बसंतचं लग्न..१४
II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
बसंतचं लग्न..१ (ओळख)
बसंतचं लग्न..२ (यमन, यमनकल्याण)
बसंतचं लग्न..३ (भूप)
बसंतचं लग्न..४ (मिया मल्हार)
बसंतचं लग्न..५ (बिहाग)
बसंतचं लग्न..६ (मालकंस)
बसंतचं लग्न..७ (हमीर)
बसंतचं लग्न..८ (भीमपलास)
बसंतचं लग्न..९ (मुलतानी)
बसंतचं लग्न..१० (तोडी)
बसंतचं लग्न..११ (शुद्धसारंग, गौडसारंग)
बसंतचं लग्न..१२ (अहीरभैरव)
बसंतचं लग्न..१३ (केदार)
राम राम मंडळी,
आमच्या बसंतचं लग्न अगदी दृष्ट लागेल असं सुरू आहे बरं का! एकापेक्षा एक दिग्गज असे राग स्थानापन्न झाले आहेत. वेगळ्यावेगळ्या भरजरी स्वरांनी, सुरावटींनी, राग-रागिण्यांच्या सौंदर्यानी आता तो मंडप नटला आहे. मोठमोठ्या रागांची गळाभेट होते आहे. मुलतानी, मल्हार सारखे दिग्गज राग मालकंसासारख्या योग्याची आदबीने विचारपूस करत आहेत. तर कुठे नट, हमीर, केदारासारखी जवान मंडळी बुजुर्ग अशा आमच्या दरबारीला काय हवं नको ते विचारत आहेत! यमन सगळ्यांना हळवेपणाने भेटतो आहे तर तोडीच्या चेहेर्यावरूनही उगाचंच थोडीशी स्मितहास्याची रेषा उमटते आहे! अहो आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीताची श्रीमंती वर्णावी तरी किती?
पण, त्या रागदारीच्या मांदियाळीमध्ये एक 'देस' नावाचा पाहुणाही आहे बरं का! बसंतच्या लग्नाचा आनंद, रागदारीतली इतर भावंडं भेटल्याचा आनंद अगदी ओसंडून वाहतोय त्याच्या चेहेर्यावरून!
राग देस! कसं आहे हो या देसचं व्यक्तिमत्व?
आपला देस तसा हळवा आहे, प्रेमळ आहे, वृत्तीने अगदी रसिक आहे, अन् मोठ्या मनाचा आहे! परंतु स्वभावाने मात्र तसा प्रवाही आहे. एके ठिकाणी फार वेळ थांबणं, गुंतून राहणं त्याच्या स्वभावात नाही. याच्यात सतत पुढे जाण्याची अत्यंत उत्साही वृत्ती आहे.
देस रागाचं स्वरूप पटकन लक्षात येण्यासाठी हे क्लिपिंग ऐका. आग्रा गायकीतल्या माझ्या आवडत्या गायिका शुभ्रा गुहा यांचं हे किल्पिंग आहे. खूप छान आहे ही बंदिश!
देवगंधर्व भास्करबुवा बखले! ग्वाल्हेर, आग्रा, व जयपूर या घराण्यांवर अनन्यसाधारण हुकुमत असलेला एक दिग्गज गवई, त्याचसोबत मराठी संगीतरंगभूमीवरचा एक दिग्गज संगीतदिग्दर्शक. शैला दातार या त्यांच्या नातसूनेने गायलेली आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातली,
"पिया कर धर देखो धडकत है मोरी छतिया!"
ही एक अतिशय लोकप्रिय बंदिश इथे ऐका. आहाहा, काय सुरेख बंदिश आहे! भास्करबुवांच्याच शिष्य परंपरेतले मास्तर व त्यांचे शिष्योत्तम संगीतभूषण पं राम मराठेदेखील ही बंदिश फार अप्रतीम गायचे. पण भास्करबुवा एवढ्यावरच थांबले नाहीत. पुढे जाऊन त्यांनी याच बंदिशीवर आधारीत संगीत स्वयंवरात काय सुंदर नाट्यपद बांधलं पाहा -
"मधुकर वन वन फिरत करी गुंजारबाला"
आणि अहो साक्षात नारायणराव बालगंधर्वांच्या स्वरांचा परिसस्पर्श झाला या पदाला! आणखी काय पाहिजे?! सुजन कसा मन चोरी, नाथ हा माझा, मधुकर वन वन अशी एकापेक्षा एक सरस पदं भास्करबुवांनी बांधावीत आणि नारायणराव बालगंधर्व या त्यांच्या शिष्योत्तमाने आपल्या स्वर्गीय स्वरांनी ती अजरामर करावीत! भास्करबुवा-बालगंधर्वांची किती थोर शिष्यपरंपरा आहे ही! मन भरून येतं!
मंडळी, आपली सर्वांचीच पूर्वपुणाई म्हणून या देस रागात अजून एक अप्रतीम गीत जन्माला आलं आणि तुमचेआमचे कान अगदी तृप्त झाले!
उदास का तू, आवर वेडे नयनातील पाणी
लाडके कौसल्ये राणी!
वसंत आला तरुतरूवर, आली नवपालवी
मनात माझ्या उमलून आली तशीच आशा नवी
कानी माझ्या घुमू लागली सादावीण वाणी, लाडके कौसल्ये राणी...
ती वाणी मज म्हणे दशरथा, अश्वमेध तू करी,
चार बोबडे वेद रांगतील तुझ्या धर्मरत घरी
विचार माझा मला जागवी, आले हे ध्यानी, लाडके कौसल्ये राणी....
महाराष्ट्रवाल्मिकी गदिमांच्या सिद्ध लेखणीतून हे शब्द उतरले आणि ते वाचतावाचताच स्वरगंधर्व बाबूजींच्या मनात देस रुंजी घालू लागला आणि एक अप्रतीम गाणं जन्माला आलं. मंडळी, या गाण्याला दाद देतांना गदिमांबाबूजींइतकीच आमच्या देसलाही दाद द्यायला विसरू नका बरं का! :)
खरंच मंडळी, अहो ह्या देसमुळे मन प्रसन्न होतं अगदी! मनातले सगळे विकार नाहीसे करण्याची ताकद आहे याच्यात!
वसंत पवारांसरखा संगीत दिग्दर्शक आणि आशाताई-बाबुजींसरखे गायक एकत्र येतात आणि देस रागातलं एक केवळ अन् केवळ अप्रतीम गीत जन्माला येतं! कोणतं गीत?
रुपास भाळलो मी,
भुललो तुझ्या गुणांना
मज वेड लाविले तू
सांगू नको कुणाला!
एकान्त पाहुनिया,
जे तू मला म्हणाला,
ऐकून लाजले मी
सांगू नको कुणाला!
क्या बात है! प्रेम करणार्या दोन जिवांतलं हे गूज देसमध्ये ऐकायला किती सुंदर वाटतं, तरल वाटतं! क्या बात है वसंत पवारसाहेब! जियो...!
"सुखदां वरदां मातरम्, वन्दे मातरम् !"
काय ओळखलंत का मंडळी? अहो हा पण देसच की! अहो हा तर हा आपल्या देशाचा देस! :) उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अखंड भारताला एका सूत्रात बांधून ठेवायची अजब किमया साधली आहे देस मधल्या या राष्ट्रगीताने! या गीतातील देसच्या स्वरात आपल्या भारतीयांच्या संस्कृतीची, परंपरांची अन् सभ्यतेची, उत्सवप्रियतेची एक छानशी सावली दिसते! आणि म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्यवर्षाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात आमच्या अण्णांसारख्या दिग्गज गवयाचे 'वन्दे मातरम्'चे सूर संसदेत उमटतात, मनात देसप्रेम आणि देशप्रेम दोन्हीही जागृत होतं आणि जीव धन्य होतो!
आत्ताही माझ्या कानात काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर अण्णांनी गायलेल्या,
"बजे, सरगम बजे,
हर तरफसे सरगम बजे, गुंज बनके देस राग!"
ह्या गाण्याचे स्वर रुंजी घालत आहेत....!
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
16484
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
छान!
जियो तात्या !
बजे सरगम
रूपास भाळलो मी
आवडला
उत्तम
सुंदर!
तात्या...
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to मस्त by नंदन
+१
मस्त
छान माहीती
आवडला !
वा !!!
In reply to वा !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर लेख!
शैला दातार..
देवगंधर्व!
तात्या,
In reply to तात्या, by रामदास
रिबन डान्स
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to रिबन डान्स by नंदन
:)
छान
छानच
मस्त
मस्त तात्या
खुप छान
आभार...
राग रागीणी
मस्त
सुंदर लेख तात्या!
आभार...