Skip to main content

प्रेमकाव्य

सावल्यांची सरमिसळ होते ..

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 02/04/2016 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक ना कारण सबळ होते पण तुझे जाणे अटळ होते हे कसे नाते दुराव्याचे जे कधीकाळी जवळ होते कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू

लेखक विदेश यांनी सोमवार, 21/03/2016 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर्फी प्रेम झाले आवरी संताप तू वेदना मी बाळगावी हा दिला का शाप तू वाटही पाहून झाली काळ तो सरला किती ना घरी ओलांडले या उंबऱ्याचे माप तू झुरत का मी राहिलो तव घेतल्या वचनावरी का कधी शंका न आली मारली मज थाप तू प्रेम केले तुजवरी मी सोडुनी धर्मासही जागली धर्मास अपुल्या उलटुनीया साप तू जन्म दुसरा खास घेइन गाठ पडण्या तुजसवे मीहि देतो शाप तुजला घे शिरावर पाप तू .. .

ती आणि तो

लेखक भरत्_पलुसकर यांनी शनिवार, 19/03/2016 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
गद्य लिहू का पद्य फारच गोंधळ झाला. सध्या आमचं दिल के चैन रातोंकी नींद लुटून शांत झोपलेल्या एका मैनेस हे काव्यपुष्प द्यायचे आहे. तुम्हाला काय वाटतं? कसं झालंय? तू आहेस ना...

मागणं

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी मंगळवार, 08/03/2016 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
मागे वळून पाहताना त्रास होतो- मागे वळून पाहू नकोस! आठवून भूतकाळ वाईट वाटतं- मागचं काही आठवू नकोस! दिल्या-घेतल्या वचनांची फिकिर तू करू नकोस ठोकरलेल्या प्रियकरास दया बिलकूल दावू नकोस! गेलीस निघुनी सोडून मला एक मागणी नाकारु नकोस या जन्मी भेटलिस, कृपया पुढल्या जन्मी भेटू नकोस!! (जुनी कविता- बहुदा 9वी/10वी ला असताना केली होती.)
काव्यरस

श्रावणसर

लेखक रातराणी यांनी सोमवार, 22/02/2016 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिटल्या डोळ्यांत माझ्या स्वप्न तुझे जागते घे मिठीत गुंफुन सख्या ही रात्र आहे सरते कसा संपेल अबोला मी शब्द जोगवा मागते तुझ्यापाशी सख्या का माझे हे वैभव हरते हुरहूर ही असे मनी तरी का शांत शांत वाटते तप्त धरेवर जशी अचानक श्रावणसर कोसळते उमजले ना नाते तरीही जन्मांची ओळख पटते तळहाताची रेषा माझी तुझ्या हाती का उमटते
काव्यरस

तू आणि मी

लेखक प्रसाद_कुलकर्णी यांनी गुरुवार, 18/02/2016 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, खूप दिवस झाले मनात काही तरी घोळत होते, पण सांगड बसत नव्हती... आणि अशातच 'व्हॅलेन्टाईन डे'ला कुठून तरी प्रेरणा मिळाली आणि गोष्टी आपोआप जुळत गेल्या...

नवविधवेचे नवर्‍यास पत्र

लेखक विवेक ठाकूर यांनी बुधवार, 10/02/2016 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
तू गेलास... बरं झालं. आणि लवकर गेलास ते आणखीन बरं झालं. नाही तरी रात्री पिऊन पडायचास.....काय उपयोग होता तुझा? लग्नानंतर तुझं पिणं कमी होईल या आशेनं आई-वडीलांनी मला घरात आणलं. पण आधी बाहेर पिणारा तू , घरीच बाटली घेऊन बसायला लागलास, का तर म्हणे चखण्याचा खर्च कमी होतो. मुलं तुला घाबरायची पण एकदाच मी, तुझी पोलीसात तक्रार करुन, इन्स्पेक्टर बोक्यांना घरी बोलावलं. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले ‘फोकलीच्या, पोराबाळांवर आणि बायकोवर हात टाकशिल तर गोमूत्र पाजीन !’ तेंव्हापासनं तू फक्त शून्यात नजर लावून प्यायला लागलास.

चाफा

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 04/02/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेवरी कुणाच्या आहे अजून चाफा! मंद परी जीवघेणा, आहे तसा पसारा! ऊन उठून येते रात्री, घर गोळा होते नेत्री! कुणी दिसते, कुणी विरते! परी चाफ्यापाशी सारे, हताश होऊन बसते! मंद परी जीवघेणा आहे तसा पसारा वाटेवरी कुणाच्याही असू नये गं चाफा! -शिवकन्या

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.