Skip to main content

पहलगाम अतिरेकी हल्ला ते जातिगत जनगणना - सरकारची संदिग्ध कोलांटीउडी

लेखक स्वधर्म यांनी गुरुवार, 01/05/2025 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
केंद्र सरकारचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकार आता जातिगत जनगणना होणार असल्याची मोठी घोषणा केली आणि देशात एकच गदारोळ माजला आहे. सत्ताधारी पक्ष व त्यांची मातृसंस्था रा.स्व. संघ यांचे जातिगत जनगणनेला नेहमीच छुपा विरोध राहिलेला आहे. त्यामुळेच बटेंगे तो कटेंगे वगैरे घोषणा दिल्या होत्या. काँग्रेस गेल्या तीन वर्षांपासून जी मागणी करत होती ती केंद्र सरकारने अखेर तेच पाऊल उचलले आहे. तरीही वैष्णव मात्र ही घोषणा जाहीर करताना राहूल गांधी यांचा जातिगत जनगणनेला विरोध होता असे सपशेल खोटे बोलले आहेत. हे नेमके आत्ताच का, हा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत रोचक मुद्दे असे: - पहलगाम हल्ल्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. पंतप्रधान तातडीने आपला परदेश दौरा गुंडाळून भारतात आले खरे, पण घटनास्थळी न जाता सरळ बिहारमध्ये निवडणूक र॓लीत गेले व त्यांचे नितिशकुमार यांच्याबरोबर मंचावर हास्यविनोद करतानाचे फोटो प्रसिध्द झाले. कोणत्याही राष्ट्राचा प्रमुख अशा वेळी घटनास्थळी जातो, पिडितांचे सांत्वन करतो, ते काही त्यांनी केले नाही. तसेच या परिस्थितीबाबत बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. विरोधकांनी यावर टिकेची झोड उठवली. - अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे, असाही प्रश्न विचारला गेला. सुरक्षेतीतील कमतरता समोर आली व गृहमंत्र्यांनी नंतर चूक झाल्याची कबुलीही दिली. कुठेतरी सरकारचा ढिसाळपणा समोर आला व त्यामुळे चहूकडून टिकेला धार चढली. - आता यावरून लक्ष दुसरीकडे वळवायला हवेच होते. अनायसे बिहारच्या निवडणूका आल्याच आहेत व त्यात काँग्रेसने जातिगत जनगणनेचा मुद्दा सर्वात महत्वाचा म्हणून पुढे आणलाच आहे. त्यातून हवा काढून घेणे सत्ताधार्यांसाठी अत्यावश्यक होते. गेली तीन वर्षे राहूल गांधी, खर्गे इ. लोक जातिगत जनगणना करण्याची मागणी करत होते. सरकारने त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही. उलट काँग्रेस देशाला जातीजातीत विभाजित करत आहे, अशी त्यांच्यावर टिका केली. अनुराग ठाकूर यांनी तर जिसकी जाती का पता नही वो जातिगत जनगणना की मांग कर रहा है, अशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. संसदेतपण चर्चा होऊ दिली नाही. पण आता मात्र काँग्रेसने केलेली मागणी आपलीच आहे असे म्हणण्याची वेळ का आली असावी? या सगळ्यात सरकार/ मोदी समर्थक यांची मात्र मोठ्ठी गोची झाली आहे आणि मास्टरस्ट्रोकवाल्या व्हॉट्स अप अंकल लोकांची जबरदस्त पंचायत झाली आहे. भाजपाला मात्र याची काहीच काळजी नाही कारण संपूर्णपणे बिनडोकीकरण झालेल्या अंध समर्थकांना फाट्यावर मारून सत्ता हस्तगत करण्यासाठी काहीही केले तरी ते आपली तळी उचलून धरणार याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे. आठवा: ज्यांना चक्की पिसिंग पिसिंग करायला पाठवणार होते, त्यांनाच ४८ तासात मांडीवर घेऊन उपमुख्यमंत्री केले तरी कोणताही समर्थक इकडचा तिकडे हलला नाही. हा मुद्दा आत्ताच वातावरण पूर्णपणे वेगळे असताना का पुढे आणला असावा त्यामुळे ही संदिग्धता निर्माण झाली आहे आणि काहीही करून बिहारच्या निवडणूका जिंकणे व त्यासाठी काँग्रेसचा मुद्दा पळवून त्याबरोबर्च नितीशकुमार यांना जातिगत जनगणनेचे मिळालेले श्रेय निस्तेज करणे हे त्याचे कारण असू शकते. जे मोजता येते, त्यातच सुधारणा करता येते; व जगात असे काहीच नाही, जे मोजता येत नाही. त्यामुळे आता या निमित्ताने कोण कुठे आहे, कोणत्या जातसमूहांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे, हे सर्वांनाच कळू शकेल. त्यामुळे यातून देशासाठी काहीतरी चांगलेच निघेल अशी आशा आहे. परंतु नोटबंदीचा अनुभव पाहता, सरकारची नियत कशी आहे व पुढची पावले कशी पडतात त्यावर बरेच अवलंबून आहे. टीपः ताज्या घडामोडीत लिहिण्याऐवजी हा स्वतंत्र धागा काढण्याचे कारण म्हणजे यावर साधक बाधक चर्चा इथे सलग व्हावी. बाकी विषय तिथे आहेतच.

वाचने 39043
प्रतिक्रिया 164

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इंदिरा गांधी यांचे कौतुक आणि श्रेय हे त्यांनी दाखवलेल्या political will चे आहे. त्यांनी त्यावेळी कसोटीच्या काळात जे जे धाडसी निर्णय घेतले , मुत्सद्दीपणा दाखवला त्याचे श्रेय आहे. आणि त्यात त्यांच्या कर्तृत्वात काहीही शंका नाहीच नाही. याचा अर्थ त्या सीमेवर बंदूक घेऊन उभ्या राहिल्या आणि पाकिस्तानी सैनिक स्वतःच्या बंदुकीने मारले असा नाही. आणि तसे करावे अशी अपेक्षा सुद्धा नाही. कोणत्याही निर्णयकर्त्याचे राज्यकर्त्यांचे ते काम नाहीच क्षेत्र नाही. त्यासाठी सैन्यदले आहेत. इंदिरा गांधीना त्यांच्या या निर्णयांचे रास्त असे श्रेय दिले जाते. त्याचप्रमाणे नेहरू यांनी सैन्य परत माघारी घेण्याच्या चुकीच्या निर्णयासाठी दोषी धरले जाते. तसेच मोदी यांना या अगोदर केलेल्या strikes चे श्रेय दिले जाते. तसंच आता पहलगाम नंतर काळ ठरवेल की मोदी हे कुठला निर्णय घेतात मात्र त्यासाठी किमान काहीं काळ तरी वाट पाहावी लागेल. त्यांनी काहीही केले नाही की त्यांनी मोठा धडा शिकवला. दोन्हीपैकी कुठलेही विधान सत्य ठरण्यासाठी किमान काही काळ थांबणे क्रमप्राप्त आहे.it is too early to comment हेच सर्वात समजूतदार विधान आपण आजच्या घडीला करू शकतो.

In reply to by सुबोध खरे

आपण लष्करात होता आणि डॉक्टर आहात यावर आता विश्वासच राहिला नाही, सर्व अधिकार सैन्याला देणे यात मोठी कर्तबगारी वाटत आहे असे वाटत असेल तर आपण चारीधाम यात्रेला निघायला हरकत नाही असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीमती इंदिरा गांधी यांनी सुद्धा असेच सर्व अधिकार फिल्ड मार्शल माणेकशॉ याना दिले होते. माणेकशॉ यांनी श्रीमती गांधी याना काही महिने तयारीला लागतील असे सांगितले होते अन त्यानंतर पाकिस्तानची सपशेल शरणागती आली हा दैदिप्यमान इतिहास आहेच One of the chief architects of India’s 1971 victory against Pakistan, Manekshaw is most famously remembered for bluntly telling Prime Minister Indira Gandhi that the Indian Army wasn’t ready for war in April 1971. ' Saying that his job was to fight to win, he asked for a few months’ time — a request which Gandhi, to her credit, accepted. True to his word, when the India-Pakistan war finally broke out in December 1971, Manekshaw delivered India one of its swiftest and most remarkable military victories. पण अर्थात हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासात येत नाही त्याला तुम्ही तरी काय करणार? तेंव्हा तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

जी स्थिती भुजबळांची आहे, तीच स्थिती प्राध्यापकांची आहे. पी.एच.डी. आहे म्हणून उगाच जास्त आशा ठेवण्यात अर्थ नाही. उच्च बुद्धिमत्तेची माणसे STEM सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग माथेमाटिक्स ह्या विषयांमध्ये करिअर करतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, अर्थशास्त्रद्न्य होतात, आपल्याला क्षेत्रात व्यग्र होऊन जातात. आणि मग आपोआपच हुमानिटीज मध्ये मोकळ्या पडलेल्या जागा सुमार बुद्धिमत्तेची माणसे भरून काढतात , आणि ते सो कॉल्ड इंटेलेकचूअल लोकं खरे काम करणाऱ्या लोकांना अक्कल शिकवायला लागतात. हा दैवदुर्विलास आहे. JNU मध्ये आंदोलने वगैरे होतात, पण त्याच्याच समोर असलेल्या IITDelhi मध्ये कधीतरी आंदोलने झाल्याचे ऐकले आहे का तुम्ही ?

In reply to by प्रसाद गोडबोले

मी आधीच लिहिले आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मिपावरील व भारतातील पाकिस्तानचा निद्रिस्त संघ आणि पाकिस्तानप्रेमी विदूषक एकदम जागे होऊनत्यांना पराकोटीचा आनंद झालाय व ते पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत झालेत. विद्यावाचस्पती प्राध्यापक अधूनमधून व्यक्त होतात, पण ते दुसरं यडं सर्व ठिकाणी वेडगळ पिंका टाकत आपलं हसू करून घेतंय.

In reply to by प्रसाद गोडबोले

JNU मध्ये आंदोलने वगैरे होतात, पण त्याच्याच समोर असलेल्या IITDelhi मध्ये कधीतरी आंदोलने झाल्याचे ऐकले आहे का तुम्ही ? ज्जे बात. खरोखर शिक्षण घेणारे शिकतात / पदवी घेतात आयुष्यात पुढे जातात. रेम्याडोक्याची शिक्षणाच्या नावाखाली नसते चाळे करतात व नंतर आम्हाला नोकरी नाही म्हणुन गळे काढत शिव्या देतात.

In reply to by सुबोध खरे

>>> तेंव्हा तुमचं चालू द्या... असंच म्हणतो. डॉक्टर साहेब कुठे धाडसी इंदिरा गांधी आणि कुठे प.मोदी. निर्णय घ्यायला धाडस लागतं. भाजपच्या पूर्वीच्या पंतप्रधानांनी सीमेवर तीन महीने सैनिक नेऊन ठेवले होते आणि परत माघारी बोलावले होते. =)) अर्थात हे मराठी वाङ्मयाच्या इतिहासात येत नाही त्याला तुम्ही तरी काय करणार? लष्करात वैदकीय विभागात असणा-या लष्कराच्या तिन्ही दलाचा अभ्यास असतो ऎसे मी काही मानत नाही. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लष्करात वैदकीय विभागात असणा-या लष्कराच्या तिन्ही दलाचा अभ्यास असतो ऎसे मी काही मानत नाही मुदलात खोट असली कि अशी कुंठित विचारसरणी असते. ए एफ एम सी काय किंवा एन डी ए काय या तिन्ही सेनादलांसाठी निर्माण केलेल्या "अ" श्रेणीच्या ( category A) प्रीमियर संस्था आहेत. ए एफ एम सी म्हणजेच ARMED FORCES MEDICAL COLLEGE "आर्मी" मेडिकल कॉलेज नव्हे. मला दोन वर्षे वरिष्ठ असणाऱ्या व्हाईस ऍडमिरल आरती सरीन ( या पण रेडिओलॉजिस्टआहेत) सध्या DGAFMS- Directorate General Armed Forces Medical Services. म्हणजे सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक किंवा हिंदीत महानिदेशक सशस्त्र सेने चिकित्सा सेवा. या नौदलाच्या असून तिन्ही दलांच्या वैद्यकीय सेवेच्या प्रमुख आहेत. माणूस एकच असतो मग तो थलसेनेत असो कि नौसेनेत कि वायुसेनेत. त्यामुळे त्याला लागणारे डॉक्टर एकच असतात. आणि या डॉक्टरांना तिन्ही दलात लागणाऱ्या अनेक वैद्यकीय प्रश्नांबद्दल प्रशिक्षण दिले जाते. तसेच युदध झाल्यास सैनिकांना कोणत्या जखमा होतील आणि त्यासाठी काय उपचार करायचे याचे प्रशिक्षण दिले जाते या शिवाय अणुयुद्ध, जैविक युद्ध आणि रासायनिक युद्ध झाल्यास Nuclear Biological Chemical Defence (NBCD):काय उपचार करायचे असतात याचे हि प्रशिक्षण दिले जाते अर्थात हे प्रशिक्षण देताना युद्धाचे डावपेच आणि सैन्याची व्यूहरचना सुद्धा डॉक्टरांना शिकावेच लागतात( म्हणून शिकवले जातात). विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याना पकडल्यावर होणाऱ्या जखमा काही वायुदलाच्या खास जखमा नव्हत्या. प्रत्येक वेळेस माहिती नसताना बेलाशक ठोकून द्यायचं आणि त्यावर त्याचे समर्थन करत राहायची हि वृत्ती आश्चर्यजनक आहे हा प्रतिसाद आपल्यासाठी नाहीच. कारण आपण आपले ज्ञानचक्षू बंद केलेले असल्याने यातून आपण काही घ्याल असे वाटत नाही. हा प्रतिसाद इतर लोकांसाठी आहे. तेंव्हा तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद डॉक्टर! एएफएमसी, एनडीए या संस्था फ्रॉड असून तेथे देणगी देऊन प्रवेश मिळतो व देणगी देऊन पदवी मिळते असे मिपावरील काही पाकिस्तानी व काही जन्मजात मूर्ख म्हणतील.

In reply to by सुबोध खरे

यावरुन आठवण झाली. 'लष्कारातील आचारी' अर्थात लष्करी स्वयंपाकी ज्याला स्वयंपाक तज्ञ म्हणतात अशा लष्करातील आचा-यांना आपल्या सैनिक आणि अधिका-यांसाठी जेवण बनवावे लागत असते. अशा तिन्ही दलाच्या सैनिकांना जेव्हा जेवण असे आचारी देत असतील तेव्हा, प्रथीने, कार्बोहाड्रेटस त्याचं प्रमाण, अन्नसुरक्षा, अन्नांची तपासणी वगैरे सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जात असावे. कारण सैन्य आणि प्रकृती त्यांचा आहार हे सर्व सैन्यांसाठी मानसिक आणि शारिरीक तंदुरस्तीसाठी अतिशय महत्वाचे असावे. युद्ध झाल्यास जखमी सैन्यांना कोणता आहार द्यायचा वगैरे याचे तपशील त्यांच्याकडे असावेत त्याचंही प्रशिक्षण दिले जात असेल, दिले जात असावे. अर्थात असा एखादा आचारी निवृत्त झाला आणि म्हणत असेल की युद्ध सैनिक, अधिकारी, त्यांचे डावपेच, सैन्याची व्युहरचना आचा-यांनाही सांगत असतील तर, आपण हा आचारी सैन्यात होता आणि आदर म्हणून त्यांच्या या गोष्टी अद्भूत कथा-कादंब-यासारख्या वाचायच्या, ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या. कारण जगातलं सगळं ज्ञान आपल्यालाच आहे, अशी माणसं जागोजागी भेटतात. एखादा माणूस अशा व्यवस्थेतही असू शकतो. आपण साहसगोष्टीतल्या गोष्टी सारख्या त्या ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या. हा प्रतिसाद इतर लोकांसाठी आहे, आपल्यासाठी नव्हे. तेव्हा आपलं चालू द्या....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर आपला द्वेष इतक्या खालच्या पातळीवर उतरेल असं वाटलं नव्हतं परंतु नौदलात स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18 महिने प्रशिक्षण दिले जाते हे आपल्याला माहीत नाही! बाकी लष्कराला रेशन दिले जाते याचे कारण सैनिक हा तंदुरुस्त असायलाच पाहिजे त्यामुळे त्याची प्रथिने जीवनसत्त्वे इ ची गरज लक्षात घेऊन त्याला हे रेशन भारत सरकार पुरवते. दिलेल्या रेशनमध्ये समतोल आहार कसा असावा याबद्दल संरक्षण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्वे याच्या पुस्तिका वेळोवेळी अद्ययावत केल्या जातात. या रेशनचे शिजवलेले अन्न रेजिमेन्ट चा किंवा जहाजाचा वैद्यकीय अधिकारी रोज आढावा घेत असतो आणि ते त्याच्या कडे टेस्टिंग साठी रोज पाठवले जाते हेही आपल्याला माहीत नसावे. बाकी लष्करातील प्रत्येक सैनिकाला लष्करी डावपेच माहीती नसले तरी प्रत्येक अधिकाऱ्याला माहिती असावेच लागतात. आणि सफाई कर्मचारी असो की वैद्यकीय सहाय्यक असो सर्वांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते आणि वारंवार सरावही केला जातो! बाकी आपण इतक्या खालच्या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते! पाहूया अजून किती खाली उतरताय ते!

In reply to by सुबोध खरे

लष्करातील प्रत्येक सैनिकाला लष्करी डावपेच माहीती नसले तरी.....
आत्ता बरोबर बोलायला लागला आहात. माझ्याकडून विषय संपला. आपलं चालू द्या. सुरमा भोपाली यांची कॉमेडी बघतोय. इंजॉय करा.....! -दिलीप बिरुटे

In reply to by सुबोध खरे

शांत व्हा डॉक्टर. द्वेषाने अंतर्बाह्य बरबटलेल्यांकडून आणि त्चांंच्या प्रत्येक वांतीला, एक हात पुढे पसरून व दुसरा कानावर ठेवून जी जी रं जी जी रं जी जी जी म्हणणारे, कधीही द्वेषाच्या चिखलातून बाहेर येणार नाहीत. भारताचं पूर्ण वाटोळं व्हावं हेच यांचे जीवनध्येय.

In reply to by सुबोध खरे

डॉक्, तुमच्यामध्ये बोलतो म्हणून क्षमस्व - भुजबळ आणि प्रोफेश्वर हे दोघेही एकाच पातळीवरचे आहेत. त्यांच्या तोंडी लागणे म्हणजे पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या मनुष्याने गटारात लडबडलेल्या प्राण्याशी दोन हात करणे आहे. त्यांच्यात आणि इतर मिपाखरांमध्ये फरक आहे.
बाकी आपण इतक्या खालच्या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते! पाहूया अजून किती खाली उतरताय ते!
त्यांच्या पातळीला जाणे माझ्यासहित अनेक मिपाखरे शक्यतो टाळतात. तुम्हीही टाळता आले तर बघा. - (शक्यतो पातळी न सोडणारे मिपाखरु) द्येस्मुक् राव्

In reply to by वामन देशमुख

'जावा फुल स्टॅक' सारखा डू आयडी घेऊन आर्वाच्य भाषेत लोळणारे जेव्हा असे काही लिहितात तेव्हा हसून हसून पुरेवाट होते. =)) लवकर बरे व्हा...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'जावा फुल स्टॅक' सारखा डू आयडी घेऊन आर्वाच्य भाषेत लोळणारे जेव्हा असे काही लिहितात तेव्हा हसून हसून पुरेवाट होते. =))
पहा मित्रांनो, म्हटलं होतं नं, दोघांची पातळी एकच आहे म्हणून! तो सदस्य अधूनमधून कुणावरही डुआयडीचा आरोप करत असतो, यावेळी तोच आरोप वेगळा आयडी वापरून केला आहे इतकेच. अर्थात मिपाखरं असल्या आरोपांना फाट्यावर मारतात हेवेसांन.
लवकर बरे व्हा...!
आम्ही आधीपासूनच बरे आहोत, तुम्ही मात्र बरे होण्याची आशा मिपाखरांनी कधीच सोडून दिली आहे.

In reply to by वामन देशमुख

आम्ही आधीपासूनच बरे आहोत, तुम्ही मात्र बरे होण्याची आशा मिपाखरांनी कधीच सोडून दिली आहे. अगदी खरे आहे. पूर्ण सहमत. यांच्यातल्या एकाचे सदस्यत्व अर्वाच्य लेखनामुळे ४ वेळा प्रतिबंधित केले होते. त्याच्या अनेक तोतया सदस्यनामांना कायमस्वरूपी अर्धचंद्र दिला होता. परंतु ५ व्यांदा पुनर्जन्माची संधी मिळूनही या सदस्यात कोणतीही सुधारणा नाही.

In reply to by सुबोध खरे

बाकी आपण इतक्या खालच्या पातळीवर उतराल असे वाटले नव्हते! पाहूया अजून किती खाली उतरताय ते! ते पाताळाच्याही खाली जाऊ शकतात. तुमची तयारी आहे का इतके खाली उतरण्याची?

In reply to by श्रीगुरुजी

मला कधी कधी वाटतं की हा नैतिकतेतील फरक आहे गट 1 आणि गट 2 च्या लोकांच्या मधील. इंदिरा गांधीचां वध झाला तेव्हा कोणत्याही संघ कार्यकर्त्याने, जन संघाच्या नेत्याने, उजव्या विचारसरणीच्या नेत्याने, पंतप्रधानाच्या सुरक्षेत झालेल्या अक्षम्य निष्काळजीपणाचा मुद्दा बनवला नाही. त्या निष्काळजी पणाला खुद्द पंतप्रधान च जबाबदार होत्या हे सत्यही आता काही लपून राहिलेले नाही तरी आपण त्याच्या इश्यू बनवत नाही. ही गट.2 लोकं मात्र पहलगाम सारखा स्पष्ट आपल्या धर्माच्या लोकांवर हल्ला झाला तर हल्ल्याचा निषेध करायचे बाजूला ठेऊन सुरक्षा रक्षणेत गुप्तचर यंत्रनेने काय चुका केल्या ह्याचे पाढे मोजायला सुरू करतात म्हणजे अतिरेकी धर्मांध दहशतवादी , आणि त्या दहशतवादाचे मूळ कारण त्यांचे तत्वद्न्यान हे राहिलं बाजूला बाष्कळ मुद्दे रेटत राहतात. आणि मी ह्याचे थोडे psychoanalysis केले आहे. परधार्जीनेपणा , स्वकीयांपेक्षा परकियांच्या बाजूला उभे रहायचे हा ह्या लोकांच्या मनोवृत्तीचा , तत्त्वज्ञानाचा भाग आहे,... "पेशवाई बुडाली बरं झालं इंग्रजांचे राज्य आलं" हा विचार ह्यांच्या तत्वज्ञानाच्या मूळ संस्थापकाने कैक वेळा त्याच्या लेखनात मांडला आहे. 3rd Anglo Maratha war मध्ये एका थातूरमातूर चकमकीचे इंग्रजांनी स्मारक उभारले त्याचा उरूस कोणी सुरू केला हे मुळातूनच शोधून पाहण्यासारखे आहे. असो.

In reply to by प्रसाद गोडबोले

इंदिरा गांधींवरील हल्ल्याला खुद्द इंदिरा गांधी जबाबदार होत्या हे सत्य सर्वांना पचले तसे पहलगाम हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार आहे हे आपल्या पचनी का पडत नाही?

In reply to by प्रसाद गोडबोले

इंदिरा गांधीचां वध झाला तेव्हा कोणत्याही संघ कार्यकर्त्याने, जन संघाच्या नेत्याने, उजव्या विचारसरणीच्या नेत्याने, पंतप्रधानाच्या सुरक्षेत झालेल्या अक्षम्य निष्काळजीपणाचा मुद्दा बनवला नाही. जनसंघ काय किंवा इतर उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि नेत्यांनी इंदिरा गांधीची हत्या नव्हे तर वध ठरवले तर ते कसे निष्काळजीपणाचा मुद्दा बनवतील? हत्या मानली असती तर मुद्दा बनावलाही असता . असते एकेकाची मानसिकता. पहलगामध्ये आपल्या नागरिकांची हत्या झाली असे मानतो. उजवे वध मानत असतील म्हणून गप्प असतील.

In reply to by प्रसाद गोडबोले

गोडबोले, तुमच्या सारख्या विचारसरणीचे लोक इंदिरा गांधींचा 'वध' असे का म्हणतात? अधम, खल व्यक्तीची जर नायक मानलेल्या व्यक्तीकडून हत्या झाली तर त्याला वध असे म्हणतात. उदा. अफझलखान वध, जरासंध वध इ. इंदिरा गांधी या आपल्या पंतप्रधान होत्या, त्यांनी हयात त्यांच्या मताप्रमाणे राष्ट्राची सेवा करण्यात घालवली. काही चुकाही केल्या पण नंतर मान्य करून सुधारल्या देखील. (जे तुमच्या आवडत्या कट्टर उजव्या, सनातनी विचारसरणीत कधीही आढळत नाही.) त्यांचा भ्याडपणे त्या नि:शस्त्र असताना गोळ्या घालून खून करण्यात आला. त्याला तुंम्ही वध म्हणता? तर एवढा द्वेष तुंम्ही व तुमच्या विचारसरणीचे लोक आणता तरी कुठून असा मला जेन्युइन प्रश्न पडला आहे. एकाच वेळी सर्व भूतमात्रांप्रती द्वेष करू नये अशा अर्थाच्या संताच्या ओव्या लिहायच्या आणि त्याच वेळी आपल्या देशाच्या पंतप्रधानाचा मरणोत्तर उल्लेख करताना सुध्दा आपला द्वेष जराही विसरायचा नाही, थोडेही मनाचे औदार्य दाखवायचे नाही, हे तुमच्या गट क्र १ मधील लोकच करू जाणोत.

In reply to by स्वधर्म

सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे पापच होते. आणि पापात सहभागी होणाऱ्या वैद्यांनी ह्या पापाची किंमत फेडली आहे. ज्ञानेश्वरांनी अल्लाउद्दीन खिलजी पाहिला नव्हता, Alphanso De albuquerque, सेंट(?) झेवियर्स पाहिला नव्हता. पाहिला असता तर तेही कृष्णासारखेच म्हणाले असते - म्हणौनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं । संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥ १८९ ॥ म्हणून हे पहा, तुम्हा क्षत्रियांना युद्धावाचून दुसरे काही उचित नाही हे लक्षात ठेव. ॥२-१८९॥ खुद्द तुकोबाही म्हणाले आहेत - तुका म्हणे विंचु सर्प नारायण | वंदावे दुरोन शिवो नये ||३|| आणि समर्थ तर स्पष्टच बोलतात. धर्मासाठी झुंझावें। झुंझोनीं अवघ्यासी मारावें । मारितां मारितां घ्यावें । राज्य आपुलें ।।१।। देशद्रोही तितुके कुत्ते । मारोनि घालावें परते । देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशोयो नाही ।।२।। देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावां । मुलुख बडवावा कीं बुडवावा । धर्म संस्थापनेसाठीं ।।३।। सोडा, तुम्हाला नाही कळणार . 2029

In reply to by प्रसाद गोडबोले

अरेच्चा! चक्क तुमच्या गटातील गुरूजी व कर्नल यांनी तुमची सुवर्ण मंदीरात सैन्य घुसवण्याच्या पापाबद्दलची विधाने अतार्किक ठरवलेली आहेत. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी पाप केले व म्हणून त्यांचा 'वध' असा शब्दप्रयोग तुंम्ही करत असाल, तर तुमचे बेसिकच इतके गंडलेले आहे, की पुढे काही बोलण्यासारखेच नाही. धर्माचे अयोग्य पढिक आकलन माणसाच्या सामान्य ज्ञानाला कसे झाकोळून टाकते याचा उत्तम नमुना म्हणजे आपले 'वध' हे संबोधन. मी म्हटल्याप्रमाणे अध्यात्मिक ओव्या दरएक प्रतिसादात पेरणारी व्यक्ती कुणाचा इतका द्वेष मृत्यूनंतर इतकी वर्षे करत असेल तर असले अध्यात्म काय कामाचे? तुंम्ही कोणाचाही द्वेष करू नये यावर १००० शब्दांचा व १०० ओव्या व श्लोक असलेला लेख लिहू शकाल, पण आपल्याला मते न पटणार्या व्यक्तीचा द्वेष करू नये, हे कळत नसेल तर... असो.

अतिरेकी इतक्या आतपर्यंत आलेच कसे व सहीसलामत परत गेलेच कसे सरकारचे इनकमिंग आणि आऊट गोईंग धोरण ,दुसरे काय?

In reply to by आग्या१९९०

भक्त लगेच पिसाटल्यासारखे मुस्लिमद्वेष करू लागले! अरे पण अतिरेकी आलेच कसे नी गेलेही कसे हे प्रश्न भक्तांना पडले नाहीत, मोठमोठ्या गप्पा हाणायला नी आंतरराष्ट्रीय प्रश्नात डोळे खोपस्सायला ही मांडली पुढे असते! ३५ - ४० हजार कोटींचा कश्मीरवर खर्च दाखवला जातो, हा खर्च हे भाजपेयी नक्की काश्मीरवर करताहेत की हा पैसा भाजप नेत्यांच्या खिशात जातो आहे हे कोणती यंत्रणा तपासणार?

सध्या पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकार उघडे पडले आहे, चहुबाजूने टीका होत असल्याने नी आपल्याला उत्तर देता येत नसल्याने काही मिपाकर वेडेपिसे झाले आहेत, सरकारला धारेवर धरणाऱ्यांनाच व मिपावर फॅक्ट दाखवून प्रश्न विचारणाऱ्यांनाच वेडे ठरवू लागले आहेत. :) अंधभक्तो हो अंधभक्ती!

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सर्वत्र पाकिस्तानप्रेमींना पाकिस्तानप्रेमाचं भरतं आलंय. मिपावरील पाकिस्तानप्रेमींचंही तसंच झालंय. कठीण आहे मोदींचं. उघड उघड असलेल्या बाह्यशत्रूंशी लढायचं आणि त्याचवेळी गुप्त अंतर्शत्रूंशीही लढायचं.

In reply to by श्रीगुरुजी

कठीण आहे मोदींचं. उघड उघड असलेल्या बाह्यशत्रूंशी लढायचं आणि त्याचवेळी गुप्त अंतर्शत्रूंशीही लढायचं. टेंशन नका घेऊ. " एक अकेला सब पर भारी " वर विश्वास डळमळीत होऊ देऊ नका.

सध्या पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकार उघडे पडले आहे, चहुबाजूने टीका होत असल्याने नी आपल्याला उत्तर देता येत नसल्याने काही मिपाकर संतुलन हरवून बसले आहेत, सरकारला धारेवर धरणाऱ्यांनाच व मिपावर फॅक्ट दाखवून प्रश्न विचारणाऱ्यांनाच देशाचे शत्रू ठरवू ठरवू लागले आहेत. मोदीना विरोध म्हणजे देशाला विरोध का हो? अंधभक्ती हा मानसिक आजार मानावा का?

कुठलीतरी निश्चीत बाजू घ्यावीशी वाटणे नव्हे ती तशी असणे असे वाटणे ही एक सर्वसाधारण मानवी मनाची कन्सीस्टन्सीची गरजच असावी. म्हणजे व्याख्ये सारखं अनेकांना प्रत्येक बाबतीत एका निश्चीत व्याख्येची गरज भासते. व्याख्या जितक्या प्रमाणात अस्पष्ट संदिघ्द असेल तितक्या प्रमाणात अस्वस्थता स्ट्रेस वाढत जातो. उदा. सध्याचा राष्ट्रवाद हा मुद्दा यावरुन मग कुठली बाजु उचलुन धरायची हा निवडीचा तणाव निर्माण होतो. सत्य वा व्यक्ती वा तथ्य हे स्थितीशील नसुन गतीशील असल्याने व सतत परीवर्तनशील असल्याने त्याला असं निश्चीत पॅटर्न मध्ये पकडणं शक्य नसतं हे एकीकडे व बाजु घेण्याचा दबाव दुसरीकडे या पेचात बरेचदा अडकायला होतं मॉब लिंचींग मध्ये किंवा रॅगींग मध्ये जर आपण पिडिताची बाजु घेतली तर आपल्यावरही तोच प्रसंग गुदरेल या भितीने मॉब ची बाजु जरी चुकीचा असेल तरी घेतली जाते. इथे संस्थळावरील चर्चेतही जर आपण वेगळी बाजु मांडली तर टीका होइल असा दबाव असु शकतो +१ ही प्रतिसाद शैली बहुतांश या दबावप्रेरणेतुन येत असावी. हो हो मी ही तुमच्या बरोबरच आहे. मोदी हा एक रोचक फॅक्टर इथे आर्वजुन नमुद करावासा वाटतो म्हणजे मोदी च्या बाबतीत मिक्स्ड फीलींग्ज असु शकतात पण त्यांच्या समर्थक वा विरोधक दोघांना दोन्ही कडे प्रसंगानुरुप बाजु घेणे मंजुर नसते या तो तुम हमारे साथ हो..................... असा बालिश आग्रह असतो. आता यात संधीसाधुपणा हा ही एक भाग आहे म्हणजे सोयीस्कर कुठलीच बाजु न घेणे पॉलिटीकली करेक्ट असणे पणं आता हा फरक की अमुक एक पॉलिटीकली करेक्ट वागतोय की जेन्युइनली त्याला एकाच वेळेस अनेक बाबी पटतातही व नाहीही थोडक्यात जेन्युइनली मिक्स्ड इमोशन्स वा कन्फ्युज्ड आहे. जे फंडामेंटलीस्ट आहेत मग कुठल्याही बाबतीत धर्म च नव्हे विचारसरणी त्यांच्यात कमालीचा ठामपणा आढळतो आकर्षक उद्दाम सोपा पण अंतिमत: घातक ठामपणा काळे वाइटच..... अ‍ॅलोपॅथी वाइटच.......... पैसा हवाच..... आत्मा आहेच..........................इ.इ. त्याउलट जितका विचारी संवेदनशील माणुस तितका बिचारा कनफ्युज्ड आढळतो कुठला झेंडा घेऊ मी हाती ? काही फॅक्ट्स च मोठ्या घोळदार असतात उदा भारतीय अध्यात्मातील ब्रह्म ते असे आहे ते तसे आहे ते इथे आहे ते तिथे आहे ते आहे ते नाही ते अमुक ते तमुक थोड्या वेळाने आपण फक्त गोल च फिरतोय असा भास होतो चक्कर येउ लागते. असो

In reply to by मारवा

>> जे फंडामेंटलीस्ट आहेत मग कुठल्याही बाबतीत धर्म च नव्हे विचारसरणी त्यांच्यात कमालीचा ठामपणा आढळतो आकर्षक उद्दाम सोपा पण अंतिमत: घातक ठामपणा - सहमत. जे कृष्णमूर्ती यांचे विधान आठवले: Confident human being is a dead human being - त्याचमुळे टोकाचे उजवे लोक आपल्या महानेत्यावर प्रचंड विश्वास ठेवतात व विरोधी मत असलेल्या लोकांना, त्यांच्या नेत्यांना अत्यंत कमी लेखून त्यांचा कमाल अपमान करायचा प्रयत्न करतात. याची उदाहरणे या लेखात ठाईठाई दिसत आहेत. टोकाचे डावेही कदाचित हेच करत असावेत. >> जितका विचारी संवेदनशील माणुस तितका बिचारा कनफ्युज्ड आढळतो. बरोबर. जितका बिनडोक, तितका ठाम हा वरील विधानाचा व्यत्त्यास होय.

सुवर्णमंदिरात सैन्य घुसवणे हे पापच होते. आणि पापात सहभागी होणाऱ्या वैद्यांनी ह्या पापाची किंमत फेडली आहे. उपरोधाने लिहिले नाही असे गृहीत धरतोय. सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवून नराधम भिंद्रनवाले व शेकडो अतिरेक्यांना मारणे हे अत्यावश्यक पुण्यकर्म होते. हे खूप आधीच व्हायला हवे होते.. निवडणुकीवर डोळा ठेवून खूप उशिरा ही कृती केली, परंतु ती योग्य कृती होती. सुवर्णमंदिरात सैन्य पाठवून भिंद्रनवालेला मारून इंदिरा गांधींनी त्याला मोठे करण्याच्या आपल्या पापाचे परिमार्जन केले होते. या कामगिरीचे नेतृत्व करणाऱ्या जनरल अरूणकुमार वैद्य यांची दुर्दैवाने जिंदा आणि सुखाने हत्या केली. नंतर त्यांनीच मॉडेल कॉलनीतील युनियन बँकेवर दरोडा टाकून तेथील शिपाई भगवान भरगुडेचीही हत्या केली. पण नंतर त्यांनाही फासावर चढवून आपली पापे फेडावी लागली.

In reply to by श्रीगुरुजी

असो. कोणत्याही मंदिरात सेक्युलर सैन्य घुसवणे हेच पाप आहे. Temples are islands of religious sovereignty. State and state forces have no business to interfere with its matters whatsoever. मी माझे स्पष्ट मत मांडले. I want every Hindu temple to be treated like Vatican City. पेशव्यांच्या नेतृत्वातील मराठा सैन्याने पवित्र शृंगेरी मठात लुटालूट केली होती, आणि त्या पापाचे फळ पेशव्यांना देखील भोगावे लागले होते !! असो. पण हा फाट्याने फाटा फुटत गेलेला विषय आहे . ह्याचा मूळ पहलगाम आणि मोदी द्वेषी लेखाशी संबंध नसल्याने मी अवांतर काहीही बोलू इच्छित नाही पहलगाम आणि जातीगानाना ह्यांचे पडसाद आपण 2029 मधील निवडणुकात पाहू. कोलांट्याउड्या बास आता.

In reply to by प्रसाद गोडबोले

State and state forces have no business to interfere with its matters whatsoever. हजारो निष्पाप नागरिकांना ठार मारून सुवर्णमंदिरात लपलेल्या आणि पाकिस्तानशी हातमिळवणी करून देशविरोधी कृत्य करणाऱ्या क्रूर देशद्रोह्यांना यमसदनास पाठविण्यासाठी सुवर्णमंदिरात सैन्य पाठवून ठार मारणे हे अत्यंत पुण्याचे काम आहे. तेथील कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी सैन्य गेले नव्हते. तेथे बॉम्ब व बंदुकांचा साठा करून लपून बसलेल्या क्रूर देशद्रोह्यांना ठार मारणे अत्यावश्यक होते. पेशव्यांच्या नेतृत्वातील मराठा सैन्याने पवित्र शृंगेरी मठात लुटालूट केली होती, आणि त्या पापाचे फळ पेशव्यांना देखील भोगावे लागले होते !! अतार्किक हास्यास्पद विधान. पहलगाम आणि जातीगानाना ह्यांचे पडसाद आपण 2029 मधील निवडणुकात पाहू. जानेवारी २०२४ मध्ये प्राणप्रतिष्ठा झालेल्या अयोध्येतील श्रीराममंदिराचे पडसाद ३ महिन्यांनतर झालेल्या निवडणुकीत पडले नव्हते. मग २०२९ निवडणूक तर अजून ४ वर्षे अंतरावर आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कोणत्याही मंदिरात सेक्युलर सैन्य घुसवणे हेच पाप आहे. कोणतेही मंदिर मशीद, दर्गा, चर्च असो, त्यात देशद्रोही घुसले असतील तर कुठलाही मुलाहिजा न बाळगता कारवाई करायला हवी हे अत्यंत पुण्यकर्म आहे. मंदिरापेक्षा देश महत्वाचा आहे.

ब्लू स्टार ऑपेरेशन योग्यच होते. नाहीतर धार्मिक स्थळं ही गुन्हेगारांचे अड्डे बनले असते. नाहीतर करा बलात्कार लपा तिथं जाऊन. करा बॉम्ब स्फोट लपा जाऊन. हे असले प्रकार घडले असते.

लालकृष्ण अडवाणी, जे त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे (भाजप) नेते होते, यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींना तेव्हा विरोध केला. त्यांनी या आरक्षणाला 'जातीयवाद' म्हटले आणि त्याचा विरोध करण्यासाठी 'रथयात्रा' काढली. आजचा भारतीय जनता पक्ष आणि नेते पुन्हा जातजनगणने द्वारे पुन्हा 'आरक्षणाकडे' घेऊन जाणार आहेत. मंडलला विरोध करीत लोकांचे लक्ष 'रथयात्रे'त लोकांना नेले. आज भाजपा 'पहलगाम' कडून देशाला कुठे कुठे जातो ते पाहणे रोचक ठरणार आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चुकीच्या धारणा असतील तर काळच भानावर आणतो असे म्हणावे लागेल. जसे की आपल्या मातृसंस्थेवर बंदी घालणार्‍या नेत्याचाच पुतळा उभा करावा लागणे. तथापि, ही १८० अंशात मारलेली कोलांटी हा नक्कीच योगायोग नसावा, कारण.. नजिकच्या कालावधीसाठी: पहलगामपेक्षा मोठा दुसरा विषय लोक व माध्यमांना चघळायला देणे. हे तर जमलेले आहे. लोक पंप्र काश्मीरला गेले नाहीत, पिडीतांना भेटले नाहीत, हे विसरले व जातनिहाय जनगणनेवरच बोलू लागले. लांबच्या कालावधीसाठी: भाजप सारखा पक्ष जिंकल्याच्या दुसर्या दिवसापासून पुढील निवडणूक जिंकण्याची रणनीती आखू लागतो. काँग्रेसचा अजेंडा पळवून नितिश कुमार यांना कोपर्‍यात ढकलणे हा डाव असावा बहुतेक. किंवा खरे तर नुसतीच हूल दिलेली असू शकते.

In reply to by स्वधर्म

सहमत. पण, ''नजिकच्या कालावधीसाठी: पहलगामपेक्षा मोठा दुसरा विषय लोक व माध्यमांना चघळायला देणे'' ते आता सध्याची परिस्थिती पाहता राजकीय हितासाठी कोणतीही अशी चघळायची 'गोळी' परवडणारा नाही, हे त्यांच्या धुरीणांनाही कळते. पहलगामच्या मुद्यावर सरकारला निर्णायक मुद्यांवर जाणे आवश्यक वाटत आहे. सर्वपक्षीय पाठींबा आहे. सर्वच ठिकाणी 'चणे फुटाण्याचा' प्रसाद देऊन सर्वच खुश होतील असे त्यांनाही वाटत नाही. पहलगामच्या घटनेमुळे सरकार व्यथित झाले नसेल पण सर्वसामान्य जनता दु;खी आहे. 'हिसाब जरुरी है' याचा एक दबाव आहे. प्रतिमा जपायची तर, आता पाऊल टाकावे लागेल. भले सीमेवर जाऊन परत येणे का होईना तशी कार्यवाही करावी लागेल. एक दोन दिवस युद्धजन्यस्थिती किंवा सीमेशेजारील अतिरेकी तळांवर मारा करणे आणि पाकिस्तानात गडबड पसरवून मग आंतरराष्ट्रीय गटाकडून 'शस्त्रसंधी, थांबा, चर्चा करा, वाट पाहा,सबूरीने घ्या' इथपर्यंत येईपर्यंत एक चटका पाकला द्यावा इतपत तयारी भारत करेल तेव्हा सरकार आणि भाजपाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. आता त्या पातळीवर जाता येईल काय ? इतकंच त्यांच्या हातात आहे. बाकी, 'विकास' वगैरेचा प्रकाश झोत तर डोळ्यांना सहन होत नाही इतका तीव्र आहे. सद्य सरकारच्या राजकीय अस्तीत्वासाठी 'छोटंसं' का होईना युद्ध गरजेचं आहे. नसता. पुढील निवडणूकीत 'जहाल भाजप' 'मवाळ भाजप' 'काँग्रेस सदृश भाजप' अशा निरनिराळ्या 'भाजपाच्या' नव आवृत्त्या निवडणूकीत दिसतील असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहलगामच्या घटनेमुळे सरकार व्यथित झाले नसेल
हे सन २००८ नसून २०२५ आहे, याचा विसर पडला की अशी विधाने केली जातात. बाकी...
'विकास' वगैरेचा प्रकाश झोत तर डोळ्यांना सहन होत नाही इतका तीव्र आहे.
...सहमत आहे. मागच्या दहा-बारा वर्षांत भारताने खरंच नेत्रदीपक प्रगती केली आहे.

In reply to by वामन देशमुख

श्री मोदी काही करत नाहीत हे घसा खरवडून ओरडून ओरडून घसे बसले आणि जी वस्तुस्थिती बाहेर येते आहे त्यामुळे बऱ्याच मोदी रुग्णांची फार जळजळ होत आहे. त्याला काही इलाज नाही.

आरक्षणाची आवश्यकता असणे, दुर्बल समाज घटकांना संधी आणि प्रतिनिधित्व,तसेच सामाजिक न्याय हे सर्व योग्यच आहे मात्र कुठल्याही परिस्थिती 50 टक्के ची भिंत कुठल्याही परिस्थितीत पाडली जाऊ नये. यामुळे मूलभूत eqalitty आणि. meritocracy दोन्ही तत्वे मातीमोल होतील. याला व राहुल गांधीच्या या असंवैधानिक, अतात्विक व अन्याय्य मागणीला ठाम विरोध केला पाहिजे. (अगोदरच सुप्रीम कोर्टाच्या इंद्र साहनी केस मधील कच्च्या ढिसाळ निकालाचा फायदा उचलून, मतपेटीच्या संकुचित राजकारणासाठी, (तामिळनाडू सारख्या काही राज्यांनी अगोदरच 50 टक्के सीमा पार केलेली आहे.) येथे सुप्रीम कोर्टाने जरी अपवादात्मक स्थितीसाठी अट दिलेली होती तरी तरतुदी पुरेशा कडक न ठेवल्याने याचा पुरेपूर फायदा उचलून 50 टक्के भिंत पाडण्याचे पुरेपूर राजकीय हेतूने प्रयत्न होत आहेत. हे फार चुकीचे आहे होत आहे.

In reply to by मारवा

तरीही तामिळनाडू मोदींच्या गुजरात नी योगीच्या यूपीपेक्षा जास्त विकसित कसा?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तामीळ्नाडू हे शिक्षण, साक्षरता, स्त्रियांची सुरक्षितता, आर्थिक बाबतीत बिमारू गाय पट्ट्यातील राज्यांपेक्षा खूप पुढे आहे. त्यांनी दिलेल्या जीएसटी मधून त्याना व महाराष्ट्रासारख्या राज्यांना खूप कमी परतावा मिळतो व बिमारू मागास राज्यांना जास्त पैसे दिले जातात.

In reply to by मारवा

तामिळनाडूचे ६९ % आरक्षण १९८० पासूनचे आहे आणि इंद्रा साहनी चा निकाल १९९२ मध्ये आला. त्यानंतर हे आरक्षण मद्रास उच्च न्यायालयाने रद्द केले होते पण त्यावर तामिळनाडू विधानसभेत विधेयक पास करून घेतले कि हे आरक्षण ६९ % पर्यंत असावे. यानंतर तामिळनाडू चे सर्वपक्षीय मंडळ राष्ट्रपतींना भेटून हे आरक्षण घटनेच्या ९ व्य परिशिष्टात टाकण्यात आले. याविरुद्धचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एक गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी हा खटला सुनावणीस येत नाही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ९ व्या परिशिष्टाची पळवाट बंद केली आहे यामुळे मराठा आरक्षण ५० % च्या वर सरकत नाही https://www.thenewsminute.com/tamil-nadu/how-tamil-nadu-s-reservation-s… इंद्र साहनी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा पूर्णपीठाने सरसकट क्रिमी लेयर लावा असे बहुमताने स्पष्टपणे लिहिलेले आहे. परंतु नोकरशाही आणि लोक प्रतिनिधी यांच्या स्वतःच्या मुलांच्या फायद्यासाठी हा क्रिमी लेयर लावला जात नाही. उत्तम खोब्रागडे या आय ए एस अधिकाऱ्याच्या मुलीला आरक्षण देऊन आय एफ एस मध्ये जागा कशासाठी? तिच्या ऐवजी त्याच जातीतल्या एखाद्या जास्त पात्र उमेदवाराला हीच जागा देता आली असती. उद्या होणारे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुलांना आरक्षण देणे हे आरक्षणाच्या मूलभूत तत्वाला (अंत्योदय) काळिमा फासणारे आहे. ( खोब्रागडें गवई हि प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.)

In reply to by सुबोध खरे

याविरुद्धचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एक गठ्ठा मतांच्या राजकारणासाठी हा खटला सुनावणीस येत नाही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ९ व्या परिशिष्टाची पळवाट बंद केली आहे यामुळे मराठा आरक्षण ५० % च्या वर सरकत नाही. फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वेक्षणाचे नाटक करून मराठा अत्यंत गरीब, मागास इ. कागदोपत्री दाखवून १०% राखीव जागांचा कायदा आणला. त्याविरोधात तात्काळ उच्च न्यायालयात खटला दाखल केला. त्यासाठी ३ न्यायाधीशांचे खंडपीठ नेमले गेले. या खंडपीठाने अत्यंत संथ गतीने सुनावणी सुरू केली. ६०% सुनावणी पूर्ण झाल्यानंतर एका न्यायाधीशाची बदली केल्याने आधीचे सर्व कामकाज रद्द झाले. आता तिसरा न्यायाधीश नेमून नव्याने सुनावणी होणार असे सांगितले गेले. फिर्यादी पक्षाने जानेवारी २०२५ मध्येच तिसरा न्यायाधीश नेमून सुनावणी करावी असा अर्ज दिलाय. परंतु ४ महिने उलटल्यानंतरही तिसरा न्यायाधीश नेमला जात नाही. सुनावणी पूर्ण झाली तर हा कायदा रद्द होईल. त्यासाठी सुनावणीच टाळणे हे राज्य सरकार करीत आहे व न्यायालयाची त्यांना साथ आहे.

In reply to by श्रीगुरुजी

न्यायालयात न्याय मिळतोच असे नाही. न्यायालयात निकाल मिळतो तो हि वेळेत मिळेल याची खात्री नसते. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात आगीत जळत असलेल्या नोटांच्या बद्दल तीन न्यायाधीशांचा अहवाल आता दीड महिन्यांनी आला आहे. सामान्य माणसाच्या घरात असं काही सापडलं असतं तर आतापर्यंत तो पोलीस/ न्यायालयीन कोठडीत खितपत पडला असता. हे लोक सामान्यातील असामान्य आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वेक्षणाचे नाटक करून मराठा अत्यंत गरीब, मागास इ. कागदोपत्री दाखवून १०% राखीव जागांचा कायदा आणला गरीब कोणत्या अर्थाने? मराठा समाजावर सामाजिक अन्याय झाल्याचा पुरावा कोणता? मराठा समाजाने राखीव जागांची मागणी करून बौद्धिक मागासलेपण दाखवू नये. उद्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले तरी आर्थिक दृष्ट्या गरीब मराठी वर्गाला त्याचा फार फायदा होणार नाही. मराठा समाज दुभंगला जाईल.

In reply to by आग्या१९९०

सांख्यिकीने कोणतीही गोष्ट सिद्ध करता येते एक सत्य सोडलं तर घटनेतील आरक्षणाच्या मूलभूत विचाराप्रमाणे केवळ सामाजिक मागासलेपण हा आरक्षणाचा निकष आहे, आर्थिक मागासलेपण नाही आहे. या निकषात मराठा समाज कोणत्याही बाबतीत बसत नाही. सर्व तथाकथित उच्च जाती मध्ये गरीब आणि पिचलेले लोक आहेतच परंतु ते सामाजिक उतरंडीत मागासलेले नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यास घटनात्मक आधार नाही. आपल्या ३३ % लोकसंख्येच्या आधारावर मतपेटी बनवून collective bargaining म्हणतात त्याप्रमाणे काही मराठा नेत्यांनी आपल्या राजकीय उद्धारासाठी हा मुद्दा ज्वलंत ठेवलेला आहे. बहुतांशी शिक्षण संस्था या मराठा समाजाच्या पुढाऱ्यांच्या हातात आहेत परंतु त्यांनी आपल्या समाजाच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी काही विशेष केल्याचे दिसत नाही. केवळ मतपेटीच्या आधारावर आपल्या मागण्या पदरात पडून घ्यायच्या हि राजकीय खेळी सर्वच करत आले आहेत. यात मागासवर्गीय नेते आणि मुसलमान नेते अग्रगणी होते यात आता मराठा नेत्यांची भर पडली आहे. आणि मताच्या राजकारणात कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता मराठा समाजाला आरक्षण देणे हे घटनाबाह्य आहे असे म्हणून राजकीय आत्महत्या करणार नाही. मग ते श्री शिवाजी महाराजांचे वंशज असोत कि कोणत्याही पक्षातील राजकीय नेते.

In reply to by सुबोध खरे

फक्त ८ दिवसात १५० प्रश्न असलेली प्रश्नावली १४ कोटी नागरिकांकडून भरण्याचे सर्वेक्षणाचे नाटक करून मागासवर्गीय आयोगाने काढलेले निष्कर्ष - १. माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याची आणि पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्याची मराठा समाजाची पातळी कमी आहे. २. आर्थिक मागासलेपणा शिक्षणातील सर्वात मोठा अडथळा आहे. ३. दारिद्र्य रेषेखाली असलेली आणि पिवळी शिधापत्रिका असलेली मराठा कुटुंबे २१.२२ टक्के, दारिद्र्य रेषेखाली खुल्या प्रवर्गातील कुटुंबे १८.०९ टक्के आणि मराठा कुटुंबाची टक्केवारी राज्याच्या सरासरीपेक्षा (१७.४) टक्के अधिक असून ती असे दर्शवते की ते आर्थिकदृष्ट्या मागास आहे. ४. सार्वजनिक नोकऱ्यांच्या सर्व क्षेत्रांमध्ये (सरकारी) मराठा समाजाचे अपर्याप्त प्रतिनिधित्व आहे आणि म्हणून सेवांमध्ये पर्याप्त प्रमाणात आरक्षण देण्याच्या दृष्टीने ते विशेष संरक्षण देण्यास पात्र आहे. ५. दुर्बल मराठा समाजाच्या आर्थिक आकडेवारीवरून स्पष्ट होते की खुल्या प्रवर्गात मोडत नसलेल्या वर्गाच्या तुलनेतही मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती निम्न आहे. ६. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, आत्महत्या केलेल्या व्यक्तींपैकी ९४ टक्के व्यक्ती मराठा समाजातील आहेत. ७. दुर्बल मराठा समाजाचा उत्पन्नाचा आर्थिक स्रोत कमी होत मराठा समाजाला माथाडी कामगार, हमाल, शिपाई, सफाई कामगार, मदतनीस, घरगुती कामगार, डबेवाले, वाहनचालक इत्यादींकडून दिल्या जाणाऱ्या कामावर अवलंबून राहावे लागत आहे. शेतीतून मिळणारा परतावा कमी होणे, धारण जमिनीचे तुकडे होणे, शेतीशी संबंधित असलेली प्रतिष्ठा गमवणे, इत्यादी घटकांमधून मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती ढासळली. ८. दुर्बल मराठा समाज इतका वंचित वर्ग आहे की त्याला विद्यमान मागासवर्गापेक्षा वेगळे वर्गीकरण करणे गरजेचे आहे, असे आयोगाला आढळून आले आहे. ९. मराठा समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या २८ टक्के असल्याचे आयोगाला आढळून आले आहे. १०. मराठा समाजाला सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांचा वर्ग म्हणून घोषित करण्याची शिफारस करण्यात येत आहे. ११. मराठा समाजाला विद्यमान राखीव प्रवर्गापासून विभिन्न आणि स्वतंत्र टक्केवारीच्या प्रमाणात वेगळा समाज घटक समाजण्याची गरज आहे. यासाठी पर्याप्त टक्केवारीची तरतूद राज्य सरकार करू शकेल. यातील निष्कर्ष क्र. १ ते ८ अत्यंत अविश्वसनीय व अनाकलनीय आहेत. अनेकांनी हे जाहीर सांगितले होते की सर्वेक्षणासाठी त्यांच्याकडे कोणीही गेले नव्हते. आमच्याकडे एक माणूस आला होता. त्याने फक्त घरातल्यांची नावे लिहून घेतली व काहीही न विचारता निघून गेला. मराठा अत्यंत मागास, गरीब, शिक्षण न मिळालेले, शतकानुशतके सामाजिक अन्याय सहन करणारे आहेत असे निष्कर्ष काढायचे व ते दाखवून राखीव जागा द्यायच्या हे आधीच ठरले होते. म्हणूनच सर्वेक्षणाचे नाटक करण्यात आले. हेच नाटक २०१४ व २०१८ मध्ये करून राखीव जागा दिल्या होत्या व दोन्ही वेळा न्यायालयाने मराठा मागास असल्याचे निष्कर्ष नाकारून राखीव जागा रद्द केल्या. यावेळीही तेच होणार असल्याने न्यायालयाशी संगनमत करून खटल्याची सुनावणी होऊन दिली जात नाही.

In reply to by सुबोध खरे

चांगली माहिती. मग १९८० च्या आधीच मराठा आरक्षण मिळवायला हवं होतं.मी तर जो मागेल त्याला आरक्षण मिळावं असे म्हणते.शेवटी कोणीही असो माणसालाच पुढे न्यायचे आहे. होय क्रीमी लेयरचा नियम मात्र तंतोतंत पाळलाच पाहिजे.

In reply to by Bhakti

भारतीय राज्यघटने च्या basic structure of constitution ज्यामध्ये principle of equality सुध्दा येते. हे doctrine सुप्रीम कोर्टाने दिलेल्या केशवानंद भारती तसेच इतर महत्वाच्या खटल्यात स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलेली आहे. आणि केवळ या मुळेच संसदेने सुद्धा एखादा कायदा पास केला की जो या basic structure उल्लघन करतो तो पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार आहे. कारण सर्वोच्च न्यायालय हे भारतात राज्यघटनेचे सर्वोच्च अधिकारी interpreter मानले गेलेले आहेत. आणि यासाठीच याच आधारावर इंद्र साहनी केस मध्ये 50 टक्केच्या वर आरक्षण गेल्यास ते principal of equality चे भंग होईल.म्हणूनच 50 टक्केची मर्यादा आखून दिली. तसेच अती अपवादात्मक स्थितीत केवळ तिला वाढवण्याची परवानगी दिली होती. माया मते ही अपवाद मंजूर करणे ही सुप्रीम कोर्टाची सर्वात चुकीचा निर्णय होता. कारण आरक्षण हा right नाही हे एक well established legal तथ्य आहे. जेव्हा ओपन वर्गाला 50 टक्केपेक्षा कमी जागा राहतील तेव्हा हे सरळ सरळ घटनेचे उल्लघन आहे. जे की उघड उघड अन्याय असे आहे व घटनाविरोधी आहे. सुप्रीम कोर्टाच्या अपवादात्मक तरतुदी cha अत्यंत गैरवापर राजकीय हेतूने होत आहे. म्हणून मागेल त्याला आरक्षण अशी भूमिका सर्वथा चुकीची आहे जर त्यात या मर्यादेचे भान नसेल तर

In reply to by मारवा

मुळात मागासवर्गातील पात्र उमेदवारांना खुल्या प्रवर्गात प्रवेश घेता येतोच कि. म्हणजेच आरक्षणापेक्षा त्यांना जास्त जागा उपलब्ध आहेतच. त्यांना अधिक आरक्षण देण्यापेक्षा सक्षम करून खुल्या प्रवर्गात स्पर्धेत उतरवायला हवे. परंतु मतपेटीच्या राजकारणामुळे असे उघडपणे कोणताही पक्ष किंवा नेता म्हणतच नाही हीच तर शोकांतिका आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाला विरोध केला होता. कारण आरक्षण दिल्यास कोणीही पुढे येण्यास तयार होणार नाही हि त्यांची भीती होती. ती संपूर्णपणे सार्थ होताना दिसते आहे. चंद्रावर अंतराळ वीर पाठवण्याच्या रांगेत चांद्रयानात २७ टक्के मागासवर्गीय, २३ टक्के इतर मागास वर्गीय, १५ टक्के आदिवासी , १५ टक्के धार्मिक मागासवर्गीय, १९ टक्के आर्थिक मागासलेले आणि जर जागा शिल्लक राहील्यास दोन अंतराळवीर अशी मांडणी होईल. जातीवर आधारित आरक्षण शिगेला पोचल्यास राष्ट्राचा अपकर्ष नक्की आहे.

In reply to by सुबोध खरे

जातीवर आधारित आरक्षण शिगेला पोचल्यास राष्ट्राचा अपकर्ष नक्की आहे. शाहू महाराजांनी जातीआधारित आरक्षण देऊनच अनेक जातींचा पर्यायाने राष्ट्राचा उत्कर्ष केला!

In reply to by सुबोध खरे

>> उद्या होणारे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मुलांना आरक्षण देणे हे आरक्षणाच्या मूलभूत तत्वाला (अंत्योदय) काळिमा फासणारे आहे. नुकतेच निवृत्त झालेले सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे वडीलही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते. तसेच त्यांचा मुलगाही अत्यंत तरूण वयात सरकार तर्फे अनेक मह्त्वाच्या प्रकरणांत थेट उच्च न्यायालयात बाजू मांडत आहे. सध्याचे न्यायाधीश खन्ना यांचे चुलतेही सरन्यायाधीश होते. न्यायव्यवस्थेत तर कुठे आरक्षण नाही. पण 'ते' अदृश्य आरक्षण बरोबर काम करतेच आहे. फक्त गुणवत्तेचा ध्यास लागलेल्या हुषार पण 'निष्पाप' लोकांना घटनेद्वारे सामाजिक मागासलेल्यांना मिळणारे आरक्षण अगदी डाचते, पण वरील 'आरक्षणात' काही खटकत नाही. मुळात त्यांना ते लक्षातच येत नाही. मात्र त्यांना अजून गवई सरन्यायाधीश व्हायच्या आधीच आरक्षण लागू होऊन त्यांची मुले पदावर बसतील अशी चिंता लागली आहे. अवांतरः काही दिवसांपूर्वी आरक्षण नसलेल्या न्यायव्यवस्थेतील एका न्यायमूर्तींच्या घरी नोटांचे घबाड आढळले होते. प्रकरण संथ गतीने सुरू राहील व ते कार्यरतही राहतील.

In reply to by स्वधर्म

साफ चुकीचा अर्थ लावलाय. माझे म्हणणे एवढेच होते कि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या मुलांना जर केवळ मागासवर्गीय घरात जन्माला आले आहेत म्हंणून आरक्षण दिले गेले तर मुळातील "अंत्योदय" या कल्पनेलाच काळिमा फासला जाईल. क्रिमी लेयर सरसकट का लावायला हवा यासाठी दिलेले ते उदाहरण आहे. अशा उमेदवारा ऐवजी मागास जातीतील दुसरा संधी न मिळालेला उमेदवार जास्त पात्र ठरतो एवढेच म्हणणे आहे वशिला ( NEPOTISM) आणि आरक्षण हे दोन वेगळे मुद्दे आहेत.

In reply to by सुबोध खरे

क्रीमी लेयर लावावा हे तत्व मलाही मान्य आहे. मुद्दा घराणेशाहीचा नाहीच मुळी. चंद्रचूड हे एक उदाहरण आहे, जे फक्त घराणेशाहीने घडले असे नाही. तथापि घडलेले उदाहरण तुमच्या लक्षात आले नाही पण गवई यांच्या बाबतीत अजून जे घडलेच नाही, ते मात्र लगेच लक्षात आले! मुद्दा असा होता की केवळ मागासवर्गीय घरात जन्माला आला म्हणून आरक्षणाने एखाद्याला संधी मिळते याचे आपणांस जेवढे दु:ख होते, तेवढे... केवळ प्रस्थापित सामाजिक स्तरात (उच्चवर्णीय आणि त्यामुळे आपसूकच मिळालेले नेटवर्क, सामाजिक भांडवल, उच्च पद इ.) जन्माला आलेले लोक ज्या प्रकारे आरक्षण भोगत आलेले आहेत, त्याचे दु: ख होते का? अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण २२.५% आज ७५ वर्षे आहे. पण - आजपर्यंत २४५ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यात फक्त ७% च दलीत का आहेत? - पण आय ए एस मधे आज रोजी अनुसूचित जाती व जमातीचे फक्त ८% लोक आहेत. बाकीचे सर्व लोक कुठून तिथे पोहोचतात? - इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे जाणार्‍यांत समान गुणवत्ता असली तरी नोकरी मिळण्याची शक्यता उच्च वर्णीय लोकांत ३०% अधिक आहे. हे असे का आहे? इथे कोणते आरक्षण कार्यरत आहे? ते केवळ प्रस्थापित समाजगटात जन्म झाल्याने मिळाले नाही का? ते कसे मिटवायचे याचा काही विचार तुमच्याकडे आहे की फक्त पदावर असलेल्यांच्या मुलांना फक्त घटनेनुसार असलेल्या आरक्षणाने ते मिळू नये असे वाटते? संदर्भः https://www.youtube.com/watch?v=x1MlD_88kr4&list=FLE5dZfbrUTs-di3rE9DIX…

In reply to by स्वधर्म

यातील काही भागाशी मी सहमत आहे. जिथे सर्वात मोठी अस्पष्टता आणि सहमती नाही तो हा खलील भाग आहे. इंजिनिअरिंग कार्पोरेटमधे जाणार्‍यांत समान गुणवत्ता असली तरी नोकरी मिळण्याची शक्यता उच्च वर्णीय लोकांत ३०% अधिक आहे. हे असे का आहे? इथे कोणते आरक्षण कार्यरत आहे? ते केवळ प्रस्थापित समाजगटात जन्म झाल्याने मिळाले नाही का? हे विधान नेमके उलटनप्रश्न सुद्धा उपस्थित करते तिथे नोकरी का मिळवू शकत नाही ? नेटवर्क आणि social capital हा अत्यंत तकलादू लवचिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काँक्रिट आधार नसलेला unmeasurable असा निकष आहे. ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांना याच कारणामुळे मिळाली 30 टक्के हे कसे सिद्ध केले ? हा कोणता सर्वे होता नेमका ? आणि हा मुद्दा अगदी जरी मोजायला बसली तरी तो कोणत्या समाजाचे किती नेटवर्क आहे किती social capital आहे हे कसे मोजणार ? Dalit chamber of commerce ही एक दलीत उद्योजकांची संघटना आहे, आता 10 जाती आहेत त्यांचे social capital मोजले तर ते मूळात मोजता तरी कसे येईल सर्वात अगोदर त्यांनी हा 30 टक्के समान गुणवत्ता असूनही मिळाली नाही कारण इंटरव्ह्यू घेणारा हा उच्चवर्णीय होता असे बहुधा म्हटले आहे हे नेमके कसे सिद्ध केले ते जाणून घ्यायला आवडेल नंतर हे मोजायचे कसे नंतर या आधारावर द्यायचे कसे