पहलगाम अतिरेकी हल्ला ते जातिगत जनगणना - सरकारची संदिग्ध कोलांटीउडी

स्वधर्म's picture
स्वधर्म in काथ्याकूट
1 May 2025 - 3:49 am
गाभा: 

केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे. तरीही वैष्णव मात्र ही घोषणा जाहीर करताना राहूल गांधी यांचा जातिगत जनगणनेला विरोध होता असे सपशेल खोटे बोलले आहेत. हे नेमके आत्ताच का, हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रोचक मुद्दे असे:

- पहलगाम हल्ल्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान तातडीने आपला परदेश दौरा गुंडाळून भारतात आले खरे, पण घटनास्थळी न जाता सरळ बिहारमध्ये निवडणूक र॓लीत गेले व त्यांचे नितिशकुमार यांच्याबरोबर मंचावर हास्यविनोद करतानाचे फोटो प्रसिध्द झाले. कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अशा वेळी घटनास्थळी जातो, पिडितांचे सांत्वन करतो, ते काही त्यांनी केले नाही. तसेच या परिस्थितीबाबत बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली.
- अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे, असाही प्रश्न विचारला गेला. सुरक्षेतीतील कमतरता समोर आली व गृहमंत्र्यांनी नंतर चूक झाल्याची कबुलीही दिली. कुठेतरी सरकारचा ढिसाळपणा समोर आला व त्यामुळे चहूकडून टिकेला धार चढली.
- आता यावरून लक्ष दुसरीकडे वळवायला हवेच होते. अनायसे बिहारच्या निवडणूका आल्याच आहेत व त्यात काँग्रेसने जातिगत जनगणनेचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून पुढे आणलाच आहे. त्यातून हवा काढून घेणे सत्ताधार्यांसाठी अत्यावश्यक होते.

गेली तीन वर्षे राहूल गांधी, खर्गे इ. लोक जातिगत जनगणना करण्याची मागणी करत होते. सरकारने त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेस देशाला जातीजातीत विभाजित करत आहे, अशी त्यांच्यावर टिका केली. अनुराग ठाकूर यांनी तर जिसकी जाती का पता नही वो जातिगत जनगणना की मांग कर रहा है, अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. संसदेतपण चर्चा होऊ दिली नाही. पण आता मात्र काँग्रेसने केलेली मागणी आपलीच आहे असे म्हणण्याची वेळ का आली असावी? या सगळ्यात सरकार/ मोदी समर्थक यांची मात्र मोठ्ठी गोची झाली आहे आणि मास्टरस्ट्रोकवाल्या व्हॉट्स अप अंकल लोकांची जबरदस्त पंचायत झाली आहे. भाजपाला मात्र याची काहीच काळजी नाही कारण संपूर्णपणे बिनडोकीकरण झालेल्या अंध समर्थकांना फाट्यावर मारून सत्ता हस्तगत करण्यासाठी काहीही केले तरी ते आपली तळी उचलून धरणार याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आठवा: ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग करायला पाठवणार होते, त्यांनाच ४८ तासात मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री केले तरी कोणताही समर्थक इकडचा तिकडे हलला नाही.

हा मुद्दा आत्ताच वातावरण पूर्णपणे वेगळे असताना का पुढे आणला असावा त्यामुळे ही संदिग्धता निर्माण झाली आहे आणि काहीही करून बिहारच्या निवडणूका जिंकणे व त्यासाठी काँग्रेसचा मुद्दा पळवून त्याबरोबर्च नितीशकुमार यांना जातिगत जनगणनेचे मिळालेले श्रेय निस्तेज करणे हे त्याचे कारण असू शकते.

जे मोजता येते, त्यातच सुधारणा करता येते; व जगात असे काहीच नाही, जे मोजता येत नाही. त्यामुळे आता या निमित्ताने कोण कुठे आहे, कोणत्या जातसमूहांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, हे सर्वांनाच कळू शकेल. त्यामुळे यातून देशासाठी काहीतरी चांगलेच निघेल अशी आशा आहे. परंतु नोटबंदीचा अनुभव पाहता, सरकारची नियत कशी आहे व पुढची पावले कशी पडतात त्यावर बरेच अवलंबून आहे.

टीपः ताज्या घडामोडीत लिहिण्याऐवजी हा स्वतंत्र धागा काढण्याचे कारण म्हणजे यावर साधक बाधक चर्चा इथे सलग व्हावी. बाकी विषय तिथे आहेतच.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 May 2025 - 8:28 am | मुक्त विहारि

RSS ने, तुमचे वैयक्तिक काय नुकसान केले आहे ते माहीत नाही.

पण

RSSने नेहमीच, राष्ट्रे उभारणी साठी मदत केलेली आहे आणि तेच त्यांचे ध्येय पण आहे.

बाकी, तुमचे विचार तुमच्या पाशी...

स्वधर्म's picture

1 May 2025 - 1:59 pm | स्वधर्म

रा स्व सं ने माझे थेट वैयक्तिक नुकसान केले नाही. पण वैयक्तिक नुकसान वा फायदा पाहण्याच्या पलिकडचा विषय आहे.
बाकी रा स्व सं ने जातनिहाय जनगणनेस पाठिंबा दिला असल्याचा काही पुरावा, नोंद असेल तर सांगा. माझा समज बदलून घेईन.

तुंम्हाला रा स्व सं चा थेट वैयक्तिक फायदा झाला म्हणून तुंम्ही तसे मत बनवत असाल तर, प्रश्न मिटला.

जातिगत जनगणना पर RSS का बड़ा बयान, कहा- इसका इस्तेमाल पॉलिटिकल टूल की तरह न हो

https://www.patrika.com/national-news/rss-big-statement-on-caste-census-...
----

RSS अपनी ‘सामाजिक समरसता’ मुहिम के तहत हिंदू समाज को एकजुट करने की दिशा में काम करता रहा है। संगठन का कहना है कि जातिगत गणना को राजनीतिक एजेंडे के रूप में नहीं देखा जाना चाहिए। पिछले साल सितंबर में केरल के पलक्कड़ में मीडिया को संबोधित करते हुए RSS के मुख्य प्रवक्ता सुनील अंबेकर ने कहा था कि जाति संबंधी मुद्दे संवेदनशील हैं और राष्ट्रीय एकता व अखंडता के लिए महत्वपूर्ण हैं। उन्होंने जोर देकर कहा, “इसे बहुत संवेदनशीलता के साथ संभाला जाना चाहिए, न कि चुनावी या राजनीतिक आधार पर।”

जातिगत जनगणना की मांग पर अंबेकर ने तब स्पष्ट किया था कि RSS को जाति डेटा संग्रह पर कोई आपत्ति नहीं है, बशर्ते यह उन समुदायों और जातियों के कल्याण के लिए हो, जो पिछड़े हैं और जिन्हें विशेष ध्यान की जरूरत है। उन्होंने कहा, “यह डेटा पहले भी एकत्र किया जाता रहा है… लेकिन इसका उपयोग केवल उन समुदायों के कल्याण के लिए होना चाहिए, न कि चुनावी राजनीति के लिए हथियार के रूप में।”
---
थोडक्यात काय तर, जाती आधारित लोकसंख्या मोजायला RSS चा विरोध नाही... विरोध आहे तो, ह्याचा उपयोग करून राजकीय फायदा करायला...

मुक्त विहारि's picture

1 May 2025 - 5:17 pm | मुक्त विहारि

RSS च्या एका शेतकरी शिबिरात गेलो होतो. त्या गृप मध्ये शेती विषयक चांगले ज्ञान उपस्थित असलेल्या सगळ्यांना मिळाले. सर्वात शेवटी सगळे हेच म्हणत होते की चार गोष्टी चांगल्या समजल्या...

हा फायदा म्हणाल तर वैयक्तिक आणि म्हणाल तर सर्वांना...

आणि हो... तिथे जात कुणीही विचारली नाही.

आरएसएस (RSS) ने वर्षों तक जातिगत जनगणना के विरोध में आवाज उठाई थी, लेकिन हाल ही में सुरेश भैयाजी जोशी ने कहा कि देश के लिए जो भी आवश्यक है, वह किया जाना चाहिए, The Hindu के अनुसार. आरएसएस ने जातिगत जनगणना के मुद्दे पर कई बार अपनी राय व्यक्त की है। [1, 2]
आरएसएस की राय: [2]

• कल्याणकारी योजनाओं के लिए डेटा की आवश्यकता: आरएसएस का मानना है कि जातिगत जनगणना कल्याणकारी योजनाओं को बेहतर ढंग से लागू करने और सामाजिक रूप से वंचित समुदायों को लाभ पहुंचाने के लिए महत्वपूर्ण है।
• सावधानी बरतने की आवश्यकता: आरएसएस का मानना ​​है कि जातिगत जनगणना को राजनीति या चुनाव के लिए नहीं, बल्कि केवल कल्याण के लिए उपयोग किया जाना चाहिए।
• एससी/एसटी उपवर्गीकरण का समर्थन: आरएसएस ने हमेशा एससी/एसटी के उपवर्गीकरण का समर्थन किया है और मानता है कि यह आरक्षण के लाभों को सुनिश्चित करने में मदद करता है।
• सहमति पर जोर: आरएसएस ने हमेशा सभी समुदायों के बीच सहमति बनाने की आवश्यकता पर जोर दिया है, इससे पहले कि जातिगत जनगणना या आरक्षण जैसे संवेदनशील मुद्दों पर कोई कार्रवाई की जाए। [2]

जातिगत जनगणना पर विवाद: [2]

• आर्थिक और सामाजिक रूप से वंचित समुदायों के लिए जानकारी: जातिगत जनगणना आर्थिक और सामाजिक रूप से वंचित समुदायों के डेटा प्रदान करेगी, जिससे सरकार को उन्हें लाभ पहुंचाने के लिए नीतियां बनाने में मदद मिलेगी। [2]
• राजनीतिक उपयोग से बचने की आवश्यकता: कुछ लोगों का मानना ​​है कि जातिगत जनगणना को राजनीतिक उद्देश्यों के लिए उपयोग किया जा सकता है, जिससे सामाजिक विभाजन बढ़ सकता है। [2]
• जातिगत जनगणना की ऐतिहासिक पृष्ठभूमि: भारत में जातिगत जनगणना का इतिहास रहा है। 2011 में सामाजिक-आर्थिक और जातिगत जनगणना हुई थी। [3]

कुल मिलाकर, आरएसएस जातिगत जनगणना के मुद्दे पर जटिल दृष्टिकोण रखता है। वह कल्याणकारी योजनाओं के लिए डेटा की आवश्यकता को स्वीकार करता है, लेकिन इसे राजनीति से अलग रखने की आवश्यकता पर भी जोर देता है।

Generative AI is experimental.

[1] https://translate.google.com/translate?u=https://www.thehindu.com/news/n... https://www.bbc.com/hindi/articles/c80e94x158ko[3] https://translate.google.com/translate?u=https://en.wikipedia.org/wiki/2...

या प्रकारे सटीप लिंक दिली तर बरे पडते. धन्यवाद.

संघाचा जातनिहाय जनगणणेस पाठींबा असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु खालील व्हिडीओत गडकरी, योगी, ठाकूर इ. तमाम स्वयंसेवक का जातनिहाय जनगणनेस विरोध करत आहेत?
https://www.youtube.com/watch?v=y7zZjLB6XHw&t=508s&pp=ygUOcHJhc2hhbnQga2...

याशिवाय गुरुजींसारखे संघ समर्थक या निर्णयाला देशाला मागे नेणारे पाऊल का म्हणत आहेत? तुंम्ही पण त्यांचीच तळी उचलली आहे:
http://misalpav.com/comment/1193493#comment-1193493

रवीश कुमारच्या व्हिडीओत तर पंप्र यांची जातनिहाय जनगणनेवर काय मते होती ते नीट सांगितले आहे. आता अचानक उपरती का झाली?

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2025 - 9:58 am | अमरेंद्र बाहुबली

लेखाशी सहमत! मोदीना पहलगाम घटनेबद्दल काहीही सीरियसनेस नाही नी नव्हता, आता लोकांचे लक्ष वळवायला जातिगत जनगणनेचा डाव टाकलाय, कारण युद्ध करणे हे अतिरेकी सोडण्याइतके सोपे नाही, त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारण सांभाळावे लागते, ह्याना डोनाल्ड ला डोनाल्ड बोलता येईना डोलांड बोलतात, इंग्लिश समजायची नी बोलायची पंचाईत, हे काय आंतराष्ट्रीय राजकारण सांभाळणार? आणि युद्ध झाले तर अदाणी डोळे वटारणार कारण त्याचे शेअर्स पडतील, त्यामुळे लोकांचे लक्ष वळवण्यासाठी हे जनगणनेचे पिलू सोडले आहे, भक्ताना प्रत्येक कोलंटउडीचे समर्थन करावे लागते तेवढे कोडगे झाले आहेत भक्त आता.

मुक्त विहारि's picture

1 May 2025 - 10:26 am | मुक्त विहारि

हे तुमच्या घरच्यांना विचारा.

आणि

ते परिणाम भोगायची आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक तयारी तुझी झाली आहे का?

इंदिरा गांधींच्या काळाची परिस्थिती वेगळी होती. आधीची ३-४ युद्धे, (दुसरे महायुद्ध, स्वातंत्र्य युद्ध, १९६२ आणि १९६५) ही आधीच्या पिढीने भोगलेली होती.त्यामुळे १९७१-७२ मध्ये सामाजिक परिस्थिती वेगळी होती.

युद्ध सुरू झाले की सूर्य बुडाल्या नंतर घरात दिवे लावायला बंदी असते. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करायला बंदी असते, विशेषतः प्रार्थना स्थळी, नाट्य गृहात आणि सिनेमा गृहात.

आज किती लोकं हा नियम पाळायला तयार होतील?

बोलणे खूप सोपे आहे. भारतात हे आचरणात आणणे कठीण आहे...

जाऊ द्या...

तुम्ही असेच बोळ्याने दूध पीत रहा....

सुबोध खरे's picture

1 May 2025 - 10:02 am | सुबोध खरे

महानगर पालिकेतील उंदीर सध्या सुटीवर गेलेले दिसतात.

त्यामुळे त्या विभागातील लोकांना बराच रिकामा वेळ आहे असं दिसतंय

बाकी

ह्या आयडीचे एक वैशिष्ट्य म्हणजे, नुह हिंसाचार, संदेशाखाली मध्ये झालेले प्रकरण, पश्चिम बंगालमध्ये झालेला हिंदूंवरील अत्याचार, ह्या विरोधात ह्यांनी एक चकार शब्द पण उच्चारला नाही..

ते तर सोडा, दर महा, भारतात होत असलेल्या, लव जिहाद, विरोधात पण हे महाशय कधी बोलले नाहीत...

असो,

आनंद आहे...

मुवि, बदाबदा लिंक टाकल्यावर काय बोलणार? तुंम्ही एक मुद्दा घेऊन व्यवस्थित मांडणी करा, तुमचा दृष्टीकोन लिहा, तरच लोक व्यक्त होतील.

असो,

तुमचे विचार तुमच्यापाशी...

मुक्त विहारि's picture

1 May 2025 - 5:19 pm | मुक्त विहारि

लिंक्स शिवाय मुद्दा कसा काय समजणार?

शिवाय, छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत नसेल तर लेखाला खोटे ठरवले जाईल किंवा अफवा समजले जाईल...

स्वधर्म's picture

1 May 2025 - 1:53 pm | स्वधर्म

मुद्दा सोडून व्यक्तीगत टिप्पण्या करायला? मुद्द्यांवर बोलणार तरी काय? म्हणूनच म्हटले की भाजपच्या अंकल लोकांची गोची झाली आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2025 - 2:21 pm | अमरेंद्र बाहुबली

त्यांचे नाव दिसले की प्रतिसाद न वाचता मी पुढे जातो! इतर अनेकही असेच करताहेत. आपणही असेच करावे हा सल्ला राहील, जेणेकरून आपल्या धाग्यावर सकस चर्चा होईल.

अशा लिंकपिसाटांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर, ठार वेडाच देऊ शकेल.

स्वधर्म's picture

1 May 2025 - 2:44 pm | स्वधर्म

खरे डॉ हे व्यक्तिगत टिप्पण्या करत आहेत. त्यामुळे दुर्लक्ष केल्याशिवाय पर्याय रहात नाही.

महिरावण's picture

1 May 2025 - 3:14 pm | महिरावण

खरे हे कायमच व्यक्तिगत टिप्पण्या करत असतात पण ते मिपाचे बाब्या असल्यामुळे असोच.

खरे डॉ हे व्यक्तिगत टिप्पण्या करत आहेत
यात व्यक्तीगत टिप्पणी कुठे आली?

स्वधर्म's picture

1 May 2025 - 8:03 pm | स्वधर्म

नांव न घेता लिहिले असले तरी,
उंदीर मारण्याच्या विभागातील लोकांना... वगैरे व्यक्तीगतच टिप्पणी आहे. त्याऐवजी जर आपण धाग्यातील मुद्दे घेऊन बोलला असतात तर ते व्यक्तीगत मानले नसते. पण असो. अजूनही लिहू शकता, फक्त लिहिणार्‍यावर घसरू नका.

लेख तुम्हाला आवडलेला नाही, हे तुम्ही वेगळ्या भाषेत लिहिले आहे.

लेखकाला आणि इतर काही सदस्यांना ती भाषा पचनी पडली नाही... हा काही तुमचा दोष नाही...

असो,

आनंद आहे..

सुक्या's picture

1 May 2025 - 2:58 pm | सुक्या

काही प्रश्न.
१. जातीगत जनगनना करताना एखादा जर मी जात पात पाळत नाही. सबब माझी जात सांगणार नाही असे म्हणाला तर ती व्यक्ती कोणत्या कॅटॅगरीत जाईल?
२. आंतर जातीय विवाह झालेल्या जोडप्याने कुठली जात लावावी? मुलाकडची की मुलीकडची?
२अ. आंतर धर्मीय विवाह केलेल्या जोडप्याची जात काय असावी?
२ब. हिंदु धर्म सोडला तर ईतर धर्मात (मुस्लिम, बोध्द, सिख, खिश्चन ई) जात ही संकल्पना नाही. त्या लोकांची जात काय लिहावी?
३. मी जातीने सवर्ण आहे परंतु अत्यंत हालाखीत जगतोय. मुलगा/मुलगी हुशार आहेत पण आरक्षण नसल्यामुळे सरकारी नोकरी मिळत नाही किंवा पाहिजे ते शिक्षण घेता येत नाही. अशा व्यक्तीने काय करावे?
४. मी जातीने शुद्र आहे. सरकारी नोकरी आहे. वडील सरकारी नोकरीतुन रिटायर झालेत. घर / गाडी सगळे आहे. माझ्या मुलाने / मुलीने आरक्षणाचा लाभ घ्यावा की नाही?
५. ३०% लोकांसाठी ७५% जागा आरक्षित केल्या (समजा ५०% चे लिमिट काढले) तर उरलेल्या ७०% लोकांसाठी काय योजना असेल? की तुम्ही तुमचे बघा असे असेल?

आग्या१९९०'s picture

1 May 2025 - 3:23 pm | आग्या१९९०

भरपूर रोजगार उपलब्ध आहे. कबरी खोदणे, मशिदी पाडणे, गोरक्षक बनणे इत्यादी इत्यादी इत्यादी.

उत्तर द्यायला जमत नसेल तर गप्प बसा. धागकर्त्याने साधक बाधक चर्चेसाठी धागा काढला आहे. पो टाकण्यासाठी दुसरा धागा आहे.

स्वधर्म's picture

1 May 2025 - 4:06 pm | स्वधर्म

सर्वप्रथम आपण योग्य प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याबद्दल धन्यवाद. पण आपण जातिगत जनगणना असावी की नसावी या दृष्टीने ते उपस्थित केले आहेत असे वाटते. तो निर्णय तर सरकारने आता घेऊन टाकलेलाच आहे. तरीही माझा प्रतिसाद खालीलप्रमाणे:
१. जातीगत जनगनना करताना एखादा जर मी जात पात पाळत नाही. सबब माझी जात सांगणार नाही असे म्हणाला तर ती व्यक्ती कोणत्या कॅटॅगरीत जाईल?
- जात न लिहिण्याचा पर्याय अवश्य असावा. असे लोक खूप आढळले तर आपण समाज म्हणून अधिक प्रगल्भ होत आहोत असे म्हणता येईल.
२. आंतर जातीय विवाह झालेल्या जोडप्याने कुठली जात लावावी? मुलाकडची की मुलीकडची?
२अ. आंतर धर्मीय विवाह केलेल्या जोडप्याची जात काय असावी?
- जात ही व्यक्तीला असते. जोडप्याला नाही. त्यामुळे ते आपआपली जात जर नोंदवायची तर नोंदवतील. मुलांची जात ही सद्य स्थितीत बापाची माणण्याचा पध्दत आहे, असे वाटते, पण तो चॉईस असावा.
३. मी जातीने सवर्ण आहे परंतु अत्यंत हालाखीत जगतोय. मुलगा/मुलगी हुशार आहेत पण आरक्षण नसल्यामुळे सरकारी नोकरी मिळत नाही किंवा पाहिजे ते शिक्षण घेता येत नाही. अशा व्यक्तीने काय करावे?
- सरकारच्या गरीबांसाठीच्या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी १०% आरक्षण आहेच.
४. मी जातीने शुद्र आहे. सरकारी नोकरी आहे. वडील सरकारी नोकरीतुन रिटायर झालेत. घर / गाडी सगळे आहे. माझ्या मुलाने / मुलीने आरक्षणाचा लाभ घ्यावा की नाही?
- नोकरी व शिक्षणात लाभ घेण्याला २-३ पिढ्यांची मर्यादा असावी. मात्र निवडणूकीत वगैरे प्रतिनिधित्वासाठी लाभ घ्यावा.
५. ३०% लोकांसाठी ७५% जागा आरक्षित केल्या (समजा ५०% चे लिमिट काढले) तर उरलेल्या ७०% लोकांसाठी काय योजना असेल? की तुम्ही तुमचे बघा असे असेल?
- तुमचा डेटा बरोबर नाही. उदा. बिहारमध्ये ६३% लोक मागास व इतर मागास जातीचे आहेत. त्यामुळे '३०% लोकांसाठी ७५% जागा आरक्षित' असे होऊच शकत नाही.

बेसिकली आपल्या समाजात जात हे वास्तव आहे. ते काम करत आहे, इतके जरी मान्य असेल तर ते मोजले पाहिजे व त्यानुसार समाजासाठी योग्य ती उपाययोजना केली जाऊ शकते हे लक्षात घ्यावे. आरक्षणाचा विषय मोठा आहे, जात जनगणना निष्कर्ष आल्यानंतर आरक्षणाची योग्य ती फेररचना करता येईल.

तुम्ही उपस्थित केले की १ व २ व त्याची उपप्रश्न फार महत्वाची आहेत .
जाणकारांकडून उत्तराच्या प्रतीक्षेत आहे.
बाकी ,3,4,5 ही जातीगणने च्या प्रत्यक्ष कामाशी काहीही संबंध नाही अशी प्रश्न आहेत. पण ती वेगळी म्हणून महत्त्वाची आहेतच.

सुक्या's picture

2 May 2025 - 5:05 am | सुक्या

माझा मुद्दा तो नाहीच.
जर आर्थिक दुर्बल घटकांसाठी १०% आरक्षण आहे पण ते फक्त सवर्णांसाठी आहे काय? तर नाही. त्यात कुणीही आवेदन करु शकतो. मग ते सवर्ण लोकांसाठी कसे चांगले? मुद्दा क्र ४ व ५ ह्यासाठी असलेले ग्रूहीतक चुकीचे आहे. आरक्षण घेण्यासाठी किती पिढ्यांची मर्यादा असावी हा जर तर चा प्रश्न आहे. माझ्या मते बाबासाहेब अंबेडकरांनी फक्त १० की २० वर्षे आरक्षण ध्यावे असे सुचीत केले होते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

राहीला मुद्दा ५. ह्या जन गणनेनंतर विरोधक ५०% असलेली मर्यादा वाढवण्याची मागणी करतीलच. त्यामुळे काय गंभीर परिणाम होतील ते बघावे लागेल.

मुद्दा २ब हा तर कळीचा मुद्दा आहे. फक्त हिंदु धर्मात वर्ण व्यवस्था होती/ आहे. मग जर धर्म बदलला (हिंदु धर्म सोडुन खिश्चन झालो) तर कुठला प्रवर्ग असायला हवा. किंवा खिश्चन माता पिता असलेल्या पाल्याला आरक्षण मिळेल काय ? जर ह्याचे उत्तर नाही असेल तर मग आरक्षण फक्त हिंदु धर्माच्या लोकांना मिळावे? कारण घटनेत धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. मग तो ईतर धर्मीय लोकांवर अन्याय नाही का?

ही मागणी अत्यंत चुकीची अशी आहे.

यामुळे खुल्या प्रवर्गाला तर संधी सोडाच.. माझे म्हणणे एकूण meritocracy च धोक्यात येईल.

जगातला कुठलाही समूह meritocracy शिवाय प्रगती करूच शकत नाही.या बाबतीत मला गुणरत्न सदावर्तेची भूमिका पटते. ते म्हणतात मी उरलेल्या 50 टक्के साठी लढतोय. अर्थात सदावर्ते यांच्या राजकीय आकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत हे जरी मान्य केले तरी त्यांचा मुद्दा तात्विकदृष्ट्या योग्यच आहे.
आपल्या घटनाकारांनी अत्यंत सुजाणपणे व दूरदृष्टीने जी 50 टक्के ची कमाल मर्यादा ठेवली आहे त्या.घटनेची पायमल्ली करण्यात त्यांचे विचार पायदळी तुडवण्यात त्याची प्रत मिरवणारे सर्वात पुढे आहेत हे खेडजानक आहे.