'चले जाव' चळवळः- काही प्रतिक्रिया
समजा १९४२ साली आतासारखी उठवळ माध्यमे असती तर काय बातम्या असत्या?
१. गांधींनी जनतेस चिथावले ' करो या मरो', जनजीवन विस्कळीत
२. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रूळ उखाडले, तारा कापल्या, जनतेचे हाल
३. गांधीसमर्थकांचा देशभर उच्छाद, आम आदमी घरात दडून!
४. वेळेत तार न पोचल्याने मुलगा आईच्या अंतिम दर्शनास मुकला
५. रेल्वे बंद, हजारो विद्यार्थी परीक्षेस मुकले
६. सर्वत्र अराजकतेचे दृश्य, आम आदमीची होत आहे गैरसोय
७. मजुरी बुडाल्याने गोदी कामगारांचा सवाल, 'आज चूल कशी पेटणार?'