गीतारहस्य प्रकरण ८ -विश्वाची उभारणी व संहारणी

लेखनविषय:
लेखनप्रकार
गीतारहस्य -प्रकरण८ ( पान क्र. १०२-११८) **विश्वाची उभारणी व संहारणी सांख्याप्रमाणे प्रकृति व पुरुष या स्वतंत्र मूलतत्वांचे स्वरूप म्हणजे प्रकृति पुरुषासमोर आपल्या गुणाचा जो बाजार मांडते त्यास मराठी कवींनी 'संसृतीचा पिंगा' तर ज्ञानेश्वर महाराज यांनी 'प्रकृतीची टांकसाळ 'असे म्हटले आहे. प्रकृतीच्या या व्यापारास समर्थांनी 'विश्वाची उभारणी व संहारणी' हे शब्द घेतले आहेत. भगवद्‌गीतेप्रमाणे प्रकृति आपला संसार चालविण्यास स्वतंत्र नसून ती हे काम परमेश्वराच्या इच्छेने चालवीत असते ,असे म्हटले आहे .( गी. ९.१०) परंतू कपिलांनी प्रकृति स्वतंत्र मानिली आहे.

बखरीच्या पानाआड

लेखनविषय:
बखरीच्या पानाआड पाहिले मी क्षणभर दडपल्या वास्तवाचे छिन्नभिन्न कलेवर प्रचलित इतिहास तुझ्या माझ्या मेंदूतून अज्ञाताच्या शक्यतांना टाके पुरता पुसून जेत्यांचाच इतिहास रुळे मग माझ्या मुखी पराजितांचा ठरतो इतिहास अनोळखी बखरीच्या पानाआड वास्तवाचा भग्न गड त्याच्या झाकल्या गूढाचे कसे सरावे गारूड?

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ (ऐसी अक्षरे ३१)

लेखनविषय:
लेखनप्रकार
गेला महिनाभर खंडेरावाच्या घराचे आम्ही सदस्य होतो.खाणदेशातले मोरगाव आमचच गाव होत :) :) हिंदू जगणयाची समृद्ध अडगळ ही भालचंद्र नेमाडे यांची ज्ञानपीठ मिळवलेली प्रसिद्ध कादंबरी पूर्ण (३६ तास ) ऐकली . तर ६०३ पानांची छापील कादंबरी आहे .

नक्षत्रांचे देणे होते

लेखनविषय:
नक्षत्रांचे देणे होते द्यायचे राहिले जगण्याच्या वाटेवर काटेच भेटले नक्षत्रांनी अव्हेरून उल्का पाठविली काट्यांशीच केली मैत्री फुले त्यांची झाली एकेका फुलाचे रंग आठवत होतो निर्माल्य फुलांचे झाले -बेसावध होतो निर्माल्य होताना फुले नि:शब्द म्हणाली, "खत होणे हेच थोर भाग्य आम्हा भाळी सृजनाच्या मृदेवर आमुची पाखर निर्मितीची उर्मी गाठो एक नवा स्तर पीक विलक्षणाचेच येईल, तोवरी नक्षत्रांनो थांबा,आज रिक्त देणेकरी"

निसर्गायण (ऐसी अक्षरे -३०)

लेखनविषय:
लेखनप्रकार
निसर्गायण लेखक- दिलीप कुलकर्णी. १ जडवादी, भोगवादी वृत्ती आधुनिक तंत्रज्ञानात अधिक इच्छांनी वखवखलेल्या माणसाला विनाशाकडे घेऊन चालली आहे. हे सर्व घडतांना बाह्य निसर्गाची तो अपरिमित हानी करत आहेच. परंतू स्वतःच्या अंतर्बाह्य निसर्गचक्राचीही तो हानी करत आहे. निसर्ग हा संतुलनासाठी सतत चक्रात काम करतो.

खडपाकोळी

लेखनविषय:
लेखनप्रकार
चिंब पावसानं रस्तं झालं खड्ड्यावाणी राखू कशी, अंगावरली ? राखू कशी,अंगावरली?कोरी पैठणी ग, कमळणबाई,भरलं पाणी डबक्यातूनी !!!! कविवर्य ना.धो.महानोर खुप दयाळू होते. ते नक्कीच मला क्षमा करतील. सध्या,पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणं कठीण झालयं. कधी लोटांगण घालावे लागेल किंवा मागून येणारे वाहन कधी सचैल स्नान घडवेल याचा नेम नाही.म्हणूनच,कविवर्य ना.धो महानोर यांचे सर्व कालीक आवडतीचे गाणे," चिंब पावसानं रान झालं आबादानी",ऐकत स्टिल्ट पार्किंग मधेच सकाळचे वाॅक करतो. पावसाची संततधार आणी चिखल,पक्षीदर्शन दुर्लभ झालेआहे.तरीही सवयीनुसार चालताना नजर भिरभिरत असते.

स्वार्थी फुलांचा परमार्थ

लेखनविषय:
हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ" कादंबरी ऐकतेय, स्वार्थ हाच एक परामार्थ आहे,हे त्यातलेच वाक्य आहे.यात पुढे निसर्गातील इतर सजीवांचा स्वार्थीपणा सांगताना म्हटलंय...म्हणजे आशय असा होता की, ही फुलं इतक्या मोहक रंगात उमलतात,सुगंधात दरवळतात ती काय माणसाला आनंद व्हावा म्हणून नव्हे.तर त्यांचं प्रजननाचे चक्र अविरत चालू रहावे म्हणूनच! पण लक्षात आलं.या सुंदर फुलांनी नकळत एक समाधानाचे चक्र माणसासाठी आपसूकच सुरु केलंय.सकाळच्या शांत पाखरांच्या गुंजारवात,कधी दवांनी भिजलेली,पावसाच्या थेंबात न्हालेली गुलाबी पाकळ्यांची अदा,जांभळ्या गोकर्णाचा मऊसर रंग‌ हाती का उमटत नाही?असा बाळबोध मनाला प्रश्न पडलेला.पारिजात फु

पार

लेखनविषय:
जनुकांचा जिना सोसे प्रसवाच्या कळा श्रवणाच्या पार उभा अनाहत निळा प्रतिबिंब जाऊ पाहे बिंबाच्याही पार उडोनिया पारा उरे काच आरपार पिंपळाच्या पारापाशी खोरणात दिवा लावण्यास कोण येते घोर लागे जीवा नक्षत्रांच्या पार जाई मिथकांचा पैस सृजनाच्या कल्लोळात सावरून बैस शब्दांच्याही पार ओळ कवितेची गेली लुटुपुटू राजा खेळे तरी भातुकली

सुरीला दारूडा,..

लेखनविषय:
संध्याकाळचे सात-साडेसातला कुकरची शिट्टी होऊ लागली, की तिच्या सूऊऊऊ आवाजाच्यानंतर ,कधी आधी "चंदनाची चोळी अंग अंग जाळी... बाई ठिपक्यांची.. ठिपक्यांची.." असा तालामुरातला खडा आवाजान गाणारा बेवडा ऐकू यायचा. घरासमोरच्या मुख्य हमरस्ता कायम वाह‌ता असतो.फाटक्या शर्टमधला तो मळका दारूडा झिंगत रस्त्याहून धीमेपणाने घरी जायचा . बर नुसता झिंगायचा नाही तर वरच्या पट्टीत गात चालायचा. "चंदनाची चोळी अंगजाळी, बाई ठिपक्यांची हे त्याचे विशेष गाणं होत. "बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची ..." हे तो इतकं अप्रतिम गायचा. वरच्या आवाजात बाई ठिपक्यांची गात हळू हळू आवाज करत, बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची..

राडा

लेखनविषय:
लेखनप्रकार
राडा ______ स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते. आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती.
Subscribe to मुक्तक