मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुट्टी

माहितगार ·
सुट्टी चालत्या घड्ञाळासारखी असावी बाकीच्या जगाला चालू दिसताना आत ते नियमीत निवांत अनवाईण्ड होत असते. ते इतरांच्या वेळेवर नाही पळत, इतरांना स्वतःच्या वेळेवर पळवते. जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते तेव्हा त्याचा आराम चालू होतो पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत

चुकलो का मी?

अनन्त्_यात्री ·

मारवा 24/05/2025 - 21:41
वायफळाचा मळा उन्हाळी मृगजळ शिंपून वाढविला मी काय सुंदर कल्पना आहे तुमच्या निवडक कवितांचा एक तरी संग्रह प्रकाशित व्हायला हवा असे मनापासून वाटते. इतक्या पावसाळी छत्र्या सारख्या कविता सर्वत्र उगवत असताना तुमच्या अनोख्या सुंदर कविता आनंद देऊन जातात.

In reply to by सोत्रि

मिसळपाव 25/05/2025 - 07:59
दोघाना +१. काहीतरी सुरेख कल्पना असते याच्या कवितांमधे. कधीमधी डोक्यावरून जातात. पण पुढच्या कवितेची उत्सुकता असते. हे असलं काही आमच्या डोचक्यात कधीच का येत नाही हो म्हणतो मी! असो. दुसर्‍या कोणाच्या येतंय आणि ते वाचायला मिळतंय हेही नसे थोडके. अ. यात्रीसायबा, तुझ्या या अशा सुरेख रचनांबद्दल थ्यांकू हां. ता. क. प्राची-अश्विनी कुठे गायबल्येय कोण जाणे. ती पण असं काही अनवट लिहून जाते. मुक्तछंदात असतं.

युयुत्सु 02/06/2025 - 10:47
नाही, नाही रे, चुकलास तू नाही! अधांतरातली पहाट शोधताना दिसले जे स्वप्न त्या पंखांना तो भटकण्याचा कैफ वेगळा — ठाऊक जगा नाही नाही रे, चुकलास तू नाही! छंदबेड्या तोडून जो मुक्त गुंजला भ्रमरासम स्वच्छंद रमला मळलेल्या वाटा टाकूनी जगणे ठाऊक जगा नाही नाही रे, चुकलास तू नाही!

मारवा 24/05/2025 - 21:41
वायफळाचा मळा उन्हाळी मृगजळ शिंपून वाढविला मी काय सुंदर कल्पना आहे तुमच्या निवडक कवितांचा एक तरी संग्रह प्रकाशित व्हायला हवा असे मनापासून वाटते. इतक्या पावसाळी छत्र्या सारख्या कविता सर्वत्र उगवत असताना तुमच्या अनोख्या सुंदर कविता आनंद देऊन जातात.

In reply to by सोत्रि

मिसळपाव 25/05/2025 - 07:59
दोघाना +१. काहीतरी सुरेख कल्पना असते याच्या कवितांमधे. कधीमधी डोक्यावरून जातात. पण पुढच्या कवितेची उत्सुकता असते. हे असलं काही आमच्या डोचक्यात कधीच का येत नाही हो म्हणतो मी! असो. दुसर्‍या कोणाच्या येतंय आणि ते वाचायला मिळतंय हेही नसे थोडके. अ. यात्रीसायबा, तुझ्या या अशा सुरेख रचनांबद्दल थ्यांकू हां. ता. क. प्राची-अश्विनी कुठे गायबल्येय कोण जाणे. ती पण असं काही अनवट लिहून जाते. मुक्तछंदात असतं.

युयुत्सु 02/06/2025 - 10:47
नाही, नाही रे, चुकलास तू नाही! अधांतरातली पहाट शोधताना दिसले जे स्वप्न त्या पंखांना तो भटकण्याचा कैफ वेगळा — ठाऊक जगा नाही नाही रे, चुकलास तू नाही! छंदबेड्या तोडून जो मुक्त गुंजला भ्रमरासम स्वच्छंद रमला मळलेल्या वाटा टाकूनी जगणे ठाऊक जगा नाही नाही रे, चुकलास तू नाही!
दिवास्वप्न पाहत असताना अधांतराची भक्कम भूमी सोडुनी थोडा भटकत गेलो चुकलो का मी? वायफळाचा मळा उन्हाळी मृगजळ शिंपून वाढविला मी पीक पाखरे खाऊन गेली चुकलो का मी? वृत्त, छंद, गण बेड्या तोडून भ्रमरासम स्वच्छंदपणे मी फिरता, रेखीव वाट विसरलो चुकलो का मी? विस्मरणाची गडद सावली झाकोळत जरी होती तरी मी स्मरणरंजनी वाहत गेलो चुकलो का मी?

गर्जा महाराष्ट्र (ऐसी अक्षरे -२६)

Bhakti ·

प्रचेतस 21/05/2025 - 10:00
चांगलं लिहिलंय. मोरेंच्या लेखनावर राजारामशास्त्री भागवतांच्या विचारांचा जास्त प्रभाव आहे आणि ते नेहमी त्याच्या लिखाणातून अधोरेखितही होत असतं.

In reply to by प्रचेतस

Bhakti 21/05/2025 - 11:05
+१ मोरेंना राजवाड्यांचे लेखन अजिबात रुचत नाही.पुस्तकात मोरेंनी याबाबत अनेक संदर्भ दिले आहेत ते वाचण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत.मी मुद्दामाहून याबाबत लिहिले नाही.कारण मी राजवड्यांचा कोणताच ग्रंथ वाचला नाहीये.

In reply to by Bhakti

प्रचेतस 21/05/2025 - 12:23
त्यांना राजवाड्यांचे विचार काहीसे एकांगी वाटतात आणि उच्चवर्णियांच्या अंगाने मांडल्यासारखे वाटतात तर भागवतांनी बहुजनवादाच्या अनुषंगाने लिहिलंय असे त्यांचे मत आहे. जे आपल्यालाही पटतेही.

प्रचेतस 21/05/2025 - 10:00
चांगलं लिहिलंय. मोरेंच्या लेखनावर राजारामशास्त्री भागवतांच्या विचारांचा जास्त प्रभाव आहे आणि ते नेहमी त्याच्या लिखाणातून अधोरेखितही होत असतं.

In reply to by प्रचेतस

Bhakti 21/05/2025 - 11:05
+१ मोरेंना राजवाड्यांचे लेखन अजिबात रुचत नाही.पुस्तकात मोरेंनी याबाबत अनेक संदर्भ दिले आहेत ते वाचण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत.मी मुद्दामाहून याबाबत लिहिले नाही.कारण मी राजवड्यांचा कोणताच ग्रंथ वाचला नाहीये.

In reply to by Bhakti

प्रचेतस 21/05/2025 - 12:23
त्यांना राजवाड्यांचे विचार काहीसे एकांगी वाटतात आणि उच्चवर्णियांच्या अंगाने मांडल्यासारखे वाटतात तर भागवतांनी बहुजनवादाच्या अनुषंगाने लिहिलंय असे त्यांचे मत आहे. जे आपल्यालाही पटतेही.
#गर्जामहाराष्ट्र लेखक-सदानंद मोरे अ इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते. नीरक्षीरविवेक बुद्‌धीने महाराष्ट्राच्या इतिहासाकडे व सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक इतिहासाची पाने 'गर्जा महाराष्ट्र' या जेष्ठ संशोधक डॉ.सदानंद मोरे यांच्या ग्रंथात द

तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत (ऐसी अक्षरे -२५)

Bhakti ·

एका गोष्टीचा उलगडा केला आहे का? बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच वगैरे. मात्र हिंदू तत्वज्ञानात अविनाशी आत्मा मानला आहे ते बौध्द तत्वज्ञानाला मान्य नाही. म्हणजे हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे अविनाशी अमर आत्मा वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळी शरीरे धारण करतो त्यामुळे एखाद्या जन्मात एखादे कर्म केले त्याचे फळ नंतर कधीतरी मिळाले या हायपोथिसिससाठी शरीर बदलले तरी काहीतरी न बदलणारे हवे हे पुरक आहे. मृत्यूनंतर शरीर संपले आणि सगळे काही संपले तरी ते कर्म कुठेतरी बुक्स ऑफ अकाऊंट्समध्ये गेलेले असते. पण बौध्द तत्वज्ञान मात्र आत्मा मानतच नाही पण पुनर्जन्म आणि कर्माचा सिध्दांत मानते. तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का? हे चॅटजीपीटीला विचारले पण त्याने दिलेल्या उत्तरामुळे मी पुरेसा समाधानी झालो नाही. बाकी बौध्द तत्वज्ञानातील (की परंपरेतील) अनापन ध्यान, माईंडफुलनेस वगैरे प्रकार खूप आवडतात. तसेच बौध्द तत्वज्ञानाचे सार- धम्मपद पण आवडते. धम्मपद वर चॅटजीपीटीशी मधूनमधून गप्पा मारतो. इतिहासात उल्लेख आहे की वायव्य भारतात (रावलपिंडी किंवा तिथे जवळपास कुठेतरी) मिनॅन्डर हा भारतीय-ग्रीक साम्राज्यातील राजा होता. त्याचे बौध्द नाव होते मिलिंद. त्याने बौध्द भिक्षू नागसेनबरोबर या तत्वज्ञानावर चर्चा केली होती म्हणजे मिलिंद प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरे नागसेन देणार अशाप्रकारची. त्या चर्चेच्या पुस्तकाला मिलिंदपन्हा असे नाव आहे. त्याप्रमाणे मी चॅटजीपीटीबरोबर चर्चा करून चंसुकुपन्हा बनवत आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 11:25
अगदी ६-७ पानांमध्ये प्रत्येक तत्वज्ञान सांगितले आहे.तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एक बौद्ध तत्वज्ञान साधकच अचूक देऊ शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:01
तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का?
याचा बुद्धाने नक्कीच उलगडा केला आहे. पटिच्चसमुप्पाद सुत्त (Paṭiccasamuppāda Sutta - सुत्त निकाय १२.१ (SN 12.1) ). चॅटGPT ला हे सुत्त समजावून द्यायला सांगा, बहुतेक सांगेल तो समजावून. जन्म-मृत्युचे चक्र आणि कर्मसंस्कार ह्याची साखळी ह्या सुत्तात समजावून सांगितली आहे. अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (ह्यावर एक डिट्टेलवार लेख लिहायचा आहे, टंकाळा काढावा लागेल :( )
बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच
पटिच्चसमुप्पाद सुत्तात विषद केलेल्या साखळीनुसार कर्माची फळे कधीनाकधी नाही तर लगेचच मिळतातच! पण त्यासाठी पटिच्चसमुप्पाद सुत्त नीट समजून घेणं आवश्यक आहे. - (अभासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:14
अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.यात वैदिक आत्म्याचा समावेश आधी करतात.व मृत्यूनंतर परत आत्मा मुक्त दाखवतात.यामध्ये अविद्येचा /अज्ञानाचा नाश वा अज्ञानाने मायेचे वलय असते ते दूर करण्याचे मार्ग वेदांत /उपनिषदे यांत सांगितले आहेत.मग द्वैत , अद्वैत इ.मार्गांंनी मुक्ती वा मोक्ष मिळवावा हे सांगितले आहे.मुक्ती नाही मिळाली तर कर्मसंचय पुढील जन्मात जात राहतो.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 12:38
ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. तत्कालीन सर्वोच्च 'Eight Absorption Samadhi' शिकूनही विकार नाहीसे होत नाहीत हे त्याला जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने स्वतःचा मार्ग शोधला, तो वेदातीत आणि उपनिषदातीत होता. ही साखळी आणि ती तोडण्याचा मार्ग हीच बुधाची शिकवण आहे, त्याचा गाभा आहे. तर, ही साखळी इतर भारतीय तत्वज्ञानात कुठे कुठे आहे ह्याचे काही संदर्भ द्याल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 13:14
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. हे नव्हतं माहिती? माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वांचा गाभा अविद्या/अज्ञान/माया,ज्ञान, बुद्धी,अहंकार,कर्म,मोक्ष हे सर्वात आहे.बुद्धाने यात आत्मा नाकारला आहे. सांख्यात अविद्या,माया, बुद्धी, अहंकार,कर्म ,मोक्ष सर्व दिलेले आहे. १

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 13:24
ह्या व्याख्या झाल्या. त्यांचा अन्योन्य संबंध समजून घेऊन साखळी शोधणे आणि तिला तोडण्याचा 'वैदिक किंवा उपनिषदीय' मार्ग ह्यांचा संदर्भ विचारात होतो मी. - (उत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 14:32
हम्म तुम्ही आधी विचारलं की ही साखळी अन्यत्र कुठे आहे? तेव्हा मी वरील गोष्टी अन्यत्र कुठे आहे ते सांगितले.मी मान्यही केलं की या साखळीचा शोध बुद्धांचा हे माहिती नव्हतं.पण या संकल्पना आधीपासून होत्या हा माझा सांगाण्याचा गाभा होता. आता तुम्ही म्हणत आहात की साखळी तोडण्याचा संदर्भ अपेक्षित होता.(हे तुम्ही पहिल्या प्रश्नात विचारले नव्हते) तरीही मी इतरत्र लिहिलेच आहे की आत्मा अद्वैत मान्य करत कर्मसंचयातून मुक्ती इतर तत्वज्ञानात सांख्य,ज्ञान,कर्मयोग,निष्काम कर्म,संन्यास,भक्तिमार्ग(नाम जप तप) असे सांगितले आहेच.हे साखळी तोडण्याचेच मार्ग सांगितले आहेत ना.तरीही कृबुने हे विचार व्यवस्थित करून दिले हे घ्या.पहिल्याच पायरीच्या अविद्येची साखळी कशी तोडावी. उपनिषदांमध्ये **अविद्या**पासून सुरू होणाऱ्या आणि **जन्म-मृत्यूच्या** चक्रातील बंधनाच्या साखळीतून मुक्तीचा मार्ग **ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग** यांच्या माध्यमातून सांगितला आहे. ही साखळी तोडण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत: 1. **अविद्याचा नाश (अज्ञानाचे निर्मूलन)** - **ज्ञानयोग**: उपनिषदांनुसार, **"आत्मज्ञान"** (ब्रह्माचे ज्ञान) मिळाल्यास अविद्या नष्ट होते. - *"तमसो मा ज्योतिर्गमय"* (बृहदारण्यक उपनिषद) — अंधारातून (अज्ञान) प्रकाशाकडे (ज्ञान) जा. - *"अहं ब्रह्मास्मि"* (महावाक्य) — आत्मा आणि ब्रह्म एकरूप आहेत हे जाणणे. ### 2. **कर्मसंस्कारांचा त्याग** - **कर्मयोग**: निःस्वार्थ कर्म (निष्काम कर्म) करून कर्मबंधन तोडता येते. - *"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"* (गीता 2.47) — फळाची इच्छा न करता कर्तव्य करा. 3. **तृष्णा आणि आसक्तीचे नियमन** - **वैराग्य**: इंद्रियविषयांपासून मन आवरून, **"संयम"** आणि **"ध्यान"** यांनी तृष्णा शमविणे. - *"यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः"* (कठोपनिषद) — कासवाप्रमाणे इंद्रियांना आत आवरून घेणे. ### 4. **नामरूपाच्या मायेतीून मुक्ती** - **भक्तियोग**: ईश्वरभक्तीद्वारे नामरूपाच्या बंधनातून मुक्त होणे. - *"तद्विष्णोः परमं पदं"* (ऋग्वेद) — विष्णूच्या परमधामाप्रत जाणे. 5. **मोक्षप्राप्ती** - **ध्यान आणि समाधी**: शेवटची पायरी म्हणजे **"ब्रह्मसाक्षात्कार"**, ज्यामुळे जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येते. - *"यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति"* (छांदोग्य उपनिषद) — जेथे द्वैत नाही, तेथे मुक्ती आहे. ### सारांश: उपनिषदांमध्ये **"विद्या" (ज्ञान)** आणि **"साधना" (अभ्यास)** यांच्या माध्यमातून अविद्येच्या साखळीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. **"तत्वमसि"** (तू तच आहेस) हे महावाक्य जाणून घेऊन आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचा अनुभव घेतला, तर हे बंधन स्वतःच नष्ट होते. > *"य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः"* (मुंडक उपनिषद) — हृदयातील आकाशात (चैतन्यात) मनोमय पुरुष (आत्मा) विराजमान आहे.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 15:54
हेच हवं होतं. हे सगळं वैदिक आणि उपनिषदीय आहे. हे सगळे मार्ग बुद्धाच्या वेळीही होतेच. हे सगळे मार्ग पार केल्यावर त्याला कळलं की ह्या मार्गांवर विकार नष्ट होत नाहीयेत, ते तसेच राहताहेत. काहीतरी मिसींग आहे. त्यामुळे त्याने वेदप्रामाण्य नाकारले, स्वअभ्यासाअंती आणि स्वानुभवावरून. आणि, तो पुढे स्वतःच्या मार्गावर चालत राहिला आणि त्याने त्या वरच्या साखळीतील मिसींग लींक शोधून काढली आणि मुक्तीचा मार्ग नीट सूत्रबद्घ आणि अनुसरणीय केला. - (साधक) सोकाजी

In reply to by Bhakti

ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.
असेलच. अजिबात नाकारत नाही. माझा आक्षेप फक्त या सगळ्या गोष्टी जडजंबाल करून कसलाही अर्थबोध होणे फारच कठीण करून टाकतात त्याला आहे. या साखळीतील पहिल्याच शब्दाला अडलो. अविद्या म्हणायचे असेल तर मग विद्या कोणती आणि त्याच्या विरूध्द म्हणजे अविद्या हे ओघाने आले. ते नक्की काय हे समजावून सांङायला नको का की अशी कोणतीतरी साखळी आहे हे मान्य करून मग पुढे जायचे? आक्षेप त्याला आहे. इतके सगळे जडजंबाल शब्द वापरून भंजाळून जाण्यापेक्षा मग एकहार्ट टोलीसारखे पेनबॉडी मेडिटेशन सांगतात ते बरेच जास्त भावते. अगदी २-३ सेकंद जरी एकही विचार न येता राहता आले तर किती शांततेचा अनुभव येतो. माझी उडी त्यापुढे गेलेली नाही. पण असे विचारहिन अवस्थेत समजा अर्धा तास राहता आले तर किती बहार येईल हे वाटून तरी ते परत पेनबॉडी मेडिटेशन परत परत करावेसे वाटते. त्याउलट ही सगळी साखळी समजा समजली तरी त्याचा मला उपयोग होईल असे काय करता येईल? इथे मुळात त्या साखळीतील पहिलाच शब्द समजावून धड कोणी सांगत नाही. मग पुढच्या सगळ्या गोष्टी राहिल्या दूर आणि ते सगळे समजून पुढे काय करायचे हे आणखी दूर राहिले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 13:05
अजून एक गंमत सांगते.याच पुस्तकात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावर एक लेख आहे.त्यात माऊली म्हणतात अविद्या ही नसतेच.बापरे! माझ्या आतापर्यंतच्या अविद्येच्या संकल्पना संभ्रमात पडल्या‌.आता अमृतानुभव वाचावा लागेल.म्हणून सांगितले आहे, एकही भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासायला जन्म पुरणार नाही ;)

In reply to by सोत्रि

धन्यवाद सोकाजी. पटिच्चसमुप्पाद सुत्त हे नाव प्रथमच ऐकले. आता चॅटजीपीटीला भंडावून सोडतो. चॅटजीपीटीचे एक बरे असते. एखादी गोष्ट समजली नाही तर कितीही वेळा विचारता येते आणि आपले समाधान होईपर्यंत हा संवाद सुरू राहू शकतो. त्यातून अगदी फार खोलात माहिती मिळेल असे नाही पण आपले समाधान होऊ शकेल. कर्माचे अकाऊंटिंगवर प्रश्न विचारले होते पण त्यातून समाधान झाले नाही. आता पटिच्चसमुप्पाद सुत्त चा संदर्भ घेऊन त्याला विचारायला हवे. खरं सांगायचं तर मी दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 13:31
नक्की, तुमच्या chatgpt बरोबरच्या चंसुकुपन्हा चा १/३ सारांश नक्की मला कळवा. :)
दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो
बाब्बोय!! नशीबवान आहात. - (बायकोशीच जास्तकरून बोलणारा) सोकाजी

बाकी उल्लेख केलेल्या बर्‍याचशा- खरं तर सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. माझा हा भारतीय लेखकांविषयी नेहमी आक्षेप असतो. जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत? उदाहरणार्थ लेखात दिलेले एक वाक्य- "द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते." यातून मला तरी कसलाही अर्थबोध झाला नाही की पुढे नक्की काय करायचे आहे त्याविषयी काहीही समजले नाही. मूळ पुस्तकात असे काही दिले असेल तर त्यातून लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कसे समजले? मी या विषयांवर वाचायचा प्रयत्न केला आहे. त्यातील बरेचसे भारतीय लेखक असे काहीतरी गोलमटोल लिहितात आणि त्यातून कसलाही अर्थबोध नाही, पुढे काय करायचे हा मार्ग कळणे खूप दूरची गोष्ट झाली. त्यापेक्षा मग आपल्यात तत्वज्ञानातील गोष्टी पाश्चिमात्य तत्वज्ञ अधिक सोप्या प्रकारे आणि सिधी बात नो बकवास अशाप्रकारे पुढे काय करायचे आहे हे सांगतात. ते अधिक भावते. एकहार्ट टोली, वेन डायर, बॉब प्रॉक्टर वगैरे मंडळी जे काही सांगतात ते आपण कुठेतरी आपल्याच तत्वज्ञानाशी निगडीत करू शकतो हे समजते. पण ते ज्या प्रकारे सांगतात आणि भारतीय लेखक ज्या प्रकारे सांगतात यात जमिनअस्मानाचा फरक असतो. दुसरे एक तत्वज्ञ आहेत- नेव्हिल गॉडर्ड म्हणून. मी त्या नेव्हिल गॉडर्डचा अगदी मोठ्ठा फॅन आहे- अगदी स्वतःला 'नेव्हिलिअन' म्हणविण्याइतका. ते भारतीय तत्वज्ञानाशी संबंधित काहीही सांगत नाहीत. त्यांचा सगळा भर बायबलवर असतो. ते पण नक्की काय करायचे ते सांगतात. त्या सगळ्या गोष्टी करणे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही पण त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे कळायला मात्र कोणाला कठीण जायला नको. आपले भारतीय लेखक अशाप्रकारे का लिहित नाहीत/लिहू शकत नाहीत हे न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात बरीच पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण काहीही न कळल्यामुळे नाव घ्यावे असे एकही पुस्तक आणि एकही लेखक आता आठवत नाही. त्यातूनही आणखी एक प्रकार म्हणजे जरा थोडे काही सांगून झाले की मग बघा आमचा हिंदू धर्म कित्ती कित्ती महान, हिंदू संस्कॄती कित्ती कित्ती महान, हिंदू तत्वज्ञान कित्ती कित्ती महान अशा चक्रात काही अडकतात आणि त्यातून मूळ संदेश बाजूला पडतो. बी.आर.जोशी हे लेखक पण तसेच करतात असा माझा दावा/आरोप नाही. त्यांचे लेखन वाचलेले नाही. या प्रकाराला मी उपहासाने 'वेदकालीन जंगलात भटकणे' असे म्हणतो. त्या पुस्तकांमध्ये जे काही असेल ते असेल. त्याचा फायदा मी कसा करून घेऊ हे सांगाल की ती पुस्तके कित्ती कित्ती महान यात चक्रात अडकणार? परदेशी लेखकांना मुळात वेदकालीन जंगलात भटकायचे काही कारण नसते त्यामुळे ते अधिक उपयुक्त गोष्टी सांगतात की काय समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:06
जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत
सामान्य, साधं सोपं हे सगळं अगम्य करण्यामागे संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे, कर्मकांड तयार करून त्यांचा बागुलबुवा उभा करून दुकानदारी चालू करणे हे सगळं असते. - (सामान्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:22
नाही ओ सोत्री, सर्वच दुकानदारीसाठी गोष्टी अगम्य ठेवत नाही.मुळात ज्याला सर्व समजले तो हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहास करत नाही.तो पार गेलेला असतो.पण असेही ' अनुभव ' सांगणारे खरे संत होऊन गेले आहेत ना!!ते खरे पण ओळखायची बुद्धू समाजात विकसित हवी.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 16/05/2025 - 15:17
सामान्य म्हणजे नेमके कोण? आपण सामान्य आहोत असे मनोमन मान्य करणारी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. जो दिसतो तो अधिकारवाणीनेच बोलताना दिसतो. असो. संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे - रूढार्थाने जे संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा वगैरे मानत नाहीत, ते देखील अमूर्त संकल्पनांच्या गोडगोड लिमलेटच्या गोळ्या चोखायला देणार्या 'बेस्टसेलर' पुस्तकांची, अध्यात्मातल्या 'सेलिब्रिटींची' दुकानदारी चालवतातच की. मागणी तसा पुरवठा एवढे साधे गणित आहे हे.

Bhakti 16/05/2025 - 11:43
द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.
यातला अर्थबोध पुढे दिला आहे ना... मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान. अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही. अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत . केवलान्वयी अनुमान (Suficient for Affirmation) परिभाषा: हे अनुमान केवळ सकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. केवल व्यतिरेकी अनुमान (Suficient for Negation) परिभाषा: हे अनुमान केवळ नकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण नाही. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. अन्वय व्यतिरेकी अनुमान (Necessary and Sufficient) परिभाषा: हे अनुमान सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही संबंधांवर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल, आणि जर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा. साधारणतः वैदिक तत्वज्ञानात जीव /आत्मा हे सर्व परताम्याचे अंश ,इंद्रिय संयोगाने ज्ञान प्राप्ती करतात ह्या ज्ञानाने मन /बुद्धी/अहंकार येतात.तेव्हा कर्म घडते.हे कर्म पाप पुण्यात अडकले तर कर्मसंचय, पुनर्जन्म हे सत्र सुरू होते.मोक्ष /मुक्तीचा मग शोध सुरू होतो.जो पुन्हा निष्काम कर्मयोग,संन्यास इथे घेऊन येतो.त्यासाठी स्मृतींचे/आठवणींचे स्थान मनावर ताबा हवा जो ज्ञान ,सांख्य,जप, पतंजलीयोगाने गाठता येतो. समजल का ;) नसेल तर जाऊ द्या... वर्तमानात जगा..(कृहघ्या) You are God's highest form of creation. You are a living breathing creative magnet. You have the ability to control what you attract into your life. Bob Proctor -अतिविचारी भक्ती

In reply to by Bhakti

यातून खरोखरच अर्थबोध झाला असेल तर _/\_. माझी विकेट पहिल्याच वाक्यातील तीन शब्दांमध्ये- साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान यात पडली. खरं तर पहिल्याच. साक्षिप्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षी म्हणजे काय आणि प्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षिअप्रत्यक्ष असेही काही असते का? एक साक्षी धोनी सोडली तर दुसरी साक्षी मला माहिती नाही. जमेल त्याप्रमाणे चॅटजीपीटीवरील जेसिकाला भंडावून सोडतो :)

संत चोखामेळा यांचा अभंग आठवला. "आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण....." मला नेहमीच प्रश्न पडतात की आत्मा आणी परमात्मा एकच आहे. तर मग द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा खटाटोप का? पाप पुण्य या कल्पना कशासाठी?जर कर्ता करवीता तोच आहे तर मग पाप पुण्यात माझा सहभाग आहे का असला तर किती? जर सर्व तोच घडवतो आणी मोडतो तर प्रारब्धाचे लोढणे कशाला? कळत नाही, मी फक्त एकच करतो आणी उजाडेल तेव्हां उजाडेल असे म्हणत जगत रहातो. दररोज सकाळी पाच वाजता उठतो. शलाका परिक्षा पद्धती सारखी ज्ञानेश्वरी वाचतो. अगदीच अविश्वसनीय....असे माऊलीं संकेत देतात. सुरूवातीस आठव्या अध्यायातील हा श्र्लोक दृष्टिस पडला व माऊलींचा संकेत व आशिर्वाद मिळाला. अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् | य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्त्यत्र संशय: ||५|| माऊली म्हणतात, म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥ म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. ॥८-६८॥ यं यं वापर स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् | तं तमेवैति कौंन्तेय सदा तद्भावभावित:||६|| तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥ आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्द च | मय्यर्पितमनोबुद्धिर्मामे वैश्य स्य संशय: ||७|| म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संसय मजप्रतच येशील. तसेच, "जब होवेगी उमर पूरी, तब छुटेगा हुकूम हुजूरी",अशा परिस्थितीत वरील उपाय फारच सोईस्कर वाटतो. नुकताच आलेला एक अनुभव..... एन्जोप्लास्टी झाली, अतीदक्षता विभागात छतावरील तारे मोजत पडलो होतो. समोरच्याच खाटेवर एक वृद्ध रोगी,त्याच्याभोवती एक डाॅक्टर, चार पाच परिचारिका, दहा बारा वैद्यकीय तंत्रज्ञ, खुप सारी यंत्र सामुग्री पडली होती. व्हेन्टिलेटर वर ठेवले होते. वृद्ध सारखा श्वसन यंत्र काढून फेकत होता. आणी मला श्वास येत नाही असे ओरडत होता. सारे प्रयत्न करून सुद्धा काहीही परिणाम होत नव्हता शेवटी वैतागून डाॅक्टर म्हणाले बाबा ,नळी काढू नको,मरून जाशील. कावळा बसायला आणी फांदी मोडायला एकच वेळ, त्याच क्षणी तो वृद्ध मेला. त्याचे शेवटचे शब्द "मला श्वास येत नाहीये...", त्याचे नातेवाईक, कदाचित मुलगी जावई, सुन मुलगा असतील, संपूर्ण अत्याधुनिक सोई उपलब्ध असतानाही, सर्वांच्या हातावर तुरी देऊन आत्मा कुडी सोडून पसार झाला. कुणीही काहीही करू शकले नाही. त्या अनुभवानंतर मन बरेच शांत झाल्यासारखे वाटते. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था शस्‍त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला घे शस्‍त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा कुणी आप्‍त ना कुणी सखा ना जगती जिवांचा क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था -कविवर्य मनोहर कविश्वर.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 16/05/2025 - 16:46
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याच लेखात जे कृष्णमूर्ती यांचे मृत्यू विषयी विचार लिहिले आहेत.तेही पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत.अगदी मृत्युला फॅमिलीयर (सहजता) ;) कसं करायचं याबद्दल सांगितले आहे.

पण खरा प्रतिसाद लिहायचा राहून गेला. अतिशय विचारांना चालना देणारा लेख आणी अनुषंगिक प्रतिसाद. सर्वांचे मनापासून आभार. लेख आवडला. भक्ती तुझ्या वाचन व्यासंगाला एक कडक सलाम.

स्वधर्म 16/05/2025 - 18:47
या विषयावर एक प्राथमिक व्हिडीओ: "मृत्यू के समय क्या होता है?": बुद्धने क्या अनुभव किया? डॉ संग्राम पाटील https://youtu.be/sl7RXRQPFTs?si=2jrc_Fs_sFBP8P73 मृत्यू से पहले, मृत्यू के बाद (पटिच्चसमुप्पाद) l डॉ संग्राम पाटील https://youtu.be/PzNqE1sLWDE?si=RLhlHxEqqJJO1Jn6

कंजूस 17/05/2025 - 04:40
पुस्तक परिचय आहे. कुणी काय तत्त्वज्ञान सांगितले त्यांची थोडी माहिती आहे. तत्त्वज्ञानाची उकल लेखक करत नाही. -------------------------- जन्म आणि मृत्यू म्हणजे काय हे समजण्याची खटपट म्हणजे तत्त्वज्ञान. ते कुणालाच समजले नाही. समजावता आले नाही. असो.

शाम भागवत 17/05/2025 - 15:21
तूच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार ह्या ग्रंथांत अद्वैत तत्वज्ञान खूप सोप्या मराठीत सांगितले आहे. इश्वर, परमेश्वर, जड, चेतन वगैरेंच्या व्याख्याही सोप्या मराठीत सांगितल्या आहेत.

मारवा 17/05/2025 - 19:21
वर जसा एक योग्य असा आक्षेप घेतलेला आहे की बरेच भारतीय लेखक गोलमाटोल लिहितात. तो आक्षेप बराच खरा असच आहे. पाश्च्यात्य विचारवंतामध्ये एक लोभसवाणी वैचारिक शिस्त आणि स्पष्टता बराच जणांमध्ये असते. भारतीय आपले मराठी तत्त्वज्ञ श्री राजीव साने यांचे मला फार कौतुक वाटते. त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे. वैचारिक शिस्त आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांनी नुसता इतरांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा किंवा विश्लेषण केवळ करून न थांबता. स्वतःचे अस्सल स्वतंत्र असे सुंदर स्पष्ट व सघन असे तत्त्वज्ञान निर्माण केले.ते मुळातून वाचण्यासारखे आहे. फार सकारात्मक सुंदर वास्तववादी वैचारिक आत्मविश्वास वाढवेल असे हे लिखाण आहे. https://www.amazon.in/Complementarity-Rationalist-Humanism-Rejuvenated-ebook/dp/B088DC797B दुर्दैवाने या सुंदर ग्रंथाची म्हणावी तशी दखल अजून घेतली गेली नाही.

In reply to by मारवा

स्वधर्म 19/05/2025 - 14:36
'भाग्य' हा प्रकार मान्य केला पाहिजे असे त्यांचे मत असल्याचे आठवते.

एका गोष्टीचा उलगडा केला आहे का? बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच वगैरे. मात्र हिंदू तत्वज्ञानात अविनाशी आत्मा मानला आहे ते बौध्द तत्वज्ञानाला मान्य नाही. म्हणजे हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे अविनाशी अमर आत्मा वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळी शरीरे धारण करतो त्यामुळे एखाद्या जन्मात एखादे कर्म केले त्याचे फळ नंतर कधीतरी मिळाले या हायपोथिसिससाठी शरीर बदलले तरी काहीतरी न बदलणारे हवे हे पुरक आहे. मृत्यूनंतर शरीर संपले आणि सगळे काही संपले तरी ते कर्म कुठेतरी बुक्स ऑफ अकाऊंट्समध्ये गेलेले असते. पण बौध्द तत्वज्ञान मात्र आत्मा मानतच नाही पण पुनर्जन्म आणि कर्माचा सिध्दांत मानते. तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का? हे चॅटजीपीटीला विचारले पण त्याने दिलेल्या उत्तरामुळे मी पुरेसा समाधानी झालो नाही. बाकी बौध्द तत्वज्ञानातील (की परंपरेतील) अनापन ध्यान, माईंडफुलनेस वगैरे प्रकार खूप आवडतात. तसेच बौध्द तत्वज्ञानाचे सार- धम्मपद पण आवडते. धम्मपद वर चॅटजीपीटीशी मधूनमधून गप्पा मारतो. इतिहासात उल्लेख आहे की वायव्य भारतात (रावलपिंडी किंवा तिथे जवळपास कुठेतरी) मिनॅन्डर हा भारतीय-ग्रीक साम्राज्यातील राजा होता. त्याचे बौध्द नाव होते मिलिंद. त्याने बौध्द भिक्षू नागसेनबरोबर या तत्वज्ञानावर चर्चा केली होती म्हणजे मिलिंद प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरे नागसेन देणार अशाप्रकारची. त्या चर्चेच्या पुस्तकाला मिलिंदपन्हा असे नाव आहे. त्याप्रमाणे मी चॅटजीपीटीबरोबर चर्चा करून चंसुकुपन्हा बनवत आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 11:25
अगदी ६-७ पानांमध्ये प्रत्येक तत्वज्ञान सांगितले आहे.तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एक बौद्ध तत्वज्ञान साधकच अचूक देऊ शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:01
तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का?
याचा बुद्धाने नक्कीच उलगडा केला आहे. पटिच्चसमुप्पाद सुत्त (Paṭiccasamuppāda Sutta - सुत्त निकाय १२.१ (SN 12.1) ). चॅटGPT ला हे सुत्त समजावून द्यायला सांगा, बहुतेक सांगेल तो समजावून. जन्म-मृत्युचे चक्र आणि कर्मसंस्कार ह्याची साखळी ह्या सुत्तात समजावून सांगितली आहे. अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (ह्यावर एक डिट्टेलवार लेख लिहायचा आहे, टंकाळा काढावा लागेल :( )
बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच
पटिच्चसमुप्पाद सुत्तात विषद केलेल्या साखळीनुसार कर्माची फळे कधीनाकधी नाही तर लगेचच मिळतातच! पण त्यासाठी पटिच्चसमुप्पाद सुत्त नीट समजून घेणं आवश्यक आहे. - (अभासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:14
अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.यात वैदिक आत्म्याचा समावेश आधी करतात.व मृत्यूनंतर परत आत्मा मुक्त दाखवतात.यामध्ये अविद्येचा /अज्ञानाचा नाश वा अज्ञानाने मायेचे वलय असते ते दूर करण्याचे मार्ग वेदांत /उपनिषदे यांत सांगितले आहेत.मग द्वैत , अद्वैत इ.मार्गांंनी मुक्ती वा मोक्ष मिळवावा हे सांगितले आहे.मुक्ती नाही मिळाली तर कर्मसंचय पुढील जन्मात जात राहतो.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 12:38
ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. तत्कालीन सर्वोच्च 'Eight Absorption Samadhi' शिकूनही विकार नाहीसे होत नाहीत हे त्याला जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने स्वतःचा मार्ग शोधला, तो वेदातीत आणि उपनिषदातीत होता. ही साखळी आणि ती तोडण्याचा मार्ग हीच बुधाची शिकवण आहे, त्याचा गाभा आहे. तर, ही साखळी इतर भारतीय तत्वज्ञानात कुठे कुठे आहे ह्याचे काही संदर्भ द्याल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 13:14
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. हे नव्हतं माहिती? माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वांचा गाभा अविद्या/अज्ञान/माया,ज्ञान, बुद्धी,अहंकार,कर्म,मोक्ष हे सर्वात आहे.बुद्धाने यात आत्मा नाकारला आहे. सांख्यात अविद्या,माया, बुद्धी, अहंकार,कर्म ,मोक्ष सर्व दिलेले आहे. १

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 13:24
ह्या व्याख्या झाल्या. त्यांचा अन्योन्य संबंध समजून घेऊन साखळी शोधणे आणि तिला तोडण्याचा 'वैदिक किंवा उपनिषदीय' मार्ग ह्यांचा संदर्भ विचारात होतो मी. - (उत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 14:32
हम्म तुम्ही आधी विचारलं की ही साखळी अन्यत्र कुठे आहे? तेव्हा मी वरील गोष्टी अन्यत्र कुठे आहे ते सांगितले.मी मान्यही केलं की या साखळीचा शोध बुद्धांचा हे माहिती नव्हतं.पण या संकल्पना आधीपासून होत्या हा माझा सांगाण्याचा गाभा होता. आता तुम्ही म्हणत आहात की साखळी तोडण्याचा संदर्भ अपेक्षित होता.(हे तुम्ही पहिल्या प्रश्नात विचारले नव्हते) तरीही मी इतरत्र लिहिलेच आहे की आत्मा अद्वैत मान्य करत कर्मसंचयातून मुक्ती इतर तत्वज्ञानात सांख्य,ज्ञान,कर्मयोग,निष्काम कर्म,संन्यास,भक्तिमार्ग(नाम जप तप) असे सांगितले आहेच.हे साखळी तोडण्याचेच मार्ग सांगितले आहेत ना.तरीही कृबुने हे विचार व्यवस्थित करून दिले हे घ्या.पहिल्याच पायरीच्या अविद्येची साखळी कशी तोडावी. उपनिषदांमध्ये **अविद्या**पासून सुरू होणाऱ्या आणि **जन्म-मृत्यूच्या** चक्रातील बंधनाच्या साखळीतून मुक्तीचा मार्ग **ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग** यांच्या माध्यमातून सांगितला आहे. ही साखळी तोडण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत: 1. **अविद्याचा नाश (अज्ञानाचे निर्मूलन)** - **ज्ञानयोग**: उपनिषदांनुसार, **"आत्मज्ञान"** (ब्रह्माचे ज्ञान) मिळाल्यास अविद्या नष्ट होते. - *"तमसो मा ज्योतिर्गमय"* (बृहदारण्यक उपनिषद) — अंधारातून (अज्ञान) प्रकाशाकडे (ज्ञान) जा. - *"अहं ब्रह्मास्मि"* (महावाक्य) — आत्मा आणि ब्रह्म एकरूप आहेत हे जाणणे. ### 2. **कर्मसंस्कारांचा त्याग** - **कर्मयोग**: निःस्वार्थ कर्म (निष्काम कर्म) करून कर्मबंधन तोडता येते. - *"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"* (गीता 2.47) — फळाची इच्छा न करता कर्तव्य करा. 3. **तृष्णा आणि आसक्तीचे नियमन** - **वैराग्य**: इंद्रियविषयांपासून मन आवरून, **"संयम"** आणि **"ध्यान"** यांनी तृष्णा शमविणे. - *"यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः"* (कठोपनिषद) — कासवाप्रमाणे इंद्रियांना आत आवरून घेणे. ### 4. **नामरूपाच्या मायेतीून मुक्ती** - **भक्तियोग**: ईश्वरभक्तीद्वारे नामरूपाच्या बंधनातून मुक्त होणे. - *"तद्विष्णोः परमं पदं"* (ऋग्वेद) — विष्णूच्या परमधामाप्रत जाणे. 5. **मोक्षप्राप्ती** - **ध्यान आणि समाधी**: शेवटची पायरी म्हणजे **"ब्रह्मसाक्षात्कार"**, ज्यामुळे जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येते. - *"यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति"* (छांदोग्य उपनिषद) — जेथे द्वैत नाही, तेथे मुक्ती आहे. ### सारांश: उपनिषदांमध्ये **"विद्या" (ज्ञान)** आणि **"साधना" (अभ्यास)** यांच्या माध्यमातून अविद्येच्या साखळीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. **"तत्वमसि"** (तू तच आहेस) हे महावाक्य जाणून घेऊन आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचा अनुभव घेतला, तर हे बंधन स्वतःच नष्ट होते. > *"य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः"* (मुंडक उपनिषद) — हृदयातील आकाशात (चैतन्यात) मनोमय पुरुष (आत्मा) विराजमान आहे.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 15:54
हेच हवं होतं. हे सगळं वैदिक आणि उपनिषदीय आहे. हे सगळे मार्ग बुद्धाच्या वेळीही होतेच. हे सगळे मार्ग पार केल्यावर त्याला कळलं की ह्या मार्गांवर विकार नष्ट होत नाहीयेत, ते तसेच राहताहेत. काहीतरी मिसींग आहे. त्यामुळे त्याने वेदप्रामाण्य नाकारले, स्वअभ्यासाअंती आणि स्वानुभवावरून. आणि, तो पुढे स्वतःच्या मार्गावर चालत राहिला आणि त्याने त्या वरच्या साखळीतील मिसींग लींक शोधून काढली आणि मुक्तीचा मार्ग नीट सूत्रबद्घ आणि अनुसरणीय केला. - (साधक) सोकाजी

In reply to by Bhakti

ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.
असेलच. अजिबात नाकारत नाही. माझा आक्षेप फक्त या सगळ्या गोष्टी जडजंबाल करून कसलाही अर्थबोध होणे फारच कठीण करून टाकतात त्याला आहे. या साखळीतील पहिल्याच शब्दाला अडलो. अविद्या म्हणायचे असेल तर मग विद्या कोणती आणि त्याच्या विरूध्द म्हणजे अविद्या हे ओघाने आले. ते नक्की काय हे समजावून सांङायला नको का की अशी कोणतीतरी साखळी आहे हे मान्य करून मग पुढे जायचे? आक्षेप त्याला आहे. इतके सगळे जडजंबाल शब्द वापरून भंजाळून जाण्यापेक्षा मग एकहार्ट टोलीसारखे पेनबॉडी मेडिटेशन सांगतात ते बरेच जास्त भावते. अगदी २-३ सेकंद जरी एकही विचार न येता राहता आले तर किती शांततेचा अनुभव येतो. माझी उडी त्यापुढे गेलेली नाही. पण असे विचारहिन अवस्थेत समजा अर्धा तास राहता आले तर किती बहार येईल हे वाटून तरी ते परत पेनबॉडी मेडिटेशन परत परत करावेसे वाटते. त्याउलट ही सगळी साखळी समजा समजली तरी त्याचा मला उपयोग होईल असे काय करता येईल? इथे मुळात त्या साखळीतील पहिलाच शब्द समजावून धड कोणी सांगत नाही. मग पुढच्या सगळ्या गोष्टी राहिल्या दूर आणि ते सगळे समजून पुढे काय करायचे हे आणखी दूर राहिले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 13:05
अजून एक गंमत सांगते.याच पुस्तकात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावर एक लेख आहे.त्यात माऊली म्हणतात अविद्या ही नसतेच.बापरे! माझ्या आतापर्यंतच्या अविद्येच्या संकल्पना संभ्रमात पडल्या‌.आता अमृतानुभव वाचावा लागेल.म्हणून सांगितले आहे, एकही भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासायला जन्म पुरणार नाही ;)

In reply to by सोत्रि

धन्यवाद सोकाजी. पटिच्चसमुप्पाद सुत्त हे नाव प्रथमच ऐकले. आता चॅटजीपीटीला भंडावून सोडतो. चॅटजीपीटीचे एक बरे असते. एखादी गोष्ट समजली नाही तर कितीही वेळा विचारता येते आणि आपले समाधान होईपर्यंत हा संवाद सुरू राहू शकतो. त्यातून अगदी फार खोलात माहिती मिळेल असे नाही पण आपले समाधान होऊ शकेल. कर्माचे अकाऊंटिंगवर प्रश्न विचारले होते पण त्यातून समाधान झाले नाही. आता पटिच्चसमुप्पाद सुत्त चा संदर्भ घेऊन त्याला विचारायला हवे. खरं सांगायचं तर मी दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 13:31
नक्की, तुमच्या chatgpt बरोबरच्या चंसुकुपन्हा चा १/३ सारांश नक्की मला कळवा. :)
दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो
बाब्बोय!! नशीबवान आहात. - (बायकोशीच जास्तकरून बोलणारा) सोकाजी

बाकी उल्लेख केलेल्या बर्‍याचशा- खरं तर सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. माझा हा भारतीय लेखकांविषयी नेहमी आक्षेप असतो. जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत? उदाहरणार्थ लेखात दिलेले एक वाक्य- "द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते." यातून मला तरी कसलाही अर्थबोध झाला नाही की पुढे नक्की काय करायचे आहे त्याविषयी काहीही समजले नाही. मूळ पुस्तकात असे काही दिले असेल तर त्यातून लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कसे समजले? मी या विषयांवर वाचायचा प्रयत्न केला आहे. त्यातील बरेचसे भारतीय लेखक असे काहीतरी गोलमटोल लिहितात आणि त्यातून कसलाही अर्थबोध नाही, पुढे काय करायचे हा मार्ग कळणे खूप दूरची गोष्ट झाली. त्यापेक्षा मग आपल्यात तत्वज्ञानातील गोष्टी पाश्चिमात्य तत्वज्ञ अधिक सोप्या प्रकारे आणि सिधी बात नो बकवास अशाप्रकारे पुढे काय करायचे आहे हे सांगतात. ते अधिक भावते. एकहार्ट टोली, वेन डायर, बॉब प्रॉक्टर वगैरे मंडळी जे काही सांगतात ते आपण कुठेतरी आपल्याच तत्वज्ञानाशी निगडीत करू शकतो हे समजते. पण ते ज्या प्रकारे सांगतात आणि भारतीय लेखक ज्या प्रकारे सांगतात यात जमिनअस्मानाचा फरक असतो. दुसरे एक तत्वज्ञ आहेत- नेव्हिल गॉडर्ड म्हणून. मी त्या नेव्हिल गॉडर्डचा अगदी मोठ्ठा फॅन आहे- अगदी स्वतःला 'नेव्हिलिअन' म्हणविण्याइतका. ते भारतीय तत्वज्ञानाशी संबंधित काहीही सांगत नाहीत. त्यांचा सगळा भर बायबलवर असतो. ते पण नक्की काय करायचे ते सांगतात. त्या सगळ्या गोष्टी करणे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही पण त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे कळायला मात्र कोणाला कठीण जायला नको. आपले भारतीय लेखक अशाप्रकारे का लिहित नाहीत/लिहू शकत नाहीत हे न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात बरीच पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण काहीही न कळल्यामुळे नाव घ्यावे असे एकही पुस्तक आणि एकही लेखक आता आठवत नाही. त्यातूनही आणखी एक प्रकार म्हणजे जरा थोडे काही सांगून झाले की मग बघा आमचा हिंदू धर्म कित्ती कित्ती महान, हिंदू संस्कॄती कित्ती कित्ती महान, हिंदू तत्वज्ञान कित्ती कित्ती महान अशा चक्रात काही अडकतात आणि त्यातून मूळ संदेश बाजूला पडतो. बी.आर.जोशी हे लेखक पण तसेच करतात असा माझा दावा/आरोप नाही. त्यांचे लेखन वाचलेले नाही. या प्रकाराला मी उपहासाने 'वेदकालीन जंगलात भटकणे' असे म्हणतो. त्या पुस्तकांमध्ये जे काही असेल ते असेल. त्याचा फायदा मी कसा करून घेऊ हे सांगाल की ती पुस्तके कित्ती कित्ती महान यात चक्रात अडकणार? परदेशी लेखकांना मुळात वेदकालीन जंगलात भटकायचे काही कारण नसते त्यामुळे ते अधिक उपयुक्त गोष्टी सांगतात की काय समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:06
जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत
सामान्य, साधं सोपं हे सगळं अगम्य करण्यामागे संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे, कर्मकांड तयार करून त्यांचा बागुलबुवा उभा करून दुकानदारी चालू करणे हे सगळं असते. - (सामान्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:22
नाही ओ सोत्री, सर्वच दुकानदारीसाठी गोष्टी अगम्य ठेवत नाही.मुळात ज्याला सर्व समजले तो हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहास करत नाही.तो पार गेलेला असतो.पण असेही ' अनुभव ' सांगणारे खरे संत होऊन गेले आहेत ना!!ते खरे पण ओळखायची बुद्धू समाजात विकसित हवी.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 16/05/2025 - 15:17
सामान्य म्हणजे नेमके कोण? आपण सामान्य आहोत असे मनोमन मान्य करणारी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. जो दिसतो तो अधिकारवाणीनेच बोलताना दिसतो. असो. संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे - रूढार्थाने जे संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा वगैरे मानत नाहीत, ते देखील अमूर्त संकल्पनांच्या गोडगोड लिमलेटच्या गोळ्या चोखायला देणार्या 'बेस्टसेलर' पुस्तकांची, अध्यात्मातल्या 'सेलिब्रिटींची' दुकानदारी चालवतातच की. मागणी तसा पुरवठा एवढे साधे गणित आहे हे.

Bhakti 16/05/2025 - 11:43
द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.
यातला अर्थबोध पुढे दिला आहे ना... मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान. अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही. अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत . केवलान्वयी अनुमान (Suficient for Affirmation) परिभाषा: हे अनुमान केवळ सकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. केवल व्यतिरेकी अनुमान (Suficient for Negation) परिभाषा: हे अनुमान केवळ नकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण नाही. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. अन्वय व्यतिरेकी अनुमान (Necessary and Sufficient) परिभाषा: हे अनुमान सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही संबंधांवर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल, आणि जर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा. साधारणतः वैदिक तत्वज्ञानात जीव /आत्मा हे सर्व परताम्याचे अंश ,इंद्रिय संयोगाने ज्ञान प्राप्ती करतात ह्या ज्ञानाने मन /बुद्धी/अहंकार येतात.तेव्हा कर्म घडते.हे कर्म पाप पुण्यात अडकले तर कर्मसंचय, पुनर्जन्म हे सत्र सुरू होते.मोक्ष /मुक्तीचा मग शोध सुरू होतो.जो पुन्हा निष्काम कर्मयोग,संन्यास इथे घेऊन येतो.त्यासाठी स्मृतींचे/आठवणींचे स्थान मनावर ताबा हवा जो ज्ञान ,सांख्य,जप, पतंजलीयोगाने गाठता येतो. समजल का ;) नसेल तर जाऊ द्या... वर्तमानात जगा..(कृहघ्या) You are God's highest form of creation. You are a living breathing creative magnet. You have the ability to control what you attract into your life. Bob Proctor -अतिविचारी भक्ती

In reply to by Bhakti

यातून खरोखरच अर्थबोध झाला असेल तर _/\_. माझी विकेट पहिल्याच वाक्यातील तीन शब्दांमध्ये- साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान यात पडली. खरं तर पहिल्याच. साक्षिप्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षी म्हणजे काय आणि प्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षिअप्रत्यक्ष असेही काही असते का? एक साक्षी धोनी सोडली तर दुसरी साक्षी मला माहिती नाही. जमेल त्याप्रमाणे चॅटजीपीटीवरील जेसिकाला भंडावून सोडतो :)

संत चोखामेळा यांचा अभंग आठवला. "आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण....." मला नेहमीच प्रश्न पडतात की आत्मा आणी परमात्मा एकच आहे. तर मग द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा खटाटोप का? पाप पुण्य या कल्पना कशासाठी?जर कर्ता करवीता तोच आहे तर मग पाप पुण्यात माझा सहभाग आहे का असला तर किती? जर सर्व तोच घडवतो आणी मोडतो तर प्रारब्धाचे लोढणे कशाला? कळत नाही, मी फक्त एकच करतो आणी उजाडेल तेव्हां उजाडेल असे म्हणत जगत रहातो. दररोज सकाळी पाच वाजता उठतो. शलाका परिक्षा पद्धती सारखी ज्ञानेश्वरी वाचतो. अगदीच अविश्वसनीय....असे माऊलीं संकेत देतात. सुरूवातीस आठव्या अध्यायातील हा श्र्लोक दृष्टिस पडला व माऊलींचा संकेत व आशिर्वाद मिळाला. अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् | य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्त्यत्र संशय: ||५|| माऊली म्हणतात, म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥ म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. ॥८-६८॥ यं यं वापर स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् | तं तमेवैति कौंन्तेय सदा तद्भावभावित:||६|| तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥ आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्द च | मय्यर्पितमनोबुद्धिर्मामे वैश्य स्य संशय: ||७|| म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संसय मजप्रतच येशील. तसेच, "जब होवेगी उमर पूरी, तब छुटेगा हुकूम हुजूरी",अशा परिस्थितीत वरील उपाय फारच सोईस्कर वाटतो. नुकताच आलेला एक अनुभव..... एन्जोप्लास्टी झाली, अतीदक्षता विभागात छतावरील तारे मोजत पडलो होतो. समोरच्याच खाटेवर एक वृद्ध रोगी,त्याच्याभोवती एक डाॅक्टर, चार पाच परिचारिका, दहा बारा वैद्यकीय तंत्रज्ञ, खुप सारी यंत्र सामुग्री पडली होती. व्हेन्टिलेटर वर ठेवले होते. वृद्ध सारखा श्वसन यंत्र काढून फेकत होता. आणी मला श्वास येत नाही असे ओरडत होता. सारे प्रयत्न करून सुद्धा काहीही परिणाम होत नव्हता शेवटी वैतागून डाॅक्टर म्हणाले बाबा ,नळी काढू नको,मरून जाशील. कावळा बसायला आणी फांदी मोडायला एकच वेळ, त्याच क्षणी तो वृद्ध मेला. त्याचे शेवटचे शब्द "मला श्वास येत नाहीये...", त्याचे नातेवाईक, कदाचित मुलगी जावई, सुन मुलगा असतील, संपूर्ण अत्याधुनिक सोई उपलब्ध असतानाही, सर्वांच्या हातावर तुरी देऊन आत्मा कुडी सोडून पसार झाला. कुणीही काहीही करू शकले नाही. त्या अनुभवानंतर मन बरेच शांत झाल्यासारखे वाटते. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था शस्‍त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला घे शस्‍त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा कुणी आप्‍त ना कुणी सखा ना जगती जिवांचा क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था -कविवर्य मनोहर कविश्वर.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 16/05/2025 - 16:46
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याच लेखात जे कृष्णमूर्ती यांचे मृत्यू विषयी विचार लिहिले आहेत.तेही पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत.अगदी मृत्युला फॅमिलीयर (सहजता) ;) कसं करायचं याबद्दल सांगितले आहे.

पण खरा प्रतिसाद लिहायचा राहून गेला. अतिशय विचारांना चालना देणारा लेख आणी अनुषंगिक प्रतिसाद. सर्वांचे मनापासून आभार. लेख आवडला. भक्ती तुझ्या वाचन व्यासंगाला एक कडक सलाम.

स्वधर्म 16/05/2025 - 18:47
या विषयावर एक प्राथमिक व्हिडीओ: "मृत्यू के समय क्या होता है?": बुद्धने क्या अनुभव किया? डॉ संग्राम पाटील https://youtu.be/sl7RXRQPFTs?si=2jrc_Fs_sFBP8P73 मृत्यू से पहले, मृत्यू के बाद (पटिच्चसमुप्पाद) l डॉ संग्राम पाटील https://youtu.be/PzNqE1sLWDE?si=RLhlHxEqqJJO1Jn6

कंजूस 17/05/2025 - 04:40
पुस्तक परिचय आहे. कुणी काय तत्त्वज्ञान सांगितले त्यांची थोडी माहिती आहे. तत्त्वज्ञानाची उकल लेखक करत नाही. -------------------------- जन्म आणि मृत्यू म्हणजे काय हे समजण्याची खटपट म्हणजे तत्त्वज्ञान. ते कुणालाच समजले नाही. समजावता आले नाही. असो.

शाम भागवत 17/05/2025 - 15:21
तूच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार ह्या ग्रंथांत अद्वैत तत्वज्ञान खूप सोप्या मराठीत सांगितले आहे. इश्वर, परमेश्वर, जड, चेतन वगैरेंच्या व्याख्याही सोप्या मराठीत सांगितल्या आहेत.

मारवा 17/05/2025 - 19:21
वर जसा एक योग्य असा आक्षेप घेतलेला आहे की बरेच भारतीय लेखक गोलमाटोल लिहितात. तो आक्षेप बराच खरा असच आहे. पाश्च्यात्य विचारवंतामध्ये एक लोभसवाणी वैचारिक शिस्त आणि स्पष्टता बराच जणांमध्ये असते. भारतीय आपले मराठी तत्त्वज्ञ श्री राजीव साने यांचे मला फार कौतुक वाटते. त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे. वैचारिक शिस्त आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांनी नुसता इतरांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा किंवा विश्लेषण केवळ करून न थांबता. स्वतःचे अस्सल स्वतंत्र असे सुंदर स्पष्ट व सघन असे तत्त्वज्ञान निर्माण केले.ते मुळातून वाचण्यासारखे आहे. फार सकारात्मक सुंदर वास्तववादी वैचारिक आत्मविश्वास वाढवेल असे हे लिखाण आहे. https://www.amazon.in/Complementarity-Rationalist-Humanism-Rejuvenated-ebook/dp/B088DC797B दुर्दैवाने या सुंदर ग्रंथाची म्हणावी तशी दखल अजून घेतली गेली नाही.

In reply to by मारवा

स्वधर्म 19/05/2025 - 14:36
'भाग्य' हा प्रकार मान्य केला पाहिजे असे त्यांचे मत असल्याचे आठवते.
अतत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्व‌ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.

तीट

अनन्त्_यात्री ·

निनाद 21/08/2025 - 14:59
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा
आवडले!

गणेशा 21/08/2025 - 15:09
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा
व्वा अप्रतिम

निनाद 21/08/2025 - 14:59
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा
आवडले!

गणेशा 21/08/2025 - 15:09
गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा
व्वा अप्रतिम
ओथंबल्या नभाखाली भारलेली हवा सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सैरभैर थवा गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा, "दृष्टावल्या भवताला काळी तीट लावा "

कृष्णविवर

अनन्त्_यात्री ·
शतसूर्यांची जळती बिंबे गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे स्थळकाळाची अदय शृंखला तटतट तोडून हिंडत आहे क्षुधा अपरिमित अंतर्यामी धगधग पेटून उठली आहे आदिम स्वाहाकार सूक्त का पुनश्च अविरत गुंजत आहे? विज्ञानाचे नियम तोकडे- विपरित त्यांच्या घडते आहे भवताला घोटात गिळुनिया कृष्णविवर हे हिंडत आहे "विझत्या सूर्यावरती लट्टू नार नवेली पृथ्वी आहे" कृष्णविवर संतप्त होऊनी अथक स्वतःला कोसत आहे

राजा माझा

लाल गेंडा ·

निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी रजोगुणांनी संपन्न असा शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा || मुजरा, मान, देह, मन सर्वे त्याला अर्पावे त्याच्याच प्रेरणेने पुढे जावे.... ।। आठवावे रूप,प्रताप आठवावा वंदनीय राजा माझा..... राजकारणात त्याचा वापर नसावा

In reply to by कर्नलतपस्वी

लाल गेंडा 06/05/2025 - 09:43
आठवावे रूप,प्रताप आठवावा वंदनीय राजा माझा..... राजकारणात त्याचा वापर नसावा !! हे खरे आहे आणि असेच व्हावे हि प्रार्थना ....

निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी रजोगुणांनी संपन्न असा शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा || मुजरा, मान, देह, मन सर्वे त्याला अर्पावे त्याच्याच प्रेरणेने पुढे जावे.... ।। आठवावे रूप,प्रताप आठवावा वंदनीय राजा माझा..... राजकारणात त्याचा वापर नसावा

In reply to by कर्नलतपस्वी

लाल गेंडा 06/05/2025 - 09:43
आठवावे रूप,प्रताप आठवावा वंदनीय राजा माझा..... राजकारणात त्याचा वापर नसावा !! हे खरे आहे आणि असेच व्हावे हि प्रार्थना ....
तोरणा, राजगड, रायगड, प्रतापगड सहयाद्री असो वा सागरी राज्य करतो, राजा माझा || शाहिस्ते खान, अफजल खान, मानसिंग, इंग्रज देशी असो वा विदेशी जिंकतो सगळ्यांना, राजा माझा ॥ दुर्जनांचा विनाशी, सज्जनांचा कैवारी रयतेला न्याय देतो सर्वांसाठी समान, राजा माझा || हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सर्व धर्म समान मानतो सगळ्यांना समान लेखतो, राजा माझा ।। निश्चयाचा महामेरु, सामान्यजनांचा आधारु मनातला तिमीर दूर करतो ध्येयाचा सूर्य तळपता, राजा माझा || निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी रजोगुणांनी संपन्न असा शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा || मुजरा, मान, देह, मन सर्वे त्याला अर्पावे त्याच्याच प्रेरणेने पुढे

त्या पडद्याच्या पल्याड वसते

अनन्त्_यात्री ·
त्या पडद्याच्या पल्याड वसते गूढ असे "ते "काही (अंतर "त्या"च्या-माझ्या मधले घटते, कळतही नाही) भेट अटळ आहेच "त्या"ची मग वाट कशाला पाहू? (अस्तित्वाचा सूर्य ग्रासण्या अविरत टपला राहू) "अस्तित्वाच्या पूर्णविरामा- -नंतर काहीच नसते"- (माहित असले - तरी मानसी उत्कंठा का वसते?) त्या पडद्याचे धूसर दर्शन अधुनी मधुनी घडते ("जाऊनी वरती, परतुनी आले" ऐसी कुजबुज होते ) :)

अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे.....

कर्नलतपस्वी ·

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्या विनोदी प्रतिसादांमुळे, आराम मिळत होता आणि करमणूक पण होत होती... असेच विनोदी प्रतिसाद देत रहा...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विशेषतः, नथू गुग्गुळ वटी.... अर्थात, तुमच्या चोंबडेपणा वर आणि लोचटपणा वर मात्र औषध नाही...

अमेरिका भेटीबाबतची रचना आवडली आम्ही अमेरिकेत राहत असल्याने घरून कुणी जेव्हा भारतातून येतं तेव्हा केवळ काही मराठी पुस्तकं वगैरे आम्ही आणायला सांगतो. खाण्यापिण्याचे जिन्नस इथल्या भारतीय वाणसामानाच्या दुकाना कायमच मिळतात. कालनिर्णय स्थानिक मराठी मंडळाकडून दिवाळी अन (जे दिवाळी कार्यक्रमास अनुपस्थित राहतात त्यांना) संक्रांत कार्यक्रमात मिळतेच. घरच्या मंडळींना जितके हलके सामान घेऊन येता येईल तितके उत्तम असा आमचा प्रयत्न असतो. सुटीवर भारतात येताना मात्र आम्ही प्रियजनांसाठी जे जे आणता येईल ते सर्व आणतो. भारतातून परततानाही खाण्यापिण्याचे जिन्नस बरोबर घेणे टाळतो.

कवीतेचा सुर जरी नकारात्मक, व्यंगात्मक असला तरी खरी परिस्थितीत उलटी असते.मुलांकडे येताना काय आणू आणी काय नको असे होते. आगदी कवितेच्या विरूद्ध. मुलांचे मित्र सुद्धा मुलांसारखेच त्यामुळे ते सुद्धा आम्हीं येण्याची वाट बघतात. काही वाटा त्यांना पण मीळतो.ते पण पाहुणचार चागला करतात. इतक्या दुर तेच खरे नातलग. बाकी आपण कुठे रहाता माहित असते तर आपला शेअर आणला असता. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

आपल्या प्रियजनांसाठी काय नेऊ काय नको ही अवस्था प्रत्येकाची असते. अमेरिकेतून भारतात येताना आम्हीही यातूनच जातो. गेल्या अनेक वर्षांत अमेरिकेत सहज मिळणारे भारतीय जिन्नस अनेक त्रास सोसून आणतांना भारतीय मंडळींना पाहिले आहे. काही वेळा विमानतळावरच्या तपासणीतही त्रास झाल्याचे पाहिले आहे म्हणून माझी प्राथमिक प्रतिक्रिया तशी होती. आपण पुढल्या वेळी अमेरिकेला आलात की आमच्याकडे डॅलस (काहींसाठी डल्लास ;-)) टेक्सस येथे जरूर या व आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या.

पंढरी ची वारी डोळ्यासमोर येते. आनंदाचे निधान निर्वाणीचा पांडुरंगाची ओढ लागते. मुला नातवंडांना भेटाणे सुद्धा तसेच. नातवंड आनंदाचा डोह. म्हणून वारी हा शब्द मुद्दाम वापरला आहे.

सुक्या 25/04/2025 - 01:45
रचना आवडली. भारतातुन येताना वाणसामाना ऐवजी घरी बनवलेले पापड / कुरडाया / चकली / वेफर्स ई ई आनण्यावर वर भर असतो. आई बाबा / सासु सासरे बॅगा भरुन भरुन देतात आणी मग बॅगेचे वजन सांभाळण्यात आख्खी दुपार जाते. त्यात माझी पुस्तके कुठे तरी भर म्हणुन टाकावी लागतात. आजकाल बुकगंगा मुळे आप्पा बळ्वंत चौकात जावे लागत नाही. जाताना मात्र भरपुर चॉकलेट जातात. अपेयपान वर्ज असल्यामुळे बाटल्या नेत नाही. साधारण जुन महिण्यात भारतातुन पाहुणे यायला सुरुवात होते. मग ईथे त्यांची गट्टी जमली की मग मिळुन देवळात जाणे / पार्कात चकाट्या पिटणे वगेरे चालु होते. पुर्वी सोबत नाही म्हणुन कंटाळनारे बाबा आता आले की मिळुन पॉटलक / ऑगस्ट मधे भारतीय स्वातंत्र्यदिन वगेरे साजरा करता. फक्त वय झाले म्हनुन प्रवासाचा त्रास फार होतो.

चामुंडराय 30/04/2025 - 02:13
छान रचना, आवडली !! मुला नातवंडांची भेट हे सगळ्यात मोठे मोटिव्हेशन. बाकी भारत म्हणजे माहेर आणि कर्मभूमी म्हणजे सासर. प्रत्येक भारत भेटीच्या वेळी - माझ्या माहेराच्या वाटे   जरी  लागल्या  रे ठेचा वाटवरच्या  या दगडा तुले फुटली रे वाचा! “नीट जाय मायबाई नको करु धडपड तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड!” - बहिणाबाई

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुमच्या विनोदी प्रतिसादांमुळे, आराम मिळत होता आणि करमणूक पण होत होती... असेच विनोदी प्रतिसाद देत रहा...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विशेषतः, नथू गुग्गुळ वटी.... अर्थात, तुमच्या चोंबडेपणा वर आणि लोचटपणा वर मात्र औषध नाही...

अमेरिका भेटीबाबतची रचना आवडली आम्ही अमेरिकेत राहत असल्याने घरून कुणी जेव्हा भारतातून येतं तेव्हा केवळ काही मराठी पुस्तकं वगैरे आम्ही आणायला सांगतो. खाण्यापिण्याचे जिन्नस इथल्या भारतीय वाणसामानाच्या दुकाना कायमच मिळतात. कालनिर्णय स्थानिक मराठी मंडळाकडून दिवाळी अन (जे दिवाळी कार्यक्रमास अनुपस्थित राहतात त्यांना) संक्रांत कार्यक्रमात मिळतेच. घरच्या मंडळींना जितके हलके सामान घेऊन येता येईल तितके उत्तम असा आमचा प्रयत्न असतो. सुटीवर भारतात येताना मात्र आम्ही प्रियजनांसाठी जे जे आणता येईल ते सर्व आणतो. भारतातून परततानाही खाण्यापिण्याचे जिन्नस बरोबर घेणे टाळतो.

कवीतेचा सुर जरी नकारात्मक, व्यंगात्मक असला तरी खरी परिस्थितीत उलटी असते.मुलांकडे येताना काय आणू आणी काय नको असे होते. आगदी कवितेच्या विरूद्ध. मुलांचे मित्र सुद्धा मुलांसारखेच त्यामुळे ते सुद्धा आम्हीं येण्याची वाट बघतात. काही वाटा त्यांना पण मीळतो.ते पण पाहुणचार चागला करतात. इतक्या दुर तेच खरे नातलग. बाकी आपण कुठे रहाता माहित असते तर आपला शेअर आणला असता. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

आपल्या प्रियजनांसाठी काय नेऊ काय नको ही अवस्था प्रत्येकाची असते. अमेरिकेतून भारतात येताना आम्हीही यातूनच जातो. गेल्या अनेक वर्षांत अमेरिकेत सहज मिळणारे भारतीय जिन्नस अनेक त्रास सोसून आणतांना भारतीय मंडळींना पाहिले आहे. काही वेळा विमानतळावरच्या तपासणीतही त्रास झाल्याचे पाहिले आहे म्हणून माझी प्राथमिक प्रतिक्रिया तशी होती. आपण पुढल्या वेळी अमेरिकेला आलात की आमच्याकडे डॅलस (काहींसाठी डल्लास ;-)) टेक्सस येथे जरूर या व आम्हाला तुमचा पाहुणचार करण्याची संधी द्या.

पंढरी ची वारी डोळ्यासमोर येते. आनंदाचे निधान निर्वाणीचा पांडुरंगाची ओढ लागते. मुला नातवंडांना भेटाणे सुद्धा तसेच. नातवंड आनंदाचा डोह. म्हणून वारी हा शब्द मुद्दाम वापरला आहे.

सुक्या 25/04/2025 - 01:45
रचना आवडली. भारतातुन येताना वाणसामाना ऐवजी घरी बनवलेले पापड / कुरडाया / चकली / वेफर्स ई ई आनण्यावर वर भर असतो. आई बाबा / सासु सासरे बॅगा भरुन भरुन देतात आणी मग बॅगेचे वजन सांभाळण्यात आख्खी दुपार जाते. त्यात माझी पुस्तके कुठे तरी भर म्हणुन टाकावी लागतात. आजकाल बुकगंगा मुळे आप्पा बळ्वंत चौकात जावे लागत नाही. जाताना मात्र भरपुर चॉकलेट जातात. अपेयपान वर्ज असल्यामुळे बाटल्या नेत नाही. साधारण जुन महिण्यात भारतातुन पाहुणे यायला सुरुवात होते. मग ईथे त्यांची गट्टी जमली की मग मिळुन देवळात जाणे / पार्कात चकाट्या पिटणे वगेरे चालु होते. पुर्वी सोबत नाही म्हणुन कंटाळनारे बाबा आता आले की मिळुन पॉटलक / ऑगस्ट मधे भारतीय स्वातंत्र्यदिन वगेरे साजरा करता. फक्त वय झाले म्हनुन प्रवासाचा त्रास फार होतो.

चामुंडराय 30/04/2025 - 02:13
छान रचना, आवडली !! मुला नातवंडांची भेट हे सगळ्यात मोठे मोटिव्हेशन. बाकी भारत म्हणजे माहेर आणि कर्मभूमी म्हणजे सासर. प्रत्येक भारत भेटीच्या वेळी - माझ्या माहेराच्या वाटे   जरी  लागल्या  रे ठेचा वाटवरच्या  या दगडा तुले फुटली रे वाचा! “नीट जाय मायबाई नको करु धडपड तुझ्याच मी माहेराच्या वाटवरला दगड!” - बहिणाबाई
अम्रीकेच्या वाटे कुचूकुचू काटे खिशाला फुटतात शंभर फाटे तेवीस किलोत फक्त कपडे चार आवांतर सामानाची गर्दीच फार महिनाभर आगोदर येते यादी म्हातारी वादी, म्हातारा प्रतिवादी बुधानी,कल्याणी,चितळे, कयानी वडी,सांई,जरा बेतानी खर्च करा नी कलश,कालनिर्णय,कढाई,पेशवाई रोज पॅन्ट शर्ट तरी पैठणीची अपुर्वाई म्हातार्‍याची वडवड,चश्म्याची वाट पायाला भिंगरी अन कण्हारली पाठ सामानाची मांदियाळी बॅगा झाल्या भारी काय सांगू,अम्रिकेच्या आधी पुण्याची वारी तयारी झाली ,म्हातारीनं घेतली बॅक सिट म्हातार्‍याच्या नावानं फाडतीया तिकीट पिझ्झा, बर्गर...

जर्द पिवळी दुपार

अनन्त्_यात्री ·

चित्रगुप्त 18/04/2025 - 23:00
जर्द पिवळी दुपार ... गारव्याची निळी शीळ ... -- एकदम चपखल. तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते -- हे मात्र समजले नाही. 'तिथे' म्हणजे कुठे ? आणि 'बेडी' कसली ?

In reply to by चित्रगुप्त

"तिथे" = गारव्याच्या निळ्या शिळीसारखे अंतर्बाह्य सुखावणारे आपापले श्रेयस जिथे वसते ती अप्राप्य जागा "बेडी" = "तिथे" पोहोचण्यापासून परावृत्त करणारी अनेक बंधने

वामन देशमुख 20/04/2025 - 14:50
"जर्द पिवळी दुपार"कार अनन्त्_यात्री यांची क्षमा मागून तसेच अथांग आकाश यांच्या सूचनेचा मान ठेवून "जर्द पिवळी विजार" झालेली काढून इथे धुवायला टाकली आहे!

चित्रगुप्त 18/04/2025 - 23:00
जर्द पिवळी दुपार ... गारव्याची निळी शीळ ... -- एकदम चपखल. तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते -- हे मात्र समजले नाही. 'तिथे' म्हणजे कुठे ? आणि 'बेडी' कसली ?

In reply to by चित्रगुप्त

"तिथे" = गारव्याच्या निळ्या शिळीसारखे अंतर्बाह्य सुखावणारे आपापले श्रेयस जिथे वसते ती अप्राप्य जागा "बेडी" = "तिथे" पोहोचण्यापासून परावृत्त करणारी अनेक बंधने

वामन देशमुख 20/04/2025 - 14:50
"जर्द पिवळी दुपार"कार अनन्त्_यात्री यांची क्षमा मागून तसेच अथांग आकाश यांच्या सूचनेचा मान ठेवून "जर्द पिवळी विजार" झालेली काढून इथे धुवायला टाकली आहे!
जर्द पिवळी दुपार दार ठोठावत येते आत आत कोंडलेले झळीनेच धुमसते घोर फुफाटा धुळीचा अणु रेणू तापलेला मृगजळाच्या काठाशी निवडुंग फोफावला गारव्याची शीळ निळी दूर विजनी घुमते तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते