मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Deep relaxation साठी योग निद्रा आणि ध्यान

मार्गी ·

गॉडजिला 29/04/2021 - 11:20
कोणाला फरक पडतो कोणाला नाही पडत पण सर्वांनी प्रयोग नक्कि करुन पाहावा. आम्ही तसे श्रमजीवी लोक. पहाटे लवकर उठुन गाडी धुण्यापासुन बाजारहाट करुन ते रात्री सर्व हिशोब सेटल करुन पुन्हा उद्याच्या तयारीत झोपणे हीच दिनचर्या. आणी यातुन योग, ध्यान प्रकाराला वेळ काढणे म्हणजे... ... .. . पण कुतुहल म्हणुनच एकदा रद्दीच्या दुकानातुन जवळपास फुकटच योगनिद्रेचे पुस्तक उचलले. आणी वाचुन घेतले. काय आहे बघुया म्हणुन योगनिद्रेचा अभ्यास चालु केला व कमालिचा उत्साह अनुभवाला मिळाला. तेंव्हा पासुन मन कितिही दमले तरी योगनिद्रा घेतच झोपी जातो. अर्थात कामाच्या गराड्यात अथवा शरीरीक श्रम भरपुर झालेले असतील अथवा आळस म्हणुन यातील सतत्य सतत भंग होतय पण मनाचा व शरीराचा उत्साह टिकवायला मला याचा अधुनमधुन कमालिचा फायदा होतो

सोत्रि 29/04/2021 - 12:34
सध्याच्या काळामध्ये अनेक लोकांच्या दु:खावर फुंकर घालणारा आणि मृत्युबद्दल विचारमंथन करणारा माझा लेख-
हा लेख खुपच छान आहे! - (मुमुक्षू) सोकाजी

मार्गी 29/04/2021 - 18:05
सर्वांना धन्यवाद! शक्य असल्यास ऐकल्यानंतर फीडबॅक द्यावा. @ सोकाजी, धन्यवाद! @ गॉडजिला जी, अरे वा! छानच.

गॉडजिला 29/04/2021 - 11:20
कोणाला फरक पडतो कोणाला नाही पडत पण सर्वांनी प्रयोग नक्कि करुन पाहावा. आम्ही तसे श्रमजीवी लोक. पहाटे लवकर उठुन गाडी धुण्यापासुन बाजारहाट करुन ते रात्री सर्व हिशोब सेटल करुन पुन्हा उद्याच्या तयारीत झोपणे हीच दिनचर्या. आणी यातुन योग, ध्यान प्रकाराला वेळ काढणे म्हणजे... ... .. . पण कुतुहल म्हणुनच एकदा रद्दीच्या दुकानातुन जवळपास फुकटच योगनिद्रेचे पुस्तक उचलले. आणी वाचुन घेतले. काय आहे बघुया म्हणुन योगनिद्रेचा अभ्यास चालु केला व कमालिचा उत्साह अनुभवाला मिळाला. तेंव्हा पासुन मन कितिही दमले तरी योगनिद्रा घेतच झोपी जातो. अर्थात कामाच्या गराड्यात अथवा शरीरीक श्रम भरपुर झालेले असतील अथवा आळस म्हणुन यातील सतत्य सतत भंग होतय पण मनाचा व शरीराचा उत्साह टिकवायला मला याचा अधुनमधुन कमालिचा फायदा होतो

सोत्रि 29/04/2021 - 12:34
सध्याच्या काळामध्ये अनेक लोकांच्या दु:खावर फुंकर घालणारा आणि मृत्युबद्दल विचारमंथन करणारा माझा लेख-
हा लेख खुपच छान आहे! - (मुमुक्षू) सोकाजी

मार्गी 29/04/2021 - 18:05
सर्वांना धन्यवाद! शक्य असल्यास ऐकल्यानंतर फीडबॅक द्यावा. @ सोकाजी, धन्यवाद! @ गॉडजिला जी, अरे वा! छानच.
सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. योगनिद्रा हा ध्यान म्हणजेच deep relaxation चा झोपलेल्या स्थितीमध्ये केला जाणारा प्रकार आहे. योगनिद्रेच्या अभ्यासाने शरीर रिलॅक्स होतं व मन शांत होतं. शरीराचे ताण व मानसिक स्ट्रेससाठीही उपयोगी आहे. शक्यतो डोक्याखाली उशी न घेता झोपलेल्या स्थितीमध्ये ३५ मिनिट दिलेल्या सूचना ऐकून सहजपणे करता येणारा हा ध्यान प्रकार आहे. आपल्या सोयीने चटई, सतरंजी किंवा गादीवर झोपून सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी किंवा अगदी झोपतानाही आपण हे करू शकता. शवासनात आडवे होऊन फक्त सूचनांनुसार स्वतःला रिलॅक्स करत जायचं आहे. इथून आपल्याला सूचना डाउनलोड करून ऐकता येतील.

आमचीबी आंटी जन टेस

पाषाणभेद ·

चित्रगुप्त 27/04/2021 - 01:24
अरारारा.. आमालाबी ह्ये वाचताना सारखी ती आंटी कशी दिसत अशीन, तिनं कपडं कोन्तं घातलं अशीन, ती लाडं लाडं कसं बोलत अशीन, ह्येच दिसत व्हतं. पन शेवटी ती आन्टी का आली न्हाई ह्ये काय बी समजलं नाय. पुन्यांदा येकदा जाऊन पघा शेंटर मदी. भेटंन यंदा.

चौकटराजा 27/04/2021 - 09:09
सगळ्या मेडिकल टर्म वापरून कंटाळा आला आहे .. अशा वातावरणात आंटी दिसलिबी न्हाई तरी चालंल पण करुणा बाई नको बाबा .... वाचून मजा आली. बाकी आंटी बघायची असेल तर " कॉरि ऑन डॉक्टर " मधली बार्बारा विंडसर पहा !

लई भारी 27/04/2021 - 13:47
आवडल! :-)
आसं कुठं आसतंय व्हय?
आक्शी बराबर हाय. आपण ऑनलाईन आंदोलन करूया!

चित्रगुप्त 27/04/2021 - 01:24
अरारारा.. आमालाबी ह्ये वाचताना सारखी ती आंटी कशी दिसत अशीन, तिनं कपडं कोन्तं घातलं अशीन, ती लाडं लाडं कसं बोलत अशीन, ह्येच दिसत व्हतं. पन शेवटी ती आन्टी का आली न्हाई ह्ये काय बी समजलं नाय. पुन्यांदा येकदा जाऊन पघा शेंटर मदी. भेटंन यंदा.

चौकटराजा 27/04/2021 - 09:09
सगळ्या मेडिकल टर्म वापरून कंटाळा आला आहे .. अशा वातावरणात आंटी दिसलिबी न्हाई तरी चालंल पण करुणा बाई नको बाबा .... वाचून मजा आली. बाकी आंटी बघायची असेल तर " कॉरि ऑन डॉक्टर " मधली बार्बारा विंडसर पहा !

लई भारी 27/04/2021 - 13:47
आवडल! :-)
आसं कुठं आसतंय व्हय?
आक्शी बराबर हाय. आपण ऑनलाईन आंदोलन करूया!
आमचीबी आंटी जन टेस गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं. त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला. या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

आवाज बंद सोसायटी - भाग ४

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 18/04/2021 - 12:03
समुद्रपाण्याखालील वाढते आवाज या विषयावरील हा धागा आवडला. ध्वनी प्रदुषणाचे गांभिर्य समजायला या मालिकेमु़ळे चांगली मदत होते आहे.

पुणे: मोठ्या आवाजात टीव्ही लावल्याचा विचारला जाब, तरुणावर जीवघेणा हल्ला..... https://maharashtratimes.com/crime-news/pune-man-attacked-with-sickle-in-dhankawadi/articleshow/82257062.cms ---------

चौथा कोनाडा 18/04/2021 - 12:03
समुद्रपाण्याखालील वाढते आवाज या विषयावरील हा धागा आवडला. ध्वनी प्रदुषणाचे गांभिर्य समजायला या मालिकेमु़ळे चांगली मदत होते आहे.

पुणे: मोठ्या आवाजात टीव्ही लावल्याचा विचारला जाब, तरुणावर जीवघेणा हल्ला..... https://maharashtratimes.com/crime-news/pune-man-attacked-with-sickle-in-dhankawadi/articleshow/82257062.cms ---------
यामागील भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ http://www.misalpav.com/node/48658 :: आवाज बंद सोसायटी - भाग ३ परिणाम ध्वनी, आवाज, गोंगाट तसेच ध्वनी प्रदूषण आदींबद्दल वर आपण चर्चा केली.

आवाज बंद सोसायटी - भाग ३

पाषाणभेद ·

मराठी_माणूस 12/04/2021 - 15:49
सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे.
बरोबर. हे प्रशिक्षण मुलांना शाळेतच दिले गेले पाहीजे. हा त्यांच्या अभ्यासक्रमाचाच भाग असला पाहीजे. म्हणजे पुढील आयुष्यात ह्यामुळे भांडण, मारामार्‍या हे टाळले जाउ शकते. आमच्या सोसायटीत रोज संध्याकाळी खाली जी थोडीशी मिकळी जागा आहे तिथे लहान मुले खेळत असतात. प्रचंड आरडाओरड , दंगामस्ती चालु असते. त्या कर्कश्श आवाजात लिफ्ट ची वाट बघणे सुध्दा अशक्य होते.

In reply to by मराठी_माणूस

चौकटराजा 12/04/2021 - 19:27
संचार बन्दी धुडकावून बावधन येथे बगाड जत्रा केली त्यात ६१ लोक करोनाग्रस्त झाले. मास्क लाव असे सांगितल्या मुळे एक सज्ञान मुलाने दोन अज्ञान मुलाना बरोबर घेऊन एका मुलाचा खून केला. एम पी ए सी च च्या परिक्षेसाठी आन्दोलन केले त्यात ३५ जण करोनाग्रस्त झाले. उपासमारीने मरण्यापेक्षा करोनाने मरेन अशी उक्ती आपल्या समाजात स्त्रिया पुरुषां पेक्षा मास्क चा नियम अधिक गम्भीरपणे पाळतात . समाजात एक विशिष्ट असा तरुणाचा गट असतो ! कमरेखाली जीन ,पायात चप्पल व इन न केलेला शर्ट असा पोशाख असतो . हा गट कसलेही सामाजिक नियम पाळत नाही .त्याला साथ असते पानवाले, चायवाले, वडापाव वाले जे त्याना मास्क लावा असे गोडीने देखील सुचवीत नाहीत. भारत देश ,इमारती ,धरणे ,रस्ते ,बागा ,रुग्णालये ,शिक्षणसन्स्था ( फक्त इमारती ) याबाबत खरेच प्रगति करीत आहे पण राजकारणी व नागरिक या बाबतीत एकदम कंडम देश आहे आपला !!

"सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे." प्रचंड सहमत ....

चौथा कोनाडा 14/04/2021 - 13:17
उत्तम माहितीपुर्ण मालिका. हे प्रदुषण वाढत गेले तर व्यापारी तत्वावर सायलेंट झोन तयार होतील व त्यातील शांततेसाठी प्रवेश हवा असेल तर आपल्याला पैसे मोजावे लागतील.

ज्या लोकांना गोंगाट असल्याशिवाय चैन पडत नाही. अशा लोकांवर काही प्रयोग झाले आहेत का? पुष्पक सिनेमात जसे कमल हसनला जशी शांत वातावरणात झोप लागली नाही म्हणून त्याने गोंगाटाची व्यवस्था केली.

मराठी_माणूस 12/04/2021 - 15:49
सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे.
बरोबर. हे प्रशिक्षण मुलांना शाळेतच दिले गेले पाहीजे. हा त्यांच्या अभ्यासक्रमाचाच भाग असला पाहीजे. म्हणजे पुढील आयुष्यात ह्यामुळे भांडण, मारामार्‍या हे टाळले जाउ शकते. आमच्या सोसायटीत रोज संध्याकाळी खाली जी थोडीशी मिकळी जागा आहे तिथे लहान मुले खेळत असतात. प्रचंड आरडाओरड , दंगामस्ती चालु असते. त्या कर्कश्श आवाजात लिफ्ट ची वाट बघणे सुध्दा अशक्य होते.

In reply to by मराठी_माणूस

चौकटराजा 12/04/2021 - 19:27
संचार बन्दी धुडकावून बावधन येथे बगाड जत्रा केली त्यात ६१ लोक करोनाग्रस्त झाले. मास्क लाव असे सांगितल्या मुळे एक सज्ञान मुलाने दोन अज्ञान मुलाना बरोबर घेऊन एका मुलाचा खून केला. एम पी ए सी च च्या परिक्षेसाठी आन्दोलन केले त्यात ३५ जण करोनाग्रस्त झाले. उपासमारीने मरण्यापेक्षा करोनाने मरेन अशी उक्ती आपल्या समाजात स्त्रिया पुरुषां पेक्षा मास्क चा नियम अधिक गम्भीरपणे पाळतात . समाजात एक विशिष्ट असा तरुणाचा गट असतो ! कमरेखाली जीन ,पायात चप्पल व इन न केलेला शर्ट असा पोशाख असतो . हा गट कसलेही सामाजिक नियम पाळत नाही .त्याला साथ असते पानवाले, चायवाले, वडापाव वाले जे त्याना मास्क लावा असे गोडीने देखील सुचवीत नाहीत. भारत देश ,इमारती ,धरणे ,रस्ते ,बागा ,रुग्णालये ,शिक्षणसन्स्था ( फक्त इमारती ) याबाबत खरेच प्रगति करीत आहे पण राजकारणी व नागरिक या बाबतीत एकदम कंडम देश आहे आपला !!

"सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे." प्रचंड सहमत ....

चौथा कोनाडा 14/04/2021 - 13:17
उत्तम माहितीपुर्ण मालिका. हे प्रदुषण वाढत गेले तर व्यापारी तत्वावर सायलेंट झोन तयार होतील व त्यातील शांततेसाठी प्रवेश हवा असेल तर आपल्याला पैसे मोजावे लागतील.

ज्या लोकांना गोंगाट असल्याशिवाय चैन पडत नाही. अशा लोकांवर काही प्रयोग झाले आहेत का? पुष्पक सिनेमात जसे कमल हसनला जशी शांत वातावरणात झोप लागली नाही म्हणून त्याने गोंगाटाची व्यवस्था केली.
याआधीचे दोन भाग: http://www.misalpav.com/node/48651 :: आवाज बंद सोसायटी - भाग १ http://www.misalpav.com/node/48652 :: आवाज बंद सोसायटी - भाग २ व्याख्या व विकास एखाद्या वस्तूमधून निघणार्‍या सामान्य ध्वनीला आवाज म्हणतात. आवाज किंवा ध्वनी म्हणजे एखाद्‍या माध्यमातून (जसे-हवा,पाणी;) कानाद्वारे कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी उर्जेचा एक प्रकार आहे. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण होतात.

सिझेरिअन प्रसूती : इतिहास व दंतकथा

हेमंतकुमार ·

सौंदाळा 12/04/2021 - 18:23
आडवे /तिरके असलेले बाळ मसाज करुन सरळ करणार्‍या सुईणी पुर्वी भारतात पण होत्या. मात्र आता असे केले जाते का? स्त्रीरोग तज्ज्ञांना असे प्रशिक्षण मिळते का? आठव्या महिन्यातल्या सोनोग्राफीत बाळाची पोझिशन बघुन निर्णय घेतला जातो. भारतात सिझेरियनचे प्रमाण खुपच वाढले आहे. पाश्चात्य देशांमधे मात्र अजुनही नैसर्गिक प्रसुतीचे प्रमाण जास्त आहे, हे खरे आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गुल्लू दादा 30/04/2021 - 17:40
आडवे असलेले बाळ जशी प्रसूती जवळ येते तसे बाह्य भागावर दाब देऊन सरळ करण्याचा प्रयत्न जरूर होतो फक्त अट अशी की बाळाचा कुठलाही भाग प्रसूतिमार्गात अडकलेला असू नये. याला external cephalic version असे म्हणतात वैद्यकीय भाषेत. वरील सगळं सोनोग्राफीच्या निगराणीत होतं. भारतात सिझेरियनच प्रमाण वाढलंय खरं पण त्याला बरेच पैलू आहेत. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय असेल इथे तो जमायचा नाही. मी या विषयातील तज्ञ नाही पण शिकत असताना या गोष्टी वरिष्ठ मंडळी करताना पाहिलंय जरूर म्हणून प्रतिसाद दिला. बाकी कुमार सर म्हणतात तशी चर्चा भटकू नये या प्रतिसादाने म्हणजे झालं. धन्यवाद.

हेमंतकुमार 12/04/2021 - 18:32
सौंदाळा, प्रसूतिशास्त्राशी माझा विशेष संपर्क राहिलेला नसल्यामुळे मी हा लेख फक्त एका रंजक दृष्टीकोनापुरताच लिहीलेला आहे. तसे लेखात शेवटी नमूद केले आहे. तुम्ही म्हणताय त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा जाऊ नये असे मला वाटते. अर्थात कोणी संबंधित तज्ञ असल्यास त्यांनी अधिक सांगायला काहीच हरकत नाही.

सोळाव्या शतकात सिझेरियन म्हणजे किमान माझ्यातरी कल्पनेच्या पार आहे . सोळ्याव्या शतकात मॉर्फिन चा तरी शोध लागला होता का ? किंव्वा बॅक्टेरिया चा तरी शोध लागला होता का? अगदी शस्त्रक्रिया लांबची बात , पण एकोणिसाव्या शतकात "नॉर्मल प्रेगनन्सि च्या आधी सुईणीने / डोक्टरने हात धुतले पाहिजेत" असे मत मांडणार्‍या डॉक्टर इग्नाझ सेमेल्वाईझ ला लोकांनी यड्यात काढले होते म्हणे! बाकी आजकाल मात्र सिझेरियन चा धंधा सुरु केला आहे डॉक्टरांनी . लोकं एक किंव्वा दोन पेक्षा जास्त अपत्यांना जन्म देत नाहीत आणि त्यामुळे सिझेरियन सहज खपुन जाते असे स्पष्ट लॉजिक आहे . नॉर्मल प्रेगनसीला जिथे २०ते २५ ह खर्च येतो तिथे सिझेरियन च्या नावाखाली ७० ते ७५ ह सहज छापता येतात असे सोप्पे अर्थकारण आहे ! अर्थात सगळेच डॉक्टर असे करत असतील अस्से नाही पण अनेक करतात . शिवाय बायकाही जास्त त्रास नको म्हणुन पटकन सिझेरियन आटोपुन घ्या असे म्हणायला लागल्या आहेत . नॉर्मल प्रेगन्स्सी नंतर ५-७ दिवसात रिकव्हरी होते अन तरी काही काही बायकांना महिनाभर अंथरुणाला खिळुन रहायची हौस का असते हे अनाकलनीय आहे ! आणि मेडीकल इन्श्युरन्स वाले तर सगळ्यात क्युतिया लोकं आहेत . माझ्या , स्वतःच्या अनुभवात , मेडीकल इन्शुरन्स कंपनीने सिझेरियन केस असुनही अ‍ॅनास्थेशिया डॉक्टरच्या फी चा क्लेम नाकारला होता . ह्या लोकांना अक्कल नसते की जाणीवपुर्वक असे वागतात हा मला अजुनही न सुटलेला प्रश्न आहे ! पण यशस्वी प्रेगनन्सी नंतर, बाळ बाळंतीण सुखरूप असल्याने सगळेच आनंदात असतात , कोणीही भांडायच्या मनःस्थितित नसतो , त्याचा गैरफायदा उचलणारे हे लोकं . सिरियसली पिपल लाईक दीज डिझर्व करोना ! बाकी हे अवांतर असो. लेख आवडला ! ह्या विषयावर असेच लेख वाचायला आवडतील. मझे स्वत्:चे क्षेत्र फायनान्स अणि ब्यँकिन्ग असले तरी ह्या मेडीकल क्षेत्रा विषयी खुप उत्सुकता आहे . अनेक प्रश्न आहेत उदा : क्रोमोझोम्स मध्ये माहीती नक्की कशी साठवली जाते ? किंव्वा प्रेगनन्सी मध्ये एक स्पर्म आणि एक एग्ग मिक्श झाल्यावर जी सेल तयार होते त्यात माहीती कोठे असते ? कोणता सेल ब्रेन होणार अन कोणता हार्ट अन कोणता बोन्स हे कसे ठरते ? किंवव्वा लहान मुलांना जन्मतःच ओठांचे मसल्स वापरुन दुध प्यायचे हे ज्ञान आपोआप कसे प्राप्त होते ? माणसांमध्ये नाही पण इतर प्राण्यांमध्ये जन्म जाल्यापासुन काही मोजक्याच मिनिटात प्राणी स्वतःच्या पायावर उभा रहातो, how does brain cells, neurons learn that ? असो पुढील लेखनासाठी शुभेछा !

हेमंतकुमार 12/04/2021 - 20:52
क्रोमोझोम्स मध्ये माहीती नक्की कशी साठवली जाते ? किंव्वा प्रेगनन्सी मध्ये एक स्पर्म आणि एक एग्ग मिक्श झाल्यावर जी सेल तयार होते त्यात माहीती कोठे असते ? कोणता सेल ब्रेन होणार अन कोणता हार्ट अन कोणता बोन्स हे कसे ठरते ?
>>>> हे प्रश्न मूलभूत जीवशास्त्राशी निगडीत असून रोचक आहेत. सवडीने विचार करेन. धन्यवाद !

वकील साहेब 13/04/2021 - 17:49
कुमार सर, नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण लेख, धन्यवाद. आता २०२१ मध्ये तरी आपण सिझेरियन प्रसूती शास्त्रात प्रगतीच्या सर्वोच्च टप्प्यावर आहोत का ? कि अजून ५० वर्षांनी मिपा वर सिझेरियन प्रसुतीवर लेख लिहिला गेला तर त्यात अशी वाक्य असतील का ? की, "बाळ बाळंतिणीला वाचवण्या साठी सोळाव्या शतका पासून सुरु झालेली पोट फाडून बाळ बाहेर काढण्याची पद्धत अगदी एकविसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत चालू होती. पण सिझेरियन प्रसूती कितीही संकटमोचक वाटत असली तरी ती अनैसर्गिक होती आणि म्हणून नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी खूप संशोधन होऊन सिझेरियन प्रसूती करावी लागण्याची जी काही कारणं होती त्यावर यशस्वीरित्या मात करण्यात आली आहे. आता मुहूर्त पाहून बाळाला या जगात आणणाऱ्या मातेची प्रसूती वगळता अन्य कोणाचीच सिझेरियन प्रसूती करण्याची वेळच येत नाही." थोडक्यात काय तर येत्या काळात या प्रकरणात अजून संशोधन होऊन हि प्रक्रिया अधिक सुकर होण्याची चिन्हे आहेत काय ?

हेमंतकुमार 13/04/2021 - 18:11
येत्या काळात या प्रकरणात अजून संशोधन होऊन हि प्रक्रिया अधिक सुकर होण्याची चिन्हे आहेत काय ? >>>
प्रामाणिकपणे सांगायचे तर वैद्यकाच्या या शाखेशी माझा फारसा संपर्क नाही आणि तितके वाचनही नाही. सवडीने तज्ञांशी काही बोलून उपयुक्त माहिती मिळाल्यास जरूर लिहीन. हा लेख मी इतिहासाचे स्मरणरंजन इतक्या पुरताच मर्यादित ठेवला आहे.

हेमंतकुमार 16/04/2021 - 16:19
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! वर वकील साहेब यांनी एक चांगला प्रश्न उपस्थित केला आहे:
भविष्यात कोणाचीच सिझेरियन प्रसूती करण्याची वेळच येणार नाही, हे शक्य आहे का ?
>> यासंदर्भात मानवी उत्क्रांतीशी संबंधित एक रोचक मुद्दा आहे. लाखो वर्षांपूर्वी जेव्हा चतुष्पाद प्राण्याचा माणूस होण्यास सुरुवात झाली तेव्हा शरीर रचनेत दोन महत्त्वाचे बदल झाले : १. चतुष्पाद ते द्विपाद अवस्था. २. मेंदूचा मोठा आकार . त्यामुळे गरोदरपणात स्त्रीचा जननमार्ग आणि बालकाचे डोके हे एकमेकात अगदी घट्ट बसू लागले. या कारणास्तव योनिमार्गे नैसर्गिक जन्म होताना देखील बाळाला पुढे सरकत असताना गोल वळावे लागते ( रोटेशन). निसर्गानुसार काही टक्के स्त्रियांत कायमच जननमार्गातील जागा आणि बाळाचे डोके यांचे प्रमाण ‘मिसफिट’ राहणार. या मूलभूत जीवशास्त्रीय कारणाने असे जन्म हे शल्यक्रियेद्वारे करावे लागतात.

नेहमीप्रमाणे मुद्देसूद आणि रंजक. धन्यवाद. एका नर्सने असे सांगितले की. सिझेरिअन करण्यापूर्वी कण्यात टोचून भूल देतात. त्यामुळे भविष्यात लंब्रायटीस होण्याची शक्यता असते. हे खरे कां?

हेमंतकुमार 20/04/2021 - 08:38
धन्यवाद. पाठदुखीचा मुद्दा. बहुतेक रुग्णांच्या बाबतीत प्रसूतीनंतर आठवडाभरात ती थांबते. ज्यांची थांबत नाही त्यांच्या बाबतीतली कारणे तशी अस्पष्ट आहेत. त्यामध्ये स्थूलपणा ( BMI > ३२) हे एक कारण आहे. प्रत्यक्ष भूल देण्याच्या तंत्रामुळे पाठदुखी मागे लागते का, हा तसा वादग्रस्त प्रश्न आहे. त्यावर सरसकट लागू होईल असे स्पष्ट उत्तर नाही.

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे 07/05/2021 - 19:52
प्रसूती आणि पाठदुखी ३३ % बायकांना प्रसूती नंतर पाठदुखी असल्याचे आणि ३७ % बायकांना सिझेरियन नंतर पाठदुखी असल्याचे आढळून आले आहे. या ४ % अतिरिक्त पाठदुखी पैकी २.२ % स्त्रियांना पाठीत इंजेक्शनने भूल दिली होती आणि १.८% याना नाका वाटे भूल दिली होती. म्हणजे पाठीत इंजेक्शन दिल्या मुळे सिझेरियन नंतर होणारी पाठदुखी हि नगण्य प्रमाणात जास्त आहे असे आढळून आले आहे. अनेक स्त्रियांना गरोदरपणात पाठदुखी असते. ज्या (३३ टक्के) स्त्रियांना प्रसूती नंतर ६ महिने पेक्षा जास्त काळ पाठदुखी होते त्याची बरीच कारणे आढळून आली. त्यात लठ्ठपणा, प्रसूतीनंतर व्यायामाचा अभाव, यात ४० दिवस खाटेवरून न उठणे (उत्तर भारतात हे मोठ्या प्रमाणात दिसते) चुकीच्या तर्हेने स्तनपान करवणे ( बाळाला हातावर घेण्याऐवजी पुढे वाकून स्तनपान देणे) अशी अनेक कारणे आढळून आली. याशिवाय निम्न आर्थिक गटात अतिश्रमाची कामे आणि एका पेक्षा जास्त प्रसूती हि कारणे आढळून आली. प्रसूतीनंतर २ वर्षे झाल्यानंतर असलेल्या पाठदुखीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रसूती मध्ये वाढलेले वजन कमी न होणे हे आढळले आहे. प्रसूती नंतर सुरवातीला सर्वच स्त्रियांना अशक्तपणा जाणवतो. परंतु बहुसंख्य स्त्रियांचा अशक्तपणा हा सात ते दहा दिवसात बराच कमी होतो. परंतु बाळंतपण आहे म्हणजे विश्रांती घेणे हा आपला हक्क( ENTITLEMENT) आहे असे स्त्रियांच्या मनावर बिम्बवले जाते. त्यातून मुलगी पहिल्या बाळंतपणात माहेरी आली कि तिच्यावर आपले प्रेम दाखवणे म्हणजे तिला इकडची काडी तिकडे करू न देणे किंवा सासरी काम करायचेच आहे म्हणून आता विश्रांती दिलीच पाहिजे या मनोवृत्ती मुळे स्त्रिया अजिबात व्यायाम करत नाहीत. यामुळे गरोदरपणात ढिले पडलेले स्नायू परत मूळ पदावर यायला अधिकच वेळ लागतो. त्यातून बाळंतिणीला दिलेले सकस अन्न यामुळे वजन आणि पोटावर चरबी वाढत जाते( जी नंतर फारच क्वचित उतरते). आपण बाळंतिणीला विश्रांती जरूर द्या परंतु शरीर ढिले पडणार नाही इतका व्यायाम/ योगाभ्यास स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने जरूर करा. प्रसूती आणि बाळाचा जन्म हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचं टप्पा असतो त्यामुळे त्यावेळेस झालेला कोणताही प्रसंग हा आयुष्यभर लक्षात राहतो यामुळे यानंतर होणाऱ्या पाठदुखीसाठी कारण हे एकतर प्रसूती किंवा पाठीत इंजेक्शन दिल्यामुळे असेच स्त्रियांना लक्षात राहते.

In reply to by हेमंतकुमार

गामा पैलवान 07/05/2021 - 02:14
कुमारेक, दुवा तुटला आहे. कृपया ईपेपर चे दुवे शक्यतो टाळावेत. ते बेभरवशाचे असतात व सहसा ठीक चालंत नाहीत. गुग्गुळाचार्यांच्या मदतीने डॉक्टर बेलखोडे यावर शोध घेतला. तेव्हा हा दुवा सापडला : https://www.esakal.com/saptarang/team-sfa-writes-about-life-saving-pregnant-women हाच का तो? आ.न., -गा.पै.

टर्मीनेटर 07/07/2021 - 14:32
मध्यंतरीच्या काळात वाचायचा राहून गेलेला हा एक मस्त लेख! माहिती खूपच रोचक आहे. अवांतर : मागे एक हिंदीत डब केलेला दाक्षिणात्य सिनेमा पहिला होता. त्यात नव्याने लग्न झालेले एक जोडपे आपले होणारे अपत्य अतिशय हुशार आणि सर्वगुणसंपन्न असावे म्हणुन प्रसूतीपर्यंतच्या सर्व गोष्टी ज्योतिष्याच्या सल्ल्याने करत असतात. अगदी अचूक मुहूर्तावर बाळ जन्माला यावे म्हणुन डॉक्टरशीही सेटिंग लावून ठरलेल्या वेळी सिझेरियन करुन प्रसूती होते. जन्माला आलेले बाळ अर्थातच अलौकिक असते आणि लहानपणापासूनच आई वडिलांच्या डोक्याला प्रचंड ताप देते 😀 नाव नाही आठवत पण सिनेमा मस्त होता... त्या साऊथवाल्यांच्या स्टोरीत असते त्याप्रमाणेच तुमच्या लेखाच्या विषयातही मस्त वैविध्य असते 🙏

हेमंतकुमार 28/12/2025 - 08:53
सिझेरियनविषयी मतमतांतरे नेहमीच व्यक्त होत असतात. त्याचे प्रमाण का वाढत आहे यामागील तथ्याचा शोध घेणारा सिझेरियनचा चक्रव्यूह हा डॉ. विवेक शेठ यांचा लेख आजच्या ( २८/१२) दैनिक मटा विशेष विभागात वाचता येईल.

सौंदाळा 12/04/2021 - 18:23
आडवे /तिरके असलेले बाळ मसाज करुन सरळ करणार्‍या सुईणी पुर्वी भारतात पण होत्या. मात्र आता असे केले जाते का? स्त्रीरोग तज्ज्ञांना असे प्रशिक्षण मिळते का? आठव्या महिन्यातल्या सोनोग्राफीत बाळाची पोझिशन बघुन निर्णय घेतला जातो. भारतात सिझेरियनचे प्रमाण खुपच वाढले आहे. पाश्चात्य देशांमधे मात्र अजुनही नैसर्गिक प्रसुतीचे प्रमाण जास्त आहे, हे खरे आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गुल्लू दादा 30/04/2021 - 17:40
आडवे असलेले बाळ जशी प्रसूती जवळ येते तसे बाह्य भागावर दाब देऊन सरळ करण्याचा प्रयत्न जरूर होतो फक्त अट अशी की बाळाचा कुठलाही भाग प्रसूतिमार्गात अडकलेला असू नये. याला external cephalic version असे म्हणतात वैद्यकीय भाषेत. वरील सगळं सोनोग्राफीच्या निगराणीत होतं. भारतात सिझेरियनच प्रमाण वाढलंय खरं पण त्याला बरेच पैलू आहेत. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय असेल इथे तो जमायचा नाही. मी या विषयातील तज्ञ नाही पण शिकत असताना या गोष्टी वरिष्ठ मंडळी करताना पाहिलंय जरूर म्हणून प्रतिसाद दिला. बाकी कुमार सर म्हणतात तशी चर्चा भटकू नये या प्रतिसादाने म्हणजे झालं. धन्यवाद.

हेमंतकुमार 12/04/2021 - 18:32
सौंदाळा, प्रसूतिशास्त्राशी माझा विशेष संपर्क राहिलेला नसल्यामुळे मी हा लेख फक्त एका रंजक दृष्टीकोनापुरताच लिहीलेला आहे. तसे लेखात शेवटी नमूद केले आहे. तुम्ही म्हणताय त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा जाऊ नये असे मला वाटते. अर्थात कोणी संबंधित तज्ञ असल्यास त्यांनी अधिक सांगायला काहीच हरकत नाही.

सोळाव्या शतकात सिझेरियन म्हणजे किमान माझ्यातरी कल्पनेच्या पार आहे . सोळ्याव्या शतकात मॉर्फिन चा तरी शोध लागला होता का ? किंव्वा बॅक्टेरिया चा तरी शोध लागला होता का? अगदी शस्त्रक्रिया लांबची बात , पण एकोणिसाव्या शतकात "नॉर्मल प्रेगनन्सि च्या आधी सुईणीने / डोक्टरने हात धुतले पाहिजेत" असे मत मांडणार्‍या डॉक्टर इग्नाझ सेमेल्वाईझ ला लोकांनी यड्यात काढले होते म्हणे! बाकी आजकाल मात्र सिझेरियन चा धंधा सुरु केला आहे डॉक्टरांनी . लोकं एक किंव्वा दोन पेक्षा जास्त अपत्यांना जन्म देत नाहीत आणि त्यामुळे सिझेरियन सहज खपुन जाते असे स्पष्ट लॉजिक आहे . नॉर्मल प्रेगनसीला जिथे २०ते २५ ह खर्च येतो तिथे सिझेरियन च्या नावाखाली ७० ते ७५ ह सहज छापता येतात असे सोप्पे अर्थकारण आहे ! अर्थात सगळेच डॉक्टर असे करत असतील अस्से नाही पण अनेक करतात . शिवाय बायकाही जास्त त्रास नको म्हणुन पटकन सिझेरियन आटोपुन घ्या असे म्हणायला लागल्या आहेत . नॉर्मल प्रेगन्स्सी नंतर ५-७ दिवसात रिकव्हरी होते अन तरी काही काही बायकांना महिनाभर अंथरुणाला खिळुन रहायची हौस का असते हे अनाकलनीय आहे ! आणि मेडीकल इन्श्युरन्स वाले तर सगळ्यात क्युतिया लोकं आहेत . माझ्या , स्वतःच्या अनुभवात , मेडीकल इन्शुरन्स कंपनीने सिझेरियन केस असुनही अ‍ॅनास्थेशिया डॉक्टरच्या फी चा क्लेम नाकारला होता . ह्या लोकांना अक्कल नसते की जाणीवपुर्वक असे वागतात हा मला अजुनही न सुटलेला प्रश्न आहे ! पण यशस्वी प्रेगनन्सी नंतर, बाळ बाळंतीण सुखरूप असल्याने सगळेच आनंदात असतात , कोणीही भांडायच्या मनःस्थितित नसतो , त्याचा गैरफायदा उचलणारे हे लोकं . सिरियसली पिपल लाईक दीज डिझर्व करोना ! बाकी हे अवांतर असो. लेख आवडला ! ह्या विषयावर असेच लेख वाचायला आवडतील. मझे स्वत्:चे क्षेत्र फायनान्स अणि ब्यँकिन्ग असले तरी ह्या मेडीकल क्षेत्रा विषयी खुप उत्सुकता आहे . अनेक प्रश्न आहेत उदा : क्रोमोझोम्स मध्ये माहीती नक्की कशी साठवली जाते ? किंव्वा प्रेगनन्सी मध्ये एक स्पर्म आणि एक एग्ग मिक्श झाल्यावर जी सेल तयार होते त्यात माहीती कोठे असते ? कोणता सेल ब्रेन होणार अन कोणता हार्ट अन कोणता बोन्स हे कसे ठरते ? किंवव्वा लहान मुलांना जन्मतःच ओठांचे मसल्स वापरुन दुध प्यायचे हे ज्ञान आपोआप कसे प्राप्त होते ? माणसांमध्ये नाही पण इतर प्राण्यांमध्ये जन्म जाल्यापासुन काही मोजक्याच मिनिटात प्राणी स्वतःच्या पायावर उभा रहातो, how does brain cells, neurons learn that ? असो पुढील लेखनासाठी शुभेछा !

हेमंतकुमार 12/04/2021 - 20:52
क्रोमोझोम्स मध्ये माहीती नक्की कशी साठवली जाते ? किंव्वा प्रेगनन्सी मध्ये एक स्पर्म आणि एक एग्ग मिक्श झाल्यावर जी सेल तयार होते त्यात माहीती कोठे असते ? कोणता सेल ब्रेन होणार अन कोणता हार्ट अन कोणता बोन्स हे कसे ठरते ?
>>>> हे प्रश्न मूलभूत जीवशास्त्राशी निगडीत असून रोचक आहेत. सवडीने विचार करेन. धन्यवाद !

वकील साहेब 13/04/2021 - 17:49
कुमार सर, नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण लेख, धन्यवाद. आता २०२१ मध्ये तरी आपण सिझेरियन प्रसूती शास्त्रात प्रगतीच्या सर्वोच्च टप्प्यावर आहोत का ? कि अजून ५० वर्षांनी मिपा वर सिझेरियन प्रसुतीवर लेख लिहिला गेला तर त्यात अशी वाक्य असतील का ? की, "बाळ बाळंतिणीला वाचवण्या साठी सोळाव्या शतका पासून सुरु झालेली पोट फाडून बाळ बाहेर काढण्याची पद्धत अगदी एकविसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत चालू होती. पण सिझेरियन प्रसूती कितीही संकटमोचक वाटत असली तरी ती अनैसर्गिक होती आणि म्हणून नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी खूप संशोधन होऊन सिझेरियन प्रसूती करावी लागण्याची जी काही कारणं होती त्यावर यशस्वीरित्या मात करण्यात आली आहे. आता मुहूर्त पाहून बाळाला या जगात आणणाऱ्या मातेची प्रसूती वगळता अन्य कोणाचीच सिझेरियन प्रसूती करण्याची वेळच येत नाही." थोडक्यात काय तर येत्या काळात या प्रकरणात अजून संशोधन होऊन हि प्रक्रिया अधिक सुकर होण्याची चिन्हे आहेत काय ?

हेमंतकुमार 13/04/2021 - 18:11
येत्या काळात या प्रकरणात अजून संशोधन होऊन हि प्रक्रिया अधिक सुकर होण्याची चिन्हे आहेत काय ? >>>
प्रामाणिकपणे सांगायचे तर वैद्यकाच्या या शाखेशी माझा फारसा संपर्क नाही आणि तितके वाचनही नाही. सवडीने तज्ञांशी काही बोलून उपयुक्त माहिती मिळाल्यास जरूर लिहीन. हा लेख मी इतिहासाचे स्मरणरंजन इतक्या पुरताच मर्यादित ठेवला आहे.

हेमंतकुमार 16/04/2021 - 16:19
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! वर वकील साहेब यांनी एक चांगला प्रश्न उपस्थित केला आहे:
भविष्यात कोणाचीच सिझेरियन प्रसूती करण्याची वेळच येणार नाही, हे शक्य आहे का ?
>> यासंदर्भात मानवी उत्क्रांतीशी संबंधित एक रोचक मुद्दा आहे. लाखो वर्षांपूर्वी जेव्हा चतुष्पाद प्राण्याचा माणूस होण्यास सुरुवात झाली तेव्हा शरीर रचनेत दोन महत्त्वाचे बदल झाले : १. चतुष्पाद ते द्विपाद अवस्था. २. मेंदूचा मोठा आकार . त्यामुळे गरोदरपणात स्त्रीचा जननमार्ग आणि बालकाचे डोके हे एकमेकात अगदी घट्ट बसू लागले. या कारणास्तव योनिमार्गे नैसर्गिक जन्म होताना देखील बाळाला पुढे सरकत असताना गोल वळावे लागते ( रोटेशन). निसर्गानुसार काही टक्के स्त्रियांत कायमच जननमार्गातील जागा आणि बाळाचे डोके यांचे प्रमाण ‘मिसफिट’ राहणार. या मूलभूत जीवशास्त्रीय कारणाने असे जन्म हे शल्यक्रियेद्वारे करावे लागतात.

नेहमीप्रमाणे मुद्देसूद आणि रंजक. धन्यवाद. एका नर्सने असे सांगितले की. सिझेरिअन करण्यापूर्वी कण्यात टोचून भूल देतात. त्यामुळे भविष्यात लंब्रायटीस होण्याची शक्यता असते. हे खरे कां?

हेमंतकुमार 20/04/2021 - 08:38
धन्यवाद. पाठदुखीचा मुद्दा. बहुतेक रुग्णांच्या बाबतीत प्रसूतीनंतर आठवडाभरात ती थांबते. ज्यांची थांबत नाही त्यांच्या बाबतीतली कारणे तशी अस्पष्ट आहेत. त्यामध्ये स्थूलपणा ( BMI > ३२) हे एक कारण आहे. प्रत्यक्ष भूल देण्याच्या तंत्रामुळे पाठदुखी मागे लागते का, हा तसा वादग्रस्त प्रश्न आहे. त्यावर सरसकट लागू होईल असे स्पष्ट उत्तर नाही.

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे 07/05/2021 - 19:52
प्रसूती आणि पाठदुखी ३३ % बायकांना प्रसूती नंतर पाठदुखी असल्याचे आणि ३७ % बायकांना सिझेरियन नंतर पाठदुखी असल्याचे आढळून आले आहे. या ४ % अतिरिक्त पाठदुखी पैकी २.२ % स्त्रियांना पाठीत इंजेक्शनने भूल दिली होती आणि १.८% याना नाका वाटे भूल दिली होती. म्हणजे पाठीत इंजेक्शन दिल्या मुळे सिझेरियन नंतर होणारी पाठदुखी हि नगण्य प्रमाणात जास्त आहे असे आढळून आले आहे. अनेक स्त्रियांना गरोदरपणात पाठदुखी असते. ज्या (३३ टक्के) स्त्रियांना प्रसूती नंतर ६ महिने पेक्षा जास्त काळ पाठदुखी होते त्याची बरीच कारणे आढळून आली. त्यात लठ्ठपणा, प्रसूतीनंतर व्यायामाचा अभाव, यात ४० दिवस खाटेवरून न उठणे (उत्तर भारतात हे मोठ्या प्रमाणात दिसते) चुकीच्या तर्हेने स्तनपान करवणे ( बाळाला हातावर घेण्याऐवजी पुढे वाकून स्तनपान देणे) अशी अनेक कारणे आढळून आली. याशिवाय निम्न आर्थिक गटात अतिश्रमाची कामे आणि एका पेक्षा जास्त प्रसूती हि कारणे आढळून आली. प्रसूतीनंतर २ वर्षे झाल्यानंतर असलेल्या पाठदुखीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रसूती मध्ये वाढलेले वजन कमी न होणे हे आढळले आहे. प्रसूती नंतर सुरवातीला सर्वच स्त्रियांना अशक्तपणा जाणवतो. परंतु बहुसंख्य स्त्रियांचा अशक्तपणा हा सात ते दहा दिवसात बराच कमी होतो. परंतु बाळंतपण आहे म्हणजे विश्रांती घेणे हा आपला हक्क( ENTITLEMENT) आहे असे स्त्रियांच्या मनावर बिम्बवले जाते. त्यातून मुलगी पहिल्या बाळंतपणात माहेरी आली कि तिच्यावर आपले प्रेम दाखवणे म्हणजे तिला इकडची काडी तिकडे करू न देणे किंवा सासरी काम करायचेच आहे म्हणून आता विश्रांती दिलीच पाहिजे या मनोवृत्ती मुळे स्त्रिया अजिबात व्यायाम करत नाहीत. यामुळे गरोदरपणात ढिले पडलेले स्नायू परत मूळ पदावर यायला अधिकच वेळ लागतो. त्यातून बाळंतिणीला दिलेले सकस अन्न यामुळे वजन आणि पोटावर चरबी वाढत जाते( जी नंतर फारच क्वचित उतरते). आपण बाळंतिणीला विश्रांती जरूर द्या परंतु शरीर ढिले पडणार नाही इतका व्यायाम/ योगाभ्यास स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने जरूर करा. प्रसूती आणि बाळाचा जन्म हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचं टप्पा असतो त्यामुळे त्यावेळेस झालेला कोणताही प्रसंग हा आयुष्यभर लक्षात राहतो यामुळे यानंतर होणाऱ्या पाठदुखीसाठी कारण हे एकतर प्रसूती किंवा पाठीत इंजेक्शन दिल्यामुळे असेच स्त्रियांना लक्षात राहते.

In reply to by हेमंतकुमार

गामा पैलवान 07/05/2021 - 02:14
कुमारेक, दुवा तुटला आहे. कृपया ईपेपर चे दुवे शक्यतो टाळावेत. ते बेभरवशाचे असतात व सहसा ठीक चालंत नाहीत. गुग्गुळाचार्यांच्या मदतीने डॉक्टर बेलखोडे यावर शोध घेतला. तेव्हा हा दुवा सापडला : https://www.esakal.com/saptarang/team-sfa-writes-about-life-saving-pregnant-women हाच का तो? आ.न., -गा.पै.

टर्मीनेटर 07/07/2021 - 14:32
मध्यंतरीच्या काळात वाचायचा राहून गेलेला हा एक मस्त लेख! माहिती खूपच रोचक आहे. अवांतर : मागे एक हिंदीत डब केलेला दाक्षिणात्य सिनेमा पहिला होता. त्यात नव्याने लग्न झालेले एक जोडपे आपले होणारे अपत्य अतिशय हुशार आणि सर्वगुणसंपन्न असावे म्हणुन प्रसूतीपर्यंतच्या सर्व गोष्टी ज्योतिष्याच्या सल्ल्याने करत असतात. अगदी अचूक मुहूर्तावर बाळ जन्माला यावे म्हणुन डॉक्टरशीही सेटिंग लावून ठरलेल्या वेळी सिझेरियन करुन प्रसूती होते. जन्माला आलेले बाळ अर्थातच अलौकिक असते आणि लहानपणापासूनच आई वडिलांच्या डोक्याला प्रचंड ताप देते 😀 नाव नाही आठवत पण सिनेमा मस्त होता... त्या साऊथवाल्यांच्या स्टोरीत असते त्याप्रमाणेच तुमच्या लेखाच्या विषयातही मस्त वैविध्य असते 🙏

हेमंतकुमार 28/12/2025 - 08:53
सिझेरियनविषयी मतमतांतरे नेहमीच व्यक्त होत असतात. त्याचे प्रमाण का वाढत आहे यामागील तथ्याचा शोध घेणारा सिझेरियनचा चक्रव्यूह हा डॉ. विवेक शेठ यांचा लेख आजच्या ( २८/१२) दैनिक मटा विशेष विभागात वाचता येईल.
गर्भारपण, बाळंतपण आणि अपत्यजन्म हे मानवी पुनरुत्पादनातले महत्त्वाचे टप्पे. निसर्गक्रमानुसार गरोदरपणाचे विशिष्ट दिवस भरले की गर्भाशय आकुंचन पावू लागते. यालाच आपण ‘कळा’ म्हणतो. त्यांची गती वाढत वाढत अखेरीस योनिमार्गे प्रसूती होते. परंतु हे नैसर्गिक भाग्य सर्वांनाच लाभत नाही. काही ना काही कारणाने जेव्हा नैसर्गिक प्रसुतीत अडथळे येतात तेव्हा पर्यायी मार्ग वापरावे लागतात. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे सिझेरिअन सेक्शन. यात गर्भवतीचे पोट प्रत्यक्ष फाडून व गर्भाशयात छेद घेऊन बाळास बाहेर काढले जाते. वैद्यकातील संशोधन व प्रगतीनुसार ही शल्यक्रिया आता सहज आणि झटपट केली जाते.

कोविड- अनुभव वगैरे..

पाटिल ·

चौकटराजा 12/04/2021 - 13:14
लेखाचा प्रत्येक शब्द खोल शिरणारा आहे ! याला म्हणतात माहिती देणे ! खरोखरीच धन्यवाद ! नियती ना करो पण वेळआलीच तर एखाद्या मिपाकरांचा रुगणालयातील अनुभव वाचायला आवडेल तो अधिक प्रबोधक असेल !

हे वाचून मनापासून आनंद झाला .... करोना हा विचित्र आजार आहे, माझी सौ. आई वाचली, पण माझ्याच वयाचा मित्र, देवाघरी गेला. घरीच रहा, सुरक्षित रहा...

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा 13/04/2021 - 11:13
काही जणाचे म्हणणे हा एक फ्लू चा प्रकार आहे बाकी काही नाही ! पण असे ठामपणे कसे कोणी म्हणू शकतो ? जगात २८ लाख माणसे मेली आहेत ते काय फ्लू होऊन ? पण समजा जरी हा एक फ्लू आहे असे क्षणभर धरले तरी त्याची वर्तणूक प्रत्येक देहात वेगवेगळी आहे ! प्रतीकार शक्ती व व्हायराल डोस हे जितके एकमेकापासून दूर तितका रोगाचा भयानक परिणाम अधिक पण या दोन्ही गोष्टी मोजण्याचे यंत्र नाही . परिणामा वरूनच त्याचा फक्त अंदाज बांधत बांधत ट्रीटमेंट चे प्रयोग करीत बसावे लागते .डोंबिवली इथे राहणारे एक परिचिताचा भाऊ १७ रेमडेसिवीर घेतल्यावर देखील व्हेंटिलेटर वर आहे !

In reply to by चौकटराजा

मराठी_माणूस 13/04/2021 - 14:01
एरवीची सामान्य परिस्थिती आणि आता ह्यात एक फरक आहे तो असा, या वेळेस सगळ्या गोष्टींची जागतीक पातळीवर नोंद ठेवली गेली आहे, एरवी कोण केंव्हा कशाने जातो हे माहीत होत नाही.

छान. अनुभवकथन प्रामाणिक असल्यामुळे, थेट भिडला. आपण ठीक झालात हे वाचून आनंद वाटला. बाकी, या करोनाचं निश्चित असं काहीच सांगू शकत नाही. -दिलीप बिरुटे

Bhakti 12/04/2021 - 16:50
वाह .. धीरोदात्त उदाहरण. सकाळपासून बातम्यांनी नकारात्मक उच्छाद मांडलाय (आता बातम्या पूर्णपणे बंद करते) हे वाचल्यावर बर वाटल.

चलत मुसाफिर 13/04/2021 - 10:04
अनुभवकथन प्रामाणिक आहे. सरकारी इस्पितळाला मारलेले टोमणे टाळता आले असते. कोविडचे संकट अतिशय बिकट व धोकादायक आहे. पण तरीही जोखीम घेऊन सर्व इस्पितळांचे कर्मचारी आपले कर्तव्य करत आहेत. असो. मला व पत्नीला डिसेंबरमध्ये कोविड होऊन गेला. आमचाही अनुभव जवळजवळ वरीलप्रमाणेच होता. फरक इतकाच की तापमापक आणि प्राणवायुमापक दोहोंचा वापर आम्ही नियमितपणे करत होतो. मला असह्य व सतत असा खोकला येत होता, इतका की वैतागून मी बोलणेच बंद करून टाकले. कफ सिरप वगळता कोणतेही औषध मी घेतले नाही. पत्नीने काही वेळा वेदनाशामक व तापहारक गोळ्या घेतल्या. 14 दिवसांच्या गृह विलगीकरणानंतर सुदैवाने सर्व लक्षणे कमी कमी होत नाहीशी झाली.

चौकटराजा 12/04/2021 - 13:14
लेखाचा प्रत्येक शब्द खोल शिरणारा आहे ! याला म्हणतात माहिती देणे ! खरोखरीच धन्यवाद ! नियती ना करो पण वेळआलीच तर एखाद्या मिपाकरांचा रुगणालयातील अनुभव वाचायला आवडेल तो अधिक प्रबोधक असेल !

हे वाचून मनापासून आनंद झाला .... करोना हा विचित्र आजार आहे, माझी सौ. आई वाचली, पण माझ्याच वयाचा मित्र, देवाघरी गेला. घरीच रहा, सुरक्षित रहा...

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा 13/04/2021 - 11:13
काही जणाचे म्हणणे हा एक फ्लू चा प्रकार आहे बाकी काही नाही ! पण असे ठामपणे कसे कोणी म्हणू शकतो ? जगात २८ लाख माणसे मेली आहेत ते काय फ्लू होऊन ? पण समजा जरी हा एक फ्लू आहे असे क्षणभर धरले तरी त्याची वर्तणूक प्रत्येक देहात वेगवेगळी आहे ! प्रतीकार शक्ती व व्हायराल डोस हे जितके एकमेकापासून दूर तितका रोगाचा भयानक परिणाम अधिक पण या दोन्ही गोष्टी मोजण्याचे यंत्र नाही . परिणामा वरूनच त्याचा फक्त अंदाज बांधत बांधत ट्रीटमेंट चे प्रयोग करीत बसावे लागते .डोंबिवली इथे राहणारे एक परिचिताचा भाऊ १७ रेमडेसिवीर घेतल्यावर देखील व्हेंटिलेटर वर आहे !

In reply to by चौकटराजा

मराठी_माणूस 13/04/2021 - 14:01
एरवीची सामान्य परिस्थिती आणि आता ह्यात एक फरक आहे तो असा, या वेळेस सगळ्या गोष्टींची जागतीक पातळीवर नोंद ठेवली गेली आहे, एरवी कोण केंव्हा कशाने जातो हे माहीत होत नाही.

छान. अनुभवकथन प्रामाणिक असल्यामुळे, थेट भिडला. आपण ठीक झालात हे वाचून आनंद वाटला. बाकी, या करोनाचं निश्चित असं काहीच सांगू शकत नाही. -दिलीप बिरुटे

Bhakti 12/04/2021 - 16:50
वाह .. धीरोदात्त उदाहरण. सकाळपासून बातम्यांनी नकारात्मक उच्छाद मांडलाय (आता बातम्या पूर्णपणे बंद करते) हे वाचल्यावर बर वाटल.

चलत मुसाफिर 13/04/2021 - 10:04
अनुभवकथन प्रामाणिक आहे. सरकारी इस्पितळाला मारलेले टोमणे टाळता आले असते. कोविडचे संकट अतिशय बिकट व धोकादायक आहे. पण तरीही जोखीम घेऊन सर्व इस्पितळांचे कर्मचारी आपले कर्तव्य करत आहेत. असो. मला व पत्नीला डिसेंबरमध्ये कोविड होऊन गेला. आमचाही अनुभव जवळजवळ वरीलप्रमाणेच होता. फरक इतकाच की तापमापक आणि प्राणवायुमापक दोहोंचा वापर आम्ही नियमितपणे करत होतो. मला असह्य व सतत असा खोकला येत होता, इतका की वैतागून मी बोलणेच बंद करून टाकले. कफ सिरप वगळता कोणतेही औषध मी घेतले नाही. पत्नीने काही वेळा वेदनाशामक व तापहारक गोळ्या घेतल्या. 14 दिवसांच्या गृह विलगीकरणानंतर सुदैवाने सर्व लक्षणे कमी कमी होत नाहीशी झाली.
माझा ताजा ताजा अनुभव शेअर करतो. मी एका कोविड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो‌ त्यामुळे मला महानगरपालिकेकडून कंपलसरी टेस्ट करून घेण्याचा सल्ला मिळाला. काहीही लक्षणं नव्हती तरीही सल्ल्यानुसार प्रीकॉशन म्हणून, २५ मार्चला मी महानगरपालिकेच्या कोविड टेस्टींग सेंटरला जाऊन पोचलो. तिथली गर्दी, आणि कशाचा कशाला संबंध नसलेली व्यवस्था बघून मला अजिबात धक्का बसला नाही.

आवाज बंद सोसायटी - भाग २

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 12/04/2021 - 18:03
अत्यंत श्रवणीय संगीतातही काही वेळ शांततेची असते म्हणूनच त्या शांततेचे महत्व अधोरेखीत होते. पूर्वीपेक्षाही आता शांततेची आवश्यकता जास्त आहे
अगदी सहमत. छान लिहिले आहे !

चौथा कोनाडा 12/04/2021 - 18:03
अत्यंत श्रवणीय संगीतातही काही वेळ शांततेची असते म्हणूनच त्या शांततेचे महत्व अधोरेखीत होते. पूर्वीपेक्षाही आता शांततेची आवश्यकता जास्त आहे
अगदी सहमत. छान लिहिले आहे !
याआधीचा भाग १: http://www.misalpav.com/node/48651 ::: आवाज बंद सोसायटी - भाग १ आवाज बंद सोसायटी - भाग १ विषय प्रवेश आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक प्रकारच्या ताण तणावांना सामोरे जात असतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंबहूना झोपलेल्या अवस्थेत आपले मन अर्धवट जागे राहून अनेक प्रकारचे तणाव झेलत असते. जीवनात समस्या काही वैयक्तिक खाजगी तर काही सामाजीक असतात. अनेक संस्थांनी केलेल्या पाहणीत जागतीक समस्यांच्या यादीत वातावरणातील बदल तसेच त्यात होणारे प्रदूषण वरच्या स्थानी आहे.

आवाज बंद सोसायटी

पाषाणभेद ·

आमच्या सोसायटीत, गोंदवलेकर महाराजांच्या भक्तांनी, ध्वनि प्रदूषणाचा उच्छाद मांडला आहे... सध्या लाॅकडाऊन आहे, तरीही भक्तजण झांजा कुटणे सोडत नाहीत... एरवी तर नुसता धुडगूस असतो...

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी 10/04/2021 - 20:09
जरा आश्चर्य वाटले. श्री गोंदवलेकर महाराजांच्या भक्तमंडळांचा भर शांतपणे नामस्मरण करण्यावर आहे. टाळा कुटणे ह जरा आश्चर्यकारक आहे.

चौकटराजा 10/04/2021 - 20:23
एक मित्रत्वाचा सल्ला- या भक्त मंडळींना , तबला कुटणाऱ्या संगीत क्लासेस मालकांना थेट टीका करत अप्रोच होऊ नका ! हल्ली कुणाच्या ही भावना पटापट दुखतात मग माफी मागा असा घोष सुरू होतो . सबब फारच त्रास होत असेल तर ध्वनी विषयक कायद्याचा सल्ला घ्या ! त्याचा संदर्भ देऊन सोसायटीकडे या कायद्याचे पालन आपण करू असा ठराव टाका . कोणत्याही प्रचलित कायद्याविरुद्ध सोसायटीत ९९ टक्के मतदानानेही ठराव पास करता येत नाही .याची जाणीव व्यवस्थापन कमिटीला लेखी द्या कारण बर्याच वेळा अशा गोष्टीमागे कमिटीतील लोकांचाच वरदहस्त असतो .

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा 10/04/2021 - 21:15
भक्त मंडळी मुळे ईश्वर कधी बदनाम होत नाही . पन्थ होतो. ईश्वर फार मोठा आहे तो आजवर कोणत्याही परम भक्ताला देखील घावलेला नाही !! अणुरणिया थोकडा व आकाशाहून ही मोठा .माणसाच्या कवेत सापडत नाही वा चिमटीत पकडता येत नाही !!

In reply to by चौकटराजा

रामनगर येथील, रामाच्या मंदिरात, ध्वनि प्रदूषण करणारी मंडळी जात होती... बदनामी झाली आणि आता मंदिर शांत झाले... फायदा समाजाला झाला.

चौकस२१२ 10/04/2021 - 20:44
घरोघरी मातिच्या चुली ... तुम्हाला महाराजांच्या शिष्यांचा त्रास इथे रविवारी "प्रभूचे गुणगान " मंडळी समोर असतात.. हालेलूया .. करीत ...वैताग येतो आंणि बुधवारी प्रभू प्रेमी मंडळींचे "कम्युनिटी किचन " तिथे फुकट किराणा माल वाटतात , त्याच दिवशी सकाळी आठवड्याचा कचरा घायला नागपालिकेची गाडी येते आणि बाहेर आपले कचऱ्याचे डबे ठेवलेले असतात तिथेच हे फुकटे आपली गाड्या लावतात ... त्यामुळे ट्रक , कचऱ्याचा डबा उचलू शकत नाही .. तक्रार केली तर कम्युनिटी किचन वाले म्हणतातात ती आमची जबाबदारी नाही ...शेवटी फुकट्यांना जाऊन सगळ्यांसमोर सांगितले .. पुढल्या बुधवारी कचरा डबा नेचर स्ट्रीप वर ना ठेवता रस्त्यावर ठेवावा काय .. कि फ्रांस मध्ये जसे वैतागले शेतकरी शेणाचा ट्रक संसदे पुढे नेऊन उपडा करतात तसे "प्रभूच्या द्वारी " करावे ?

In reply to by चौकस२१२

सगळी प्रार्थना स्थळे बंद करावीत धर्म घरात आणि कायद्याचे राज्य बाहेर गणपती उत्सव, गुढीपाडव्याची मिरवणूक (ही घातक प्रथा, डोंबिवलीकरांनी सुरू केली) नवरात्र, काही विचारू नका ह्या पृथ्वीतलावर जगण्यासाठी सगळ्यात नालायक प्राणी म्हणजे, माणूस... असेच वाटायला लागले आहे...

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा 10/04/2021 - 21:11
ते अल्प भू धारक वगरे सोडा . इटली त काहीशी गुन्हेगारी आहे पण एरवी देश शान्त. येता का म्हातारपणी फ्लोरेन्स ला रहायला ...? तिथे भारतीय पर्यटक खूप येतात ! चर्च वर भोंगे , मग आपले प्रति लाउड स्पीकर असे तिथे काहीही नाही . मात्र खायचे लै वांधे असतात , तिथे लोक कायम पीत असतात ! नो भावना दुखविणे नो प्रतिहल्ले! भारतीयाना मस्त जेवण देण्याचा जाईन्ट काढू !!!

In reply to by चौकटराजा

ऑस्ट्रेलिया बाबतीत पण असेच ऐकून आहे ... भारतीयाना मस्त जेवण देण्याचा जाईन्ट काढू !! कल्पना उत्तम आहे .... प्रभाकर पेठकरांना किचन देऊ, तुम्ही गल्ल्यावर, मी वेटर म्हणून काम करीन... टिप घेतली नाही तर, गिर्हाइकांना पण आनंद... शांततेची किंमत, असे म्हणून टिप स्वीकारायची नाही ...

In reply to by Rajesh188

आपण आलात? तुमचीच वाट बघत होतो... त्या आपल्या प्रश्र्नांची उत्तरे कधी देणार आहात? तुम्ही थापा मारता हे वाचलेले आहेच, आता पळपुटे पणा तरी करू नका ...

In reply to by मुक्त विहारि

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

कंजूस 11/04/2021 - 06:31
यासाठी अंतिम निर्णय रेजिस्ट्रार- उपनिबंधक ( सहकारी संस्था) यांचेकडे असतो. वकील किंवा पोलीसांकडे जाऊ नये. फक्त गुन्हा फौजदारी स्वरुपाचा असल्यास पोलीस ताबडतोप हस्तक्षेप करतात. १) चेअरमन/सेक्रीटरी अमुक अमुक सोसायटी या नावे दोन ओळींची तक्रार आणि कार्यवाही न झाल्यास मी उपनिबंधक यांचेकडे जाणार आहे एवढेच लिहावे. (तक्रार - नियमाप्रमाणे अमुक सभासद हा त्याची सदनिका फक्त रहिवासाकरिता वापरत नसून ***अशासाठी करत आहे.) २) नंतर रजिस्ट्रारला पत्र लिहून कमिटीला दिलेल्या पत्राची कॉपी जोडावी. ------- तुम्ही रेजिस्ट्रारच्या कार्यालयात गेलात आणि त्यांच्याशी बोललो एवढ्यावरही पळापळ सुरू होते. कारण यांचा दणका भारी असतो.

https://www.mpcb.gov.in/noise-pollution याठिकाणी ध्वनी प्रदूषण व इतर प्रदूषणांची माहिती आहे. मंडळाला अधिकार ही आहेत. ध्वनिप्रदुषणामुळे रक्तदाब, कर्ण बधिरता,डोकेदुखी इत्यांदिंना आमंत्रण तर मिळतेच पण मानसिक स्वास्थ्य बिघडून चिडचिड वाढते हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे. ठाण्याचे डॉ महेश बेडेकर ध्वनीप्रदूषण विरोधी प्रबोधनाचे काम करतात. हा त्यांचा विडिओ पहा https://youtu.be/2VcsBdvhPMs

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुरसंगम 11/04/2021 - 10:42
प्र.घा. या बेडेकरांनी आव्हाढच्या दहीहंडी उत्सवाचं सगळं रेकॉर्ड करून कोर्टात याचिका दाखल केली होती. काही शष्प फरक पडला नाही. कार्यक्रम चालूच आहे दरवर्षी.

In reply to by सुरसंगम

याचिकेमुळे ध्वनीप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीस गती मिळाली. एकदम फरक पडणार नाही. प्रथम प्रबोधन केले पाहिजे. ध्वनीप्रदूषणाला मिळालेले ग्लॅमर कमी होत गेले कि लोकांना शांततेचे महत्व लक्षात येउ लागेल. ही मोठी लांब प्रक्रिया आहे.

फायर ऑडिट असते तसे आता रहिवासी भागात नॉईज ऑडिट व्हायला पाहिजे. ध्वनीप्रदूषण हे केवळ प्रदूषण नसते. ती एक चक्क नशा असते. अंगात माझिया भिनलाय ढोलिया या काव्य पंक्तीत ही नशा व्यक्त केली आहे. समूह ढोलवादनात सामूहिक नशा मिळते. म्हणूनच एवढी मंडळे फोफावली आहेत. वैद्यकीय विषयातील तज्ञ या बद्दल अधिक सांगू शकतील

मदनबाण 11/04/2021 - 09:20
ध्वनी प्रदूषण हे अत्यंत तापदायक आहे. लॉक डाउन मध्ये मला चांगली शांतता अनुभवता आली हाच काय तो त्याचा मला झालेला विशेष फायदा. मुख्यत्वे या लॉक डाउनमुळे माझ्या घराच्या समोर एक चायनीज टेंम्पो लागतो तो काही दिवस बंद झालाय याचा फार म्हणजे फार आनंद झाला आहे. या चायनीज वाल्याचा मला लयं त्रास होतो. आधी त्याची लाल रंगाची लोखंडी गाडी होती, मध्येच कधी तरी पालिकेने येउन ती मोडली तर त्या पठ्ठ्याने अर्धा तासात एक मिनी टेंम्पो आणला आणि त्यात परत चायनीज बनवुन विकणे सुरु केले. रात्री बारा-साडेबारा पर्यंत त्याच्या कढईचा आवाज येतो,त्याचे चायनीज खाणार्‍याला लोहाची कमतरता भासणार नाही याची काळजी घेउन तो ती कढई ताकद लावुन त्यात चायनीज परतत असतो. मग कधी बेवडे,टल्ली झालेले लोक येउन त्याच्या गाडीवर राडा करतात्,आय-मायच्या शिव्या आणि फालतुची बोंबाबोंब होते. एकदातर दोन गटात हाणामारी होउन वास्तव टाईप डोक्यात दगड घालण्याचा प्रकार होता होता राहीला. याचा सगळा परिणाम माझ्या झोपेवर होतो कारण हा जवळपास रोजचाच ताप असतो. :( जाता जाता :- हल्लीच मी कुठल्या तरी शास्त्रज्ञाचा व्हिडियो पाहिला होता, तो वन्य प्राण्यांचे / किटकांचे आवाज रेकॉर्ड करतो. दर वर्षी हा त्याचा उपक्रम असतो आणि त्यांचा निष्कर्ष असे सांगतो की हे प्राण्यांचे / किटकांचे आवाज कमी होत चालले आहेत कारण त्यांची संख्या वेगाने कमी होत चालली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chupke Se... :- Saathiya

आमच्या सोसायटीत, गोंदवलेकर महाराजांच्या भक्तांनी, ध्वनि प्रदूषणाचा उच्छाद मांडला आहे... सध्या लाॅकडाऊन आहे, तरीही भक्तजण झांजा कुटणे सोडत नाहीत... एरवी तर नुसता धुडगूस असतो...

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी 10/04/2021 - 20:09
जरा आश्चर्य वाटले. श्री गोंदवलेकर महाराजांच्या भक्तमंडळांचा भर शांतपणे नामस्मरण करण्यावर आहे. टाळा कुटणे ह जरा आश्चर्यकारक आहे.

चौकटराजा 10/04/2021 - 20:23
एक मित्रत्वाचा सल्ला- या भक्त मंडळींना , तबला कुटणाऱ्या संगीत क्लासेस मालकांना थेट टीका करत अप्रोच होऊ नका ! हल्ली कुणाच्या ही भावना पटापट दुखतात मग माफी मागा असा घोष सुरू होतो . सबब फारच त्रास होत असेल तर ध्वनी विषयक कायद्याचा सल्ला घ्या ! त्याचा संदर्भ देऊन सोसायटीकडे या कायद्याचे पालन आपण करू असा ठराव टाका . कोणत्याही प्रचलित कायद्याविरुद्ध सोसायटीत ९९ टक्के मतदानानेही ठराव पास करता येत नाही .याची जाणीव व्यवस्थापन कमिटीला लेखी द्या कारण बर्याच वेळा अशा गोष्टीमागे कमिटीतील लोकांचाच वरदहस्त असतो .

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा 10/04/2021 - 21:15
भक्त मंडळी मुळे ईश्वर कधी बदनाम होत नाही . पन्थ होतो. ईश्वर फार मोठा आहे तो आजवर कोणत्याही परम भक्ताला देखील घावलेला नाही !! अणुरणिया थोकडा व आकाशाहून ही मोठा .माणसाच्या कवेत सापडत नाही वा चिमटीत पकडता येत नाही !!

In reply to by चौकटराजा

रामनगर येथील, रामाच्या मंदिरात, ध्वनि प्रदूषण करणारी मंडळी जात होती... बदनामी झाली आणि आता मंदिर शांत झाले... फायदा समाजाला झाला.

चौकस२१२ 10/04/2021 - 20:44
घरोघरी मातिच्या चुली ... तुम्हाला महाराजांच्या शिष्यांचा त्रास इथे रविवारी "प्रभूचे गुणगान " मंडळी समोर असतात.. हालेलूया .. करीत ...वैताग येतो आंणि बुधवारी प्रभू प्रेमी मंडळींचे "कम्युनिटी किचन " तिथे फुकट किराणा माल वाटतात , त्याच दिवशी सकाळी आठवड्याचा कचरा घायला नागपालिकेची गाडी येते आणि बाहेर आपले कचऱ्याचे डबे ठेवलेले असतात तिथेच हे फुकटे आपली गाड्या लावतात ... त्यामुळे ट्रक , कचऱ्याचा डबा उचलू शकत नाही .. तक्रार केली तर कम्युनिटी किचन वाले म्हणतातात ती आमची जबाबदारी नाही ...शेवटी फुकट्यांना जाऊन सगळ्यांसमोर सांगितले .. पुढल्या बुधवारी कचरा डबा नेचर स्ट्रीप वर ना ठेवता रस्त्यावर ठेवावा काय .. कि फ्रांस मध्ये जसे वैतागले शेतकरी शेणाचा ट्रक संसदे पुढे नेऊन उपडा करतात तसे "प्रभूच्या द्वारी " करावे ?

In reply to by चौकस२१२

सगळी प्रार्थना स्थळे बंद करावीत धर्म घरात आणि कायद्याचे राज्य बाहेर गणपती उत्सव, गुढीपाडव्याची मिरवणूक (ही घातक प्रथा, डोंबिवलीकरांनी सुरू केली) नवरात्र, काही विचारू नका ह्या पृथ्वीतलावर जगण्यासाठी सगळ्यात नालायक प्राणी म्हणजे, माणूस... असेच वाटायला लागले आहे...

In reply to by मुक्त विहारि

चौकटराजा 10/04/2021 - 21:11
ते अल्प भू धारक वगरे सोडा . इटली त काहीशी गुन्हेगारी आहे पण एरवी देश शान्त. येता का म्हातारपणी फ्लोरेन्स ला रहायला ...? तिथे भारतीय पर्यटक खूप येतात ! चर्च वर भोंगे , मग आपले प्रति लाउड स्पीकर असे तिथे काहीही नाही . मात्र खायचे लै वांधे असतात , तिथे लोक कायम पीत असतात ! नो भावना दुखविणे नो प्रतिहल्ले! भारतीयाना मस्त जेवण देण्याचा जाईन्ट काढू !!!

In reply to by चौकटराजा

ऑस्ट्रेलिया बाबतीत पण असेच ऐकून आहे ... भारतीयाना मस्त जेवण देण्याचा जाईन्ट काढू !! कल्पना उत्तम आहे .... प्रभाकर पेठकरांना किचन देऊ, तुम्ही गल्ल्यावर, मी वेटर म्हणून काम करीन... टिप घेतली नाही तर, गिर्हाइकांना पण आनंद... शांततेची किंमत, असे म्हणून टिप स्वीकारायची नाही ...

In reply to by Rajesh188

आपण आलात? तुमचीच वाट बघत होतो... त्या आपल्या प्रश्र्नांची उत्तरे कधी देणार आहात? तुम्ही थापा मारता हे वाचलेले आहेच, आता पळपुटे पणा तरी करू नका ...

In reply to by मुक्त विहारि

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

कंजूस 11/04/2021 - 06:31
यासाठी अंतिम निर्णय रेजिस्ट्रार- उपनिबंधक ( सहकारी संस्था) यांचेकडे असतो. वकील किंवा पोलीसांकडे जाऊ नये. फक्त गुन्हा फौजदारी स्वरुपाचा असल्यास पोलीस ताबडतोप हस्तक्षेप करतात. १) चेअरमन/सेक्रीटरी अमुक अमुक सोसायटी या नावे दोन ओळींची तक्रार आणि कार्यवाही न झाल्यास मी उपनिबंधक यांचेकडे जाणार आहे एवढेच लिहावे. (तक्रार - नियमाप्रमाणे अमुक सभासद हा त्याची सदनिका फक्त रहिवासाकरिता वापरत नसून ***अशासाठी करत आहे.) २) नंतर रजिस्ट्रारला पत्र लिहून कमिटीला दिलेल्या पत्राची कॉपी जोडावी. ------- तुम्ही रेजिस्ट्रारच्या कार्यालयात गेलात आणि त्यांच्याशी बोललो एवढ्यावरही पळापळ सुरू होते. कारण यांचा दणका भारी असतो.

https://www.mpcb.gov.in/noise-pollution याठिकाणी ध्वनी प्रदूषण व इतर प्रदूषणांची माहिती आहे. मंडळाला अधिकार ही आहेत. ध्वनिप्रदुषणामुळे रक्तदाब, कर्ण बधिरता,डोकेदुखी इत्यांदिंना आमंत्रण तर मिळतेच पण मानसिक स्वास्थ्य बिघडून चिडचिड वाढते हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे. ठाण्याचे डॉ महेश बेडेकर ध्वनीप्रदूषण विरोधी प्रबोधनाचे काम करतात. हा त्यांचा विडिओ पहा https://youtu.be/2VcsBdvhPMs

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुरसंगम 11/04/2021 - 10:42
प्र.घा. या बेडेकरांनी आव्हाढच्या दहीहंडी उत्सवाचं सगळं रेकॉर्ड करून कोर्टात याचिका दाखल केली होती. काही शष्प फरक पडला नाही. कार्यक्रम चालूच आहे दरवर्षी.

In reply to by सुरसंगम

याचिकेमुळे ध्वनीप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीस गती मिळाली. एकदम फरक पडणार नाही. प्रथम प्रबोधन केले पाहिजे. ध्वनीप्रदूषणाला मिळालेले ग्लॅमर कमी होत गेले कि लोकांना शांततेचे महत्व लक्षात येउ लागेल. ही मोठी लांब प्रक्रिया आहे.

फायर ऑडिट असते तसे आता रहिवासी भागात नॉईज ऑडिट व्हायला पाहिजे. ध्वनीप्रदूषण हे केवळ प्रदूषण नसते. ती एक चक्क नशा असते. अंगात माझिया भिनलाय ढोलिया या काव्य पंक्तीत ही नशा व्यक्त केली आहे. समूह ढोलवादनात सामूहिक नशा मिळते. म्हणूनच एवढी मंडळे फोफावली आहेत. वैद्यकीय विषयातील तज्ञ या बद्दल अधिक सांगू शकतील

मदनबाण 11/04/2021 - 09:20
ध्वनी प्रदूषण हे अत्यंत तापदायक आहे. लॉक डाउन मध्ये मला चांगली शांतता अनुभवता आली हाच काय तो त्याचा मला झालेला विशेष फायदा. मुख्यत्वे या लॉक डाउनमुळे माझ्या घराच्या समोर एक चायनीज टेंम्पो लागतो तो काही दिवस बंद झालाय याचा फार म्हणजे फार आनंद झाला आहे. या चायनीज वाल्याचा मला लयं त्रास होतो. आधी त्याची लाल रंगाची लोखंडी गाडी होती, मध्येच कधी तरी पालिकेने येउन ती मोडली तर त्या पठ्ठ्याने अर्धा तासात एक मिनी टेंम्पो आणला आणि त्यात परत चायनीज बनवुन विकणे सुरु केले. रात्री बारा-साडेबारा पर्यंत त्याच्या कढईचा आवाज येतो,त्याचे चायनीज खाणार्‍याला लोहाची कमतरता भासणार नाही याची काळजी घेउन तो ती कढई ताकद लावुन त्यात चायनीज परतत असतो. मग कधी बेवडे,टल्ली झालेले लोक येउन त्याच्या गाडीवर राडा करतात्,आय-मायच्या शिव्या आणि फालतुची बोंबाबोंब होते. एकदातर दोन गटात हाणामारी होउन वास्तव टाईप डोक्यात दगड घालण्याचा प्रकार होता होता राहीला. याचा सगळा परिणाम माझ्या झोपेवर होतो कारण हा जवळपास रोजचाच ताप असतो. :( जाता जाता :- हल्लीच मी कुठल्या तरी शास्त्रज्ञाचा व्हिडियो पाहिला होता, तो वन्य प्राण्यांचे / किटकांचे आवाज रेकॉर्ड करतो. दर वर्षी हा त्याचा उपक्रम असतो आणि त्यांचा निष्कर्ष असे सांगतो की हे प्राण्यांचे / किटकांचे आवाज कमी होत चालले आहेत कारण त्यांची संख्या वेगाने कमी होत चालली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chupke Se... :- Saathiya
लेख वाचण्याआधी खाली दिलेली विडीओक्ल्पीप क्रृपया प्रथम 'ऐका'. ध्वनी प्रदूषण तर मंडळी, असले आवाज ऐकून माझी देखील अवस्था तुमच्या सारखीच झालेली असते. माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतो. एकदा आमच्या कॉलनीत, माझ्या घरासमोरच एका जणाने एक घर भाड्याने घेवून तेथे गायन क्लास सुरू केला. गायन, वादन, संगीत आदी कलांबद्दल मला आकस नाही. उलटपक्षी, मी अनेक गाणी, पोवाडे, लावण्या इत्यादी लिहील्या आहेत. पण समोरच्या त्या गायन आणि वाद्यांच्या वादनाचा जाणवण्याइतपत त्रास होऊ लागला होता.

कोविड अनुभव

MipaPremiYogesh ·

चौकटराजा 29/03/2021 - 21:09
बेफिकीर लोकाना हे कळत नाही की मी माझे आई वडील बायको कधीतरी या आजाराने ग्रासणार आहोत. म्र्युत्यूचा दर जरी कमी असला तरी बरे होणे हे ६५ चे वरचे रुग्णास पुरेसे नसते. यासाठी पाच सहा महिने दोन्ही व्रुद्धाना सनिटयझर ,मास्क यान्चे बन्धन चालूच ठेवा! आमच्या समोर दोन पेशंट होते त्याना मदत केली याचे समाधान आहे ! खाली एक पेशंट होती पण तिने मदत बिदत काही लागणार नाही असे सांगितले ! सगळ्याची टेस्ट करावी हा थ्री टी मधील प्रोटोकॉल च आहे ! त्याला इलाज नाही. एकूण किती खर्च व कसकसा आला ते ही लिहा कारण तितके पैसे राखून ठेवता येतील.

In reply to by चौकटराजा

टवाळ कार्टा 30/03/2021 - 12:47
त्याहून जास्त काळजीचे कारण म्हणजे आरोग्यसेवेवर पडणारा ताण....हॉस्पिटलमध्ये बेड नसतील तर काय करणार? आणि इथे मिपावर लोक बोंबा मारत आहेत कि करोना वगैरे सगळे थोतांड आहे

In reply to by चौकटराजा

MipaPremiYogesh 01/04/2021 - 21:39
चौरा जी - खर्च साधारण पणे खालील प्रमाणे Rt-cpr - 980 X ray - 350 Ct scan ~ 2500 Blood reports ~ 1500 te 2000 Medicines ~ 5000 Dr consultation ~ 500 Food (tiffin) ~ 3000 Fruits etc. ~ 1000 In case of hospitalization ~ 70000 to 90000 (depend upon hospital and treatment)

चौथा कोनाडा 30/03/2021 - 12:56
दोन्ही बाबा आणि आपण सर्व ह्या परिस्थिति मधून बाहेर पडलात हे खुपच चांगले झाले ! देवाची कृपा. निरिक्षणे आणि संपर्काक दिले हे उत्तम केले, उपयोगी पडतील. अनुभव सामायिक केल्याबद्दल धन्यवाद !

काळजी घ्या अजून थोडे दिवस. तुम्ही माहिती आणि सगळे फोन नं. दिलेत त्याबद्दल धन्यवाद. पॅनिक व्हायचं नाही म्हटलं तरी वेळ येईल तेव्हा शांत राहता येईल का हा खरा मला पडलेला प्रश्न आहे. परत सांगते काळजी घ्या

रंगीला रतन 30/03/2021 - 15:42
अनुभवकथन आवडले. डॉक्टर वर पूर्ण विश्वास ठेवावा. हे महत्वाचे, नाहीतर काही लोकं कंपाउंडर वर जास्त विश्वास ठेवतात :) काळजी घ्या. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.

In reply to by रंगीला रतन

स्वतःवर आजारपण ओढवले की, डाॅक्टरच गाठतात.. असेच एकजण, मातृभाषा प्रेमी होते, अगदी कट्टर, पण नंतर मात्र घरच्या मंडळींना, इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले....

MipaPremiYogesh 01/04/2021 - 21:40
धन्यवाद सगळ्यांना. कोणाला काहीही मदत किंवा माहिती हवी असल्यास, व्य नि करावा.

चौकटराजा 29/03/2021 - 21:09
बेफिकीर लोकाना हे कळत नाही की मी माझे आई वडील बायको कधीतरी या आजाराने ग्रासणार आहोत. म्र्युत्यूचा दर जरी कमी असला तरी बरे होणे हे ६५ चे वरचे रुग्णास पुरेसे नसते. यासाठी पाच सहा महिने दोन्ही व्रुद्धाना सनिटयझर ,मास्क यान्चे बन्धन चालूच ठेवा! आमच्या समोर दोन पेशंट होते त्याना मदत केली याचे समाधान आहे ! खाली एक पेशंट होती पण तिने मदत बिदत काही लागणार नाही असे सांगितले ! सगळ्याची टेस्ट करावी हा थ्री टी मधील प्रोटोकॉल च आहे ! त्याला इलाज नाही. एकूण किती खर्च व कसकसा आला ते ही लिहा कारण तितके पैसे राखून ठेवता येतील.

In reply to by चौकटराजा

टवाळ कार्टा 30/03/2021 - 12:47
त्याहून जास्त काळजीचे कारण म्हणजे आरोग्यसेवेवर पडणारा ताण....हॉस्पिटलमध्ये बेड नसतील तर काय करणार? आणि इथे मिपावर लोक बोंबा मारत आहेत कि करोना वगैरे सगळे थोतांड आहे

In reply to by चौकटराजा

MipaPremiYogesh 01/04/2021 - 21:39
चौरा जी - खर्च साधारण पणे खालील प्रमाणे Rt-cpr - 980 X ray - 350 Ct scan ~ 2500 Blood reports ~ 1500 te 2000 Medicines ~ 5000 Dr consultation ~ 500 Food (tiffin) ~ 3000 Fruits etc. ~ 1000 In case of hospitalization ~ 70000 to 90000 (depend upon hospital and treatment)

चौथा कोनाडा 30/03/2021 - 12:56
दोन्ही बाबा आणि आपण सर्व ह्या परिस्थिति मधून बाहेर पडलात हे खुपच चांगले झाले ! देवाची कृपा. निरिक्षणे आणि संपर्काक दिले हे उत्तम केले, उपयोगी पडतील. अनुभव सामायिक केल्याबद्दल धन्यवाद !

काळजी घ्या अजून थोडे दिवस. तुम्ही माहिती आणि सगळे फोन नं. दिलेत त्याबद्दल धन्यवाद. पॅनिक व्हायचं नाही म्हटलं तरी वेळ येईल तेव्हा शांत राहता येईल का हा खरा मला पडलेला प्रश्न आहे. परत सांगते काळजी घ्या

रंगीला रतन 30/03/2021 - 15:42
अनुभवकथन आवडले. डॉक्टर वर पूर्ण विश्वास ठेवावा. हे महत्वाचे, नाहीतर काही लोकं कंपाउंडर वर जास्त विश्वास ठेवतात :) काळजी घ्या. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.

In reply to by रंगीला रतन

स्वतःवर आजारपण ओढवले की, डाॅक्टरच गाठतात.. असेच एकजण, मातृभाषा प्रेमी होते, अगदी कट्टर, पण नंतर मात्र घरच्या मंडळींना, इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले....

MipaPremiYogesh 01/04/2021 - 21:40
धन्यवाद सगळ्यांना. कोणाला काहीही मदत किंवा माहिती हवी असल्यास, व्य नि करावा.
कोविड अनुभव तसे पहिले तर आता लोकांना नवीन नाहीये तरीही मी हे लिहिण्याचं कारण कि कोणाला थोडासा तरी फायदा होऊ शकेल. तारीख १२ मार्च , माझ्या मुलाचा वाढदिवस. पुरणपोळीचा प्लॅन चालू होता आणि फोन खणखणला कि तडक हॉस्पिटल मध्ये या. माझ्या सासर्यांना वेगळ्या कारणासाठी ऍडमिट केले होते तिकडून फोन होता. आम्ही ब्रेकफास्ट चा घास तसाच ठेवला आणि हॉस्पिटल ला गेलो. ICU मधले डॉ म्हणाले कि त्यांना covid डिटेक्ट झालाय आणि इकडून शिफ्ट करावे लागेल. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मेव्हणी आणि मेव्हण्याला फोन केला. ते पण आले. डॉ ची चर्चा केली ते म्हणाले आम्ही चौकशी करतो कुठे जागा मिळेल तशी.

करोनाची लस : एक थोतांड

गामा पैलवान ·

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?

चित्रगुप्त 01/03/2021 - 06:31
करोनाची लस मी घेणार नाही आहे. मागे एका लेखात (कोविडः एक इष्टापत्ती ?) लिहिल्याप्रमाणे आम्हा उभयतांना कोविडबाधा होऊन त्यातून आम्ही कोणताही औषधोपचार न करता पूर्ण बरे झालेलो आहोत. बाकी नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते फक्त आपल्याला ते ठाऊक नसल्याने आपल्याला उगाचच धास्ती वाटत रहाते याची मला स्वानुभवावरून खात्री पटलेली आहे.

In reply to by चित्रगुप्त

>>>>>>करोनाची लस मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे, असे म्हणनेच मोठं धाडस आहे. बाकी आपण औषध उपचार न घेताही बरे झालात असे समजणे म्हणजे करोनाच्या असण्यावर शंका उपस्थित करणे आहे. करोनाबद्दल आपल्या मनात इतकी भिती भरवल्या गेली की आज रात्री आठ वाजेच्या नंतर खिड़कीच्या फ़टीतून तुम्ही बाहेर जरी बघितलं तरी करोनाचे विषाणु आणि तुमची नजरा-नजर झाली असे समजून करोना तुमच्या डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करेल असे वाटायचे. डोळेच नव्हे तर, शरीराच्या कोणत्याही भागातून करोना आत प्रवेश करेल असे वाटायचे. इतकी ती दहशत होती. ( thanks टू मीडिया आणि सरकार) मला तर इतकी दहशत बसली की जग नष्ट होऊन फक्त झुरळच उरतील आणि मग ते जग कसे असेल असाही विचार मी करायचो. आता लस येईल, तेव्हा लस येईल म्हणून प्रेयसीची वाट पाहणा-या प्रियकरासारखे, किंवा बस थांब्यावर बसची वाट पाहतो तसे आतुर होतो. प्रयत्न सुरु होते आणि एकदाचे लशीचे वेगवेगळे व्हर्जन्स आले. कोणती लस द्यायची ते उपलब्ध साठ्यावर असेल असे सरकारने म्हटल्यापासून लशीबद्दलचा आत्मविश्वास जरा कमी झाला. तुमची लस नुसते पाणी आहे, अशी एका कंपनीची टिका दुस-या कंपनीवर होती. त्याच्या आठवणीने तर लशीची भानगड़ नको असेही वाटून गेले. आज सकाळीच जेव्हा मिपावर लशीच्या थोतांडावर लेख वाचला आणि खुप आनंद झाला. आता आनंद का झाला ते नेमकं सांगता येत नाही, पण झाला. पण आपण लस घेऊन टाकू. परिणाम होऊ की ना होऊ.....प्लासिबो इफेक्ट आता काही रिस्क नाही, असे मनाचे समाधान तरी होईल. बाकी, नशिबात जे आहे ते अगोदरच निश्चित झालेले असते,असे समजू आणि देव्हा-यातल्या देवासमोरची घंटी घेऊ, नसेल तर थाळी घेऊ, दिवाबत्ती करू करोना गो, करोना गो असे म्हणू, हाय काय आणि नाय काय...! -दिलीप बिरुटे

In reply to by उपयोजक

पण, इतक्यात घाई करू नका.... राजकीय नेते, थेट जनसंपर्क टाळू शकतात, आपण तसे करू शकत नाही... घरातून काम करत असाल तर, जनसंपर्क टाळणे, हा सर्वोत्तम उपाय आहे.

In reply to by चित्रगुप्त

चित्रगुप्त 10/03/2021 - 20:47
सध्या हितं आमेरिकेत आहोत गेले आठेक महिने. गप गुमान घरीच. किंवा फारतर येकट्याने मोकळ्यात फिरायला जाणे. कोणी कुणाकडे जात नाहिये वगैरे. आता जरा लोकांनी थोडंबहुत जाणं-येणं सुरु केलय म्हणून एक-दोघांना फोन केला आणि काही मराठी मंडळी फिरायला गेलेलो असताना भेटली - मग घरी या निवांत गप्पा करायला नवीन केलेली चित्रं बघायला वगैरे म्हणालो तर त्यांचा पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही व्ह्याक्शीण घेटलाय का ? अजून नाही म्हटल्यावर लौकरात लौकर घ्या म्हणून काढता पाय घेणे. आता काही काळानंतर भारतात परतायचे आहे तेंव्हाही व्ह्याक्शीण घेतले असल्याचे दाखवावे लागणार. म्हणजे आता घ्यावीच लागणार लस्सी.

In reply to by उपयोजक

काहींना मानस पुत्र, मानस कुटुंब किंवा मानस मुलगी असते.... तसेच आमचे हे मानस बाबा महाराज आहेत... दोन चार पेगांची आहुती चढवली की, ते आत्मिक प्रगट होतात.... डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने म्हणा किंवा आमची आराधना उत्तम असल्याने म्हणा, ते आमच्या आराधनेने कधी कधी प्रसन्न होतात... सध्या ते आम्हाला, आर्थिक षटरिपू ह्या विषयी प्रवचन देत आहेत... बाबा महाराज डोंबोलीकर, यांचे म्हणणे, जास्त मनावर घेऊ नये, ही विनंती.

लेखन आवडलं. लेखाबाबत आणि लशी बाबत अनेकांचे मतभेद होऊ शकतील, पण लेख पटणारा आहे. करोना प्रतिबंधक लस आयुष्यभर तुमचं संरक्षण करू शकणार नाही, हेही खरं आहे, पण काही काळासाठी प्रतिबंध नक्कीच होऊ शकेल असेही वाटते. -दिलीप बिरुटे (कन्फ्यूज) >>>>>आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली....... माझं या विषयावर आणि त्यांच्या काल कर्तुत्वावर काही दिवस मौन आहे, मुखपट्टीच लावली आहे असे समजा. -दिलीप बिरुटे (मुखपट्टीधारक)

कंजूस 01/03/2021 - 09:01
वैज्ञानिकच ठेवा म्हणतो. महाभारत त्यात आणू नका. तो एक वेगळाच करा. ---------------------- एक उदाहरण पाहा काविळीसाठी आयुर्वेदात - यकृत बिघडून पित्तरस अधिक किंवा उणे निर्माण झाल्याने होणारा रोग धरला आहे. त्रिकटू चूर्ण आणि एरंड पानांचा रस हे बरे करतात. हेच मॉडर्न मेडसन, संशोधनातून लिवरचे A,B,C, D प्रकार शोधून वेगवेगळ्या लशी केल्या. रोग होऊ नये म्हणून लस. रोग झाल्यावर फक्त बी कॉम्प्लेक्स. आयुर्वेद औषध अजूनही गुणकारी आहे!!

In reply to by कंजूस

गवि 01/03/2021 - 09:11
कारण व्हायरस ऊर्फ विषाणूची लागण एकदा झाली की थेट त्याच्यावर उपचार करुन मारणे अवघड़ पडते. Bacteria बाबत अँटीबायोटीक औषधे उपयोगी पडतात . व्हायरस मारण्याबाबत मर्यादा येतात. त्यावर केवळ बाह्य लक्षणे कमी करणारे उपायच मुख्यतः करता येतात.

चौकटराजा 01/03/2021 - 09:23
हे पुस्तक २०१३ साली लिहिलेले असल्याने २०२१ साली ते कालबाह्य झाले असण्याची शक्यता आहे ! अशक्त झालेला विषाणू शरीरात टोचल्याने प्रतिपिंडे निर्माण होऊन शरीर त्याच्या पेशीप्रवेशाला मारक अशी योजना करते असा दावा लस याबाबत आतापर्यंत करण्यात आला आहे ! आताची लस या तंत्रावर आधारित नाही अशी माझी माहिती आहे ! लस घेतल्याने प्रत्येकास भक्कम संरक्षण मिळालेच पाहिजे असा दावा निसर्गच मुळी करीत नसतो. यासाठीच तर ते शेवटचे वाक्य डॉक्टरांनी जपून ठेवलेले असते " बॉडी रिस्पॉन्स देत नाही औषधाना ! " आज देखील मला असे वाटते की नेहमीच रोग अनेकांना होत असतात ,अनेक माणसे काहीही औषध न घेता बरी होत असतात ते त्यांच्या नैसर्गिक प्रतिकार शक्तीने . पण हे सगळे अव्यक्त पातळीवर होत असल्यानं त्याचा तपशील ठेवता येत नाही ! ही केवळ तर्का ने जाणण्याची गोष्ट आहे ! तर्कट हे फायद्याचे ही ठरते वा अगदी उलट ! महाजनो गत: स: पंथः या नात्याने मी लस घेणार आहे ! लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल !

In reply to by चौकटराजा

आमचे बाबा महाराज डोंबोलीकर हेच म्हणतात ....सध्या शांत रहा, घरात पडीक रहा, सांसर्गिक रोग असल्याने, जन संपर्क टाळा.लशीचे बरेवाईट परिणाम दिसायला वेळ लागेल.

In reply to by चौकटराजा

गोंधळी 01/03/2021 - 09:52
लस न घेतल्याने मरण्यापेक्षा लस घेऊन मी मेलो तर मला त्या मरणाचा अभिमान असेल ज्याने हे सिद्ध होईल की लस घेतल्याने माणूस मरतो जगण्याऐवजी ! निदान त्याने लशीचा गोरखधंदा संपुष्टात तरी येईल ! चौ रा काका हे काही पटले नाही.

In reply to by गोंधळी

चौकटराजा 01/03/2021 - 10:36
कोणतेही औषध वा लस बाजारात येण्यापूर्वी त्याचे काही दुश्परिणाम माणसावर होतात की नाही हे पाहण्यासाठी काही स्वयंसेवक गरजेचे असतात ! ही लस बाजारात येण्यापूर्वी अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लसीची ७० टकके परिणामकारकता सिद्ध केली आहे ! तरी ही काही लोकांना त्यावर शंका आहे ! रसायन विज्ञानाचा विषय नसून मानस शास्त्राचा झाला आहे ! वरील स्वयंसेवकांत अनेक तरुण मंडळीही असतीलच ना ! आता धोका पत्करण्यात मी म्हातारा मग मागे का राहू ? आता राहता राहिला संशय लस निर्माते ,राजकारणी व डॉक्टर यांच्या तोडपाण्याचा ! त्यावरही संदेह लोकांना आहे ! तो ही दूर होऊन सत्य पुढे येण्याचे श्रेय संशोधकांप्रमाणेच या स्वयंसेवकांनाही आहे हे नाकारू नये !

उत्तम माहिती. सध्यातरी लस घेण्यापलिकडे पर्याय दिसत नाही. लस घेतल्याने करोना पूर्ण जाणार नाही हे माहित आहे .

Bhakti 01/03/2021 - 10:30
लसीवर चांगलाच ऊहापोह आहे.जीवानमान उंचावण हेच महत्त्वाचे आहे हे तर त्रिकाल बाधित सत्य आहे.पण म्हणून संशोधन सर्व थोडांत हे काय पटल नाही. कंजूस यांच्याप्रमाणेच मलापण​ आयुर्वेद महान आहे त्यात अजूनही शक्ती आहे हे पटल,पण मग प्रश्न पडला रामदेवबाबाच "औषध ?" करोनावर घ्यायच का? (भयानक विचार).. चौरा यांचं मत पटल लस न घेणं ही चुक ठरु शकते. बाकी महाभारतची उजाळणी आवडली :)

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti 01/03/2021 - 10:44
ते घेणारच होते. पण त्या अखिलेश बाबाला प्रोटोकॉल,नियम वगैरे काहीच कळत नाही.काहीही बरळत होता.(हा हा)

Rajesh188 01/03/2021 - 12:29
लस च नाही तर सर्वच बाबतीत अवास्तव दावे करण्याचे प्रमाण खूप आहे.सायन्स मॅगझिन मध्ये सुद्धा सर्रास खोटे दावे केले जातात.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 14:05
फक्त स्वच्छ हवा. रासायनिक खत आणि कीटक नाशक न वापरलेलं अन्न आणि पालेभाजी. शुद्ध पाणी. संकरित जनावर चे दूध पूर्ण बंद. आणि स्वच्छ आणि मोकळा परिसर . एवढे उपलब्ध झाले तर. लस,औषध ह्यांची बिलकुल गरज नाही

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:30
या सगळ्या गोष्टी कदाचित १५०/२०० वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.१८५०) नक्कीच होत्या तर तेव्हा माणसे जास्त जगायची कि आत्ता जास्त जगतात?

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 01/03/2021 - 16:01
मलेरिया,अतिसार,प्लेग ह्या मुळे लोक जास्त मरायची . कारण योग्य उपचार नव्हते. पण उपचार निर्माण झाल्यावर ते प्रमाण कमी झाले. त्याला लसी कारणीभूत नाहीत. आता जे आयुष्य वाढले आहे असे वाटत आहे ते कोणाचे? ज्यांचे राहणीमान,आहार, विहार नैसर्गिक होता त्यांचेच. म्हणजे १९४५ ते १९७० पर्यंत ज्यांचा जन्म आहे त्यांचेच. त्याला कारण शुध्द आहार,शुद्ध हवा,आणि जोडीला वैधकिय सुविधा हे आहे. पण त्या पुढची पिढी अनेक रोगाने त्रस्त आहे कमी वयात मधुमेह ब्लड प्रेशर. किडनी चे प्रॉब्लेम खूप जास्त वजन आणि अशा अनेक रोगांनी आताची पिढी कमी वयात त्रस्त आहे. ह्याला एकमेव कारण आरोग्य व्यवस्थेचे बाजारीकरण आणि प्रदूषित,हवा,पाणी,अन्न,हे आहे बाजारीकरण मुळे नसलेले गुण चिकटवून केलेली औषनिर्माणशास्त्र ची होत असलेली जाहिरात लेखिका हेच सांगत आहे.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 01/03/2021 - 16:12
ओके :) तुमच्यासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

आग्या१९९० 01/03/2021 - 16:24
ह्यांच्या मुलांना नव्हे तर ह्यांनाच देवीचे जिवंत विषाणू टोचून घ्यावेत. नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढली कि नाही हे ही कळेल.

गोंधळी 01/03/2021 - 14:41
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया. म्हणजे तुम्ही आजारी पडल्यावर वैद्यबुवां कडे जातच नाहीत का? नामजप करुन बरे होता? बाकी अध्यात्माशी सांगड घालत जगणं खुप कठीण काम वाट्ते. ego मुळे असेल कदाचीत.

In reply to by गोंधळी

सासूला, सुनेच्या जाचापासून वाचवते सुनेला, सासू पासून वाचवते स्वतःचे षंढत्व लपवायला धंदा वाढवायला लोकांची फसवणूक करायला जागा ढापायला असे ह्या कातड्याचे विविध उपयोग आहेत आध्यात्मिक माणूस, एक नंबरचा स्वार्थी आणि खोटारडा असतो, हे मी अनुभवले आहे,

टवाळ कार्टा 01/03/2021 - 15:27
लेखकासाठी एक प्रश्न....तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का?

In reply to by टवाळ कार्टा

पुर्वी गल्लोगल्ली, किंवा दरेक शाळेत, एक तरी पोलियोग्रस्त, व्यक्ती असायचीच, आता नाही --------------------- त्यामुळे, आपण लस टोचून घ्यायची. मी थोडे दिवस वाट बघून, मग कुणाकडून लस टोचून घ्यायची?, लस टोचून घेतल्या नंतर कुठे रहायचे? इत्यादि साधकबाधक विचार करून, मगच ठरवीन.... घाई गडबडीत, असे निर्णय न घेणेच उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे... बाय द वे, लस टोचून घेतली की, एक जोरदार कट्टा करू...

जॉन रीज 01/03/2021 - 16:19
आपले जुने लेख आणि हा लेख अशी तुलना करता आपला i.d. कुणी चोरला असावा असे वाटते कारण आपण असे लिखाण कराल असे वाटत नाही आणि लेखाची शैलीही मागील लेखांशी जुळत नाही.

सूक्ष्मजीव 01/03/2021 - 19:36
मी एका ओळखीच्या डॉक्टर सोबत जे कोरोना काळात महानगरपालिके कडून हंगामी करोना सेवे साठी भरती केले आहेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांना मोफत लस दिली जात होती. या लशीचा प्रभाव किती काळ राहील हे विचारल्यावर ते म्हणाले की ही लस नसून एक प्रकारचा इम्यूनिटी बूस्टर आहे जे सर्व सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. याबद्दल जाणकार काय म्हणतात?

In reply to by सूक्ष्मजीव

गामा पैलवान 02/03/2021 - 03:39
सूक्ष्मजीव, पर्यायी दृष्टीकोन असलेल्या डॉक्टरांना आपल्या आस्था ( = concerns ) मांडायला वाव मिळावा हा सदर लेख लिहिण्यामागे हेतू आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

निमिष ध. 01/03/2021 - 21:16
मिपावर असा लेख असणे - तो सुद्धा करोनासारख्या अवघड काळात हे एक सामाजीक आरोग्याकरता हानीकारक आहे. वेगवेगळी मते असणे वेगळे आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येणे वेगळे. त्यामुळेच इथे उत्तर लिहीतो आहे. त्या ज्या कोण सुझान हम्फ्रीज आहेत त्यांना क्वॅक (ढोंगी वैद्द्य) म्हटलेले आहे - https://medika.life/dr-suzanne-humphries-on-medikas-quack-scale/ त्यांच्या पुस्तकातील मिसल्स चे दाखले कसे खोटे आहेत ते इथे नीट सांगितलेले आहे - https://medium.com/@visualvaccines/why-dr-suzanne-humphries-an-anti-vaccine-activist-is-lying-to-you-about-measles-ce446d0a7e0f अमेरिकेत ५ लाखांहून लोक मेलेली आहेत करोनामुळे आणि जगभरात जवळ जवळ २५ लाख लोकसंख्या दगावलेली आहे. असे असताना असा बेजवाबदार लेख येणे हे चांगले नाही. कृपया कोणीही या लेखाला वाचून करोना लशीबद्दल आपली मते बनवू नयेत ही माझी कळकळीची विनंती.

In reply to by निमिष ध.

पिनाक 01/03/2021 - 22:51
अगदी बरोबर. हेंच म्हणायला इथे आलो होतो. उगीच सरकारचा त्रास वाढवू नका..गप गुमान लस घ्या आणि कामावर चला. लै झालं घरी बसून.

In reply to by निमिष ध.

गामा पैलवान 02/03/2021 - 02:57
निमिष ध., पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर सुझन हम्फ्रीझ कधीही होमियोपाथ नव्हत्या. त्यांनी अलोपथी सोडून इतर कोणतीही उपचारपद्धती सुचवली नाहीये. तुम्ही दिलेल्या दोन्ही दुव्यांत डॉक्टरबाईंना होमियोपाथ व अवांतर चिकित्सक म्हंटलेलं आहे, जे साफ चुकीचं आहे. इझाबेला बाईंचा आरोप २०१५ च्या आसपासचा म्हणजे बराच जुना आहे. डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांच्या संकेतस्थळावर या आरोपांचं खंडन केलेलं आहे : http://www.dissolvingillusions.com/critiques/ वानगीदाखल एक वृथा आरोप दाखवतो :
She promotes mystical powers of Vitamin C, calling it “the basis of life,”[10] and asserts it magically “neutralizes any toxins in the blood.”[10]
प्रत्यक्षांत उपरोक्त पुस्तकात डॉक्टरबाईंनी क जीवनसत्वाच्या चाचण्या घेतल्या नाहीत म्हणून विधान केलंय. हे क जीवनसत्वाचं प्रमोटिंग नव्हे. असो. लशीच्या दुष्परिणामांवर कोणीही काहीच का बोलंत नाही? मी डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांना संशोधिका मानंत नाही. त्यांनी कुठलाही नवा शोध लावलेला नाहीये. त्यांनी फक्त जुना विदा ठळकपणे समोर मांडलाय. जो आजपर्यंत कोणीच मांडला नव्हता. या विदाप्रस्तुतीमुळे लशीविषयी आणि जंतुसिद्धांताविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. कोणाकडे उत्तरं आहेत का? आ.न., -गा.पै.

बाजीगर 02/03/2021 - 14:25
गा.पै. यांच्याविषयी मला आदर आहे. पण या लेखाला मी विरोध करतो. नाही हो. चूक गलत राँगनंबर, गल्ली चूकलात. खूप भटकलात. महाभारत संदर्भ पूर्ण अनावश्यक. माझ्या माहितीतले दक्ष जागरुक मित्र करोना ने मरण पावलेत. कृृपया स्वच्छता पाळा ( त्यावर गा,पै. आपण योग्य जोर दिलात, स्वच्छ पाणी प्या / पोषक व घरचा आहार घ्या / यथाशक्ती व्यायाम,चालणं करा, अकारण जागू नका. आणि हो ...लस घ्या...त्यावर डोकं खपवू नका. हा धागा delit करा. (एवढा research आणि टंकण्याचे श्रम, मुद्दे मांडण्याचे कसब याची मला कदर आहे)

मदनबाण 02/03/2021 - 16:13
गा.पै, हिंदुस्थानातील लसी बाबत गैर समज उत्पन्न होइल असे लेखन सध्य काळात योग्य नाही ! ती किती उपायकारक आहे हे येत्या काळात कळेलच परंतु उगाच लसी विषयी शंका घ्यावी असे सध्या कोणतेच कारण नाही. परदेशातील स्थिती मात्र वेगळी दिसते आणि त्या बद्धल अनेक बातम्या इथे वाचण्यास मिळतील :- Coronavirus COVID19 जाता जाता :- तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. या बद्धल विशेष आक्षेप ! आपल्या लिखाणासाठी परमेश्वरास कशास बोल लावावे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- #AlluduAdhurs​​ | Ramba Oorvasi Full Video Song | Bellamkonda Sreenivas | Monal Gajjar |

Rajesh188 02/03/2021 - 16:21
कशा साठी हा लेख delete करायला हवा,लेखात दुसरी बाजू मांडली आहे समजून घ्यायला काय हरकत आहे.प्रतेक विषयावरील दोन्ही बाजू समोर यायलाच हवी.लेख वाचून लगेच लोक लसी बद्द्ल निगेटिव्ह मत बनवतील असे इथे काही लोकांना का वाटत ह्याचेच मोठं आश्चर्य वाटत. वाचणारी माणसं आहेत प्रत्येकाला स्वतःची बुध्दी असते चांगले वाईट,योग्य,अयोग्य सर्वांना समजत .त्यांना गाढव समजू नका. मीच शहाणा मलाच योग्य अयोग्य कळत बाकी लोक बुद्धिहीन आहेत असले गैर समज काढून टाका. आणि लेख delete करायची काही गरज नाही.

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 19:02
मी तरी लस टोचून घेणार नाही. आणि देवू,क्षय,पोलिओ ह्यांची लस टोचली म्हणून ते जगातून कमी झाले आहेत हे तुमचे मत आहे माझे नाही. तुम्हीच त्या प्रश्नांची उत्तरं शोधत बसा.

In reply to by Rajesh188

टवाळ कार्टा 02/03/2021 - 22:11
मी तरी लस टोचून घेणार नाही.
तुम्ही लस टोचून घ्या किंवा नका घेउ...कोणालाही शष्प फरक पडत नाही. मी विचारलेला प्रश्न "तुम्ही लस टोचून घेणार की नाही?" हा नाहीये तर "तुमच्या मुलांना लहान असताना पोलिओ वगैरेच्या लस टोचवल्यात का?" असा आहे. तुम्हाला मुले/मुल असल्यास ती मुले किंवा ते मुल लहान असताना त्यांना/त्याला/तिला लसी टोचवून घेतलेल्या का? अजूनही प्रश्न समजला नसेल तर सांगा....अजून सोप्या मराठीत लिहिन :)

In reply to by टवाळ कार्टा

Rajesh188 02/03/2021 - 22:36
आपले विचार कधीच दुसऱ्या वर थोपवयचे नसतात हा साधा common सेन्स आहे. त्या मुळे मुलांना लस दिलेली आहे.ज्या लसी देण्याचे वेळापत्रक सरकार नी तयार केले आहे त्या प्रमाणे. पण आजच्या काळात वैधकीय व्यवसाय हा प्रामाणिक राहिला नाही ह्या वर माझे ठाम मत आहे . मग ते संशोधक असतील तर ते कोणत्या तरी व्यापारी कंपनी शी बांधील असतात आणि त्यांच्या इशर्या वरूनच त्यांचे संशोधन आणि त्याची माहिती ह्याचा प्रचार ,प्रसार ते करत असतात. मोठमोठ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांचा वापर करून घेतात. ह्या मध्ये शेवटच्या स्तरावर डॉक्टर मंडळी असतात त्यांचे कार्य कसे चालते ह्याचे अनेक किस्से लोकांना माहीत आहेत. लुटमार करणारा व्यवसाय असे वर्णन केले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी माझ्या विषयी निर्णय घेताना मात्र त्याचा विचार करतो. एक तर आजारी पडत नाही पण कधी पडलो तर खूप पाच सहा दिवस तरी डॉक्टर कडे जात नाही औषध ही रोग बरे करत नाहीत तर रोग वाढवतात असे माझे मत आहे. अगदीच गरजेचं झाले तर च dr कडे जातो. ते पण माझ्या family dr कडेच. बाकी कोणाकडे नाही. आता सर्व उत्तर दिली आहेत परत एकच प्रश्न विचारू नका

In reply to by Rajesh188

बेंगुताई 30/04/2021 - 11:26
ठाम मत हाहाहा.पण सगळ्या डॉक्टरांचा ठेका तुम्ही म्हणून का घ्यायचा? गलत बात! आणि फॅमिली डॉक्टर पण डॉक्टरचं असतील नाही का ?

In reply to by टवाळ कार्टा

गोवर, काजण्या, गालगुंड, यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे किंवा त्यांना अटकाव करणारी, प्रतिकारक्षमता तरी वाढलेली आहे लस टोचून घेणे हे उत्तम, हे तुझे मत, मला तरी मान्य आहे

स्मिता. 02/03/2021 - 16:29
केवळ करोनाच नाही तर इतरही अनेक दुर्धर रोगांवरचे लसीकरण आवश्यकच आहे. आधीच्या अनेक महत्त्वाच्या लसींची माहिती आणि आकडेवारी एक गूगल सर्च केला की सापडेल आणि करोनाच्या लशीची माहिती समजून घ्यायची असल्यास इंग्लंडची (युके) आकडेवारी अभ्यासून बघता येते. तेथे जानेवारीच्या मध्यापासून तर अखेरपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची वेळ आली होती. भारताच्या तुलनेत खूप लहान आणि कमी लोकसंख्येच्या या देशात दिवसाला सरासरी ६०,००० बाधीत तर दररोज सरासरी १५०० मृत्यू होत होते. त्यात भर म्हणून हे दिवस तिथल्या कडक हिवाळ्याचे, अनेक दिवस तापमान शून्याच्या मागे-पुढे असते. पण लॉकडाऊन सोबतच लसीकरणाच्या जोरावर एका महिन्याच्या कालावधीत, आजच्या दिवसाला बाधीत आणि मृत्यूचे आकडे १० पटीने कमी झाले आहेत (सरासरी ६००० बाधीत आणि १५० मृत्यू). आलेख पाहिला तर लक्षात येतं की तिथल्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या तुलनेत ही तिसरी लाट बरीच मोठी असली तरी उच्चांकानंतर बाधितांची संख्या झपाट्याने खाली आली आहे. हा एका महिन्यातला फरक केवळ लसीकरणामुळे शक्य झाला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आधीच्या लसींच्या तुलनेत ही लस नवीन आहे आणि कमी कालवधीत बनवली आहे हे खरं असलं तरी आता लस शोधण्याचं तंत्रज्ञानसुद्धा आधीपेक्षा खूप विकसीत झालं आहे हे लक्षात घ्यायला हवं. करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?

निपा 02/03/2021 - 18:13
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

निपा 02/03/2021 - 18:14
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने. हे खूपच simplification झालं . Germs theory ने आपल्याला समजले कि प्रसार कसा होतो आणि ते टाळावे कसे . हे सिद्ध केलं science ने . म्हणजे फक्त hygiene राहिल्याने रोग आटोक्यात येत नसतात. Corona च उदाहरण घेतलं तर फक्त हायजिन maintain करून प्रसार थांबणार नाही . देवीचा रोग व पहिली लस लॅन्सेट च्या लेखात काहीही असे नाही कि ते vaccination प्रोसेस ला कमी लेखते. बाकी पहिल्या vaccination च्या वेळेस प्रॉब्लेम्स झाल्याच असायला पाहिजे. पण आपण हा अर्थ नाही काढू शकत कि vaccine निरुपयोगी आहे. कितीही सर्वर लावले तरी १००% availability नाही येत . तसेच करंट vaccine चा effectiveness ९५% -९८% असा असतो म्हणजे सर्व vaccine घेटलेल्याना corona होणारच नाही असा नाही. परत हा काही पॉईंट नाही विकसन न घेण्याचा. https://www.thelancet.com/journals/laninf/article/PIIS1473-30991730445-0/fulltext बाकी लेख वाचण्या च्या लायकी चा नाही ...

गामा पैलवान 02/03/2021 - 19:56
स्मिता.,
करोनाच्या महामारीमुळे जगभरात लाखो जीव गेले आणि करोडोंचे जगणे अवघड झाले असतांना त्या महामारीला आणि ती आवरण्याच्या प्रयत्नांना कोणी थोतांड कसं म्हणू शकतं?
करोना हे एक थोतांड आहे. कारण की अमेरिकेत ऑगस्ट २०२० पर्यंत ( म्हणजे गेल्या सहा सात महिन्यांपर्यंत ) हा विषाणू अलग केला गेला नव्हता. हे गूगल करून पहा : "Since no quantified virus isolates of the 2019-nCoV are currently available," बाकी, इथे इंग्लंडात PHE ( = Public Health England ) कडे करोना विषाणू अलग केल्याची शष्प माहिती नाही : https://www.whatdotheyknow.com/request/679566/response/1625332/attach/2/872%20FOI%20All%20records%20describing%20isolation%20of%20SARS%20COV%202.pdf करोनाचा विषाणू अलग केलेला नसतांना कोणती दिव्य लस उत्पन्न केली गेलीये? थोतांड ते थोतांडच ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 11:34
मग मानसं कशाने बर मरत असतील? बहुतेक स्वच्छ भारत अभियान कमी पडले असणार! बाकीच्या देशाचं आपल्याला काही माहीत नाही बुवा.

In reply to by बेंगुताई

रंगीला रतन 30/04/2021 - 11:55
साधा सर्दी पडसा झालेली लोकं आपल्याला करोना झालाय या गैरसमजुतीने उगाच घाबरून मेली आहेत. जगात करोनाचा विषाणु अस्तीत्वात नाही हेच सत्य आहे! तुम्ही आम्ही कीतीही ओरडुन सांगीतले तरी धागालेखक विषाणुचे अस्तीत्व मान्य करणार नाहीत. हां पण सनातन प्रभातने तसा दावा केला तर आणि तरच त्यांचे मतपरीवर्तन नक्की होइल :)

Rajesh188 02/03/2021 - 21:14
प्लेग,देवी,इत्यादी रोग निर्माण करणारे जिवाणू ,विषाणू आज सुद्धा मानवी शरीरावर हल्ला करतात पण त्या व्यक्ती नी त्या आजाराची लस घेतली असल्या मुळे लोक आता त्या आजारांना बळी पडत नाहीत .हे कस सिद्ध केले जाते शास्त्रीय पद्धती नी. कोणी असे सिद्ध करून दाखवलं आहे का? की ते रोग कारक विषाणू,जिवाणू आता अस्तित्वातच नाहीत हे त्याला कारण आहे.

Bhakti 02/03/2021 - 23:29
फायझर लसीबाबत चांगला दुवा मिळाला..कोवीशिल्ड आणि भारत बायोटेक लसीवर शोधत आहे. ् https://www.technologyreview.com/2020/12/09/1013538/what-are-the-ingredients-of-pfizers-covid-19-vaccine/

Rajesh188 03/03/2021 - 19:51
त्यांना होणारे साथी चे आजार काही महिन्यात संपुष्टात येतात ना . कसे . ना लस ना औषध . तरी मानव जेवढं आजारांनी ,रोग राई नी मृत्यू मुखी पडतो तेवढे प्राणी पडत नाहीत. ह्याची पण काही तरी कारणे असतील ना. प्लेग उंदरा पासून माणसात संक्रमित होत होता. आता उंदरांना पण प्लेग होत नाही.

चौकस२१२ 04/03/2021 - 04:43
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड ! बरं.. अमेरिकेत , इंग्लंड इटली ब्राझील मध्ये हजारो लाखो मेले हे पण एक थोडांतच का? कि त्यांना लपवून ठेवलाय मोहावी वाळवंटात कि आल्प्स मध्ये ? आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल

In reply to by मुक्त विहारि

Rajesh188 04/03/2021 - 10:49
माझ्या लहानपणी मधुमेह, लठ्पणा,लहान वयात चशमे,लहान वयात केस पांढरे झालेल्या व्यक्ती दिसत नव्हत्या पण आता मात्र सर्रास दिसत आहेत. उच्च रक्तदाब असणारे तर खूपच आहेत पाहिले तेवढे नव्हते. कमी वयातच दातांचे आणि हिरड्यांचे विकार असलेली लोक पण वाढली आहेत. 32 दात 32 वर्षापर्यंत सुद्धा टिकत नाहीत पाच दहा कमी होतातच.

Rajesh188 04/03/2021 - 11:22
माझ्या गावात मला वाटतं एकच कुष्ठ रोगाचा रोगी होता तो पण वय झालेला. बाकी मी प्लेग चा आजार बघितला नाही ना अनुभवला आहे. पण हिवताप,अतिसार ,कांजण्या हे आजार असायचे आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे .पण हिवताप आणि अतिसार आज सुद्धा जीवघेणा आहे. उपचार वेळेवर मिळाले नाहीत तर. सर्वात जास्त लोक हिवताप,अतिसार ह्या मुळेच पूर्वी लोक मृत्यू मुखी पडत असत आता तशी स्थिती नाही . औषध उपचार नी ह्या रोगावर विजय मिळवला आहे. रोग राई कमी होण्याचे स्वच्छता हे कारण नक्कीच आहे . धनुर्वात,rabies, ह्याचा रोगी मी आज पर्यंत तरी बघितला नाही. पण हे दोन्ही आजार पण घातक आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्र नी लोकांचे आयुष्य वाढवले आहे ह्या विषयी शंका नाही. पण आता परत त्या शास्त्राला उतरती कळा लागली आहे असे म्हणता येईल. सेवा भावनेने संशोधन आणि उपचार मधल्या काळात होत होते आता त्याला बाजारू स्वरूप आले आहे.

गामा पैलवान 04/03/2021 - 15:24
चौकस२१२, तुमचा इथला संदेश वाचला. १.
आधी karona थोतांड होता आपल्यामते आता लस थोतांड !
बरोबर. करोनाचा विषाणू हे आजूनही थोतांडच आहे. जो विषाणू अद्याप विलग करता आलेला नाही, त्यावर म्हणे लस बनवली आहे. पब्लिक इतकं मूर्ख आहे का विश्वास ठेवायला? २.
यावर लवकरात लवकर कोणी मिपाकर वैद्यबुवा किंवा बाईंनी उत्तर दिले तर सर्व मिपाकरांचे भले होईल
सहमत आहे. निदान माहिती तरी मिळेल. जमल्यास डॉक्टर सुझन हम्फ्रीझ यांचं उपरोक्त पुस्तक वाचून पहा. निदान त्यातल्या साथीच्या रोगांचे आलेख तरी बघा म्हणून सुचवेन. ३.
आरे बापरे १००+ देश गंडले कि काय थोतांडामुळे
हो. मेकॉलेछाप राज्यपद्धती असली की हे असं होतंच. आ.न., -गा.पै.

चौकस२१२ 05/03/2021 - 04:22
१०० + अधिक देश त्यांची सरकार पूर्ण गंडली , आणि ती सुद्धा काही सरकारे पार उजव्या विचारसरणी ची आणि काही डाव्या तरी गंडली होय??? अरे बापरे म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का? बरं आपण ४थय प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळलेत .. हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय ! बरं उत्तर द्या नका देऊ... आपली "थेरी "कळली एक काम करा तो शोधलेख एवढी मेहनत घेऊन लहिलेलेला जरा मटा किंवा लोकसत्तेत छापायला पाठवा ..( कुबेर साहेब स्वागतच करतील कारण त्यात त्यांना "सरकारने लोकांनां कसे गंडवले याचे अजून एक शास्त्रीय उदाहरण मिळेल अप्लाय कृपेने ) जनताच उत्तर देईल तुम्ह्ल्ला अहो काय हे.. चाललंय तुमचा हा हे समजू शकतो कि काही गोष्टींवर आपण प्रश्न उभे करू जसे कि ( राजेश तुम्ही पण ऐका ) लस चुकीच्या पदहतीने विकसित केली असावी , त्यात आर्थिक घोटाळा असेल, इतर उपायातील त्रुटी , पण हे सगळंच खोटा आहे ! असा दावा !

Rajesh188 05/03/2021 - 14:10
Corona लसी मुळे corona होणार नाही ह्याची शाश्वती आहे का. कोणत्याच संस्थेने covid ची लस किती दिवस covid विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण करेल ह्या विषयी ठाम विधान केलेले नाही. म्हणजे हे लसी करण प्रोयागिक आहे.निष्कर्ष अजुन यायचा आहे.

In reply to by Rajesh188

लस १०० % करोनाला प्रतिबंध करेल असा विदा अजुन दिसला नाही. ९० टक्के प्रतिबंध होईल असे समजले तरी १० % रिस्क आहेच. काय नाय, सतत मास्क घालणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धूणे सॅनिटाइजरचा वापर करणे काळजी घेणे हाच सुरक्षित राहण्याचा उत्तम उपाय आहे. करोना समजा झालाच तर औषधोपचाराने तो बराही होतो. बाकी, अजुन एक करोनास प्रतिबंध करायचा थेट लशी इतकाच उपाय, जोरजोरात थाळी वाजविणे आणि गॅलरीत जाऊन दिवाबत्ती करणे त्याचंही महत्व काही कमी नव्हतं, नाही. त्याचाही विदा येणे अजुन बाकी आहे. =)) च्यायला, आयुष्यात लै गमती जमती केल्या या करोनाने. मागे वळून पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. -दिलीप बिरुटे

In reply to by टवाळ कार्टा

मिपा वरील चर्चा वाचूनच, केवळ भारतच न्हवे तर,चीन, अमेरिका, पाकिस्तान आपली परराष्ट्रीय धोरणे ठरवतात.... त्यात आता, नोबेल पुरस्कार पण टाकायला हरकत नाही...

गामा पैलवान 05/03/2021 - 20:54
चौकस२१२, १.
हजारो लाखो आणि ते सुद्धा ६० च्या आतले मेले ! कि ते हि खोटंच? का सगळे च्या सगळे असे एकदम इतर आजारांमुळे मेले आणि उगाच करोना चे कारण दिल जातंय !
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? करोनामुळे मृत असा छाप मारला तर अमेरिकन सरकार रोग्याचे सगळे पैसे द्यायचं. मग कोण कशाला बिनकरोनाचं प्रमाणपत्र देईल? एक लेख सापडला : https://eu.usatoday.com/story/news/factcheck/2020/04/24/fact-check-medicare-hospitals-paid-more-covid-19-patients-coronavirus/3000638001/ शितावरून भाताची परीक्षा. इथे इंग्लंडमध्ये आता फ्ल्यू चे मृत्यू अचानक नाहीसे झाले. त्यांची जागा करोनाने घेतली. घरोघरी मातीच्याच चुली म्हणावं का ? करोनचा विषाणू आजघडीला विलग ( = isolate ) झालेला नाहीये. भविष्यात तो कधी विलग होण्याची शक्यता माझ्या मते तरी ० आहे. मग नेमकी कशाची चाचणी केली जाते? आणि नेमकी कसली लस टोचली जाते? २.
म्हणजे जगातील सर्वात मोठा झोल म्हणाला पाहिजे नाही का?
होच मुळी. निदान आजवरचा तरी हा सर्वात मोठ्ठा झोल आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 05/03/2021 - 22:23
रंगीला रतन,
तेवढीच जेवढी त्याला थोतांड म्हणायला लागते.
हे बरोबर बोललात. तुमच्याकडे करोनाविषाणू विलगीकृत म्हणजे आयसोलेटेड केलेला आहे का? थेट रोग्याकडून नमुना मिळवलेला पाहिजे. माकडाच्या मूत्रपिंडावर वसवलेली वस्ती किंवा डुकराच्या गळ्याखाली लोंबणारी मांसरुडे ओघळून पडलेल्या चरबीच्या कणांवर वाढवलेली बुरशी वगैरे नको. असा विषाणू तुमच्याकडे नसेल तर करोना हे थोतांड आहे. महत्त्वाचा. आणि हे विधान करायला मला काडीचीही अक्कल वापरावी लागली नाही. तुमच्या उपरोक्त उद्गारांना माझं पूर्ण अनुमोदन आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रंगीला रतन 05/03/2021 - 22:44
करोना कोणाच्याही अंगात सापडू शकतो. मेलेल्या माणसावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? या वाक्याचाआणि तो करोनाविषाणू आयसोलेटेड आहे क नाही याचा काय संबंध? असल्यास तो स्पष्ट कराच. आपला उद्धट रंगीला रतन

In reply to by रंगीला रतन

गामा पैलवान 06/03/2021 - 15:36
रंगीला रतन, तोच तर माझाही प्रश्न आहे. करोनाचा अस्सल नमुना अस्तित्वात नाही. तरीपण तो रोग्याच्या शरीरात मात्र सापडतो आहे. त्याचप्रमाणे तो निरोगी माणसातही असू शकतो. आणि तो पसरतोही म्हणे. याचाच अर्थ 'करोना' 'शोधण्याची' चाचणी करोनाइतकीच भंपक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बेंगुताई 30/04/2021 - 12:00
त्यासाठी तुम्हाला प्रयोगशाळेत भेट द्यावी लागेल(मास्क लाउन जा बरं का?) तिथे रुग्णांचे swab असतात तिथे कदाचित दिसतील पण.(बघा एकदा उघड्या डोळ्यांनी दिसले तर) आता नसतीलच विषाणू तर दिसतीलच कशे?काहीही करतात हे लोक दिवसरात्र ते पपई किट घालून काय तर swab घेऊन काय बघतात काय माहीत काय भेटणार त्यात शेम्बडाशिवाय?

Rajesh188 05/03/2021 - 20:59
जेव्हा पासून लस पुराण चालू आहे तेव्हा पासून मला काही प्रश्न पडतात. गूगल वर उत्तर शोधली पण सविस्तर,उत्तर मिळाले नाही. १) covid१९ व्हायरस चे इन्फेक्शन होवून बरे झालेल्या रुग्णात जी प्रतीपिंड तयार होतात ,किंवा covid व्हायरस विरूद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते . ती प्रतिकार क्षमता आणि लसी मुळे निर्माण होणारी प्रतिकार क्षमता ह्या मध्ये काय फरक आहे? २) एकदा covid होवून गेल्या नंतर त्याच व्यक्ती ला परत covid झाला अशी जगात किती उदाहरणे आहेत( मी तर वाचले आहे अशी फक्त ५० उदाहरणे जगात आहेत) आणि माझ्या संपर्कात असलेल्या ज्या लोकांना covid झाला होता त्या मधील कोणालाच परत covid झालेला आहे. ना कोणा कडून तशी केस ऐकण्यात आली. इथे कोणाला reinfection झालेला covid रुग्ण माहीत आहे का?
नमस्कार लोकहो! करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय. या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले.