‘आठवणी’ एक लहानसाच, पण अर्थाचे अनेक आयाम असणारा शब्द. आनंदाच्या पाकळ्या घेऊन उमलत राहणारा, कधी वेदनांच्या व्यथा घेऊन कोमेजणारा. आठवणी समुद्रासारख्या अथांग. आभाळासारख्या अफाट. क्षितिजासारख्या अमर्याद. आयुष्याच्या वाटेवरून प्रवास घडताना इच्छा असो, नसो स्मृतींची सोबत घडत राहते. कुणासाठी त्या आनंदाचं अभिधान असतात, तर कुणासाठी वेदनांचे वेद. आठवणींचं पाथेय घेऊन निघालेली माणसे सुखांचे कवडसे हाती लागताना हरकतात. पदरी पडणाऱ्या वंचनेच्या वेदनांनी विकल होतात. त्यांचं असणं, नसणं जेवढं कालसापेक्ष तेवढंच परिस्थितीसापेक्ष.
आठवणींच्या ओलाव्याने मनाचं आभाळ भरून येतं.
कधी दुष्काळजन्य परिस्थिती आली
चित्र आवडलं...
मस्त . एखादी कविता वाचवी इतक
मनाला भिडला
या सगळ्या आठवणी पावसाच्या धारांसारख्याच झरझर तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. तेवढ्यात मागून येऊन तिच्या लेकीने तिला क्षणभर मिठी मारली आणि पावसाला बिलगायला ती गेली सुध्दा. पावसामध्ये मनसोक्त भिजणाऱ्या लेकीला बघून 'एक जलचक्र पूर्ण झालं' असं तिलाही वाटलं आणि त्यालाहीशाळेत असताना कलिंगड नावाची कथा अभ्यासाला होती. मला वाटतं लेखिका गौरी देशपांडे. तुमची कथा वाचल्यावर अगदी तसंच वाटलं. खूपच छान