मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमकाव्य

बरे नाही

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
टपोरे पाणीदार नयन, त्यावर रेघ काजळाची, वर असे रोखून बघणे, बरे नाही * भिवया कोरलेल्या, शर नजरेचे घातक ह्या पारध्यास,असे घायाळ करणे, बरे नाही * ओष्ट पाकळ्या गुलाबी,खट्याळ हास्य शराबि, बहकवलेल्यास, बहकावणे साजणे, बरे नाही * रेशमी कुंतल,त्यावर गजरा,काय नखरा, लाविली आग,अंगास फुलांनी, हे, बरे नाही * गुलाबी रेखीव जिवणी, त्याचे विभ्रमी चाळे होतो जीव चोळा मोळा, असे करणे बरे नाही * तुझे अल्लड वय,वाट अशी नीसरडी अस भेटणं वेळी अवेळी,प्रिये बरे नाही. * खवळला तो सागर, सुटले पिसाट वारे तरी लोटतेस होडी वादळात ,सखे बरे नाही

"तडफड" की "तोडफोड"

विशुमित ·
लेखनविषय:
तू सांगितलंस म्हणून मी लिहलं "त्यानं " सांगावं अन सृष्टी ने हलावं तसं..!! शब्दांची तोडफोड केली पण काळजाची तडफड झाली भावनांचं झाड झडलं थोडक्यात लिहिण्याच्या नादात मन पार कोरडं पडलं मी लिहलं माझ्या परीने माहित नाही त्यातून तुला काय समजणार आहे कारण तू वाचणार आहेस तुझ्या नजरेने याला "तडफड" म्हणू की "तोडफोड"...!! ==>> विशुमीत

अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
दिसलास तू, उमले यौवन हसलास तू, लाजले नयन. आवेग प्रीतीचा,तनूत मोहरे गंध पसरवे, यौवन वारे. रोम रोमात रे फुलतो फुलोरा देहात उसळे, बेभान वारा जाळते तन, धुंद चांदणे, घे मिठीत, हेच मागणे, अधरा वरती तू लिहिले ते गुपित आपले अधरी जपते मिठीत तुझ्या हि तनू विरघळते श्वासांत मिसळता श्वास, नयन मिटते, देहास आलिंगता ,मी एकरूप होते, अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.

और क्या एहेदे वफा होते है - एक अविस्मरणीय गीत

शान्तिप्रिय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
और क्या एहेदे वफा होते हैं । लोग मिलते हैं जुदा होते है। और क्या......... एहेदे वफा होते हैं । पंचम (आर डी बर्मन), आनंद बक्षी ,आशाताई(सोलो) आणि सुरेश वाडकर(सोलो) यांच्या प्रतिभेनी सजलेली एक मास्टरपीस संगीतकृती ! चांगुलपणा , चांगुलपणा म्हणजे काय? लोक एकत्र येतात आणि विभक्त होतात , जणू एकत्र येण्यातच विभक्त होण्याची बीजे रोवलेली असतात. जीवनात भेटणारे साठी केव्हा तरी विभक्त होतातच. जवळच्या व्यक्तीला त्रास देऊन आणि रडवूनच सुख मिळते काय? प्रेम विसरण्याची जणू जगाला सवयच असते. प्रेमातील उद्विग्नता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न !

प्रश्न

इना ·
हलकेचं आलीस आयुष्यात वाऱ्याच्या झुळूकीसारखी मनात मात्र माझ्या वादळासारखी राहिलीयेस तुझं हसणं, तुझं दिसणं कोरलय माझ्या अस्तित्वावर रात्रीच्या आकाशात ध्रुव चमकत रहावा तसा गुणगुणत राहतो तुझा आवाज माझ्या कानात त्या क्षणी जवळ असतीस तर मिठीत घेतली असती तुला किती आवडतेस तू मला मीही सांगितलं असत मग पण नाही सांगता आलं तेव्हाही आणि आताही आता फक्त स्वप्नं पाहतो त्या स्वप्नातही तू भेटतेस तेही दूर जाण्यासाठीच मग भेटतेस तरी का ते तुलाच माहीत तुझ्याचंजवळ हरवून आलोय मी स्वतःला बेमालूमपणे पण तुझ्या नाही येतं लक्षात आणि माझ्याजवळ असलेला मी अजूनच अगतिक होतो पण यातलं काहीही तुला कळून उप

मी आर्ची बोलत्येय.

आंबट चिंच ·
काय मस्त सकाळ उजाडलीये अजुनही झोपुन राहावसे वाटतंय , पण आईने तरीही उठवलेच. नाही तर शाळेला उशीर झाला असता. सगळं लवकर आटोपले तेवढ्यात शैला, शारदा आल्याच. मग डबा दफ्तरात टाकुन तशीच पळाले शाळेला. शाळेत जाता जाता वाटेत त्यांना काल आईकडे नागराजदादा आलेला सांगितले आणि कायतरी पिक्चर काढाणारे म्हणे तर मला काम करायला पाठवशील का हे विचारत होता. तशा "अय्या खरंच" दोघी एकदमच किंचाळल्या. "ए मग तु हिरोईन झलीस की आम्हाला नाही ना विसरणार? " आणि "हिरो कोण आहे ?" "काय नाव पिक्चरचं?" प्रश्नाचं मोहोळ माझ्या मागे लावले. अगं अजुन कशात काय नाही मलाच माहित नाही तर तुम्हाला काय सांगु.

जागली स्पंदने नवी नवी

रातराणी ·
काव्यरस
आमची प्रेरणा: स्पंदन, सांजवेळ, हृदय, अवचित, मन, मोहरणे वगैरे शब्द इकडून तिकडे गुंफले की आजकाल मराठी रोमँटिक गाणं तयार होतं. बावरे प्रेम हे या पंचनाम्यात समीरसूर यांनी आधुनिक गीत लेखकांवर असे ताशेरे ओढलेले पाहून अंमळ डचमळून आले. त्याचा निषेध म्हणून लगोलग एक गीत लिहून काढले.

आठवतेय का?

रातराणी ·
आठवतेय का? पावसातली पहिली भेट धुक्याची दुलई पांघरूण लपुन बसलेली वाट आणि तोल जाता जाता तू हाती घेतलेला हात ओल्या गवताळ मातीचा थंड हुळहुळता स्पर्श आणि भिजल्या पापण्यात तुझ्या श्वासांची ऊब मला उगीच असलेली घरी जायची घाई आणि तुझ्या आर्जवात शहारलेली जाईजुई डोळ्यांनीच दिलेघेतलेले कितीतरी मुके निरोप आणि परतीच्या वाटेवर हरवलेली दोन मनं आठवतेय ना? पावसातली पहिली भेट

त्याची आठवण,

ज्ञानोबाचे पैजार ·
त्याची केव्हाही आठवण आली तरी, सर्वांगावर सरकन् काटा येतो, डोक्यावरचा केस न केस उभा रहातो, आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो, अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर, जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर, कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले, याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले, तो आहेच असा भितीदायक, आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक, मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची, नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची, वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा, पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा, किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले, पण याच्या समोर

वणवा

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
सुखाचा संसार फुलवु नये कुणी एखाद्याच आयुष्य माती मोल करुन . . नर्सरीत सुरक्षित जीवन जगण्या-या गुलाबाला काय तमा? जंगलातल्या वणव्यात भाजणा-या रान फुलांची