मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

'नोकरशाई' च्या निमित्ताने

विनायक पाचलग ·
नोक्रशाईचे रंग या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेले एक मुक्तचिंतन. ''नोकरशाही व्यवस्था'' नाव घेतल्यावरच दचकलात ना!" आता कोणती नवी गडबड! "अशीच तुमचा प्रतिक्रिया असणार, अगदी बरोबर आहे. सर्वसामान्यांना नको वाटणारी अशीच ही व्यवस्था . ती सरकारी ऑफिसेस, गर्दी, ते कधीतरीच भेटणारे साहेबलोक! चहापाणी ,अग आई ग!आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेबलाखालची देवाण-घेवाण. थोडक्यात काय, तर लोकांना त्राही त्राही करून सोडणारी एक व्यवस्था आणि त्याचबरोबर मेंदूत अगदी नकळतपणे कुठेतरी उमटणारा 'नको रे बाबा!' चा सूर! खरे ना? सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात साधारणत: हेच चित्र उभे राहणार, आणि राहिलेच पाहिजे म्हणा!

तीन काळी गाणी

प्रदीप ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ही गाणी 'काळी' आहेत, कारण त्यांना दु:खाची तीव्र झालर आहे. नैराश्याची, वैफल्याची गडद छटा ह्या गाण्यांवर आहे. ही तिन्ही गाणी चित्रगुप्त ह्या थोड्या दुर्लक्षिलेल्या पण अत्यंत गुणी संगीतकारांकडे रफीसाहेबांनी अप्रतिम गायिलेली आहेत. दु:खाच्या चढत्या श्रेणीने (माझ्या मते, अर्थात) मी ती येथे देतो. पहिली दोन गाणी राजेंद्रकृष्ण ह्यांची आहेत. तिसरे साहिरचे. गाण्यात शब्द सर्वात महत्वाचे, त्यानंतर संगीत, गायन इ. सर्व. तेव्हा ह्या गाण्यांचे शब्द देत आहे, त्या नादात अपरिहार्यपणे लेख मोठा झाला आहे. पहिले गीत आहे 'मेरा क़सूर क्या है?

मीनाकुमारी

सहज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कपाळावरून घाम निथळत होता, मिटल्या डोळ्यांची गरगर वाढली होती. श्वासाची लय बिघडली होती. धडपडून मीना जागी झाली. कालपासून तिचे मन तसे सैरभैर होतेच पण उशाशी कोणीतरी बसून डोक्यावरुन हात फिरवत, "चल, बाळ घरी ये, सगळे जमलेत बघ" असे म्हणत आहे. आवाज ओळखीचा वाटतोय पण डोळे चिकटले आहेत व नीट काही बघताही येत नाही असा, भास व सत्याच्या मधला अनुभव तिला अतिशय संभ्रमित करुन गेला. आता झोपणं शक्यच नव्हतं म्हणून ती ऊठली आणि खोलीच्या बाहेर आली. हॉल मधे मालक-मालकीण टिव्ही बघत बसलेले होते. मालकीण बाईंनी घड्याळाकडे पहात विचारले, "काय ग? बरे नाही वाटत का, की अजून झोप येत नाहीये?

साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...)

पाषाणभेद ·
साप्ताहीक सदर- ताईचा सल्ला :- अ‍ॅडीशन टू (भूत कॉस्टींगचे...) प्रिय ताई, माझ्या डोक्यातून (भूत कॉस्टींगचे...) काही उतरत नाही. आता तर सगळेच जण भुतांबद्दल न भिता काहीतरी लिहीत आहे. म्हणून मी पण माझ्या घंद्यातून वेळ काढून हे पत्र लिहून तुझा वर्तमानपत्रातून जाहीर सल्ला मागत आहे. तु इतर टाईमपास सल्ल्याप्रमाणे मला सल्ला देणार नाही ही अपेक्षा बाळगून आहे. असो. (मला माझ्या एका आय.टी. रिटर्न्ड भिकारी मित्राची पाल्हाळ लावायची सवय लागली आहे.

पाणीपुरी

भोचक ·
पाणीपुरी हा काय पदार्थ आहे? 'पाणीपुरी' आणि तीही 'खायची'? छ्या. पुरीत भरलेलं पाणी प्यायचं की खायचं? आणि त्यातलं पाणी महत्त्वाचं की पुरी? त्या क्षुद्र पातळ पुरीला खायचं काय? (आणि त्या पुरीतल्या पाण्यात असतं तरी काय? नुस्तं आंबटगोडपणा. उगाचच, दिवस गेलेल्या बाईसारखं वाटतं.) खाणं म्हणजे कसं असावं, ज्यातून आत्मानंद, परमात्मानंद मिळाला पाहिजे. एकेक घास खाता खाता परमोच्च आनंदाची प्राप्ती झाल्याचा फील आला नाही तर ते खाणं कसलं? त्यामुळे आंबटगोड पाणीपुरीविषयी अस्मादिकांची मतं अशी 'तिखट' होती. पण इंदूरला आलो नि पुदिन्याचं पाणी पिऊन दुसर्‍या दिवशी पोटाचं जे होतं, तसे सगळे समज-गैरसमज 'स्वच्छ' झालेत.

शेयर मार्केट (बेसिक) भाग -३

दशानन ·
लेखनविषय:
पुढील भागात आपण ट्रेडिंगचे दोन प्रकार आहेत एक ऑफलाईन ट्रेडिंग व एक ऑनलाईन ट्रेडिंग ते समजावून घेऊ. मागील..

अ‍ॅन्टीगनी

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अ‍ॅन्टीगनी कडे वळण्यापूर्वी तीची पूर्वपिठीका पाहुयात. सोफोक्लीज च्या नाटकांबद्दल एक विचित्र कुतुहल असते.

एक पुस्तक वाचताना...

श्रावण मोडक ·
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.

मालवून टाक दीप

अन्वय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भूप म्हणजेच भूपाली. हा राग रात्रीच्या वेळी गायला जातो, असं म्हणतात. परंतु आपल्याकडे असंख्य भूपाळ्या आहेत. त्या याच रागातल्या. त्यामुळे हा राग रात्रीचा की पहाटेचा हा वादाचा विषय आहे. --- उत्तर रात्र उलटून गेलीय. पक्षांचा किलबिलाटही अद्याप सुरू व्हायचा आहे. काही वेळानंतर झुंजूमुजू होणार आहे. अशा धीरगंभीर वातावरणात भूपाळ्यांचे स्वर मनप्रसन्न करतात. या वातावरणातील शांत आणि गंभीर पण प्रसन्नभाव भूपमध्ये ओतप्रोत भरलेला आहे. हीच भूपची नादप्रवृत्ती असावी. सा रे ग प ध सा हे सहा स्वर असलेला हा राग त्यामुळेच उत्तररात्रीनंतर पहाटपर्यंत गायला जात असावा, असे वाटते. असो.

सोंगट्या, कवड्या, गंजिफा आणि सारीपाट

अभिरत भिरभि-या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
म्हैसूरजवळच्या एका संग्रहालयातील ही छायाचित्रे. माझ्या मित्राकडे सापडली. मी यातील अनेक गोष्टी प्रथमच बघितल्या होत्या. कदाचित तुमची ही पहिलीच वेळ असेल म्हणून शेअर करतोय :) मोबाईल कॅमेर्‍याने काढल्यामुळे दर्जा मर्यादित आहे. सांभाळून घ्या.