शेवटची प्रेमकथा
सृष्टीच्या अंताच्या वेळची एक अनोखी प्रेमकथा.
प्रकार: अदभुतिका ( फॅंटसी)
सृष्टीच्या अंताच्या वेळची एक अनोखी प्रेमकथा.
प्रकार: अदभुतिका ( फॅंटसी)
सन २०१२-१३ मध्ये मी राज्यसेवा परीक्षेसाठी क्लास लावल्यामुळे पुण्यात राहायला होतो. त्यावेळच्या काही आठवणी.
माझा क्लास म्हणजे नव्यापेठेतील चाणक्य मंडळ परिवार.आणी मी रहायचो ते पेरुगेटाजवळ. पेरुगेटचवळचे पुना बोर्डिंग म्हणजे माझी जेवणावळ. रोज तेथुन जेवण आणणे आणी खाणे यामुळे तेथील लोकांची छान(च) ओळख झाली.
पेरुगेटवरुन मागे ज्ञानप्रबोधीनीकडे गेलं की त्या कॉर्नरला आनारसेवाला समोसे वाला आहे.त्याचे समोसे अख्या जगात ( पुणेकरांच्यामते)फेमस आहेत. बाजुलाच A1 का काय ते नाव आसलेला ज्युसवाला आहे. त्याचाकडे ज्युस/मिल्कशेक फार छान मिळतात. बाकी बादशाहीथाळी बद्दल मी बोलणे योग्य नव्हे.
"शूक.. शूक.." गल्लीतून आवाज आला.
आपण तशी डेरींग कधी केली नाय. पण या झ्याट जिंदगीत बाकी ठेवलंय तरी काय. आपण या घोळक्याला उभा कोलतो.
पोरसवदा उभारलेली एकटी दिसली. मग तिच्यासमोर जाऊन खिशात हात घालून उभारलो. सालं आपलं काळीजसुद्धा किती बेभरवसा धडाकतं.
"बैठना है?" असं तिनं विचारलं. सरळसोट. मनानं ती किती नागडी आहे हे एका झटक्यात समजलं.
"कितना?" सौदा हा असाच होत असावा. आता जरा धीर आला होता.
"सौ रुपय.."
तू मागितलं आणि मी दिलं. एवढं सोप्प वाटलं का हे?
"पचास दूंगा.."
NFDC द्वारे बनवला गेलेला चित्रपट "जाने भी दो यारो" १९८३ मध्ये आला आणि तेंव्हा पासून अजरामर झाला. अतिशय लो बजेट वर बनवला गेलेला चित्रपट आज सुद्धा लोकांच्या मनात एक घर करून आहे. मीडिया, बिल्डर, सरकार ह्यांच्यातील घाणेरडा भ्र्ष्टाचार आणि त्यांत शेवटी विनाकारण फाशीवर जाणारे दोन तरुण आदर्शवादी अश्या कथानकावर आधारलेली हि एक डार्क कॉमेडी होती.
मी ज्या घरात सध्या असतो
त्या घरात आधी रहायचो
माहित होती मला भिंत न् भिंत
कोपरा अन् कोपरा त्या घराचा
आणि सहज जाऊ शकत होतो मी
एका खोलीतून दुस-या खोलीत
.
.
.
नाती म्हंटल की आठवतात ती रक्ताची नाती. पण काही नाती ही रक्ताचा नात्यानं पेक्षा थोडी वेगळी असतात. काही प्रसंगी तर ती रक्ताचा नात्यानं पेक्षा जास्त घट्ट वाटतात. आपण आपल्या मित्राला खूप वर्षा नंतर भेटतो. बराच वेळ गप्पा केल्या नंतर आपण जायला निघतो त्याला आपले प्रॉब्लेम न सांगताच आणि मित्र बोलतो अरे जे बोलायला आला होतास ते तर बोललाचस नाहीस. इथे आपल्याला जाणीव होते की आपण न बोलताच आपल्या भावना त्याचा पर्यंत पोहोचलेल्या असतात. घरी टिव्ही वर कधी तरी एखादी क्रिकेट मैच एकदम रंगात आलेली असते.
एक ग॑ध हलकासा
सारा दिवस दरवळला
एक उडती नजरानजर
सारा दिवस गुणगुणला
एक स्पर्श ओझरता
दिवस सगळा झिणझिणला
दिवस सरता सरता का
जीव असा हुरहुरला ?
एकदा चाललेल्या वाटे वरून पुन्हा चालता येत नाही असं म्हणतात. वाट तीच असते पण आपण मात्र बदलले असतो. तारुण्याचे वयच असतं नविन वाटा तुडवायचं. पण परत त्याच वाटेवरून चालता येईलच असं नाही. आज मागे वळून बघताना हसायला येतं. कालच्या भाबडेपणावर हसावं कि आजच्या निगरगट्ट पणाची कीव करावी कळत नाही. हळवे असतात काही क्षण. भोळे निरागस आणि तितकेच मूर्ख सुध्दा. अशाच एका हळव्या क्षणी मी माझ्या मैत्रिणीला विचारलं होतं "तुझा शेवटचा क्षण कसा असावा असं तुला वाटतं ?" त्या वेळेला का हा प्रश्न विचारला माहित नाही. पण कुठली तरी कविता वाचून शेवटच्या क्षणाबद्दल काहीतरी काव्यात्मक सुचलं होतं हे खरं.
===============================================================================