निळा समुद्र, गरम वाळू, छोटे मासे, खारी हवा, समुद्राची झुळूक आणि तो उबदार सूर्य. ह्या माझ्या लहानपणी उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा समुद्रकिनाऱ्यावर खूप जीव होता..
मला वाटतं की, समुद्रकिनारा आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते.
मला असं वाटतं की समुद्रकिनाऱ्याकडे मी
त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो
मला आठवतं की एकदा आम्ही गोव्याला गेलो होतो,तो बिच वेगळा होता, पाहून मी थक्क झालो होतो.
पण कोकणातला, माझ्या आजोळ जवळचा
बिच मला निराळा वाटायचा.