूर ओसरावा म्हणून पट्टीचा पोहणारा पोहत जात नदीतल्या मारूतीला मीठ व्हावयाचा.बराच काळ काकांची शेती मोठा वाडा इथे होता.पैठणचे जायकवाडी धरण झाल्यानंतर सर्व शेतीवाडी पाण्यात गेली.(पाण्याचा फुगवटा इतका ३० किमी आहे?).नंतर आईच्या निधनानंतर ती १० एकर जमीन विकली ..आता इथलं नातं संपल पण कायगाव टोक्याच्या सगळ्या रम्य आठवणी सर्वात जास्त सुंदर होत्या असं काका म्हणाले 😇

प्रचेतस 14/08/2024 - 09:24
लेख एकदम आवडला. ह्या मंदिरात ३/४ वेळा जाऊन आलोय तरीही तुमच्या लेखामुळे पुन्हा एकदा हे मंदिर अनुभवता आले. नागर शैलीतले हे मंदिर सुंदरच आहे. लेखात दिलेल्या रामायणतल्या संस्कृत श्लोकांचा अर्थ मात्र थोडा चुकलाय. तेव्हा तेथे कुपित झालेल्या राघवांनी भात्यातून सूर्यकिरणांप्रमाणे ज्वलंत असा शत्रूंचा संहार कराणारा बाण आपल्या सुदृढ धनुष्यावर ठेवून आणि त्या धनुष्यास जोराने ताणून त्या मृगाला लक्ष्य बनवून फुस्कारलेल्या सापासमान भासणारा दिप्तीसमान ज्वलंत असा बाण जो ब्रह्माने दिला होता तो सोडला. त्या उत्तम तेजस्वी बाणाने त्या त्या मृगरुपी मारिचाचे शरीर भेदून त्याच्या हृदयासही विदिर्ण केले. त्या बाणाच्या आघाताने तो तालवृक्ष जसा उसळी मारुन पडतो तद्वत तो मारीच उसळी मारुन पडला आणि मृत्यु येताना पाहून तो किंकाळ्या मारु लागला.

In reply to by प्रचेतस

गवि 14/08/2024 - 10:59
@ वल्ली.. पुराण काळात उपम्याच्या प्लेटच्या प्लेट भरून वाहत असत काय रे काव्यात? याच्यासमान ते, त्याच्यासमान हे... प्रत्येक वस्तू आणि कृतीचे वर्णन उपमा दिल्याशिवाय लोकांना कळत नसे की काय? साधा "चहा ओतू का?" विचारताना पण असेच विचारत असतील का? वर्षा ऋतुतील गढूळलेल्या ओढ्याच्या जलासमान वर्णाचे हे उकळता लाव्हाच जणू असे उष्ण कषाय पेय मी या अर्ध्या फोडलेल्या नरिकेल फळाच्या करवंटीसम आकारच जणू अशा पात्रात ओतून तुम्हाला समर्पित करू का?

In reply to by गवि

Bhakti 14/08/2024 - 11:35
हा हा पुलंनंतर गविशेठच असं मार्मिक निरीक्षण करू शकतात 😂

In reply to by असंका

टर्मीनेटर 14/08/2024 - 15:49
त्याबद्दल मौन पाळायचे हो 😀 वरती कर्नल साहेबांनी लिहिलंय
मिपा चिकित्सकांना चिकित्सा करण्यासाठी कुठलाच स्कोप नाही.
तरी एवढं चालायचंच… बाकी मला लेखातली एकमेव गोष्ट खटकली ती म्हणजे शेवटच्या वाक्यातला ‘तूनळी’ हा गलीच्छ उल्लेख!

श्वेता२४ 14/08/2024 - 19:42
मंदिराचे फोटो विशेष आवडले व त्यात तुम्ही सविस्तर वर्णन करून लिहीले आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट समजली. लेख अतिशय आवडला.

"प्रचेतस विद्यापीठ ", सहमत आहे. प्रचेतस यांच्या लेखामधून शिल्प, मंदिरे आणी वास्तूकला यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. असाच अनुभव मला पावागढ आणी कायावरोहण येथील लकुलीश मंदिर बघताना आला. अतिशय बारकाईने मंदिर आणी परिसराचे निरीक्षण व तसेच सक्षम लिखाण. लेख खुपच आवडला. औरंगाबाद सासूरवाडी व मोहनीराज कुलदैवत असल्याने या भागात वारंवार चकरा होतात. पुढच्या वेळेस नक्कीच भेट देईन. मनापासून आभार. ताजा कलम- मिपा चिकित्सकांना चिकित्सा करण्यासाठी कुठलाच स्कोप नाही.

चित्र-१-मुख्य दरवाजा वरती सुंदर नगारखाना दिसत आहे. असे नगारखाने महाराष्ट्रातच दिसतात असे वाटते.

छान ओळख. छायाचित्रेही सुंदर आली आहेत. लिहिते राहा. प्रवरेच्या नदीकाठील या मंदिरातली शिल्प अतिशय सुंदर आहेत. पूर्वी या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पूल नव्हता तेव्हा आम्ही अनेकदा छोट्या होडीचा प्रवास करुन या मंदिरात जात असायचो. आता अनेक पर्यटक श्रद्धाळु या मंदिरास भेट देतात. श्रावणात तर तुडुंब गर्दी असते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 13/08/2024 - 10:29
पूर्वी या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पूल नव्हता तेव्हा आम्ही अनेकदा छोट्या होडीचा प्रवास करुन या मंदिरात जात असायचो.
इथे नौकाविहार पर्यटन विकास व्हायला पाहिजे ‌.पुढे देवगडला गेलो.तिथे नौकाविहार करता येतो.पण मागच्या भेटीचा अनुभव पाहता इतका सेफ वाटला नव्हता. बिरूटे सर तुमच्यासाठी भेट म्हणून आणलेली दोन‌ पुस्तके आणि एक रोप भेट न झाल्याने तशीच परत घरी आली 😅

In reply to by Bhakti

>>> बिरूटे सर तुमच्यासाठी भेट म्हणून आणलेली दोन‌ पुस्तके आणि एक रोप भेट न झाल्याने तशीच परत घरी आली अरे देवा, दोन्ही पुस्तके आणि रोप सांभाळून ठेवा. आपण पुन्हा कट्टा करू डिसेंबरात. वल्लीने निरोप सकाळचा सायंकाळी दिला. माझी कोणा मिपाकरांशी भेट होऊ नये असे त्यास कायम वाटत असते. अनेक मिपाकरांच्या भेटी त्याच्यामुळे टळल्या आहेत. स्वत:मात्र थेट भेटायला येतो. :( -दिलीप बिरुटे

मनो 13/08/2024 - 10:54
मंदिर विष्णू महादेव गद्रे सावकार यांनी उत्तर पेशवाईत बांधले आहे, तसा तारीख असलेला शिलालेख तिथे मंदिरात आहे. > यात पहिल्यांदा एक हत्तीवर बसलेले पेशवे? याच मंदिराची प्रतिकृती असलेले शिल्प आहे. माटे यांच्या पुस्तकात ते थोरले माधवराव पेशवे आहेत असे दिले आहे, परंतु हा रामायण/महाभारत/पुराणातील प्रसंग असेल का (माट्यांची चूक झाली आहे का) हे मात्र वल्लीशेठच सांगू शकतील.

In reply to by मनो

प्रचेतस 14/08/2024 - 09:42
माटे यांच्या पुस्तकात ते थोरले माधवराव पेशवे आहेत असे दिले आहे, परंतु हा रामायण/महाभारत/पुराणातील प्रसंग असेल का (माट्यांची चूक झाली आहे का) हे मात्र वल्लीशेठच सांगू शकतील.
नाही,ते शिल्प म्हणजे ही ह्या मंदिराची प्रतिकृतीच असून हत्तीवर बसलेले पेशवेच आहेत असा तर्क मी ही माझ्या लेखात केला होताच, फक्त ते पेशवे माधवरावच आहेत की नाही हे मी नक्की सांगू शकत नाही. माटेंचे म्हणणे मात्र बरोबरच असावे.

Bhakti 13/08/2024 - 20:42
लेख वाचून आमच्या शास्त्री काकांचा फोन आला.कायगाव टोके हे त्यांचे बालपणीचे गाव होतं.त्यांच मूळ आडनाव 'टोकेकर' पण त्यांचे गावात मोठे विद्वान त्यामुळे त्यांना तत्कालीन राणीने?(आता त्यांनाही आठवत नाही) त्यांना 'शास्त्री' उपाधी दिली आणि मेहकर (नीट नाव समजले नाही) गावात जहागिरदारी दिली.सिद्धेश्वराला लांब असल्याने कमी जाणं व्हायचं,तिथली मोठी घंटा ही लहानपणीची ओळख आठवते.नदीच्या थडीपाशी वांगी पिकवली जातं,ज्याची चव या प्रवरेच्या गोड पाण्यामुळे अप्रतिम लागत असे.१९५६ साली नदीला खूप मोठा पूर आला होता.पूर ओसरावा म्हणून पट्टीचा पोहणारा पोहत जात नदीतल्या मारूतीला मीठ व्हावयाचा.बराच काळ काकांची शेती मोठा वाडा इथे होता.पैठणचे जायकवाडी धरण झाल्यानंतर सर्व शेतीवाडी पाण्यात गेली.(पाण्याचा फुगवटा इतका ३० किमी आहे?).नंतर आईच्या निधनानंतर ती १० एकर जमीन विकली ..आता इथलं नातं संपल पण कायगाव टोक्याच्या सगळ्या रम्य आठवणी सर्वात जास्त सुंदर होत्या असं काका म्हणाले 😇

प्रचेतस 14/08/2024 - 09:24
लेख एकदम आवडला. ह्या मंदिरात ३/४ वेळा जाऊन आलोय तरीही तुमच्या लेखामुळे पुन्हा एकदा हे मंदिर अनुभवता आले. नागर शैलीतले हे मंदिर सुंदरच आहे. लेखात दिलेल्या रामायणतल्या संस्कृत श्लोकांचा अर्थ मात्र थोडा चुकलाय. तेव्हा तेथे कुपित झालेल्या राघवांनी भात्यातून सूर्यकिरणांप्रमाणे ज्वलंत असा शत्रूंचा संहार कराणारा बाण आपल्या सुदृढ धनुष्यावर ठेवून आणि त्या धनुष्यास जोराने ताणून त्या मृगाला लक्ष्य बनवून फुस्कारलेल्या सापासमान भासणारा दिप्तीसमान ज्वलंत असा बाण जो ब्रह्माने दिला होता तो सोडला. त्या उत्तम तेजस्वी बाणाने त्या त्या मृगरुपी मारिचाचे शरीर भेदून त्याच्या हृदयासही विदिर्ण केले. त्या बाणाच्या आघाताने तो तालवृक्ष जसा उसळी मारुन पडतो तद्वत तो मारीच उसळी मारुन पडला आणि मृत्यु येताना पाहून तो किंकाळ्या मारु लागला.

In reply to by प्रचेतस

गवि 14/08/2024 - 10:59
@ वल्ली.. पुराण काळात उपम्याच्या प्लेटच्या प्लेट भरून वाहत असत काय रे काव्यात? याच्यासमान ते, त्याच्यासमान हे... प्रत्येक वस्तू आणि कृतीचे वर्णन उपमा दिल्याशिवाय लोकांना कळत नसे की काय? साधा "चहा ओतू का?" विचारताना पण असेच विचारत असतील का? वर्षा ऋतुतील गढूळलेल्या ओढ्याच्या जलासमान वर्णाचे हे उकळता लाव्हाच जणू असे उष्ण कषाय पेय मी या अर्ध्या फोडलेल्या नरिकेल फळाच्या करवंटीसम आकारच जणू अशा पात्रात ओतून तुम्हाला समर्पित करू का?

In reply to by गवि

Bhakti 14/08/2024 - 11:35
हा हा पुलंनंतर गविशेठच असं मार्मिक निरीक्षण करू शकतात 😂

In reply to by असंका

टर्मीनेटर 14/08/2024 - 15:49
त्याबद्दल मौन पाळायचे हो 😀 वरती कर्नल साहेबांनी लिहिलंय
मिपा चिकित्सकांना चिकित्सा करण्यासाठी कुठलाच स्कोप नाही.
तरी एवढं चालायचंच… बाकी मला लेखातली एकमेव गोष्ट खटकली ती म्हणजे शेवटच्या वाक्यातला ‘तूनळी’ हा गलीच्छ उल्लेख!

श्वेता२४ 14/08/2024 - 19:42
मंदिराचे फोटो विशेष आवडले व त्यात तुम्ही सविस्तर वर्णन करून लिहीले आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट समजली. लेख अतिशय आवडला.
A भूयस्तु शरमुद‍्धृत्य कुपितस्तत्र राघवः। सूर्यरश्मिप्रतीकाशं ज्वलन्तमरिमर्दनम्॥ १३॥ संधाय सुदृढे चापे विकृष्य बलवद‍्बली। तमेव मृगमुद्दिश्य श्वसन्तमिव पन्नगम्॥ १४॥ मुमोच ज्वलितं दीप्तमस्त्रं ब्रह्मविनिर्मितम्। शरीरं मृगरूपस्य विनिर्भिद्य शरोत्तमः॥ १५॥ मारीचस्यैव हृदयं बिभेदाशनिसंनिभः। तालमात्रमथोत्प्