मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गरम आणि ‘ताप’दायक

हेमंतकुमार ·

स्मिता. 19/10/2020 - 18:03
साध्या-सोप्या भाषेत असलेला माहितीपूर्ण लेख! मी तुमचे लेख नेहमीच उत्सुकतेने वाचते. त्यातून वैद्यक क्षेत्रातली बरीच माहिती समजते आणि आपल्या शरीराच्या नव्याने ओळख होते. पुढील लेखांसाठी शुभेच्छा!

लेखन माहितीपूर्ण आहे, डॉक्टर साहेब. ताप येतो तेव्हा, किंवा डेंग्यू, मलेरिया यात जेव्हा ताप येतो तेव्हा ओल्या रुमालाने अंग पुसून घेतो हे किती लाभदायक असते ? आपण जरा वेळ अंग पुसले की पुन्हा जैसे थे परिस्थिती होते हा तात्पुरता उपाय असेल तर करीत राहावे की कसे ? आणि तापाचे मूळ निदान न होता ज्या काही गोळ्या दिल्या जातात त्या बद्दल तापामधे तातडीने मदत होईल असे काही उपाय ? गोळ्या ? -दिलीप बिरुटे

हेमंतकुमार 19/10/2020 - 19:56
स्मिता , धन्यवाद. प्राडॉ , चांगला प्रश्न. १. ताप उतरवण्यासाठी ओल्या रुमालाने अंग पुसून घेणे हा एक तात्पुरता प्रथमोपचार आहे. त्याचा परिणाम लवकर दिसतो, पण तो ही क्रिया चालू असेपर्यंतच टिकतो. याउलट तापविरोधी औषधाचा परिणाम सुरू व्हायला वेळ लागतो, पण तो पुढे काही तास टिकतो. म्हणून, डॉक्टर अथवा औषध उपलब्ध होईपर्यंत एक तात्पुरता उपचार म्हणून पाण्याच्या पट्ट्या ठीक आहेत. अलीकडे त्यासाठी गार ऐवजी कोमट पाणी (32 ते 35 C) वापरण्याची शिफारस केली आहे. २.
मूळ निदान न होता ज्या काही गोळ्या दिल्या जातात त्या बद्दल तापामधे तातडीने मदत
>>> Paracetamol ही सुरक्षित गोळी आहे. मुलांत Aspirin देऊ नये.

In reply to by हेमंतकुमार

पॅरोसिटॉमॉल ही गोळी सुरक्षित आहे या माहितीबद्दल धन्यवाद. पण, ताप आला की ताबडतोब फरक चाळीस मिनिटात घाम घेऊन रीलॅक्स फिलिंग कॉम्बीफ्लेमने वाटते, नीसीप्लस पण एक आहे, डो़कं दुखत असले की उपयोगाची. या गोळ्या पडीकच असतात आमच्याकडे. यांच्या उपयोगितेबद्दल काही ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेमंतकुमार 20/10/2020 - 14:59
Combi = paracet. + ibuprofen व्यक्तीशः मी कमीत कमी औषधे वापरावी या मताचा आहे. वरील मिश्रणाने उगाचच जठराम्लता अजून वाढते. मग तसे होऊ नये म्हणून अजून एक वेगळी गोळी घ्या.... असे ते वाढत जाते. माझ्या घरी Asp व paracet सोडून कुठलाही ‘साठा’ नसतो. या गोळ्यांची निम्मीएक स्ट्रिप कालबाह्य झाल्याने काही वर्षांनी फेकून द्यावी लागते !

Rajesh188 19/10/2020 - 21:49
ताप आला की लगेच क्रोसिन घेणे किंवा बाकी ताप उतरव्यासाठी औषध घेणे योग्य आहे का? तुमच्या लेखातील माहिती नुसार शारीरिक क्रिया मुळेच ताप येतो. मग त्या मध्ये जंतू संसर्ग झाला की शरीर त्याची प्रतिक्रिया देते हे एक कारण किंवा चयापचय क्रिये मुळे तापमान वाढते हे एक कारण. त्या मुळे एक प्रश्न उभा राहतो. एक दिवस वाट बघून नंतर औषध घेणे योग्य आहे की लगेच ताबडतोप औषध घेणे योग्य आहे. लगेच औषध घेवून आपण शरीराच्या कार्यात अडथळा तर आणत नाही ना.? कारण शरीर स्वतः च झालेली तापमान वाढ कमी करण्याचे प्रयत्न करत असते .

बाप्पू 19/10/2020 - 22:05
आणखी एक सहज सोपा लेख. धन्यवाद कुमार1 सर. वर राजेश यांनी जी शंका उपस्थित केलीय ती मला देखील आहे. शरीरामध्ये आपल्या पांढऱ्या पेशी विषाणू आणि जिवाणू चा प्रतिकार करताना शरीराचे तापमान वाढते. मग ताप आल्यावर लगेचच ताप करण्याची औषधं का घ्यायची? त्यामुळे त्या नैसर्गिक कार्यात अडथळा येत नाही का? आपली प्रतिकारशक्ती vs विषाणू या युद्धात ताप कमी करणारी औषधे नेमकी काय भूमिका बजावतात? अश्या वेळी ताप कमी करणारी औषधे घेण्याआधी आपण किती काळापर्यंत वाट पाहावी? आणि आणखी ही औषधं शरीरात जाऊन नेमकी काय करतात? ब्रेन ला काही सिग्नल देतात का? कि अजुन काही? ताप डोक्यात जातो म्हणजे नेमके काय? काही वेळेला फक्त रात्री ताप येतो आणि सकाळी निघून जातो ( विशेषतः लहान मुलांमध्ये ) ही काय भानगड असते.?

हेमंतकुमार 20/10/2020 - 09:22
राजेश व बाप्पू, आता एकेक मुद्दे घेतो.
ताप आला की लगेच क्रोसिन घेणे किंवा बाकी ताप उतरव्यासाठी औषध घेणे योग्य आहे का?
>>> बरोबर. लगेच औषध घेऊ नये. पण त्याचबरोबर हेही करावे: १. दर ३-४ तासांनी ताप मोजत राहावा. २. स्वतःच्या इतर लक्षणांवर नजर ठेवावी. ३. तापमान ३९ C चे वरच राहत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. ४. ताप ही जरी शरीर प्रतिक्रियाच असली तरी तो नियंत्रित केला पाहिजे.

हेमंतकुमार 20/10/2020 - 09:44
उच्च तापमानामुळे मेदूवर परिणाम का होतो (“ताप डोक्यात जाणे”) >>>
जर तीव्र ताप बराच काळ टिकला तर मेंदूत असे परिणाम होतात : १. पेशींची मोडतोड व प्रथिनांचा नाश २. पेशींचा दाह, सूज ३. रक्तप्रवाहात अडथळा. >>> आपल्या आकलना (cognition) वर विपरीत परिणाम >> समज, माहितीचे ग्रहण व स्मरण यांवर परिणाम.

हेमंतकुमार 20/10/2020 - 10:04
निरोगी अवस्थेतही आपले तापमान संध्याकाळी सर्वाधिक असते. बऱ्याच तपाजनक आजारांतही हा pattern टिकून राहतो. जेव्हा रुग्णाचे म्हणण्यानुसार ‘सकाळी बिलकूल ताप नसतो’ , तेव्हा तो प्रत्यक्ष मोजून खात्री केली पाहिजे. २४ तासांत तापात होणारे चढउतार हे त्याच्या मूळ कारणावर अवलंबून असतात. ताप आणणारे असंख्य आजार आहेत. त्यानुसार तापमानातील चढउतार वेगवेगळे आहेत.

Rajesh188 20/10/2020 - 14:01
36.3 आणि 37.3 C असते भावनिक आंदोलनात 2 c वाढत. म्हणजे 39.3 c होते हे किती वेळ राहिले म्हणजे normal समजायचे? दुसरे खूप लोकांचे तापमान हे 36.3 c पेक्षा कमी असते ते योग्य आहे का? तापमान 36.3 पेक्षा कमी असणे हे शरीराला हानिकारक असते असते का? असेल तर तापमान कमी झाले असेल तर ते वाढवण्यासाठी काही उपचार आहेत का?

हेमंतकुमार 20/10/2020 - 14:20
सोत्रि, धन्यवाद. राजेश, १
.भावनिक आंदोलनात 2 c वाढत.
>>> २ C याचा अर्थ जास्तीत जास्त २ ने. हे बरेचदा लहान मुलांत प्रचंड भितीमुळे येते. योग्य समुपदेशनाने ते ठीक होते. 2
. खूप लोकांचे तापमान हे 36.3 c पेक्षा कमी असते ते योग्य आहे का?
>> होय, त्यांचा मेंदूतील प्रमाणबिंदू जरा कमीकडे झुकलेला असतो. त्याची काळजी नको. ३५ C चे खाली गेल्यास तो ‘आजार’ आहे. कारणे शोधावी लागतात.

गवि 20/10/2020 - 15:14
उत्तम लेख. ताप उतरवणारी / वेदनाशामक औषधे होता होईल तोवर टाळतो. वेदना असह्य, म्हणजे झोप येणे अशक्य व्हावे इतक्या असतील तरच क्वचित घ्यावे असे मत. एरवी शक्य असल्यास विश्रांतीला प्राधान्य. ताप वगैरे सलग अनेक तास 103 वगैरेवर राहिला तरच तापावर औषध. दात हा एक अवयव मात्र कधी कोपला तर नाइलाज असतो. दाती तृण धरुन शरण यावे लागते.

धन्यवाद डॉक्टर.. सुदैवाने शालेय वयानंतर कधी डॉक्टर कडे जावं लागेल एवढा ताप आलेला नाही. कधी कधी ताप आला तर शक्यतो आराम, भरपूर द्रव, भूक कमी झाली तरी नॉर्मल जेवणे असं करून अंगावर काढतो. तिसऱ्या दिवशी कमी नाही झाला तर शक्यतो disprin. घरात नसेल तर क्रोसिन. disprin शक्यतो एका गोळीनंतर झोप झाली की मस्त घाम येऊन ताप उतरतो आणि एकदम हलकं वाटतं. बऱ्याचदा दुसऱ्या गोळीची गरज पडत नाही. मात्र विना गोळी शरीराला काम करू दिले तर थकवा फार येतो. ता. क. सध्या कंपनीत जाताना गेटवर तापमान तपासतात. आधी कपाळाला बघायचे, आता महिनाभरापासून मनगटाला बघतात. बहुधा कपाळाचे जास्त विश्वासार्ह नसावे.

हेमंतकुमार 22/10/2020 - 09:12
गवि, पैलवान, धन्यवाद.
दाती तृण धरुन शरण यावे लागते.
>>> अगदी ! *
गेटवर तापमान तपासतात. आधी कपाळाला बघायचे, आता महिनाभरापासून मनगटाला बघतात. बहुधा कपाळाचे जास्त विश्वासार्ह नसावे.
चांगला मुद्दा. शरीराचे तापमान अचूक मोजायचे असल्यास तापमापक शरीराला खेटून असला पाहिजे. त्यामुळे सध्या चाचणी म्हणून लांबून वापरायच्या गन्स निघाल्या आहेत, त्या प्रमाणित तापमापकाइतक्या अचूक नाहीत. अलीकडेच दोघांची तुलना करणारा एक लहानसा अभ्यास झाला. त्यानुसार, जेव्हा तापमान नॉर्मल असते तेव्हा या दोन्ही यंत्रांनी मोजलेले तापमान बर्‍यापैकी सारखे असते. पण तसा ताप चढत जातो तशी मग दोन्ही मापनांमधील फारकत स्पष्ट होऊ लागते.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 16/12/2020 - 18:19
चाळणी चाचणी म्हणून लांबून वापरायच्या गन्स निघाल्या आहेत, त्या प्रमाणित तापमापकाइतक्या अचूक नाहीत.
>>>> अधिक संशोधनातून या ‘गन्स’च्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. जेव्हा ताप चढू लागतो तेव्हा त्वचेखालच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे शरीरा’बाहेर’ पडणारी उष्णता बऱ्यापैकी कमी होते. >>> गनचे मापन विश्वासार्ह राहत नाही. जेव्हा ताप उतरू लागतो तेव्हा वरचा प्रकार बरोबर उलटा होतो. म्हणून दोन्ही वेळेस ‘हे’ तापमान गाभ्याशी विसंगत राहते. https://www.hopkinsmedicine.org/news/newsroom/news-releases/covid-19-sto...

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे 16/12/2020 - 19:10
लेसर तापमापक हा त्वचेचे तापमान पाहण्यासाठी वापरला तर अत्यंत बेभरवशी आहे असेच दिसून येते आहे आणि असे तापमान पाहणे हा एक अत्यंत भंपक प्रकार आहे. केवळ सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही कोव्हीड साठी आवश्यक सगळी काळजी घेतो हे दाखवण्यापलीकडे याचा काडीचाही उपयोग नाही कोणत्याही मॉल किंवा तत्सम ठिकाणी जेथे येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान मोजतात तेथे असलेले रजिस्टर पहा. ९० टक्के लोकांचे ८७ पासून ते ९५ अंश फॅरनहाईट असे काहीही तापमान लिहिलेले आढळते.

हेमंतकुमार 22/10/2020 - 15:12
लेखात लिहिल्याप्रमाणे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. भविष्यात कधीतरी घेईन. इथे थोडक्यात नको. धन्यवाद.

हेमंतकुमार 29/10/2020 - 16:29
वरील चर्चेत काही जणांनी स्वतःचे तापमान असल्याचे लिहीले आहे. या संदर्भात एक ताजे संशोधन वाचण्यात आले. जरी ते अमेरिकेतले असले तरी त्यातले काही मुद्दे सर्वांसाठी रोचक ठरावेत. १. ३७ हा सरासरी ‘नॉर्मल’ अंक जर्मन डॉ. कार्ल यांनी १८६७मध्ये निश्चित केला होता. २. तेव्हापासून ते आजपर्यंत निरोगी लोकांचे तापमान मोजण्याचे अनेक अभ्यास झालेले आहेत. ३. एक गृहीतक असे आहे की दर १० वर्षांत शरीर तापमानात ०.०३ C ने घट होत आहे. ४. या मागची कारणे अभ्यासली जात आहेत. त्यामध्ये आपली शरीररचना, शारीरिक हालचालींचे बदल, उबदार निवासव्यवस्था आणि प्रतिजैविकांचा वाढता वापर यांचा समावेश आहे. ................ भविष्यातील अधिकाधिक संशोधन आता यावर काय प्रकाश टाकते ते पाहू !

Bhakti 05/11/2020 - 22:03
लहान मुलांना ताप आल्यास sumol L + सिरप देते.पण एकदा लोकल डॉक्टरांनी viral fever मध्ये ibuprofen दिले,तरी ताप गेला नाही..नंतर hemorrhagic viral fever मध्ये ibuprofen देऊ नये असे वाचलंय. नेमक तेच दिल्याने complications वाढू शकतात का?. Plz hemorrhagic viral fever विषयी चांगला लेख सुचवा.

हेमंतकुमार 06/11/2020 - 07:38
भक्ती, Ibuprofen आणि त्या आजाराचा मुद्दा योग्यच. या औषधाने रक्तातील बिम्बिका पेशींवर परिणाम होऊ शकतो. त्यातून रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. VHFs ची सामान्य माणसांसाठी माहिती इथे आहे

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 06/11/2020 - 11:14
माहिती वाचून VHF हा देखील RNA virus ने होतो हे समजले. https://www.who.int/topics/haemorrhagic_fevers_viral/en/ WHO ने दिलेली VHF ची माहिती .

हेमंतकुमार 07/11/2020 - 11:39
Nimesulide
>> या औषधाचा एक तीव्र दुष्परिणाम म्हणजे यकृताला होणारी गंभीर इजा. ती विचारात घेता अमेरिका आणि काही युरोपीय देशांनी त्याच्यावर बंदी घातलेली आहे. मात्र अन्य बऱ्याच देशात ते अजूनही मिळते. भारतात हे औषध बारा वर्षाखालील मुलांसाठी वापरू नये असा संकेत आहे. विकिपीडियाच्या माहितीनुसार लहान मुलांसाठीचे याचे उत्पादन आता बंद आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय आणि दीर्घ मुदतीसाठी तर हे औषध घेऊ नयेच.

तनमयी 07/11/2020 - 11:42
Mefenamic acid जास्त ताप असला कि द्या असं सांगतात दुसरे dr जास्त देत नाहीत त्याने cough वाढतो असं म्हणतात . अजून एक कॉम्बो आहे पॅरासिटामोल विथ मेफनीक ऍसिड अशी औषध dr लहान मुलांना देतायत यावर काय सांगणार

तनमयी 07/11/2020 - 11:47
आता मोठा झालाय आता इम्युनिटी वाढली असावी लहान असताना खूप वेळा viral फेवर व्हयायचा दर महिन्याला औषधांचा मारा करावा लागायचा आता ठीक आहे सर्व

In reply to by तनमयी

Bhakti 07/11/2020 - 12:08
येस Immunity Booster वर साध्या माझा भर आहे. त्यात बीट (कोशिंबीर,शिरा ,धपाटे)पपई, डाळिंब ज्यूस यांचा समावेश रोज आहे.पपई पानांचा रस मागविणार आहे. Eat Apple Day Keep Doctor Away असंही म्हणू शकत नाही.किती इंजेक्शन्स दिली असतात.सो नो doctor says Apple . निदान आमच्या कडे तरी फ्रेश apple नाही मिळत.

हेमंतकुमार 07/11/2020 - 11:58
Mefenamic acid
या औषधाचे दुष्परिणाम : जठराचे अल्सर, यकृतदाह. अर्थात हे किती डोस व काळ घेणार यावर अवलंबून. काहींना त्वचेची तीव्र अलर्जी होऊ शकते. तज्ञाने हे औषध देताना रुग्णात खालील मुद्दे नसल्याचे बघावे: • रक्तन्यूनता • श्वासनलिकांतील अडथळा • हृदय, यकृत वा मूत्रपिंडाचे आजार. संबंधित रुग्ण-परिस्थिती आणि तज्ञाचे अनुभवानुसार वापर ठरेल.

हेमंतकुमार 13/03/2021 - 16:45
पुन्हा एकदा कोविडचे रुग्ण वाढू लागल्याने ‘गन’चा वापर करून सार्वजनिक ठिकाणी लोकांचे तापमान मोजणे वाढू लागेल. गनला शेवटी मर्यादा आहेतच. तरीसुद्धा चाळणी चाचणी म्हणून तिचा वापर करताना तज्ज्ञांनी खालील सूचना केल्या आहेत : १. एखादी व्यक्ती उन्हातून इमारतीत शिरल्यावर काही मिनिटे थांबून मगच तापमान मोजावे. २. जिचे तापमान मोजायचे आहे त्या व्यक्तीने डोक्यावरील टोपी आणि चष्मा काढून ठेवावा. ३. तसेच जर डोक्यावरील केस बरेच लोंबत असतील तर ते हाताने बऱ्यापैकी मागे सारावेत.

In reply to by हेमंतकुमार

Rajesh188 13/03/2021 - 16:51
त्यांच्या मध्ये गंभीर लक्षण पहिल्या पेक्षा जास्त वाढली आहेत का? मृत्यू चे प्रमाण वाढले आहे का? की. फक्त कोणतेच लक्षण नसलेले corona रुग्णांची संख्या वाढली आहे. फक्त संख्या वाढली असेल पण लक्षण सौम्य असतील तर त्याचा अर्थ काय काढला पाहिजे.

हेमंतकुमार 18/04/2024 - 11:26
राज्यात उकाडा वाढला; उष्माघाताचे ८२ रुग्ण .. जेव्हा शरीराचे तापमान 40°C (104°F) या मर्यादेच्या वर जाते तेव्हा मेंदू कार्यावर विपरीत परिणाम होतो. सध्याच्या तापमानात तान्ही मुले, वृद्ध आणि दीर्घकालीन मोठे आजार असणाऱ्या व्यक्तींची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच प्रत्यक्ष उन्हातील श्रम टाळले पाहिजेत. .. प्रखर उन्हाळ्यात शरीरातील जलसमतोल कसा राखता येईल यासंबंधी काही सोप्या सूचना इथल्या माहितीपत्रकात वाचता येतील त्यातले महत्वाचे मुद्दे अधोरेखित करतो : . बंदिस्त जागेत काम करणाऱ्या सर्वसाधारण माणसाला योग्य प्रमाणात पाणी पिणे हे पुरेसे आहे. त्याचबरोबर जेवणाच्या वेळाही नियमित पाळाव्यात. पाणी पिण्यासंबंधी काही उपयुक्त सूचना : १. प्रत्यक्ष तहान लागण्यापूर्वीच पाणी प्यावे. २. खूप वेळाने एकदम जास्त पाणी पिण्याऐवजी कमी अंतराने सामान्य प्रमाणातील पाणी पित राहणे अधिक महत्त्वाचे. ३. लघवीचा रंग ही जलसमतोल पारखण्याची सर्वात सोपी स्वयंचाचणी ! . खालील पेये टाळावीत : १. तथाकथित 'शक्तिवर्धक' कृत्रिम पेये : यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कॅफीन असते. २. अतिरिक्त गोड असलेली पेये ३. मद्य * Water is generally sufficient for hydration * अन्य नैसर्गिक पेयांचा आस्वाद आपापल्या आवडीनुसार घ्यावा :)

वामन देशमुख 21/04/2024 - 11:48
' लेख व प्रतिक्रिया वाचतो आहे. नेहमीप्रमाणेच साध्यासोप्या भाषेत समजावून सांगताय. ---
Water is generally sufficient for hydration सामान्यतः पाणी हायड्रेशन(मराठी?)साठी पुरेसे असते.
सवांतर (कदाचित मूर्ख शंका): अनेकदा, "उन्हाळ्यात रसदार फळे खा, शरीरातील पाणी टिकून राहायला मदत होईल" असे कानावर येते; पण मग फळे खाण्यापेक्षा थेट पाणीच पिलेले चांगले नाही का? टरबूज, काकडी, पाणी असे पर्याय असतील तर हायड्रेशनसाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? --- अवांतर: काही समाजघटकांचा बाहेरील वातावरणाशी असा किती संपर्क येतो? मागच्या दहा वर्षांत आपल्यापैकी कितीजण (नको असताना) - - पावसात जाम भिजलो, काहीच आडोसा नव्हता - थंडीत कुडकुडलो, खूपच त्रास झाला - उन्हाच्या झळा लागत होत्या, अगदी जीव नकोसा झाला अश्या अनुभवातून गेले आहेत? - शंकासुर वामन '

In reply to by वामन देशमुख

हेमंतकुमार 21/04/2024 - 15:39
Hydration = जलसमतोल dehydration = जलन्यूनता समाजातील जो वर्ग बंदिस्त हवामानात वातावरणात आणि सुखद गारव्यात पांढरपेशा स्वरूपाचे काम करतो आहे त्यांना काळजीचे कारण नसते. त्यांनी समतोल आहार वेळच्यावेळी घेतला तर समतोलसाठी पुरेसे पाणी पिणेच योग्य. ज्यांना उन्हामध्ये बरीच फिरती वगैरे आहे किंवा काही काळ तरी प्रत्यक्ष उन्हात काम करावे लागते त्यांच्यासाठी पाणीदार फळांचे सेवन अधिक उपयुक्त ठरेल.

कांदा लिंबू 21/04/2024 - 11:55
कृपया हे वाचा खूप उपयुक्त !! "वैद्यकीय महाविद्यालयात, प्राध्यापक मेडीकलच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषधशास्त्र शिकवत होते, त्यांनी खालील प्रश्न विचारला: "वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणे कोणती?" काहीचे उत्तर: "डोक्यात ट्यूमर". त्यांनी उत्तर दिले: नाही! इतरांनी सुचवले: "अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे". त्यांनी पुन्हा उत्तर दिले: नाही! त्यांच्या प्रत्येक उत्तराच्या नकारानंतर त्यांचे प्रतिसाद येणं बंद होतं त्यांनी सर्वात सामान्य कारण सूचीबद्ध केले ते म्हणजे - निर्जलीकरण हे विनोदी वाटेल; पण ते खरे आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना तहान लागणे बंद होते आणि परिणामी, द्रव पदार्थ पिणे थांबवतात . आणि त्यांना द्रव पदार्थ सेवनाची आठवण करून देण्यासाठी आजूबाजूला कोणीही नसते तेव्हा ते लवकर निर्जलीकृत होतात. निर्जलीकरण गंभीर आहे आणि संपूर्ण शरीरावर परिणाम करते. यामुळे अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, एनजाइना (छातीत दुखणे), कोमा आणि मृत्यू देखील ओढवू शकतो. द्रव पिणे विसरण्याची ही सवय वयाच्या ६० व्या वर्षी सुरू होते, जेव्हा आपल्या शरीरात ५०% पेक्षा जास्त पाणी असते. ६० वर्षांवरील लोकांकडे पाण्याचा साठा कमी असतो. हा नैसर्गिक वृद्धत्व प्रक्रियेचा भाग आहे. त्यात आणखी गुंतागुंत अशी कि जरी ते निर्जलित असले तरी, त्यांना पाणी प्यावेसे वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत संतुलन यंत्रणा फारशी काम करत नाही. निष्कर्ष: 60 वर्षांहून अधिक वयाचे लोक सहजपणे निर्जली कृत होतात, इतकेच नव्हे तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता आहे हे जाणवत नाही. जरी ६० वर्षांपेक्षा जास्त लोक निरोगी दिसत असले तरी, प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्ये त्यांच्या संपूर्ण शरीराला हानी पोहोचवू शकतात. म्हणून येथे दोन सूचना कराव्या शा वाटतात: १) द्रव पदार्थ सेवनाची सवय लावा. द्रवपदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळाचे पाणी, सूप आणि टरबूज, खरबूज, पीच आणि अननस यांसारखी पाणी समृद्ध फळे यांचा समावेश होतो; ऑरेंज आणि टेंजेरिन पण हे काम करतात. महत्त्वाची गोष्ट अशी की, दर दोन तासांनी तुम्ही काही द्रव पदार्थ सेवन करावे. हे लक्षात ठेवा ! 2) कुटुंबातील सदस्यांसाठी इशारा: 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सतत द्रव पदार्थ द्या. ते जेव्हा द्रवपदार्थ नाकारतात आणि तशा दिवसात चिडचिड करतात, अस्वस्थ दिसतात, ती निश्चितच त्यांच्या निर्जलीकरणाची लक्षणे आहेत. तेव्हा ज्येष्ठांनी दर तासाला जास्तीतजास्त पाणी प्यावयांची सवय लावा. ही माहिती इतरांना पाठवावी. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी आपल्या ग्रुप मध्ये जरुर शेअर करावे

In reply to by कांदा लिंबू

हेमंतकुमार 21/04/2024 - 15:44
वरील संदेशात तथ्य आहे परंतु साठीवरील सर्वांनाच तो मुद्दा सरसकट लागू होणार नाही; प्रकृतीनुसार ठरवावे लागेल. वयस्कर लोकांमधील दोन महत्त्वाच्या घडामोडी अशा : १. तहानेची भावना काही प्रमाणात कमी होते आणि मूत्रपिंड पाणी शोषण करण्याच्या कामात जरा कमी पडते. २. तसेच वातावरणातल्या तापमानाशी जुळवून घेण्याची शारीरिक क्षमता काही प्रमाणात कमी होते * परंतु मुख्य प्रश्न उद्भवतात ते स्मरणशक्ती आणि आकलनावर परिणाम झालेल्या वृद्धांच्या बाबतीत. असे काही आजार असले की मग पाणी पिण्याचे समजतच नाही. त्याच्या जोडीला जर शारीरिक दुर्बलता येऊन हालचाली करणे खूप कमी झाले तर त्याचाही पाणी पिण्यावर परिणाम होतो. * मधुमेहींच्या बाबतीत जर आजार नियंत्रणात राहत नसेल तर जलन्यूनता होण्याचा धोका वाढतो.

गवि 21/04/2024 - 12:38
निर्जलीकरण या महत्त्वाच्या विषयावर काही चर्चा वाचली. सध्या तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली असल्याने हा विषय अधिकच सुसंगत आहे. याचवेळी चिकित्सा किंवा तत्सम नावाने अतिरिक्त पाणी पिणे, सतत पाणी पीत राहणे, क्षमतेपेक्षा जास्त पाणी रिचवत राहणे यासारख्या टोकाच्या गोष्टी काही लोक करताना दिसतात. पूर्वी एक ओळखीचे चाळिशीतले गृहस्थ जलचिकित्सा करताना पाणी पिणे अति झाल्याने अत्यवस्थ होऊन कमी वेळातच अचानक निधन पावले होते. हे दुर्मिळ असले तरी वॉटर टॉक्सीसिटी असा प्रकार ऐकला आहे खरा.

In reply to by गवि

हेमंतकुमार 21/04/2024 - 15:46
अति पाणी पिण्याची घातकता या विषयावर स्वतंत्र लेखात माहिती आहे आणि चर्चाही झाली आहे. त्याचा सारांश असा : जोपर्यंत मूत्रपिंडे तंदुरुस्त आहेत, मेंदूतील तहान नियंत्रण व्यवस्थित काम करतंय आणि संबंधित हॉर्मोन्सही व्यवस्थित स्त्रवत आहेत, तोपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी प्याल्याने दुष्परिणाम व्हायचे काही कारण नाही.

In reply to by हेमंतकुमार

गवि 21/04/2024 - 16:12
मी गरजेपेक्षा अधिक पाणी पिण्याबद्दल बोलत नसून सतत आणि क्षमतेपेक्षा अधिक पाणी उपचार या नावाखाली पिण्याबद्दल बोलत होतो. तडस लागली तरी, उलटून पडले तरी, जीव घाबरा होईपर्यंत पाणी पीतच राहणे असे काहीसे घडत असावे. पण अर्थातच ते दुर्मिळच म्हणावे लागेल.

In reply to by गवि

हेमंतकुमार 21/04/2024 - 16:20
ते दुर्मिळच म्हणावे लागेल.
+१ जर 'नॉर्मल' माणसाने भरमसाट पाणी ढोसायचेच म्हटले, तर एक क्षण असा येईल की आपल्याला पाणी पाहूनच प्रचंड मळमळ होईल आणि ताबडतोब उलटी सुद्धा होईल.

हेमंतकुमार 23/04/2024 - 08:37
कडक उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. यामागे मेंदूतील रासायनिक घडामोडी आहेत. एरवी सुद्धा जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा मेंदूतून डोपामिन आणि अन्य काही चेतना रसायने मोठ्या प्रमाणात स्त्रवतात. त्यामुळे आपल्याला सुखद तृप्तीची भावना होते आणि हा अनुभव पुन्हा घ्यायचा वाटतो. याला शरीरशास्त्रात reward यंत्रणा असे म्हटले जाते. उन्हाळ्यात जर श्रम झाले असतील तर वरील यंत्रणा नेहमीपेक्षाही अधिक पातळीवर चेतविली जाते.

स्मिता. 19/10/2020 - 18:03
साध्या-सोप्या भाषेत असलेला माहितीपूर्ण लेख! मी तुमचे लेख नेहमीच उत्सुकतेने वाचते. त्यातून वैद्यक क्षेत्रातली बरीच माहिती समजते आणि आपल्या शरीराच्या नव्याने ओळख होते. पुढील लेखांसाठी शुभेच्छा!

लेखन माहितीपूर्ण आहे, डॉक्टर साहेब. ताप येतो तेव्हा, किंवा डेंग्यू, मलेरिया यात जेव्हा ताप येतो तेव्हा ओल्या रुमालाने अंग पुसून घेतो हे किती लाभदायक असते ? आपण जरा वेळ अंग पुसले की पुन्हा जैसे थे परिस्थिती होते हा तात्पुरता उपाय असेल तर करीत राहावे की कसे ? आणि तापाचे मूळ निदान न होता ज्या काही गोळ्या दिल्या जातात त्या बद्दल तापामधे तातडीने मदत होईल असे काही उपाय ? गोळ्या ? -दिलीप बिरुटे

हेमंतकुमार 19/10/2020 - 19:56
स्मिता , धन्यवाद. प्राडॉ , चांगला प्रश्न. १. ताप उतरवण्यासाठी ओल्या रुमालाने अंग पुसून घेणे हा एक तात्पुरता प्रथमोपचार आहे. त्याचा परिणाम लवकर दिसतो, पण तो ही क्रिया चालू असेपर्यंतच टिकतो. याउलट तापविरोधी औषधाचा परिणाम सुरू व्हायला वेळ लागतो, पण तो पुढे काही तास टिकतो. म्हणून, डॉक्टर अथवा औषध उपलब्ध होईपर्यंत एक तात्पुरता उपचार म्हणून पाण्याच्या पट्ट्या ठीक आहेत. अलीकडे त्यासाठी गार ऐवजी कोमट पाणी (32 ते 35 C) वापरण्याची शिफारस केली आहे. २.
मूळ निदान न होता ज्या काही गोळ्या दिल्या जातात त्या बद्दल तापामधे तातडीने मदत
>>> Paracetamol ही सुरक्षित गोळी आहे. मुलांत Aspirin देऊ नये.

In reply to by हेमंतकुमार

पॅरोसिटॉमॉल ही गोळी सुरक्षित आहे या माहितीबद्दल धन्यवाद. पण, ताप आला की ताबडतोब फरक चाळीस मिनिटात घाम घेऊन रीलॅक्स फिलिंग कॉम्बीफ्लेमने वाटते, नीसीप्लस पण एक आहे, डो़कं दुखत असले की उपयोगाची. या गोळ्या पडीकच असतात आमच्याकडे. यांच्या उपयोगितेबद्दल काही ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेमंतकुमार 20/10/2020 - 14:59
Combi = paracet. + ibuprofen व्यक्तीशः मी कमीत कमी औषधे वापरावी या मताचा आहे. वरील मिश्रणाने उगाचच जठराम्लता अजून वाढते. मग तसे होऊ नये म्हणून अजून एक वेगळी गोळी घ्या.... असे ते वाढत जाते. माझ्या घरी Asp व paracet सोडून कुठलाही ‘साठा’ नसतो. या गोळ्यांची निम्मीएक स्ट्रिप कालबाह्य झाल्याने काही वर्षांनी फेकून द्यावी लागते !

Rajesh188 19/10/2020 - 21:49
ताप आला की लगेच क्रोसिन घेणे किंवा बाकी ताप उतरव्यासाठी औषध घेणे योग्य आहे का? तुमच्या लेखातील माहिती नुसार शारीरिक क्रिया मुळेच ताप येतो. मग त्या मध्ये जंतू संसर्ग झाला की शरीर त्याची प्रतिक्रिया देते हे एक कारण किंवा चयापचय क्रिये मुळे तापमान वाढते हे एक कारण. त्या मुळे एक प्रश्न उभा राहतो. एक दिवस वाट बघून नंतर औषध घेणे योग्य आहे की लगेच ताबडतोप औषध घेणे योग्य आहे. लगेच औषध घेवून आपण शरीराच्या कार्यात अडथळा तर आणत नाही ना.? कारण शरीर स्वतः च झालेली तापमान वाढ कमी करण्याचे प्रयत्न करत असते .

बाप्पू 19/10/2020 - 22:05
आणखी एक सहज सोपा लेख. धन्यवाद कुमार1 सर. वर राजेश यांनी जी शंका उपस्थित केलीय ती मला देखील आहे. शरीरामध्ये आपल्या पांढऱ्या पेशी विषाणू आणि जिवाणू चा प्रतिकार करताना शरीराचे तापमान वाढते. मग ताप आल्यावर लगेचच ताप करण्याची औषधं का घ्यायची? त्यामुळे त्या नैसर्गिक कार्यात अडथळा येत नाही का? आपली प्रतिकारशक्ती vs विषाणू या युद्धात ताप कमी करणारी औषधे नेमकी काय भूमिका बजावतात? अश्या वेळी ताप कमी करणारी औषधे घेण्याआधी आपण किती काळापर्यंत वाट पाहावी? आणि आणखी ही औषधं शरीरात जाऊन नेमकी काय करतात? ब्रेन ला काही सिग्नल देतात का? कि अजुन काही? ताप डोक्यात जातो म्हणजे नेमके काय? काही वेळेला फक्त रात्री ताप येतो आणि सकाळी निघून जातो ( विशेषतः लहान मुलांमध्ये ) ही काय भानगड असते.?

हेमंतकुमार 20/10/2020 - 09:22
राजेश व बाप्पू, आता एकेक मुद्दे घेतो.
ताप आला की लगेच क्रोसिन घेणे किंवा बाकी ताप उतरव्यासाठी औषध घेणे योग्य आहे का?
>>> बरोबर. लगेच औषध घेऊ नये. पण त्याचबरोबर हेही करावे: १. दर ३-४ तासांनी ताप मोजत राहावा. २. स्वतःच्या इतर लक्षणांवर नजर ठेवावी. ३. तापमान ३९ C चे वरच राहत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. ४. ताप ही जरी शरीर प्रतिक्रियाच असली तरी तो नियंत्रित केला पाहिजे.

हेमंतकुमार 20/10/2020 - 09:44
उच्च तापमानामुळे मेदूवर परिणाम का होतो (“ताप डोक्यात जाणे”) >>>
जर तीव्र ताप बराच काळ टिकला तर मेंदूत असे परिणाम होतात : १. पेशींची मोडतोड व प्रथिनांचा नाश २. पेशींचा दाह, सूज ३. रक्तप्रवाहात अडथळा. >>> आपल्या आकलना (cognition) वर विपरीत परिणाम >> समज, माहितीचे ग्रहण व स्मरण यांवर परिणाम.

हेमंतकुमार 20/10/2020 - 10:04
निरोगी अवस्थेतही आपले तापमान संध्याकाळी सर्वाधिक असते. बऱ्याच तपाजनक आजारांतही हा pattern टिकून राहतो. जेव्हा रुग्णाचे म्हणण्यानुसार ‘सकाळी बिलकूल ताप नसतो’ , तेव्हा तो प्रत्यक्ष मोजून खात्री केली पाहिजे. २४ तासांत तापात होणारे चढउतार हे त्याच्या मूळ कारणावर अवलंबून असतात. ताप आणणारे असंख्य आजार आहेत. त्यानुसार तापमानातील चढउतार वेगवेगळे आहेत.

Rajesh188 20/10/2020 - 14:01
36.3 आणि 37.3 C असते भावनिक आंदोलनात 2 c वाढत. म्हणजे 39.3 c होते हे किती वेळ राहिले म्हणजे normal समजायचे? दुसरे खूप लोकांचे तापमान हे 36.3 c पेक्षा कमी असते ते योग्य आहे का? तापमान 36.3 पेक्षा कमी असणे हे शरीराला हानिकारक असते असते का? असेल तर तापमान कमी झाले असेल तर ते वाढवण्यासाठी काही उपचार आहेत का?

हेमंतकुमार 20/10/2020 - 14:20
सोत्रि, धन्यवाद. राजेश, १
.भावनिक आंदोलनात 2 c वाढत.
>>> २ C याचा अर्थ जास्तीत जास्त २ ने. हे बरेचदा लहान मुलांत प्रचंड भितीमुळे येते. योग्य समुपदेशनाने ते ठीक होते. 2
. खूप लोकांचे तापमान हे 36.3 c पेक्षा कमी असते ते योग्य आहे का?
>> होय, त्यांचा मेंदूतील प्रमाणबिंदू जरा कमीकडे झुकलेला असतो. त्याची काळजी नको. ३५ C चे खाली गेल्यास तो ‘आजार’ आहे. कारणे शोधावी लागतात.

गवि 20/10/2020 - 15:14
उत्तम लेख. ताप उतरवणारी / वेदनाशामक औषधे होता होईल तोवर टाळतो. वेदना असह्य, म्हणजे झोप येणे अशक्य व्हावे इतक्या असतील तरच क्वचित घ्यावे असे मत. एरवी शक्य असल्यास विश्रांतीला प्राधान्य. ताप वगैरे सलग अनेक तास 103 वगैरेवर राहिला तरच तापावर औषध. दात हा एक अवयव मात्र कधी कोपला तर नाइलाज असतो. दाती तृण धरुन शरण यावे लागते.

धन्यवाद डॉक्टर.. सुदैवाने शालेय वयानंतर कधी डॉक्टर कडे जावं लागेल एवढा ताप आलेला नाही. कधी कधी ताप आला तर शक्यतो आराम, भरपूर द्रव, भूक कमी झाली तरी नॉर्मल जेवणे असं करून अंगावर काढतो. तिसऱ्या दिवशी कमी नाही झाला तर शक्यतो disprin. घरात नसेल तर क्रोसिन. disprin शक्यतो एका गोळीनंतर झोप झाली की मस्त घाम येऊन ताप उतरतो आणि एकदम हलकं वाटतं. बऱ्याचदा दुसऱ्या गोळीची गरज पडत नाही. मात्र विना गोळी शरीराला काम करू दिले तर थकवा फार येतो. ता. क. सध्या कंपनीत जाताना गेटवर तापमान तपासतात. आधी कपाळाला बघायचे, आता महिनाभरापासून मनगटाला बघतात. बहुधा कपाळाचे जास्त विश्वासार्ह नसावे.

हेमंतकुमार 22/10/2020 - 09:12
गवि, पैलवान, धन्यवाद.
दाती तृण धरुन शरण यावे लागते.
>>> अगदी ! *
गेटवर तापमान तपासतात. आधी कपाळाला बघायचे, आता महिनाभरापासून मनगटाला बघतात. बहुधा कपाळाचे जास्त विश्वासार्ह नसावे.
चांगला मुद्दा. शरीराचे तापमान अचूक मोजायचे असल्यास तापमापक शरीराला खेटून असला पाहिजे. त्यामुळे सध्या चाचणी म्हणून लांबून वापरायच्या गन्स निघाल्या आहेत, त्या प्रमाणित तापमापकाइतक्या अचूक नाहीत. अलीकडेच दोघांची तुलना करणारा एक लहानसा अभ्यास झाला. त्यानुसार, जेव्हा तापमान नॉर्मल असते तेव्हा या दोन्ही यंत्रांनी मोजलेले तापमान बर्‍यापैकी सारखे असते. पण तसा ताप चढत जातो तशी मग दोन्ही मापनांमधील फारकत स्पष्ट होऊ लागते.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 16/12/2020 - 18:19
चाळणी चाचणी म्हणून लांबून वापरायच्या गन्स निघाल्या आहेत, त्या प्रमाणित तापमापकाइतक्या अचूक नाहीत.
>>>> अधिक संशोधनातून या ‘गन्स’च्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. जेव्हा ताप चढू लागतो तेव्हा त्वचेखालच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे शरीरा’बाहेर’ पडणारी उष्णता बऱ्यापैकी कमी होते. >>> गनचे मापन विश्वासार्ह राहत नाही. जेव्हा ताप उतरू लागतो तेव्हा वरचा प्रकार बरोबर उलटा होतो. म्हणून दोन्ही वेळेस ‘हे’ तापमान गाभ्याशी विसंगत राहते. https://www.hopkinsmedicine.org/news/newsroom/news-releases/covid-19-sto...

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे 16/12/2020 - 19:10
लेसर तापमापक हा त्वचेचे तापमान पाहण्यासाठी वापरला तर अत्यंत बेभरवशी आहे असेच दिसून येते आहे आणि असे तापमान पाहणे हा एक अत्यंत भंपक प्रकार आहे. केवळ सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही कोव्हीड साठी आवश्यक सगळी काळजी घेतो हे दाखवण्यापलीकडे याचा काडीचाही उपयोग नाही कोणत्याही मॉल किंवा तत्सम ठिकाणी जेथे येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान मोजतात तेथे असलेले रजिस्टर पहा. ९० टक्के लोकांचे ८७ पासून ते ९५ अंश फॅरनहाईट असे काहीही तापमान लिहिलेले आढळते.

हेमंतकुमार 22/10/2020 - 15:12
लेखात लिहिल्याप्रमाणे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. भविष्यात कधीतरी घेईन. इथे थोडक्यात नको. धन्यवाद.

हेमंतकुमार 29/10/2020 - 16:29
वरील चर्चेत काही जणांनी स्वतःचे तापमान असल्याचे लिहीले आहे. या संदर्भात एक ताजे संशोधन वाचण्यात आले. जरी ते अमेरिकेतले असले तरी त्यातले काही मुद्दे सर्वांसाठी रोचक ठरावेत. १. ३७ हा सरासरी ‘नॉर्मल’ अंक जर्मन डॉ. कार्ल यांनी १८६७मध्ये निश्चित केला होता. २. तेव्हापासून ते आजपर्यंत निरोगी लोकांचे तापमान मोजण्याचे अनेक अभ्यास झालेले आहेत. ३. एक गृहीतक असे आहे की दर १० वर्षांत शरीर तापमानात ०.०३ C ने घट होत आहे. ४. या मागची कारणे अभ्यासली जात आहेत. त्यामध्ये आपली शरीररचना, शारीरिक हालचालींचे बदल, उबदार निवासव्यवस्था आणि प्रतिजैविकांचा वाढता वापर यांचा समावेश आहे. ................ भविष्यातील अधिकाधिक संशोधन आता यावर काय प्रकाश टाकते ते पाहू !

Bhakti 05/11/2020 - 22:03
लहान मुलांना ताप आल्यास sumol L + सिरप देते.पण एकदा लोकल डॉक्टरांनी viral fever मध्ये ibuprofen दिले,तरी ताप गेला नाही..नंतर hemorrhagic viral fever मध्ये ibuprofen देऊ नये असे वाचलंय. नेमक तेच दिल्याने complications वाढू शकतात का?. Plz hemorrhagic viral fever विषयी चांगला लेख सुचवा.

हेमंतकुमार 06/11/2020 - 07:38
भक्ती, Ibuprofen आणि त्या आजाराचा मुद्दा योग्यच. या औषधाने रक्तातील बिम्बिका पेशींवर परिणाम होऊ शकतो. त्यातून रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. VHFs ची सामान्य माणसांसाठी माहिती इथे आहे

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 06/11/2020 - 11:14
माहिती वाचून VHF हा देखील RNA virus ने होतो हे समजले. https://www.who.int/topics/haemorrhagic_fevers_viral/en/ WHO ने दिलेली VHF ची माहिती .

हेमंतकुमार 07/11/2020 - 11:39
Nimesulide
>> या औषधाचा एक तीव्र दुष्परिणाम म्हणजे यकृताला होणारी गंभीर इजा. ती विचारात घेता अमेरिका आणि काही युरोपीय देशांनी त्याच्यावर बंदी घातलेली आहे. मात्र अन्य बऱ्याच देशात ते अजूनही मिळते. भारतात हे औषध बारा वर्षाखालील मुलांसाठी वापरू नये असा संकेत आहे. विकिपीडियाच्या माहितीनुसार लहान मुलांसाठीचे याचे उत्पादन आता बंद आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय आणि दीर्घ मुदतीसाठी तर हे औषध घेऊ नयेच.

तनमयी 07/11/2020 - 11:42
Mefenamic acid जास्त ताप असला कि द्या असं सांगतात दुसरे dr जास्त देत नाहीत त्याने cough वाढतो असं म्हणतात . अजून एक कॉम्बो आहे पॅरासिटामोल विथ मेफनीक ऍसिड अशी औषध dr लहान मुलांना देतायत यावर काय सांगणार

तनमयी 07/11/2020 - 11:47
आता मोठा झालाय आता इम्युनिटी वाढली असावी लहान असताना खूप वेळा viral फेवर व्हयायचा दर महिन्याला औषधांचा मारा करावा लागायचा आता ठीक आहे सर्व

In reply to by तनमयी

Bhakti 07/11/2020 - 12:08
येस Immunity Booster वर साध्या माझा भर आहे. त्यात बीट (कोशिंबीर,शिरा ,धपाटे)पपई, डाळिंब ज्यूस यांचा समावेश रोज आहे.पपई पानांचा रस मागविणार आहे. Eat Apple Day Keep Doctor Away असंही म्हणू शकत नाही.किती इंजेक्शन्स दिली असतात.सो नो doctor says Apple . निदान आमच्या कडे तरी फ्रेश apple नाही मिळत.

हेमंतकुमार 07/11/2020 - 11:58
Mefenamic acid
या औषधाचे दुष्परिणाम : जठराचे अल्सर, यकृतदाह. अर्थात हे किती डोस व काळ घेणार यावर अवलंबून. काहींना त्वचेची तीव्र अलर्जी होऊ शकते. तज्ञाने हे औषध देताना रुग्णात खालील मुद्दे नसल्याचे बघावे: • रक्तन्यूनता • श्वासनलिकांतील अडथळा • हृदय, यकृत वा मूत्रपिंडाचे आजार. संबंधित रुग्ण-परिस्थिती आणि तज्ञाचे अनुभवानुसार वापर ठरेल.

हेमंतकुमार 13/03/2021 - 16:45
पुन्हा एकदा कोविडचे रुग्ण वाढू लागल्याने ‘गन’चा वापर करून सार्वजनिक ठिकाणी लोकांचे तापमान मोजणे वाढू लागेल. गनला शेवटी मर्यादा आहेतच. तरीसुद्धा चाळणी चाचणी म्हणून तिचा वापर करताना तज्ज्ञांनी खालील सूचना केल्या आहेत : १. एखादी व्यक्ती उन्हातून इमारतीत शिरल्यावर काही मिनिटे थांबून मगच तापमान मोजावे. २. जिचे तापमान मोजायचे आहे त्या व्यक्तीने डोक्यावरील टोपी आणि चष्मा काढून ठेवावा. ३. तसेच जर डोक्यावरील केस बरेच लोंबत असतील तर ते हाताने बऱ्यापैकी मागे सारावेत.

In reply to by हेमंतकुमार

Rajesh188 13/03/2021 - 16:51
त्यांच्या मध्ये गंभीर लक्षण पहिल्या पेक्षा जास्त वाढली आहेत का? मृत्यू चे प्रमाण वाढले आहे का? की. फक्त कोणतेच लक्षण नसलेले corona रुग्णांची संख्या वाढली आहे. फक्त संख्या वाढली असेल पण लक्षण सौम्य असतील तर त्याचा अर्थ काय काढला पाहिजे.

हेमंतकुमार 18/04/2024 - 11:26
राज्यात उकाडा वाढला; उष्माघाताचे ८२ रुग्ण .. जेव्हा शरीराचे तापमान 40°C (104°F) या मर्यादेच्या वर जाते तेव्हा मेंदू कार्यावर विपरीत परिणाम होतो. सध्याच्या तापमानात तान्ही मुले, वृद्ध आणि दीर्घकालीन मोठे आजार असणाऱ्या व्यक्तींची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच प्रत्यक्ष उन्हातील श्रम टाळले पाहिजेत. .. प्रखर उन्हाळ्यात शरीरातील जलसमतोल कसा राखता येईल यासंबंधी काही सोप्या सूचना इथल्या माहितीपत्रकात वाचता येतील त्यातले महत्वाचे मुद्दे अधोरेखित करतो : . बंदिस्त जागेत काम करणाऱ्या सर्वसाधारण माणसाला योग्य प्रमाणात पाणी पिणे हे पुरेसे आहे. त्याचबरोबर जेवणाच्या वेळाही नियमित पाळाव्यात. पाणी पिण्यासंबंधी काही उपयुक्त सूचना : १. प्रत्यक्ष तहान लागण्यापूर्वीच पाणी प्यावे. २. खूप वेळाने एकदम जास्त पाणी पिण्याऐवजी कमी अंतराने सामान्य प्रमाणातील पाणी पित राहणे अधिक महत्त्वाचे. ३. लघवीचा रंग ही जलसमतोल पारखण्याची सर्वात सोपी स्वयंचाचणी ! . खालील पेये टाळावीत : १. तथाकथित 'शक्तिवर्धक' कृत्रिम पेये : यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कॅफीन असते. २. अतिरिक्त गोड असलेली पेये ३. मद्य * Water is generally sufficient for hydration * अन्य नैसर्गिक पेयांचा आस्वाद आपापल्या आवडीनुसार घ्यावा :)

वामन देशमुख 21/04/2024 - 11:48
' लेख व प्रतिक्रिया वाचतो आहे. नेहमीप्रमाणेच साध्यासोप्या भाषेत समजावून सांगताय. ---
Water is generally sufficient for hydration सामान्यतः पाणी हायड्रेशन(मराठी?)साठी पुरेसे असते.
सवांतर (कदाचित मूर्ख शंका): अनेकदा, "उन्हाळ्यात रसदार फळे खा, शरीरातील पाणी टिकून राहायला मदत होईल" असे कानावर येते; पण मग फळे खाण्यापेक्षा थेट पाणीच पिलेले चांगले नाही का? टरबूज, काकडी, पाणी असे पर्याय असतील तर हायड्रेशनसाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? --- अवांतर: काही समाजघटकांचा बाहेरील वातावरणाशी असा किती संपर्क येतो? मागच्या दहा वर्षांत आपल्यापैकी कितीजण (नको असताना) - - पावसात जाम भिजलो, काहीच आडोसा नव्हता - थंडीत कुडकुडलो, खूपच त्रास झाला - उन्हाच्या झळा लागत होत्या, अगदी जीव नकोसा झाला अश्या अनुभवातून गेले आहेत? - शंकासुर वामन '

In reply to by वामन देशमुख

हेमंतकुमार 21/04/2024 - 15:39
Hydration = जलसमतोल dehydration = जलन्यूनता समाजातील जो वर्ग बंदिस्त हवामानात वातावरणात आणि सुखद गारव्यात पांढरपेशा स्वरूपाचे काम करतो आहे त्यांना काळजीचे कारण नसते. त्यांनी समतोल आहार वेळच्यावेळी घेतला तर समतोलसाठी पुरेसे पाणी पिणेच योग्य. ज्यांना उन्हामध्ये बरीच फिरती वगैरे आहे किंवा काही काळ तरी प्रत्यक्ष उन्हात काम करावे लागते त्यांच्यासाठी पाणीदार फळांचे सेवन अधिक उपयुक्त ठरेल.

कांदा लिंबू 21/04/2024 - 11:55
कृपया हे वाचा खूप उपयुक्त !! "वैद्यकीय महाविद्यालयात, प्राध्यापक मेडीकलच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषधशास्त्र शिकवत होते, त्यांनी खालील प्रश्न विचारला: "वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणे कोणती?" काहीचे उत्तर: "डोक्यात ट्यूमर". त्यांनी उत्तर दिले: नाही! इतरांनी सुचवले: "अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे". त्यांनी पुन्हा उत्तर दिले: नाही! त्यांच्या प्रत्येक उत्तराच्या नकारानंतर त्यांचे प्रतिसाद येणं बंद होतं त्यांनी सर्वात सामान्य कारण सूचीबद्ध केले ते म्हणजे - निर्जलीकरण हे विनोदी वाटेल; पण ते खरे आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना तहान लागणे बंद होते आणि परिणामी, द्रव पदार्थ पिणे थांबवतात . आणि त्यांना द्रव पदार्थ सेवनाची आठवण करून देण्यासाठी आजूबाजूला कोणीही नसते तेव्हा ते लवकर निर्जलीकृत होतात. निर्जलीकरण गंभीर आहे आणि संपूर्ण शरीरावर परिणाम करते. यामुळे अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, एनजाइना (छातीत दुखणे), कोमा आणि मृत्यू देखील ओढवू शकतो. द्रव पिणे विसरण्याची ही सवय वयाच्या ६० व्या वर्षी सुरू होते, जेव्हा आपल्या शरीरात ५०% पेक्षा जास्त पाणी असते. ६० वर्षांवरील लोकांकडे पाण्याचा साठा कमी असतो. हा नैसर्गिक वृद्धत्व प्रक्रियेचा भाग आहे. त्यात आणखी गुंतागुंत अशी कि जरी ते निर्जलित असले तरी, त्यांना पाणी प्यावेसे वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत संतुलन यंत्रणा फारशी काम करत नाही. निष्कर्ष: 60 वर्षांहून अधिक वयाचे लोक सहजपणे निर्जली कृत होतात, इतकेच नव्हे तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता आहे हे जाणवत नाही. जरी ६० वर्षांपेक्षा जास्त लोक निरोगी दिसत असले तरी, प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्ये त्यांच्या संपूर्ण शरीराला हानी पोहोचवू शकतात. म्हणून येथे दोन सूचना कराव्या शा वाटतात: १) द्रव पदार्थ सेवनाची सवय लावा. द्रवपदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळाचे पाणी, सूप आणि टरबूज, खरबूज, पीच आणि अननस यांसारखी पाणी समृद्ध फळे यांचा समावेश होतो; ऑरेंज आणि टेंजेरिन पण हे काम करतात. महत्त्वाची गोष्ट अशी की, दर दोन तासांनी तुम्ही काही द्रव पदार्थ सेवन करावे. हे लक्षात ठेवा ! 2) कुटुंबातील सदस्यांसाठी इशारा: 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सतत द्रव पदार्थ द्या. ते जेव्हा द्रवपदार्थ नाकारतात आणि तशा दिवसात चिडचिड करतात, अस्वस्थ दिसतात, ती निश्चितच त्यांच्या निर्जलीकरणाची लक्षणे आहेत. तेव्हा ज्येष्ठांनी दर तासाला जास्तीतजास्त पाणी प्यावयांची सवय लावा. ही माहिती इतरांना पाठवावी. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी आपल्या ग्रुप मध्ये जरुर शेअर करावे

In reply to by कांदा लिंबू

हेमंतकुमार 21/04/2024 - 15:44
वरील संदेशात तथ्य आहे परंतु साठीवरील सर्वांनाच तो मुद्दा सरसकट लागू होणार नाही; प्रकृतीनुसार ठरवावे लागेल. वयस्कर लोकांमधील दोन महत्त्वाच्या घडामोडी अशा : १. तहानेची भावना काही प्रमाणात कमी होते आणि मूत्रपिंड पाणी शोषण करण्याच्या कामात जरा कमी पडते. २. तसेच वातावरणातल्या तापमानाशी जुळवून घेण्याची शारीरिक क्षमता काही प्रमाणात कमी होते * परंतु मुख्य प्रश्न उद्भवतात ते स्मरणशक्ती आणि आकलनावर परिणाम झालेल्या वृद्धांच्या बाबतीत. असे काही आजार असले की मग पाणी पिण्याचे समजतच नाही. त्याच्या जोडीला जर शारीरिक दुर्बलता येऊन हालचाली करणे खूप कमी झाले तर त्याचाही पाणी पिण्यावर परिणाम होतो. * मधुमेहींच्या बाबतीत जर आजार नियंत्रणात राहत नसेल तर जलन्यूनता होण्याचा धोका वाढतो.

गवि 21/04/2024 - 12:38
निर्जलीकरण या महत्त्वाच्या विषयावर काही चर्चा वाचली. सध्या तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली असल्याने हा विषय अधिकच सुसंगत आहे. याचवेळी चिकित्सा किंवा तत्सम नावाने अतिरिक्त पाणी पिणे, सतत पाणी पीत राहणे, क्षमतेपेक्षा जास्त पाणी रिचवत राहणे यासारख्या टोकाच्या गोष्टी काही लोक करताना दिसतात. पूर्वी एक ओळखीचे चाळिशीतले गृहस्थ जलचिकित्सा करताना पाणी पिणे अति झाल्याने अत्यवस्थ होऊन कमी वेळातच अचानक निधन पावले होते. हे दुर्मिळ असले तरी वॉटर टॉक्सीसिटी असा प्रकार ऐकला आहे खरा.

In reply to by गवि

हेमंतकुमार 21/04/2024 - 15:46
अति पाणी पिण्याची घातकता या विषयावर स्वतंत्र लेखात माहिती आहे आणि चर्चाही झाली आहे. त्याचा सारांश असा : जोपर्यंत मूत्रपिंडे तंदुरुस्त आहेत, मेंदूतील तहान नियंत्रण व्यवस्थित काम करतंय आणि संबंधित हॉर्मोन्सही व्यवस्थित स्त्रवत आहेत, तोपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी प्याल्याने दुष्परिणाम व्हायचे काही कारण नाही.

In reply to by हेमंतकुमार

गवि 21/04/2024 - 16:12
मी गरजेपेक्षा अधिक पाणी पिण्याबद्दल बोलत नसून सतत आणि क्षमतेपेक्षा अधिक पाणी उपचार या नावाखाली पिण्याबद्दल बोलत होतो. तडस लागली तरी, उलटून पडले तरी, जीव घाबरा होईपर्यंत पाणी पीतच राहणे असे काहीसे घडत असावे. पण अर्थातच ते दुर्मिळच म्हणावे लागेल.

In reply to by गवि

हेमंतकुमार 21/04/2024 - 16:20
ते दुर्मिळच म्हणावे लागेल.
+१ जर 'नॉर्मल' माणसाने भरमसाट पाणी ढोसायचेच म्हटले, तर एक क्षण असा येईल की आपल्याला पाणी पाहूनच प्रचंड मळमळ होईल आणि ताबडतोब उलटी सुद्धा होईल.

हेमंतकुमार 23/04/2024 - 08:37
कडक उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना गोड पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. यामागे मेंदूतील रासायनिक घडामोडी आहेत. एरवी सुद्धा जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा मेंदूतून डोपामिन आणि अन्य काही चेतना रसायने मोठ्या प्रमाणात स्त्रवतात. त्यामुळे आपल्याला सुखद तृप्तीची भावना होते आणि हा अनुभव पुन्हा घ्यायचा वाटतो. याला शरीरशास्त्रात reward यंत्रणा असे म्हटले जाते. उन्हाळ्यात जर श्रम झाले असतील तर वरील यंत्रणा नेहमीपेक्षाही अधिक पातळीवर चेतविली जाते.
सस्तन प्राणी या वर्गानुसार आपण प्राणिमात्रांत उत्क्रांतीच्या सर्वोच्च पातळीवर आहोत. पृथ्वीवर आपण वेगवेगळ्या खंडांत राहतो. विशिष्ट खंडानुसार आपल्या सभोवतालचे तापमान ऋतूनुसार बदलते असते. कडाक्याच्या थंडीतील उणे ४० C ते भर उन्हाळ्यातील ५२ C हून अधिक, एवढा त्याचा व्यापक पल्ला आहे. आपण बाह्य तापमानाच्या एवढ्या विविधतेने गुरफटलेले असूनही आपल्या शरीराचे तापमान मात्र कायम स्थिर असते. शरीरातील विशिष्ट दमदार यंत्रणेमुळे आपल्याला हे अचंबित करणारे वैशिष्ट्य मिळाले आहे. निरोगी अवस्थेत आपण आपले तापमान सरासरी ३७ C ( ९८.६ F) इतके ठेवतो. विविध आजारांमध्ये हे तापमान वाढते.

पल्स ऑक्सीमीटरचे गमभन

हेमंतकुमार ·

मापनाचे आकड्यांत किरकोळ बदल झाल्यास अस्वस्थ होऊ नये. या उपकरणाची उपयुक्तता, अचूकता आणि मर्यादा लक्षात घेऊन त्याचा तारतम्याने वापर करावा.
हे महत्त्वाचं!!

चौकटराजा 22/09/2020 - 20:49
. समजा, आपण रक्तक्षयाच्या (anemia) रुग्णात हे मापन करीत आहोत आणि संबंधिताचे हिमोग्लोबिन बरेच कमी आहे. जर या व्यक्तीला कुठलाही श्‍वसन अवरोध नसेल तर saturation हे मापन अगदी नॉर्मल ( कदाचित 100% सुद्धा) दाखवले जाईल. परंतु तिच्या रक्तात मुळात हिमोग्लोबिनच कमी असल्याने रक्तातील एकूण ऑक्सिजन वाहण्याचे प्रमाण कमीच राहील. परिणामी पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळणार नाही. हे विधान मी स्वत; व माझी पत्नी याबाबत तन्तोतन्त खरे आहे. रिडिन्ग ९७ ते ९९ दाखवते ,दम लागलेला नाही पण अनिमिया मुळे अशक्तणा दोघानाही जाणवतो .दोघांचीही कारणे वेगळी असली तरी .

Rajesh188 22/09/2020 - 22:48
सामान्य लोक oxymeter विकत घेतात पण ते कसे कार्य करते किंवा त्याच्या रीडिंग वर बाह्य गोष्टी चा कसा परिणाम होतो ह्याचे ज्ञान त्यांना नसते. 95 ते 100 असे रीडिंग असावे हेच फक्त माहीत असते चुकीच्या पद्धती नी वापर केल्या मुळे reading उलट सुलट येते मंग oxymeter हे उपकरण बकवास आहे असा समज करून घेतात. व्हॉट्स ऍप वाले अजुन काय काय forward करतात आणि लोक गोंधळून जातात. तुमच्या ह्या माहिती मुळे लोकांना शास्त्रीय माहिती मिळाली. पण माझा एक प्रश्न ऑक्सिजन विषयी. शरीराचे काम सुरळीत चालण्यासाठी रक्तात किती ऑक्सिजन असावाच लागतो?

शेखरमोघे 22/09/2020 - 23:34
नेहमीसारखाच माहितीपूर्ण आणि उपयुक्त लेख. हल्लीच कायप्पावर पाहिलेले काही: अशाच कुठल्याशा ऑक्सिमीटर मध्ये जरी बॉलपेन खुपसले तरी तिथेही काही "ऑक्सिजन" असल्याचे हा मीटर दाखवतो, ते कदाचित "प्रकाशकिरण जसे परवर्तित झाले तसे ऑक्सिजनचे प्रमाण दाखवले" अशा तर्‍हेच्या काही ठोकताळे वापरून काढलेल्या पूर्णपणे यान्त्रिक अनुमानामुळे असावे आणि असेच कुठल्याही ऑक्सिमीटर मध्ये होत असावे असे वाटते.

हेमंतकुमार 23/09/2020 - 08:11
आरोग्यलेखन आवडीने वाचणाऱ्या वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !
शरीराचे काम सुरळीत चालण्यासाठी रक्तात किती ऑक्सिजन असावाच लागतो?
याचे उत्तर विशिष्ट तांत्रिक परिभाषेत द्यावे लागते. १. रक्तातील O२ चा दाब 83 -108 mmHg इतका , तर २. रक्ताची O२ वाहकक्षमता २० मिली / रक्ताचे १०० मिली.

हेमंतकुमार 24/09/2020 - 11:04
नुकतेच ‘ऍपल’ने ऑक्सीजनमापक मनगटी घड्याळ बाजारात आणले आहे. तूर्त त्याला एफडीए ची मान्यता नसल्याने ते ‘बिगर वैद्यकीय’ या सदराखाली विक्रीस आहे. नेहमीच्या ऑक्सीमीटरच्या तुलनेत या घड्याळ्याची मापने कमी विश्वासार्ह आहेत. याची कारणे अशी: १.बोटांच्या टोकांमध्ये सूक्ष्म रक्तवाहिन्या भरपूर असतात याउलट मनगटावर त्यांचे प्रमाण बर्‍यापैकी कमी असते. म्हणून मापनाच्या बाबतीत ऑक्सिमीटरची संदेश यंत्रणा उच्च ठरते. २. यंत्रातील प्रकाश बोटांमधून आरपार जातो आणि त्यामुळे हे मापन श्रेष्ठ दर्जाचे असते. मनगटाच्या बाबतीत फक्त परावर्तित प्रकाशावर अवलंबून राहावे लागते.

ल्व्ख आवडलाच. प्रतिसादातले मनगटी घड्याळ, मनगट आणि बोटांची टोके यावरील विवेचन सुरेखच. धन्यवाद.

चामुंडराय 04/10/2020 - 23:18
खूप छान माहिती डॉक्टर साहेब. बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. एक प्रश्न... खरंतर दोन रक्ताची O२ वाहकक्षमता २० मिली / रक्ताचे १०० मिली. >>> म्हणजे जेव्हा रिडींग ९५ किंवा ९० दाखवते तेव्हा रक्ताची वाहकक्षमता अनुक्रमे १९ मिली आणि १८ मिली / रक्ताचे १०० मिली अशी कमी होते का? आणि दुसरे म्हणजे तांबड्या पेशी ज्या प्राणवायू वाहून नेतात पेशींच्या इंजिनापर्यंत (मायटोकाँड्रिया कि कायसे म्हणतात) त्या स्वतः साठी प्राणवायू वापरतात का? नाहीतर पेशींपर्यंत पोहचेपर्यंत तो संपून जायचा.

हेमंतकुमार 05/10/2020 - 09:11
चामुंडराय, दोन्ही प्रश्न चांगले आहेत. स्वतंत्रपणे घेऊ. १. हिमोग्लोबीन आणि ऑक्सिजन या संदर्भातल्या पेशींमधील घडामोडी बऱ्याच क्लिष्ट आहेत. या उपकरणावरचे मापन (98% इत्यादी) हा त्यातला केवळ एक घटक आहे. प्रत्यक्ष पेशींना किती ऑक्सिजन मिळतो, हे हृदयक्रिया, रक्तप्रवाहाची गती आणि रक्तातील ऑक्सिजनचा दाब अशा इतर अनेक गोष्टींवरही अवलंबून असते. म्हणून, तुम्ही म्हणता तसे सरळसोट गणित नाही करता येत. सामान्य माणसाच्या दृष्टीने 95 टक्क्यांच्या वर मापन हा एक ढोबळ अंदाज आहे आणि तो पुरेसा आहे. यासंदर्भातील अधिक मापने ही रुग्णालयात असणाऱ्या पूर्ण क्षमतेच्या उपकरणांवरच करणे शक्य असते.

हेमंतकुमार 05/10/2020 - 09:18
आपल्या रक्तातील लाल पेशी ही नवलाई आहे. त्यांच्या स्वतः मध्ये mitochondria हा घटक नसतो. तो खरे तर आपल्या पेशींचे ‘पॉवर हाऊस’ असतो. त्यामुळे लाल पेशीची वस्तूस्थिती अशी आहे: ती तिच्या अस्तित्वाला गरज असेल इतका अक्सिजन जरूर वापरते. पण, तिच्यातील चयापचयाच्या क्रिया मात्र ऑक्सिजनच्या सहभागाविना होत असतात. तरीही ती स्वतःसाठी ऊर्जानिर्मिती करू शकते, हे तिचे अफलातून वैशिष्ट्य आहे.

मापनाचे आकड्यांत किरकोळ बदल झाल्यास अस्वस्थ होऊ नये. या उपकरणाची उपयुक्तता, अचूकता आणि मर्यादा लक्षात घेऊन त्याचा तारतम्याने वापर करावा.
हे महत्त्वाचं!!

चौकटराजा 22/09/2020 - 20:49
. समजा, आपण रक्तक्षयाच्या (anemia) रुग्णात हे मापन करीत आहोत आणि संबंधिताचे हिमोग्लोबिन बरेच कमी आहे. जर या व्यक्तीला कुठलाही श्‍वसन अवरोध नसेल तर saturation हे मापन अगदी नॉर्मल ( कदाचित 100% सुद्धा) दाखवले जाईल. परंतु तिच्या रक्तात मुळात हिमोग्लोबिनच कमी असल्याने रक्तातील एकूण ऑक्सिजन वाहण्याचे प्रमाण कमीच राहील. परिणामी पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळणार नाही. हे विधान मी स्वत; व माझी पत्नी याबाबत तन्तोतन्त खरे आहे. रिडिन्ग ९७ ते ९९ दाखवते ,दम लागलेला नाही पण अनिमिया मुळे अशक्तणा दोघानाही जाणवतो .दोघांचीही कारणे वेगळी असली तरी .

Rajesh188 22/09/2020 - 22:48
सामान्य लोक oxymeter विकत घेतात पण ते कसे कार्य करते किंवा त्याच्या रीडिंग वर बाह्य गोष्टी चा कसा परिणाम होतो ह्याचे ज्ञान त्यांना नसते. 95 ते 100 असे रीडिंग असावे हेच फक्त माहीत असते चुकीच्या पद्धती नी वापर केल्या मुळे reading उलट सुलट येते मंग oxymeter हे उपकरण बकवास आहे असा समज करून घेतात. व्हॉट्स ऍप वाले अजुन काय काय forward करतात आणि लोक गोंधळून जातात. तुमच्या ह्या माहिती मुळे लोकांना शास्त्रीय माहिती मिळाली. पण माझा एक प्रश्न ऑक्सिजन विषयी. शरीराचे काम सुरळीत चालण्यासाठी रक्तात किती ऑक्सिजन असावाच लागतो?

शेखरमोघे 22/09/2020 - 23:34
नेहमीसारखाच माहितीपूर्ण आणि उपयुक्त लेख. हल्लीच कायप्पावर पाहिलेले काही: अशाच कुठल्याशा ऑक्सिमीटर मध्ये जरी बॉलपेन खुपसले तरी तिथेही काही "ऑक्सिजन" असल्याचे हा मीटर दाखवतो, ते कदाचित "प्रकाशकिरण जसे परवर्तित झाले तसे ऑक्सिजनचे प्रमाण दाखवले" अशा तर्‍हेच्या काही ठोकताळे वापरून काढलेल्या पूर्णपणे यान्त्रिक अनुमानामुळे असावे आणि असेच कुठल्याही ऑक्सिमीटर मध्ये होत असावे असे वाटते.

हेमंतकुमार 23/09/2020 - 08:11
आरोग्यलेखन आवडीने वाचणाऱ्या वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !
शरीराचे काम सुरळीत चालण्यासाठी रक्तात किती ऑक्सिजन असावाच लागतो?
याचे उत्तर विशिष्ट तांत्रिक परिभाषेत द्यावे लागते. १. रक्तातील O२ चा दाब 83 -108 mmHg इतका , तर २. रक्ताची O२ वाहकक्षमता २० मिली / रक्ताचे १०० मिली.

हेमंतकुमार 24/09/2020 - 11:04
नुकतेच ‘ऍपल’ने ऑक्सीजनमापक मनगटी घड्याळ बाजारात आणले आहे. तूर्त त्याला एफडीए ची मान्यता नसल्याने ते ‘बिगर वैद्यकीय’ या सदराखाली विक्रीस आहे. नेहमीच्या ऑक्सीमीटरच्या तुलनेत या घड्याळ्याची मापने कमी विश्वासार्ह आहेत. याची कारणे अशी: १.बोटांच्या टोकांमध्ये सूक्ष्म रक्तवाहिन्या भरपूर असतात याउलट मनगटावर त्यांचे प्रमाण बर्‍यापैकी कमी असते. म्हणून मापनाच्या बाबतीत ऑक्सिमीटरची संदेश यंत्रणा उच्च ठरते. २. यंत्रातील प्रकाश बोटांमधून आरपार जातो आणि त्यामुळे हे मापन श्रेष्ठ दर्जाचे असते. मनगटाच्या बाबतीत फक्त परावर्तित प्रकाशावर अवलंबून राहावे लागते.

ल्व्ख आवडलाच. प्रतिसादातले मनगटी घड्याळ, मनगट आणि बोटांची टोके यावरील विवेचन सुरेखच. धन्यवाद.

चामुंडराय 04/10/2020 - 23:18
खूप छान माहिती डॉक्टर साहेब. बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. एक प्रश्न... खरंतर दोन रक्ताची O२ वाहकक्षमता २० मिली / रक्ताचे १०० मिली. >>> म्हणजे जेव्हा रिडींग ९५ किंवा ९० दाखवते तेव्हा रक्ताची वाहकक्षमता अनुक्रमे १९ मिली आणि १८ मिली / रक्ताचे १०० मिली अशी कमी होते का? आणि दुसरे म्हणजे तांबड्या पेशी ज्या प्राणवायू वाहून नेतात पेशींच्या इंजिनापर्यंत (मायटोकाँड्रिया कि कायसे म्हणतात) त्या स्वतः साठी प्राणवायू वापरतात का? नाहीतर पेशींपर्यंत पोहचेपर्यंत तो संपून जायचा.

हेमंतकुमार 05/10/2020 - 09:11
चामुंडराय, दोन्ही प्रश्न चांगले आहेत. स्वतंत्रपणे घेऊ. १. हिमोग्लोबीन आणि ऑक्सिजन या संदर्भातल्या पेशींमधील घडामोडी बऱ्याच क्लिष्ट आहेत. या उपकरणावरचे मापन (98% इत्यादी) हा त्यातला केवळ एक घटक आहे. प्रत्यक्ष पेशींना किती ऑक्सिजन मिळतो, हे हृदयक्रिया, रक्तप्रवाहाची गती आणि रक्तातील ऑक्सिजनचा दाब अशा इतर अनेक गोष्टींवरही अवलंबून असते. म्हणून, तुम्ही म्हणता तसे सरळसोट गणित नाही करता येत. सामान्य माणसाच्या दृष्टीने 95 टक्क्यांच्या वर मापन हा एक ढोबळ अंदाज आहे आणि तो पुरेसा आहे. यासंदर्भातील अधिक मापने ही रुग्णालयात असणाऱ्या पूर्ण क्षमतेच्या उपकरणांवरच करणे शक्य असते.

हेमंतकुमार 05/10/2020 - 09:18
आपल्या रक्तातील लाल पेशी ही नवलाई आहे. त्यांच्या स्वतः मध्ये mitochondria हा घटक नसतो. तो खरे तर आपल्या पेशींचे ‘पॉवर हाऊस’ असतो. त्यामुळे लाल पेशीची वस्तूस्थिती अशी आहे: ती तिच्या अस्तित्वाला गरज असेल इतका अक्सिजन जरूर वापरते. पण, तिच्यातील चयापचयाच्या क्रिया मात्र ऑक्सिजनच्या सहभागाविना होत असतात. तरीही ती स्वतःसाठी ऊर्जानिर्मिती करू शकते, हे तिचे अफलातून वैशिष्ट्य आहे.
कोविड महासाथीच्या निमित्ताने बऱ्याच सुशिक्षित कुटुंबांमध्ये पल्स ऑक्सीमीटर या उपकरणाचे आगमन झालेले आहे. या आजारात काही रुग्णांना श्वसन अवरोध होऊ शकतो. परिणामी शरीरपेशींना रक्ताद्वारे मिळणाऱ्या ऑक्सीजनचे प्रमाण बरेच कमी होऊ शकते. या परिस्थितीचा प्राथमिक अंदाज घरच्या घरी घेता यावा, या उद्देशाने या घरगुती उपकरणाचे उत्पादन केलेले आहे. सध्या त्याचा लाभ बरेच जण घेत आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आरोग्य सर्वेक्षणातही त्याचा चाळणी चाचणीसारखा वापर होत आहे. या उपकरणातून ऑक्सीजन संबंधीचे जे मापन दिसते त्याबद्दल सामान्यांत कुतूहल दिसून आले.

Once in a lifetime....!

डॉ श्रीहास ·

महासंग्राम 12/09/2020 - 13:48
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

चौथा कोनाडा 12/09/2020 - 17:02
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_

चौकटराजा 12/09/2020 - 18:58
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी 13/09/2020 - 04:38
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

चामुंडराय 14/09/2020 - 00:09
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

निनाद 14/09/2020 - 06:10
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

डॉ श्रीहास 16/09/2020 - 08:02
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2020 - 11:58
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ

महासंग्राम 12/09/2020 - 13:48
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

चौथा कोनाडा 12/09/2020 - 17:02
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_

चौकटराजा 12/09/2020 - 18:58
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी 13/09/2020 - 04:38
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

चामुंडराय 14/09/2020 - 00:09
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

निनाद 14/09/2020 - 06:10
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

डॉ श्रीहास 16/09/2020 - 08:02
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2020 - 11:58
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...

अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन ·

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.
अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

पाषाणभेद ·

पाषाणभेद 24/08/2020 - 17:22
ताक. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पीटलमधील सेवा देणारे, नगर/महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी यांनी या काळात जीवाची पर्वा न करता काम केले. लॉकडाऊन काळात बंदोबस्त ठेवून पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. कित्येक डॉक्टर तसेच नर्सेस हे इतरांवर उपचार करतांना दगावले.

चित्रगुप्त 24/08/2020 - 18:23
धडा मस्त लिवलाय पाभौ. हा भाग १ झाला. आता दर दोन-तीन महिनांनी मधल्या काळातील घटनांचा आढावा घेत आणखी पुढले लेख लिहीत रहावे. करोनाचा प्रभाव - देशी आणि जागतिक - यांचाही आढावा घ्यावा, असे वाटते. ही एक लेखमालिकाच होऊ शकते. पुभाशु.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 25/08/2020 - 22:55
नको हो चित्रगुप्तजी, थोडक्यात गोडी असते. अन तसेही हा धडा नॉस्टॅल्जीया किंवा जून्या आठवणी असलेल्या मिपावरील लेखमालीकेसाठी लिहीलेला होता. म्हणजे असे की, पुढल्या दशकातल्या मुलांना हा धडा असेल अन त्यांना आता २०२० मध्ये काय घडले ते वाचता येईल. बाकी काय, परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे? अहो, उलट तुम्ही जास्त फिरतात हिंडतात. तुम्हीच लिहा की एखादा चित्रलेख!!

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 26/08/2020 - 03:20
@पाषाणभेदः
परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे?
सध्या अमेरिकेत आलेलो आहोत, आणि इकडे येण्यापूर्वीचे, प्रवासातले आणि आल्यावर केलेल्या कोरोनाशी संघर्षाचे वर्णन केलेला खालील लेखही लिहीला आहे. http://www.misalpav.com/node/47307
लिहा की एखादा चित्रलेख!!
आणखी एक नवा चित्रेलेख 'माळवा - काही आठव्णी, काही चित्रे' हा श्रीगणेश लेखमालेत येऊ घातला आहे.

पाषाणभेद 24/08/2020 - 17:22
ताक. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पीटलमधील सेवा देणारे, नगर/महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी यांनी या काळात जीवाची पर्वा न करता काम केले. लॉकडाऊन काळात बंदोबस्त ठेवून पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. कित्येक डॉक्टर तसेच नर्सेस हे इतरांवर उपचार करतांना दगावले.

चित्रगुप्त 24/08/2020 - 18:23
धडा मस्त लिवलाय पाभौ. हा भाग १ झाला. आता दर दोन-तीन महिनांनी मधल्या काळातील घटनांचा आढावा घेत आणखी पुढले लेख लिहीत रहावे. करोनाचा प्रभाव - देशी आणि जागतिक - यांचाही आढावा घ्यावा, असे वाटते. ही एक लेखमालिकाच होऊ शकते. पुभाशु.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 25/08/2020 - 22:55
नको हो चित्रगुप्तजी, थोडक्यात गोडी असते. अन तसेही हा धडा नॉस्टॅल्जीया किंवा जून्या आठवणी असलेल्या मिपावरील लेखमालीकेसाठी लिहीलेला होता. म्हणजे असे की, पुढल्या दशकातल्या मुलांना हा धडा असेल अन त्यांना आता २०२० मध्ये काय घडले ते वाचता येईल. बाकी काय, परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे? अहो, उलट तुम्ही जास्त फिरतात हिंडतात. तुम्हीच लिहा की एखादा चित्रलेख!!

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 26/08/2020 - 03:20
@पाषाणभेदः
परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे?
सध्या अमेरिकेत आलेलो आहोत, आणि इकडे येण्यापूर्वीचे, प्रवासातले आणि आल्यावर केलेल्या कोरोनाशी संघर्षाचे वर्णन केलेला खालील लेखही लिहीला आहे. http://www.misalpav.com/node/47307
लिहा की एखादा चित्रलेख!!
आणखी एक नवा चित्रेलेख 'माळवा - काही आठव्णी, काही चित्रे' हा श्रीगणेश लेखमालेत येऊ घातला आहे.
(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधित खाजगी मंडळ, पुणे-१२) इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट (प्रस्तावना : कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल, हे लेखकाच्या मनात आल्याने 'इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट' हा पाठ लिहिला आहे. ) जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०२०च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२०च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले.

मृत्यूंचा आकडा वाढला, आता 'राजि'नामे द्या

माहितगार ·

माहितगार 12/09/2020 - 10:22
बातमीत सुखकारक भाग दिसला नाही की घाबरवताय म्हणायचे, सुखकारक भाग ऐकला की निष्काळजीपणाने जगायचे भोगायचे आणि खापरपुन्हा आरोग्य यंत्रणेच्या माथी फोडायचे. बातमीचा सुखकारक नंतर देतो पण अती आत्मविश्वास किंवा कोरोनाची धास्ती पोकळ म्हणण्याच्या खालील दोन परिणामांचे नेमके काय करायचे ?
An increase of 16.91 per cent has been registered in the death of patients without co-morbidities
The critical rate, however, has also increased from 5.54 per cent, which has led to critical patients struggling to find beds.
...A week later, Pune Metropolitan Region, which has among the highest concentration of urban and semi-urban spaces in the district, registered its single highest 24-hour tally with 4,935 new patients. As on Thursday, it had 40,152 active patients. ...
सुखकारक भाग वाचा पण सुखावून निष्काळजी होऊ नका अनेक दुसर्‍या मानवी जीवांचा प्रश्न आहे, केवळ तुमच्या स्वतःच्या नव्हे.
The percentage of active cases dropped from 15.9 to 14.68. The mortality rate has improved as it reduced from 2.39 per cent to 2.34 per cent, while the recovery rate has increased from 81.7 per cent to 82.97 per cent.
संदर्भ https://timesofindia.indiatimes.com/city/pune/september-surge-active-cases-top-40000-in-pune-region/articleshow/78069697.cms https://indianexpress.com/article/cities/pune/pune-more-deaths-of-patients-without-co-morbidities-recorded-in-pmc-this-week-6592508/ सुरक्षीत अंतर, मास्क, प्रत्येक स्पर्षजन्याचे स्पर्षा आधी आणि नंतर निर्जुंतुकीकरण सोप्पच आहे, न पाळून अवघड करू नका

दैनिक सकाळच्या बातमीवर आधारीत 'आता तरी भानावर या' या शीर्षकाचा मी धागा काढला. काही मिपाकरांनी त्याची 'जिलबी' म्हणून संभावना केली
आपल्या धाग्यास ज्या मिपाकरांनी 'जिल्बी' म्हणून संभावना केली असेल, त्या मिपाकरांमधे मीही एक होतो, मिपाकरांनी असे म्हणायला नको. 'इथं परस्थिती काये' भान असायला पाहिजे. धाग्याला जिल्बी खरं म्हणायची वेळ येऊ नये. पण, संयमाचा बांध कधीतरी फुटतोच. बाकी,त्याबद्दल आजही कोणता पश्चाताप नाही. -दिलीप बिरुटे (स्पष्ट)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 12/09/2020 - 13:07
पुण्याची आजची स्थिती पहाता त्यावेळचा सकाळचा लेख आणि माझा धागा दोन्ही समयोचितच होते. सुयोग्य दक्षता न घेणार्‍यांबद्दल बांध कुणाचा फुटावयास हवा ? संयमाने दक्षता बाळगून इतरांना दक्षतेचा सल्ला दिल्या नंतरही पाळली जात नाही हे पहाण्याची वेळ येणार्‍यांचा की दक्षता न पाळणार्‍या निष्काळजी लोकांचा आणि त्यांची पाठराखण करणार्‍यांचा?

माहितगार 13/09/2020 - 09:20
मे २०२० मध्ये कोविडने मुंबईत कळस गाठला असताना मे २०१९ पेक्षा जवळपास दुप्प्ट मृत्यू झाले. गेल्या दहा वर्षातीलतरी मृत्युंचा उच्चांक केला. मे महिन्या पर्यंत पॉझीटीव्ह म्हणून रिपोर्ट न झालेल्या पण मृत घोषीत करण्यासाठी हॉस्पीटल कडे आलेल्या मृतांचा मृत्यू कोविड ने झाला नाही ना याची अंशतः खात्री केली जात होती, आकडेवारी हाता बाहेर जाते आहे पाहून प्रशासनाने ही चाचणी बंद केली. (ट्रेस आणि ट्रॅकला हरताळ या निर्णयामुळे फासला गेला तो तुर्तास बाजूस ठेऊ) मार्च ते जुलै ३१ या २०२०च्या पाच महिन्यात मुंबईतील कोविड मृत्यूच्या अधिकृत प्रशासकीय आकडा फक्त 6,395 मात्र होता, पण एकुण मृत्यू 49,040 झाले, वर्ष २०१९ च्या याच ५ महिन्याच्या कालावधीतील मृत्यू 35,982 होते म्हणजे गत वर्षापेक्षा 13,058 अधिक मृत्यू म्हणजे टक्केवारीने मुंबईत ३७ टक्क्याच्या आसपास मृत्यूदर १ मार्च ते ३१ जुलै या पाच महिन्याच्या काळात वाढला. मार्च ते जुलै ३१ या २०२०च्या पाच महिन्यात मुंबईतील कोविड मृत्यूच्या तांडवाचा हिशेब मांडताना अपघाती मृत्यू २०१९ च्या या कालावधीतील जवळपास २/३ ने कमी झाले ते वगळावे लागतात. तर कोविड साथीचे मार्च ते जुलै पाच महिन्यातील ९०० च्या आसपासही मृत्यू कोविड कालीन वाढीचा भाग मानावा लागतो . हे दोन टक्के मृत्यू जोडले तर इटलीतही साथ टोकावर असताना सर्वसाधारणपणे मृत्यूदर गतवर्षापेक्षा ३९ टक्क्याने वाढला होता - आम्ही युरोमेरीकेपेक्षा काही बरे करतो आहोत या फुशारकीत बहुधा तथ्य नसावे. बाहेरगावचे लोक उपचारासाठी येतात त्यांचे मृत्यूही ह्यात पकडले जातात ज्या कोविडेतर रुग्णांना उपचार न मिळाल्याने मृत्यू झाले असतील त्याचे ही आकडे यात असतील अशी सारवा सारव प्रशासन करताना दिसते - जर बहुतांश वाढीव मृत्यू हॉस्पीटलला न पोहोचता झाले असतील तर प्रशासनाचा हा बचाव पटणारा वाटत नाही, सर्व मृतांचे पॉझीटीव्ह असणे तपासले असते तर मुंबई सोडून पळून उर्वरीत राज्य आणि भारतात जाणार्‍यांना अंशतः तरी क्वारंटाईन करून प्रसार टाळता आला असता. त्या शिवाय मुंबईत टेस्टींग आंणि उपचार सुविधा उपलब्ध असून मृत्यूदर ३९ टक्क्याने वाढलेला ज्या भागात टेस्टींग आंणि उपचार सुविधांचा अभाव असलेल्या उर्वरीत महाराष्ट्राचे काय? पुण्यातली गेल्या वर्षा सोबतची तुलना आलेली नाही पण आयसीयु बेडची उपलब्धता अगदी काठावर आहे, अँब्युलन्स उपलब्धता आणि स्मशानभूमीवरील सुविधा आणि कर्मचार्‍यांची स्थिती गंभीर तणावात आहे. संदर्भ https://indianexpress.com/article/cities/mumbai/covid-outbreak-64349-deaths-in-mumbai-this-year-6587188/ https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-coronavirus-live-updates-mumbai-thane-pune-unlock-4-guidelines-cases-deaths-vaccine-sero-survey-news-6579764/ https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-mumbai-pune-coronavirus-live-updates-cases-deaths-vaccine-6591491/ https://www.hindustantimes.com/pune-news/chase-the-virus-pune-dist-admin-to-start-100-per-cent-testing-at-164-hotspots-in-next-ten-days/story-pz8iesNbbM0I67JSuoaLUI.html https://www.mid-day.com/articles/why-should-pune-with-a-population-of-just-31-2-lakh-account-for-the-highest-number-of-covid-19-cases-in-india/22986237

Rajesh188 13/09/2020 - 09:30
Corona नियंत्रीत करण्यात पाकिस्तान नी उत्तम कार्य केले आहे. साधीचे रोग कसे नियंत्रित करावेत हे पाकिस्तान कडून शिकून घ्या असे who नी म्हंटले आहे. बहुमत नी सत्तेवर बसलेल्या bjp सरकार नी तबोडतोप सत्ता सोडली पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 14/09/2020 - 11:10
पाकीस्तान बाबत लेखातील मुद्दे महत्वाचेच आहेत. सर्वसाधारण मृत्यूदरच अधिक असेल तर वाढीव मृत्यूदर कमी भरेल अर्थात भारतीय उपमहाद्विपात सांख्यिकीची वानवा आहेच. मुंबईच्या मागच्या वर्षाच्या मृतूदराच्या तुलनेत या वर्षाचा मृत्यूदर पाहील्या नंतर कोविड कालिन मृत्यूदर ३७ टक्क्यांनी वाढल्याचे लक्षात आले. पाकीस्तानचीही अशी आकडेवारी समोर येईल तेव्हा नेमका परिणाम सांगता येईल.

माहितगार 12/09/2020 - 10:22
बातमीत सुखकारक भाग दिसला नाही की घाबरवताय म्हणायचे, सुखकारक भाग ऐकला की निष्काळजीपणाने जगायचे भोगायचे आणि खापरपुन्हा आरोग्य यंत्रणेच्या माथी फोडायचे. बातमीचा सुखकारक नंतर देतो पण अती आत्मविश्वास किंवा कोरोनाची धास्ती पोकळ म्हणण्याच्या खालील दोन परिणामांचे नेमके काय करायचे ?
An increase of 16.91 per cent has been registered in the death of patients without co-morbidities
The critical rate, however, has also increased from 5.54 per cent, which has led to critical patients struggling to find beds.
...A week later, Pune Metropolitan Region, which has among the highest concentration of urban and semi-urban spaces in the district, registered its single highest 24-hour tally with 4,935 new patients. As on Thursday, it had 40,152 active patients. ...
सुखकारक भाग वाचा पण सुखावून निष्काळजी होऊ नका अनेक दुसर्‍या मानवी जीवांचा प्रश्न आहे, केवळ तुमच्या स्वतःच्या नव्हे.
The percentage of active cases dropped from 15.9 to 14.68. The mortality rate has improved as it reduced from 2.39 per cent to 2.34 per cent, while the recovery rate has increased from 81.7 per cent to 82.97 per cent.
संदर्भ https://timesofindia.indiatimes.com/city/pune/september-surge-active-cases-top-40000-in-pune-region/articleshow/78069697.cms https://indianexpress.com/article/cities/pune/pune-more-deaths-of-patients-without-co-morbidities-recorded-in-pmc-this-week-6592508/ सुरक्षीत अंतर, मास्क, प्रत्येक स्पर्षजन्याचे स्पर्षा आधी आणि नंतर निर्जुंतुकीकरण सोप्पच आहे, न पाळून अवघड करू नका

दैनिक सकाळच्या बातमीवर आधारीत 'आता तरी भानावर या' या शीर्षकाचा मी धागा काढला. काही मिपाकरांनी त्याची 'जिलबी' म्हणून संभावना केली
आपल्या धाग्यास ज्या मिपाकरांनी 'जिल्बी' म्हणून संभावना केली असेल, त्या मिपाकरांमधे मीही एक होतो, मिपाकरांनी असे म्हणायला नको. 'इथं परस्थिती काये' भान असायला पाहिजे. धाग्याला जिल्बी खरं म्हणायची वेळ येऊ नये. पण, संयमाचा बांध कधीतरी फुटतोच. बाकी,त्याबद्दल आजही कोणता पश्चाताप नाही. -दिलीप बिरुटे (स्पष्ट)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 12/09/2020 - 13:07
पुण्याची आजची स्थिती पहाता त्यावेळचा सकाळचा लेख आणि माझा धागा दोन्ही समयोचितच होते. सुयोग्य दक्षता न घेणार्‍यांबद्दल बांध कुणाचा फुटावयास हवा ? संयमाने दक्षता बाळगून इतरांना दक्षतेचा सल्ला दिल्या नंतरही पाळली जात नाही हे पहाण्याची वेळ येणार्‍यांचा की दक्षता न पाळणार्‍या निष्काळजी लोकांचा आणि त्यांची पाठराखण करणार्‍यांचा?

माहितगार 13/09/2020 - 09:20
मे २०२० मध्ये कोविडने मुंबईत कळस गाठला असताना मे २०१९ पेक्षा जवळपास दुप्प्ट मृत्यू झाले. गेल्या दहा वर्षातीलतरी मृत्युंचा उच्चांक केला. मे महिन्या पर्यंत पॉझीटीव्ह म्हणून रिपोर्ट न झालेल्या पण मृत घोषीत करण्यासाठी हॉस्पीटल कडे आलेल्या मृतांचा मृत्यू कोविड ने झाला नाही ना याची अंशतः खात्री केली जात होती, आकडेवारी हाता बाहेर जाते आहे पाहून प्रशासनाने ही चाचणी बंद केली. (ट्रेस आणि ट्रॅकला हरताळ या निर्णयामुळे फासला गेला तो तुर्तास बाजूस ठेऊ) मार्च ते जुलै ३१ या २०२०च्या पाच महिन्यात मुंबईतील कोविड मृत्यूच्या अधिकृत प्रशासकीय आकडा फक्त 6,395 मात्र होता, पण एकुण मृत्यू 49,040 झाले, वर्ष २०१९ च्या याच ५ महिन्याच्या कालावधीतील मृत्यू 35,982 होते म्हणजे गत वर्षापेक्षा 13,058 अधिक मृत्यू म्हणजे टक्केवारीने मुंबईत ३७ टक्क्याच्या आसपास मृत्यूदर १ मार्च ते ३१ जुलै या पाच महिन्याच्या काळात वाढला. मार्च ते जुलै ३१ या २०२०च्या पाच महिन्यात मुंबईतील कोविड मृत्यूच्या तांडवाचा हिशेब मांडताना अपघाती मृत्यू २०१९ च्या या कालावधीतील जवळपास २/३ ने कमी झाले ते वगळावे लागतात. तर कोविड साथीचे मार्च ते जुलै पाच महिन्यातील ९०० च्या आसपासही मृत्यू कोविड कालीन वाढीचा भाग मानावा लागतो . हे दोन टक्के मृत्यू जोडले तर इटलीतही साथ टोकावर असताना सर्वसाधारणपणे मृत्यूदर गतवर्षापेक्षा ३९ टक्क्याने वाढला होता - आम्ही युरोमेरीकेपेक्षा काही बरे करतो आहोत या फुशारकीत बहुधा तथ्य नसावे. बाहेरगावचे लोक उपचारासाठी येतात त्यांचे मृत्यूही ह्यात पकडले जातात ज्या कोविडेतर रुग्णांना उपचार न मिळाल्याने मृत्यू झाले असतील त्याचे ही आकडे यात असतील अशी सारवा सारव प्रशासन करताना दिसते - जर बहुतांश वाढीव मृत्यू हॉस्पीटलला न पोहोचता झाले असतील तर प्रशासनाचा हा बचाव पटणारा वाटत नाही, सर्व मृतांचे पॉझीटीव्ह असणे तपासले असते तर मुंबई सोडून पळून उर्वरीत राज्य आणि भारतात जाणार्‍यांना अंशतः तरी क्वारंटाईन करून प्रसार टाळता आला असता. त्या शिवाय मुंबईत टेस्टींग आंणि उपचार सुविधा उपलब्ध असून मृत्यूदर ३९ टक्क्याने वाढलेला ज्या भागात टेस्टींग आंणि उपचार सुविधांचा अभाव असलेल्या उर्वरीत महाराष्ट्राचे काय? पुण्यातली गेल्या वर्षा सोबतची तुलना आलेली नाही पण आयसीयु बेडची उपलब्धता अगदी काठावर आहे, अँब्युलन्स उपलब्धता आणि स्मशानभूमीवरील सुविधा आणि कर्मचार्‍यांची स्थिती गंभीर तणावात आहे. संदर्भ https://indianexpress.com/article/cities/mumbai/covid-outbreak-64349-deaths-in-mumbai-this-year-6587188/ https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-coronavirus-live-updates-mumbai-thane-pune-unlock-4-guidelines-cases-deaths-vaccine-sero-survey-news-6579764/ https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-mumbai-pune-coronavirus-live-updates-cases-deaths-vaccine-6591491/ https://www.hindustantimes.com/pune-news/chase-the-virus-pune-dist-admin-to-start-100-per-cent-testing-at-164-hotspots-in-next-ten-days/story-pz8iesNbbM0I67JSuoaLUI.html https://www.mid-day.com/articles/why-should-pune-with-a-population-of-just-31-2-lakh-account-for-the-highest-number-of-covid-19-cases-in-india/22986237

Rajesh188 13/09/2020 - 09:30
Corona नियंत्रीत करण्यात पाकिस्तान नी उत्तम कार्य केले आहे. साधीचे रोग कसे नियंत्रित करावेत हे पाकिस्तान कडून शिकून घ्या असे who नी म्हंटले आहे. बहुमत नी सत्तेवर बसलेल्या bjp सरकार नी तबोडतोप सत्ता सोडली पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 14/09/2020 - 11:10
पाकीस्तान बाबत लेखातील मुद्दे महत्वाचेच आहेत. सर्वसाधारण मृत्यूदरच अधिक असेल तर वाढीव मृत्यूदर कमी भरेल अर्थात भारतीय उपमहाद्विपात सांख्यिकीची वानवा आहेच. मुंबईच्या मागच्या वर्षाच्या मृतूदराच्या तुलनेत या वर्षाचा मृत्यूदर पाहील्या नंतर कोविड कालिन मृत्यूदर ३७ टक्क्यांनी वाढल्याचे लक्षात आले. पाकीस्तानचीही अशी आकडेवारी समोर येईल तेव्हा नेमका परिणाम सांगता येईल.
सार्स कोविड- २ २०१९ मध्ये मानव प्रजातित उतरुन सहा महिने उलटून गेले. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाले तर पहिल्या १०८ दिवसात १०,००० मृत्यू झाले. त्या नंतर मागच्या ३७ दिवसात १०,००० जीव गेले त्यातील ५००० मागच्या १६ दिवसात गेलेत. संदर्भ पहिल्या १०८ दिवसात जे १०,००० गेले त्यातले ५२% मुंबईतले होते, नंतरच्या १०,००० मुंबईचा टक्का घसरून १९% म्हणजे गेल्या ३७ दिवसातील १०,००० मृत्यू पैकी ८१ % उर्वरीत महाराष्ट्रातून आलेत.

कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)

चित्रगुप्त ·

चित्रगुप्तसेठ, लेखन खुसखुशीत आहे, जागो जागी स्मायल्या येत होत्या. आपण ठणठणीत झालात हे वाचून छान वाटलं. तरीही काही प्रश्न मनात पडले आहेत. एक) संसर्ग कशामुळे झाला असावा, तो प्रवासात काही संपर्क झाले असावे असे वाटते. दोन) उपचारासाठी आपण काय काय घेतले तेही जरा सविस्तर सांगा,म्हणजे बघा. आणि लेखनात एक चित्र पाहिजे होतं. जरासं उघडं-नागडं, पण कलात्मक. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 14/08/2020 - 18:27
सरजी, तीन-चार चित्रे देतो आहे, ही दोन-तीन वर्षांपूर्वी रंगवलली होती. खरेतर अजून अपूर्ण आहेत, यंदा त्यात आणखी काम करावे म्हणतो. . . ... नातवंडांनाही बाळकडू मिळते आहे, बघूया पूढे काय करतात. . . बाकी घरातून बाहेर पडून टॅक्सीत बसल्यापासून पुढले तीस तासात केंव्हातरी संसर्ग झाला असावा. औषधोपचार म्हणावा तर काहीच केले नाही. काढा गुळण्या वगैरे लिहीलेच आहे. आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.

In reply to by हेमंतकुमार

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:10
@ कुमार१ : तुमच्या लेखातून प्रेरणा मिळाली,आणि खूप महिन्यांनी पुन्हा लिहावेसे वाटू लागले. शतशः आभार. मी जे औषधे न घेणे आणि नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्तीबद्दल लिहीले आहे, त्याबद्दल एक डॉक्टर म्हणून काय मत आहे, हे जाणून घेऊ इच्छितो.

In reply to by चित्रगुप्त

हेमंतकुमार 14/08/2020 - 21:15
जंतुसंसर्ग आणि आजार : काही मूलभूत माहिती १. संसर्ग होतो परंतु तो जंतू शरीराच्या प्रतिकारशक्तीला भेदू शकत नाही किंवा प्रतिकारशक्ती त्याच्यावर तातडीने विजय मिळवते >> आजार होत नाही. २. घातक जंतूचा संसर्ग >> जवळपास सर्वांना आजार होतो. आता पुढे ..... a. एखाद्याची प्रतिकारशक्‍ती चांगली असल्यास जंतूचा निचरा लवकर होतो. b. तशी नसल्यास आजार लांबतो/ दीर्घकाळ होतो किंवा उलटतो. इथे b मध्ये औषधांची गरज आणि उपयुक्तता बरीच असते. ३. विषाणूंच्या बाबतीत त्यांची घातकता यावर अवलंबून असते: a. आपल्या शरीरात पसरण्याची क्षमता b. त्यांची प्रजनन क्षमता आणि c.मानवी प्रतिकारशक्तीला भेदण्याची ताकद

चौकटराजा 14/08/2020 - 13:37
अथ ध्यानम ,चित्रगुप्त उवाच ते इति बापूसुतकृतम कोविड आख्यानं संपूर्णम येथवर वाचले ! मला तशी ही इष्टापत्ती वगैरे वाटलेली नाही पण ,देऊळ,हॉटेल,शिनियर शिटीजण टोळके यात रस नसल्याने मला करमत नाही असे झाले नाही !इटाली, चीन,मध्य युरोप येथे यु ट्यूब मुळे अखंड प्रवास चालू आहे ! नजीकच्या भविष्यात आणखी काही शारीरिक समस्यांवर} झाल्यास बाल्कनीत स्वत:च एक वाटरफॉल तयार करण्याचा मानस आहे !

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:23
@ चौरा: 'सावध आशावादाची बखर' या अवघ्या तीन शब्दात आपण केलेला या लेखाचा सन्मान वाचून थक्क झालो. अनेक आभार. तुमच्या आभासी यात्रांबद्दल मिपावर अवश्य लिहा. लेखातील रविंद्रथांची रचना: "नील दिगोन्ते" अवश्य ऐका. यूट्यूबीवर ते अनेकांनी गायलेले आणि नृत्ये वगैरे आहेत, पण मला श्रीराधा बंदोपाध्याय यांचे भावविभोर करणारे गायन, त्यातील मृदुंग आणि सतार हे फार भावले. बंगाली गीताचा अर्थ समजला नाही तरी एक अनोखी जादू त्यात आहे.

विनिता००२ 14/08/2020 - 15:28
छान लिहीलेत :) ह्या लॉकडाऊन मधे मी माझी जेवढी हस्तलिखिते होते ती सॉफ्टकॉपीत रुपांतरीत केली. सर्व डाटा युनिकोडमधे असल्याने अर्धवट कथा पूर्ण करणे, एडीट करणे बरेच सोपे झालेय.

In reply to by विनिता००२

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:58
@ विनिता००२ अभिप्रायाबद्दल अनेक आभार. लॉकडाऊन मधे हस्तलिखिते सॉफ्टकॉपीत रुपांतरीत करणे हे फार मोठे चिकाटीचे काम केलेत हे भारीच. मला पण शेकडो रेखाचित्रे, रंगचित्रे फोटो काढून जालावर टाकायची आहेत. नेमकी कुठे टाकावीत, याबद्दल काही सल्ला ?

In reply to by संजय क्षीरसागर

आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.
आणि चित्रं तर बेफामच !

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:14
@संक्षि, तुमच्यासारख्या विचक्षण रसिकाकडून अशी पावती मिळाणे म्हणजे एकप्रकारे मिपावरील जीवन गौरव पुरस्कारच. शतशः आभार.

मस्त लिहिले आहे. आपल्याला झालेला रोगही इतक्या खुसखुशीतपणे वर्णन करणे याला मनाची सकारात्मकपणा लागतो. असे वर्णन कोरोनाच्या विषाणूने मि. पा. वर वाचले तर तो स्वतः होऊन निघून जाईल. :-)

In reply to by दुर्गविहारी

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:17
@ दुर्गविहारी, लेख खुसखुशीत वाटला, आणि यासाठी मन सकारात्मक हवे, हे वाचून एक आगळेच समाधान दाटले. अनेक आभार.

चौकस२१२ 14/08/2020 - 19:36
"तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. ..." - पण मग नंतर केलीत कि नाही? हे कळले नाही? आणि तुम्हाला मग नक्की काय झालं होत? - आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? " कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही" हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? इथे धोरण असे आहे कि जि पी तुम्हाला तपासून सरळ कोविद ची टेस्ट करायला सांगतो..बरं त्यात त्याचा काही आर्थिक फायदा नसतो.. सगळेच फुकट असते कारण सरकार चे धोरण अतिशय काटेकोर पणे तपासणे आणि प्रादुर्भाव थांबवणे हे आहे , साधारण समाज रचना अमेरिकेसारखी आहे म्हणून विचारले गैरसमज करून घेऊ नका

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 15/08/2020 - 20:50
@ चौकस २१२: तुमच्या प्रश्नांची उत्तरे: (१) पण मग नंतर (कोविड टेस्ट) केलीत कि नाही? हे कळले नाही? उत्तरः लेखाच्या सुरुवातीला लिहील्याप्रमाणे सुमारे आठवडाभरापूर्वी केली आणि निकाल नकारात्मक आला. त्यापूर्वी मात्र केलेली नाही (२) तुम्हाला मग नक्की काय झालं होत? उत्तरः टेस्ट न केल्यामुळे कोविडबद्दल मला तरी नक्की कधीच सांगता येणार नाही, पण लक्षणांवरून तरी तसे वाटते. बाकी या बाबतीत मिपावरील सुजाण लोक/डॉक्टर मंडळी जास्त सांगू शकतील. (३) आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? उत्तरः आम्हा उभयतांना हा त्रास झाला होता, आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपलेलो असायचो. मुले सकाळी ७ ते दुपारी ४-५ पर्यंत बाहेर असायची. ते दोघे फिजिओथेरॅपिस्ट असल्याने घरून काम करता येत नाही. संध्याकाळी जेवायला वगैरे एकत्र, पण दूर दूर बसायचो. खरेतर श्वासाचा त्रास आणि गुंगीत असल्यासारखे वाटत होते, तेंव्हाचे मला आता काहीही आठवत नाही. (त्याची नोंदच मनात झाली नाही की काय ?) (४) कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही"... हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? उत्तरः सध्याचे सरकारी धोरण साधारणपणे असेच आहे. अगदी जास्त त्रास असेल (ऑक्सिजनची पातळी खाली जाणे, ताप, खोकला , श्वसनाचा त्रास वगैरे) तरच दवाखान्यात घेतात. एरव्ही घरीच राहून काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सरकार कडून नेहमी तुमची चवकशी केली जात रहाते. थोडे अवांतर: मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. यातल्या कोविड-बाधित होऊन बरे झालेल्यांपैकी ज्यांची घरे, कुटुंबीय वगैरे आहेत त्यांना त्यांच्या घरी पाठवले गेले. काही मरण पावले. जे बेघर, सरकारी भत्त्यावरच अवलंबून आहेत, त्यांना (उर्वरित आयुष्य ) तिथेच रहावे लागते. त्यांना अगदी गरज असली तरच फिजिओथेरॅपी द्यायची असे सध्याचे कंपनीचे धोरण आहे म्हणे. सुरुवातीला सर्व कर्मचार्याची कोविड टेस्ट दार आठवड्याला कंपनीतर्फे होत असे, मात्र निकाल येईपर्यंत सुट्टी घेऊन घरीच रहायचे. निकाल यायला कधीकधी दोन-तीन आठवडेही लागायचे. टेस्ट सुद्धा आज निगेटिव्ह, पुढील आठवड्यात पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह असा घोळ, खुद्द बरेचसे कर्मचारीच कोविड पॉझेटिव्ह होणे, कंपनीवर असलेली बेघर लोकांची जबाबदारी आणि त्यासाठी आवश्यक असलेली कर्मचाऱयांची उपस्थिती, विशेषतः गोऱ्या कर्मचाऱयांची काम करण्याबद्दल भिती आणि अनिच्छा (घरबसल्या पगार मिळणार, मग काय) कोविड विषाणूचा एकदा प्रवेश झाला की तो बारा आठवडे शरीरात रहातो म्हणे, परंतु पहिल्या दहा ते चौदा दिवसांनंतर जर लक्षणे निवळली, तर तुमच्यापासून इतरांना धोका रहात नाही असे काहीतरी आहे. कदाचित त्यामुळेच आता कर्मचार्‍यांची साप्ताहिक टेस्ट बंद केली आहे. मात्र खोकला, ताप वगैरे लक्षणे दिसून आल्यास लगेच टेस्ट करवतात. आम्ही बरे होत आलो होतो त्या सुमारास आरोग्य खात्याकडून फोनवरून बरेच प्रश्न विचारण्यात आले, लक्षणे दिसून आल्यास काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले गेले, शक्यतो घरीच रहावे, ऑक्सिजन कमी झाल्यास मात्र भर्ती व्हावे, वगैरे. इकडले गोरे अमेरिकन खुशाल बीचवर, स्विमिंग पुलात, हॉटेलात जातात, पार्ट्या वगैरे काय काय करतात, त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत. हल्ली न्यूयॉर्क व अन्य काही राज्यात बाहेरच्या राज्यांमधून येणारांना दोन आठवडे स्वखर्चाने क्वॅरंटाईन करावे लागते आहे. आम्ही आलो तेंव्हा असे काही नव्हते. टीप: वरील माहिती माझ्या मगदुराप्रमाणे मला जे समजले त्यावरुन देतो आहे. मी टीव्ही वगैरे कधीच बघत नसल्याने आणि कोविड विषयी बातम्या वगैरेंचा केंव्हाचाच वैताग आल्यामुळे माझी माहिती अपुरी वा चुकीचीही असू शकते.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 26/08/2020 - 06:16
मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. काळजी घ्या ... येथे VIKTORIA राज्यात सर्व सुरळीत असताना गेला महिनाभर जो परत प्रसार झाला तो नर्सिंग होम मध्ये जास्त ( येथतील अर्थव्यवस्था साधारण जरी भांडवलशाही आणि सोशालीसम याचे मिश्रण असली तरी नर्सिंग होम हे चालवले जातात खाजगी उद्योगांकडून आणि त्याला सरकारी अनुदान मिळते त्यामुळे "उद्योग आधी कि स्वास्थ्य आधी" हा प्रश्न येथेही आहेच अमेरिके इतका कदाचित टोकाचा नसेल ! )

शशिकांत ओक 14/08/2020 - 19:44
मस्त चाललेल्या कथनात गाढव प्रकरण आल्यावर आमची गाडी गाण्याच्या रुळावरून घसरली... ती इथे थांबली....
तत्पूर्वी आमचे कडून घडलेला एक गाढवपणा इथे सांगितला पाहिजे. तिकिटांची प्रिंटौटे काढायला आम्ही बाजारात गेलो, तिथे लटकवलेल्या हल्दीरामादिंच्या माळांमध्ये खट्टामीठा वगैरेंची दहा- दहा रुपयेवाली पौचे बघून तोंडाला पाणी सुटले. गेल्या दोन तीन महिन्यात असले अरबटचरबट काही खाल्लेले नसल्याने, ‘चला प्रवासात तोंड हलवायला काहीतरी हवे’ म्हणून चार-सहा पाऊचे घेतली. त्यावरील ‘म्यान्युफ्याकटुरिंग दाते’ वगैरे बघण्याचे भानही राहिले नव्हते, असो.
... ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:32
@शशिकांत ओकः ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...
... हा छोटा तीन वर्षे वयाचा मुलगा त्या दिवशी आमच्याकडे आलेल्या परिचितांचा आहे. माझा स्टुडिओ वरच्या मजल्यावर आहे. जिना चढून तो तिकडे जात असलेला बघून मी त्याच्या मागोमाग गेलो, (कारण स्टुडिओत टरपेन्टाईन, थिनर, करवत, कटर, कात्री, ब्लेडा वगैरे उघड्यावर असते.) मी दरवाज्यातून आत शिरलो, तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता. ते गंमतशीर दृष्य त्याक्षणी मला टिपता आले नसले, तरी माझ्या कलेला मिळालेली ही अनोखी पावती आहे, असे वाटून गेले. ... मेहमूदचे हे गाढव-गाणे प्रथमच बघितले.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 18/08/2020 - 22:57
तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता.
हे कौतुकास्पद दृश्य पाहून खुष होणारे मायबाप आजकाल दिसतात!

माझा दुपारचा प्रतिसादफाटेल एर्रोरने गिळला बहुतेक. चिगुकाका, फक्त चलो दिलदार चलो ला लिंकवायचं राहिलं. बाकी लेख, लिंका उत्कृष्ट. तुम्ही सुखरूप आणि खुशाल आहात हे वाचून आनंद वाटला. आता चित्रमय धागा येऊद्या भारी. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:54
चांदणे संदीप, लेख, लिंका आवड्ल्याचे वाचून छान वाटले. 'चलो दिलदार चलो' ची लिंक देता देता लक्षात आले, की ते गाणे आधी वरती दिलेले "हम है तैयार चलो" हेच आहे, त्यामुळे पुनरोक्ती नको म्हणून लिंक काढून टाकली. बाकी श्रीगणेश लेखमालेत चित्रमय धागा येऊ घातला आहे.

In reply to by चौथा कोनाडा

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:58
@ चौथा कोनाडा, "कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट पॉझिटिव्ह" हे खूपच आवडले. कुणाला त्यातून ऊर्जा मिळाली तर सोन्याहून पिवळे. अनेक आभार.

बबन ताम्बे 16/08/2020 - 10:18
आपल्याला झालेल्या आजाराचे एव्हढे खुसखुशीत आणि सकारात्मक वर्णन खूप आवडले तसेच आनंदाने आणि धर्याने एका जगभर थैमान घातलेल्या आजाराशी कसे लढायचे याचा वस्तुपाठ मिळाला.

लई भारी 16/08/2020 - 14:22
छान लिहिलंय तुम्ही! आपला बघण्याचा दृष्टिकोन आणि लेखनशैली आवडली. अमेरिकेतपण साधारण असाच गोंधळ आहे हे बघून आमच्या खुज्या मनाला बर वाटलं! :-) संपादक मंडळाला विनंती आहे की असा काही वेगळा विभाग करता येईल की जिथे मुख्यत्वेकरून कोविड बद्दलचे अनुभव असतील. बऱ्याच लोकांना फायदा होईल असे वाटते.

आरोग्यावरच्या गंभीर संकटावर धीरोद्दातपणे मात केल्याबद्दल मनःपूर्वक तुम्हा उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन. या अनुभवकथनासाठी वापरलेली लेखनशैली एकदम झकास वाटली. हे अनुभवकथन वाचून या संकटाला गांभिर्याने न घेणारे यापुढे गंभीर होतील अशी आशा वाटते. आपण आता अमेरिकेत वास्तव्याला असल्याने यापुढेही काटेकोरपणे कोविड-१९ बाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत राहावे ही प्रेमळ सुचवणी.

शाम भागवत 17/08/2020 - 12:53
झकास लेखन.
त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत.
आपण सर्व भारतीय समंजस आहोतच मुळी. :)

सुमो 26/08/2020 - 09:11
सचित्र संगीतमय आणि प्रेरणादायी लेखन. आवडलं !

पाषाणभेद 27/08/2020 - 22:51
वा छान लिहीले आहे. तुम्हाला जे गुंगीत वाटत होते ते तुमच्या मनाला समजत होते की अजाणतेपणी घडत होते? मला असे विचारायचे आहे की समजा मी कोमात गेलो, तर मला (म्हणजे जो कोमात असेल त्याला) सगळे समजते की काय? फक्त शरीर दाखवत नाही? बाकी आपण बरे झालात ते चांगलेच आहे. आता प्रकृती अगदी ठणठणीत हवी.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 29/08/2020 - 02:45
@पाभे: कोमाबद्दल ठाऊक नाही. मला येत असलेली गुंगी म्हणजे 'कोमा' होती किंवा कसे हे ठाऊक नाही (बहुतेक नसावी) मात्र आत्ता आठवले, की लेखात अनुभवलेले जे दोन जुने अनुभव आहेत ( टायफॉईड आणि चिकनगुनिया) त्यावेळीही अगदी वेगळे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव आले होते, ते असे: १. टायफॉईडच्या वेळी माझे वय सतरा होते. त्यावेळी किंबहुना आजतागायत मला ऊर्दु भाषा, शेरोशायरी वगैरे विषयी ओ की ठो कळत नाही. मात्र जोराचा ताप चढला की कितितरी वेळ (कदाचित तासन तास - वेळेचे अवधान तेंव्हा हरपलेले असायचे) माझ्या मनात अगदी अस्खलित शेरोशायरी न थांबता सतत चालू असायची..... इकडे आश्चर्यही वाटत असायचे की आपल्याला यातले काहीही माहित नसून हे कसे काय होते आहे.... २. चिकनगुनियाच्या वेळी जोराचा ताप चढला, की सर्वांगातून उत्कट आनंदाच्या उबळींवर उबळी उसळू लागायच्या. अनिवार, निखळ आनंदाच्या सरिवर सरी... तेंव्हासुद्धा वाटायचे की आपण एवढे आजारी असून हे काय घडते आहे. हे जे प्रत्यक्ष अनुभव आहेत, त्यांचे कारण/ विष्लेषण काय आहे, हे मला कधीच समजले नाही. कदाचित मानसशास्त्रांवरील पुस्तकांमधे याविषयी असेल सुद्धा. माझ्यामते शरिराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचीच ही बचाव योजना असावी, पण शेरोशायरी हे मात्र एक कोडेच आहे.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 21/09/2020 - 20:35
आश्चर्य आहे. शरीर अन मन एक कोडेच आहे हे नक्की. प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.

In reply to by चित्रगुप्त

ह्याचे एक कारण मला वाटते ते हे असावे कि ज्यांना ज्यांना चित्रकलेचे अंग असलेले पाहिले आहे त्या व्यक्तींमध्ये बाकीचेही कलागुण असतात. उदा. गुरु ठाकुर हा उत्कृष्ठ चित्रकार आहे पण त्याचप्रमाणे उत्कृष्ठ गीतकार व पटकथाकार आहे. रत्नाकर मतकरी उत्कृष्ठ लेखक + चित्रकार. सूर्यकांत मांढरे चित्रकार + उत्कृष्ठ अभिनेते. संदीप खरेही चित्रकार आहे असे वाचले आहे. तुमच्यामध्येही इतर दुसरा कलागुण असावा जो आजारपणात सुप्तावस्थेत प्रकर्षाने जाणवत असावा.

शशिकांत ओक 15/09/2020 - 20:57
करोना झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये पुष्प गुच्छ न्यायला लागत नाही. घरातून बाहेर पडला की फक्त बातमी येते ते /त्या गेले /गेल्या! अंत्यदर्शनासाठी जायची सोय नाही! एकटे मरा...

चित्रगुप्तसेठ, लेखन खुसखुशीत आहे, जागो जागी स्मायल्या येत होत्या. आपण ठणठणीत झालात हे वाचून छान वाटलं. तरीही काही प्रश्न मनात पडले आहेत. एक) संसर्ग कशामुळे झाला असावा, तो प्रवासात काही संपर्क झाले असावे असे वाटते. दोन) उपचारासाठी आपण काय काय घेतले तेही जरा सविस्तर सांगा,म्हणजे बघा. आणि लेखनात एक चित्र पाहिजे होतं. जरासं उघडं-नागडं, पण कलात्मक. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 14/08/2020 - 18:27
सरजी, तीन-चार चित्रे देतो आहे, ही दोन-तीन वर्षांपूर्वी रंगवलली होती. खरेतर अजून अपूर्ण आहेत, यंदा त्यात आणखी काम करावे म्हणतो. . . ... नातवंडांनाही बाळकडू मिळते आहे, बघूया पूढे काय करतात. . . बाकी घरातून बाहेर पडून टॅक्सीत बसल्यापासून पुढले तीस तासात केंव्हातरी संसर्ग झाला असावा. औषधोपचार म्हणावा तर काहीच केले नाही. काढा गुळण्या वगैरे लिहीलेच आहे. आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.

In reply to by हेमंतकुमार

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:10
@ कुमार१ : तुमच्या लेखातून प्रेरणा मिळाली,आणि खूप महिन्यांनी पुन्हा लिहावेसे वाटू लागले. शतशः आभार. मी जे औषधे न घेणे आणि नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्तीबद्दल लिहीले आहे, त्याबद्दल एक डॉक्टर म्हणून काय मत आहे, हे जाणून घेऊ इच्छितो.

In reply to by चित्रगुप्त

हेमंतकुमार 14/08/2020 - 21:15
जंतुसंसर्ग आणि आजार : काही मूलभूत माहिती १. संसर्ग होतो परंतु तो जंतू शरीराच्या प्रतिकारशक्तीला भेदू शकत नाही किंवा प्रतिकारशक्ती त्याच्यावर तातडीने विजय मिळवते >> आजार होत नाही. २. घातक जंतूचा संसर्ग >> जवळपास सर्वांना आजार होतो. आता पुढे ..... a. एखाद्याची प्रतिकारशक्‍ती चांगली असल्यास जंतूचा निचरा लवकर होतो. b. तशी नसल्यास आजार लांबतो/ दीर्घकाळ होतो किंवा उलटतो. इथे b मध्ये औषधांची गरज आणि उपयुक्तता बरीच असते. ३. विषाणूंच्या बाबतीत त्यांची घातकता यावर अवलंबून असते: a. आपल्या शरीरात पसरण्याची क्षमता b. त्यांची प्रजनन क्षमता आणि c.मानवी प्रतिकारशक्तीला भेदण्याची ताकद

चौकटराजा 14/08/2020 - 13:37
अथ ध्यानम ,चित्रगुप्त उवाच ते इति बापूसुतकृतम कोविड आख्यानं संपूर्णम येथवर वाचले ! मला तशी ही इष्टापत्ती वगैरे वाटलेली नाही पण ,देऊळ,हॉटेल,शिनियर शिटीजण टोळके यात रस नसल्याने मला करमत नाही असे झाले नाही !इटाली, चीन,मध्य युरोप येथे यु ट्यूब मुळे अखंड प्रवास चालू आहे ! नजीकच्या भविष्यात आणखी काही शारीरिक समस्यांवर} झाल्यास बाल्कनीत स्वत:च एक वाटरफॉल तयार करण्याचा मानस आहे !

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:23
@ चौरा: 'सावध आशावादाची बखर' या अवघ्या तीन शब्दात आपण केलेला या लेखाचा सन्मान वाचून थक्क झालो. अनेक आभार. तुमच्या आभासी यात्रांबद्दल मिपावर अवश्य लिहा. लेखातील रविंद्रथांची रचना: "नील दिगोन्ते" अवश्य ऐका. यूट्यूबीवर ते अनेकांनी गायलेले आणि नृत्ये वगैरे आहेत, पण मला श्रीराधा बंदोपाध्याय यांचे भावविभोर करणारे गायन, त्यातील मृदुंग आणि सतार हे फार भावले. बंगाली गीताचा अर्थ समजला नाही तरी एक अनोखी जादू त्यात आहे.

विनिता००२ 14/08/2020 - 15:28
छान लिहीलेत :) ह्या लॉकडाऊन मधे मी माझी जेवढी हस्तलिखिते होते ती सॉफ्टकॉपीत रुपांतरीत केली. सर्व डाटा युनिकोडमधे असल्याने अर्धवट कथा पूर्ण करणे, एडीट करणे बरेच सोपे झालेय.

In reply to by विनिता००२

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:58
@ विनिता००२ अभिप्रायाबद्दल अनेक आभार. लॉकडाऊन मधे हस्तलिखिते सॉफ्टकॉपीत रुपांतरीत करणे हे फार मोठे चिकाटीचे काम केलेत हे भारीच. मला पण शेकडो रेखाचित्रे, रंगचित्रे फोटो काढून जालावर टाकायची आहेत. नेमकी कुठे टाकावीत, याबद्दल काही सल्ला ?

In reply to by संजय क्षीरसागर

आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.
आणि चित्रं तर बेफामच !

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:14
@संक्षि, तुमच्यासारख्या विचक्षण रसिकाकडून अशी पावती मिळाणे म्हणजे एकप्रकारे मिपावरील जीवन गौरव पुरस्कारच. शतशः आभार.

मस्त लिहिले आहे. आपल्याला झालेला रोगही इतक्या खुसखुशीतपणे वर्णन करणे याला मनाची सकारात्मकपणा लागतो. असे वर्णन कोरोनाच्या विषाणूने मि. पा. वर वाचले तर तो स्वतः होऊन निघून जाईल. :-)

In reply to by दुर्गविहारी

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:17
@ दुर्गविहारी, लेख खुसखुशीत वाटला, आणि यासाठी मन सकारात्मक हवे, हे वाचून एक आगळेच समाधान दाटले. अनेक आभार.

चौकस२१२ 14/08/2020 - 19:36
"तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. ..." - पण मग नंतर केलीत कि नाही? हे कळले नाही? आणि तुम्हाला मग नक्की काय झालं होत? - आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? " कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही" हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? इथे धोरण असे आहे कि जि पी तुम्हाला तपासून सरळ कोविद ची टेस्ट करायला सांगतो..बरं त्यात त्याचा काही आर्थिक फायदा नसतो.. सगळेच फुकट असते कारण सरकार चे धोरण अतिशय काटेकोर पणे तपासणे आणि प्रादुर्भाव थांबवणे हे आहे , साधारण समाज रचना अमेरिकेसारखी आहे म्हणून विचारले गैरसमज करून घेऊ नका

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 15/08/2020 - 20:50
@ चौकस २१२: तुमच्या प्रश्नांची उत्तरे: (१) पण मग नंतर (कोविड टेस्ट) केलीत कि नाही? हे कळले नाही? उत्तरः लेखाच्या सुरुवातीला लिहील्याप्रमाणे सुमारे आठवडाभरापूर्वी केली आणि निकाल नकारात्मक आला. त्यापूर्वी मात्र केलेली नाही (२) तुम्हाला मग नक्की काय झालं होत? उत्तरः टेस्ट न केल्यामुळे कोविडबद्दल मला तरी नक्की कधीच सांगता येणार नाही, पण लक्षणांवरून तरी तसे वाटते. बाकी या बाबतीत मिपावरील सुजाण लोक/डॉक्टर मंडळी जास्त सांगू शकतील. (३) आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? उत्तरः आम्हा उभयतांना हा त्रास झाला होता, आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपलेलो असायचो. मुले सकाळी ७ ते दुपारी ४-५ पर्यंत बाहेर असायची. ते दोघे फिजिओथेरॅपिस्ट असल्याने घरून काम करता येत नाही. संध्याकाळी जेवायला वगैरे एकत्र, पण दूर दूर बसायचो. खरेतर श्वासाचा त्रास आणि गुंगीत असल्यासारखे वाटत होते, तेंव्हाचे मला आता काहीही आठवत नाही. (त्याची नोंदच मनात झाली नाही की काय ?) (४) कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही"... हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? उत्तरः सध्याचे सरकारी धोरण साधारणपणे असेच आहे. अगदी जास्त त्रास असेल (ऑक्सिजनची पातळी खाली जाणे, ताप, खोकला , श्वसनाचा त्रास वगैरे) तरच दवाखान्यात घेतात. एरव्ही घरीच राहून काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सरकार कडून नेहमी तुमची चवकशी केली जात रहाते. थोडे अवांतर: मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. यातल्या कोविड-बाधित होऊन बरे झालेल्यांपैकी ज्यांची घरे, कुटुंबीय वगैरे आहेत त्यांना त्यांच्या घरी पाठवले गेले. काही मरण पावले. जे बेघर, सरकारी भत्त्यावरच अवलंबून आहेत, त्यांना (उर्वरित आयुष्य ) तिथेच रहावे लागते. त्यांना अगदी गरज असली तरच फिजिओथेरॅपी द्यायची असे सध्याचे कंपनीचे धोरण आहे म्हणे. सुरुवातीला सर्व कर्मचार्याची कोविड टेस्ट दार आठवड्याला कंपनीतर्फे होत असे, मात्र निकाल येईपर्यंत सुट्टी घेऊन घरीच रहायचे. निकाल यायला कधीकधी दोन-तीन आठवडेही लागायचे. टेस्ट सुद्धा आज निगेटिव्ह, पुढील आठवड्यात पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह असा घोळ, खुद्द बरेचसे कर्मचारीच कोविड पॉझेटिव्ह होणे, कंपनीवर असलेली बेघर लोकांची जबाबदारी आणि त्यासाठी आवश्यक असलेली कर्मचाऱयांची उपस्थिती, विशेषतः गोऱ्या कर्मचाऱयांची काम करण्याबद्दल भिती आणि अनिच्छा (घरबसल्या पगार मिळणार, मग काय) कोविड विषाणूचा एकदा प्रवेश झाला की तो बारा आठवडे शरीरात रहातो म्हणे, परंतु पहिल्या दहा ते चौदा दिवसांनंतर जर लक्षणे निवळली, तर तुमच्यापासून इतरांना धोका रहात नाही असे काहीतरी आहे. कदाचित त्यामुळेच आता कर्मचार्‍यांची साप्ताहिक टेस्ट बंद केली आहे. मात्र खोकला, ताप वगैरे लक्षणे दिसून आल्यास लगेच टेस्ट करवतात. आम्ही बरे होत आलो होतो त्या सुमारास आरोग्य खात्याकडून फोनवरून बरेच प्रश्न विचारण्यात आले, लक्षणे दिसून आल्यास काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले गेले, शक्यतो घरीच रहावे, ऑक्सिजन कमी झाल्यास मात्र भर्ती व्हावे, वगैरे. इकडले गोरे अमेरिकन खुशाल बीचवर, स्विमिंग पुलात, हॉटेलात जातात, पार्ट्या वगैरे काय काय करतात, त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत. हल्ली न्यूयॉर्क व अन्य काही राज्यात बाहेरच्या राज्यांमधून येणारांना दोन आठवडे स्वखर्चाने क्वॅरंटाईन करावे लागते आहे. आम्ही आलो तेंव्हा असे काही नव्हते. टीप: वरील माहिती माझ्या मगदुराप्रमाणे मला जे समजले त्यावरुन देतो आहे. मी टीव्ही वगैरे कधीच बघत नसल्याने आणि कोविड विषयी बातम्या वगैरेंचा केंव्हाचाच वैताग आल्यामुळे माझी माहिती अपुरी वा चुकीचीही असू शकते.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 26/08/2020 - 06:16
मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. काळजी घ्या ... येथे VIKTORIA राज्यात सर्व सुरळीत असताना गेला महिनाभर जो परत प्रसार झाला तो नर्सिंग होम मध्ये जास्त ( येथतील अर्थव्यवस्था साधारण जरी भांडवलशाही आणि सोशालीसम याचे मिश्रण असली तरी नर्सिंग होम हे चालवले जातात खाजगी उद्योगांकडून आणि त्याला सरकारी अनुदान मिळते त्यामुळे "उद्योग आधी कि स्वास्थ्य आधी" हा प्रश्न येथेही आहेच अमेरिके इतका कदाचित टोकाचा नसेल ! )

शशिकांत ओक 14/08/2020 - 19:44
मस्त चाललेल्या कथनात गाढव प्रकरण आल्यावर आमची गाडी गाण्याच्या रुळावरून घसरली... ती इथे थांबली....
तत्पूर्वी आमचे कडून घडलेला एक गाढवपणा इथे सांगितला पाहिजे. तिकिटांची प्रिंटौटे काढायला आम्ही बाजारात गेलो, तिथे लटकवलेल्या हल्दीरामादिंच्या माळांमध्ये खट्टामीठा वगैरेंची दहा- दहा रुपयेवाली पौचे बघून तोंडाला पाणी सुटले. गेल्या दोन तीन महिन्यात असले अरबटचरबट काही खाल्लेले नसल्याने, ‘चला प्रवासात तोंड हलवायला काहीतरी हवे’ म्हणून चार-सहा पाऊचे घेतली. त्यावरील ‘म्यान्युफ्याकटुरिंग दाते’ वगैरे बघण्याचे भानही राहिले नव्हते, असो.
... ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:32
@शशिकांत ओकः ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...
... हा छोटा तीन वर्षे वयाचा मुलगा त्या दिवशी आमच्याकडे आलेल्या परिचितांचा आहे. माझा स्टुडिओ वरच्या मजल्यावर आहे. जिना चढून तो तिकडे जात असलेला बघून मी त्याच्या मागोमाग गेलो, (कारण स्टुडिओत टरपेन्टाईन, थिनर, करवत, कटर, कात्री, ब्लेडा वगैरे उघड्यावर असते.) मी दरवाज्यातून आत शिरलो, तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता. ते गंमतशीर दृष्य त्याक्षणी मला टिपता आले नसले, तरी माझ्या कलेला मिळालेली ही अनोखी पावती आहे, असे वाटून गेले. ... मेहमूदचे हे गाढव-गाणे प्रथमच बघितले.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 18/08/2020 - 22:57
तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता.
हे कौतुकास्पद दृश्य पाहून खुष होणारे मायबाप आजकाल दिसतात!

माझा दुपारचा प्रतिसादफाटेल एर्रोरने गिळला बहुतेक. चिगुकाका, फक्त चलो दिलदार चलो ला लिंकवायचं राहिलं. बाकी लेख, लिंका उत्कृष्ट. तुम्ही सुखरूप आणि खुशाल आहात हे वाचून आनंद वाटला. आता चित्रमय धागा येऊद्या भारी. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:54
चांदणे संदीप, लेख, लिंका आवड्ल्याचे वाचून छान वाटले. 'चलो दिलदार चलो' ची लिंक देता देता लक्षात आले, की ते गाणे आधी वरती दिलेले "हम है तैयार चलो" हेच आहे, त्यामुळे पुनरोक्ती नको म्हणून लिंक काढून टाकली. बाकी श्रीगणेश लेखमालेत चित्रमय धागा येऊ घातला आहे.

In reply to by चौथा कोनाडा

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:58
@ चौथा कोनाडा, "कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट पॉझिटिव्ह" हे खूपच आवडले. कुणाला त्यातून ऊर्जा मिळाली तर सोन्याहून पिवळे. अनेक आभार.

बबन ताम्बे 16/08/2020 - 10:18
आपल्याला झालेल्या आजाराचे एव्हढे खुसखुशीत आणि सकारात्मक वर्णन खूप आवडले तसेच आनंदाने आणि धर्याने एका जगभर थैमान घातलेल्या आजाराशी कसे लढायचे याचा वस्तुपाठ मिळाला.

लई भारी 16/08/2020 - 14:22
छान लिहिलंय तुम्ही! आपला बघण्याचा दृष्टिकोन आणि लेखनशैली आवडली. अमेरिकेतपण साधारण असाच गोंधळ आहे हे बघून आमच्या खुज्या मनाला बर वाटलं! :-) संपादक मंडळाला विनंती आहे की असा काही वेगळा विभाग करता येईल की जिथे मुख्यत्वेकरून कोविड बद्दलचे अनुभव असतील. बऱ्याच लोकांना फायदा होईल असे वाटते.

आरोग्यावरच्या गंभीर संकटावर धीरोद्दातपणे मात केल्याबद्दल मनःपूर्वक तुम्हा उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन. या अनुभवकथनासाठी वापरलेली लेखनशैली एकदम झकास वाटली. हे अनुभवकथन वाचून या संकटाला गांभिर्याने न घेणारे यापुढे गंभीर होतील अशी आशा वाटते. आपण आता अमेरिकेत वास्तव्याला असल्याने यापुढेही काटेकोरपणे कोविड-१९ बाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत राहावे ही प्रेमळ सुचवणी.

शाम भागवत 17/08/2020 - 12:53
झकास लेखन.
त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत.
आपण सर्व भारतीय समंजस आहोतच मुळी. :)

सुमो 26/08/2020 - 09:11
सचित्र संगीतमय आणि प्रेरणादायी लेखन. आवडलं !

पाषाणभेद 27/08/2020 - 22:51
वा छान लिहीले आहे. तुम्हाला जे गुंगीत वाटत होते ते तुमच्या मनाला समजत होते की अजाणतेपणी घडत होते? मला असे विचारायचे आहे की समजा मी कोमात गेलो, तर मला (म्हणजे जो कोमात असेल त्याला) सगळे समजते की काय? फक्त शरीर दाखवत नाही? बाकी आपण बरे झालात ते चांगलेच आहे. आता प्रकृती अगदी ठणठणीत हवी.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 29/08/2020 - 02:45
@पाभे: कोमाबद्दल ठाऊक नाही. मला येत असलेली गुंगी म्हणजे 'कोमा' होती किंवा कसे हे ठाऊक नाही (बहुतेक नसावी) मात्र आत्ता आठवले, की लेखात अनुभवलेले जे दोन जुने अनुभव आहेत ( टायफॉईड आणि चिकनगुनिया) त्यावेळीही अगदी वेगळे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव आले होते, ते असे: १. टायफॉईडच्या वेळी माझे वय सतरा होते. त्यावेळी किंबहुना आजतागायत मला ऊर्दु भाषा, शेरोशायरी वगैरे विषयी ओ की ठो कळत नाही. मात्र जोराचा ताप चढला की कितितरी वेळ (कदाचित तासन तास - वेळेचे अवधान तेंव्हा हरपलेले असायचे) माझ्या मनात अगदी अस्खलित शेरोशायरी न थांबता सतत चालू असायची..... इकडे आश्चर्यही वाटत असायचे की आपल्याला यातले काहीही माहित नसून हे कसे काय होते आहे.... २. चिकनगुनियाच्या वेळी जोराचा ताप चढला, की सर्वांगातून उत्कट आनंदाच्या उबळींवर उबळी उसळू लागायच्या. अनिवार, निखळ आनंदाच्या सरिवर सरी... तेंव्हासुद्धा वाटायचे की आपण एवढे आजारी असून हे काय घडते आहे. हे जे प्रत्यक्ष अनुभव आहेत, त्यांचे कारण/ विष्लेषण काय आहे, हे मला कधीच समजले नाही. कदाचित मानसशास्त्रांवरील पुस्तकांमधे याविषयी असेल सुद्धा. माझ्यामते शरिराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचीच ही बचाव योजना असावी, पण शेरोशायरी हे मात्र एक कोडेच आहे.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 21/09/2020 - 20:35
आश्चर्य आहे. शरीर अन मन एक कोडेच आहे हे नक्की. प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.

In reply to by चित्रगुप्त

ह्याचे एक कारण मला वाटते ते हे असावे कि ज्यांना ज्यांना चित्रकलेचे अंग असलेले पाहिले आहे त्या व्यक्तींमध्ये बाकीचेही कलागुण असतात. उदा. गुरु ठाकुर हा उत्कृष्ठ चित्रकार आहे पण त्याचप्रमाणे उत्कृष्ठ गीतकार व पटकथाकार आहे. रत्नाकर मतकरी उत्कृष्ठ लेखक + चित्रकार. सूर्यकांत मांढरे चित्रकार + उत्कृष्ठ अभिनेते. संदीप खरेही चित्रकार आहे असे वाचले आहे. तुमच्यामध्येही इतर दुसरा कलागुण असावा जो आजारपणात सुप्तावस्थेत प्रकर्षाने जाणवत असावा.

शशिकांत ओक 15/09/2020 - 20:57
करोना झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये पुष्प गुच्छ न्यायला लागत नाही. घरातून बाहेर पडला की फक्त बातमी येते ते /त्या गेले /गेल्या! अंत्यदर्शनासाठी जायची सोय नाही! एकटे मरा...
मित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा). प्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे : मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेतून मुलगा, सून आणि लहानशी नात भारतात आले. त्यांचे व्हिसादिकांचे काम आटोपल्यावर आम्ही सगळे उदयपूर प्रवासाला गेलो.

संपला फ्रेंडशिप डे......

सुधीर मुतालीक ·

विजुभाऊ 05/08/2020 - 07:45
आहा हाहा मस्तच लिवलय. एकदम झकास. सगळा हिषेब असा एकदम मांडायच्या ऐवजी जरा प्रत्येक एपीसोडवाईज लिहीता का.

हा हा हा ! भारी लिहिले आहे. "फक्त फुकट चेपायला मिळते म्हणून मुली फ्रेंडशिप देतात" अशी बातमी कोठेतरी वाचली होती. खरी कि खोट? याचा अनुभव नाही. पण तुमची कथा वाचून मजा आली. :-)

In reply to by दुर्गविहारी

आनन्दा 05/08/2020 - 18:08
तुमचे वरचे वाक्य वाचून पार उडालो ना मी.. उशिरा कळला अर्थ!! असो. चोराच्या मनात चांदणे, दुसरे काय म्हणायचे याला?

In reply to by आनन्दा

मी पण :) वाक्यात 'चेपायला' ऐवजी 'चापायला' हवे होते का ? असो, असल्या बाबतीत शुद्धलेखनास फाट्यावर मारावे आणि जो काही मनास भावेल तो अर्थ घेऊन 'आनंदा'त रहावे.

In reply to by आनन्दा

अर्रर्रर्र ! गलतीसे लईच मोठी मिस्टेक झाली कि हो ! स्वारी बर का. माझ्या मनात तसे काही नव्हते. :-))))

सौन्दर्य 05/08/2020 - 22:48
नाय म्हणजे रुपये २२५३.८० मध्ये 'काय काय' अपेक्षित होते तुम्हाला ? असाच एक सहज सुचलेला प्रश्न. (हलकेच घ्या, नायतर एक पाव ओल्ड मॉंक झाल्यावर आमची बी वरात काडाल)

त्यामुळे दोनेक दिवसांनी पुनश्च हरीओम.
खरायं. आमचा देखील असाच एक मित्र होता. मात्र चॉईस नावाचा प्रकारच नव्हता. प्रेमात पडायला अगदी कोणतीही मुलगी त्याला चालत असे. आम्ही काही सल्ले दिल्यावर "लोकाच्या लेकराला नावं ठेऊ नयेत" असा ठरलेला डॉयलॉग मारुन आमची बोळवण व्हायची. अर्थात त्याने पैसे देऊन कधीही प्रेम विकत घेतले नाही आणि कोणत्याही मुलीने त्याला प्रेमाचे दान दिले नाही. शेवटपर्यंत मनोव्यापार करुन थकल्यावर आई बापाने आणलेल्या स्थलाबरोबर बोहलस्थ जाहला.

अर्धवटराव 06/08/2020 - 06:08
बेस्ट फ्रेण्ड नामक पोपटाची 'गाडी किधरको जारी' हे तिला पुरेपुर माहित असतं.... तरी अगदी दरीच्या टोकावर येतपर्यंत 'नो एण्ट्री' चा बोर्ड दाखवत नाहि वो जालिम. पण असे पोपट होण्याची मजाच काहि और आहे (मजा न मानुन सांगतो कोणाला ;) )

विजुभाऊ 05/08/2020 - 07:45
आहा हाहा मस्तच लिवलय. एकदम झकास. सगळा हिषेब असा एकदम मांडायच्या ऐवजी जरा प्रत्येक एपीसोडवाईज लिहीता का.

हा हा हा ! भारी लिहिले आहे. "फक्त फुकट चेपायला मिळते म्हणून मुली फ्रेंडशिप देतात" अशी बातमी कोठेतरी वाचली होती. खरी कि खोट? याचा अनुभव नाही. पण तुमची कथा वाचून मजा आली. :-)

In reply to by दुर्गविहारी

आनन्दा 05/08/2020 - 18:08
तुमचे वरचे वाक्य वाचून पार उडालो ना मी.. उशिरा कळला अर्थ!! असो. चोराच्या मनात चांदणे, दुसरे काय म्हणायचे याला?

In reply to by आनन्दा

मी पण :) वाक्यात 'चेपायला' ऐवजी 'चापायला' हवे होते का ? असो, असल्या बाबतीत शुद्धलेखनास फाट्यावर मारावे आणि जो काही मनास भावेल तो अर्थ घेऊन 'आनंदा'त रहावे.

In reply to by आनन्दा

अर्रर्रर्र ! गलतीसे लईच मोठी मिस्टेक झाली कि हो ! स्वारी बर का. माझ्या मनात तसे काही नव्हते. :-))))

सौन्दर्य 05/08/2020 - 22:48
नाय म्हणजे रुपये २२५३.८० मध्ये 'काय काय' अपेक्षित होते तुम्हाला ? असाच एक सहज सुचलेला प्रश्न. (हलकेच घ्या, नायतर एक पाव ओल्ड मॉंक झाल्यावर आमची बी वरात काडाल)

त्यामुळे दोनेक दिवसांनी पुनश्च हरीओम.
खरायं. आमचा देखील असाच एक मित्र होता. मात्र चॉईस नावाचा प्रकारच नव्हता. प्रेमात पडायला अगदी कोणतीही मुलगी त्याला चालत असे. आम्ही काही सल्ले दिल्यावर "लोकाच्या लेकराला नावं ठेऊ नयेत" असा ठरलेला डॉयलॉग मारुन आमची बोळवण व्हायची. अर्थात त्याने पैसे देऊन कधीही प्रेम विकत घेतले नाही आणि कोणत्याही मुलीने त्याला प्रेमाचे दान दिले नाही. शेवटपर्यंत मनोव्यापार करुन थकल्यावर आई बापाने आणलेल्या स्थलाबरोबर बोहलस्थ जाहला.

अर्धवटराव 06/08/2020 - 06:08
बेस्ट फ्रेण्ड नामक पोपटाची 'गाडी किधरको जारी' हे तिला पुरेपुर माहित असतं.... तरी अगदी दरीच्या टोकावर येतपर्यंत 'नो एण्ट्री' चा बोर्ड दाखवत नाहि वो जालिम. पण असे पोपट होण्याची मजाच काहि और आहे (मजा न मानुन सांगतो कोणाला ;) )
कसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे !!! ‘मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानते...' या वाक्याची लय भीती वाटायची राव ! कोंच्या क्षणी थोबाडावर हे वाक्य येऊन आदळेल याचा नेम नसायचा. बरं, ते आलंच अंगावर की मेंदू त्यावेळी मात्र सटासट कॅल्क्युलेशन करायचा. तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन इंजिनियरिंगला असताना झाले असते तर आज कुठच्याकुठं गेलो असतो आपण!

लॉकडाउनमधील रनिंगचा अनुभव

मार्गी ·
सर्वांना नमस्कार! परभणीमध्ये गेल्या महिन्यामध्ये विद्यापीठाचा परिसर नुकताच मॉर्निंग वॉक व रनिंग करणा-यांसाठी खुला केला होता. तेव्हा खूप दिवसांनी तिकडे रनिंग चालू केलं. लॉकडाउनच्या काळात सायकलिंग बंद होतं. त्यामुळे त्या दिवसांमध्ये अंगणामध्येच आठवड्यातून दोन- तीनदा टायमर लावून रनिंग करत होतो. परिस्थिती काही काळ ठीक झाल्यावर रोडवर थोडे दिवस सायकलिंग केलं आणि विद्यापीठाच्या परिसरात रनिंग करण्याचा आनंद घेतला न घेतला तोच घरासमोरच कंटेनमेंट झोन आला. सरकारचे नियम काहीही असले तरी परिस्थितीचं गांभीर्य समजून घेऊन काळजी घेणं प्रत्येकाचं काम आहे.

कोविड-१९, थांबा आणि गांभीर्‍याने घ्याच अजून जरासे

माहितगार ·

मदनबाण 14/07/2020 - 16:12
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने आत्ता पर्यंत इतकी परस्पर विरोधी वक्तव्य केली आहेत की ती संघटना आता विश्वासास पात्र आहे का ? हाच प्रश्न आत्ता उद्भवावा ! करोनाच्या आजारा संबधी जालावर ज्या बातम्या येत आहेत त्या सत्य मानायचे असे क्षणभर धरल्यास करोना या रोगाने शरीराचे पार वाटोळे होते असे वाटते. बाधीत होउन परत घरी पाठवलेले रुग्ण काही काळाने परत बाधीत होणे तसेच या आजाराने मेंदू,हृदय, फुफ्फुस आणि किडणी याची पार वाट लागणे तसेच शरीराची प्रतिकार क्षमता कमी होण्या पासुन ते पुढील आयुष्यात या आजाराने रुग्णास शारीरिक कष्ट उद्भवणे असे बरेच काही घडु शकते ! संदर्भ :- Almost 90% of Covid-19 survivors still have symptoms such as fatigue TWO MONTHS after their illness, 'extremely worrying' study reveals Coronavirus: What does Covid-19 do to the brain? Severe brain damage possible even with mild coronavirus symptoms New evidence shows Covid-19 could cause brain damage in patients Delirium, rare brain inflammation and stroke linked to Covid-19 How the novel coronavirus attacks our entire body Covid-19 symptoms outside lungs decoded, virus can lead to high blood sugar levels, blood clots & delirium Large Number of Coronavirus Patients Suffer Kidney, Heart and Brain Damage, Studies Find Researchers decode symptoms of COVID-19 outside lungs, call it a 'multisystem disease' Coronavirus: Heart scans of more than half of COVID-19 patients abnormal, scientists find Coronavirus may have ‘devastating impact’ on the heart आता खरचं हा व्हायरस इतका रानटी आहे का ? याचे उत्तर आपल्याला बहुतेक पुढील ६ ते १० महिन्यात मिळावे असे वाटते, यमलोकी किती लोक जातील त्याचाही आकडा या कालावधीत कळेलच ! याच बरोबर मोठ्या संख्येने लोक उपासमारीने मरतील याची भिती आणि दु:ख वाटत आहे ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

जागतिक आरोग्यसंघटनेचं आता काही खरं राहीलेलं नाही, ते आणि आपले ते काय, त्यांचं नाव विसरलो. निव्वळ गप्पांवर भरवसा. प्रत्यक्षात काहीच नाही त्यामुळे दरदोन दिवसाला आरोग्यसंघटनाच्या नवनवीन बातांवर माझा आता विश्वास उरला नाही. लशीचं म्हणाल तर, जरा पेप्रात अशी बातमी आली, टीव्हीवर असे काही दावे आले की काही तरी हालचालीने निपचित पडलेलं कुत्र जसं कान टवकारतं तसं आपलं सर्वांचं झालंय. ज्या दिवशी प्रत्यक्षात अशी लस येईल, आणि पोलियोचा डोस देणारे कर्मचारी जसे घरोघर विचारत फिरतात तसे कोरोनाची लस घ्यायची कोणी बाकी आहे का असे विचारणारे येतील त्या दिवशी तो डोस टोचून घेऊ. तो पर्यंत अशा बातम्या वाचायच्या आणि सोडून द्यायच्या. रामदेवबाबांच्या अशाच घोषणेने प्रचंड आनंद झालेले लोक पाहिले. आता आपण पूर्वीसारखं कसं जगत होतो हे आता आठवेनासं झालंय. भविष्यात तसे जगू असेही सध्या काही वाटत नै. च्यायला, कसल्या मजेचं आयुष्य होतं पण काय माज होता तेव्हा आपल्याला असे वाटले. सालं, कोरोनाने वाट लावली. बाकी, जिथे दुकानदार मास्क न लावलेला असेल अशा ठिकाणी फटकायचं नाही. रिस्क फॅक्टर जास्त आहे, असे वाटते. तसंही करोना कशाने होईल काही सांगता येईना. लैच अंदाजपंचे आयुष्य झालं. भेंडी किती दिवस त्या दाळी खायच्या म्हणून आज चिकन आणायला गेलो होतो. चिकनवाल्याचा मास्क हनुवटीला आलेला. चिकन घ्यायचा विचार बदलला त्याच्या दुकानातून अंडी घेतली आणि मास्क लावलेल्या दुसर्‍या दुकानदाराकडून चिकन घेतलं, म्हणजे जेवढ्या वेळात पाहिलं तोवर मास्क ग्लोव्ज दिसले. पूर्वीचं आणि नंतरचं माहिती नाही. अंडी साबण पाण्याने धुवून घेतली. चिकन हळदमिठाने धुवून घेतली मनाचं समाधान. मास्क कितीवेळ ठेवायचा, रुमाल किती वेळा तोंडावर बांधून ठेवायचा. जीव गुदमरतो तरीही न कंटाळता मास्क लावणे,फिझीकल डिस्टेन्स पाळणे, सॅनीटायजरचा वापर करणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धुत राहणे, आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यायची. रुग्णालयात गेल्यावर माणूस बरा होतो, पण त्या कटकटीच ना..! तेव्हा मास्क नसेल लावला कोणी तर त्याला हटकायचं, समजून सांगायचं. पटलं तर ठीक नै तर सोडून द्यायचं. भांडन करुन तान वाढवून घ्यायचा नाही. इतक्या तितक्याशा कारणावरुन भांडन वाढवायचं नाही. सध्या समजूतदारपणे घ्यायचं. एकदा लस आली आणि त्याचे दुष्परिणाम नसतील असे समजू आणि गॅरंटेड लस असली की पुन्हा आपण आपल्या स्वभावावर परत येऊच...! -दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 16:57
-दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ) बिरुटे सर ते करोना हाय बरं का लष्कराच्या भाकऱ्या...... पाहिल्या नाहीत का ? आता तिसर्‍यांदा स्वतःचाच प्रतिसाद एडिट करा बरं ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

माहितगार 14/07/2020 - 17:29
कोविड -१९ अजूनही शत्रु नंबर १ आहे. पण अनेक व्यक्ती, नेतृत्व आणि सरकारांचे वागणे त्याचा मुकाबला करण्याच्या अनुषंगाने पुरेसे नाही. हा पहिला मुद्दा सोडला तर इतर मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेचे नाहीत. कोविड-१९ एकदा होऊन गेल्यानंतरही इतर अवयवांना भोवतो आहे हे स्पष्ट करणारे डॉ. रणदीप गुलेरीया भारतीय AIIMS च्या क्लिनीकल रिसर्च विभागाचे प्रमूख आहेत. आणि बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात असा सावधानतेचा इशारा देणार्‍या प्रा. वेंडी बार्कले या इंग्लंडातील जागतिक स्तरावर या विषयावरील नामांकीत जुन्या जाणत्या संशोधक समजल्या जातात. त्याही आधी मागच्या आठवड्यात ३२ देशातील २३९ संशोधकांनी जागतिक आरोग्त संघटनेला पत्र देऊन 'बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात' याची जाणीव दिली त्यास प्रा. वेंडी बार्कलेयांनी त्यांच्या संशोधनातून पुष्टी दिली. तज्ञ डॉक्टर सर्वसामान्य पेशंट्स समोर आपापसातील वैद्यकीय मतभेदांची चर्चा करत नाहीत म्हणजे त्यांच्यात वैद्यकीय मतभेद नसतात असे नसावे. सर्वसामान्य माणसाची तार्कीक बाजू लंगडीपडते धरसोड होते तसे जागतिक आरोग्य संघटनेचेही होते. ती यावेळी अधिक प्रकाशात आली एवढेच. जागतिकस्तरावर आरोग्य विषयक समन्वय साधणारी दुसरी संस्था नाही तो पर्यंत तिच्या मर्यादांसहीत सल्ले लक्षात घेण्या शिवाय तुर्तास पर्याय नाही. आपण आपल्या पेशंटला दोन वेगवेगळे डॉक्टर सल्ला देतात तेव्हा काय करतो ? अधिक सुरक्षीत सेफ साईडला असणारा सल्ला निवडतो.

"एकही मृत्यू कोरोनामुळे नाही.. आणखी एक मास्टरस्ट्रोक !" कोरोना हे WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रचलेले एक षडयंत्र असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. अनेक तज्ञांनी, अभ्यासकांनी, शोध पत्रकारांनी ही गोष्ट जाहिर केली आहे.. सिद्ध केली आहे. त्यात कोरोना फेक असल्याचा आणखी एक मास्टरस्ट्रोक युरोपियन शास्त्रज्ञांनी नुकताच दिला. डब्ल्यूूूएचओच्या निर्देशानुसार कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नाही. मात्र एका उच्च दर्जाचे युरोपियन पॅथॉलॉजिस्ट डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी त्यांच्या टिममधील रोझमेरी फ्रे आणि मोरी डेव्हरेक्स इत्यादी सहकाऱ्यांसह युरोप खंडातील कोरोनाने मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे पोस्टमार्टम केले आणि संशोधनांती असे नोंदविले आहे की, *संपूर्ण युरोप खंडातून कुणाचाही मृत्यू नोवल कोरोनाव्हायरसमुळे झाल्याचा कोणताही पुरावा त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मिळालेला नाही.* त्यांनी हे देखील उघड केले की, *युरोपियन पॅथॉलॉजीस्ट्स यांना SARS-CoV-2 म्हणजे Covid-19 साठी विशिष्ट अशी कोणतीही अँटीबॉडीज आढळली नाही.* त्यामुळे सर्व जगभरात महामारीची भीती आणि अराजक निर्माण करण्यासाठी *कोणत्याही आधाराशिवाय महामारीची धोकादायक घोषणा करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूूूएचओला) डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी एक "क्रिमिनल मेडिकल ऑर्गनायझेशन" अर्थात “गुन्हेगारी वैद्यकीय संस्था” असे संबोधले.* अशी माहिती डॉ.अलेक्सोव यांची टिम सदस्य रोझमेरी फ्रे यांनी दिली. Corbett Report वर आपण 15 जूनची त्यांची मुलाखत पाहू शकता. तसेच Off-Guardian वरील 2 जुलैचा लेख वाचू शकता. डॉ.अलेक्सोव हे एक निर्विवाद आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून, ते 30 वर्षांपासून डॉक्टर आहेत. शिवाय ते बल्गेरियन पॅथॉलॉजी असोसिएशनचे (बीपीए) अध्यक्ष आहेत, तसेच ईएसपीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आणि बल्गेरियन राजधानी सोफियातील ऑन्कोलॉजी हॉस्पिटलमधील हिस्टोपाथोलॉजी विभागाचे प्रमुखही आहेत. तसेच रोझमेरी फ्रे या कॅलगरी विद्यापीठातील मेडिकल फॅकल्टीतून आण्विक जीवशास्त्रात एमएससी असून सद्या स्वतंत्र मेडिकल रिसर्च जर्नालिस्ट आहेत. डॉ.अलेक्सोव जे सांगत आहेत त्यास समर्थन देताना जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग-एपेनडॉर्फ येथील फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. क्लाऊस पेशेल यांनी वेेेबिनार मुलाखतीत सांगितले की, *"कोविड-19 च्या प्राणघातकतेबद्दल खात्रीशीर पुरावा नसल्याचे दिसून येते."* तसेच *“कोविड-19 हा केवळ एखाद्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये घातक आजार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे एक अत्यंत निरुपद्रवी व्हायरल इन्फेक्शन आहे,”* असेेेही डॉ.पेशेल यांनी एप्रिलमध्ये एका जर्मन पेपरला मुलाखतीत सांगितले. याशिवाय आणखी एका मुलाखतीत डॉ.पेशेल सांगतात की, "बर्‍याच प्रकरणांमध्ये आम्हाला असेही आढळले आहे की, घातक आजारांमधील मृत्यूंशी वर्तमान कोरोना संसर्गाचा काहीही संबंध नाही. कारण त्यात मृत्यूची इतर कारणे आढळली आहेत, जसे मेंदू रक्तस्राव किंवा हृदयविकाराचा झटका. कोविड-19 विशेषतः धोकादायक व्हायरल रोग नाही, मात्र प्रत्येक मृत्यूच्या सर्व अनुमानांची कुशलतेने तपासणी केली गेली नाही हे चिंताजनक आहे." रोझमेरी सांगतात की, त्या आणि त्यांच्या टीममधील एक पत्रकार मोरी डेव्हरेक्स यांनी 9 जूनच्या ऑफ-गार्डियन लेखात असे प्रमाणित केले आहे की, कोरोनाव्हायरस कोचच्या तत्त्वांची पूर्तता करीत नाही. ही तत्वं एक वैज्ञानिक पद्धती आहे, जी व्हायरस अस्तित्त्वात आहे का आणि विशिष्ट रोगांशी त्याचे परस्पर संबंध आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी वापरले जाते. तसेच पुढे त्या म्हणतात आम्ही संशोधन अहवालात नोंदविले की, "आजपर्यंत कोणालाही सिद्ध करता आले नाही की, SARS-CoV-2 हे आजाराचे एक वेगळे कारण आहे, जे त्या सर्व लोकांच्या लक्षणांशी जुळते, ज्यांचा स्पष्टपणे COVID-19 मुळे मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय तपासणीत या वायरसला ना वेगळे ठेवले गेले ना पुनरुत्पादित केले. मात्र पुढे तो आजाराला कारणीभूत असल्याचे दर्शविले गेले." याव्यतिरिक्त, 27 जूनच्या ऑफ-गार्डियनच्या लेखात, टोर्स्टन एंगेलब्रेक्ट आणि कॉन्स्टँटिन डीमीटर या दोन पत्रकारांनी *“SARS-CoV-2 RNAचे अस्तित्व विश्वासावर आधारित आहे, वास्तविकतेवर आधारित नाही,”* याचा आणखी एक पुरावा जोडला. अर्थात, वेगवेगळ्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचा आणि कोरोनाचा एकमेकांशी काही संबंध नाही. मात्र त्या रुग्णांच्या मृत्यूंची गणना कोरोनाच्याच नावाखाली केली गेलीय आणि केली जातेय हे स्पष्ट आहे. म्हणजेच एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही हे डॉ.अलेक्सोव यांच्या सर्वेक्षणातून त्यांनी सिद्ध केले आहे. युरोपियन पॅथॉलॉजिस्ट्स यांनी कोरोना फेक असल्याचे निष्कर्ष मांडल्यानंतर त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचा दबाव आणला जात आहे. तसेच डॉ.अलेक्सोव यांचे सर्वेक्षण आणि त्या सर्वेक्षणाचे विश्लेषण केलेले रोझमेरी यांचे आर्टिकल चुकीचे ठरविण्यासाठी हॉक्स साईट्सचा वापर करुन बेबनाव केला जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक पॅथॉलॉजिस्ट्सवर कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचा दबाव आहे. तसेच WHO च्या प्रोटोकॉलमुळे तोंड उघडता येत नसल्याचे काही पॅथॉलॉजिस्ट्स सांगत आहेत. तर काही पॅथॉलॉजिस्ट्स अशा दबावात चुकीचे काम करण्यास तयार नाहीत. यावरून ही गोष्ट लक्षात येते की, WHO ने कोरोनामुळे झालेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नसल्याचे निर्देश का दिले असावेत. याशिवाय अमेरिकन सरकारच्या CDC आरोग्य संस्थेने अन्य काही आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे कारण हे कोरोना नोंदवा अशा सुचना डॉक्टरांना आधीच दिलेल्या आहेत. WHO आणि CDC च्या अगदी याच गोष्टी भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने लागू केल्या आहेत. आतापर्यंत (9 जूलै) जगभरातून साधारण 1 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट आणि 5 लाख 52 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. तसेच यु.के मधून 2 लाख 87 हजार टेस्ट व 44 हजार मृत्यू तर भारतातून 7 लाख 71 हजार कोरोना टेस्ट आणि 21 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. कोरोना म्हणजे साधारण सर्दीचा आजार आहे. आणि केवळ एक साधारण सर्दीचा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण करतोय ही कुणाही सुज्ञांच्या बुद्धीला न पटणारी बाब आहे. सबंध कारोनाची आकडेवारी म्हणजे प्रचंड दिशाभूल आहे. *कोरोना एक जागतिक अंधश्रद्धा आहे.* *कोरोना एक जागतिक षडयंत्र आहे.* ✍️लेखन- जर्नालिस्ट *हर्षद रुपवते* Article published on: 9 July 2020 Source- https://off-guardian.org/2020/07/02/no-one-has-died-from-the-coronavirus-president-of-the-bulgarian-pathology-association/ https://www.globalresearch.ca/no-one-has-died-coronavirus/5717668

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 18:10
हे दोन्ही लेख व्हॉट्अ‍ॅप वर काही दिवसापुर्वी फिरत होते, आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? चीन मध्ये लाखो लोक मेले ते कुठल्या व्हायरस ने मेले ? अश्या व्हिडियोंचे तू-नळीवरील चॅनल असताना त्या युजरला ते सगळे व्हिडियो का डिलिट करावे लागले ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

In reply to by मदनबाण

मदनबाण 16/07/2020 - 10:02
आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? आतापर्यंत 99 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून रेड अलर्ट जारी

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumati

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 19:40
सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक या माझ्या जुन्या मिपा धाग्याची या निमीत्ताने आठवण झाली. मला उपरोक्त कॉन्स्पिरसी थेअरी वाचताना विनोदी सार्कॅझम वाटली म्हणून Dr Stoian Alexov या नावाचा गूगल न्यूजवर शोध घेतला तर मेन स्ट्रीम मिडीयाने या वल्लीची अजिबात दखल घेतलेली दिसत नाही. फक्त फॅक्ट चेक करणार्‍या healthfeedback.org पोर्टलवरील या लेखातून the European Society of Pathology (ESP). चा दाखला देत Dr Stoian Alexov चा प्रत्येक दावा खोडलेला दिसतो. माझ्या अल्प ज्ञानाचा तर्क जिथपर्यंत पोहोचतो त्यानुसार, वीषाणूंचा प्रभाव प्रत्यक्ष नसून परिस्थिती जन्य असावा त्यामुळे केवळ कोविड १९च काय बहुतेक वीषाणूंच्या वीरोधात प्रत्यक्ष प्रभावाचा पुरावा नसल्याचा दिशाभूल करणारे दावा करता येत असावा. बेसिकली वीषाणू हे वीष नाही की एखादा अवयव बंद पाडून मृत्यूस डायरेक्ट कारणीभूत होईल -तसे असते तर वीषाणू संसर्ग झालेले सर्वच मृत झाले असते कुणिच वाचले नसते. वीषाणू हे वेगवेगळ्या शारीरीक परिस्थिती निर्माण करतात ज्यामुळे आजार ओढावतात, बहुतेक किंवा बरेच बरे होतात, काहींचे बळावतात आणि त्यातील काही मृत्यूस कारणीभूत होतात. वेगवेगळ्या वीषाणूंच्या प्रभावानुसार किती आजारी पडणार किती बळावणार किती मृत्यूच्या तोंड जाणार ते व्यक्ती परत्वे घडत जाते. वीषाणू शास्त्रच खोटे असते लसी खोट्या असत्या तर लसींच्या शोधाने जगाची जेवढी लोकसंख्या वाढली आहे तेवढी वाढली नसती. असे काही नाहीच म्हणून कोविड -१९ पार्ट्या अटेंड करणारे बाधीत होऊन मेले नसते ना पेशंट्सना अटेंडकरणारे अनेक डॉक्टर आणि आरोग्य सेवक मेले असते. नाही म्हटले तरी ब्रिटन आणि आमेरीका जागतिक महासत्ता आहेत ज्यांना आपल्या प्रमुख नेत्याच्या आरोग्याची बारकाईने काळजी घ्यावी लागते, मास्क बांधण्यास नकार देणारा ब्रीटनचा पंतप्रधान आजारी पडला नसता, मास्क बांधण्यास नकार देणारा डोनाल्ड ट्रम्प मास्क बांधण्यास सुरवात करता झाला नसता. विलगीकरण कक्षातले बेड कमी पडणे वेगळे , अती दक्षता विभागाचे बेड कमी पडून शेकडोंनी लोक मरत असतील,, एकुण मृत्यूदर ४९ टक्क्या पर्यंत वाढला असेल, प्रेत पुरण्यासाठी अधिक जागा खोदल्या जात असतील स्मशानभूमीतील नोंदी मागच्या वर्षापेक्षा वाढल्या असतील आणि हे सर्व मिथ्या आहे असे कुणि म्हणत असेल तर ते दर्शनशास्त्र म्हणून भारतीय तत्वज्ञानास नवीन नाही पण आपला हात भाजल्यावर होणारी वेदना वास्तवच असते किंवा कसे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत त्या खाली हे वीषाणू (आणि इतर सुक्ष्म जीव दिसतात) प्राणी शरीरात पोहोचल्यानंतर ते स्वतःचा गुणाकार करत कसे वाढतात, त्यामुळे प्राणी आणि मानवी शरीर कसे प्रतिकार करते आणि केव्हा कमी पडते यास आधुनिक जागतिक संशोधनाचा शंभरेक वर्षांचा तरी पाया आहे. एक्सरे पासून ते विवीध स्कॅनिंग मशिनचे तंत्रज्ञान वाढले आहे. व्हायरॉलॉजीस्ट आणि इम्युनॉलॉजीस्ट काही दोनचार देशात नाही तर अनेक देशात आहेत जाया सर्वांना जेनेटीक कोड तपासता येतात प्रत्येक देशाकडे स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत सर्व देशातल्या सर्व प्रयोगशाळा आणि शेकडोंनी वैज्ञानिक एकजात खोटे बोलत असल्याचे दावे अतिशयोक्त ठरत असावेत. जनतेची दिशाभूल करणारा कोणताही संदेश सोशल मिडीयावर फॉर्वर्ड करण्यापुर्वी आपल्या परिचयातील व्हायरॉलॉजीस्ट आणि लंग्सस्पेशालिस्टशी चर्चा करून घेणे श्रेयस्कर नसते का ? लॉक डाऊन मुळे लोकांचे मोठेच आर्थीक नुकसान झाले हे खरे आहे पण अधिकतम शारीरीक अंतर, मास्क लावणे, शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात नुकसानकारक काय आहे ? शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात काही केमीकल कंपन्यांचा फायदा होत असेल नाही असे नाही. पण लोकांना परवडणारच नाही एवढे सुद्धा साबण महाग नसते. पिपिई आणि एन-९५ मास्कबाबतीत कंपन्यांना फायदा आहे नाही असे नाही पण प्रत्यक्षात डॉक्टरांनाच संसर्ग होऊन मरताहेत म्हणून डॉक्टरांनाच प्राधान्याने वापरण्यास सांगतात त्या अर्थी वीषाणू प्रभाव खरा नसावा किंवा कसे ? माझ्या व्यक्तिगत मते ५ पेक्षा अधिक व्यक्तींना दिवसाभरात भेटणार्‍या प्रत्येकाने एन-९५ मास्क वापरला पाहिजे , त्याने वीषाणू संसर्गाचा साखळी थांबण्यास मदत होईल . सोबत प्रत्येक व्यक्तीने अधिकतम शारीरीक अंतर कापडी मास्क अधिकची स्वच्छताने खूप नुकसान होणार नाही पण वस्तुस्थितीस नकार दिल्याने होणारे नुकसान अधिक मोठे असेल.

In reply to by माहितगार

खरं तर मेसेज फॉर्वर्ड असला तरी शेवटी दुव्यातील गोष्टींवर चर्चा करायला हरकत नसावी. बाकी, त्या 'हू' ने इतक्या फिरक्या आणि गिरक्या घेतल्या आहेत की त्याबद्दल न बोललेलंच बरं. नेमकं सत्य काय आहे, हे अजूनही तितक्या धाडसाने कोणी सांगू शकत नाही. बाकी, संपादकांनी फॉर्वर्ड मेसेज असलेला संदेश अप्रकाशित करायला माझी हरकत नाही. स्पष्टीकरणे आणि उत्तरदायित्वास नकार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 20:38
नाही तुमच्या फॉर्वर्डेड मेसेज लक्षात आणून देण्यास हरकत नाही. व्हॉट्स अ‍ॅप आणि इतर सोशल मिडीयावर असे मेसेज तपासण्याची व खोडण्याची संधी मिळत नाही जी मिपासारख्या प्लॅटफॉर्मवर शक्य होते. पण इतर प्लॅटफॉर्मवर असे संदेश फॉर्वर्ड करणे किंवा बरोबरच आहेत हे गृहीत धरून चालण्या पुर्वी आपल्या परिचित तज्ञांशी चर्चा करून घेणे अधिक उत्तम असावे. ज्या दाव्यांचे खंडण होते यथा योग्य उहापोह होतो त्या दाव्यांना सेन्सॉर करणे मला व्यक्तिशः फारसे जरूरी वाटत नाही. डॉक्टर मंडळींच्या प्रतिसादांचीही प्रतिक्षा करूयात. खर्‍या अर्थाने आरोग्यदायी चर्चा सहभागासाठी आपले अनेक आभार

Prajakta२१ 15/07/2020 - 01:26
भारतात mutation होऊन पसरत असावा अगदी मार्च च्या सुरवातीस राजस्थान मध्ये आलेल्या इटालियन प्रवाशांमुळे पहिल्यांदाच पसरला तेव्हा टीव्ही वर सर्व जण mortality खूप कमी आहे पण infectivity (संसर्गजन्यता खूप जास्त आहे असे सांगत होते) तसेच परदेशी प्रवास नसेल तर काही धोका नाही असेही तेव्हा सांगितले गेले; मास्क हि सगळ्यांना बंधनकारक नव्हता पहिल्या लोकडाऊनमध्ये प्रसार थांबणे गरजेचे होते पण तसे झाले नाही लोकडाऊन मुळे काही प्रमाणात आळा बसला तरी अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाले नाही आणि जिथे मागमूसही नव्हता अशा ग्रामीण भागात देखील पसरला तसेच सुदैवाने बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे लोक थोडेसे रिलॅक्स होत आहेत त्यावरून मूळच्या virusche mutation होऊन वेगळाच प्रकार भारतात पसरत असावा असे वाटते बाकी हनुवटीवर मास्क असणे बऱ्याच दुकानांमध्ये दिसते सिंहगड रोड वर काही वेळा गाड्यांवरून without मास्क जाणारे आणि पिचकाऱ्या टाकणारे अजूनही आहेतच कालच सिंहगड रोड वरच्या पतंजलीच्या दुकानात गेले असता तिथे रांग आणि एका वेळेस ठराविक लोकांनाच सोडणे बघून चांगले वाटत होते तोच तिथल्या स्टाफ ने (तो मास्कशिवायच होता) तोंडात हात घालून साफ केले आणि तेच हात त्यांच्या बँनरला लावले कि पुसले आणि त्याच अवस्थेत सहकारी जवळ बसून गप्पा मारल्या आणि त्याच हाताने मास्क परत तोंडाला लावला ते बघूनच रांगेतून परत फिरले तिथेच बाजूला त्यांचा दवाखाना पण आहे त्यामुळे तो स्टाफ अगदीही अशिक्षित म्हणता येणार नाही शिक्षित लोकांचे असे वर्तन असेल तर काय करणार?

Rajesh188 15/07/2020 - 18:27
सर्व देशांना गर्व झाला होता आधुनिक औषध शास्त्र वर . संशोधक लोकांच्या मोठ मोठ्या थापा जगाला खऱ्या वाटत होत्या आणि त्याच गुर्मीत पहिल्या पासून निषकाळजी पना बघायला मिळाला. चीन मधील एका शहरात आलेली साथ चीन मध्ये पसरली नाही पण जग भर पसरली. चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . खोट्या थापा वर पण ते विसंबून राहिले नाहीत आणि खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय वर च त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच भागात व्हायरस गाडून टाकला. बाकी देश आधुनिक शास्त्र च्या भरवशावर होते माणूस खूप सुधारला आहे आधुनिक वैदिक शास्त्र प्रचंड प्रगत झाले आहे ह्या भ्रमात होते. योग्य वेळी सावध होवून कोणी चीन मधून सुरू असणारी सर्व विमान वाहतूक बंद केली नाही. आंतरदेशीय विमान वाहतूक पूर्णतः बंद केली नाही. सर्व bindast चालू होते. Corona ni त्याची उपस्थित दाखवली तरी हे नवं नवीन दावे करण्यात मश्गूल होते. कोण म्हणतंय जास्त तापमानात तो निष्क्रिय होईल. कोण म्हणते मास्क वापरला की तो शरीरात जाणार नाही मग अचानक विषाणू ची size Adhunik wale सांगून जगाला शास्त्रीय बिन कामाची माहिती देतात आणि मास्क वर प्रश्न चिन्ह उभे करतात. कोणी सांगितले हात धुत चला साबण हे योग्य साधन असताना sanitizer var vishesh jor. बाजारातून दोन्ही वस्तू गायब. मग surface var kiti vel sakriy राहतो ह्या वर ज्ञान देणे चालू त्या मध्ये एकमत नाही. असे बरेच तमाशे झाले. आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down. Vishanu ni purn हातपाय पसरविल्या नंतर. ते यशस्वी होणारच नव्हत आणि तसेच घडले विषाणू जगभर पसरला खेड्या पाड्यातील वस्ती वर पसरला. आधुनिक शास्त्र ची लाज जाणार ह्याची पूर्ण जाणीव झाल्या वर लस निर्माण करणे कसे कठीण आहे हे सांगायला suravat केली. गर्व हरण झाले अब्रू वाचवायला जागा राहिली नाही. लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले. जो मानव अगोदर डरकाळ्या फोडत होता सर्व ज्ञानी असल्याचा त्यांचे मांजर झाले. प्राचीन उपाय च शिल्लक होता लॉक down

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 18:47
* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.

In reply to by Rajesh188

शा वि कु 15/07/2020 - 19:34
blockquote>खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय कोणता म्हणे ? का लॉकडाऊनंच आहे "प्राचीन उपाय" ?
आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down.
अच्छाछा. कोणत्या पुरातन शास्त्राने विषाणू चे "काही बिघडवले आहे" म्हणे ? लॉकडाऊन प्राचीन कसा, आणि तो आधुनिक कसा नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. आणि हा उपाय म्हणून मान्य आहे काय? जन्मभर घरी बसायची आहे काय तयारी ?
लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले.
अच्छा. लस निर्माण करणे हे सोपे हा गैरसमज मुळात असायला हवा त्यासाठी. याबद्दल माहिती असणाऱ्या लोकांना असा गैरसमज कधीच नसावा. आपण कित्येक वर्षांपासून एड्स शी झगडत आहोत. त्याची लस अजूनही नाहीये. यावरून "लस बनवणे हे सोपे" असं परसेप्शन कस काय बनतं कोणास ठाऊक.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 15/07/2020 - 19:50
चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . मग तिथे फेब्रुवारी मध्ये ७० लाख फोनची कनेक्शन बंद का झाली? चीनच्या कोणत्या गोष्टीनवर आपण विश्वास ठेवता आहात? तेथे एकपक्षीय लोकशाही(?) आहे. आपल्याच तरुण विद्यार्थ्यांवर रणगाडे चालवून १० हजार विद्यार्थ्यांना अमानुष पणे ठार मारणाऱ्या राजवटीवर कोणता विश्वास ठेवायचा? क्रांती काळात केवळ विरोधक आहे म्हणून ७ कोटी लोकांना यमसदनी पाठवणारे कम्युनिस्ट सरकार. एक एप्रिल पर्यंत तेथे ८० हजार रुग्ण होते आणि त्यानंतरच्या साडे तीन महिन्यात केवळ ३ हजार रुग्ण? याच्या वर तुम्ही विश्वास ठेवता? धन्य आहे

Rajesh188 15/07/2020 - 22:20
आकडे वारीत थोडी फार तफावत असू शकते पण चीन नी व्हायरस देशात पसरू दिला नाही हे सत्य आहे. व्हायरस स्वतः हालचाल करू शकत नाही त्याला वाहकाची गरज आहे हे सिद्ध झालेले सत्य आहे ना. मग चीन च्या रोज बातम्या येत होत्या,मग सर्व देशांनी तत्काळ विमानसेवा का बंद केली नाही हा पहिला प्रश्न. ह्याचे उत्तर हेच आहे की आपण त्या व्हायरस ला कंट्रोल मध्ये ठेवू. जे बाहेरून लोक आली त्यांची तपासणी अत्यंत गचाळ पने केली आणि त्यांना घरी सोडले. आणि जे बाधित होते त्यांचे उपचार दाट लोकसंख्या असलेल्या शहरांच्या मध्य भागी. हा आत्मविश्वास कोठून आला. चीन काही दिवसात हॉस्पिटल उभे करू शकतो. तर बाकी देश सुद्धा निर्मनुष्य ठिकाणी हॉस्पिटल उभे करू शकले असते. विषाणू मुळे च ही जीवसृष्टी अस्तित्वात आहे हे सत्य च आहे फक्त काही रोग कारक विषाणू ते पण त्याच स्पेसिस ला बाधित करतात त्यांचा अभ्यास आपण खोलवर केलेला नाही हे सत्य नाकारणे चूक आहे. कमर्शियल आरोग्य व्यवस्था कधी तरी उगवणाऱ्या विषाणू ना फायद्याचे समजत नाही .

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 22:46
सर्वांना सक्तीची सैनिकी सेवा + एकाधिकारशाही + एकाधिकारशाही विरोधात बोलण्यास मज्जाव या परिस्थितीतील जनता फारसे फाटे न फोडता सरकारी आदेशाच्या जशीच्या तशी अमंलबजावणीची सवय असते त्याचे फायदे शारीरीक अंतर आणि लॉकडाऊनच्या अटींची तंतोतंत पालनातून होणारे फायदे चिनला मिळतात त्यास नाकारण्यात अर्थ नाही. सोबतच कम्युनीस्ट देशात अंतर्गत स्थलांतरासाठीही पास लागतो त्यामुळे देशांतर्गत प्रवासावर अत्यंत वेगाने नियंत्रण आणता येते. त्याचाही फायदा चिनला मिळतो. या जमेच्या बाजू तरीही वीषाणूच वीषाणू चिनमध्येही सर्वत्र टेस्टींग होतच असेल असे गृहीत धरण्यात अर्थ नाही आणि मृत्यूंची आकडेवारी दाबण्यामागे कम्युनीस्टांना सत्तेत टिकून राहण्यासाठीचे लॉजीक असते त्यामुळे सत्य परिस्थिती लपविली जात असण्याचीही बर्‍यापैकी शक्यता संभवते.

Rajesh188 15/07/2020 - 22:50
साथीच्या रोगाला बळी पडलेल्या व्यक्ती ल बाकी समजा पासून वेगळे करणे ही खूप जुनी आणि अगदी प्राथमिक स्तरावर ची उपचार पद्धती आहे. Plage undara पासून होत आहे हे माहीत पडल्या वर शेतात किंवा गावा बाहेर राहणे हा उपचार पूर्वी लोक करायची. साथी चे रोग येवून ठान मांडून बसत नाहीत. Plage सुद्धा काही वर्षा नंतर ठराविक काळा साठी यायचा आता पण तो आला तर आपल्या कडे उपचार नाहीत त्या मुळे आधुनिक औषध नी प्लेग ला नष्ट केले आहे असे समजण्यात काही ही अर्थ नाही . आज सुद्धा त्याच्या वर उपचार नाहीत. एचआयव्ही आज पण बरा होत नाही तो आजार आता होत नाही ह्या मध्ये आधुनिक औषधांचा काही संबंध नाही. आणि कोणी काळजी पण घेत नाही. हे जर असेच असेल तर निसर्ग वर अवलंबून आपण आज पण आहे. व्हायरस पासून मुक्ती औषध शास्त्र देणार आहे की नाही

मदनबाण 14/07/2020 - 16:12
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने आत्ता पर्यंत इतकी परस्पर विरोधी वक्तव्य केली आहेत की ती संघटना आता विश्वासास पात्र आहे का ? हाच प्रश्न आत्ता उद्भवावा ! करोनाच्या आजारा संबधी जालावर ज्या बातम्या येत आहेत त्या सत्य मानायचे असे क्षणभर धरल्यास करोना या रोगाने शरीराचे पार वाटोळे होते असे वाटते. बाधीत होउन परत घरी पाठवलेले रुग्ण काही काळाने परत बाधीत होणे तसेच या आजाराने मेंदू,हृदय, फुफ्फुस आणि किडणी याची पार वाट लागणे तसेच शरीराची प्रतिकार क्षमता कमी होण्या पासुन ते पुढील आयुष्यात या आजाराने रुग्णास शारीरिक कष्ट उद्भवणे असे बरेच काही घडु शकते ! संदर्भ :- Almost 90% of Covid-19 survivors still have symptoms such as fatigue TWO MONTHS after their illness, 'extremely worrying' study reveals Coronavirus: What does Covid-19 do to the brain? Severe brain damage possible even with mild coronavirus symptoms New evidence shows Covid-19 could cause brain damage in patients Delirium, rare brain inflammation and stroke linked to Covid-19 How the novel coronavirus attacks our entire body Covid-19 symptoms outside lungs decoded, virus can lead to high blood sugar levels, blood clots & delirium Large Number of Coronavirus Patients Suffer Kidney, Heart and Brain Damage, Studies Find Researchers decode symptoms of COVID-19 outside lungs, call it a 'multisystem disease' Coronavirus: Heart scans of more than half of COVID-19 patients abnormal, scientists find Coronavirus may have ‘devastating impact’ on the heart आता खरचं हा व्हायरस इतका रानटी आहे का ? याचे उत्तर आपल्याला बहुतेक पुढील ६ ते १० महिन्यात मिळावे असे वाटते, यमलोकी किती लोक जातील त्याचाही आकडा या कालावधीत कळेलच ! याच बरोबर मोठ्या संख्येने लोक उपासमारीने मरतील याची भिती आणि दु:ख वाटत आहे ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

जागतिक आरोग्यसंघटनेचं आता काही खरं राहीलेलं नाही, ते आणि आपले ते काय, त्यांचं नाव विसरलो. निव्वळ गप्पांवर भरवसा. प्रत्यक्षात काहीच नाही त्यामुळे दरदोन दिवसाला आरोग्यसंघटनाच्या नवनवीन बातांवर माझा आता विश्वास उरला नाही. लशीचं म्हणाल तर, जरा पेप्रात अशी बातमी आली, टीव्हीवर असे काही दावे आले की काही तरी हालचालीने निपचित पडलेलं कुत्र जसं कान टवकारतं तसं आपलं सर्वांचं झालंय. ज्या दिवशी प्रत्यक्षात अशी लस येईल, आणि पोलियोचा डोस देणारे कर्मचारी जसे घरोघर विचारत फिरतात तसे कोरोनाची लस घ्यायची कोणी बाकी आहे का असे विचारणारे येतील त्या दिवशी तो डोस टोचून घेऊ. तो पर्यंत अशा बातम्या वाचायच्या आणि सोडून द्यायच्या. रामदेवबाबांच्या अशाच घोषणेने प्रचंड आनंद झालेले लोक पाहिले. आता आपण पूर्वीसारखं कसं जगत होतो हे आता आठवेनासं झालंय. भविष्यात तसे जगू असेही सध्या काही वाटत नै. च्यायला, कसल्या मजेचं आयुष्य होतं पण काय माज होता तेव्हा आपल्याला असे वाटले. सालं, कोरोनाने वाट लावली. बाकी, जिथे दुकानदार मास्क न लावलेला असेल अशा ठिकाणी फटकायचं नाही. रिस्क फॅक्टर जास्त आहे, असे वाटते. तसंही करोना कशाने होईल काही सांगता येईना. लैच अंदाजपंचे आयुष्य झालं. भेंडी किती दिवस त्या दाळी खायच्या म्हणून आज चिकन आणायला गेलो होतो. चिकनवाल्याचा मास्क हनुवटीला आलेला. चिकन घ्यायचा विचार बदलला त्याच्या दुकानातून अंडी घेतली आणि मास्क लावलेल्या दुसर्‍या दुकानदाराकडून चिकन घेतलं, म्हणजे जेवढ्या वेळात पाहिलं तोवर मास्क ग्लोव्ज दिसले. पूर्वीचं आणि नंतरचं माहिती नाही. अंडी साबण पाण्याने धुवून घेतली. चिकन हळदमिठाने धुवून घेतली मनाचं समाधान. मास्क कितीवेळ ठेवायचा, रुमाल किती वेळा तोंडावर बांधून ठेवायचा. जीव गुदमरतो तरीही न कंटाळता मास्क लावणे,फिझीकल डिस्टेन्स पाळणे, सॅनीटायजरचा वापर करणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धुत राहणे, आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यायची. रुग्णालयात गेल्यावर माणूस बरा होतो, पण त्या कटकटीच ना..! तेव्हा मास्क नसेल लावला कोणी तर त्याला हटकायचं, समजून सांगायचं. पटलं तर ठीक नै तर सोडून द्यायचं. भांडन करुन तान वाढवून घ्यायचा नाही. इतक्या तितक्याशा कारणावरुन भांडन वाढवायचं नाही. सध्या समजूतदारपणे घ्यायचं. एकदा लस आली आणि त्याचे दुष्परिणाम नसतील असे समजू आणि गॅरंटेड लस असली की पुन्हा आपण आपल्या स्वभावावर परत येऊच...! -दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 16:57
-दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ) बिरुटे सर ते करोना हाय बरं का लष्कराच्या भाकऱ्या...... पाहिल्या नाहीत का ? आता तिसर्‍यांदा स्वतःचाच प्रतिसाद एडिट करा बरं ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

माहितगार 14/07/2020 - 17:29
कोविड -१९ अजूनही शत्रु नंबर १ आहे. पण अनेक व्यक्ती, नेतृत्व आणि सरकारांचे वागणे त्याचा मुकाबला करण्याच्या अनुषंगाने पुरेसे नाही. हा पहिला मुद्दा सोडला तर इतर मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेचे नाहीत. कोविड-१९ एकदा होऊन गेल्यानंतरही इतर अवयवांना भोवतो आहे हे स्पष्ट करणारे डॉ. रणदीप गुलेरीया भारतीय AIIMS च्या क्लिनीकल रिसर्च विभागाचे प्रमूख आहेत. आणि बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात असा सावधानतेचा इशारा देणार्‍या प्रा. वेंडी बार्कले या इंग्लंडातील जागतिक स्तरावर या विषयावरील नामांकीत जुन्या जाणत्या संशोधक समजल्या जातात. त्याही आधी मागच्या आठवड्यात ३२ देशातील २३९ संशोधकांनी जागतिक आरोग्त संघटनेला पत्र देऊन 'बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात' याची जाणीव दिली त्यास प्रा. वेंडी बार्कलेयांनी त्यांच्या संशोधनातून पुष्टी दिली. तज्ञ डॉक्टर सर्वसामान्य पेशंट्स समोर आपापसातील वैद्यकीय मतभेदांची चर्चा करत नाहीत म्हणजे त्यांच्यात वैद्यकीय मतभेद नसतात असे नसावे. सर्वसामान्य माणसाची तार्कीक बाजू लंगडीपडते धरसोड होते तसे जागतिक आरोग्य संघटनेचेही होते. ती यावेळी अधिक प्रकाशात आली एवढेच. जागतिकस्तरावर आरोग्य विषयक समन्वय साधणारी दुसरी संस्था नाही तो पर्यंत तिच्या मर्यादांसहीत सल्ले लक्षात घेण्या शिवाय तुर्तास पर्याय नाही. आपण आपल्या पेशंटला दोन वेगवेगळे डॉक्टर सल्ला देतात तेव्हा काय करतो ? अधिक सुरक्षीत सेफ साईडला असणारा सल्ला निवडतो.

"एकही मृत्यू कोरोनामुळे नाही.. आणखी एक मास्टरस्ट्रोक !" कोरोना हे WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रचलेले एक षडयंत्र असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. अनेक तज्ञांनी, अभ्यासकांनी, शोध पत्रकारांनी ही गोष्ट जाहिर केली आहे.. सिद्ध केली आहे. त्यात कोरोना फेक असल्याचा आणखी एक मास्टरस्ट्रोक युरोपियन शास्त्रज्ञांनी नुकताच दिला. डब्ल्यूूूएचओच्या निर्देशानुसार कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नाही. मात्र एका उच्च दर्जाचे युरोपियन पॅथॉलॉजिस्ट डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी त्यांच्या टिममधील रोझमेरी फ्रे आणि मोरी डेव्हरेक्स इत्यादी सहकाऱ्यांसह युरोप खंडातील कोरोनाने मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे पोस्टमार्टम केले आणि संशोधनांती असे नोंदविले आहे की, *संपूर्ण युरोप खंडातून कुणाचाही मृत्यू नोवल कोरोनाव्हायरसमुळे झाल्याचा कोणताही पुरावा त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मिळालेला नाही.* त्यांनी हे देखील उघड केले की, *युरोपियन पॅथॉलॉजीस्ट्स यांना SARS-CoV-2 म्हणजे Covid-19 साठी विशिष्ट अशी कोणतीही अँटीबॉडीज आढळली नाही.* त्यामुळे सर्व जगभरात महामारीची भीती आणि अराजक निर्माण करण्यासाठी *कोणत्याही आधाराशिवाय महामारीची धोकादायक घोषणा करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूूूएचओला) डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी एक "क्रिमिनल मेडिकल ऑर्गनायझेशन" अर्थात “गुन्हेगारी वैद्यकीय संस्था” असे संबोधले.* अशी माहिती डॉ.अलेक्सोव यांची टिम सदस्य रोझमेरी फ्रे यांनी दिली. Corbett Report वर आपण 15 जूनची त्यांची मुलाखत पाहू शकता. तसेच Off-Guardian वरील 2 जुलैचा लेख वाचू शकता. डॉ.अलेक्सोव हे एक निर्विवाद आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून, ते 30 वर्षांपासून डॉक्टर आहेत. शिवाय ते बल्गेरियन पॅथॉलॉजी असोसिएशनचे (बीपीए) अध्यक्ष आहेत, तसेच ईएसपीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आणि बल्गेरियन राजधानी सोफियातील ऑन्कोलॉजी हॉस्पिटलमधील हिस्टोपाथोलॉजी विभागाचे प्रमुखही आहेत. तसेच रोझमेरी फ्रे या कॅलगरी विद्यापीठातील मेडिकल फॅकल्टीतून आण्विक जीवशास्त्रात एमएससी असून सद्या स्वतंत्र मेडिकल रिसर्च जर्नालिस्ट आहेत. डॉ.अलेक्सोव जे सांगत आहेत त्यास समर्थन देताना जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग-एपेनडॉर्फ येथील फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. क्लाऊस पेशेल यांनी वेेेबिनार मुलाखतीत सांगितले की, *"कोविड-19 च्या प्राणघातकतेबद्दल खात्रीशीर पुरावा नसल्याचे दिसून येते."* तसेच *“कोविड-19 हा केवळ एखाद्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये घातक आजार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे एक अत्यंत निरुपद्रवी व्हायरल इन्फेक्शन आहे,”* असेेेही डॉ.पेशेल यांनी एप्रिलमध्ये एका जर्मन पेपरला मुलाखतीत सांगितले. याशिवाय आणखी एका मुलाखतीत डॉ.पेशेल सांगतात की, "बर्‍याच प्रकरणांमध्ये आम्हाला असेही आढळले आहे की, घातक आजारांमधील मृत्यूंशी वर्तमान कोरोना संसर्गाचा काहीही संबंध नाही. कारण त्यात मृत्यूची इतर कारणे आढळली आहेत, जसे मेंदू रक्तस्राव किंवा हृदयविकाराचा झटका. कोविड-19 विशेषतः धोकादायक व्हायरल रोग नाही, मात्र प्रत्येक मृत्यूच्या सर्व अनुमानांची कुशलतेने तपासणी केली गेली नाही हे चिंताजनक आहे." रोझमेरी सांगतात की, त्या आणि त्यांच्या टीममधील एक पत्रकार मोरी डेव्हरेक्स यांनी 9 जूनच्या ऑफ-गार्डियन लेखात असे प्रमाणित केले आहे की, कोरोनाव्हायरस कोचच्या तत्त्वांची पूर्तता करीत नाही. ही तत्वं एक वैज्ञानिक पद्धती आहे, जी व्हायरस अस्तित्त्वात आहे का आणि विशिष्ट रोगांशी त्याचे परस्पर संबंध आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी वापरले जाते. तसेच पुढे त्या म्हणतात आम्ही संशोधन अहवालात नोंदविले की, "आजपर्यंत कोणालाही सिद्ध करता आले नाही की, SARS-CoV-2 हे आजाराचे एक वेगळे कारण आहे, जे त्या सर्व लोकांच्या लक्षणांशी जुळते, ज्यांचा स्पष्टपणे COVID-19 मुळे मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय तपासणीत या वायरसला ना वेगळे ठेवले गेले ना पुनरुत्पादित केले. मात्र पुढे तो आजाराला कारणीभूत असल्याचे दर्शविले गेले." याव्यतिरिक्त, 27 जूनच्या ऑफ-गार्डियनच्या लेखात, टोर्स्टन एंगेलब्रेक्ट आणि कॉन्स्टँटिन डीमीटर या दोन पत्रकारांनी *“SARS-CoV-2 RNAचे अस्तित्व विश्वासावर आधारित आहे, वास्तविकतेवर आधारित नाही,”* याचा आणखी एक पुरावा जोडला. अर्थात, वेगवेगळ्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचा आणि कोरोनाचा एकमेकांशी काही संबंध नाही. मात्र त्या रुग्णांच्या मृत्यूंची गणना कोरोनाच्याच नावाखाली केली गेलीय आणि केली जातेय हे स्पष्ट आहे. म्हणजेच एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही हे डॉ.अलेक्सोव यांच्या सर्वेक्षणातून त्यांनी सिद्ध केले आहे. युरोपियन पॅथॉलॉजिस्ट्स यांनी कोरोना फेक असल्याचे निष्कर्ष मांडल्यानंतर त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचा दबाव आणला जात आहे. तसेच डॉ.अलेक्सोव यांचे सर्वेक्षण आणि त्या सर्वेक्षणाचे विश्लेषण केलेले रोझमेरी यांचे आर्टिकल चुकीचे ठरविण्यासाठी हॉक्स साईट्सचा वापर करुन बेबनाव केला जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक पॅथॉलॉजिस्ट्सवर कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचा दबाव आहे. तसेच WHO च्या प्रोटोकॉलमुळे तोंड उघडता येत नसल्याचे काही पॅथॉलॉजिस्ट्स सांगत आहेत. तर काही पॅथॉलॉजिस्ट्स अशा दबावात चुकीचे काम करण्यास तयार नाहीत. यावरून ही गोष्ट लक्षात येते की, WHO ने कोरोनामुळे झालेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नसल्याचे निर्देश का दिले असावेत. याशिवाय अमेरिकन सरकारच्या CDC आरोग्य संस्थेने अन्य काही आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे कारण हे कोरोना नोंदवा अशा सुचना डॉक्टरांना आधीच दिलेल्या आहेत. WHO आणि CDC च्या अगदी याच गोष्टी भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने लागू केल्या आहेत. आतापर्यंत (9 जूलै) जगभरातून साधारण 1 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट आणि 5 लाख 52 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. तसेच यु.के मधून 2 लाख 87 हजार टेस्ट व 44 हजार मृत्यू तर भारतातून 7 लाख 71 हजार कोरोना टेस्ट आणि 21 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. कोरोना म्हणजे साधारण सर्दीचा आजार आहे. आणि केवळ एक साधारण सर्दीचा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण करतोय ही कुणाही सुज्ञांच्या बुद्धीला न पटणारी बाब आहे. सबंध कारोनाची आकडेवारी म्हणजे प्रचंड दिशाभूल आहे. *कोरोना एक जागतिक अंधश्रद्धा आहे.* *कोरोना एक जागतिक षडयंत्र आहे.* ✍️लेखन- जर्नालिस्ट *हर्षद रुपवते* Article published on: 9 July 2020 Source- https://off-guardian.org/2020/07/02/no-one-has-died-from-the-coronavirus-president-of-the-bulgarian-pathology-association/ https://www.globalresearch.ca/no-one-has-died-coronavirus/5717668

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 18:10
हे दोन्ही लेख व्हॉट्अ‍ॅप वर काही दिवसापुर्वी फिरत होते, आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? चीन मध्ये लाखो लोक मेले ते कुठल्या व्हायरस ने मेले ? अश्या व्हिडियोंचे तू-नळीवरील चॅनल असताना त्या युजरला ते सगळे व्हिडियो का डिलिट करावे लागले ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

In reply to by मदनबाण

मदनबाण 16/07/2020 - 10:02
आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? आतापर्यंत 99 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून रेड अलर्ट जारी

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumati

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 19:40
सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक या माझ्या जुन्या मिपा धाग्याची या निमीत्ताने आठवण झाली. मला उपरोक्त कॉन्स्पिरसी थेअरी वाचताना विनोदी सार्कॅझम वाटली म्हणून Dr Stoian Alexov या नावाचा गूगल न्यूजवर शोध घेतला तर मेन स्ट्रीम मिडीयाने या वल्लीची अजिबात दखल घेतलेली दिसत नाही. फक्त फॅक्ट चेक करणार्‍या healthfeedback.org पोर्टलवरील या लेखातून the European Society of Pathology (ESP). चा दाखला देत Dr Stoian Alexov चा प्रत्येक दावा खोडलेला दिसतो. माझ्या अल्प ज्ञानाचा तर्क जिथपर्यंत पोहोचतो त्यानुसार, वीषाणूंचा प्रभाव प्रत्यक्ष नसून परिस्थिती जन्य असावा त्यामुळे केवळ कोविड १९च काय बहुतेक वीषाणूंच्या वीरोधात प्रत्यक्ष प्रभावाचा पुरावा नसल्याचा दिशाभूल करणारे दावा करता येत असावा. बेसिकली वीषाणू हे वीष नाही की एखादा अवयव बंद पाडून मृत्यूस डायरेक्ट कारणीभूत होईल -तसे असते तर वीषाणू संसर्ग झालेले सर्वच मृत झाले असते कुणिच वाचले नसते. वीषाणू हे वेगवेगळ्या शारीरीक परिस्थिती निर्माण करतात ज्यामुळे आजार ओढावतात, बहुतेक किंवा बरेच बरे होतात, काहींचे बळावतात आणि त्यातील काही मृत्यूस कारणीभूत होतात. वेगवेगळ्या वीषाणूंच्या प्रभावानुसार किती आजारी पडणार किती बळावणार किती मृत्यूच्या तोंड जाणार ते व्यक्ती परत्वे घडत जाते. वीषाणू शास्त्रच खोटे असते लसी खोट्या असत्या तर लसींच्या शोधाने जगाची जेवढी लोकसंख्या वाढली आहे तेवढी वाढली नसती. असे काही नाहीच म्हणून कोविड -१९ पार्ट्या अटेंड करणारे बाधीत होऊन मेले नसते ना पेशंट्सना अटेंडकरणारे अनेक डॉक्टर आणि आरोग्य सेवक मेले असते. नाही म्हटले तरी ब्रिटन आणि आमेरीका जागतिक महासत्ता आहेत ज्यांना आपल्या प्रमुख नेत्याच्या आरोग्याची बारकाईने काळजी घ्यावी लागते, मास्क बांधण्यास नकार देणारा ब्रीटनचा पंतप्रधान आजारी पडला नसता, मास्क बांधण्यास नकार देणारा डोनाल्ड ट्रम्प मास्क बांधण्यास सुरवात करता झाला नसता. विलगीकरण कक्षातले बेड कमी पडणे वेगळे , अती दक्षता विभागाचे बेड कमी पडून शेकडोंनी लोक मरत असतील,, एकुण मृत्यूदर ४९ टक्क्या पर्यंत वाढला असेल, प्रेत पुरण्यासाठी अधिक जागा खोदल्या जात असतील स्मशानभूमीतील नोंदी मागच्या वर्षापेक्षा वाढल्या असतील आणि हे सर्व मिथ्या आहे असे कुणि म्हणत असेल तर ते दर्शनशास्त्र म्हणून भारतीय तत्वज्ञानास नवीन नाही पण आपला हात भाजल्यावर होणारी वेदना वास्तवच असते किंवा कसे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत त्या खाली हे वीषाणू (आणि इतर सुक्ष्म जीव दिसतात) प्राणी शरीरात पोहोचल्यानंतर ते स्वतःचा गुणाकार करत कसे वाढतात, त्यामुळे प्राणी आणि मानवी शरीर कसे प्रतिकार करते आणि केव्हा कमी पडते यास आधुनिक जागतिक संशोधनाचा शंभरेक वर्षांचा तरी पाया आहे. एक्सरे पासून ते विवीध स्कॅनिंग मशिनचे तंत्रज्ञान वाढले आहे. व्हायरॉलॉजीस्ट आणि इम्युनॉलॉजीस्ट काही दोनचार देशात नाही तर अनेक देशात आहेत जाया सर्वांना जेनेटीक कोड तपासता येतात प्रत्येक देशाकडे स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत सर्व देशातल्या सर्व प्रयोगशाळा आणि शेकडोंनी वैज्ञानिक एकजात खोटे बोलत असल्याचे दावे अतिशयोक्त ठरत असावेत. जनतेची दिशाभूल करणारा कोणताही संदेश सोशल मिडीयावर फॉर्वर्ड करण्यापुर्वी आपल्या परिचयातील व्हायरॉलॉजीस्ट आणि लंग्सस्पेशालिस्टशी चर्चा करून घेणे श्रेयस्कर नसते का ? लॉक डाऊन मुळे लोकांचे मोठेच आर्थीक नुकसान झाले हे खरे आहे पण अधिकतम शारीरीक अंतर, मास्क लावणे, शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात नुकसानकारक काय आहे ? शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात काही केमीकल कंपन्यांचा फायदा होत असेल नाही असे नाही. पण लोकांना परवडणारच नाही एवढे सुद्धा साबण महाग नसते. पिपिई आणि एन-९५ मास्कबाबतीत कंपन्यांना फायदा आहे नाही असे नाही पण प्रत्यक्षात डॉक्टरांनाच संसर्ग होऊन मरताहेत म्हणून डॉक्टरांनाच प्राधान्याने वापरण्यास सांगतात त्या अर्थी वीषाणू प्रभाव खरा नसावा किंवा कसे ? माझ्या व्यक्तिगत मते ५ पेक्षा अधिक व्यक्तींना दिवसाभरात भेटणार्‍या प्रत्येकाने एन-९५ मास्क वापरला पाहिजे , त्याने वीषाणू संसर्गाचा साखळी थांबण्यास मदत होईल . सोबत प्रत्येक व्यक्तीने अधिकतम शारीरीक अंतर कापडी मास्क अधिकची स्वच्छताने खूप नुकसान होणार नाही पण वस्तुस्थितीस नकार दिल्याने होणारे नुकसान अधिक मोठे असेल.

In reply to by माहितगार

खरं तर मेसेज फॉर्वर्ड असला तरी शेवटी दुव्यातील गोष्टींवर चर्चा करायला हरकत नसावी. बाकी, त्या 'हू' ने इतक्या फिरक्या आणि गिरक्या घेतल्या आहेत की त्याबद्दल न बोललेलंच बरं. नेमकं सत्य काय आहे, हे अजूनही तितक्या धाडसाने कोणी सांगू शकत नाही. बाकी, संपादकांनी फॉर्वर्ड मेसेज असलेला संदेश अप्रकाशित करायला माझी हरकत नाही. स्पष्टीकरणे आणि उत्तरदायित्वास नकार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 20:38
नाही तुमच्या फॉर्वर्डेड मेसेज लक्षात आणून देण्यास हरकत नाही. व्हॉट्स अ‍ॅप आणि इतर सोशल मिडीयावर असे मेसेज तपासण्याची व खोडण्याची संधी मिळत नाही जी मिपासारख्या प्लॅटफॉर्मवर शक्य होते. पण इतर प्लॅटफॉर्मवर असे संदेश फॉर्वर्ड करणे किंवा बरोबरच आहेत हे गृहीत धरून चालण्या पुर्वी आपल्या परिचित तज्ञांशी चर्चा करून घेणे अधिक उत्तम असावे. ज्या दाव्यांचे खंडण होते यथा योग्य उहापोह होतो त्या दाव्यांना सेन्सॉर करणे मला व्यक्तिशः फारसे जरूरी वाटत नाही. डॉक्टर मंडळींच्या प्रतिसादांचीही प्रतिक्षा करूयात. खर्‍या अर्थाने आरोग्यदायी चर्चा सहभागासाठी आपले अनेक आभार

Prajakta२१ 15/07/2020 - 01:26
भारतात mutation होऊन पसरत असावा अगदी मार्च च्या सुरवातीस राजस्थान मध्ये आलेल्या इटालियन प्रवाशांमुळे पहिल्यांदाच पसरला तेव्हा टीव्ही वर सर्व जण mortality खूप कमी आहे पण infectivity (संसर्गजन्यता खूप जास्त आहे असे सांगत होते) तसेच परदेशी प्रवास नसेल तर काही धोका नाही असेही तेव्हा सांगितले गेले; मास्क हि सगळ्यांना बंधनकारक नव्हता पहिल्या लोकडाऊनमध्ये प्रसार थांबणे गरजेचे होते पण तसे झाले नाही लोकडाऊन मुळे काही प्रमाणात आळा बसला तरी अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाले नाही आणि जिथे मागमूसही नव्हता अशा ग्रामीण भागात देखील पसरला तसेच सुदैवाने बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे लोक थोडेसे रिलॅक्स होत आहेत त्यावरून मूळच्या virusche mutation होऊन वेगळाच प्रकार भारतात पसरत असावा असे वाटते बाकी हनुवटीवर मास्क असणे बऱ्याच दुकानांमध्ये दिसते सिंहगड रोड वर काही वेळा गाड्यांवरून without मास्क जाणारे आणि पिचकाऱ्या टाकणारे अजूनही आहेतच कालच सिंहगड रोड वरच्या पतंजलीच्या दुकानात गेले असता तिथे रांग आणि एका वेळेस ठराविक लोकांनाच सोडणे बघून चांगले वाटत होते तोच तिथल्या स्टाफ ने (तो मास्कशिवायच होता) तोंडात हात घालून साफ केले आणि तेच हात त्यांच्या बँनरला लावले कि पुसले आणि त्याच अवस्थेत सहकारी जवळ बसून गप्पा मारल्या आणि त्याच हाताने मास्क परत तोंडाला लावला ते बघूनच रांगेतून परत फिरले तिथेच बाजूला त्यांचा दवाखाना पण आहे त्यामुळे तो स्टाफ अगदीही अशिक्षित म्हणता येणार नाही शिक्षित लोकांचे असे वर्तन असेल तर काय करणार?

Rajesh188 15/07/2020 - 18:27
सर्व देशांना गर्व झाला होता आधुनिक औषध शास्त्र वर . संशोधक लोकांच्या मोठ मोठ्या थापा जगाला खऱ्या वाटत होत्या आणि त्याच गुर्मीत पहिल्या पासून निषकाळजी पना बघायला मिळाला. चीन मधील एका शहरात आलेली साथ चीन मध्ये पसरली नाही पण जग भर पसरली. चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . खोट्या थापा वर पण ते विसंबून राहिले नाहीत आणि खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय वर च त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच भागात व्हायरस गाडून टाकला. बाकी देश आधुनिक शास्त्र च्या भरवशावर होते माणूस खूप सुधारला आहे आधुनिक वैदिक शास्त्र प्रचंड प्रगत झाले आहे ह्या भ्रमात होते. योग्य वेळी सावध होवून कोणी चीन मधून सुरू असणारी सर्व विमान वाहतूक बंद केली नाही. आंतरदेशीय विमान वाहतूक पूर्णतः बंद केली नाही. सर्व bindast चालू होते. Corona ni त्याची उपस्थित दाखवली तरी हे नवं नवीन दावे करण्यात मश्गूल होते. कोण म्हणतंय जास्त तापमानात तो निष्क्रिय होईल. कोण म्हणते मास्क वापरला की तो शरीरात जाणार नाही मग अचानक विषाणू ची size Adhunik wale सांगून जगाला शास्त्रीय बिन कामाची माहिती देतात आणि मास्क वर प्रश्न चिन्ह उभे करतात. कोणी सांगितले हात धुत चला साबण हे योग्य साधन असताना sanitizer var vishesh jor. बाजारातून दोन्ही वस्तू गायब. मग surface var kiti vel sakriy राहतो ह्या वर ज्ञान देणे चालू त्या मध्ये एकमत नाही. असे बरेच तमाशे झाले. आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down. Vishanu ni purn हातपाय पसरविल्या नंतर. ते यशस्वी होणारच नव्हत आणि तसेच घडले विषाणू जगभर पसरला खेड्या पाड्यातील वस्ती वर पसरला. आधुनिक शास्त्र ची लाज जाणार ह्याची पूर्ण जाणीव झाल्या वर लस निर्माण करणे कसे कठीण आहे हे सांगायला suravat केली. गर्व हरण झाले अब्रू वाचवायला जागा राहिली नाही. लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले. जो मानव अगोदर डरकाळ्या फोडत होता सर्व ज्ञानी असल्याचा त्यांचे मांजर झाले. प्राचीन उपाय च शिल्लक होता लॉक down

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 18:47
* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.

In reply to by Rajesh188

शा वि कु 15/07/2020 - 19:34
blockquote>खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय कोणता म्हणे ? का लॉकडाऊनंच आहे "प्राचीन उपाय" ?
आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down.
अच्छाछा. कोणत्या पुरातन शास्त्राने विषाणू चे "काही बिघडवले आहे" म्हणे ? लॉकडाऊन प्राचीन कसा, आणि तो आधुनिक कसा नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. आणि हा उपाय म्हणून मान्य आहे काय? जन्मभर घरी बसायची आहे काय तयारी ?
लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले.
अच्छा. लस निर्माण करणे हे सोपे हा गैरसमज मुळात असायला हवा त्यासाठी. याबद्दल माहिती असणाऱ्या लोकांना असा गैरसमज कधीच नसावा. आपण कित्येक वर्षांपासून एड्स शी झगडत आहोत. त्याची लस अजूनही नाहीये. यावरून "लस बनवणे हे सोपे" असं परसेप्शन कस काय बनतं कोणास ठाऊक.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 15/07/2020 - 19:50
चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . मग तिथे फेब्रुवारी मध्ये ७० लाख फोनची कनेक्शन बंद का झाली? चीनच्या कोणत्या गोष्टीनवर आपण विश्वास ठेवता आहात? तेथे एकपक्षीय लोकशाही(?) आहे. आपल्याच तरुण विद्यार्थ्यांवर रणगाडे चालवून १० हजार विद्यार्थ्यांना अमानुष पणे ठार मारणाऱ्या राजवटीवर कोणता विश्वास ठेवायचा? क्रांती काळात केवळ विरोधक आहे म्हणून ७ कोटी लोकांना यमसदनी पाठवणारे कम्युनिस्ट सरकार. एक एप्रिल पर्यंत तेथे ८० हजार रुग्ण होते आणि त्यानंतरच्या साडे तीन महिन्यात केवळ ३ हजार रुग्ण? याच्या वर तुम्ही विश्वास ठेवता? धन्य आहे

Rajesh188 15/07/2020 - 22:20
आकडे वारीत थोडी फार तफावत असू शकते पण चीन नी व्हायरस देशात पसरू दिला नाही हे सत्य आहे. व्हायरस स्वतः हालचाल करू शकत नाही त्याला वाहकाची गरज आहे हे सिद्ध झालेले सत्य आहे ना. मग चीन च्या रोज बातम्या येत होत्या,मग सर्व देशांनी तत्काळ विमानसेवा का बंद केली नाही हा पहिला प्रश्न. ह्याचे उत्तर हेच आहे की आपण त्या व्हायरस ला कंट्रोल मध्ये ठेवू. जे बाहेरून लोक आली त्यांची तपासणी अत्यंत गचाळ पने केली आणि त्यांना घरी सोडले. आणि जे बाधित होते त्यांचे उपचार दाट लोकसंख्या असलेल्या शहरांच्या मध्य भागी. हा आत्मविश्वास कोठून आला. चीन काही दिवसात हॉस्पिटल उभे करू शकतो. तर बाकी देश सुद्धा निर्मनुष्य ठिकाणी हॉस्पिटल उभे करू शकले असते. विषाणू मुळे च ही जीवसृष्टी अस्तित्वात आहे हे सत्य च आहे फक्त काही रोग कारक विषाणू ते पण त्याच स्पेसिस ला बाधित करतात त्यांचा अभ्यास आपण खोलवर केलेला नाही हे सत्य नाकारणे चूक आहे. कमर्शियल आरोग्य व्यवस्था कधी तरी उगवणाऱ्या विषाणू ना फायद्याचे समजत नाही .

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 22:46
सर्वांना सक्तीची सैनिकी सेवा + एकाधिकारशाही + एकाधिकारशाही विरोधात बोलण्यास मज्जाव या परिस्थितीतील जनता फारसे फाटे न फोडता सरकारी आदेशाच्या जशीच्या तशी अमंलबजावणीची सवय असते त्याचे फायदे शारीरीक अंतर आणि लॉकडाऊनच्या अटींची तंतोतंत पालनातून होणारे फायदे चिनला मिळतात त्यास नाकारण्यात अर्थ नाही. सोबतच कम्युनीस्ट देशात अंतर्गत स्थलांतरासाठीही पास लागतो त्यामुळे देशांतर्गत प्रवासावर अत्यंत वेगाने नियंत्रण आणता येते. त्याचाही फायदा चिनला मिळतो. या जमेच्या बाजू तरीही वीषाणूच वीषाणू चिनमध्येही सर्वत्र टेस्टींग होतच असेल असे गृहीत धरण्यात अर्थ नाही आणि मृत्यूंची आकडेवारी दाबण्यामागे कम्युनीस्टांना सत्तेत टिकून राहण्यासाठीचे लॉजीक असते त्यामुळे सत्य परिस्थिती लपविली जात असण्याचीही बर्‍यापैकी शक्यता संभवते.

Rajesh188 15/07/2020 - 22:50
साथीच्या रोगाला बळी पडलेल्या व्यक्ती ल बाकी समजा पासून वेगळे करणे ही खूप जुनी आणि अगदी प्राथमिक स्तरावर ची उपचार पद्धती आहे. Plage undara पासून होत आहे हे माहीत पडल्या वर शेतात किंवा गावा बाहेर राहणे हा उपचार पूर्वी लोक करायची. साथी चे रोग येवून ठान मांडून बसत नाहीत. Plage सुद्धा काही वर्षा नंतर ठराविक काळा साठी यायचा आता पण तो आला तर आपल्या कडे उपचार नाहीत त्या मुळे आधुनिक औषध नी प्लेग ला नष्ट केले आहे असे समजण्यात काही ही अर्थ नाही . आज सुद्धा त्याच्या वर उपचार नाहीत. एचआयव्ही आज पण बरा होत नाही तो आजार आता होत नाही ह्या मध्ये आधुनिक औषधांचा काही संबंध नाही. आणि कोणी काळजी पण घेत नाही. हे जर असेच असेल तर निसर्ग वर अवलंबून आपण आज पण आहे. व्हायरस पासून मुक्ती औषध शास्त्र देणार आहे की नाही
माझ्या एका परिचितांनी ऑनलाईन मिटींगमध्ये बॉसना कोरोनाचे वादळ कधी पर्यंत घोंघावणार, आपण जुन्या नॉर्मलला कधी जाऊ असे विचारले, बॉसने लगेच त्यांची इम्युनॉलॉजीस्टशी झालेल्या चर्चेचा दाखला देत अजून दिड एक वर्षात सगळं पुर्वी सारखे नॉर्मल असेल असा विश्वास दिला आणि ऑनलाईन मधली सगळी मंडळी सुखावली. लगोलग व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतून रशियन लस तयार असल्याची बातमी अगदी उद्यापासून उपलब्ध असल्याचा भास निर्माण करेल अशी फिरली. ....पण थांबा जरासे वस्तुस्थिती कदाचीत बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल Dr Tedros Adhanom Ghebreyesus, AIIMS चे डॉ.