Mobile

लेखनविषय:
काव्यरस
तू माझ्या mobileवर call करायचीस , मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस तू माझ्या mobileवर call करायचीस , मध्य -रात्री माझं प्रेम मागायचीस माझा mobile जेव्हा vibrate ह्यायचा , अर्थ त्याचा फक्त एकच असायचा तुझा देह माझं प्रेम मागायचं आवाजही मझा देहाला तुझ्या शांत करायचा जेव्हापासून शहर तुझ मी सोडलं , तू बरंच नावलौकीक मिळवलं सर्वांना माहितेय , तू मला रिकामं सोडलं प्रिये ,जिंदगीला माझ्या तू वाळवांट केलं जेव्हापासून शहर तुझ मी सोडलं , Whatsapp तुझं contact list न भरलं रात्रंदिवस vedio calling तुझ्या संग नव्या पोरांसोबत पार्ट्यात तू गुंग .... तू माझ्या mobileवर call करायचीस , मध

मी

लेखनविषय:
काव्यरस
मी नशिले फुलपाखरु, जे वार्यावर भिरभिरते... मी शितल जल मृगजळीचे वाळुत ही खळखळते... ढगाळलेल्या आभाळागत आसमात गडगडते... कळ्या कळ्यातुन फुलांबरोबर अशीच मी बडबडते... मी अबोली पाऊलवाट रानावनांतुन भिरभिरते. मी नवेली एक पहाट फुलाफुलांतुन उलघडते.. कधी धुंद धुंद या पावसात मी चिंबचिंब भिजुनी जाते... कधी मंद मंद ही चांदरात मी स्वप्नगंध देऊन जाते... तार्यांसवे लखलखते मी मोत्यांसवे चमचमते मी कधी अडखळते मी, धडपडते मी तरी पुन्हा पुन्हा सावरते मी सांभाळ जरा स्वत:ला      ही प्रित माझ्या मनाची... जाणुन घे रे मजला      मी रीत नवी जगण्याची...

बायको गेली माहेरी..

बायको गेली माहेरी,आलो मी मिपावरी परी कर्तव्याची दोरी, आता गळ्यात आहे. कळले आहे तिला, नवरा मिपा खुळा मारून एक खिळा, ती गेली आहे दिसाल जर ऑन-ला-ईनं, लगेच फोन-मारीनं! (दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

काव्यरस
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

लढा

लेखनविषय:
काव्यरस
ते आले आणि वार केले मी धडपडलो पण भ्यालो नाही अपमान पचवु कसा म्हणत उगा मद्य प्यालो नाही केली त्यांनी अफाट निंदा मी मुळीच बधलो नाही दिखाव्याच्या प्रतिष्ठेसाठी दिखाऊपणे वदलो नाही उष्ण झळा येत गेल्या कोमेजलो पण हरलो नाही मनाला चटके बसले तरी काळजामधे झुरलो नाही सोसुन सारा ऊन-वारा नियतीशीही झुंजत राहीन खंबीरपणे उभा राहुन पहाडाशीही टक्कर घेईन आघात तर होतच राहतील लोक हसुन मजा पाहतील पाहणाऱ्यांना पाहु द्यावे आपण पुढे चालत राहावे रडणार नाही कुढणार नाही त्याचाच भाव चढा असेल आणि बेडरपणे पुढे जाणे हाच खरा लढा असेल - शार्दुल हातोळकर

कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं आता फक्त ऑफिस की हो उरलं! मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर. कोण नाही पर्वा करायला कुठं कुठं जाऊ मी सांगायला? थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला! रात्रभर एकटा बसू कसा? क्लायंटला अडचण सांगू कसा? बाकीचे सारे, प्रोफेशनल खरे जातात टायमात ते घरला! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? जमेल तेवढं खेचून मी काम नाही केला आजिबात आराम सकाळ

माझी मस्तानी

लेखनविषय:
‘बाजीराव-मस्तानी’ सिनेमा पाहताना ही मुसमुसत होती, मस्तानी जगताना. ठरवले ह्याच क्षणी सांगावे हिला मनोगत सहज पूर्ण होईल जीवनाचे मनोरथ. “मी पण आणू म्हणतो मस्तानी आपल्या आयुष्यात” फक्त पुढचे काही क्षण गेले मौनात, मा‍झ्या जीवनात. डोळे बरसू लागले तोफ गोळे आणि जिव्हा, तप्त लाव्हा ‘मुलुख मैदानी’च्या वर्षावात सर्व झाले स्वाहा. बाळगा जरा मनाची, असलं काही बोलायला, पोरीचे हात पिवळे करायचे, तर निघाले तोंड काळे करायला.

याद

लेखनविषय:
काव्यरस
तुझी याद अशी , अमावसेच्या रातीला येते अन रातीसारखच माझ मन अंधारागत करून जाते डोळ्यावरची झोप , रुसून जाते अन बेचैन हृद्यायला खवळत सुटते सुटलेले क्षण , Chat History मध्ये शोधते हरवलेले मन , तुझ्या प्रतीमात हरवते डोळे असेच screen समोर , मग हळूच ओले होतात अन सकाळची सूर्यकिरणे , ऑफिसला जाण्याची साद देतात ........

'नो बॉल'

लेखनविषय:
काव्यरस
आपण व्यर्थ शृंखलेत बरबाद झालो खोलीची पर्वा न करता दरीत पडलो एका चुंबनाने दोघ मोहजालात अडकलो एक प्रेम ज्याला नाकारू नाही शकलो आजन्म बोलू नकोस , की तू असच सोडलं , मरेपर्यंत हवीये तू मला …. मृगजळाच्या मागे धावयचा नाही मला , मरेपर्यंत हवीये तू मला …. 'नो बॉल' सारखा आलोय तुझ्याकड , सडकून मैदानाबाहेर पाठवू नकोस मला तुझ्या 'क्रीझ' जवळ यायचा होता पण तू 'extra hit 'ला ही सडकलं आभाळाच्या ही वरती तुला मी चढवलं आत्ता तुझे डोळे खाली बघायला हि लाजल सारच बदलल, तू माझ्या मनाला जाळलं अन त्याच राखेत जमिनीवर प्रेम अडकलं आजन्म बोलू नकोस , की तू असच सोडलं , आजन्म हवीये तू मला ….

अनुभव

लेखनविषय:
काव्यरस
अनुभव अनुभव हा अनुभव असतो. प्रत्येकाचा वेगळा असतो. अनुभव सुखद असतो किवा दु:खद असतो. दु:खद अनुभव आयुष्यावर काळी छाया पसरवतो सुखद अनुभव आयुष्याला सोनेरी किनार देतो. सुखद अनुभव थकल्या जीवाला आसरा देतो, मनावर फुंकर घालतो. मलाच दु:खद अनुभव का म्हणून विचारू नये. दु:खद अनुभव दुसऱ्याला का नाही म्हणून खंतावू नये. कोणता अनुभव मिळेल हे आपल्या नशिबावर अवलंबून असते. मित्रानो, प्रत्येक अनुभव घेत जावे. प्रत्येक अनुभवातून शिकत जावे. दु:खद अनुभव तुम्हाला शिकवतो. सुखद अनुभव विकार वाढवतो. दु:खद अनुभवाने खचू नका. सुख - दु:ख हे निसर्गाचे चक्र आहे. देवही एव्हडा निष्टुर नाहीये. त्याच्याकडे सोसायला बळ म
Subscribe to कविता माझी