मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता माझी

५. दुष्काळ झळा ... रानातली वाट..

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
बर्‍याच दिवसानी पुन्हा थोडे कवितेत लिहावे म्हणतोय .. आवडले तर सांगा... चोचभर दाण्यासाठी वेशी बाहेर पाखरं टीचभर पोटासाठी घर उंबर्याशी वैर || पाणी आटलं डोळ्यात शेत जळलं रानात पोर धाडलं शरात गाव दुष्काळ पिडित || दारातली तुळस, कधीच.. कोरडी फट्ट काळी... हं, गोठ्यातली गाय, कत्तल खाण्यात कापली... पांढर्‍या रानागत, गावपोरींची कपाळं...दादल्यांनी त्यांच्या, होता जेंव्हा आवळला फास... शेतकरी हा अन्नदाता, हे सगळंच झुट... त्याच्या दाताखाली अन्नाचा, कुठ हाय तपास... शासनाची पांढरी बुजगावनी, फिरतात कधी शेतात..

सुख

चांदणे संदीप ·
हरवलेले ते सापडले सापडले हरवल्यानंतर हरवले सापडण्याआधी      कळाले सापडल्यानंतर! तेच होते ते जरी ते न राहिले तसे तरी हवे होते ते तसेच तेव्हा      कळाले सापडल्यानंतर! भाव पुसा बाजाराला दाम जरी ना लाविला अनमोल ते आहे खरे      कळाले सापडल्यानंतर! शब्दांचा ना लागे ठाव जरी दोन अक्षरांचा गाव 'सुख' म्हणती सारे त्याला      कळाले सापडल्यानंतर! - संदीप चांदणे

नवोदित कवी

हरिदास ·
लेखनविषय:
काव्यरस
नकोत मजला टाळ्या चुटक्या वाहवाही अन मान बढाई कोऱ्या पाट्या तुमच्या आमच्या रसिक आपुली बाप नि आई कुणी कल्पतो आकाशगंगा कुणी वर्णीतो प्रीत पतंगा नाद कुणासी विठू रायाचा रंगून जातो भलत्या रंगा अलंकारे सजवी कुणी कविता कुणाची वाहे दुःख सरिता भलत्या भलत्या कल्पना स्फुर्ती शब्द निराळे भाव पेरिता नवकवी मीही धडपड करतो फाटके तुटके शेले विणतो तुमच्या दारी हात जोडुनी कृपाप्रसादा निशिदिनी झुरतो रांगत्या मुलासी उचलुनी घ्यावे अनुभव अंजन नयनी दयावे तुम्हीच दावा चूक आमुची दिशा दावूनी मार्गस्थ करावे शब्दास शब्दांनी न्याय मिळावा नवजात प्रवाहे सहज रुळावा कल्पवृक्ष हा बहरत राहो नव्या कळ्यांनी सदा फ़ुलावा :हरिदास

टाकटोकावली

नाखु ·
अगतगडमतर्रर्रमताशा ढोलबडवीभाऊबत्ताशास्वारीमर्जीखाशा वाटास्त्वर्खिरापती बेल्भंडारासूचक्मौन पोकळवासाभीकडोहाळे भाळीफुपाटी रेखीजाण्यतेराखीचिल्लरगौण नवनीतीशिंकाळे सल्लजाकुचंबीतनिसर्गबंधीत चिंताभीषण्कळीकांची हायखाउदेनिसर्गकुंठा दूरांदाजीकचराकोंडीजलपर्णी शांत्पहाराखुशीतगाजर नजरर्घड्याळीहितवरकर्णी निवडणुकीचा ‘संकल्प’

एकांत

मीनादि ·
लेखनविषय:
काव्यरस
हवा मज एकांत बेबंध धुंद, आणि शांत स्व:ताचीच ओळख नव्याने करण्यास, भूतकाळच्या जखमेवर खपली धरण्यास . जगापासून अलिप्त होण्यास, स्वताच्याच कोशात लुप्त होण्यास. अंतर्मुख झालेल्या मनाला टोचणी घडलेल्या चुकांची, समजुतीची झालर फाटक्या दु:खाची. करून टाकावा निचरा कोरड्या मनाने, पुन्हा नवीन भवितव्यासाठी.

पाटी

मीनादि ·
लेखनविषय:
काव्यरस
असावी एक चुका पुसणारी पाटी ठरेल ती उ:शाप प्रत्येकासाठी खदखदणारे दु:ख घडलेल्या चुकांचे ओघळले डोळ्यातून अश्रू पश्यातापाचे नकळत घडलेल्या चुका करतात आपुलाच घात मानाने मनावर केलेली खोटी मात वेळ निघून गेल्यावर सार काही कळत पण उपयोग नसतो त्याचा हेच दु:ख छळत खाडाखोड होत नाही घडलेल्या भूतकाळाची पण जगन तर सुटत नाही ओढ असते भविष्याची पुसाव्यात ह्या चुका आणि स्वच्छ करावी पाटी कारण चुकतो तो माणूस हेच कारण जगण्यासाठी.

बालपण

मीनादि ·
लेखनविषय:
काव्यरस
रम्य ते बालपण , रम्य ते सोहळे रम्य तो काळ अन दिवस ते कोवळे नवी भरारी नव आकाश अज्ञानाचे डोह अन मोहाचे पाश सावरावे किती अन कसे जीवाला, लागते ओढ ही किती मनाला. वास्तवाची झळ नसे पुसटशी. इवलाश्या त्या बालमनाला अखंड असावे हे दिवस निरंतर, प्रत्येकाच्या नशिबाला

आठवणी

मीनादि ·
लेखनविषय:
काव्यरस
आठवणींचा भार ना हलका होई कुणाचा, आयुष्य जगताना जरा विसर पडे त्याचा . कधी ना पुसे ठसे आठवांचे, ते आहेतच ऋणानुबंध गतजन्माचे. कधी हासू , कधी आसू तरीही हव्याहव्याश्या वाटणाऱ्या, नकळत न सांगता क्षणक्षणाला जोडणाऱ्या नसत्या जर ह्या आठवणी तर काय असते आयुष्यात, आहे अनमोल ठेवा हाच प्रत्येकाच्या प्रारब्धात.

पांढरा दिवस

सुरवंट ·
लेखनविषय:
काव्यरस
बशीतून चहा पिताना फार बरे वाटते हातात घेतलेल्या कपाला मग बाजूला ठेवावे लागते नाष्ट्याला पोहे असल्यास तोंडाला पाणी सुटते चटणीवर दही घेऊन मग लोणचं खाऊ वाटते बुट घालून झाल्यावर गाडीला किक बसते कितीही हॉर्न वाजवला तरी एखादी कार मध्येच घुसते दिवस डोक्यावर येतो सुर्यनारायणाची भट्टी तापते वेगळ्या अँगल मधून पाहिल्यास दुपारची काशी होते घरी आल्यावर मला माझी कविता म्हणते मालक बशी फुटली, तसं कपातून चहा पितानाही फार बरे वाटते