एका वर्सात
एका वर्षाच्या बाद अकोल्यात येऊन रायलो परवाच्या दिवशी,
अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ?
अजून बी पिकवित लोक सकाळी फिराले जात असतीन काय?
दिवसभर मंग धूळ्ला खायाले तयार होत असतीन काय?
च्या प्याले कप देतात, का अजूनही वापरतात बशी?
अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ?
अजून बी दुपारच्या जेवनाले मंग वांग्यावर तर्री असते काय?
गरमागरम वरणभातावर तुपाची धार खरी असते काय?
इंजेक्शनवालं दुध देत नाहीत ना आपल्या म्हशी?
अजून बी तसाच अशीन का माला गाव जसा व्हता मांगल्या वर्षी ?