मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दर्शन -- भक्तिगीत

कौस्तुभ ·
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे कधीचे प्राण माझे नयनी उभे रे ॥धृ॥ नाण्यावरी ठसा जसा, दिवा मंदिरात तसा तूच सामावला माझ्या अंतरात वितळू दे काया, तुझ्या मुर्तीत घे रे ॥१॥ पांडुरंग पांडुरंग ... ऐकीयले जनाघरी जाते तू ओढीले नरहरी सोनाराचे दागिने करीले देई हाक येथ पहा, लेकरु तुझे रे ॥२॥ पांडुरंग पांडुरंग ... जन म्हणे विठोबाच्या नादी खुळावला दृष्टाळला जन्म सारा, संसार नासला उत्तराया तूच नाथा, प्रकटोनी ये रे ॥३॥ पांडुरंग पांडुरंग ... भक्तिगीत --कौस्तुभ

बसंतचं लग्न..१४

विसोबा खेचर ·

माझ्या एकदम आवडत्या रागावर लेख लिहिलास :) 'बजे सरगम...' ! भीमसेनजींचा बुलंद मधुर आवाज अजूनही कानांत घुमतोय !! त्याच चित्रफितीमधे बासरीवर जादुई कलाकुसर करणारी हरिजींची बोटं आणि फुंक किती वेळा पाहिली ह्याची गणनाच नाही :) (हरिभक्त) संदीप -------------------------- www.atakmatak.blogspot.com

बेसनलाडू 09/07/2008 - 22:15
ओळखीच्या गाण्यामुळे लेखही चटाचट उलगडत गेला. खंडित विवाहसोहळा पुन्हा मार्गस्थ झाला,हे पाहून बरे वाटले. (बाराती)बेसनलाडू

सर्किट 09/07/2008 - 22:55
क्या बात है ! (बसंतच्या लग्नाची मालिका अशीच सुरू राहावी ही शुभेच्छा. जरा मारव्याकडेही लक्ष द्या तात्या. ते बेणं लग्नात नुस्तंच जिलब्या हादडायला आलंय, असं वाटायला नको.) - सर्किट

नेहमी प्रमाणेच उत्तम.. बाकी देस रागात इतकी छान छान गाणी आहेत हे माहीतच नव्हते. सुंदर रागाची ओळख करून देण्याबद्दल तात्याचे आभार मानावे तितके कमीच. (अवांतरः बाकी तात्यासारखे दिग्गज गवई आणि इतर अनेक रसिक वाचकांचा प्रतिसाद बघता मिसळपाव नावाचे एक नविन घराणे सुरू करायला हरकत नाही असे वाटते. मिसळपाव एक घर तर आहेच, आता एक सांगितिक घराणे देखील होईल. ह.घ्या. हे.वे.सां. न. ल.) पुण्याचे पेशवे

कोलबेर 10/07/2008 - 00:46
नेहमी प्रमाणेच बंदीशींच्या क्लिपिंग्ज ऐकत आणखी एका रागाची ओळख करुन घ्यायला छान वाटले.

प्राजु 10/07/2008 - 01:00
सुंदर वर्णन रागाच्या स्वभावाचं. क्लिपिंग्जमुळे आणखीच छान वाटलं. गाण्यांमुळे राग उलगडत गेला. असो.. लग्नाची वरात मध्येच कुठेतरी आडकली होती आता पुन्हा रस्त्याला लागली.. लवकरच मुहुर्त गाठेल अशी आशा करायला हरकत नाही. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विकास 10/07/2008 - 07:28
माझ्या "दारी राग" नसल्याने या विषयात तसा अनभिज्ञ आहे. पण उदाहरण म्हणून दिलेली एकापेक्षा एक मस्त गाणि सांगितल्यामुळे समजायला सोपे गेले.

संगितातले राग वगैरे काही कळत नाही, पण बसंतच्या लग्नात 'देस' रागाचे वैभव वाचायला आवडले.
जे आपल्याला कळत नाही, एकतर समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश 10/07/2008 - 09:53
संगितातले राग वगैरे काही कळत नाही, पण बसंतच्या लग्नात 'देस' रागाचे वैभव वाचायला आवडले.
अगदी मनातलं बोललात प्रा डॉ. :) निव्वळ सुंदर लेख! क्लिपिंग तर मस्तच! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसोबा खेचर 10/07/2008 - 09:40
शैला दातार या त्यांच्या नातसूनेने गायलेली आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातली, शैला दातार या माणिकताईंकडे गाणं शिकलेल्या आहेत. त्यांच्या गाण्याच्या काही चांगल्या मैफली मी ऐकल्या आहेत. पूर्वी त्या भास्करबुवा बखल्यांवर 'देवगंधर्व' नावाचा एक कार्यक्रमही करत असत, अजूनही बहुधा करत असाव्यात. त्यांचे पती सुधीर दातार यांचंही चांगलं गाणं मी ऐकलं आहे. त्यांनी रामभाऊ मराठ्यांकडे गाण्याची तालीम घेतलेली आहे... आपला, (भास्करबुवाप्रेमी) तात्या.

रामदास 10/07/2008 - 10:18
देस ऐकतो तेव्हा मला कसरती मध्ये हातात रीबन धरून करण्याच एक इवंट असतो.माझ्या डोळ्यासमोर तेच चित्र उभं राहीलं. य खेळाला काय म्हणतात ते आठवत नाही.

In reply to by नंदन

विसोबा खेचर 10/07/2008 - 12:22
आमचा नंदन अन् तो दुसरा एक शशांक! कुठून कुठून शोधून काढून दुवे देण्यात दोघंही एकदम तरबेज आहेत... :) तात्या.

छान ..दोन्ही क्लिपिंग ऐकल्या.. ... आणि तो रिबन डान्स सुद्धा छान होता :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा 11/07/2008 - 00:03
जरा सवडीनं क्लीपा ऐकल्या.... मस्त आहेत्...छान समजावलयत... पुढ्च्या भागांना खूप शुभेच्छा! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर 11/07/2008 - 07:41
आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार... :) आपला, (कृतज्ञ) तात्या. -- आगामी तात्या अभ्यंकर : "चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १ (गाणं - 'पिया बावरी', चित्रपट - रेखाचा खूबसूरत)

अरुण मनोहर 12/07/2008 - 13:41
राग रागीणी क्षेत्रातले काही कळत नसल्याने वाचायला उशीरच झाला. एक अभ्यासपूर्ण लेख. तात्यांनी येवढे सविस्तर लीहून संगीत क्षेत्रासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.

चतुरंग 14/07/2008 - 03:35
'गूंजे मंतर देस राग' वा! दूरदर्शनवरची ती क्लिप अजूनही मनात गाजू लागते. एकदम सुरेख वर्णन. शुभ्रा गुहांची क्लिप देखील सुंदरच! नाट्यपद"मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला" असे हवे पण ती नजरचूक असावी. बसंतच्या लग्नाची वरात कधी संपूच नये असे वाटते! अजून येऊ देत तात्या! चतुरंग

विसोबा खेचर 14/07/2008 - 08:07
अरूणराव, डॉ दाढे, आणि रंगा, आपल्या तिघांचेही मनापसून आभार. रंगा तू म्हणतोस ते बरोबर आहे. माझी टंकनचूक झाली.... तात्या.

माझ्या एकदम आवडत्या रागावर लेख लिहिलास :) 'बजे सरगम...' ! भीमसेनजींचा बुलंद मधुर आवाज अजूनही कानांत घुमतोय !! त्याच चित्रफितीमधे बासरीवर जादुई कलाकुसर करणारी हरिजींची बोटं आणि फुंक किती वेळा पाहिली ह्याची गणनाच नाही :) (हरिभक्त) संदीप -------------------------- www.atakmatak.blogspot.com

बेसनलाडू 09/07/2008 - 22:15
ओळखीच्या गाण्यामुळे लेखही चटाचट उलगडत गेला. खंडित विवाहसोहळा पुन्हा मार्गस्थ झाला,हे पाहून बरे वाटले. (बाराती)बेसनलाडू

सर्किट 09/07/2008 - 22:55
क्या बात है ! (बसंतच्या लग्नाची मालिका अशीच सुरू राहावी ही शुभेच्छा. जरा मारव्याकडेही लक्ष द्या तात्या. ते बेणं लग्नात नुस्तंच जिलब्या हादडायला आलंय, असं वाटायला नको.) - सर्किट

नेहमी प्रमाणेच उत्तम.. बाकी देस रागात इतकी छान छान गाणी आहेत हे माहीतच नव्हते. सुंदर रागाची ओळख करून देण्याबद्दल तात्याचे आभार मानावे तितके कमीच. (अवांतरः बाकी तात्यासारखे दिग्गज गवई आणि इतर अनेक रसिक वाचकांचा प्रतिसाद बघता मिसळपाव नावाचे एक नविन घराणे सुरू करायला हरकत नाही असे वाटते. मिसळपाव एक घर तर आहेच, आता एक सांगितिक घराणे देखील होईल. ह.घ्या. हे.वे.सां. न. ल.) पुण्याचे पेशवे

कोलबेर 10/07/2008 - 00:46
नेहमी प्रमाणेच बंदीशींच्या क्लिपिंग्ज ऐकत आणखी एका रागाची ओळख करुन घ्यायला छान वाटले.

प्राजु 10/07/2008 - 01:00
सुंदर वर्णन रागाच्या स्वभावाचं. क्लिपिंग्जमुळे आणखीच छान वाटलं. गाण्यांमुळे राग उलगडत गेला. असो.. लग्नाची वरात मध्येच कुठेतरी आडकली होती आता पुन्हा रस्त्याला लागली.. लवकरच मुहुर्त गाठेल अशी आशा करायला हरकत नाही. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विकास 10/07/2008 - 07:28
माझ्या "दारी राग" नसल्याने या विषयात तसा अनभिज्ञ आहे. पण उदाहरण म्हणून दिलेली एकापेक्षा एक मस्त गाणि सांगितल्यामुळे समजायला सोपे गेले.

संगितातले राग वगैरे काही कळत नाही, पण बसंतच्या लग्नात 'देस' रागाचे वैभव वाचायला आवडले.
जे आपल्याला कळत नाही, एकतर समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश 10/07/2008 - 09:53
संगितातले राग वगैरे काही कळत नाही, पण बसंतच्या लग्नात 'देस' रागाचे वैभव वाचायला आवडले.
अगदी मनातलं बोललात प्रा डॉ. :) निव्वळ सुंदर लेख! क्लिपिंग तर मस्तच! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसोबा खेचर 10/07/2008 - 09:40
शैला दातार या त्यांच्या नातसूनेने गायलेली आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातली, शैला दातार या माणिकताईंकडे गाणं शिकलेल्या आहेत. त्यांच्या गाण्याच्या काही चांगल्या मैफली मी ऐकल्या आहेत. पूर्वी त्या भास्करबुवा बखल्यांवर 'देवगंधर्व' नावाचा एक कार्यक्रमही करत असत, अजूनही बहुधा करत असाव्यात. त्यांचे पती सुधीर दातार यांचंही चांगलं गाणं मी ऐकलं आहे. त्यांनी रामभाऊ मराठ्यांकडे गाण्याची तालीम घेतलेली आहे... आपला, (भास्करबुवाप्रेमी) तात्या.

रामदास 10/07/2008 - 10:18
देस ऐकतो तेव्हा मला कसरती मध्ये हातात रीबन धरून करण्याच एक इवंट असतो.माझ्या डोळ्यासमोर तेच चित्र उभं राहीलं. य खेळाला काय म्हणतात ते आठवत नाही.

In reply to by नंदन

विसोबा खेचर 10/07/2008 - 12:22
आमचा नंदन अन् तो दुसरा एक शशांक! कुठून कुठून शोधून काढून दुवे देण्यात दोघंही एकदम तरबेज आहेत... :) तात्या.

छान ..दोन्ही क्लिपिंग ऐकल्या.. ... आणि तो रिबन डान्स सुद्धा छान होता :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा 11/07/2008 - 00:03
जरा सवडीनं क्लीपा ऐकल्या.... मस्त आहेत्...छान समजावलयत... पुढ्च्या भागांना खूप शुभेच्छा! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर 11/07/2008 - 07:41
आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार... :) आपला, (कृतज्ञ) तात्या. -- आगामी तात्या अभ्यंकर : "चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १ (गाणं - 'पिया बावरी', चित्रपट - रेखाचा खूबसूरत)

अरुण मनोहर 12/07/2008 - 13:41
राग रागीणी क्षेत्रातले काही कळत नसल्याने वाचायला उशीरच झाला. एक अभ्यासपूर्ण लेख. तात्यांनी येवढे सविस्तर लीहून संगीत क्षेत्रासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.

चतुरंग 14/07/2008 - 03:35
'गूंजे मंतर देस राग' वा! दूरदर्शनवरची ती क्लिप अजूनही मनात गाजू लागते. एकदम सुरेख वर्णन. शुभ्रा गुहांची क्लिप देखील सुंदरच! नाट्यपद"मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला" असे हवे पण ती नजरचूक असावी. बसंतच्या लग्नाची वरात कधी संपूच नये असे वाटते! अजून येऊ देत तात्या! चतुरंग

विसोबा खेचर 14/07/2008 - 08:07
अरूणराव, डॉ दाढे, आणि रंगा, आपल्या तिघांचेही मनापसून आभार. रंगा तू म्हणतोस ते बरोबर आहे. माझी टंकनचूक झाली.... तात्या.

कवितेच्या झाडावर...

अशोक गोडबोले ·

बेसनलाडू 09/07/2008 - 10:13
शुद्ध,सात्त्विक,प्रसन्नचित्त कविता आवडली. (प्रसन्न)बेसनलाडू

चेतन 09/07/2008 - 10:19
सगळ्या ओळि आवडल्या (सुदंर उपमा) त्यात अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता कवितेची लागते किनारी नाव भावगीता खासच्... काव्यप्रेमी चेतन

शितल 09/07/2008 - 16:57
खुप छान काव्य रचना झाली आहे. सगळीच कविता आवडली. :)

धनंजय 09/07/2008 - 20:02
पुन्हा तुमच्या कविता येथे वाचायला मिळत आहेत, आनंद वाटतो.

विसोबा खेचर 10/07/2008 - 00:02
गोडबोले मास्तर, सगळीच कविता सुंदर, परंतु कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी या ओळी सर्वाधिक आवडल्या... तात्या. अवांतर - मिपाकरहो, सध्या पनवेलमधील रामदास-मारुती मंदिरात रोज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळात गीतेच्या १२व्या अध्यायावर गोडबोले सरांचं प्रवचन सुरू आहे. अतिशय प्रासादिक भाषा, गीतेवर, संस्कृतवर अफाट प्तभूत्व, प्रवचनादरम्यान ज्ञानोबा तुकोबांचे असंख्य दाखले, साधी सोपी व्यावहारिक उदाहरणं, या सर्व गोष्टी सरांच्या प्रवचनात अगदी पुरेपूर असतात. अतिशय श्रवणीय प्रवचन. इच्छुकांनी अवश्य हजेरी लावावी... तात्या.

बेसनलाडू 09/07/2008 - 10:13
शुद्ध,सात्त्विक,प्रसन्नचित्त कविता आवडली. (प्रसन्न)बेसनलाडू

चेतन 09/07/2008 - 10:19
सगळ्या ओळि आवडल्या (सुदंर उपमा) त्यात अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता कवितेची लागते किनारी नाव भावगीता खासच्... काव्यप्रेमी चेतन

शितल 09/07/2008 - 16:57
खुप छान काव्य रचना झाली आहे. सगळीच कविता आवडली. :)

धनंजय 09/07/2008 - 20:02
पुन्हा तुमच्या कविता येथे वाचायला मिळत आहेत, आनंद वाटतो.

विसोबा खेचर 10/07/2008 - 00:02
गोडबोले मास्तर, सगळीच कविता सुंदर, परंतु कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी या ओळी सर्वाधिक आवडल्या... तात्या. अवांतर - मिपाकरहो, सध्या पनवेलमधील रामदास-मारुती मंदिरात रोज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळात गीतेच्या १२व्या अध्यायावर गोडबोले सरांचं प्रवचन सुरू आहे. अतिशय प्रासादिक भाषा, गीतेवर, संस्कृतवर अफाट प्तभूत्व, प्रवचनादरम्यान ज्ञानोबा तुकोबांचे असंख्य दाखले, साधी सोपी व्यावहारिक उदाहरणं, या सर्व गोष्टी सरांच्या प्रवचनात अगदी पुरेपूर असतात. अतिशय श्रवणीय प्रवचन. इच्छुकांनी अवश्य हजेरी लावावी... तात्या.
कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी गणमात्रांच्या नाजूक वेली वेढीतात तिजला यमकांची चरणात पैंजणे छंद मधुर मेखला भव्य कल्पनाविलासापुढे नीलांबर ठेंगणे काव्यफुले फुलल्यावर लाजे पुनवेचे चांदणे सुधारसाशी पैज लाविती नवरस अभिमाने विश्वात्मक हा विशाल हृदये वसतो प्रेमाने षड्ज लावुनी मोर नाचती प्रीती गती संगम कोकिळकंठामधुनी निघतो नभचुंबी पंचम अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता कवितेची लागते किनारी नाव भावगीता --अशोक गोडबोले, पनवेल.

शर्यत

अरुण मनोहर ·

शितल 09/07/2008 - 07:07
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून वाट काढत पुढे पळणारे असंख्य मुसाफीर हे मस्तच रचले आहे

यशोधरा 09/07/2008 - 07:36
मस्तच! एकला वेडा, तोडूनी बेडी, मारली उडी अशी वेडी..... मारलेली उडी सफल होवो!! निदान उडी मारली ती चूक झाली, असे न वाटो....

विसोबा खेचर 10/07/2008 - 09:26
धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत वा! भन्नाट लिहिलं आहे! तात्या.

In reply to by आनंदयात्री

अरुण मनोहर 10/07/2008 - 12:04
सही पहचाना आपने. ही पद्य कविता म्हणूनच लिहीली होती. पण वाचकांना गोंधळ नको म्हणून, लेख वगैरे प्रकारात टाकली!

अरुण मनोहर 10/07/2008 - 11:59
शितल, यशोधरा, तात्या, आनंदयात्री, प्रोत्साहनासाठी धन्यवाद. तसेच सर्व वाचकांचे पण आभार.

वरदा 10/07/2008 - 17:27
चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. ह्या ओळी जास्त आवडल्या. "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

शितल 09/07/2008 - 07:07
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून वाट काढत पुढे पळणारे असंख्य मुसाफीर हे मस्तच रचले आहे

यशोधरा 09/07/2008 - 07:36
मस्तच! एकला वेडा, तोडूनी बेडी, मारली उडी अशी वेडी..... मारलेली उडी सफल होवो!! निदान उडी मारली ती चूक झाली, असे न वाटो....

विसोबा खेचर 10/07/2008 - 09:26
धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत वा! भन्नाट लिहिलं आहे! तात्या.

In reply to by आनंदयात्री

अरुण मनोहर 10/07/2008 - 12:04
सही पहचाना आपने. ही पद्य कविता म्हणूनच लिहीली होती. पण वाचकांना गोंधळ नको म्हणून, लेख वगैरे प्रकारात टाकली!

अरुण मनोहर 10/07/2008 - 11:59
शितल, यशोधरा, तात्या, आनंदयात्री, प्रोत्साहनासाठी धन्यवाद. तसेच सर्व वाचकांचे पण आभार.

वरदा 10/07/2008 - 17:27
चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. ह्या ओळी जास्त आवडल्या. "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
डोंगराला वळसे घालत जाणारा नागमोडी रस्ता चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून

पावसा!

ऋषिकेश ·

धनंजय 05/07/2008 - 17:36
सुपीक काफिया आहे - प्रत्येक शेरातली कल्पना मस्त आहे.

मदनबाण 05/07/2008 - 20:21
फारच सुंदर कविता.. वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा हे फार आवडल.. (ये रे ये रे पावसा )हे गाण गुणगुणारा.. मदनबाण.....

In reply to by मदनबाण

प्राजु 07/07/2008 - 01:09
हृषिकेश, खूप दिवसांनी तुझी गझल वाचली. अप्रतिम झाली आहे. खास करून शेवटचा शेर खूप आवडला.... अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 06/07/2008 - 22:33
धनंजय, तात्या, अभिज्ञ, मदनबाण आणि फुलवा, सार्‍यांचे प्रोत्साहनाबद्दल अन प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू 08/07/2008 - 01:45
नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वावावावा! फार आवडले. (बालक)बेसनलाडू

ऋषिकेश 09/07/2008 - 18:47
प्राजु, बेला, चतुरंग, चित्रा, शितल आणि कौस्तुभ सार्‍यांचे आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

धनंजय 05/07/2008 - 17:36
सुपीक काफिया आहे - प्रत्येक शेरातली कल्पना मस्त आहे.

मदनबाण 05/07/2008 - 20:21
फारच सुंदर कविता.. वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा हे फार आवडल.. (ये रे ये रे पावसा )हे गाण गुणगुणारा.. मदनबाण.....

In reply to by मदनबाण

प्राजु 07/07/2008 - 01:09
हृषिकेश, खूप दिवसांनी तुझी गझल वाचली. अप्रतिम झाली आहे. खास करून शेवटचा शेर खूप आवडला.... अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 06/07/2008 - 22:33
धनंजय, तात्या, अभिज्ञ, मदनबाण आणि फुलवा, सार्‍यांचे प्रोत्साहनाबद्दल अन प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू 08/07/2008 - 01:45
नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वावावावा! फार आवडले. (बालक)बेसनलाडू

ऋषिकेश 09/07/2008 - 18:47
प्राजु, बेला, चतुरंग, चित्रा, शितल आणि कौस्तुभ सार्‍यांचे आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
कोरड्या हृदयात माझ्या बरसून जा रे पावसा एकट्या वाटेत माझ्या हरवून जा रे पावसा वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हासतो फसवा अन मी मनातच रडतो किती शुष्क या वैराण नयना भिजवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वाटतो तु मित्र कोणा, कोणास तुची देव रे सार्‍यांस सारे देउनीही कमवून जा रे पावसा चिंब हे करसी असे प्रत्येक तु या मानसी भिजण्यास परतूनी यायचे ठरवून जा रे पावसा -ऋषिकेश

पाहिले मी !

कौस्तुभ ·

विसोबा खेचर 04/07/2008 - 16:53
एक उच्च दर्जाची कविता वाचल्याचा आनंद वाटला...! अतिशय सुंदर.. धन्यवाद कौस्तुभराव! तात्या.

सुचेल तसं 05/07/2008 - 11:33
कौस्तुभ, अर्थपुर्ण कविता. लगे रहो........ -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com

चतुरंग 06/07/2008 - 20:52
अतिशय आशयपूर्ण कविता. पहिलं आणि शेवटचं कडवं तर उच्च झालं आहे. मनातली अस्वस्थता इतक्या प्रभावी शब्दात मांडणार्‍या तुझ्या काव्यप्रतिभेला सलाम! चतुरंग

कौस्तुभ 07/07/2008 - 09:23
ह्रषिकेश,मदनबाण,श्रीकृष्ण सामंत,चतुरंग,शितल सर्वांचे आभार!

विसोबा खेचर 04/07/2008 - 16:53
एक उच्च दर्जाची कविता वाचल्याचा आनंद वाटला...! अतिशय सुंदर.. धन्यवाद कौस्तुभराव! तात्या.

सुचेल तसं 05/07/2008 - 11:33
कौस्तुभ, अर्थपुर्ण कविता. लगे रहो........ -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com

चतुरंग 06/07/2008 - 20:52
अतिशय आशयपूर्ण कविता. पहिलं आणि शेवटचं कडवं तर उच्च झालं आहे. मनातली अस्वस्थता इतक्या प्रभावी शब्दात मांडणार्‍या तुझ्या काव्यप्रतिभेला सलाम! चतुरंग

कौस्तुभ 07/07/2008 - 09:23
ह्रषिकेश,मदनबाण,श्रीकृष्ण सामंत,चतुरंग,शितल सर्वांचे आभार!
पाहिले मी पाचोळ्याला फांद्याना लटकून रडताना,जगताना तर कधी फुलण्या‌आधी कळी गळून पडताना ऐन बहरात फुलांचा रंग उडून जाताना अन कुठे सुरकुतल्या देहातूनही उरला गंध ओवळून टाकताना पाहिले मी डेरेदार वृक्षाखाली सावली हरवून जाताना तर कुठे इवल्या रोपाखाली वारूळ उभे रहाताना वादळाशी झूंज देत इतिहास नवा रचताना तर कुणी अलवार झूळकीसरशी मुळासकट पडताना पाहिले मी देवळात दगडावर अभीषेक दुधाचा होताना तर कधी भीकार रस्त्यावर पत्थरात अन्कुर उद्याचा फुटताना खडकाळ बंजर जमीनीवर नांगर (प्र)यत्नाचा फिरताना तर कुठे नर्मदेच्या तीरावर गोट्यांचे पीक येताना पाहिले मी हिमालयाला नतमस्तक धरेसमोर होताना तर कधी इवल्या शीळेला मिज

(...मी खरा की तू खरा?)

चतुरंग ·

केशवसुमार 03/07/2008 - 02:07
रंगाशेठ एकदम झकास विडंबन.. सगळ्याच द्विपदी आवडल्या.. (सध्याचा बॉस) केशवसुमार स्वगतः मी खरा की तो खरा ?

बेसनलाडू 03/07/2008 - 04:02
आवडले;पण काही द्विपदी संदिग्ध वाटल्या.अर्थाच्या दृष्टीने गझल,विडंबन किंवा कोणतेही काव्य - जितके स्पष्ट,सहज तितके जास्त अपीलिंग :) विडंबन बाकी ओघवते झाले आहे.शब्दरचनेत कोठेही ओढाताण नाही,लय सांभाळली आहे.कार्यालयीन स्लँग्जचा वापर आणि एकंदर वातावरणनिर्मिती विशेष वाटली. कीप इट् अप् (कामगार)बेसनलाडू

विसोबा खेचर 03/07/2008 - 08:36
बरळ तू सोईप्रमाणे जे तुला बरळायचे... 'बाटली' सांगेल प्यारी - मी खरा की तू खरा ! रंगा, हे मस्त! :)

केशवसुमार 03/07/2008 - 02:07
रंगाशेठ एकदम झकास विडंबन.. सगळ्याच द्विपदी आवडल्या.. (सध्याचा बॉस) केशवसुमार स्वगतः मी खरा की तो खरा ?

बेसनलाडू 03/07/2008 - 04:02
आवडले;पण काही द्विपदी संदिग्ध वाटल्या.अर्थाच्या दृष्टीने गझल,विडंबन किंवा कोणतेही काव्य - जितके स्पष्ट,सहज तितके जास्त अपीलिंग :) विडंबन बाकी ओघवते झाले आहे.शब्दरचनेत कोठेही ओढाताण नाही,लय सांभाळली आहे.कार्यालयीन स्लँग्जचा वापर आणि एकंदर वातावरणनिर्मिती विशेष वाटली. कीप इट् अप् (कामगार)बेसनलाडू

विसोबा खेचर 03/07/2008 - 08:36
बरळ तू सोईप्रमाणे जे तुला बरळायचे... 'बाटली' सांगेल प्यारी - मी खरा की तू खरा ! रंगा, हे मस्त! :)
प्रदीप कुलकर्णी ह्यांची '...मी खरा की तू खरा?' ही अप्रतिम गजल अनेक प्रश्न उभे करुन गेली आणि त्या प्रश्नांना वाचा फुटली ह्या काव्यातून! ........................................ ...मी खरा की तू खरा ? ........................................ बॉस मज माझा विचारी - मी खरा की तू खरा ? ही पुरे झाली 'हुशारी' - मी खरा की तू खरा ? मध्यरात्री काल मी जे काम त्याचे उपसले... आज तो म्हणतो दुपारी - मी खरा की तू खरा ? उत्तराची मेल नाही धाडता आली मला... प्रश्न आला तोच भारी - मी खरा की तू खरा ? शेवटी घोळात मी!

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष,लय,संवाद,जॉनर

भडकमकर मास्तर ·

मनिष 01/07/2008 - 15:51
उदाहरणांमुळे जास्त मजा येते आहे. अवांतर - नुकत्याच पाहिलेल्या 'आमीर' मधला क्लायमॅक्स ला प्रोटॆगनिस्टचा अंतर्गत संघर्ष आवडला.

In reply to by मनिष

मे अमीर पाहिलेला नाहीये... 'आमीर' मधला क्लायमॅक्स ला प्रोटॆगनिस्टचा अंतर्गत संघर्ष याबद्दल अजून माहिती द्या... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा 01/07/2008 - 20:15
हा भाग जास्त छान समजला...उदाहरणं जास्त किंवा सोपी असल्याने असेल कदाचित... माझी अशी एच आर इंटर्व्यु साठी तयारी झाली होती ते आठवलं कुठल्याही प्रश्नाला...माझ्यापुढचा प्रॉब्लेम, माझी थॉट प्रोसेस, माझं सोल्युशन आणि त्याचा रिझल्ट असं उत्तर द्यावं लागायचं...एक्दम तस्संच वाटलं मला... पु ले शु... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर 02/07/2008 - 08:17
हा लेख पण लै भारी वाटला! मास्तर, तुमचा या विषयातला व्यासंग पाहून अंमळ थक्क व्हायला होतं! आपला, (नाट्यप्रेमी) तात्या.

आमच्या काही आवडत्या वेबसाईट्स..... १.playwriting seminars खूप मोठी साईट आहे ही.... http://www.vcu.edu/arts/playwriting/seminar.html २.होतकरू पटकथालेखकांसाठी http://www.toronto-filmmaking.com/screenwriting.html ३.पटकथालेखनासाठी काही टिप्स .by Billy Wilder http://www.writingclasses.com/InformationPages/index.php/PageID/270 ४.Emotional plots and suspense plots...भावकथा आणि गूढकथा (?) जोडीनं येतात इथे.... http://www.vcu.edu/arts/playwriting/plot.html ५.नाट्यलेखनाची मूलभूत तत्त्वे...by Charles Deemer http://www.geocities.com/cdeemer/Play.htm ६. आणि सबसे बढिया... लायोस ( की लाजोस) एग्रि भाऊचे पुस्तक...सर्जनशील लेखनाची कला. हे पुस्तक एफ्टीआयाय मध्ये लेखक मंडळी पाठ्यपुस्तकासारखे वापरतात, असे ऐकले. मला संपूर्ण इ बुक नाही सापडले पण या नोट्स सापडल्या..... भन्नाट प्रकार आहे... Lajos egri's book art of creative writing... http://www.darkcloudpress.com/%5Cblog_files%5Cegri_notes.pdf ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लय (rhythm) गोष्टीला किंवा नाटकाला एक लय असते.प्रत्येक गोष्टीला लय असते. आपल्या आयुष्यात सुद्धा काही दिवस सावकाश जाणारे, कंटाळवाणे असतात तर काही घटनांनी भरलेले वेगवान असतात... लय सगळीकडेच असते. ..., गाण्यांमध्ये / संगीतात / नृत्यनाट्यात तर असतेच पण संवादांमध्ये , नेपथ्य आणि पात्रांच्या हालचालीमध्ये सुद्धा असते...रेसमध्ये धावणार्‍या घोड्याला स्वत:ची लय असते आणि सर्व धावणार्‍या घोड्यांची मिळून एक लय असते.... तेंडुलकर म्हणतात," अननुभवी लेखक लयीसाठी दिग्दर्शकावर अवलंबून असतो"...विशेषत: कादंबरीचे नाट्यरूपांतर किंवा सिनेरूपांतर करताना ती लय टिकवणं मुश्किल..... किंवा "वाडा चिरेबंदी त्रिनाट्याचे एकच नाटक करायचा एक प्रयत्न झाला, त्यात लय सांभाळणे अवघड जाते " मला स्वत:ला खूप पूर्वी वाचलेली आनंदाचं झाड कादंबरी आवडलेली होती पण चित्रपट अगदीच सुमार वाटला. घटनांसंदर्भात बोलायचं तर ही लयच वेगवान घटना आणि व्यक्तिरेखांची खोली यामधला तोल सांभाळणार असते. हॊरिझॊंटल ऎक्शन गोष्ट पुढे नेते. घटना घडवते. व्हर्टिकल ऎक्शन वेग कमी करते. व्यक्तिरेखांमधलं मानसिक चिंतन दर्शवते. ( आंतरिक अंतर्गत संघर्ष) गोष्टीतले अनेक पदर उलगडून दाखवते. या दोन्ही ऎक्शन आणि त्यातला तोल साधणं गोष्टीसाठी आवश्यक ... मारधाडपटात जास्त हॊरिझॊंटल ऎक्शन असते. चेकॊव्हच्या नाटकात व्हर्टिकल ऎक्शन जास्त असते. _____________________-- त्यामुळे उत्तम पटकथेत भांडण / मारामारीच्या सीननंतर लगेचच पुन्हा मारामारी नसते.... मग शांतता...प्रेमाचे दृश्य / किंवा फ्लॅशबॅक जुन्या आठवणी / गाणी / मानसिक चिंतन वगैरे... हा सारा लयीचा भाग आहे. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

संवादलेखन १. व्यक्तिरेखेच्या मनातलं जसंच्या तसं लिहू नये.. आपण रोजच्या आयुष्यात तरी कुठे अगदी खरं मनातलं बोलत असतो ? त्यांना उपरोधाने बोलूदेत, कधी खोटंसुद्धा बोलूदेत..कधी अडखळत, थट्टा करत,कधी कॊमेंट पास करत , टोमणे मारत संवाद पुढे सरकायला हवा. पात्राच्या मनात काय आहे हे अप्रत्यक्षपणे समजलं तर संवाद बरा चाललाय असं समजावं... २. कधीकधी काही अस्वस्थ हालचाली , वागण्याच्या पद्धती असतात ज्या पात्राच्या मनात काय चाललंय ते दर्शवतात.अशा छोट्याछोट्या हालचाली शोधून काढून त्यात्या प्रसंगात पात्रांना चिकटवाव्या लागतात. ( पात्रांची शारीरिक जडणघडण इथे उपयोगी पडते) ३. आपण स्वत:सुद्धा बर्‍याचदा मनातल्या मनात संवाद तयार करत असतो. पार्टीत किंवा गप्पा मारताना आपल्याला कधी मस्त कॊमेंट सुचते आणि बोलायची राहून जाते, मग आपण संवाद तयार करत राहतो की तो जर असं बोलला असता तर मी मग असं बोललो असतो वगैरे... ४.विशेषत: एकांकिकांसाठी संवाद छोटे हवेत.वेगवान हवेत. छोटे म्हणजे किती छोटे ? एका भाषणात एकच कल्पना. (one idea per speech) ५. संवाद लिहिताना संवाद सतत वाचत राहा आणि आता या वाक्यानंतर रंगमंचावर हजर पात्रांपैकी कोण यात व्यत्यय आणणार याचा अंदाज घेत घेत पुढे जा. ६. "दाखवा...सांगू नका." हे सर्वात महत्त्वाचं.. उदा. ती हुशार मुलगी आहे असं कोणी सांगण्यापेक्षा ते प्रसंगातून दिसूद्या. ७. कथेच्या रूपांतरामध्ये सूत्रधार गोष्ट सांगतो अशा युक्त्या शक्यतो वापरू नयेत. ( ती एक पळवाट आहे असं माझं वैयक्तिक मत) ८. बर्‍याचदा दोन ( विरुद्ध स्वभावाच्या सुद्धा) पात्रांच्या तोंडून लेखक स्वतःच बोलतो आहे असा भास होतो... कौशल्याचा भाग हाच की पात्रे जीवंत होण्यासाठी संवाद त्यांचे स्वतःचे वाटले पाहिजेत... त्याच व्यक्तिरेखा बोलताहेत असं वाटलं पाहिजे.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हा माझा सध्याचा आवडता सिनेमा. गंमत म्हणजे ही सगळी सूत्रं त्याला चपखल लावून दाखवता येतात. पूर्वपक्ष? जशास तसे! हे सूत्र सगळ्या सिनेमात कुठेही उच्चारलं जात नाही. उलट चिरोंजीलाल अमेरिकेत निघून जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला या प्रकरणात अज्याबात गुंतायचं नाही आहे, मग सूड-बिड तर दूरच राहिला. ते सभ्यपणे पोलिसांकडेही जाऊन पाहतात, पण तिथेही काही डाळ शिजत नाही. मग नाईलाज म्हणून म्हणा, योगायोगानं तो दलाल भेटतो म्हणून म्हणा, थोडी खुमखुमी असल्यामुळे म्हणा - मंडळी या अचाट प्लॅनमधे सामील होतात आणि बघता बघता गोष्ट वेग घेते. प्रमुख व्यक्तिरेखा - यातली सगळ्यांत लोभसवाणी आणि खरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे ती अनुपम खेरची. फसवणूक त्याची झालीय. या सगळ्या अव्यापारेषु व्यापारातून त्याला पैसे आणि घर तर मिळतंच. पण त्याचं हातून निसटणारं कुटुंबही अनपेक्षितपणे परत मिळून जातं. या प्रवासातून दिसणारा-घडणारा टिपिकल मध्यमवर्गीय, पापभीरू, कुटुंबवत्सल, नेक बाप अक्षरशः लाजवाब आहे. तो असतो पार्श्वभूमीला. सतत मोडता घालत, चिडत-वैतागत-खंतावत. पण ही गोष्ट त्याचीच. पोरगा मोठ्या कंपनीत आहे असं अभिमानानं कुणालाही सांगणं काय, किंवा 'इसके साथ कुछ चटनी वगैरा है क्या?' असं पिझ्झा पाहून वैतागानं विचारणं काय! त्याला त्याचा इतिहास-भूगोल आहे आणि तो नेमका दिसत राहतो. हेच इथल्या सगळ्या व्यक्तिरेखांना लागू होतं. भलेही चार फ्रेमकरता का पात्र पडद्यावर येईना, ते सकाळी चहा पीत असेल, की कॉफी हे अचूक सांगता येईल, इतकी स्पष्ट माणसं आहेत ही. त्यांच्या कपडे घालण्याच्या, खाण्या-पिण्याच्या पद्धती (बोमन इराणीचं नि:संकोचपणे आपल्याच घराच्या आवारात जरा लांब जाऊन लघवी करणं!), त्यांची भाषा (मेघनाच्या मैत्रिणीनं 'बास्टर्ड' अशी शिवी हासडणं!), त्यांचे मॅनरिझम्स (सतत घायकुतीला आलेला काहीसा नर्व्हस असा बापूंचा सेक्रेटरी)... आहाहा! संघर्ष - खोसला कुटुंब आणि बोमन इराणीचं पात्र (नाव विसरले!) यांच्यातला हा संघर्ष असं ढोबळ मानानं म्हणता येईल. पण तो बाह्य संघर्ष झाला. खरा संघर्ष अनुपम खेरचा. कुटुंबाशी, नव्या मूल्यव्यवस्थेशी आणि स्वत:शी. अशी फसवाफसवी करून पैसे परत मिळवावेत की न मिळवावेत, या त्याच्या 'भवति न भवति'मधून तो अचूक दिसत राहतो. तो पोरांवर चिडल्यासारखं करतो, पण पोटातून मात्र सुखावलेला. काळजी आणि कौतुक करणारा. तरी चिरोंजीलाल पैसे घेऊन आल्यावर त्याला पुरेसा आणि निर्भेळ आनंदही होत नाही. मासिक वाचल्याचं नाटक करत तो आपला व्हरांड्यातच. आपली प्रतिक्रिया नक्की काय असली पाहिजे, या संभ्रमात. हाच तो मास्तर म्हणत असलेला अंतर्गत संघर्ष असेल का? संवाद - 'हम आपके' मधे सुरुवातीला आलोकनाथ आणि कुणाचातरी एक संवाद आहे. कसला विनोदी आहे तो! तुम्ही भाऊ वारल्यावर पुतण्यांना कसं सांभाळलंत आणि त्यासाठी लग्न टाळलंत, तुम्ही किती थोर, असं आलोकनाथलाच सांगण्यात येतं! अरे, त्याला माहीत नाही का हे? ही कुठली निर्बुद्ध पद्धत पात्राची पार्श्वभूमी सांगायची? असो. असले आचरट संवाद 'खोसला..'मधे नाहीत. त्यातली सगळी माणसं आपापली, आपल्या वयाला-पेशाला-संस्कारांना साजेशी भाषा बोलतात. बिनदिक्कत (आणि गरज पडेल - नाईलाज होईल तेव्हाच!) शिव्या देतात. उगीचच्या उगीच भाषणं न झोडता एखाद्याच लुकनं आपलं म्हणणं स्पष्ट करतात. (चिरोंजीची बहीण अनुपम खेरला कसले खतरनाक लुक्स देत असते सतत! 'बाबा म्हणजे ना... ' असं कौतुक कम वैताग सरळ वाचता येतो त्यात.) लय - आधी काहीशी संथ आहे गोष्ट. सगळ्या माणसांशी पुरेशी ओळख होते आपली. सगळ्यांची गोची - स्वभाव - अडचणी - एकात एक गुंतलेल्या तंगड्या... सगळं स्पष्ट होतं. आणि मग सुरुवातीला मंद हुंकार देणार्‍या बाईनं हळूहळू अंगात येऊन जोरदार भीतीप्रद घुमायला सुरुवात करावी, तशी गोष्ट वेग घेत जाते! पेहेलवान, पोलीस, नाटक मंडळी, फिशरी जमिनीवरचं नाटक... अशा चढत्या क्रमानं गोष्टी घडत जातात. ही मास्तरांची हॉरिझॉण्टल लय असावी बहुधा. पण पार्श्वभूमीला त्याला आडवा छेद देत, अनुपम खेरची चलबिचल सदसद्विवेकबुद्धी असतेच. ती खरी गंमत! मास्तर, बरोबर आहे का हो?

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष 02/07/2008 - 11:00
'खोसला का घोसला' खरच छान आहे. ते व्हर्टिकल/हॉरिझॉण्टल माहित नाही. पण व्यक्तिरेखा फारच सुरेख लिहिल्यात आणि अभिनेत्यांनी त्याला मस्तच न्याय दिलाय. अनुपम खेर -- केवळ अशक्य!! अभिनयाचा वस्तुपाठ म्हणा ना...ते दारू घेऊन येतांना त्याचे चालणे? वा!!!

In reply to by मेघना भुस्कुटे

जशास तसे! हे सूत्र सगळ्या सिनेमात कुठेही उच्चारलं जात नाही. परफेक्ट...पूर्वपक्ष डायरेक्ट न सांगता आपोआप कळायला हवा... ते इथे एकदम जमतेच... ते सकाळी चहा पीत असेल, की कॉफी हे अचूक सांगता येईल, इतकी स्पष्ट माणसं आहेत ही. ...........आपली प्रतिक्रिया नक्की काय असली पाहिजे, या संभ्रमात. हाच तो मास्तर म्हणत असलेला अंतर्गत संघर्ष असेल का? एकदम सहमत. त्यातली सगळी माणसं आपापली, आपल्या वयाला-पेशाला-संस्कारांना साजेशी भाषा बोलतात आणि बापूचे ते पैसे पाहून घाबरून परत येणं, आणि अनुपमला सॉरी म्हणणं...आणि इतर सगळे बापूवर वैतागलेले असताना अनुपमने येऊन सांत्वन करणं.हा एक अप्रतिम सीन आहे... मग सुरुवातीला मंद हुंकार देणार्‍या बाईनं हळूहळू अंगात येऊन जोरदार भीतीप्रद घुमायला सुरुवात करावी, तशी गोष्ट वेग घेत जाते हे एकदम मस्त .. अनुपम खेरची चलबिचल सदसद्विवेकबुद्धी असतेच. ती खरी गंमत!... एकदम पटले.... ही व्हर्टिकल ऍक्शन.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मेघना भुस्कुटे

वरदा 02/07/2008 - 20:36
सॉलीड अभ्यास केलायस गं....माझा पण हा सगळ्यात लाडका सिनेमा.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by मेघना भुस्कुटे

महेश हतोळकर 02/07/2008 - 23:31
मेघना म्हणाल्या ते मनापासून पटले. उगीच संवाद बोलून पात्राच्या आडून प्रेक्षकांना त्याच पात्राची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न अगदीच हास्यास्पद होता. मास्तरांच्याच शिकवणीवरून वरील प्रसंग बदलण्याचा प्रयत्न. बघा कसा वाटतो ते. (अलोकनाथ व अजीत वाच्छानी अलोकनाथच्या दिवाणखान्यात बसले आहेत. अलोकनाथच्या मागे भिंतीवर त्याच्या भाऊ-भावजयीचा फोटो टांगला आहे.) अजीत वाच्छानी: भाईसहाब अब राजेश की शादी का दिल पे ले ही लिजीये| अलोकनाथ: हां भाईसहाब, (फोटोकडे निर्देश करून) भय्या भाभी की अशिर्वादसे राजेश बिजीनेसको अच्छी तरहसे संभाल रहा है| अब प्रेम भी MBA खत्म करके उसके साथ जुड जायेगा| आपकी नजरमे कोई लडकी हो तो बताईये| (एवढ्यात प्रेम येतो. तो खूप आनंदात आहे.) प्रेमः (दोघांच्या पाया पडून). प्रणाम चाचाजी| प्रणाम मामाजी| अजीत वाच्छानी: भाईसहाब लगता है प्रेम का Result उम्मीद के मुताबिक निकला है| क्यों बेटा? प्रेमः हा मामाजी! मै अव्वल आया| अजीत वाच्छानी: भई व्वा! कृपया हिंदी कडे थोडे दुर्लक्ष करा. खूप चिंध्या केल्या आहेत

In reply to by महेश हतोळकर

...मस्त रे "मी " खूप छान प्रयत्न... ... किंवा "शो डोंन्ट टेल "...पद्धतीने हे सारे अत्यंत कमी किंवा शून्य संवादात दाखवताही आले असते.... .... (आलोकनाथ मोहनीश बहलसाठी स्थळं पाहायला म्हणून हातात मुलींचे फोटो, पत्रिका आणि माहिती वगैरे घेऊन बसला आहे, त्याचे समोरच्या भाऊ आणि भावजयीच्या फोटोकडे लक्ष जाते ....फोटोवर क्लोज मग आलोकनाथवर क्लोज्...त्याला आठवतं, त्याच्या भावाच्या मृत्यूसमयी दोन घाबरलेली लहान मुलं काकाला बिलगतात आणि हा त्यांना डोळ्यातलं पाणी थोपवत शांत करतो,थोपटतो...पुन्हा आलोकनाथचा चेहरा दिसतो, त्याच्या डोळ्यात अश्रू पण चेहर्‍यावर समाधान...( भावाला दिलेलं त्या पोरांना नीट सांभाळायचं वचन पूर्ण केल्याचं वगैरे समाधान) . शेजारी स्थानिक वर्तमानपत्रात मोहनीशचा यंग बिझिनेसमन ऑफ द इयर वगैरे पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो आहे, त्या फोटोकडं तो अभिमानानं पाहतो आणि साधारण पसंत असलेल्या मुलीचा फोटो त्याच्याशेजारी धरतो, नापसंत करतो, असं दोन तीन वेळा होतानाच प्रेम आलेला आहे...).... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

वरदा 03/07/2008 - 00:32
मस्तच आहे मास्तर्....मला आवडली ही आयडीया एक्दम्.... "मी" ची पण आयडीया आवडली... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

तुमच्या नाट्यलेखन तंत्राचे सगळे दुवे एकमेकांना जोडाल का? उदा. भाग २ च्या लेखाखाली भाग १ आणि भाग ३ चे दुवे ! तुमच्या नाट्यलेखन तंत्राचे सगळे दुवे एकमेकांना जोडाल का? आता तसे केले आहे. -- जनरल डायर. -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

In reply to by संदीप चित्रे

भाग एक http://www.misalpav.com/node/2344 भाग दोन.. http://www.misalpav.com/node/2347 आता तसे केले आहे. -- जनरल डायर. धन्यवाद डायरसाहेब... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दामिनी... कथासार : दामिनी (मीनाक्षी शेषाद्री) या गरीब मुलीचे ऋषी कपूरच्या श्रीमंत घरात लग्न होते, तिथल्या तरूण मोलकरणीवरती बलात्कार करताना आपल्या दिराला आणि त्याच्या काही मित्रांना दामिनी पाहते आणि कोर्टात सत्य बोलून गुन्हेगारांविरुद्ध साक्ष देते,( यात ती तिचा पती आणि सासरच्यांचा रोष ओढवून घेते) मात्र तिला कोर्टात वेडं ठरवलं जातं, घरातून हाकलून वेड्यांच्या इस्पितळात पाठवलं जातं.. तरीही ती तिथून पळून जाऊन सनी देओल या एका हुषार वकिलाच्या मदतीनं त्या मोलकरणीला न्याय मिळवून देते... पूर्वपक्ष जे सत्य आहे, ते कोणत्याही अडचणींशी लढून विजय मिळवतंच... प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत. १.भावना (character) : सत्य २.संघर्ष (conflict ) : संकटं , अडचणी ३.निराकरण / गोष्टीचे ध्येय. (goal / resolution) विजय मिळवतं.. म्हणजे काय तर दामिनी सनी मिळून सत्यासाठी अमरीष आणि सासरा यांनी उभ्या केलेल्या संकटावर मात करून न्याय मिळवतात. प्रमुख व्यक्तिरेखा १. दामिनी. (प्रोटॆगनिस्ट )सरळमार्गी, संस्कारी मोठ्या श्रीमंत घरात अचानक येऊन पडल्यावर मोलकरणीवरचा अत्याचार पाहते...खरं बोलण्यासाठी नवर्याचेही मन वळवू पाहते...पण कितीही संकटं आली तरी सत्याचीच बाजू घेते. २. ऋषी कपूर : द्विधा मनस्थितीत, न्याय आणि सत्य महत्त्वाचं की कुटुंब...? ३.अमरीष पुरी (ऎंटागनिस्ट): आरोपीचा महापाताळयंत्री वकील, याच्याकडे सर्व संकटांवरचे कायदेशीर (आणि इतरही) उपाय असतात. ४.सनी देओल : सर्वात भावखाऊ रोल.... पत्नीला न्याय मिळवून न देऊ शकलेला एक वैफ़ल्यग्रस्त, व्यसनी वकील पण दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न, ( हुशारी आणि मारामार्या दोन्हीही) करतो. ( बाकी मंडळीसुद्धा उत्तम ... सासू सासरे, ती सुटेल अशा समजुतीने खोटी साक्ष द्यायला तयार झालेले तिचे अगतिक वडील, परेश रावल,इन्स्पेक्टर कदम, तिच्या बहिणीचा मिमिक्रीवाला नवरा मस्त)... संघर्ष कोअर कॊन्फ़्लिक्ट सांगायचा तर सत्य विरुद्ध असत्य असा सनातन संघर्ष... बाह्य संघर्ष : दामिनीचं सत्य आणि तिच्या सासरकडचे लोक + अमरीष यांचं असत्य यांचा संघर्ष. शिवाय सनी आणि अमरीष यांचा संघर्ष आंतरिक संघर्ष : तिचं आणि तिच्या पतीचं नातं ... तो तिला " जाउदे ,विसरून जा" असं सांगतोय आणि ती सत्य आणि न्याय पकडून बसलीय. आणि या दोघांचाही अंतर्गत आंतरिक संघर्ष असा की नातं महत्त्वाचं की न्याय ? संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स. सूड : ऋषी कपूरशी आपल्या मुलीचे लग्न लावू इच्छिणारा एक उयोगपती सूड घेण्याच्या इच्छेने ( आणि ती वेडी झाली की आपल्या मुलीचे पुन्हा ऋषीशी लग्न करून देण्याच्या इच्छेने) दामिनीविरुद्ध अमरीषला मदत करतो. संकट : दामिनीविरुद्ध अनेक संकटे पाठलाग : तिच्या मागे पळणारे गुंड. प्रेम : पतीकडून पूर्वी मिळालेले प्रेम. फ़सवणूक : तिच्या भोळ्या बापाला खोटं सांगून तिच्याविरुद्ध खोटी साक्ष वदवून घेतात. छळ :वेड्यांच्या इस्पितळात तिला शॊक देतात. वाढता संघर्ष : सुरुवातीला तिला धमक्या, मग कोर्टात तिला वेडं ठरवून इस्पितळात, तिथे शॊक देतात... ती पळून सनीच्या आश्रयाला जाते... मग अटक करायला पोलीस पाठवतात ( सनीने अटकपूर्व जामीन घेतलेला असतो),गुंड पाठवतात ( सनी तुफ़ान मारामारी करतो)... अगदी शेवटी कोर्टात पोचायच्या वेळी तिच्यावर खुनी हल्ला होतो... तेव्हा पळतापळता एके क्षणी एका इमारतीच्या बांधकामाजवळ येऊन पोचते, ती हातात टिकाव घेऊन उलटी फ़िरते आणि गुंडानाच आव्हान देते... हे पाहून इमारतीतील बांधकामावरचे मजूर दगडाविटांच्या मार्याने गुंडांना पळवून लावतात..( हे दृश्य अप्रतिम आहे)... इकडे सनी अमरीषच्या वकिली डावपेचांना "तारीख पे तारीख .."चं भाषण करून वेळ काढतोय... :) .. मग ती नाट्यमयरित्या पोचते आणि साक्ष देते...( आरोपीच्या वकिलाला लै बोल लावते)..हा उत्कर्षबिंदू...पुढे फ़ॊलिंग ऎक्शन ... मग तिचा नवराही येऊन तिच्या बाजूने साक्ष देतो...कोर्टाचा निकाल... ती खुश...नवरा परत तिच्याबाजूने मिळाला.. या प्रत्येक रायजिंग कॊन्फ़्लिक्ट ( वाढत्या संघर्षा) च्या मुद्द्याला प्रेरणा ध्येय अडचणी आणि कृती यांचा संदर्भ देता येतो... संवाद पात्रे आपापले संवाद बोलतात.... अत्यंत स्टाईलाईज्ड अमरीष आणि सनी.. मजा येते. दामिनी आणि तिचे वडील साधं बोलतात.... ऋषीचं पात्र दोन्ही बाजू समजून घेत मध्यम बोलत राहतं... अमरीष अणि विशेषत: सनीचे संवाद अप्रतिम / अजरामर वगैरे :) ... "ये ढाई किलोका हाथ जब पडता है तो आदमी उठता नही उठ जाता है" किंवा इन्स्पेक्टरला " एक कागजका टुकडा मेरे पास भी है" " कदम संभलकर चल कदम" किंवा शेवटचा " तारीख पे तारीख.." संवाद. लय सुरुवातीला व्यक्तिरेखा कळेपर्यंत सावकाश.. गाणी ( बिन साजन झूला झूलूं, जबसे तुमको देखा है सनम)..वगैरे... ऋषीचं तिला मागणी घालणं , प्रेम...पण एकदा लग्नानंतर ती सासरी आल्यावर होळीच्या त्या दिवसानंतर घटना वेगात घडतात...हॊरिझोंटल ऎक्शन... त्यात तिचं आणि ऋषीचं मानसिक द्वंद्व.. तिथे व्हर्टिकल ऎक्शन.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मनिष 03/07/2008 - 12:29
मला पटकथा, प्रिमाईस आवडले तरी प्रत्यक्ष सिनेमा फार भडक/लाऊड वाटला होता.... सनीचा रोल तर फारच...नंतर एकदा चॅनेल सर्फ करतांना एका साऊथ च्या सिनेमात (नाव माहित नाही) तस्सच हात करून बोलणार वकिल पाहिला...फारच विनोदी वाटलं ते सगळ. त्यापेक्षा ऋषी कपूर चा अभिनय आवडला (ह्याला खरं तर कोणी नीट वापरला नाही, बराच चांगला अभिनेता अहे, फक्त फार फालतू रोल मधे अडकला)...त्याने त्याचे ते "दु:ख तो इस बात का है दामिनी, की तुम्हारे लिये मुझस, हम दोनोसे जरुरी कुछ और हे" अशा अर्थाच्या संवादाच्यावेळी द्विधा होणे किंवा व्याकूळ होणे खूपच चांगले दाखवले ... एकूणात मला "व्हर्टिकल ऍक्शन", "हॉरिझाँटल ऍक्शन" पेक्षा जास्त आवडते असे वाटते! - ( "व्हर्टिकल ऍक्शन" प्रेमी) मनिष

In reply to by मनिष

सनी देओल इतका परिणामकारक वाटलाय तो निव्वळ त्या स्क्रिप्ट आणि संवादांमुळे. एरवी तो कसला! ऋषी कपूर मलापण फार आवडतो यातला. त्याच्या ऑफीसातला एक सीन आहे ना, त्याचा कुणीतरी एम्प्लॉयी काहीतरी क्षुल्लक खोटं सांगतो त्याला, आणि ऋषी कपूर वेडावाकडा भडकतो. 'हम झूठ क्यों बोलते हैं यार?' हा त्याचा सवाल स्वतःलाच. कसला हताश वाटतो तो तेव्हा. तसाच त्याचा संताप. अमरिश पुरीची कॉलर धरून त्याला मधे न पडण्याबद्दल बजावताना काय बोललीय त्याची नजर. सनीला 'ए गोविंद..' म्हणून धमकावतानाचा त्याचा उफाळून आलेला संताप. काय चूक काय बरोबर, हे कळतं आहे खरं तर. पण चौकटीबाहेर जाऊन कुटुंबाला विरोध करण्याचा धीर नाहीय. ही तगमग आणि त्या पार्श्वभूमीवर दामिनीवरचं नितांत प्रेम. सनी त्याच्या पासंगालाही पुरायचा नाही.

In reply to by मनिष

हो, कोर्टात तिला वेडं ठरवताना तर सिनेमा एकदम मद्रासी टाईपचा भडक होतो... (९४ साली एका फॅमिली गेदरिंगला कोणती व्हिडीओ कॅसेट बघायला आणावी , या विचारात असताना सर्व लहानांनी मोठ्यांच्या मनावर भडक सिनेमामुळे वाईट परिणाम नकोत म्हणून हा सिनेमा आणायचे कॅन्सल केले होते...) :) .. आणि ऋषीचं काम फार छान आहे सिनेमात फक्त त्याला टाळ्या शिट्यांचे संवाद नाहीत इतकेच...( सनी फक्त स्क्रिप्ट + संवादावर मारून नेतो गोष्टी)... ते तारीख पे तारीख असं म्हणत जजवर ओरडणं मला अंमळ विनोदी वाटलं होतं... आणि ऋषीशी सनीची काही तुलनाच नाही हेही खरेच... :) असतात काही माणसं नशीबवान... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

१. आपल्या सर्व व्यक्तिरेखा नीट समजून घ्या... त्यांची सारी पार्श्वभूमी आणि विशिष्ट वागण्याची कारणमीमांसा ,प्रेरणा तयार असूद्या. २.नायक आणि खलनायक त्या सार्या व्यक्तिरेखामध्ये न तुटणारं एक नातं तयार होऊद्यात.का? अन्ब्रेकेबल बाँड का? तर ही विरुद्ध स्वभावाची मंडळी गोष्टीत एकमेकांशिवाय राहू शकायला नाही पाहिजेत. ... इंट्रेस्ट गुंतले नाहीत तर लोक सोडून जातील ना एकमेकांना.... ३. आपल्या गोष्टीची थीम ठरवा, मुख्य पात्राचं ध्येय काय ते ठरवा.... तुम्हाला काय सांगायचंय ? प्रीमाईस ४. मुख्य व्यक्तिरेखेकडे असा एखादा गुण किंवा एखादा विशिष्ट स्वभावविशेष हवा... विशिष्ट बाबतीत थोडासा चक्रम वाटणारा,शंभर टक्के अतिरेकी टोकाचा विचार हवा..( १०० % कंपल्सिव्ह ट्रेट).. आता दामिनीच्या उदाहरणात बघा... ती सत्य आणि न्यायासाठी इतकी टोकाला जाते, नवर्‍यापासून सगळ्यांशी लढते...आता एवढं काय गरज होती का करायची? पण नाही... चक्रमपणा असलेली माणसं काहीतरी करून दाखवतात...म्हणून उत्तम गोष्टीतलं पात्र विशिष्ट् बाबतीत चक्रम असतं... ५.आणि त्याच्या त्या विशिष्ट चक्रमपणामुळंच तो काही प्रसंगात संकटात अडकलाय.. इथे संघर्ष सुरू. ६.त्याच्या अशा स्वभाववैशिष्ट्यामुळं तो अधिकाधिक संकटात , अडचणीत सापडतो.... आणि अस्तित्त्वासाठी, जगण्यासाठी संघर्षात पडावंच लागतं.. अधिकाधिक गुंतत जावं लागतं...अधिकाधिक नाट्यमय घटना...व्यक्तिरेखा अधिकाधिक संकटात... ७. त्यातून बाहेर पडत पडत उत्कर्षबिंदू...आता माघार नाही... ८.उत्कर्ष निराकरण...त्यातूनच प्रेमाईस ची सत्यता व्यक्तिरेखांना आणि प्रेक्षकांना कळते...(काय धडा घेतला... काय शिकवण मिळाली??) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज 03/07/2008 - 17:55
मास्तर तीनही भाग, उदाहरणे, प्रतिसाद अतिशय वाचनीय.

मुक्तसुनीत 04/07/2008 - 01:55
आताच तीन्ही भाग वाचले. प्रचंड आवडले !! भुस्कुटे , मनिष आणि इतरांचे प्रतिसाद खूप एंजॉय केले ! भडकमकर, तुमच्याबरोबर एखादे नाटक पहायला आवडेल बुवा ! :-)

In reply to by मुक्तसुनीत

आताच तीन्ही भाग वाचले. प्रचंड आवडले !! भुस्कुटे , मनिष आणि इतरांचे प्रतिसाद खूप एंजॉय केले !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

genre याचा उच्चार बरेच जण जॉनर / जॉन्रा / जॅनर असा करताना ऐकले आहेत..मी सध्या जॉनर म्हणतो...ते काही फ़ारसे महत्त्वाचे नाही ... मी याला लेखनप्रकार , लेखन शैली म्हणेन... (अधिक चांगला प्रतिशब्द कोणीतरी देइलच..) उदा. सामाजिक, थरार, गूढ, फ़ॆंटसी, कॊमेडी, प्रेमकथा वगैरे वगैरे... आता थेट उदाहरणे घेऊ... समजा घटना हीच आहे ... एक मनुष्य त्याच्या मित्राच्या घरात येतो तेव्हा तो मित्र मेलेला आढळतो... आता याच घटनेचे जॊनरप्रमाणे पुढे कथानकाच्या ट्रीटमेंटमध्ये बदल होतात... उदाहरणार्थ... १.सामाजिक नाट्य : या मृत्यूला कोणती सामाजिक कारणं आहेत,जर समजा चोरी साठी हा खून झाला असेल तर गरीबी, बेरोजगारी.. किंवा हार्ट ऎटॆकने गेला असेल तर वेळेत वैद्यकीय सेवा न मिळणे... वगैरे वगैरे... यावर चर्चा... आसवं गाळत स्वगत वगैरे... २.सस्पेन्स.. ( गूढ उकलणे)...मित्र घरात इकडे तिकडे पाहतो, तर त्याला सिगरेटचे थोटूक , कोटचं तुटलेले बटन आणि लायटर सापडतो.. ( मित्र सिगरेट न ओढणारा वगैरे). ३.थरार... ( थ्रिलर).. घड्याळात बाराचे टोले पडतात..बाहेर काहीतरी आवाज होतो आणि खिडकीतून एक काळी आकृती जाताना दिसते... ४.फ़ॆंटसी :यमदूत मेलेल्या मित्राच्या आत्म्याला म्हणतो, " अरेरे, खरंतर या दुसया मित्रालाच मारायचं होतं...चूक झाली... आता काय करायचं?" ५. कॊमेडी.. : तेवढ्यात बेल वाजते,...मित्र घाबरून ते प्रेत लपवायच्या प्रयत्नाला लागतो... त्यातून गोंधळ उडतो... ६. रोमॆंटिक : मित्राच्या निराधार बहिणीला तो भावनिक आधार देतो आणि त्यातून त्यांचं प्रेम फ़ुलतं वगैरे... आता साधारणपणे एकच एक जॆनर नसतो तर त्याची मिश्रणे असतात... उदाहरणार्थ रोमेंटिक कॊमेडी.., सस्पेन्स थ्रिलर... सगळं तसं एकमेकांच्यात गुंतलेलंच असतं... फ़ार वेगळं काढून दाखवता येत नाही असं मला वाटतं... जॊनर हा प्रकार फ़क्त एकूण लेखकाला लिहायला सुरुवात करण्यापूर्वी एक मार्गदर्शक म्हणून असावा, की बाबा आपल्याला काय शैलीत लिहायचंय... एकूण त्या बाबतीत गोंधळ माज्ला की अवघड जातं.. .... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 04/07/2008 - 12:03
भडकमकरांची ही सगळी लेखमाला मला आवडली हे आधीच सांगितले आहे. असे म्हणतात की मोठ्या कलाकृतींमधे बर्‍याचदा , त्या त्या कलेच्या क्षेत्रातील नियम , संकेत मोडल्याचे दिसून येते. विशेषतः चित्रकलेमधे असे वारंवार घडले. (इम्प्रेशनिझम हे एक ठळक उदाहरण.) युलिसिस ही कादंबरी म्हणे प्रसिद्ध झाली तेव्हा "संज्ञाप्रवाही कादंबरी" हा प्रकार जन्माला आला. आपल्याकडील नेमाडे, मर्ढेकर यांची अशी "क्रांतिकारकाची" उदाहरणे आहेतच. माझी भडकमकरना अशी विनंती आहे की त्यानी जे नियम समजावून दिलेत त्याना छेद देणार्‍या नाट्य किंवा सिनेकृतींचाही उल्लेख उदाहरणांसकट करावा. नियम असतात ते मोडण्याकरता , हे चांगल्या अर्थाने खरे करणार्‍या , एकूण कलाप्रकाराची कक्षा वाढवणारे त्यांनी काही पाहिले काय ? असल्यास काय ते जाणून घ्यायला उत्सुक आहे.

In reply to by मुक्तसुनीत

अगदी मनातलं बोललात. परंपरेच्या विरोधात केलेली अर्थपूर्ण आणि अपरिहार्य बंडखोरी परंपरेला अधिक सशक्त करत जाते - बंडखोरीच्या अशा अनेक कड्यांची मिळून समृद्ध परंपरा तयार होत असते... अशा अर्थाचं एक विधान तेंडुलकरांनी कुठेतरी केलेलं आहे, त्याची आठवण झाली. नुकतंच वाचलेलं मनस्विनी लता रवींद्रचं 'सिगारेट्स' आठवतं आहे. या नाटकाला रूढार्थानं कथा नाही. प्रमुख पात्र असंही नक्की नाही. सगळेच आपापल्या परीनं चक्रम आणि चाकोरीतलेही असलेले तरुण. नायक नाही आणि खलनायकही. आपल्या लैंगिक - शारीरिक आणि मानसिकही - गरजांना हे सगळे जण रिऍक्ट होत राहतात. त्यांचे प्रश्न प्रामाणिक आहेत आणि उत्तरं शोधण्याचे प्रयत्न धीट. त्यात कसलाही अभिनिवेश नाही. सोवळेपणाचा आव वा दुटप्पीपणाही नाही. निव्वळ आयुष्याचा एक तुकडा. जिवंत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतात की नाही, त्यांच्या शोधात-लढ्यात ते यशस्वी होतात की नाही, ते सुखी होतात की दु:खी यांतल्या कसल्याही प्रश्नांची आयती उत्तरं मिळत नाहीत. जिथून नाटक सुरू होतं तिथे आणि जिथे संपतं तिथे - बाह्य परिस्थितीत काहीच फरक नाही. पण सगळ्यांच्या शरीरा-मनात काहीतरी घडून गेलं आहे - जे उत्तरं मागणार आहे. कुणी त्याला सामोरं जाईल, कुणी तोंड लपवून पळ काढील... आपापल्या वकुबानुसार. नाटक फक्त आपल्या आयुष्याचा हा एक अस्पर्श भाग आपल्या पुढ्यात आणून टाकतं. जिवंत. कसल्याही रूढ नियमांखेरीज. हे तर प्रायोगिक - त्यामुळे काहीश्या आडबाजूच्या - नाटकाचं उदाहरण झालं. पण मुख्य धारेत राहून 'दिल चाहता है'नं असे कितीतरी नियम मोडले. त्यालाही गोष्ट अशी नव्हतीच. फार तर ओढून ताणून तिला नायकांच्या 'ग्रोइंग अप्'चीही कथा म्हणता आलं असतं. पण त्यातही नायक नव्हताच, खलनायकही. एक आयुष्याचा रसरशीत तुकडा. काही घटना. काही प्रश्न. बस. काही म्हणा, नियम मोडायलाच मज्जा येते! :)

मनिष 01/07/2008 - 15:51
उदाहरणांमुळे जास्त मजा येते आहे. अवांतर - नुकत्याच पाहिलेल्या 'आमीर' मधला क्लायमॅक्स ला प्रोटॆगनिस्टचा अंतर्गत संघर्ष आवडला.

In reply to by मनिष

मे अमीर पाहिलेला नाहीये... 'आमीर' मधला क्लायमॅक्स ला प्रोटॆगनिस्टचा अंतर्गत संघर्ष याबद्दल अजून माहिती द्या... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा 01/07/2008 - 20:15
हा भाग जास्त छान समजला...उदाहरणं जास्त किंवा सोपी असल्याने असेल कदाचित... माझी अशी एच आर इंटर्व्यु साठी तयारी झाली होती ते आठवलं कुठल्याही प्रश्नाला...माझ्यापुढचा प्रॉब्लेम, माझी थॉट प्रोसेस, माझं सोल्युशन आणि त्याचा रिझल्ट असं उत्तर द्यावं लागायचं...एक्दम तस्संच वाटलं मला... पु ले शु... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर 02/07/2008 - 08:17
हा लेख पण लै भारी वाटला! मास्तर, तुमचा या विषयातला व्यासंग पाहून अंमळ थक्क व्हायला होतं! आपला, (नाट्यप्रेमी) तात्या.

आमच्या काही आवडत्या वेबसाईट्स..... १.playwriting seminars खूप मोठी साईट आहे ही.... http://www.vcu.edu/arts/playwriting/seminar.html २.होतकरू पटकथालेखकांसाठी http://www.toronto-filmmaking.com/screenwriting.html ३.पटकथालेखनासाठी काही टिप्स .by Billy Wilder http://www.writingclasses.com/InformationPages/index.php/PageID/270 ४.Emotional plots and suspense plots...भावकथा आणि गूढकथा (?) जोडीनं येतात इथे.... http://www.vcu.edu/arts/playwriting/plot.html ५.नाट्यलेखनाची मूलभूत तत्त्वे...by Charles Deemer http://www.geocities.com/cdeemer/Play.htm ६. आणि सबसे बढिया... लायोस ( की लाजोस) एग्रि भाऊचे पुस्तक...सर्जनशील लेखनाची कला. हे पुस्तक एफ्टीआयाय मध्ये लेखक मंडळी पाठ्यपुस्तकासारखे वापरतात, असे ऐकले. मला संपूर्ण इ बुक नाही सापडले पण या नोट्स सापडल्या..... भन्नाट प्रकार आहे... Lajos egri's book art of creative writing... http://www.darkcloudpress.com/%5Cblog_files%5Cegri_notes.pdf ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लय (rhythm) गोष्टीला किंवा नाटकाला एक लय असते.प्रत्येक गोष्टीला लय असते. आपल्या आयुष्यात सुद्धा काही दिवस सावकाश जाणारे, कंटाळवाणे असतात तर काही घटनांनी भरलेले वेगवान असतात... लय सगळीकडेच असते. ..., गाण्यांमध्ये / संगीतात / नृत्यनाट्यात तर असतेच पण संवादांमध्ये , नेपथ्य आणि पात्रांच्या हालचालीमध्ये सुद्धा असते...रेसमध्ये धावणार्‍या घोड्याला स्वत:ची लय असते आणि सर्व धावणार्‍या घोड्यांची मिळून एक लय असते.... तेंडुलकर म्हणतात," अननुभवी लेखक लयीसाठी दिग्दर्शकावर अवलंबून असतो"...विशेषत: कादंबरीचे नाट्यरूपांतर किंवा सिनेरूपांतर करताना ती लय टिकवणं मुश्किल..... किंवा "वाडा चिरेबंदी त्रिनाट्याचे एकच नाटक करायचा एक प्रयत्न झाला, त्यात लय सांभाळणे अवघड जाते " मला स्वत:ला खूप पूर्वी वाचलेली आनंदाचं झाड कादंबरी आवडलेली होती पण चित्रपट अगदीच सुमार वाटला. घटनांसंदर्भात बोलायचं तर ही लयच वेगवान घटना आणि व्यक्तिरेखांची खोली यामधला तोल सांभाळणार असते. हॊरिझॊंटल ऎक्शन गोष्ट पुढे नेते. घटना घडवते. व्हर्टिकल ऎक्शन वेग कमी करते. व्यक्तिरेखांमधलं मानसिक चिंतन दर्शवते. ( आंतरिक अंतर्गत संघर्ष) गोष्टीतले अनेक पदर उलगडून दाखवते. या दोन्ही ऎक्शन आणि त्यातला तोल साधणं गोष्टीसाठी आवश्यक ... मारधाडपटात जास्त हॊरिझॊंटल ऎक्शन असते. चेकॊव्हच्या नाटकात व्हर्टिकल ऎक्शन जास्त असते. _____________________-- त्यामुळे उत्तम पटकथेत भांडण / मारामारीच्या सीननंतर लगेचच पुन्हा मारामारी नसते.... मग शांतता...प्रेमाचे दृश्य / किंवा फ्लॅशबॅक जुन्या आठवणी / गाणी / मानसिक चिंतन वगैरे... हा सारा लयीचा भाग आहे. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

संवादलेखन १. व्यक्तिरेखेच्या मनातलं जसंच्या तसं लिहू नये.. आपण रोजच्या आयुष्यात तरी कुठे अगदी खरं मनातलं बोलत असतो ? त्यांना उपरोधाने बोलूदेत, कधी खोटंसुद्धा बोलूदेत..कधी अडखळत, थट्टा करत,कधी कॊमेंट पास करत , टोमणे मारत संवाद पुढे सरकायला हवा. पात्राच्या मनात काय आहे हे अप्रत्यक्षपणे समजलं तर संवाद बरा चाललाय असं समजावं... २. कधीकधी काही अस्वस्थ हालचाली , वागण्याच्या पद्धती असतात ज्या पात्राच्या मनात काय चाललंय ते दर्शवतात.अशा छोट्याछोट्या हालचाली शोधून काढून त्यात्या प्रसंगात पात्रांना चिकटवाव्या लागतात. ( पात्रांची शारीरिक जडणघडण इथे उपयोगी पडते) ३. आपण स्वत:सुद्धा बर्‍याचदा मनातल्या मनात संवाद तयार करत असतो. पार्टीत किंवा गप्पा मारताना आपल्याला कधी मस्त कॊमेंट सुचते आणि बोलायची राहून जाते, मग आपण संवाद तयार करत राहतो की तो जर असं बोलला असता तर मी मग असं बोललो असतो वगैरे... ४.विशेषत: एकांकिकांसाठी संवाद छोटे हवेत.वेगवान हवेत. छोटे म्हणजे किती छोटे ? एका भाषणात एकच कल्पना. (one idea per speech) ५. संवाद लिहिताना संवाद सतत वाचत राहा आणि आता या वाक्यानंतर रंगमंचावर हजर पात्रांपैकी कोण यात व्यत्यय आणणार याचा अंदाज घेत घेत पुढे जा. ६. "दाखवा...सांगू नका." हे सर्वात महत्त्वाचं.. उदा. ती हुशार मुलगी आहे असं कोणी सांगण्यापेक्षा ते प्रसंगातून दिसूद्या. ७. कथेच्या रूपांतरामध्ये सूत्रधार गोष्ट सांगतो अशा युक्त्या शक्यतो वापरू नयेत. ( ती एक पळवाट आहे असं माझं वैयक्तिक मत) ८. बर्‍याचदा दोन ( विरुद्ध स्वभावाच्या सुद्धा) पात्रांच्या तोंडून लेखक स्वतःच बोलतो आहे असा भास होतो... कौशल्याचा भाग हाच की पात्रे जीवंत होण्यासाठी संवाद त्यांचे स्वतःचे वाटले पाहिजेत... त्याच व्यक्तिरेखा बोलताहेत असं वाटलं पाहिजे.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हा माझा सध्याचा आवडता सिनेमा. गंमत म्हणजे ही सगळी सूत्रं त्याला चपखल लावून दाखवता येतात. पूर्वपक्ष? जशास तसे! हे सूत्र सगळ्या सिनेमात कुठेही उच्चारलं जात नाही. उलट चिरोंजीलाल अमेरिकेत निघून जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला या प्रकरणात अज्याबात गुंतायचं नाही आहे, मग सूड-बिड तर दूरच राहिला. ते सभ्यपणे पोलिसांकडेही जाऊन पाहतात, पण तिथेही काही डाळ शिजत नाही. मग नाईलाज म्हणून म्हणा, योगायोगानं तो दलाल भेटतो म्हणून म्हणा, थोडी खुमखुमी असल्यामुळे म्हणा - मंडळी या अचाट प्लॅनमधे सामील होतात आणि बघता बघता गोष्ट वेग घेते. प्रमुख व्यक्तिरेखा - यातली सगळ्यांत लोभसवाणी आणि खरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे ती अनुपम खेरची. फसवणूक त्याची झालीय. या सगळ्या अव्यापारेषु व्यापारातून त्याला पैसे आणि घर तर मिळतंच. पण त्याचं हातून निसटणारं कुटुंबही अनपेक्षितपणे परत मिळून जातं. या प्रवासातून दिसणारा-घडणारा टिपिकल मध्यमवर्गीय, पापभीरू, कुटुंबवत्सल, नेक बाप अक्षरशः लाजवाब आहे. तो असतो पार्श्वभूमीला. सतत मोडता घालत, चिडत-वैतागत-खंतावत. पण ही गोष्ट त्याचीच. पोरगा मोठ्या कंपनीत आहे असं अभिमानानं कुणालाही सांगणं काय, किंवा 'इसके साथ कुछ चटनी वगैरा है क्या?' असं पिझ्झा पाहून वैतागानं विचारणं काय! त्याला त्याचा इतिहास-भूगोल आहे आणि तो नेमका दिसत राहतो. हेच इथल्या सगळ्या व्यक्तिरेखांना लागू होतं. भलेही चार फ्रेमकरता का पात्र पडद्यावर येईना, ते सकाळी चहा पीत असेल, की कॉफी हे अचूक सांगता येईल, इतकी स्पष्ट माणसं आहेत ही. त्यांच्या कपडे घालण्याच्या, खाण्या-पिण्याच्या पद्धती (बोमन इराणीचं नि:संकोचपणे आपल्याच घराच्या आवारात जरा लांब जाऊन लघवी करणं!), त्यांची भाषा (मेघनाच्या मैत्रिणीनं 'बास्टर्ड' अशी शिवी हासडणं!), त्यांचे मॅनरिझम्स (सतत घायकुतीला आलेला काहीसा नर्व्हस असा बापूंचा सेक्रेटरी)... आहाहा! संघर्ष - खोसला कुटुंब आणि बोमन इराणीचं पात्र (नाव विसरले!) यांच्यातला हा संघर्ष असं ढोबळ मानानं म्हणता येईल. पण तो बाह्य संघर्ष झाला. खरा संघर्ष अनुपम खेरचा. कुटुंबाशी, नव्या मूल्यव्यवस्थेशी आणि स्वत:शी. अशी फसवाफसवी करून पैसे परत मिळवावेत की न मिळवावेत, या त्याच्या 'भवति न भवति'मधून तो अचूक दिसत राहतो. तो पोरांवर चिडल्यासारखं करतो, पण पोटातून मात्र सुखावलेला. काळजी आणि कौतुक करणारा. तरी चिरोंजीलाल पैसे घेऊन आल्यावर त्याला पुरेसा आणि निर्भेळ आनंदही होत नाही. मासिक वाचल्याचं नाटक करत तो आपला व्हरांड्यातच. आपली प्रतिक्रिया नक्की काय असली पाहिजे, या संभ्रमात. हाच तो मास्तर म्हणत असलेला अंतर्गत संघर्ष असेल का? संवाद - 'हम आपके' मधे सुरुवातीला आलोकनाथ आणि कुणाचातरी एक संवाद आहे. कसला विनोदी आहे तो! तुम्ही भाऊ वारल्यावर पुतण्यांना कसं सांभाळलंत आणि त्यासाठी लग्न टाळलंत, तुम्ही किती थोर, असं आलोकनाथलाच सांगण्यात येतं! अरे, त्याला माहीत नाही का हे? ही कुठली निर्बुद्ध पद्धत पात्राची पार्श्वभूमी सांगायची? असो. असले आचरट संवाद 'खोसला..'मधे नाहीत. त्यातली सगळी माणसं आपापली, आपल्या वयाला-पेशाला-संस्कारांना साजेशी भाषा बोलतात. बिनदिक्कत (आणि गरज पडेल - नाईलाज होईल तेव्हाच!) शिव्या देतात. उगीचच्या उगीच भाषणं न झोडता एखाद्याच लुकनं आपलं म्हणणं स्पष्ट करतात. (चिरोंजीची बहीण अनुपम खेरला कसले खतरनाक लुक्स देत असते सतत! 'बाबा म्हणजे ना... ' असं कौतुक कम वैताग सरळ वाचता येतो त्यात.) लय - आधी काहीशी संथ आहे गोष्ट. सगळ्या माणसांशी पुरेशी ओळख होते आपली. सगळ्यांची गोची - स्वभाव - अडचणी - एकात एक गुंतलेल्या तंगड्या... सगळं स्पष्ट होतं. आणि मग सुरुवातीला मंद हुंकार देणार्‍या बाईनं हळूहळू अंगात येऊन जोरदार भीतीप्रद घुमायला सुरुवात करावी, तशी गोष्ट वेग घेत जाते! पेहेलवान, पोलीस, नाटक मंडळी, फिशरी जमिनीवरचं नाटक... अशा चढत्या क्रमानं गोष्टी घडत जातात. ही मास्तरांची हॉरिझॉण्टल लय असावी बहुधा. पण पार्श्वभूमीला त्याला आडवा छेद देत, अनुपम खेरची चलबिचल सदसद्विवेकबुद्धी असतेच. ती खरी गंमत! मास्तर, बरोबर आहे का हो?

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष 02/07/2008 - 11:00
'खोसला का घोसला' खरच छान आहे. ते व्हर्टिकल/हॉरिझॉण्टल माहित नाही. पण व्यक्तिरेखा फारच सुरेख लिहिल्यात आणि अभिनेत्यांनी त्याला मस्तच न्याय दिलाय. अनुपम खेर -- केवळ अशक्य!! अभिनयाचा वस्तुपाठ म्हणा ना...ते दारू घेऊन येतांना त्याचे चालणे? वा!!!

In reply to by मेघना भुस्कुटे

जशास तसे! हे सूत्र सगळ्या सिनेमात कुठेही उच्चारलं जात नाही. परफेक्ट...पूर्वपक्ष डायरेक्ट न सांगता आपोआप कळायला हवा... ते इथे एकदम जमतेच... ते सकाळी चहा पीत असेल, की कॉफी हे अचूक सांगता येईल, इतकी स्पष्ट माणसं आहेत ही. ...........आपली प्रतिक्रिया नक्की काय असली पाहिजे, या संभ्रमात. हाच तो मास्तर म्हणत असलेला अंतर्गत संघर्ष असेल का? एकदम सहमत. त्यातली सगळी माणसं आपापली, आपल्या वयाला-पेशाला-संस्कारांना साजेशी भाषा बोलतात आणि बापूचे ते पैसे पाहून घाबरून परत येणं, आणि अनुपमला सॉरी म्हणणं...आणि इतर सगळे बापूवर वैतागलेले असताना अनुपमने येऊन सांत्वन करणं.हा एक अप्रतिम सीन आहे... मग सुरुवातीला मंद हुंकार देणार्‍या बाईनं हळूहळू अंगात येऊन जोरदार भीतीप्रद घुमायला सुरुवात करावी, तशी गोष्ट वेग घेत जाते हे एकदम मस्त .. अनुपम खेरची चलबिचल सदसद्विवेकबुद्धी असतेच. ती खरी गंमत!... एकदम पटले.... ही व्हर्टिकल ऍक्शन.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मेघना भुस्कुटे

वरदा 02/07/2008 - 20:36
सॉलीड अभ्यास केलायस गं....माझा पण हा सगळ्यात लाडका सिनेमा.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by मेघना भुस्कुटे

महेश हतोळकर 02/07/2008 - 23:31
मेघना म्हणाल्या ते मनापासून पटले. उगीच संवाद बोलून पात्राच्या आडून प्रेक्षकांना त्याच पात्राची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न अगदीच हास्यास्पद होता. मास्तरांच्याच शिकवणीवरून वरील प्रसंग बदलण्याचा प्रयत्न. बघा कसा वाटतो ते. (अलोकनाथ व अजीत वाच्छानी अलोकनाथच्या दिवाणखान्यात बसले आहेत. अलोकनाथच्या मागे भिंतीवर त्याच्या भाऊ-भावजयीचा फोटो टांगला आहे.) अजीत वाच्छानी: भाईसहाब अब राजेश की शादी का दिल पे ले ही लिजीये| अलोकनाथ: हां भाईसहाब, (फोटोकडे निर्देश करून) भय्या भाभी की अशिर्वादसे राजेश बिजीनेसको अच्छी तरहसे संभाल रहा है| अब प्रेम भी MBA खत्म करके उसके साथ जुड जायेगा| आपकी नजरमे कोई लडकी हो तो बताईये| (एवढ्यात प्रेम येतो. तो खूप आनंदात आहे.) प्रेमः (दोघांच्या पाया पडून). प्रणाम चाचाजी| प्रणाम मामाजी| अजीत वाच्छानी: भाईसहाब लगता है प्रेम का Result उम्मीद के मुताबिक निकला है| क्यों बेटा? प्रेमः हा मामाजी! मै अव्वल आया| अजीत वाच्छानी: भई व्वा! कृपया हिंदी कडे थोडे दुर्लक्ष करा. खूप चिंध्या केल्या आहेत

In reply to by महेश हतोळकर

...मस्त रे "मी " खूप छान प्रयत्न... ... किंवा "शो डोंन्ट टेल "...पद्धतीने हे सारे अत्यंत कमी किंवा शून्य संवादात दाखवताही आले असते.... .... (आलोकनाथ मोहनीश बहलसाठी स्थळं पाहायला म्हणून हातात मुलींचे फोटो, पत्रिका आणि माहिती वगैरे घेऊन बसला आहे, त्याचे समोरच्या भाऊ आणि भावजयीच्या फोटोकडे लक्ष जाते ....फोटोवर क्लोज मग आलोकनाथवर क्लोज्...त्याला आठवतं, त्याच्या भावाच्या मृत्यूसमयी दोन घाबरलेली लहान मुलं काकाला बिलगतात आणि हा त्यांना डोळ्यातलं पाणी थोपवत शांत करतो,थोपटतो...पुन्हा आलोकनाथचा चेहरा दिसतो, त्याच्या डोळ्यात अश्रू पण चेहर्‍यावर समाधान...( भावाला दिलेलं त्या पोरांना नीट सांभाळायचं वचन पूर्ण केल्याचं वगैरे समाधान) . शेजारी स्थानिक वर्तमानपत्रात मोहनीशचा यंग बिझिनेसमन ऑफ द इयर वगैरे पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो आहे, त्या फोटोकडं तो अभिमानानं पाहतो आणि साधारण पसंत असलेल्या मुलीचा फोटो त्याच्याशेजारी धरतो, नापसंत करतो, असं दोन तीन वेळा होतानाच प्रेम आलेला आहे...).... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

वरदा 03/07/2008 - 00:32
मस्तच आहे मास्तर्....मला आवडली ही आयडीया एक्दम्.... "मी" ची पण आयडीया आवडली... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

तुमच्या नाट्यलेखन तंत्राचे सगळे दुवे एकमेकांना जोडाल का? उदा. भाग २ च्या लेखाखाली भाग १ आणि भाग ३ चे दुवे ! तुमच्या नाट्यलेखन तंत्राचे सगळे दुवे एकमेकांना जोडाल का? आता तसे केले आहे. -- जनरल डायर. -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

In reply to by संदीप चित्रे

भाग एक http://www.misalpav.com/node/2344 भाग दोन.. http://www.misalpav.com/node/2347 आता तसे केले आहे. -- जनरल डायर. धन्यवाद डायरसाहेब... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दामिनी... कथासार : दामिनी (मीनाक्षी शेषाद्री) या गरीब मुलीचे ऋषी कपूरच्या श्रीमंत घरात लग्न होते, तिथल्या तरूण मोलकरणीवरती बलात्कार करताना आपल्या दिराला आणि त्याच्या काही मित्रांना दामिनी पाहते आणि कोर्टात सत्य बोलून गुन्हेगारांविरुद्ध साक्ष देते,( यात ती तिचा पती आणि सासरच्यांचा रोष ओढवून घेते) मात्र तिला कोर्टात वेडं ठरवलं जातं, घरातून हाकलून वेड्यांच्या इस्पितळात पाठवलं जातं.. तरीही ती तिथून पळून जाऊन सनी देओल या एका हुषार वकिलाच्या मदतीनं त्या मोलकरणीला न्याय मिळवून देते... पूर्वपक्ष जे सत्य आहे, ते कोणत्याही अडचणींशी लढून विजय मिळवतंच... प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत. १.भावना (character) : सत्य २.संघर्ष (conflict ) : संकटं , अडचणी ३.निराकरण / गोष्टीचे ध्येय. (goal / resolution) विजय मिळवतं.. म्हणजे काय तर दामिनी सनी मिळून सत्यासाठी अमरीष आणि सासरा यांनी उभ्या केलेल्या संकटावर मात करून न्याय मिळवतात. प्रमुख व्यक्तिरेखा १. दामिनी. (प्रोटॆगनिस्ट )सरळमार्गी, संस्कारी मोठ्या श्रीमंत घरात अचानक येऊन पडल्यावर मोलकरणीवरचा अत्याचार पाहते...खरं बोलण्यासाठी नवर्याचेही मन वळवू पाहते...पण कितीही संकटं आली तरी सत्याचीच बाजू घेते. २. ऋषी कपूर : द्विधा मनस्थितीत, न्याय आणि सत्य महत्त्वाचं की कुटुंब...? ३.अमरीष पुरी (ऎंटागनिस्ट): आरोपीचा महापाताळयंत्री वकील, याच्याकडे सर्व संकटांवरचे कायदेशीर (आणि इतरही) उपाय असतात. ४.सनी देओल : सर्वात भावखाऊ रोल.... पत्नीला न्याय मिळवून न देऊ शकलेला एक वैफ़ल्यग्रस्त, व्यसनी वकील पण दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न, ( हुशारी आणि मारामार्या दोन्हीही) करतो. ( बाकी मंडळीसुद्धा उत्तम ... सासू सासरे, ती सुटेल अशा समजुतीने खोटी साक्ष द्यायला तयार झालेले तिचे अगतिक वडील, परेश रावल,इन्स्पेक्टर कदम, तिच्या बहिणीचा मिमिक्रीवाला नवरा मस्त)... संघर्ष कोअर कॊन्फ़्लिक्ट सांगायचा तर सत्य विरुद्ध असत्य असा सनातन संघर्ष... बाह्य संघर्ष : दामिनीचं सत्य आणि तिच्या सासरकडचे लोक + अमरीष यांचं असत्य यांचा संघर्ष. शिवाय सनी आणि अमरीष यांचा संघर्ष आंतरिक संघर्ष : तिचं आणि तिच्या पतीचं नातं ... तो तिला " जाउदे ,विसरून जा" असं सांगतोय आणि ती सत्य आणि न्याय पकडून बसलीय. आणि या दोघांचाही अंतर्गत आंतरिक संघर्ष असा की नातं महत्त्वाचं की न्याय ? संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स. सूड : ऋषी कपूरशी आपल्या मुलीचे लग्न लावू इच्छिणारा एक उयोगपती सूड घेण्याच्या इच्छेने ( आणि ती वेडी झाली की आपल्या मुलीचे पुन्हा ऋषीशी लग्न करून देण्याच्या इच्छेने) दामिनीविरुद्ध अमरीषला मदत करतो. संकट : दामिनीविरुद्ध अनेक संकटे पाठलाग : तिच्या मागे पळणारे गुंड. प्रेम : पतीकडून पूर्वी मिळालेले प्रेम. फ़सवणूक : तिच्या भोळ्या बापाला खोटं सांगून तिच्याविरुद्ध खोटी साक्ष वदवून घेतात. छळ :वेड्यांच्या इस्पितळात तिला शॊक देतात. वाढता संघर्ष : सुरुवातीला तिला धमक्या, मग कोर्टात तिला वेडं ठरवून इस्पितळात, तिथे शॊक देतात... ती पळून सनीच्या आश्रयाला जाते... मग अटक करायला पोलीस पाठवतात ( सनीने अटकपूर्व जामीन घेतलेला असतो),गुंड पाठवतात ( सनी तुफ़ान मारामारी करतो)... अगदी शेवटी कोर्टात पोचायच्या वेळी तिच्यावर खुनी हल्ला होतो... तेव्हा पळतापळता एके क्षणी एका इमारतीच्या बांधकामाजवळ येऊन पोचते, ती हातात टिकाव घेऊन उलटी फ़िरते आणि गुंडानाच आव्हान देते... हे पाहून इमारतीतील बांधकामावरचे मजूर दगडाविटांच्या मार्याने गुंडांना पळवून लावतात..( हे दृश्य अप्रतिम आहे)... इकडे सनी अमरीषच्या वकिली डावपेचांना "तारीख पे तारीख .."चं भाषण करून वेळ काढतोय... :) .. मग ती नाट्यमयरित्या पोचते आणि साक्ष देते...( आरोपीच्या वकिलाला लै बोल लावते)..हा उत्कर्षबिंदू...पुढे फ़ॊलिंग ऎक्शन ... मग तिचा नवराही येऊन तिच्या बाजूने साक्ष देतो...कोर्टाचा निकाल... ती खुश...नवरा परत तिच्याबाजूने मिळाला.. या प्रत्येक रायजिंग कॊन्फ़्लिक्ट ( वाढत्या संघर्षा) च्या मुद्द्याला प्रेरणा ध्येय अडचणी आणि कृती यांचा संदर्भ देता येतो... संवाद पात्रे आपापले संवाद बोलतात.... अत्यंत स्टाईलाईज्ड अमरीष आणि सनी.. मजा येते. दामिनी आणि तिचे वडील साधं बोलतात.... ऋषीचं पात्र दोन्ही बाजू समजून घेत मध्यम बोलत राहतं... अमरीष अणि विशेषत: सनीचे संवाद अप्रतिम / अजरामर वगैरे :) ... "ये ढाई किलोका हाथ जब पडता है तो आदमी उठता नही उठ जाता है" किंवा इन्स्पेक्टरला " एक कागजका टुकडा मेरे पास भी है" " कदम संभलकर चल कदम" किंवा शेवटचा " तारीख पे तारीख.." संवाद. लय सुरुवातीला व्यक्तिरेखा कळेपर्यंत सावकाश.. गाणी ( बिन साजन झूला झूलूं, जबसे तुमको देखा है सनम)..वगैरे... ऋषीचं तिला मागणी घालणं , प्रेम...पण एकदा लग्नानंतर ती सासरी आल्यावर होळीच्या त्या दिवसानंतर घटना वेगात घडतात...हॊरिझोंटल ऎक्शन... त्यात तिचं आणि ऋषीचं मानसिक द्वंद्व.. तिथे व्हर्टिकल ऎक्शन.. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मनिष 03/07/2008 - 12:29
मला पटकथा, प्रिमाईस आवडले तरी प्रत्यक्ष सिनेमा फार भडक/लाऊड वाटला होता.... सनीचा रोल तर फारच...नंतर एकदा चॅनेल सर्फ करतांना एका साऊथ च्या सिनेमात (नाव माहित नाही) तस्सच हात करून बोलणार वकिल पाहिला...फारच विनोदी वाटलं ते सगळ. त्यापेक्षा ऋषी कपूर चा अभिनय आवडला (ह्याला खरं तर कोणी नीट वापरला नाही, बराच चांगला अभिनेता अहे, फक्त फार फालतू रोल मधे अडकला)...त्याने त्याचे ते "दु:ख तो इस बात का है दामिनी, की तुम्हारे लिये मुझस, हम दोनोसे जरुरी कुछ और हे" अशा अर्थाच्या संवादाच्यावेळी द्विधा होणे किंवा व्याकूळ होणे खूपच चांगले दाखवले ... एकूणात मला "व्हर्टिकल ऍक्शन", "हॉरिझाँटल ऍक्शन" पेक्षा जास्त आवडते असे वाटते! - ( "व्हर्टिकल ऍक्शन" प्रेमी) मनिष

In reply to by मनिष

सनी देओल इतका परिणामकारक वाटलाय तो निव्वळ त्या स्क्रिप्ट आणि संवादांमुळे. एरवी तो कसला! ऋषी कपूर मलापण फार आवडतो यातला. त्याच्या ऑफीसातला एक सीन आहे ना, त्याचा कुणीतरी एम्प्लॉयी काहीतरी क्षुल्लक खोटं सांगतो त्याला, आणि ऋषी कपूर वेडावाकडा भडकतो. 'हम झूठ क्यों बोलते हैं यार?' हा त्याचा सवाल स्वतःलाच. कसला हताश वाटतो तो तेव्हा. तसाच त्याचा संताप. अमरिश पुरीची कॉलर धरून त्याला मधे न पडण्याबद्दल बजावताना काय बोललीय त्याची नजर. सनीला 'ए गोविंद..' म्हणून धमकावतानाचा त्याचा उफाळून आलेला संताप. काय चूक काय बरोबर, हे कळतं आहे खरं तर. पण चौकटीबाहेर जाऊन कुटुंबाला विरोध करण्याचा धीर नाहीय. ही तगमग आणि त्या पार्श्वभूमीवर दामिनीवरचं नितांत प्रेम. सनी त्याच्या पासंगालाही पुरायचा नाही.

In reply to by मनिष

हो, कोर्टात तिला वेडं ठरवताना तर सिनेमा एकदम मद्रासी टाईपचा भडक होतो... (९४ साली एका फॅमिली गेदरिंगला कोणती व्हिडीओ कॅसेट बघायला आणावी , या विचारात असताना सर्व लहानांनी मोठ्यांच्या मनावर भडक सिनेमामुळे वाईट परिणाम नकोत म्हणून हा सिनेमा आणायचे कॅन्सल केले होते...) :) .. आणि ऋषीचं काम फार छान आहे सिनेमात फक्त त्याला टाळ्या शिट्यांचे संवाद नाहीत इतकेच...( सनी फक्त स्क्रिप्ट + संवादावर मारून नेतो गोष्टी)... ते तारीख पे तारीख असं म्हणत जजवर ओरडणं मला अंमळ विनोदी वाटलं होतं... आणि ऋषीशी सनीची काही तुलनाच नाही हेही खरेच... :) असतात काही माणसं नशीबवान... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

१. आपल्या सर्व व्यक्तिरेखा नीट समजून घ्या... त्यांची सारी पार्श्वभूमी आणि विशिष्ट वागण्याची कारणमीमांसा ,प्रेरणा तयार असूद्या. २.नायक आणि खलनायक त्या सार्या व्यक्तिरेखामध्ये न तुटणारं एक नातं तयार होऊद्यात.का? अन्ब्रेकेबल बाँड का? तर ही विरुद्ध स्वभावाची मंडळी गोष्टीत एकमेकांशिवाय राहू शकायला नाही पाहिजेत. ... इंट्रेस्ट गुंतले नाहीत तर लोक सोडून जातील ना एकमेकांना.... ३. आपल्या गोष्टीची थीम ठरवा, मुख्य पात्राचं ध्येय काय ते ठरवा.... तुम्हाला काय सांगायचंय ? प्रीमाईस ४. मुख्य व्यक्तिरेखेकडे असा एखादा गुण किंवा एखादा विशिष्ट स्वभावविशेष हवा... विशिष्ट बाबतीत थोडासा चक्रम वाटणारा,शंभर टक्के अतिरेकी टोकाचा विचार हवा..( १०० % कंपल्सिव्ह ट्रेट).. आता दामिनीच्या उदाहरणात बघा... ती सत्य आणि न्यायासाठी इतकी टोकाला जाते, नवर्‍यापासून सगळ्यांशी लढते...आता एवढं काय गरज होती का करायची? पण नाही... चक्रमपणा असलेली माणसं काहीतरी करून दाखवतात...म्हणून उत्तम गोष्टीतलं पात्र विशिष्ट् बाबतीत चक्रम असतं... ५.आणि त्याच्या त्या विशिष्ट चक्रमपणामुळंच तो काही प्रसंगात संकटात अडकलाय.. इथे संघर्ष सुरू. ६.त्याच्या अशा स्वभाववैशिष्ट्यामुळं तो अधिकाधिक संकटात , अडचणीत सापडतो.... आणि अस्तित्त्वासाठी, जगण्यासाठी संघर्षात पडावंच लागतं.. अधिकाधिक गुंतत जावं लागतं...अधिकाधिक नाट्यमय घटना...व्यक्तिरेखा अधिकाधिक संकटात... ७. त्यातून बाहेर पडत पडत उत्कर्षबिंदू...आता माघार नाही... ८.उत्कर्ष निराकरण...त्यातूनच प्रेमाईस ची सत्यता व्यक्तिरेखांना आणि प्रेक्षकांना कळते...(काय धडा घेतला... काय शिकवण मिळाली??) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज 03/07/2008 - 17:55
मास्तर तीनही भाग, उदाहरणे, प्रतिसाद अतिशय वाचनीय.

मुक्तसुनीत 04/07/2008 - 01:55
आताच तीन्ही भाग वाचले. प्रचंड आवडले !! भुस्कुटे , मनिष आणि इतरांचे प्रतिसाद खूप एंजॉय केले ! भडकमकर, तुमच्याबरोबर एखादे नाटक पहायला आवडेल बुवा ! :-)

In reply to by मुक्तसुनीत

आताच तीन्ही भाग वाचले. प्रचंड आवडले !! भुस्कुटे , मनिष आणि इतरांचे प्रतिसाद खूप एंजॉय केले !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

genre याचा उच्चार बरेच जण जॉनर / जॉन्रा / जॅनर असा करताना ऐकले आहेत..मी सध्या जॉनर म्हणतो...ते काही फ़ारसे महत्त्वाचे नाही ... मी याला लेखनप्रकार , लेखन शैली म्हणेन... (अधिक चांगला प्रतिशब्द कोणीतरी देइलच..) उदा. सामाजिक, थरार, गूढ, फ़ॆंटसी, कॊमेडी, प्रेमकथा वगैरे वगैरे... आता थेट उदाहरणे घेऊ... समजा घटना हीच आहे ... एक मनुष्य त्याच्या मित्राच्या घरात येतो तेव्हा तो मित्र मेलेला आढळतो... आता याच घटनेचे जॊनरप्रमाणे पुढे कथानकाच्या ट्रीटमेंटमध्ये बदल होतात... उदाहरणार्थ... १.सामाजिक नाट्य : या मृत्यूला कोणती सामाजिक कारणं आहेत,जर समजा चोरी साठी हा खून झाला असेल तर गरीबी, बेरोजगारी.. किंवा हार्ट ऎटॆकने गेला असेल तर वेळेत वैद्यकीय सेवा न मिळणे... वगैरे वगैरे... यावर चर्चा... आसवं गाळत स्वगत वगैरे... २.सस्पेन्स.. ( गूढ उकलणे)...मित्र घरात इकडे तिकडे पाहतो, तर त्याला सिगरेटचे थोटूक , कोटचं तुटलेले बटन आणि लायटर सापडतो.. ( मित्र सिगरेट न ओढणारा वगैरे). ३.थरार... ( थ्रिलर).. घड्याळात बाराचे टोले पडतात..बाहेर काहीतरी आवाज होतो आणि खिडकीतून एक काळी आकृती जाताना दिसते... ४.फ़ॆंटसी :यमदूत मेलेल्या मित्राच्या आत्म्याला म्हणतो, " अरेरे, खरंतर या दुसया मित्रालाच मारायचं होतं...चूक झाली... आता काय करायचं?" ५. कॊमेडी.. : तेवढ्यात बेल वाजते,...मित्र घाबरून ते प्रेत लपवायच्या प्रयत्नाला लागतो... त्यातून गोंधळ उडतो... ६. रोमॆंटिक : मित्राच्या निराधार बहिणीला तो भावनिक आधार देतो आणि त्यातून त्यांचं प्रेम फ़ुलतं वगैरे... आता साधारणपणे एकच एक जॆनर नसतो तर त्याची मिश्रणे असतात... उदाहरणार्थ रोमेंटिक कॊमेडी.., सस्पेन्स थ्रिलर... सगळं तसं एकमेकांच्यात गुंतलेलंच असतं... फ़ार वेगळं काढून दाखवता येत नाही असं मला वाटतं... जॊनर हा प्रकार फ़क्त एकूण लेखकाला लिहायला सुरुवात करण्यापूर्वी एक मार्गदर्शक म्हणून असावा, की बाबा आपल्याला काय शैलीत लिहायचंय... एकूण त्या बाबतीत गोंधळ माज्ला की अवघड जातं.. .... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत 04/07/2008 - 12:03
भडकमकरांची ही सगळी लेखमाला मला आवडली हे आधीच सांगितले आहे. असे म्हणतात की मोठ्या कलाकृतींमधे बर्‍याचदा , त्या त्या कलेच्या क्षेत्रातील नियम , संकेत मोडल्याचे दिसून येते. विशेषतः चित्रकलेमधे असे वारंवार घडले. (इम्प्रेशनिझम हे एक ठळक उदाहरण.) युलिसिस ही कादंबरी म्हणे प्रसिद्ध झाली तेव्हा "संज्ञाप्रवाही कादंबरी" हा प्रकार जन्माला आला. आपल्याकडील नेमाडे, मर्ढेकर यांची अशी "क्रांतिकारकाची" उदाहरणे आहेतच. माझी भडकमकरना अशी विनंती आहे की त्यानी जे नियम समजावून दिलेत त्याना छेद देणार्‍या नाट्य किंवा सिनेकृतींचाही उल्लेख उदाहरणांसकट करावा. नियम असतात ते मोडण्याकरता , हे चांगल्या अर्थाने खरे करणार्‍या , एकूण कलाप्रकाराची कक्षा वाढवणारे त्यांनी काही पाहिले काय ? असल्यास काय ते जाणून घ्यायला उत्सुक आहे.

In reply to by मुक्तसुनीत

अगदी मनातलं बोललात. परंपरेच्या विरोधात केलेली अर्थपूर्ण आणि अपरिहार्य बंडखोरी परंपरेला अधिक सशक्त करत जाते - बंडखोरीच्या अशा अनेक कड्यांची मिळून समृद्ध परंपरा तयार होत असते... अशा अर्थाचं एक विधान तेंडुलकरांनी कुठेतरी केलेलं आहे, त्याची आठवण झाली. नुकतंच वाचलेलं मनस्विनी लता रवींद्रचं 'सिगारेट्स' आठवतं आहे. या नाटकाला रूढार्थानं कथा नाही. प्रमुख पात्र असंही नक्की नाही. सगळेच आपापल्या परीनं चक्रम आणि चाकोरीतलेही असलेले तरुण. नायक नाही आणि खलनायकही. आपल्या लैंगिक - शारीरिक आणि मानसिकही - गरजांना हे सगळे जण रिऍक्ट होत राहतात. त्यांचे प्रश्न प्रामाणिक आहेत आणि उत्तरं शोधण्याचे प्रयत्न धीट. त्यात कसलाही अभिनिवेश नाही. सोवळेपणाचा आव वा दुटप्पीपणाही नाही. निव्वळ आयुष्याचा एक तुकडा. जिवंत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतात की नाही, त्यांच्या शोधात-लढ्यात ते यशस्वी होतात की नाही, ते सुखी होतात की दु:खी यांतल्या कसल्याही प्रश्नांची आयती उत्तरं मिळत नाहीत. जिथून नाटक सुरू होतं तिथे आणि जिथे संपतं तिथे - बाह्य परिस्थितीत काहीच फरक नाही. पण सगळ्यांच्या शरीरा-मनात काहीतरी घडून गेलं आहे - जे उत्तरं मागणार आहे. कुणी त्याला सामोरं जाईल, कुणी तोंड लपवून पळ काढील... आपापल्या वकुबानुसार. नाटक फक्त आपल्या आयुष्याचा हा एक अस्पर्श भाग आपल्या पुढ्यात आणून टाकतं. जिवंत. कसल्याही रूढ नियमांखेरीज. हे तर प्रायोगिक - त्यामुळे काहीश्या आडबाजूच्या - नाटकाचं उदाहरण झालं. पण मुख्य धारेत राहून 'दिल चाहता है'नं असे कितीतरी नियम मोडले. त्यालाही गोष्ट अशी नव्हतीच. फार तर ओढून ताणून तिला नायकांच्या 'ग्रोइंग अप्'चीही कथा म्हणता आलं असतं. पण त्यातही नायक नव्हताच, खलनायकही. एक आयुष्याचा रसरशीत तुकडा. काही घटना. काही प्रश्न. बस. काही म्हणा, नियम मोडायलाच मज्जा येते! :)

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा

भडकमकर मास्तर ·

मनिष 01/07/2008 - 11:45
व्यक्तिरेखा लिहितांना खरच असा विचार झालेल दिसत नाही बर्‍याच वेळा....खासकरून मानसिक अंगाचा...त्यात लेखकाची 'इनसाईट' महत्वाची. नाहितर त्या कथेची विश्वासार्हता गमावून बसतात....उदा. गजेंद्र अहिरेच्या बर्‍याच व्यक्तिरेखा...त्याची समज खूपच वरवरची, भाबडी वाटते. तसेच "सातच्या आत घरात" मधे वाटले. त्या उलट सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर ह्यांच्या व्यक्तिरेखेचा आलेख खूप नेटकेपणे, तसेच तपशीलात मांदलेल वाटतो -- त्या व्यक्तिरेखा जिवंत वाटतात. मला वातते - ह्यात लेखकाची जाण खर्‍या अर्थाने दिसून येते! अवांतर - मधे प्रख्यात मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी (त्यांची नाटक, सिनेमा ह्यांची जाणही चांगलीच प्रगल्भ आहे) ह्यांचे 'तुझ्याविना' नाटक पाहिले...ते व्यक्तिरेखा कशा दखवतात ह्याबद्द्ल साहजिकच उत्सुकता होती...काही डिटेल्स खूप चांगले होते, पण तरीही नाटक नाही परिणामकारक वातले...ते असे का ह्याचा अजून विचार करतोय.... मास्त्र - लिहित रहा....चर्चा मस्त रंगते आहे! :)

विसोबा खेचर 01/07/2008 - 13:03
मास्तर, छान लिहिले आहे. आत्ताच दोन्ही भाग वाचले. फारसे समजले नाहीत व अंमळ बोअर वाटले. मात्र नाट्यलेखन क्षेत्रात येऊ घातलेल्या मंडळींकरता/विद्यार्थ्यांकरता हे लेखन नक्कीच उपयोगी ठरेल असे वाटते. आम्हाला आपली नाटके पाहायला मात्र मनापासून आवडतात! :) तात्या.

मनिष 01/07/2008 - 11:45
व्यक्तिरेखा लिहितांना खरच असा विचार झालेल दिसत नाही बर्‍याच वेळा....खासकरून मानसिक अंगाचा...त्यात लेखकाची 'इनसाईट' महत्वाची. नाहितर त्या कथेची विश्वासार्हता गमावून बसतात....उदा. गजेंद्र अहिरेच्या बर्‍याच व्यक्तिरेखा...त्याची समज खूपच वरवरची, भाबडी वाटते. तसेच "सातच्या आत घरात" मधे वाटले. त्या उलट सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर ह्यांच्या व्यक्तिरेखेचा आलेख खूप नेटकेपणे, तसेच तपशीलात मांदलेल वाटतो -- त्या व्यक्तिरेखा जिवंत वाटतात. मला वातते - ह्यात लेखकाची जाण खर्‍या अर्थाने दिसून येते! अवांतर - मधे प्रख्यात मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी (त्यांची नाटक, सिनेमा ह्यांची जाणही चांगलीच प्रगल्भ आहे) ह्यांचे 'तुझ्याविना' नाटक पाहिले...ते व्यक्तिरेखा कशा दखवतात ह्याबद्द्ल साहजिकच उत्सुकता होती...काही डिटेल्स खूप चांगले होते, पण तरीही नाटक नाही परिणामकारक वातले...ते असे का ह्याचा अजून विचार करतोय.... मास्त्र - लिहित रहा....चर्चा मस्त रंगते आहे! :)

विसोबा खेचर 01/07/2008 - 13:03
मास्तर, छान लिहिले आहे. आत्ताच दोन्ही भाग वाचले. फारसे समजले नाहीत व अंमळ बोअर वाटले. मात्र नाट्यलेखन क्षेत्रात येऊ घातलेल्या मंडळींकरता/विद्यार्थ्यांकरता हे लेखन नक्कीच उपयोगी ठरेल असे वाटते. आम्हाला आपली नाटके पाहायला मात्र मनापासून आवडतात! :) तात्या.

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस

भडकमकर मास्तर ·

चतुरंग 01/07/2008 - 02:58
चांगला चर्चाविषय. नाटकाच्या/चित्रपटाच्या लिखाणाची पार्श्वभूमी समजावून देणारा विषय. ('प्रिमाईस = प्रमेय' शब्द कसा वाटतो.) (प्लॉट = आराखडा?) चतुरंग

In reply to by चतुरंग

धनंजय 01/07/2008 - 03:13
चांगला चर्चाविषय. तंत्राबद्दल वाचून मला नाटक लिहायला शिकता येणार नाही, हे मान्य, पण नाटक बघताना अधिक आस्वाद घेता येईल. प्रेमिस/प्रिमाइस म्हणजे ज्यावर (नाट्य)वास्तू उभी करतो ते आधारस्थान, म्हणजे गृहीतक. प्रमेय म्हणजे जे प्रमाणांनी सिद्ध करायचे आहे ते. थोडक्यात "मत्सराने माणूस एकाकी पडतो" हे प्रिमाईस असले, तर नाटकाच्या शेवटी ते सिद्ध होत नाही - ते सुरुवातीलाच नाटककार + प्रेक्षकांना पूर्ण मान्य असते. हे मान्य असल्यामुळेच नाटकातल्या पात्रांच्या आयुष्यात जे काही नाट्यमय प्रसंग येतात ते प्रेक्षकांना पटतात.

In reply to by धनंजय

चतुरंग 01/07/2008 - 06:14
प्रिमाइस = गृहितक हे मान्य. ते सुरुवातीलाच नाटककार + प्रेक्षकांना पूर्ण मान्य असते - हे मात्र पटत नाही. नाटककाराला मान्य असणारच कारण त्यावरच नाटक आधारित असते पण प्रेक्षकांना गृहितक शेवटी पटणे/न पटणे हे नाट्य कसे उलगडत जाते त्यावर ठरते. ह्या गृहितकाची बांधणी ज्या तत्त्वांवर आधारलेली आहे ती जेवढी दृढ आणि ते हाताळण्याचे कौशल्य जितके जास्त तेवढी ते प्रेक्षकांना पटण्याची शक्यता जास्त. चतुरंग

In reply to by चतुरंग

उत्तम उपक्रम.. कदाचित माझ्यासारख्या दगडाला या धाग्याचा नक्की उपयोग होईल.. नाटककाराला मान्य असणारच कारण त्यावरच नाटक आधारित असते पण प्रेक्षकांना गृहितक शेवटी पटणे/न पटणे हे नाट्य कसे उलगडत जाते त्यावर ठरते. ह्या गृहितकाची बांधणी ज्या तत्त्वांवर आधारलेली आहे ती जेवढी दृढ आणि ते हाताळण्याचे कौशल्य जितके जास्त तेवढी ते प्रेक्षकांना पटण्याची शक्यता जास्त. हे देखील पटले.. पुण्याचे पेशवे

In reply to by चतुरंग

(प्लॉट = आराखडा) योग्य वाटतोय... पण प्रमेय काही कळत नाही , गणिती वाटतंय ... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 01/07/2008 - 07:51
प्रिमाईस -नाट्यलेखनतंत्राबद्दल लिखाण सुरु झाले की पिडाकाका झोपतात आणि संपले की पिडा काकांना उठवावे लागते! ;) चतुरंग

मास्तर, झकास झालीय सुरुवात. जाम मजा येतेय. पण जमतील तितकी उदाहरणं द्या बरं का. आणि इथेपण घरचा अभ्यास दिलात तरी चालेल. :) तुम्हांला सापडलेले दुवे इथे द्यायला जमतील का? (अवांतर वाचन करून जास्तीचा अभ्यास केलेला बरा असतो! वर्गात हमखास भाव खाता येतो!) पुढच्या भागाची वाट पाहते.

हे प्रतिशब्द चालतील का? terminology... (परिसंज्ञा) 1.premise - गृहितक 2.plot - कथानक 3.dramatic structure - नाट्य आराखडा 4.protagonist - मुख्य पात्र 5.conflict - संघर्ष 6.rhythm - ताल / लय (?) 7.genre - प्रकार (/जातकुळी?) 8.dialogue - संवाद 9.progression of play... नाटकाचा (कथानकाचा?) ओघ?

अमोल केळकर 01/07/2008 - 09:09
मस्त माहिती आर्टस् मधे ही एक सायन्स दडले आहे ( ऍरिस्टॉटलचे ड्रामॆटिक स्ट्रक्चर ) हे लक्षात आले. धन्यवाद या अभ्यासपुर्ण माहितीबद्दल

चतुरंग 01/07/2008 - 02:58
चांगला चर्चाविषय. नाटकाच्या/चित्रपटाच्या लिखाणाची पार्श्वभूमी समजावून देणारा विषय. ('प्रिमाईस = प्रमेय' शब्द कसा वाटतो.) (प्लॉट = आराखडा?) चतुरंग

In reply to by चतुरंग

धनंजय 01/07/2008 - 03:13
चांगला चर्चाविषय. तंत्राबद्दल वाचून मला नाटक लिहायला शिकता येणार नाही, हे मान्य, पण नाटक बघताना अधिक आस्वाद घेता येईल. प्रेमिस/प्रिमाइस म्हणजे ज्यावर (नाट्य)वास्तू उभी करतो ते आधारस्थान, म्हणजे गृहीतक. प्रमेय म्हणजे जे प्रमाणांनी सिद्ध करायचे आहे ते. थोडक्यात "मत्सराने माणूस एकाकी पडतो" हे प्रिमाईस असले, तर नाटकाच्या शेवटी ते सिद्ध होत नाही - ते सुरुवातीलाच नाटककार + प्रेक्षकांना पूर्ण मान्य असते. हे मान्य असल्यामुळेच नाटकातल्या पात्रांच्या आयुष्यात जे काही नाट्यमय प्रसंग येतात ते प्रेक्षकांना पटतात.

In reply to by धनंजय

चतुरंग 01/07/2008 - 06:14
प्रिमाइस = गृहितक हे मान्य. ते सुरुवातीलाच नाटककार + प्रेक्षकांना पूर्ण मान्य असते - हे मात्र पटत नाही. नाटककाराला मान्य असणारच कारण त्यावरच नाटक आधारित असते पण प्रेक्षकांना गृहितक शेवटी पटणे/न पटणे हे नाट्य कसे उलगडत जाते त्यावर ठरते. ह्या गृहितकाची बांधणी ज्या तत्त्वांवर आधारलेली आहे ती जेवढी दृढ आणि ते हाताळण्याचे कौशल्य जितके जास्त तेवढी ते प्रेक्षकांना पटण्याची शक्यता जास्त. चतुरंग

In reply to by चतुरंग

उत्तम उपक्रम.. कदाचित माझ्यासारख्या दगडाला या धाग्याचा नक्की उपयोग होईल.. नाटककाराला मान्य असणारच कारण त्यावरच नाटक आधारित असते पण प्रेक्षकांना गृहितक शेवटी पटणे/न पटणे हे नाट्य कसे उलगडत जाते त्यावर ठरते. ह्या गृहितकाची बांधणी ज्या तत्त्वांवर आधारलेली आहे ती जेवढी दृढ आणि ते हाताळण्याचे कौशल्य जितके जास्त तेवढी ते प्रेक्षकांना पटण्याची शक्यता जास्त. हे देखील पटले.. पुण्याचे पेशवे

In reply to by चतुरंग

(प्लॉट = आराखडा) योग्य वाटतोय... पण प्रमेय काही कळत नाही , गणिती वाटतंय ... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 01/07/2008 - 07:51
प्रिमाईस -नाट्यलेखनतंत्राबद्दल लिखाण सुरु झाले की पिडाकाका झोपतात आणि संपले की पिडा काकांना उठवावे लागते! ;) चतुरंग

मास्तर, झकास झालीय सुरुवात. जाम मजा येतेय. पण जमतील तितकी उदाहरणं द्या बरं का. आणि इथेपण घरचा अभ्यास दिलात तरी चालेल. :) तुम्हांला सापडलेले दुवे इथे द्यायला जमतील का? (अवांतर वाचन करून जास्तीचा अभ्यास केलेला बरा असतो! वर्गात हमखास भाव खाता येतो!) पुढच्या भागाची वाट पाहते.

हे प्रतिशब्द चालतील का? terminology... (परिसंज्ञा) 1.premise - गृहितक 2.plot - कथानक 3.dramatic structure - नाट्य आराखडा 4.protagonist - मुख्य पात्र 5.conflict - संघर्ष 6.rhythm - ताल / लय (?) 7.genre - प्रकार (/जातकुळी?) 8.dialogue - संवाद 9.progression of play... नाटकाचा (कथानकाचा?) ओघ?

अमोल केळकर 01/07/2008 - 09:09
मस्त माहिती आर्टस् मधे ही एक सायन्स दडले आहे ( ऍरिस्टॉटलचे ड्रामॆटिक स्ट्रक्चर ) हे लक्षात आले. धन्यवाद या अभ्यासपुर्ण माहितीबद्दल
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष " नाट्यलेखन काय क्लासमध्ये शिकवून येतं का रे? " " काय एवढं शिकवतात रे लेखन कार्यशाळेत? " अशा काही सीनियर नाटकवाल्याच्या प्रश्नांना तोंड देत देत आम्ही एक दोन लेखन कार्यशाळांमध्ये जाऊन शिकून वगैरे आलो...