मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सावल्यांची सरमिसळ होते ..

drsunilahirrao · · जे न देखे रवी...
काव्यरस
एक ना कारण सबळ होते पण तुझे जाणे अटळ होते हे कसे नाते दुराव्याचे जे कधीकाळी जवळ होते कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते डॉ. सुनील अहिरराव

वाचने 4139 वाचनखूण प्रतिक्रिया 19

आवडली रचना. कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते क्लास. -दिलीप बिरुटे

माहितगार 04/04/2016 - 22:28
कविता छान आहेच. खालील ओळी छानच आहेत
कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते
इन अ‍ॅडीशन अवांतर: या एवढ्या ओळी मायनस करुन कविता वाचली तर मिपावरील डुआयडींच्या आपापसातील संघर्षावरचे चपखल भाष्य वाटावे ;)

नाखु 05/04/2016 - 10:29
चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते
हे अगदी उच्च ! कवीतेतला गोळा नाखु

सटक 05/04/2016 - 22:18
सुंदर गझल! पण अजून एक शेर हवा असे वाटते.. शेवटचा शेर तर अप्रतिम! हासण्या या सर्व भुलले पण, वेदना माझी अटळ होते रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते कसे वाटते?