Skip to main content

प्रेमकाव्य

तरी मैत्रीण का आवडे मला ती?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 18/10/2016 06:47 या दिवशी प्रकाशित केले.
* चेह~यावर रेशमी बटा रुळती का इतकी सुंदर दिसते ती? * नवनवे फोटो अपलोड करते ती प्रत्यक्षात कितीे मोहक असेल ती * धवल गुलाबी साडी नेसती ती जणू गुलाबास पाकळ्यांत लपेटती ती * च्याटिंग चा प्रयत्न जरी केला मी तरी सारखी बिझी का असते ती? * कधी ड्रेस,कधी जिनटॉप वापरे ती पण साडीत अती सुंदर दिसते ती * किती गोड कविता लिहिते ती, त्यात दुखा:चे रंग का भरते ती? * भेटलो नाही कधी तिला मी तरी ओळखीची का वाटते ती ? * नाही जरी दोन शब्द बोललो मी अनामिक ओढ का लावते ती?

त्या एका पावसात...

लेखक प्रसाद_कुलकर्णी यांनी मंगळवार, 04/10/2016 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
ती कित्येक वर्षांनी भेटलीय मला या अशा दिवसात, अन भावनांचा बांध फुटला माझा...त्या एका पावसात... लहानपणी हातात हात घेऊन खेळलो आम्ही त्या मागच्या अंगणात, नशिबान वेगळे झालो...अशाच एका पावसात... तिच्यासाठी धडपडलो मी कित्येक अशा वर्षावात, भेटेल मला परत ती, हीच एक भाबडी आशा...त्या हर-एक पावसात... आज समोर उभी आहे ती, अन शब्द फुटत नाहीत ओठात, न बोलताही मन भिडली...त्या एका पावसात... भिजलेले केस तिचे ज्वालाग्नी पेटवताहेत माझ्या मनात, थर-थरते अंग तिचे कंप करतेय मला...त्या एका पावसात... ती जवळ आहे माझ्या इतकी, कि विरघळलीय ती माझ्यात, अन माझे अश्रू विरघळताना दिसताहेत मला...त्या एका पावसात....
काव्यरस

झड श्रावणाची

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 03/10/2016 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
झड श्रावणाची अचानक श्रावणाची झड ती आली अंग अंग भिजवून गेली ओल्या केसातून बट ही ओघळली चिटकून बसली गोऱ्या गाली मोहक हालचाल सुखावून गेली नकळत डोळे विस्फारून गेली कवेत घेता काया ही थरथरली चित्तवृत्ती मोहरून गेली त्रेधातिरपीट उडवून गेली यौवनास माझ्या खिजवून गेली जेव्हा जेव्हा आठवते रात्र ती ओली श्रावणात होते पापणी ही ओली राजेंद्र देवी

राया...

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 24/09/2016 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
राया... मखमली मंचकी पसरली, मखमली काया, नका सोडून जाऊ, नका ना जाऊ राया ॥ध्रु॥ करून बसले मंचकी थाट किती दिवस पाहिली वाट उगवेल आता चैत्री पहाट सोनचाफ्याचा सुटेल घमघमाट अत्तराच्या लावल्या या समया नका सोडून जाऊ.... ॥१॥ ल्याले शालू भरजरी देह झाला आज शेवरी ठेवा बाजूला तुम्ही शेला घ्या अलगद कवेत मजला जाईल ज्वानी माझी वाया नका सोडून जाऊ.... ॥२॥ राजेंद्र देवी

कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 22/09/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं.. ओळखीचं हसून बोलायला हवं.. किती ती धूळ गैरसमजांची, मनाला स्वच्छ झाडायला हवं.. कुठंतरी आत सलतंय का काही? समजूतीचं मलम तिथं लावायला हवं.. जे झालं ते झालं, ते होणारच होतं अपराधीपणाचं ओझं फेकायला हवं.. पूलाखालून खूप पाणी वाहून गेलंय आनंदानं जीवन आता जगायला हवं.. अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..

मी कोणालाच काही सांगणार नाही...

लेखक bhavana kale यांनी गुरुवार, 22/09/2016 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
तुज्या प्रेमाच्या ओलाव्यात चिंब भिजेन एवढं प्रेम करू नकोस.. प्रीतीच्या सागरात वाहून किनाऱ्याला येऊ शकणार नाही एवढं प्रेम करू नकोस... तुझ्या सौदर्यांने घायाळ फक्त स्वप्नातच असतो मी आजकाल.. म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही.. खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार नाही.. डोळ्यावर झोप अशी नसतेच कधी स्वप्नात तुझी सोबत हवी हवीशी वाटते.. गजबजलेल्या गर्दीतून वाट काढताना तुझ्या हळुवार स्पर्शाचा आधार घ्यावासा वाटतो.. तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय आणखी मला काही सुचतच नाही.. म्हणून तुझ्या मनात काय आहे ते सांग मला, मी कोणालाच सांगणार नाही.. खरं खरं सांग मला, मी कोणाला सांगणार न

मिठीतली रात्र

लेखक निनाव यांनी बुधवार, 14/09/2016 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्षानी जुनी पाने पालटली आज, आणिक हि कविता नजरेस अाली मिपा वर बरेच नविन कवि वर्ग जुडले आहे, तेव्हा पुन्हा सादर करतो आहे. "मिठीतली रात्र" आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत तुझ्या आज पाहा रे आवरे मोह मज न अधिक आता पडदा तारकांचा पडू दे ना रे... निजले जग, निजले तारे अंतर असे हे मिटले सारे माझ्या कुशीत तु उजळला अधिकच तुझ्या आलिंगनात मज लाज ना रे विझले कधी मी मलाच कळेना तुझ्या कुशीतुन पदर सुटेना उलगडली वेणी, उलगडले अशी मी तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे आले विरह ते किरणांचे मज कलह मनाचा काही शमेना दरवळते अजुनी तुझ्या श्वासांचे गंध, पडेल तारकांचा पुन्हा पडदा ना रे? आले आहे पुन्हा सख्या रे मिठीत

दारी श्रावण दारी साजण....

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 14/09/2016 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
दारी श्रावण दारी साजण.... पाऊस आला पाऊस आला जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सरींवर सरी अशा कोसळल्या डोळ्याच्या कडा ढासळल्या असा काही बरसला श्रावण न्हाऊन निघाली तुझी आठवण रोज खेळते आठवणींची भातुकली वाट पाहते तुझी एकली, तुझी एकली कळलेच नाही कधी ठाकला दारी श्रावण दारी साजण.... राजेंद्र देवी

व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी

लेखक निनाव यांनी सोमवार, 12/09/2016 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी - निनाव (१२.०९.२०१६) व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी अव्यक्त गुंत भावनांची, तुज समजेल का तरी आठवून विसरावे तुला, प्रयत्न मज आसवांचे विसरलोच तुला जर कधी, मी उरेन का तरी आस ही जगण्याची मी, सोडली नसली तरी जगलो तुझ्याच साठी, तुज उमगेल का तरी आठवून विचारावे तुला, अर्थ मज जगण्याचे आठवलोच मी नाही तुज, मी उरेन का तरी बहर गोड़ मज स्वप्नांना, कधी येईल का तरी मन बंद पापण्यांना, चिंब भिजवेल का तरी स्पर्श एक तुझे, मज स्वप्न कोवळे स्वप्नांचे भंगूनि स्वप्न तुझे असे, मी उरेन का तरी
काव्यरस

मी एकटी ....

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 08/09/2016 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकटी .... एल तीरावर मी एकटी पैलतीर त्याला नाही समोर पसरला अथांग दर्या साजणाचा पत्ता नाही परतुनी आले सारे अजून तो आला नाही रात्रीचा चंद्र देतसे तो येईल याची ग्वाही रंग हळदीचा अन मेंदीचा अजून उतरला नाही स्वप्नांचे जहाज बुडाले साजणाचे तारू वाचले का नाही ? बघत बसते खुणा वाळूतल्या निरखीत असते लाटांनाही नकोत रत्ने मज सागरा का साजण माझा परत देत नाही ? राजेंद्र देवी