मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वादळ

पाषाणभेद ·

गणेशा Fri, 06/12/2020 - 16:33
आणि मग.. घरात साठलेला पाऊस मनात साठत नाही... मनालाही त्याचे काही अप्रूप राहत नाही... पडलेल्या भिंती.. उडालेले छप्पर.. काहीच उरत नाही.. रात्र ओली दुःखाची अन दिवस सरत नाही...

गणेशा Fri, 06/12/2020 - 16:33
आणि मग.. घरात साठलेला पाऊस मनात साठत नाही... मनालाही त्याचे काही अप्रूप राहत नाही... पडलेल्या भिंती.. उडालेले छप्पर.. काहीच उरत नाही.. रात्र ओली दुःखाची अन दिवस सरत नाही...
लेखनविषय:
छप्पर उडून गेल्यानंतर पाऊस घरात येतो तोंडचा घास नाहीसा होतो भणाणता आलेले वादळ सारं उध्वस्त करीत जातं वाटेत येईल ते पाडत जातं मग ते काहीही असो घर खांब छप्पर झाड माड आणि मनही.

तू ठरव...

सत्यजित... ·

खिलजि Mon, 06/01/2020 - 17:17
एक नंबर बहारदार , लाकडाउन स्पेशल कविता ========================== काहीतरी द्यायचे ठरवले देण्यासाठी हात खिशात गेले मी रिता आधीच होतो हे मजला नंतर समजले

सत्यजित... Fri, 06/05/2020 - 07:59
बिरुटे सर,खिलजी,मदणबाण,प्रमोदजी,गणेशा,वीणा,रातराणी,मन्या,श्रीगणेशा,सर्वांचे मनापासून आभार!

खिलजि Mon, 06/01/2020 - 17:17
एक नंबर बहारदार , लाकडाउन स्पेशल कविता ========================== काहीतरी द्यायचे ठरवले देण्यासाठी हात खिशात गेले मी रिता आधीच होतो हे मजला नंतर समजले

सत्यजित... Fri, 06/05/2020 - 07:59
बिरुटे सर,खिलजी,मदणबाण,प्रमोदजी,गणेशा,वीणा,रातराणी,मन्या,श्रीगणेशा,सर्वांचे मनापासून आभार!
लेखनविषय:
तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही हात घे हातात आधी,आरसा नाही! टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा फायदा नात्यात आता फारसा नाही! एवढा केला खुबीने खूनही माझा वारही केला असा जो वारसा नाही! सांगतो आहे जगाला कोण हा वेडा! मी असा नाही असा नाही असा नाही! कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना एवढीही या मनाला लालसा नाही! तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही... —सत्यजित

ढासळला वाडा

पाषाणभेद ·

पाषाणभेद Fri, 05/29/2020 - 12:44
(या वरूनच सुचलेल्या आगामी आकर्षणाची झैरात येथेच उरकून घेतो. :-) . ) (लॉकडाऊनमुळे एकाच स्क्रिनवर खेळ दाखवण्यात येईल. तिकीट दर जास्त असू शकते. त्वरा करा अन थेटरमध्येच पहा.) नुकतेच गावी जाणे झाले. या असल्या बँकेच्या बदली असणार्‍या गावातल्या एकटे राहण्यामुळे मुळ गावी आताशः जाणे होत नाही. अन त्यात माझी बदली मध्यप्रदेशातल्या गुना या जिल्ह्यातील एका खेडेगावी. खेडेगाव अगदीच आडमार्गाला असल्यामुळे तेथे सामान्य सुविधादेखील नव्हत्या. केवळ प्रमोशन टाळायचे नव्हते म्हणून ही बदली स्विकारली. मोठा दुद्दा मिळाला पण त्यासाठी कुटूंबाला नागपूरलाच ठेवावे लागले. मोठा मुलगा इंजिनीअरींगला नागपूरलाच होता. लहानगीचे कॉलेज, मिसेसचा खाजगी शाळेतील जॉब नागपूरलाच असल्याने त्यांना नागपूर शहर सोडवत नव्हते. मी देखील इतक्या दुरवरून प्रत्येक आठवड्यातून अप डाऊन करणे टाळत होतो. एकतर प्रवासाची दगदग मला आता या रिटायरमेंटच्या वयात सहन होत नाही. अन दुसरे म्हणजे ट्रेनचा सरळ रूट नाही. बस किंवा इतर वाहनांनी मला प्रवास सहन होत नाही. त्यामुळे महिन्या दिड महिन्यात मी नागपूरला चक्कर मारत असे. - क्रमशः

चित्रगुप्त Fri, 05/29/2020 - 15:18
कविता आवडली. कधीकाळी वैभवशाली असलेल्या उत्तुंग इमारती आता पडक्या अवस्थेत बघणे खेदजनक खरेच, पण त्यातही एक आगळे सौंदर्य असते. या इमारती म्हणजे " नव्या पिढीच्या खांद्यावर बळजबरी ओझे" नसून अभिमानाने, कसोशीने जपण्याचे वैभव असते, हे युरोपातील प्रत्येक गावा-शहरात बघून जाणवते. . . . .

पाषाणभेद Fri, 05/29/2020 - 12:44
(या वरूनच सुचलेल्या आगामी आकर्षणाची झैरात येथेच उरकून घेतो. :-) . ) (लॉकडाऊनमुळे एकाच स्क्रिनवर खेळ दाखवण्यात येईल. तिकीट दर जास्त असू शकते. त्वरा करा अन थेटरमध्येच पहा.) नुकतेच गावी जाणे झाले. या असल्या बँकेच्या बदली असणार्‍या गावातल्या एकटे राहण्यामुळे मुळ गावी आताशः जाणे होत नाही. अन त्यात माझी बदली मध्यप्रदेशातल्या गुना या जिल्ह्यातील एका खेडेगावी. खेडेगाव अगदीच आडमार्गाला असल्यामुळे तेथे सामान्य सुविधादेखील नव्हत्या. केवळ प्रमोशन टाळायचे नव्हते म्हणून ही बदली स्विकारली. मोठा दुद्दा मिळाला पण त्यासाठी कुटूंबाला नागपूरलाच ठेवावे लागले. मोठा मुलगा इंजिनीअरींगला नागपूरलाच होता. लहानगीचे कॉलेज, मिसेसचा खाजगी शाळेतील जॉब नागपूरलाच असल्याने त्यांना नागपूर शहर सोडवत नव्हते. मी देखील इतक्या दुरवरून प्रत्येक आठवड्यातून अप डाऊन करणे टाळत होतो. एकतर प्रवासाची दगदग मला आता या रिटायरमेंटच्या वयात सहन होत नाही. अन दुसरे म्हणजे ट्रेनचा सरळ रूट नाही. बस किंवा इतर वाहनांनी मला प्रवास सहन होत नाही. त्यामुळे महिन्या दिड महिन्यात मी नागपूरला चक्कर मारत असे. - क्रमशः

चित्रगुप्त Fri, 05/29/2020 - 15:18
कविता आवडली. कधीकाळी वैभवशाली असलेल्या उत्तुंग इमारती आता पडक्या अवस्थेत बघणे खेदजनक खरेच, पण त्यातही एक आगळे सौंदर्य असते. या इमारती म्हणजे " नव्या पिढीच्या खांद्यावर बळजबरी ओझे" नसून अभिमानाने, कसोशीने जपण्याचे वैभव असते, हे युरोपातील प्रत्येक गावा-शहरात बघून जाणवते. . . . .
काव्यरस
खालील फोटो पाहून सुचलेली कविता: ढासळला वाडाफोटो सौजन्य: फेसबूक पेज ऑफ ALDM Photography, Pune ढासळला वाडा ढासळला वाडा, पडक्या झाल्या भिंती उगवल्या बाभळी त्यातून काटेच पडती सरकले वासे, खिडक्यांनी जागा सोडल्या दरवाजे करकरूनी, कड्या कोयंड्या तुटल्या टणक होते जूनेर ल

डाग

कौस्तुभ भोसले ·
लेखनविषय:
त्या रात्री त्याला चंद्रावरचा डाग स्पष्ट दिसला. आणि मग त्यानं घट्ट मिटून घेतली खिडक्यांची दार... सताड उघडी ठेवली भयाण काळोखात नयनांची कवाडं... त्या स्मशान शांततेत निर्दयीपणे ओढल्या त्याने रक्ताळलेल्या रेघा आपल्याच हातावर आणि मग पुन्हा पहाटच झाली नाही... -कौस्तुभ

वणवा

कौस्तुभ भोसले ·
लेखनविषय:
काव्यरस
असा पेटतो वणवा उरी घर्षती झाडे, आणि भणानून उठती दु:खाचे धूसर वाडे. रात्र वेशीला अडली अंधारच इथे सजलेला, अग्नीच्या तप्त तमांतून मोगरा कसा भिजलेला? कुणी हाक देऊनी स्वर्गी वणवा असा रोखावा, वनमेघ दाटूनी विवर्त वळीवाचा पाऊस यावा. -कौस्तुभ

प्राणवेळा

कौस्तुभ भोसले ·
लेखनविषय:
काव्यरस
आठवांच्या काळवेळा पाहिल्या. हृदयाच्या प्राणवेळा पाहिल्या. मालवेणा चंद्र भोळा कालचा. कालच्या या चांदण्याही राहिल्या. सोसली मी ही तमांची अंतरे. रात्र काळी झाडपाने मंतरे. गारव्याने जाग आली या फुला. पाकळ्यांच्या गंधपेशी दाहिल्या. प्राण झाले कातिलांचे सोबती. सांग हे का माणसाला शोभती ? वाचण्याचे मार्ग सारे संपले. शेवटाला प्रार्थना मी वाहिल्या. -कौस्तुभ वृत्त - मालीबाला

परकीमिलन

माहितगार ·

कवितेत शिरकाव ? भारी. :) लिहिते राहा सेठ. विडंबनातील भावना पोहोचल्या. पण विविधतेत एकता आपला हा खरा चेहरा आहे. -दिलीप बिरुटे

कवितेत शिरकाव ? भारी. :) लिहिते राहा सेठ. विडंबनातील भावना पोहोचल्या. पण विविधतेत एकता आपला हा खरा चेहरा आहे. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
नशिबात ग्रहण संपणे का अजून नाही गरळही देशद्रोहाची का भरात भारतात येत राही शतकोशतके परहीत बेतशिजे अखंडीत खंडीत बोली नयनांत देशद्रोहींच्या समज दिसणार नाही अत्याचार पाशव्यांचा झेली कशी भारतमाता संततीच देशतोडी साही कशी ती त्यांना? हिंदूपणाच्या मरणाला थांबवेल आता कशी ती झाकूनही दिसावी त्या जखमेस लपवेल कशी ती? देशद्रोही मवाली तुळशीसही फुस लावी अंगणात परकीयांच्या का रुजले नवीन धागे ? भारतीय एकंघतेच्या द्वेषाचे दु:श्वास घोंघावत रहाती मोहात लेकांच्या अप्पल्पोटेपणाच्या गेले असे बळी ती क्रिया त्यांच्या परभू भारतीय स्वातंत्र्याचा घात होई भूंकारवे मोहलुच्च्या सिक्युलरमुखे परकी बांग ऐकू देई परप्रेमा

दसरा

शिव कन्या ·

गणेशा Wed, 10/09/2019 - 14:00
मस्त. दसर्यावर चे मेसेज वाचुन बोर झालो होतो, तसेच काहीसे असेल म्हणुन उघडली पण नव्हती कविता. पण काय मस्त लिहिले आहे ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो वा वा

गणेशा Wed, 10/09/2019 - 14:00
मस्त. दसर्यावर चे मेसेज वाचुन बोर झालो होतो, तसेच काहीसे असेल म्हणुन उघडली पण नव्हती कविता. पण काय मस्त लिहिले आहे ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो वा वा
जगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो रणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो सोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी बलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शिवकन्या

संध्याकाळी तू गंगेतीरी

शिव कन्या ·

In reply to by जॉनविक्क

शिव कन्या Sun, 09/01/2019 - 20:09
समुद्र आपली मर्यादा ओलांडून वाट शोधेल का? नाही. गंगा कधी उलटी वाहील का? नाही. पण तिला वाटते हे असे अघटीत काहीतरी घडावे, आणि त्याची भेट व्हावी.

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला सांग ना तुलाही असेच वाटते ना कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा... खास. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by जॉनविक्क

शिव कन्या Sun, 09/01/2019 - 20:09
समुद्र आपली मर्यादा ओलांडून वाट शोधेल का? नाही. गंगा कधी उलटी वाहील का? नाही. पण तिला वाटते हे असे अघटीत काहीतरी घडावे, आणि त्याची भेट व्हावी.

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला सांग ना तुलाही असेच वाटते ना कुठूनतरी समुद्राने वाट काढावी नाहीतर गंगेने पदर उलटा करावा चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा... खास. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना.....

देवघर

शिव कन्या ·

जॉनविक्क Mon, 08/19/2019 - 22:39
फक्त ही सांस्कृतिच आता परकी वाटावी इतका बदल स्वत: मधे झालेला असल्याने, संपूर्ण वृध्दत्व येत नाही तोपर्यंत हे काव्य काळजाला भिड़ेल असे वाटत नाही.

In reply to by जॉनविक्क

माहितगार Sat, 08/24/2019 - 09:07
सहज सुचलेला एक विचार देवघर शेवटी एक आदर्शांचा श्रद्धायुक्त अल्बम असते का ? देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी.

In reply to by माहितगार

जॉनविक्क Sat, 08/24/2019 - 12:52
आवेनजर्स वास्तव्यास आहेत ना. उद्या तिथं रामकृष्ण परमहंसही असू शकतील. बस देवघर रिकामे नसावे इतकेच काय ते आवश्यक, अर्थात तसे ते कधीच नसते पण नास्तिकतेचा माजोरडेपणा तो भासही निर्माण करतो कधी कधी

In reply to by जॉनविक्क

सर टोबी Sat, 08/24/2019 - 15:00
हे काय असतं? माजोरडेपणा हा जर पाशवी शक्तीचा अविष्कार असेल तर नास्तिकांकडे ती कोणत्या स्वरूपाची असते? त्या उलट श्रद्धेची दुकानदारी करणारे आणि नास्तिक यांच्या युद्धामध्ये नास्तिकांच्याच आहुत्या पडल्या आहेत. नास्तिकता म्हणजे श्रद्धेचा अभाव असे नसावे. अन्यथा दररोजच्या व्यवहारात विश्वास ठेवणारे सर्वच जण श्रद्धाळू असायला हवे. पण तसे नसते. नास्तिक आपल्याला आपल्यातीलच विरोधाभासाची आठवण करून देतात. एकीकडे मोठ्याने ओरडून केलेल्या प्रार्थनेपेक्षा मूक आक्रोश देवाला ऐकू येतो असे म्हणायचे, मुंगीच्या पायात चाळ बांधला तरी देवाला तो ऐकू येतो असे म्हणायचे आणि ठणाणा करणाऱ्या आरत्या आणि काकड आरत्या करीत लोकांची झोपमोड करणे, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल असे वागायचे हे 'सो कॉल्ड' नास्तिकच तुम्हाला सांगतात.

खिलजि Tue, 08/20/2019 - 15:21
मस्त लिवलंय .. जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. खासकरून कोकणातल्या घराच्या .. मी महिन्यात आम्ही सर्व भावंडे तिथे अंगणात सर्व स्तोत्रे म्हणायचो .. मला वाटत दहा पंधरा वर्षे तिथे आम्ही दरवर्षी दंगा करायचो पण आता सर्व जण शहरात स्थायिक झाले आणि ते भलेमोठे घर , त्यासमोरच अंगण , वृंदावन असेच ओस पडले आहे .. तिथे तुळस लावली जाते पण ती फक्त गणपतीत आणो होळीच्या सणालाच.. नाहीतर तिथे पूर्ण शुकशुकाट असतो ... कधी पुन्हा उजळेल सारे ? कधी उतरतील त्या अंगणात तारे ? कधी भिनेल गगनात स्तोत्र ध्वनी ? कधी बैसेल ती अनोखी पंगत पुन्हा अंगणी ? तूच तर आहेस त्या सर्वांचा उदगाता निर्माता तूच घडविलेस सर्व पसारे अन नजारे तूच दिलेस कैक आशीर्वाद तूच दिल्या या अनमोल ठेवी आम्हा लोचनी पुढारलो कि सुधारलो ते तूच जाणे पण मी अजूनही तिथेच लोळतो जिवंतपणी दे , कधीतरी पुन्हा दे करून जवळ त्या भूतकाळाला ओढ अनामिक ती हृदयात कायम राहिली

नाखु Tue, 08/20/2019 - 20:54
निव्वळ अफलातून आहे. समजतेय असं वाटेपर्यंत निसटतेय आणि निसटताना समजतेय अशी अवस्था झाली आहे. मिपावर बाजूनेच निसटणारा सरधोपट वाचकांची पत्रेवाला नाखु

माहितगार Sat, 08/24/2019 - 08:25
कविता आवडली, नीटशी समजण्यासाठी बर्‍याचदा वाचावयास लागली (की अजून नीटशी समजली नाही असा प्रश्नही मनात येऊन गेला.)

In reply to by जालिम लोशन

माहितगार Sat, 08/24/2019 - 10:05
मला दोन रूपकांची शक्यता जाणवतेय - एक 'आज्जी किंवा आजोबा' या व्यक्तीरेखेचे किंवा दुसरे खूप काही वेगळे रूपक जाणवतयं -शिवकन्येनीच लिवल्यावर काय?-(स्पष्ट बोलण्याची हिम्मत नै बा आपल्यात) ज्याचे रूपक असेल ते अप्रतिम हे नक्की

जॉनविक्क Mon, 08/19/2019 - 22:39
फक्त ही सांस्कृतिच आता परकी वाटावी इतका बदल स्वत: मधे झालेला असल्याने, संपूर्ण वृध्दत्व येत नाही तोपर्यंत हे काव्य काळजाला भिड़ेल असे वाटत नाही.

In reply to by जॉनविक्क

माहितगार Sat, 08/24/2019 - 09:07
सहज सुचलेला एक विचार देवघर शेवटी एक आदर्शांचा श्रद्धायुक्त अल्बम असते का ? देवघरात नव्या श्रद्धांचे नवे देव जोडल्यास ? लोक तसे न ठरवताही करतच असतात, सांस्कृतिक समस्येचे निदान होत असेल तर ठरवून नवे अल्बम बनवून घेण्यास काय हरकत असावी.

In reply to by माहितगार

जॉनविक्क Sat, 08/24/2019 - 12:52
आवेनजर्स वास्तव्यास आहेत ना. उद्या तिथं रामकृष्ण परमहंसही असू शकतील. बस देवघर रिकामे नसावे इतकेच काय ते आवश्यक, अर्थात तसे ते कधीच नसते पण नास्तिकतेचा माजोरडेपणा तो भासही निर्माण करतो कधी कधी

In reply to by जॉनविक्क

सर टोबी Sat, 08/24/2019 - 15:00
हे काय असतं? माजोरडेपणा हा जर पाशवी शक्तीचा अविष्कार असेल तर नास्तिकांकडे ती कोणत्या स्वरूपाची असते? त्या उलट श्रद्धेची दुकानदारी करणारे आणि नास्तिक यांच्या युद्धामध्ये नास्तिकांच्याच आहुत्या पडल्या आहेत. नास्तिकता म्हणजे श्रद्धेचा अभाव असे नसावे. अन्यथा दररोजच्या व्यवहारात विश्वास ठेवणारे सर्वच जण श्रद्धाळू असायला हवे. पण तसे नसते. नास्तिक आपल्याला आपल्यातीलच विरोधाभासाची आठवण करून देतात. एकीकडे मोठ्याने ओरडून केलेल्या प्रार्थनेपेक्षा मूक आक्रोश देवाला ऐकू येतो असे म्हणायचे, मुंगीच्या पायात चाळ बांधला तरी देवाला तो ऐकू येतो असे म्हणायचे आणि ठणाणा करणाऱ्या आरत्या आणि काकड आरत्या करीत लोकांची झोपमोड करणे, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होईल असे वागायचे हे 'सो कॉल्ड' नास्तिकच तुम्हाला सांगतात.

खिलजि Tue, 08/20/2019 - 15:21
मस्त लिवलंय .. जुन्या आठवणी जाग्या झाल्या .. खासकरून कोकणातल्या घराच्या .. मी महिन्यात आम्ही सर्व भावंडे तिथे अंगणात सर्व स्तोत्रे म्हणायचो .. मला वाटत दहा पंधरा वर्षे तिथे आम्ही दरवर्षी दंगा करायचो पण आता सर्व जण शहरात स्थायिक झाले आणि ते भलेमोठे घर , त्यासमोरच अंगण , वृंदावन असेच ओस पडले आहे .. तिथे तुळस लावली जाते पण ती फक्त गणपतीत आणो होळीच्या सणालाच.. नाहीतर तिथे पूर्ण शुकशुकाट असतो ... कधी पुन्हा उजळेल सारे ? कधी उतरतील त्या अंगणात तारे ? कधी भिनेल गगनात स्तोत्र ध्वनी ? कधी बैसेल ती अनोखी पंगत पुन्हा अंगणी ? तूच तर आहेस त्या सर्वांचा उदगाता निर्माता तूच घडविलेस सर्व पसारे अन नजारे तूच दिलेस कैक आशीर्वाद तूच दिल्या या अनमोल ठेवी आम्हा लोचनी पुढारलो कि सुधारलो ते तूच जाणे पण मी अजूनही तिथेच लोळतो जिवंतपणी दे , कधीतरी पुन्हा दे करून जवळ त्या भूतकाळाला ओढ अनामिक ती हृदयात कायम राहिली

नाखु Tue, 08/20/2019 - 20:54
निव्वळ अफलातून आहे. समजतेय असं वाटेपर्यंत निसटतेय आणि निसटताना समजतेय अशी अवस्था झाली आहे. मिपावर बाजूनेच निसटणारा सरधोपट वाचकांची पत्रेवाला नाखु

माहितगार Sat, 08/24/2019 - 08:25
कविता आवडली, नीटशी समजण्यासाठी बर्‍याचदा वाचावयास लागली (की अजून नीटशी समजली नाही असा प्रश्नही मनात येऊन गेला.)

In reply to by जालिम लोशन

माहितगार Sat, 08/24/2019 - 10:05
मला दोन रूपकांची शक्यता जाणवतेय - एक 'आज्जी किंवा आजोबा' या व्यक्तीरेखेचे किंवा दुसरे खूप काही वेगळे रूपक जाणवतयं -शिवकन्येनीच लिवल्यावर काय?-(स्पष्ट बोलण्याची हिम्मत नै बा आपल्यात) ज्याचे रूपक असेल ते अप्रतिम हे नक्की
देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या