मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन

हेमंतकुमार ·

अनुप ढेरे 12/07/2018 - 12:32
मला एक शंका आहे. आपल्याला महिती नाहीत/सापडली नाहीत अशी व्हिटामिन्स असण्याची शक्यता किती? आजकाल व्हिटामिन्सच्या गोळ्यांनी सर्व विटामिन्स मिळतील असं म्हटलेलं वाचलं जातं. जर आपल्याला माहिती नाहीत अशी व्हिटामिन्स असतील तर गोळ्यांवर अवलंबुन रहाणं धोक्याचं असेल असं वाटतं.

हेमंतकुमार 12/07/2018 - 13:03
अनुप, चांगला प्रश्न. १९४८ मध्ये ब-१२ च्या शोधानंतर कुठल्याही पदार्थाला जीवनसत्वाचा दर्जा दिला गेलेला नाही. तरीसुद्धा किमान एक डझन पदार्थ तरी या प्रतीक्षा यादीत नंबर लावून आहेत ! सध्या त्यांना “जीवनसत्वासारखे” इतपत म्हटले जाते. आता जीवनसत्वे आहारातून आणि गोळ्यांतून हा मुद्दा. आहारातून कधीही श्रेष्ठ. आहारातून जेव्हा तुम्ही एखादे जीवनसत्व घेता त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित त्याच जातकुळीतले इतर पदार्थ (Vitamers) सुद्धा मिळतात. उलट गोळीतून मिळणारे जीवनसत्व हे ‘शुद्ध’ एकच रसायन असते. तेव्हा एकूण पचन उत्तम असेल व वृद्धावस्था वगळता आहारच उत्तम. विशिष्ट परिस्थितींत (गर्भावस्था, तान्हुलेपण, इ.) गरज खूप असते तेव्हा तेवढ्यापुरत्या गोळ्या द्याव्यात. अभावाचा आजार असता मात्र गोळ्याच.

लई भारी 12/07/2018 - 14:41
मालिका चांगली होत आहे. अनुक्रमणिका झाल्यास बरे पडेल.
याउलट ‘संपन्न’ खाद्यांतले अथवा गोळ्यांच्या रुपातले ब-१२चे व्यवस्थित शोषण होते.
म्हणजे आधी आहाराच्या बाबतीत सांगितलेली गुंतागुंत इथे लागू नाही का? वरती सांगितलेला 'आहारातून कधीही श्रेष्ठ.' हा मुद्दा अगदी पटला. माहितगार साहेबांच्या धाग्यातून पण चांगली माहिती मिळाली. मांसाहारी बद्दल एक डॉक्टर म्हणाले होते कि तुम्ही अगदी दररोज मांसाहार करत असाल तरच तुम्हाला कमतरता असणार नाही, अन्यथा लक्ष ठेवा आणि एकदा कमतरता जाणवल्यावर पहिल्या फेरी नंतर वर्षभराने परत औषध/इंजेक्शन घेणे सोईस्कर. शास्त्रीय दृष्ट्या अगदी बरोबर नसेल पण ढोबळमानाने 'आपण मांसाहारी म्हणजे बी-१२ ची कमतरता नाही' असा समज करून घेऊन नये. टेस्टचा खर्च पाहता, हे व्यावहारिक वाटते. डॉ. खरे यांनी पण वरील धाग्यात हाच मुद्दा सांगितला होता.

मंजूताई 12/07/2018 - 14:48
नेहमीप्रमाणे उपयुक्त लेख ! डाॅ तुम्ही म्हणता कुठलही जीवनसत्वे आहारातून घेणे योग्य आहे आणि शिळ्या अन्नातून मिळतं .... ह्यावर सविस्तर लिहा खासकरून जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी....

हेमंतकुमार 12/07/2018 - 14:57
म्हणजे आधी आहाराच्या बाबतीत सांगितलेली गुंतागुंत इथे लागू नाही का? >>> पुन्हा एकदा बघा. तरुण व्यक्ती, पचन उत्तम अशा वेळी आहार उत्तम. पण म्हातारपण, त्यामुळे होणारी जठराची झीज यांत अन्नातले ब-१२ शोषले जात नाही. त्यांनाच कृत्रिम पर्याय. शिळ्या अन्नातून मिळतं .. >>> यात जीवाणूंची वाढ होते जे ब -१२ तयार करतात. त्यातून काही प्रमाणात मिळेल. दुग्धजन्य खात असल्यास फार चिंता नको. रोजची गरज अवघी २-३ मायक्रोग्रॅम आहे.

श्वेता२४ 12/07/2018 - 15:42
तेव्हा तथाकथित ‘शाकाहारी’ हे दूध वा दुग्धजन्य पदार्थ खात असतात आणि त्यातून ब-१२ मिळते. त्याची रोजची गरज काही मायक्रोग्रॅम इतकीच आहे. वर आपल्या यकृतात त्याचा भरपूर साठा होत असतो. साधारणपणे हा साठा आपल्या ५ वर्षांच्या गरजेइतका असतो. तेव्हा व्हेगन शैली आचरणात आणल्यानंतर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील. जर माझ्या रोजच्या आहारात दुध, ताक, दही, हे कम्पल्सरी असंलच तर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील का

हेमंतकुमार 12/07/2018 - 16:39
ती लक्षणे व्हेगन च्या बाबतीत म्हटले आहे. हे लोक दूध सुद्धा घेत नाहीत. तुम्ही दुग्धजन्य शाकाहारी असणार, तेव्हा चिंता नको.

In reply to by श्वेता२४

अनुप ढेरे 12/07/2018 - 16:59
ते लोक कोणतेच प्राणीज पदार्थ खात नाहीत. मांस/अंडी तर नाहीच पण दुधाचे पदार्थदेखील खात नाहीत. मधपण खात नाहीत बहुधा.

In reply to by अनुप ढेरे

हेमंतकुमार 12/07/2018 - 17:42
या निमित्ताने आहारशास्त्रानुसारचे वर्गीकरण लिहितो. ते रोचक आहे. मूळ इंग्लिश शब्द अर्थवाही असल्याने तेही लिहितो: १. vegan : अतिशुद्ध शा. हे फक्त भाजीपालाच खाणार. २. Lactovegetarian ; दूध पिणारे शा. ३. Ovovegetarian : अंडे खाणारे शा. ४. Lactoovovegetarian : दूध व अंडे दोन्ही खाणारे शा.

हेमंतकुमार 12/07/2018 - 17:34
“ब-१७” हे अजिबात अधिकृत जीवनसत्व नाही. त्याच्या कर्करोगातील उपयुक्ततेबाबत उलटसुलट मते आहेत. एका अमेरिकी आहार संघटनेने तर ते धुडकावून लावले आहे. तेव्हा माझ्या मते त्यावर चर्चा नको.

मस्तं चालली आहे लेखमाला. मिपाकरांचे प्रतिसाद आणि चर्चा पाहता, बर्‍याच जणांना या विषयात रस आहे आणि खूप जणांना उपयुक्त... आणि मुख्य म्हणजे खात्रीशीर... माहिती मिळत आहे. हा स्पृहणिय उपक्रम असाच चालू ठेवा.

' ब-१२ ची रक्तपातळी : अलीकडे ही पातळी चाळणी चाचणी म्हणून बरीच चर्चेत असते. पण या चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे. पण अशा सरसकटीकरणाला तसा अर्थ नाही ' वेगवेगळे निष्कर्ष येण्याचे कारण प्रत्येक ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या मशीन्स हे होय , आणि त्या मशीन्स प्रमाणीकरण करण्याची कुठलीही पद्धत आपल्याकडे तरी अस्तित्वात नाही . रस्त्यावर शेकडो पंचर वाले हातातील गेज मीटर ( +/ - २० दाखवू शकतो ) ने आपल्या गाडीतील हवा चेक करत असतो आणि बरेचसे लोक त्या गेज मीटर वर विश्वास ठेवून ( जीव धोक्यात घालून ) गाड्या हाकत असतात .त्यातलाच प्रकार आहे हा .

सुबोध खरे 13/07/2018 - 09:42
त्या मशीन्स प्रमाणीकरण करण्याची कुठलीही पद्धत आपल्याकडे तरी अस्तित्वात नाही . हि वस्तुस्थिती नाही. कारण कोणत्याही रक्त निदान यंत्राचे प्रमाणीकरण अतिशय सोपे आहे. बी १२ जीवनसत्व असलेला प्रमाणित द्रव standardised solution उदा. एका मिलिलिटर मध्ये १० मायक्रोग्रॅम जीवनसत्व असलेला या यंत्रात तपासला जातो. त्यात समजा ९ मायक्रोग्रॅम जीवनसत्व आढळले तर ते यंत्र परत जुळवले जाते ( adjust) आणि परत हा १० मायक्रोग्रॅम असलेल्या प्रमाणित द्रवाची चाचणी घेतली जाते. हि चाचणी अचूक येईपर्यंत असे यंत्राचे प्रमाणीकरण केले जाते. NABL (National Accreditation Board for Laboratories) या राष्ट्रीय प्रमाणीकरण संस्थेच्या मानकाप्रमाणे प्रत्येक १०० चाचण्यांनंतर असे प्रमाणीकरण आवश्यक आहे. असे accreditation करून घेण्यासाठी त्या निदान केंद्राला फार कठीण परीक्षेतून जायला लागते. हा प्रमाणित द्रव महाग असतो शिवाय हा चाचणी संच( test kit) पण महाग असतो. यामुळे या चाचण्या महाग असतात. आपल्याला कोणत्याही रक्त चाचणीचे निदान अचूक हवे असेल तर या चाचण्या NABL accredited laboratory मधून करून घ्याव्यात.

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार 13/07/2018 - 10:02
दोन "कोपर्‍यावरच्या प्रयोगशालांचे" निष्कर्ष जुळणार नाहीत. तसेच या पद्धतींत सतत नवे संशोधन होत असते. त्यामुळे प्रगत देशातली अत्याधुनिक आणि आपल्याकडची पद्धत यानुसारही फरक पडतो.

In reply to by सुबोध खरे

म्हणजे त्या प्रमाणित द्रवा मूळे विश्वास ठेवायला जागा आहे . आपल्या कडे अचूक निदान होऊ शकते पण नेहमी प्रमाणे ते तंत्रज्ञान ग्राऊंड लेव्हल वर उपलब्ध नाही अशी शक्यता वाटते . म्हणजेच मध्यमवर्गीय व गरीब जमात यांच्या रक्तचाचण्या निष्कर्षा मध्ये मटकेबाजी फुल ला वाव आहे . ग्राहकांच्या जीवा ची काळजी घेणारे वजन माप खाते स्वतःची कुठलीही लॅब नसतांना फुड प्रोसेसिंग कारखान्याच्या मशिनरीज चे धडाधड दरवर्षी नुतनीकरण प्रमाणपत्र देत असतच की .

सुबोध खरे 13/07/2018 - 11:38
साधारण पणे NABL accredited laboratory अशा भंपक गोष्टी करणार नाही. कारण एवढ्या कष्टाने मिळवलेले आपले प्रमाणीकरण( accreditation) घालवणे त्यांना परवडणार नाही. परंतु आपली भारतीय मनोवृत्ती अशी आहे कि अशी प्रमाणित प्रयोगशाळा महाग आहे म्हणून कोपर्यावरची कुणी तरी टाकलेली प्रयोगशाळाच बघा म्हणजे स्वस्तात काम होईल.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 13/07/2018 - 15:18
मला वाटते कोपर्‍यावरच्या प्रयोगशाळातही प्रमाणित आणि रास्त दरात चाचण्या उपलब्ध करुन दिल्या जाण्यास हरकत नसावी. मेडीकल स्टोअर्स पर्यंत नियंत्रणे आणली जाऊ शकतात तर शासकीय यंत्रणांनी सर्व प्रयोगशाळा प्रमाणितच असतील याची खबरदारी घ्यावयास हवी. अर्थात तुमचे म्हणणेही बरोबर आहे, मी माझ्या एका कोपर्‍यावरच्या केंद्रास भेट दिली तर तेथील रक्त घेणारा मुलगा चक्क अनट्रेन्ड होता !

लेख आवडलाच. नेहमीप्रमाणे माहितीत भर टाकणारा लेख. १. वजने मापे खाते हे मुख्यता ग्राहक कायद्याखाली तयार उत्पादनाच्या वजनमाप प्रमाणासाठी आहे. बरोबर दहा गोळ्या किंवा १०० मिली व्गैरे औषध आहे की नाही एवढीच पूर्तता असते. २. औषध उत्पादक कारखान्यात चाचणी यंत्राचे कॅलिब्रेशन हे कारखान्यातलाच क्यूसी वा क्यूए चा सरकारमान्यताप्राप्त तांत्रिक अधिकारी =अ‍ॅप्रूव्हड टेक्निकल स्टाफ करतो. त्यासाठी स्टॅन्डर्ड सोल्यूशन बनवण्यासाठी वापरायचे रसायन (इथे - बी१२) हे सरकारमान्य प्रयोगशाळेतून मागवावे लागते. फक्त पुणे, अहमदाबाद, कलकत्ता इ. मोजक्याच ठिकाणी या प्रयोगशाळा आहेत. हे कॅलिब्रेशन किमान दरवर्षी करून त्याचे अभिलेख तसेच स्टॅन्डर्ड रसायनाचा हिशेबही ठेवावा लागतो व ते फक्त कॅलिब्रेशनसाठीच वापरायचे असते. ड्रग्ज आणि कॉस्मेटीक्स अ‍ॅक्ट आणि त्याखालील अधिनियमांनुसार हे प्रोटोकॉल्स ठेवावे लागतात. कारखान्याच्या स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसीजरमध्ये तसा याचा उल्लेख असतो. सोबत गॅरट, मार्टींडेल इ. संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. यात गडबड झाल्यास कारखान्याचा मान्यताप्राप्त तांत्रिक अधिकारी जबाबदार असतो. सरकारी ड्रग इन्स्पेक्टर दरवर्षी किमान एकदा प्रत्येक कारखान्याचे तपासणी निरीक्षण करतो व पृष्ठांकित तीन प्रतीच्या निरीक्षण नोंदवहीत नोंदी करतो. नोंदीखाली निरीक्षकाच्या सहीसोबत कारखान्याच्या तांत्रिक अधिकार्‍याची देखील सही असते. जेणेकरून कारखाना ती निरीक्षणे नाकारू शकत नाही. मागील तृटींच्या पूर्ततेचा आढावा घेऊनच नव्या तपासणी निरीक्षणास सुरुवात करतो. बाजारातून विविध औषधांचे नियमितपणे नमुने घेऊन सरकारी प्रयोगशाळेत तपासले जातात. तपासणीत गडबड आढळल्यास औषध निरीक्षकाला तो औषधविभाग ताबडतोब बंद करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळेच बाजारातील औषधात सहसा गडबड आढळत नाही.

In reply to by सुधीर कांदळकर

सुधीर साहेब , थोडं विषयांतर होईल पण , पॅक केलेल्या बिस्कीट च्या वेष्टनावर त्या वस्तू च्या वजनात टोटल किती calcium , calories , fat , iron व्हिटॅमिन्स ब1 पासून ब12 , folic acid वैगेरे चें प्रमाण छापलेले असते तर मला नेहमी प्रश्न पडतो की तो बिस्कीट चा पुडा लॅब मध्ये पाठवून वरील सर्व प्रमाण चेक करता येत का ? लॅब मध्ये तशा सुविधा असतात का ?. तसच औषधी गोळ्यांचे छापलेले कंटेंट्स त्या पाकिटातील गोळ्या काढून त्यातील कंटेंटस लॅब मध्ये चेक करता येतात का ? म्हणजे ती वस्तू बाजारात आल्यानंतर तपासण्याची सोय असते का ?. मध्यंतरी स्कोडा कंपनी ने त्याच्या गाडी च्या सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी फेरफार करून विकल्या होत्या , त्या गाड्या प्रदूषण चाचणीत ओके दिसायच्या पण वास्तवता खूप प्रदूषण करायच्या म्हणून स्कोडा ला करोडो डॉलर्स चा दंड भरावा लागला , अशी काहीतरी केस वाचनात आली होती तेव्हां पासून पॅक वस्तू च्या न्युट्रीशिएन माहिती बद्दल त्या वस्तूवर किती विश्वास ठेवावा प्रश्न पडतो .

In reply to by सुधीर कांदळकर

Rajesh188 27/04/2019 - 17:46
ECG करताना छातीवर ज्या वायरी चिकटून ठेवतात त्यातील काही loose aahet he सांगून सुद्धा दुर्लक्ष करून report दिला गेला तर report मध्ये heart मध्ये प्रॉब्लेम आहे असा निष्कर्ष निघाला मी परत दुसऱ्या लॅब मध्ये सर्व वायर फिट बसवण्याचा हट्ट थरला आणि report normal आला

ते अस्थिजनक पेशींच्या योग्य वाढीसाठी मदत करते.
ह्या विषयी थोडी अजुन माहीती हवी आहे ! मी अ‍ॅक्टीव्हली जिम करत होतो तेव्हा व्हे प्रोटीन रेकमेन्ड केले होते जिम ट्रेनर ने ( शरीराच्या वजनाच्या प्रति किलो ला एक ग्रॅम ) पण दुसर्‍या मित्राने सांगितले की शरीरात व्हिटॅमिन बी नसेल तर प्रोटीन डायजेस्ट होणार नाहीच, प्रोटीन अ‍ॅब्सॉर्प्शन आणि मसल रिक्व्हरी साठी काही व्हिटॅमिन बी घेणे आवश्यक आहे ! बीकोस्युल किंव्वा तत्सम काही. हे कितपत सत्य आहे ? खरे असल्यास अ‍ॅक्टीव्ह वर्काऊट करत असतना ( म्हणजे आठवड्यातील ५-६ दिवस नित्यनेमाने १ ते दीड तास स्ट्रेचनस वर्काऊट) किती व्हिटॅमिन बी घेणे आवश्यक आहे ? बी व्हिटॅमिन कमी पडत असल्याची किंव्वा जास्त झाल्याची लक्षणे कोणती ? ( नखाच्या इथली सालं निघणे आणि तोंड येणे ही डिफिशियन्शी ची लक्षणे आहे असे ऐकुन आहे हे खरे आहे का ? )

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 14/07/2018 - 10:19
मी अ‍ॅक्टीव्हली जिम करत होतो तेव्हा व्हे प्रोटीन रेकमेन्ड केले होते जिम ट्रेनर ने व्हे प्रोटीन हे साध्या दुधापेक्षाकिंवा कोणत्याही प्रथिन युक्त अन्न पदार्थापेक्षा जास्त चांगले आहे या विधानाला कोणताही शास्त्रीय पुरावा मला तरी आढळलेला नाही. (आमच्या बायकोला तिच्या जिमच्या इन्स्ट्रक्टर ने ५०० रुपयाला चुना लावला ते पाहून माझे डोके ठणकले होते म्हणून मी बऱयापैकी वाचन केले होते) कारण मुळात कोणतेच प्रथिन हे तसेच्या तसे शरीरात शोषले जात नाही. त्याचे मूळ अमायनो ऍसिड मध्ये पचन होणे आवश्यक आहे. व्हे प्रथिन पचायला हलके आहे असेही नाही. मग सर्वत्र जिम मध्ये व्हे प्रोटीन घ्या हा आग्रह का होतो याचा विचार करा. व्हे प्रोटीन हे चीज तयार करताना बाकी राहिलेल्या टाकाऊ द्रव पदार्थात (WASTE PRODUCT) असलेले प्रथिन आहे. Whey protein is a mixture of globular proteins isolated from whey, the liquid material created as a by-product of cheese production. कचऱ्यातून कला निर्माण करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी शोधून काढलेला हि एक क्लृप्ति आहे. आणि हे असे प्रथिन दोन हजार ते चार हजार रुपये किलोने विकले जाते आणि हे फक्त जिम मध्ये किंवा त्याचे साहित्य विकणाऱ्या दुकानातच मिळते. कोणताही डॉक्टर आपल्याला हे घ्या म्हणून सांगताना आढळत नाही. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये In 2010 a panel of the European Food Safety Authority examined health claims made for whey protein. For the following claims either no references were provided on the claimed effect, or the provided studies did not test the claims or reported conflicting results: the claims Increase in satiety leading to a reduction in energy intake Contribution to the maintenance or achievement of a normal body weight Growth or maintenance of muscle mass Increase in lean body mass during energy restriction and resistance training Reduction of body fat mass during energy restriction and resistance training Increase in muscle strength Increase in endurance capacity during the subsequent exercise bout after strenuous exercise Skeletal muscle tissue repair Faster recovery from muscle fatigue after exercise. On the basis of the data presented, the 2010 panel concluded that a cause and effect relationship between the consumption of whey protein and these claims had not been established. साधे चणे खाल्ले तरी १०० रुपयात ३८० ग्राम प्रथिने मिळतात(१९ टक्के प्रथिने आणि साधारण ५० रुपये किलो). आणि व्हे प्रोटीन मध्ये तुम्ही १५०० रुपये मोजता ते सुद्धा टाकाऊ पदार्थातून निर्माण केलेले.

In reply to by सुबोध खरे

येस , या विषयीही चर्चा ऐकली आहे पण मग व्हे प्रोटिन्स ला मग पर्याय काय ? साधारण पणे शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोला एक ग्रॅम प्रोटिन घ्या असेच सगळे सांगतात , तेही मसल्स मेन्टेन करायचे असतील तर . वाढवायचे असतील तर २ ग्रॅम. मग माझ्या सारख्याला १२५-१५० ग्रॅम प्रोटिन म्हणजे जवळापास २००-२५० ग्रॅम चिकन किंव्वा अंडी खाण्याशिवाय पर्याय काय ? ( पण आजकाल चिकन अंडी खाताना देखील भिती वाटते . इन्डस्टीयल फार्मिंग बेक्कार आहे , वाढीसाठी , अंडी देण्यासाठी हे हरामखोर लोकं प्राण्यांना हार्मोस देतात म्हणे ! ) किंव्वा मग दुध प्या पण दुधात फॅट्स असल्याने परत मस्लस बिल्डींग ला किती उपयोग ? शिवाय गायीलाही हार्मोन्स देत नसतील कशावरुन ? शिवाय नुकतेच ए१ मिल्क ए२ मिल्क हा प्रकार वाचनात आला , हा काय नवीन झोल आहे देव जाणे ! इतर शाकाहारी पदार्थातील प्रोटिन्स शरीराला लागतात का ? कोणतीही डाळीचे पदार्थ खाल्ले थोडे जरी प्रमाणापेक्षा जास्त खल्ले की गॅसेस होतात हा स्वानुभव आहे ! जास्त सोयाबीन खाऊ नका असे आता सगळेच सांगतात .
कोणताही डॉक्टर आपल्याला हे घ्या म्हणून सांगताना आढळत नाही.
हेही खरे आहे , उलट माझ्या माहीतीतील एका आयुर्वेदीक डॉक्टारांनी व्हे प्रोटिन्स घेवु नका असे स्पष्ट सांगितलेले त्याने किडनीवर ताण पडतो , शिवाय त्या प्रोटिन्स मध्ये इतर काय मिक्स केले आहे हे खात्रीलायक सांगता येत नाही म्हणुन. व्हिटॅमिस च्या धाग्यावर प्रोटीन आणि आहाराची चर्चा हे थोडे विषयांतर होत आहे हे खरे पण हा महत्वाचा विषय आहे म्हणुन विचारत आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

मला B Protein हे माझ्या physiotherapist नी सुचवले होते. एका अपघातात माझ्या मनगटाचा जोड निखळला होता , त्यावर शस्त्रकिया करुन , प्लेटच्या सहाय्याने निखळलेले भाग जोडले गेलेत. पण नुसत्या शस्त्रक्रियेने हे बरे होत नाहीत त्याकरिता physiotherapy लागते. त्यावेळी physiotherapist ने मला सांध्यातील तंतूंची (आता तिने नेमकं काय सांगितलं ते शब्दा आठवत नाही) झीज लवकर भरुन येण्याकरिता B Protein ची भूकटी सुचवली होती. माझ्या मते मला त्याचा फायदा झाला.

In reply to by मराठी कथालेखक

हेमंतकुमार 17/07/2018 - 17:51
बऱ्याच उपयुक्त पोषणघटकांचा मस्त 'मसाला' दिसतोय. त्यात ब १२ आहे की नाही याची माहिती जालावर मिळाली नाही. तुमच्याकडे आहे का ?

In reply to by हेमंतकुमार

या दुव्यावर अधिक माहिती आहे. यावरुन तरी b12 नाहीये असे वाटते, तरी एकदा बरणी वरील माहिती वाचून सांगतो. Calories 6,180 Sodium 31 mg Total Fat 284 g Potassium 1,540 mg Saturated 36 g Total Carbs 852 g Polyunsaturated 58 g Dietary Fiber 114 g Monounsaturated 171 g Sugars 276 g Trans 0 g Protein 114 g Cholesterol 0 mg Vitamin A 34% Calcium 46% Vitamin C 16% Iron 293%

हेमंतकुमार 13/07/2018 - 21:06
तुमच्या प्रतिसादात बऱ्याच मुद्द्यांची सरमिसळ आहे. एकेक दमाने घेतो १. "ब" हे मुळात एक जीवनसत्व नसून ते ८ जणांचे कुटुंब आहे. २. तुमच्या व्यायामासंदर्भात 'ब-१' चा वाटा जास्त आहे. तरुणपणी ते आहारातून घेतले तरी चालेल, गोळ्यांची सक्ती नाही. ३. 'ब-१२ हे म्हातारपणातील हाडांच्या झीजे साठी देतात; तुमच्या बाबत नाही क्रमशः....

हेमंतकुमार 13/07/2018 - 21:30
आता अभावाची लक्षणे बघा: ब-१ : खूप अशक्तपणा, स्नायू दुःखी ब-२: तोंड व जीभेचा दाह ब-१२: हाता पायांना मुंग्या येणे ब१ वर स्वतंत्र लेख पुढे येईलच. तेव्हा अधिक चर्चा करू.

हेमंतकुमार 13/07/2018 - 21:53
अजून एक .. ब च्या गोळ्या गरजेपेक्षा जास्त खाल्ल्या तर लघवी मस्तपैकी जर्द पिवळी होईल, बाकी काय भ्यायचे काम नाही !

In reply to by शाम भागवत

सुबोध खरे 14/07/2018 - 09:37
दूध पाश्चराईज्ड केले की त्यातले ब१२ नष्ट होते. During the pasteurization process there is a minimal loss (approximately 10%) of thiamine and vitamin B12. But because losses are small in comparison to the large amounts of the B vitamins in milk, milk is still considered a source of these nutrients. About 20% of vitamin C is lost during pasteurization, but this loss is not nutritionally significant since milk is not an important source of vitamin C to begin with. https://www.dairynutrition.ca/facts-fallacies/product-quality/raw-milk

In reply to by हेमंतकुमार

शाम भागवत 27/07/2018 - 08:23
मी शाकाहारी असल्याने माझा दुधावर भरवसा होता. तो तुमच्यामुळे परत प्रस्थापित झाला. डॉ. सुबोध खरे व तुम्हाला धन्यवाद.

In reply to by शाम भागवत

हेमंतकुमार 27/07/2018 - 08:28
शाकाहार आरोग्यासाठी चांगलाच असतो. सर्व पोषणघटक मिळतात. अतिशुद्ध शाकाहार मात्र टोकाचे पाऊल वाटते.

@ खांदवेसाहेबः बिस्कीटचा पुडा वा बहुतेक सर्वसामान्य खाद्यपदार्थ हे ड्रग्ज अ‍ॅन्ड कॉस्मेटीक्स अ‍ॅक्टच्या कार्यकक्षेत येत नाहीत. ते अन्न भेसळ प्रतिबंधक आणि नियंत्रण विषयक कायद्याच्या कार्यकक्षेत येतात. त्यात जाहीर केलेल्या पदार्थांच्या +_ मर्यादा किती आहेत ठाऊक नाही. परंतु विविध घातक रसायनांचा उदा हेवी मेटल्स, विविध विषारी कार्बनी पदार्थ यांचा अंतर्भाव विशिष्ट मर्यादेच्या बाहेर नाही हे तपासून पाहणे हा मुख्य उद्देश असावा. जाहीर केलेले पदार्थ हे फक्त एकदाच तपासून पाहिलेले असतात की दर बॅचमध्ये तपासले जातात हे ठाऊक नाही. तसे ते बहुधा आढळणारच. जसे गव्हातून बिस्कीटात ब जीवनसत्व येणे. फक्त भाजण्यासारख्या प्रक्रियेत प्रमाण कमी होईल. पण जाहीर घटकांच्या मर्यादेची शिथिलता किती आहे ५-१० टक्के की २० टक्के यासंबंधी अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यात उल्लेख नसल्यास उत्पादक कायद्यात सापडणार नाही. असली तरीही मर्यादेचे उल्लंघन झाल्यास होणारी अन्न निरीक्षकाची कारवाई कोणताही शहाणा उत्पादक ओढवून घेणार नाही. शिवाय उत्पादनाची प्रतिष्ठा, ब्रॅन्ड व्हॅल्यू कोणीही निष्कारण पणाला लावणार नाही.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 14/07/2018 - 09:53
कोणत्याही अन्नपदार्थात असलेले पोषक घटक हे त्याच्या कच्च्या मालात नव्हे तर जे उत्पादन विकले जाते त्यात असणे आवश्यक आहे. याच्या प्रत्येक घटकाचे पृथक्करण करून त्याचे प्रमाण ठरवलेले असते. उदा. येथे बी १२ जीवनसत्वाचे पृथक्करण करायचे असेल तर १० ग्रामचे बिस्कीट पाण्यात पूर्ण विरघळवून त्या पाण्याचे स्पेकट्रोफोटोमीटर मध्ये प्रमाणित बी १२ च्या द्रावणाशी तुलना करून प्रमाण ठरवता येते. किंवा एलिसा Enzyme-linked immunosorbent assay या तंत्राने अन्न घटकातील बी १२ चे प्रमाण ठरवता येते http://www.rapidtest.com/index.php?i=Food-ELISA-test-kits&id=196&cat=104 किंवा NMR SPECTROSCOPY या तंत्राने त्यातील कोबाल्टचे प्रमाण ( बी १२ म्हणजे सायनोकॉबालमिन हे कोबाल्टचे एक संयुग आहे) ठरवता येते. आणि या कोबाल्टच्या प्रमाणावरून त्यातील बी १२ ची मात्र ठरवता येते.

हेमंतकुमार 14/07/2018 - 11:15
या लेखमालेदरम्यान खाद्यान्नातील “जीवनसत्वांचा उष्णतेने होणारा नाश (heat stability )” हा मुद्दा चर्चेत येणार आहे. हा विषय रसायनशास्त्राच्या अखत्यारीत येतो. वरवर गुगलून येणारे संदर्भ वाचून नीटसे समजत नाही. काहीसा गोंधळही होतो. तरी आपले अनुभवी मत वाचायला आवडेल.

या विषयावरील माझा अनुभव शून्य आहे. माझ्या सर्वसामान्य नजरेतून प्रामुख्याने घटकांच्या विघटनासाठी तीन घटक कारण असलेले दिसतात. १. भोवतालचे माध्यम (गोळी मध्ये स्टार्च, टाल्कम, इ. द्रव्ये, प्यावयाच्या औषधात पाणी, अल्कोहोल, साखर इ. द्रव्ये, पेरेन्टरल्समध्ये मॅनिटॉलसारखी द्रव्ये आणि पीएच राखण्यासाठी घातलेली द्रव्ये) तापमान आणि आर्द्रता. २. विशिष्ट सहघटकांचे अस्तित्त्व. घटकांचे स्थैर्य दोन प्रमुख कारणांमुळे धोक्यात येऊ शकते. १. उष्णतेमुळे वाफ होऊन उडून जाणे. २. उष्णता, प्रकाश, आर्द्रता वा इतर कारणांमुळे रेणूंचे विघटन होणे. जसे अ‍ॅस्पिरीनच्या बाबतीत अ‍ॅसिटाईल सॅलिसायलीक अ‍ॅसिडचे पाण्याच्या रेणूमुळे हायड्रोलायसीस होऊन सॅलिसायलिक अ‍ॅसिड हे घातक द्रव्य तयार होणे. व्हिटॅमीन अ चा उष्णतेमुळे र्‍हास होतो असे वाचल्याचे आठवते परंतु कायिक की रासायनिक आणि रासायनिक असेल तर रासायनिक सूत्रे आठवत नाहीत. एका कंपनीत केलेला एक अभ्यास आठवतो. त्यांनी जुनी तीन वर्षांपूर्वीची कन्ट्रोल सॅम्पल्स काढून त्यांच्या चाचण्या घेतल्या होत्या. %ज र्‍हास काढून टाईम स्केलवर ग्राफ काढला होता. आणि नंतर नवीन उत्पादन ४५ अंश सें तापमानात अतिआर्द्रतेसाठी डब्यात पाणी घालून सील करून ठेवली होती (अ‍ॅक्सीलरेटेड डायनॅमिक कन्डीशन्स). नंतर दर तीन महिन्याने ते (या स्टोरेज कन्डीशन्समधल्या नमुन्यांच्या) चाचण्या घेऊन निष्कर्ष काढणार होते. र्‍हासाची टक्केवारी नंतर त्यांनी अभ्यासली असेलच. निष्कर्ष बहुधा खाजगी असलयामुळे मी त्यात कुतूहल वाटूनही फाजील स्वारस्य दाखवले नव्हते. गुगलून बघितल्यावर In general, many physical and chemical factors can have a negative effect on stability of vitamins. Water-soluble vitamins are prone to degradation in solutions, particularly when exposed to light. B Vitamins are sensitive to factors such as: light, heat, moisture, oxidizing and reducing agents, acids and or bases. There is plenty of literature concerning the poor stability of vitamin B12 and it has been reported that the optimum pH for stability of this vitamin is 4-6.5 pH value.2-13 It is well known that aqueous solutions of cyanocobalamin are photoliable and some B and C vitamins accelerate the photodegradation. हा प्रमुख निष्कर्ष आढळला. सर्वसामान्यांसाठी (डॉक्टर्ससाठी नाही) तात्पर्य काय तर प्यावयाचे जीवनसत्त्वांचे अर्भकासाठींचे थेंब आणि छोट्यांसाठीचे औषध हे गडद रंगाच्या बाटलीतले असावे, थंड, कोरड्या जागी प्रकाशापासून दूर ठेवावे आणि डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण झाल्यानंतर फेकून द्यावे. एक्सपायरी तारीख पुढची असली तरी उघडलेली बाटली कोर्स पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा वापरायची गरज पडल्यास नवे औषध आणावे. मोठ्यांनी गोळ्यास खाव्यात आणि प्यावयाचे औषध लिहून द्या असा डॉ. कडे हट्ट धरू नये. असो. लेखक डॉक्टरसाहेब आपली जिज्ञासा पूर्ण करू शकेल असा अनुभव माझ्यापाशी नसल्यामुळे मनात निराशा दाटली.

In reply to by सुधीर कांदळकर

खिलजि 17/07/2018 - 19:00
मला हा प्रतिसाद आवडला सुधीरसाहेबांचा . मी स्वतः अस्पिरीनवर काम केलेले आहे . ते एका ठराविक तापमानावरच नियंत्रि राहते अन्यथा त्याचे त्वरित सॅलिसिलिक ऍसिडमध्ये रूपांतर होते . सुमारे २०१० मध्ये हा प्रोजेक्ट आला होता आणि मी स्वतः त्यावर काम करत होतो . जवळजवळ सहा महिने काम झाल्यावर आम्हाला असे आढळले कि एका नियंत्रित तापमानात आणि एका विशिष्ट सामूमध्येच ऍस्पिरिन राहू शकतो . आता सांगायची गोष्ट अशी कि आम्ही आमच्या परीने तो प्रोजेक्ट पूर्ण केला आणि सूपूर्दही केला आणि नंतर तो एफ दि ए ला मान्यही झाला . सांगायची मेख अशी कि ऍस्पिरिन जो घेत असेल त्याने जर ते व्यवस्थित शीतकपाटात ठेवले नाही तर सर्व गोंधळच आहे . तो नक्की काय खात असेल ऍस्पिरिन कि त्याचा मेटॅबोलाईट सॅलिसिलिक ऍसिड हा देखील संशोधनाचा मुद्दा आहे .

In reply to by खिलजि

सुबोध खरे 17/07/2018 - 20:39
मुळात ऍस्पिरिन हे ऍसेटील सॅलिसिलिक ऍसिड आहे. ते तयार करतात ते सुद्धा सॅलिसिलिक ऍसिड आणि ऍसेटिक ऍनहायड्राइड याच्या संयोगाने. ते जठरात / आतड्यात/ यकृतात सॅलिसिलिक ऍसिड मध्ये आणि ऍसेटिक ऍसिड मध्ये विघटन पावते. सॅलिसिलिक ऍसिड हेच मुळात औषध आहे. त्यामुळे जरी ऍस्पिरिन विघटन पावलेले असले तरी मागे राहणाऱ्या सॅलिसिलिक ऍसिडमुळे रुग्णाला फायदा सुद्धा मिळतोच. फरक एवढाच आहे कि नुसत्या सॅलिसिलिक ऍसिडमुळे जठराचा दाह ऍस्पिरिनपेक्षा जास्त होतो

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 17/07/2018 - 20:40
Aspirin is used in the treatment of mild to moderate pain, inflammation, and fever. It is also used as an antiplatelet agent to prevent myocardial infarction, stroke and transient ischemic episodes. Aspirin is absorbed rapidly from the stomach and intestine by passive diffusion. Aspirin is a prodrug, which is transformed into salicylate in the stomach, in the intestinal mucosa, in the blood and mainly in the liver. Salicylate is the active metabolite responsible for most anti-inflammatory and analgesic effects (but acetylsalicylate is the active moiety for the antiplatelet-aggregating effect). Gastrointestinal intolerance to salicylate observed in some patients has prompted the development of formulations with enteric coating. Salicylate distributes rapidly into the body fluid compartments. It binds to albumin in the plasma. With increasing total plasma salicylate concentrations, the unbound fraction increases. Salicylate may cross the placental barrier and distributes into breast milk. https://sepia.unil.ch/pharmacology/index.php?id=83

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार 17/07/2018 - 21:06
एक विनंती… चर्चेदरम्यान जालावरचे इंग्लिश परिच्छेद इथे जसेच्या तसे डकवणे टाळल्यास बरे होईल अपरिहार्य तांत्रिक शब्द वगळता मराठीतच लिहावे ही विनंती. आपल्या संस्थळाचे मराठीपण आपणच जपूयात. धन्यवाद

हेमंतकुमार 15/07/2018 - 08:10
आपण कोणीच परिपूर्ण नाही. जे काही अनुभवाचे बोल असतात ते एकमेकास जरूर सांगायचे. काही विषय हे २-३ ज्ञानशाखांच्या सीमेवरील असतात. तिथे वाचकाच्या प्रत्येक शंकेला एकच तज्ञ उत्तर नाही देऊ शकत. दरवेळेस त्या ‘गुगलराजा’तून बोध होतोच असे नाही. तेव्हा एकमेकांची मदत घेण्यात आनंद वाटतो. धन्यवाद !

खिलजि 17/07/2018 - 18:50
कुमारसाहेब आपले लेख फारच छान असतात . मला खरंच खूप खूप आवडतात . मुळात आपली लेखन शैली इतकी सहज आहे कि मी ते व्यवस्थितपणे माझ्या बायकोला देखील समजावून सांगू शकतो . मागे मी नमूद केल्याप्रमाणे हे आपले लिखाण म्हणजे एक उत्कृष्ट समाजसेवा आहे असे माझे पक्के मत बनत चाललेय . धन्यवाद कुमारसाहेब

In reply to by खिलजि

हेमंतकुमार 17/07/2018 - 19:11
तुमचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन माझ्या भावी लेखनासाठी उर्जा पुरवते. तुमच्यासारख्या अभ्यासू वाचकांच्या सहभागानेच ही चर्चा परिपूर्ण होते.

ट्रेड मार्क 20/07/2018 - 02:48
आणि चांगली माहिती आहे. दुकानात मिळणाऱ्या गोळ्या किंवा द्रावण स्वरूपातील व्हिटॅमिन बी१२ मध्ये दोन वेगवेगळे मूलभूत घटक असतात. जे सर्वसाधारण सहज आणि कमी किमतीत उपलब्ध असते त्यात Cyanocobalamin असते. हे प्रयोगशाळेत तयार केलेले बी१२ आहे. तर दुसऱ्या प्रकारात Methylcobalamin असते जे प्राकृतिक स्वरूपात मिळवले जाते असे म्हणतात. त्यामुळे याची किंमत थोडी जास्त असते. या दोन्हीपैकी कुठलं चांगलं यावरून डॉक्टर मंडळींमध्ये मतभिन्नता आहे. डॉ. कुमार, डॉ. खरे किंवा मिपावर अजून कोणी औषधशास्त्रातले असतील त्यांनी कृपया यावर थोडी अधिक माहिती द्यावी.

In reply to by ट्रेड मार्क

सुबोध खरे 20/07/2018 - 09:20
सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दोन्हीच्या कार्यक्षमते मध्ये फारसा फरक नाही. दोनातील कोणतेहि द्रव्य घ्या. काही फरक पडणार नाही. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5370327/

हेमंतकुमार 20/07/2018 - 08:01
Methyl C हे प्रत्यक्ष पेशींत काम करणारे सह-एंझाइम आहे. त्यामुळे वरवर पाहता ते श्रेष्ठ असेल असे वाटते. तरी पण दोहोंची तुलना करण्यासाठी औषध शास्त्रातील व्यक्ती चे मत घ्यावे लागेल.

Rajesh188 28/04/2019 - 09:27
वर्णनाच्या सुलभतेकरिता जीवनसत्त्वांचे विद्राव्यतेप्रमाणे वर्गीकरण सर्वसामान्य झालेले आहे. परंतु ते अगदी काटेकोर आहे असे नव्हे. कारण काहींची विद्राव्यता मेद व जल या दोन्हींतही आढळली आहे. ‘जलविद्राव्य ब’ हा एकच पदार्थ नसून आणखी काही विशिष्ट पदार्थांचा मिळून बनल्याचे समजल्यानंतर त्याला ‘जीवनसत्त्व ब समूह’ असे नाव मिळाले. या समूहास थायामीन (ब१ जीवनसत्त्व किंवा ॲन्युरीन), रिबोफ्लाविन (ब२ जीवनसत्त्व ), निॲसीन (निॲसीनामाइड किंवा निकोटिनिक अम्ल), ब६ जीवनसत्त्व, पँटोथेनिक अम्ल, बायोटीन, फॉलिक अम्ल, ब१२ जीवनसत्त्व, इनॉसिटॉल, कोलीन इ. पदार्थांचा समावेश होतो. या लेखात फक्त प्रचलित नावांचाच उल्लेख करण्यात आला आहे.

हेमंतकुमार 28/04/2019 - 09:58
जीवनसत्वांच्या ‘ब’ गटात एकूण ८ घटक आहेत : थायमिन, रिबोफ्लाविन, निअसीन, पायरीडोक्सीन, बायोटीन, pantothenic acid, फोलिक a व कोबालामीन. इनॉसिटॉल व कोलीन यांना जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत स्थान दिलेले नाही. असे बरेच पदार्थ ‘जीवनसत्वासारखे’ (vitamin-like sub.) म्हणून ओळखले जातात. त्यांची यादी बरीच आहे. एकूण अधिकृत जीवनसत्वे १३ च आहेत. ( ‘ब’ गटाची ८, क आणि अ, ड, इ आणि K).

हेमंतकुमार 14/11/2022 - 12:33
B12 च्या उपयुक्ततेसंबंधी नवे संशोधन सतत चालू असते. अलीकडच्या काही संशोधनानुसार या जीवनसत्त्वाचा खालील आजारांमध्ये उपयोग होऊ शकतो: विषाणू संसर्ग : पूरक उपचार पार्किन्सन आजार: प्रतिबंधात्मक उपचार

अनुप ढेरे 12/07/2018 - 12:32
मला एक शंका आहे. आपल्याला महिती नाहीत/सापडली नाहीत अशी व्हिटामिन्स असण्याची शक्यता किती? आजकाल व्हिटामिन्सच्या गोळ्यांनी सर्व विटामिन्स मिळतील असं म्हटलेलं वाचलं जातं. जर आपल्याला माहिती नाहीत अशी व्हिटामिन्स असतील तर गोळ्यांवर अवलंबुन रहाणं धोक्याचं असेल असं वाटतं.

हेमंतकुमार 12/07/2018 - 13:03
अनुप, चांगला प्रश्न. १९४८ मध्ये ब-१२ च्या शोधानंतर कुठल्याही पदार्थाला जीवनसत्वाचा दर्जा दिला गेलेला नाही. तरीसुद्धा किमान एक डझन पदार्थ तरी या प्रतीक्षा यादीत नंबर लावून आहेत ! सध्या त्यांना “जीवनसत्वासारखे” इतपत म्हटले जाते. आता जीवनसत्वे आहारातून आणि गोळ्यांतून हा मुद्दा. आहारातून कधीही श्रेष्ठ. आहारातून जेव्हा तुम्ही एखादे जीवनसत्व घेता त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित त्याच जातकुळीतले इतर पदार्थ (Vitamers) सुद्धा मिळतात. उलट गोळीतून मिळणारे जीवनसत्व हे ‘शुद्ध’ एकच रसायन असते. तेव्हा एकूण पचन उत्तम असेल व वृद्धावस्था वगळता आहारच उत्तम. विशिष्ट परिस्थितींत (गर्भावस्था, तान्हुलेपण, इ.) गरज खूप असते तेव्हा तेवढ्यापुरत्या गोळ्या द्याव्यात. अभावाचा आजार असता मात्र गोळ्याच.

लई भारी 12/07/2018 - 14:41
मालिका चांगली होत आहे. अनुक्रमणिका झाल्यास बरे पडेल.
याउलट ‘संपन्न’ खाद्यांतले अथवा गोळ्यांच्या रुपातले ब-१२चे व्यवस्थित शोषण होते.
म्हणजे आधी आहाराच्या बाबतीत सांगितलेली गुंतागुंत इथे लागू नाही का? वरती सांगितलेला 'आहारातून कधीही श्रेष्ठ.' हा मुद्दा अगदी पटला. माहितगार साहेबांच्या धाग्यातून पण चांगली माहिती मिळाली. मांसाहारी बद्दल एक डॉक्टर म्हणाले होते कि तुम्ही अगदी दररोज मांसाहार करत असाल तरच तुम्हाला कमतरता असणार नाही, अन्यथा लक्ष ठेवा आणि एकदा कमतरता जाणवल्यावर पहिल्या फेरी नंतर वर्षभराने परत औषध/इंजेक्शन घेणे सोईस्कर. शास्त्रीय दृष्ट्या अगदी बरोबर नसेल पण ढोबळमानाने 'आपण मांसाहारी म्हणजे बी-१२ ची कमतरता नाही' असा समज करून घेऊन नये. टेस्टचा खर्च पाहता, हे व्यावहारिक वाटते. डॉ. खरे यांनी पण वरील धाग्यात हाच मुद्दा सांगितला होता.

मंजूताई 12/07/2018 - 14:48
नेहमीप्रमाणे उपयुक्त लेख ! डाॅ तुम्ही म्हणता कुठलही जीवनसत्वे आहारातून घेणे योग्य आहे आणि शिळ्या अन्नातून मिळतं .... ह्यावर सविस्तर लिहा खासकरून जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी....

हेमंतकुमार 12/07/2018 - 14:57
म्हणजे आधी आहाराच्या बाबतीत सांगितलेली गुंतागुंत इथे लागू नाही का? >>> पुन्हा एकदा बघा. तरुण व्यक्ती, पचन उत्तम अशा वेळी आहार उत्तम. पण म्हातारपण, त्यामुळे होणारी जठराची झीज यांत अन्नातले ब-१२ शोषले जात नाही. त्यांनाच कृत्रिम पर्याय. शिळ्या अन्नातून मिळतं .. >>> यात जीवाणूंची वाढ होते जे ब -१२ तयार करतात. त्यातून काही प्रमाणात मिळेल. दुग्धजन्य खात असल्यास फार चिंता नको. रोजची गरज अवघी २-३ मायक्रोग्रॅम आहे.

श्वेता२४ 12/07/2018 - 15:42
तेव्हा तथाकथित ‘शाकाहारी’ हे दूध वा दुग्धजन्य पदार्थ खात असतात आणि त्यातून ब-१२ मिळते. त्याची रोजची गरज काही मायक्रोग्रॅम इतकीच आहे. वर आपल्या यकृतात त्याचा भरपूर साठा होत असतो. साधारणपणे हा साठा आपल्या ५ वर्षांच्या गरजेइतका असतो. तेव्हा व्हेगन शैली आचरणात आणल्यानंतर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील. जर माझ्या रोजच्या आहारात दुध, ताक, दही, हे कम्पल्सरी असंलच तर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील का

हेमंतकुमार 12/07/2018 - 16:39
ती लक्षणे व्हेगन च्या बाबतीत म्हटले आहे. हे लोक दूध सुद्धा घेत नाहीत. तुम्ही दुग्धजन्य शाकाहारी असणार, तेव्हा चिंता नको.

In reply to by श्वेता२४

अनुप ढेरे 12/07/2018 - 16:59
ते लोक कोणतेच प्राणीज पदार्थ खात नाहीत. मांस/अंडी तर नाहीच पण दुधाचे पदार्थदेखील खात नाहीत. मधपण खात नाहीत बहुधा.

In reply to by अनुप ढेरे

हेमंतकुमार 12/07/2018 - 17:42
या निमित्ताने आहारशास्त्रानुसारचे वर्गीकरण लिहितो. ते रोचक आहे. मूळ इंग्लिश शब्द अर्थवाही असल्याने तेही लिहितो: १. vegan : अतिशुद्ध शा. हे फक्त भाजीपालाच खाणार. २. Lactovegetarian ; दूध पिणारे शा. ३. Ovovegetarian : अंडे खाणारे शा. ४. Lactoovovegetarian : दूध व अंडे दोन्ही खाणारे शा.

हेमंतकुमार 12/07/2018 - 17:34
“ब-१७” हे अजिबात अधिकृत जीवनसत्व नाही. त्याच्या कर्करोगातील उपयुक्ततेबाबत उलटसुलट मते आहेत. एका अमेरिकी आहार संघटनेने तर ते धुडकावून लावले आहे. तेव्हा माझ्या मते त्यावर चर्चा नको.

मस्तं चालली आहे लेखमाला. मिपाकरांचे प्रतिसाद आणि चर्चा पाहता, बर्‍याच जणांना या विषयात रस आहे आणि खूप जणांना उपयुक्त... आणि मुख्य म्हणजे खात्रीशीर... माहिती मिळत आहे. हा स्पृहणिय उपक्रम असाच चालू ठेवा.

' ब-१२ ची रक्तपातळी : अलीकडे ही पातळी चाळणी चाचणी म्हणून बरीच चर्चेत असते. पण या चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे. पण अशा सरसकटीकरणाला तसा अर्थ नाही ' वेगवेगळे निष्कर्ष येण्याचे कारण प्रत्येक ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या मशीन्स हे होय , आणि त्या मशीन्स प्रमाणीकरण करण्याची कुठलीही पद्धत आपल्याकडे तरी अस्तित्वात नाही . रस्त्यावर शेकडो पंचर वाले हातातील गेज मीटर ( +/ - २० दाखवू शकतो ) ने आपल्या गाडीतील हवा चेक करत असतो आणि बरेचसे लोक त्या गेज मीटर वर विश्वास ठेवून ( जीव धोक्यात घालून ) गाड्या हाकत असतात .त्यातलाच प्रकार आहे हा .

सुबोध खरे 13/07/2018 - 09:42
त्या मशीन्स प्रमाणीकरण करण्याची कुठलीही पद्धत आपल्याकडे तरी अस्तित्वात नाही . हि वस्तुस्थिती नाही. कारण कोणत्याही रक्त निदान यंत्राचे प्रमाणीकरण अतिशय सोपे आहे. बी १२ जीवनसत्व असलेला प्रमाणित द्रव standardised solution उदा. एका मिलिलिटर मध्ये १० मायक्रोग्रॅम जीवनसत्व असलेला या यंत्रात तपासला जातो. त्यात समजा ९ मायक्रोग्रॅम जीवनसत्व आढळले तर ते यंत्र परत जुळवले जाते ( adjust) आणि परत हा १० मायक्रोग्रॅम असलेल्या प्रमाणित द्रवाची चाचणी घेतली जाते. हि चाचणी अचूक येईपर्यंत असे यंत्राचे प्रमाणीकरण केले जाते. NABL (National Accreditation Board for Laboratories) या राष्ट्रीय प्रमाणीकरण संस्थेच्या मानकाप्रमाणे प्रत्येक १०० चाचण्यांनंतर असे प्रमाणीकरण आवश्यक आहे. असे accreditation करून घेण्यासाठी त्या निदान केंद्राला फार कठीण परीक्षेतून जायला लागते. हा प्रमाणित द्रव महाग असतो शिवाय हा चाचणी संच( test kit) पण महाग असतो. यामुळे या चाचण्या महाग असतात. आपल्याला कोणत्याही रक्त चाचणीचे निदान अचूक हवे असेल तर या चाचण्या NABL accredited laboratory मधून करून घ्याव्यात.

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार 13/07/2018 - 10:02
दोन "कोपर्‍यावरच्या प्रयोगशालांचे" निष्कर्ष जुळणार नाहीत. तसेच या पद्धतींत सतत नवे संशोधन होत असते. त्यामुळे प्रगत देशातली अत्याधुनिक आणि आपल्याकडची पद्धत यानुसारही फरक पडतो.

In reply to by सुबोध खरे

म्हणजे त्या प्रमाणित द्रवा मूळे विश्वास ठेवायला जागा आहे . आपल्या कडे अचूक निदान होऊ शकते पण नेहमी प्रमाणे ते तंत्रज्ञान ग्राऊंड लेव्हल वर उपलब्ध नाही अशी शक्यता वाटते . म्हणजेच मध्यमवर्गीय व गरीब जमात यांच्या रक्तचाचण्या निष्कर्षा मध्ये मटकेबाजी फुल ला वाव आहे . ग्राहकांच्या जीवा ची काळजी घेणारे वजन माप खाते स्वतःची कुठलीही लॅब नसतांना फुड प्रोसेसिंग कारखान्याच्या मशिनरीज चे धडाधड दरवर्षी नुतनीकरण प्रमाणपत्र देत असतच की .

सुबोध खरे 13/07/2018 - 11:38
साधारण पणे NABL accredited laboratory अशा भंपक गोष्टी करणार नाही. कारण एवढ्या कष्टाने मिळवलेले आपले प्रमाणीकरण( accreditation) घालवणे त्यांना परवडणार नाही. परंतु आपली भारतीय मनोवृत्ती अशी आहे कि अशी प्रमाणित प्रयोगशाळा महाग आहे म्हणून कोपर्यावरची कुणी तरी टाकलेली प्रयोगशाळाच बघा म्हणजे स्वस्तात काम होईल.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 13/07/2018 - 15:18
मला वाटते कोपर्‍यावरच्या प्रयोगशाळातही प्रमाणित आणि रास्त दरात चाचण्या उपलब्ध करुन दिल्या जाण्यास हरकत नसावी. मेडीकल स्टोअर्स पर्यंत नियंत्रणे आणली जाऊ शकतात तर शासकीय यंत्रणांनी सर्व प्रयोगशाळा प्रमाणितच असतील याची खबरदारी घ्यावयास हवी. अर्थात तुमचे म्हणणेही बरोबर आहे, मी माझ्या एका कोपर्‍यावरच्या केंद्रास भेट दिली तर तेथील रक्त घेणारा मुलगा चक्क अनट्रेन्ड होता !

लेख आवडलाच. नेहमीप्रमाणे माहितीत भर टाकणारा लेख. १. वजने मापे खाते हे मुख्यता ग्राहक कायद्याखाली तयार उत्पादनाच्या वजनमाप प्रमाणासाठी आहे. बरोबर दहा गोळ्या किंवा १०० मिली व्गैरे औषध आहे की नाही एवढीच पूर्तता असते. २. औषध उत्पादक कारखान्यात चाचणी यंत्राचे कॅलिब्रेशन हे कारखान्यातलाच क्यूसी वा क्यूए चा सरकारमान्यताप्राप्त तांत्रिक अधिकारी =अ‍ॅप्रूव्हड टेक्निकल स्टाफ करतो. त्यासाठी स्टॅन्डर्ड सोल्यूशन बनवण्यासाठी वापरायचे रसायन (इथे - बी१२) हे सरकारमान्य प्रयोगशाळेतून मागवावे लागते. फक्त पुणे, अहमदाबाद, कलकत्ता इ. मोजक्याच ठिकाणी या प्रयोगशाळा आहेत. हे कॅलिब्रेशन किमान दरवर्षी करून त्याचे अभिलेख तसेच स्टॅन्डर्ड रसायनाचा हिशेबही ठेवावा लागतो व ते फक्त कॅलिब्रेशनसाठीच वापरायचे असते. ड्रग्ज आणि कॉस्मेटीक्स अ‍ॅक्ट आणि त्याखालील अधिनियमांनुसार हे प्रोटोकॉल्स ठेवावे लागतात. कारखान्याच्या स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसीजरमध्ये तसा याचा उल्लेख असतो. सोबत गॅरट, मार्टींडेल इ. संदर्भग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. यात गडबड झाल्यास कारखान्याचा मान्यताप्राप्त तांत्रिक अधिकारी जबाबदार असतो. सरकारी ड्रग इन्स्पेक्टर दरवर्षी किमान एकदा प्रत्येक कारखान्याचे तपासणी निरीक्षण करतो व पृष्ठांकित तीन प्रतीच्या निरीक्षण नोंदवहीत नोंदी करतो. नोंदीखाली निरीक्षकाच्या सहीसोबत कारखान्याच्या तांत्रिक अधिकार्‍याची देखील सही असते. जेणेकरून कारखाना ती निरीक्षणे नाकारू शकत नाही. मागील तृटींच्या पूर्ततेचा आढावा घेऊनच नव्या तपासणी निरीक्षणास सुरुवात करतो. बाजारातून विविध औषधांचे नियमितपणे नमुने घेऊन सरकारी प्रयोगशाळेत तपासले जातात. तपासणीत गडबड आढळल्यास औषध निरीक्षकाला तो औषधविभाग ताबडतोब बंद करण्याचे अधिकार आहेत. त्यामुळेच बाजारातील औषधात सहसा गडबड आढळत नाही.

In reply to by सुधीर कांदळकर

सुधीर साहेब , थोडं विषयांतर होईल पण , पॅक केलेल्या बिस्कीट च्या वेष्टनावर त्या वस्तू च्या वजनात टोटल किती calcium , calories , fat , iron व्हिटॅमिन्स ब1 पासून ब12 , folic acid वैगेरे चें प्रमाण छापलेले असते तर मला नेहमी प्रश्न पडतो की तो बिस्कीट चा पुडा लॅब मध्ये पाठवून वरील सर्व प्रमाण चेक करता येत का ? लॅब मध्ये तशा सुविधा असतात का ?. तसच औषधी गोळ्यांचे छापलेले कंटेंट्स त्या पाकिटातील गोळ्या काढून त्यातील कंटेंटस लॅब मध्ये चेक करता येतात का ? म्हणजे ती वस्तू बाजारात आल्यानंतर तपासण्याची सोय असते का ?. मध्यंतरी स्कोडा कंपनी ने त्याच्या गाडी च्या सॉफ्टवेअर मध्ये काहीतरी फेरफार करून विकल्या होत्या , त्या गाड्या प्रदूषण चाचणीत ओके दिसायच्या पण वास्तवता खूप प्रदूषण करायच्या म्हणून स्कोडा ला करोडो डॉलर्स चा दंड भरावा लागला , अशी काहीतरी केस वाचनात आली होती तेव्हां पासून पॅक वस्तू च्या न्युट्रीशिएन माहिती बद्दल त्या वस्तूवर किती विश्वास ठेवावा प्रश्न पडतो .

In reply to by सुधीर कांदळकर

Rajesh188 27/04/2019 - 17:46
ECG करताना छातीवर ज्या वायरी चिकटून ठेवतात त्यातील काही loose aahet he सांगून सुद्धा दुर्लक्ष करून report दिला गेला तर report मध्ये heart मध्ये प्रॉब्लेम आहे असा निष्कर्ष निघाला मी परत दुसऱ्या लॅब मध्ये सर्व वायर फिट बसवण्याचा हट्ट थरला आणि report normal आला

ते अस्थिजनक पेशींच्या योग्य वाढीसाठी मदत करते.
ह्या विषयी थोडी अजुन माहीती हवी आहे ! मी अ‍ॅक्टीव्हली जिम करत होतो तेव्हा व्हे प्रोटीन रेकमेन्ड केले होते जिम ट्रेनर ने ( शरीराच्या वजनाच्या प्रति किलो ला एक ग्रॅम ) पण दुसर्‍या मित्राने सांगितले की शरीरात व्हिटॅमिन बी नसेल तर प्रोटीन डायजेस्ट होणार नाहीच, प्रोटीन अ‍ॅब्सॉर्प्शन आणि मसल रिक्व्हरी साठी काही व्हिटॅमिन बी घेणे आवश्यक आहे ! बीकोस्युल किंव्वा तत्सम काही. हे कितपत सत्य आहे ? खरे असल्यास अ‍ॅक्टीव्ह वर्काऊट करत असतना ( म्हणजे आठवड्यातील ५-६ दिवस नित्यनेमाने १ ते दीड तास स्ट्रेचनस वर्काऊट) किती व्हिटॅमिन बी घेणे आवश्यक आहे ? बी व्हिटॅमिन कमी पडत असल्याची किंव्वा जास्त झाल्याची लक्षणे कोणती ? ( नखाच्या इथली सालं निघणे आणि तोंड येणे ही डिफिशियन्शी ची लक्षणे आहे असे ऐकुन आहे हे खरे आहे का ? )

In reply to by प्रसाद गोडबोले

सुबोध खरे 14/07/2018 - 10:19
मी अ‍ॅक्टीव्हली जिम करत होतो तेव्हा व्हे प्रोटीन रेकमेन्ड केले होते जिम ट्रेनर ने व्हे प्रोटीन हे साध्या दुधापेक्षाकिंवा कोणत्याही प्रथिन युक्त अन्न पदार्थापेक्षा जास्त चांगले आहे या विधानाला कोणताही शास्त्रीय पुरावा मला तरी आढळलेला नाही. (आमच्या बायकोला तिच्या जिमच्या इन्स्ट्रक्टर ने ५०० रुपयाला चुना लावला ते पाहून माझे डोके ठणकले होते म्हणून मी बऱयापैकी वाचन केले होते) कारण मुळात कोणतेच प्रथिन हे तसेच्या तसे शरीरात शोषले जात नाही. त्याचे मूळ अमायनो ऍसिड मध्ये पचन होणे आवश्यक आहे. व्हे प्रथिन पचायला हलके आहे असेही नाही. मग सर्वत्र जिम मध्ये व्हे प्रोटीन घ्या हा आग्रह का होतो याचा विचार करा. व्हे प्रोटीन हे चीज तयार करताना बाकी राहिलेल्या टाकाऊ द्रव पदार्थात (WASTE PRODUCT) असलेले प्रथिन आहे. Whey protein is a mixture of globular proteins isolated from whey, the liquid material created as a by-product of cheese production. कचऱ्यातून कला निर्माण करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी शोधून काढलेला हि एक क्लृप्ति आहे. आणि हे असे प्रथिन दोन हजार ते चार हजार रुपये किलोने विकले जाते आणि हे फक्त जिम मध्ये किंवा त्याचे साहित्य विकणाऱ्या दुकानातच मिळते. कोणताही डॉक्टर आपल्याला हे घ्या म्हणून सांगताना आढळत नाही. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये In 2010 a panel of the European Food Safety Authority examined health claims made for whey protein. For the following claims either no references were provided on the claimed effect, or the provided studies did not test the claims or reported conflicting results: the claims Increase in satiety leading to a reduction in energy intake Contribution to the maintenance or achievement of a normal body weight Growth or maintenance of muscle mass Increase in lean body mass during energy restriction and resistance training Reduction of body fat mass during energy restriction and resistance training Increase in muscle strength Increase in endurance capacity during the subsequent exercise bout after strenuous exercise Skeletal muscle tissue repair Faster recovery from muscle fatigue after exercise. On the basis of the data presented, the 2010 panel concluded that a cause and effect relationship between the consumption of whey protein and these claims had not been established. साधे चणे खाल्ले तरी १०० रुपयात ३८० ग्राम प्रथिने मिळतात(१९ टक्के प्रथिने आणि साधारण ५० रुपये किलो). आणि व्हे प्रोटीन मध्ये तुम्ही १५०० रुपये मोजता ते सुद्धा टाकाऊ पदार्थातून निर्माण केलेले.

In reply to by सुबोध खरे

येस , या विषयीही चर्चा ऐकली आहे पण मग व्हे प्रोटिन्स ला मग पर्याय काय ? साधारण पणे शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोला एक ग्रॅम प्रोटिन घ्या असेच सगळे सांगतात , तेही मसल्स मेन्टेन करायचे असतील तर . वाढवायचे असतील तर २ ग्रॅम. मग माझ्या सारख्याला १२५-१५० ग्रॅम प्रोटिन म्हणजे जवळापास २००-२५० ग्रॅम चिकन किंव्वा अंडी खाण्याशिवाय पर्याय काय ? ( पण आजकाल चिकन अंडी खाताना देखील भिती वाटते . इन्डस्टीयल फार्मिंग बेक्कार आहे , वाढीसाठी , अंडी देण्यासाठी हे हरामखोर लोकं प्राण्यांना हार्मोस देतात म्हणे ! ) किंव्वा मग दुध प्या पण दुधात फॅट्स असल्याने परत मस्लस बिल्डींग ला किती उपयोग ? शिवाय गायीलाही हार्मोन्स देत नसतील कशावरुन ? शिवाय नुकतेच ए१ मिल्क ए२ मिल्क हा प्रकार वाचनात आला , हा काय नवीन झोल आहे देव जाणे ! इतर शाकाहारी पदार्थातील प्रोटिन्स शरीराला लागतात का ? कोणतीही डाळीचे पदार्थ खाल्ले थोडे जरी प्रमाणापेक्षा जास्त खल्ले की गॅसेस होतात हा स्वानुभव आहे ! जास्त सोयाबीन खाऊ नका असे आता सगळेच सांगतात .
कोणताही डॉक्टर आपल्याला हे घ्या म्हणून सांगताना आढळत नाही.
हेही खरे आहे , उलट माझ्या माहीतीतील एका आयुर्वेदीक डॉक्टारांनी व्हे प्रोटिन्स घेवु नका असे स्पष्ट सांगितलेले त्याने किडनीवर ताण पडतो , शिवाय त्या प्रोटिन्स मध्ये इतर काय मिक्स केले आहे हे खात्रीलायक सांगता येत नाही म्हणुन. व्हिटॅमिस च्या धाग्यावर प्रोटीन आणि आहाराची चर्चा हे थोडे विषयांतर होत आहे हे खरे पण हा महत्वाचा विषय आहे म्हणुन विचारत आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

मला B Protein हे माझ्या physiotherapist नी सुचवले होते. एका अपघातात माझ्या मनगटाचा जोड निखळला होता , त्यावर शस्त्रकिया करुन , प्लेटच्या सहाय्याने निखळलेले भाग जोडले गेलेत. पण नुसत्या शस्त्रक्रियेने हे बरे होत नाहीत त्याकरिता physiotherapy लागते. त्यावेळी physiotherapist ने मला सांध्यातील तंतूंची (आता तिने नेमकं काय सांगितलं ते शब्दा आठवत नाही) झीज लवकर भरुन येण्याकरिता B Protein ची भूकटी सुचवली होती. माझ्या मते मला त्याचा फायदा झाला.

In reply to by मराठी कथालेखक

हेमंतकुमार 17/07/2018 - 17:51
बऱ्याच उपयुक्त पोषणघटकांचा मस्त 'मसाला' दिसतोय. त्यात ब १२ आहे की नाही याची माहिती जालावर मिळाली नाही. तुमच्याकडे आहे का ?

In reply to by हेमंतकुमार

या दुव्यावर अधिक माहिती आहे. यावरुन तरी b12 नाहीये असे वाटते, तरी एकदा बरणी वरील माहिती वाचून सांगतो. Calories 6,180 Sodium 31 mg Total Fat 284 g Potassium 1,540 mg Saturated 36 g Total Carbs 852 g Polyunsaturated 58 g Dietary Fiber 114 g Monounsaturated 171 g Sugars 276 g Trans 0 g Protein 114 g Cholesterol 0 mg Vitamin A 34% Calcium 46% Vitamin C 16% Iron 293%

हेमंतकुमार 13/07/2018 - 21:06
तुमच्या प्रतिसादात बऱ्याच मुद्द्यांची सरमिसळ आहे. एकेक दमाने घेतो १. "ब" हे मुळात एक जीवनसत्व नसून ते ८ जणांचे कुटुंब आहे. २. तुमच्या व्यायामासंदर्भात 'ब-१' चा वाटा जास्त आहे. तरुणपणी ते आहारातून घेतले तरी चालेल, गोळ्यांची सक्ती नाही. ३. 'ब-१२ हे म्हातारपणातील हाडांच्या झीजे साठी देतात; तुमच्या बाबत नाही क्रमशः....

हेमंतकुमार 13/07/2018 - 21:30
आता अभावाची लक्षणे बघा: ब-१ : खूप अशक्तपणा, स्नायू दुःखी ब-२: तोंड व जीभेचा दाह ब-१२: हाता पायांना मुंग्या येणे ब१ वर स्वतंत्र लेख पुढे येईलच. तेव्हा अधिक चर्चा करू.

हेमंतकुमार 13/07/2018 - 21:53
अजून एक .. ब च्या गोळ्या गरजेपेक्षा जास्त खाल्ल्या तर लघवी मस्तपैकी जर्द पिवळी होईल, बाकी काय भ्यायचे काम नाही !

In reply to by शाम भागवत

सुबोध खरे 14/07/2018 - 09:37
दूध पाश्चराईज्ड केले की त्यातले ब१२ नष्ट होते. During the pasteurization process there is a minimal loss (approximately 10%) of thiamine and vitamin B12. But because losses are small in comparison to the large amounts of the B vitamins in milk, milk is still considered a source of these nutrients. About 20% of vitamin C is lost during pasteurization, but this loss is not nutritionally significant since milk is not an important source of vitamin C to begin with. https://www.dairynutrition.ca/facts-fallacies/product-quality/raw-milk

In reply to by हेमंतकुमार

शाम भागवत 27/07/2018 - 08:23
मी शाकाहारी असल्याने माझा दुधावर भरवसा होता. तो तुमच्यामुळे परत प्रस्थापित झाला. डॉ. सुबोध खरे व तुम्हाला धन्यवाद.

In reply to by शाम भागवत

हेमंतकुमार 27/07/2018 - 08:28
शाकाहार आरोग्यासाठी चांगलाच असतो. सर्व पोषणघटक मिळतात. अतिशुद्ध शाकाहार मात्र टोकाचे पाऊल वाटते.

@ खांदवेसाहेबः बिस्कीटचा पुडा वा बहुतेक सर्वसामान्य खाद्यपदार्थ हे ड्रग्ज अ‍ॅन्ड कॉस्मेटीक्स अ‍ॅक्टच्या कार्यकक्षेत येत नाहीत. ते अन्न भेसळ प्रतिबंधक आणि नियंत्रण विषयक कायद्याच्या कार्यकक्षेत येतात. त्यात जाहीर केलेल्या पदार्थांच्या +_ मर्यादा किती आहेत ठाऊक नाही. परंतु विविध घातक रसायनांचा उदा हेवी मेटल्स, विविध विषारी कार्बनी पदार्थ यांचा अंतर्भाव विशिष्ट मर्यादेच्या बाहेर नाही हे तपासून पाहणे हा मुख्य उद्देश असावा. जाहीर केलेले पदार्थ हे फक्त एकदाच तपासून पाहिलेले असतात की दर बॅचमध्ये तपासले जातात हे ठाऊक नाही. तसे ते बहुधा आढळणारच. जसे गव्हातून बिस्कीटात ब जीवनसत्व येणे. फक्त भाजण्यासारख्या प्रक्रियेत प्रमाण कमी होईल. पण जाहीर घटकांच्या मर्यादेची शिथिलता किती आहे ५-१० टक्के की २० टक्के यासंबंधी अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्यात उल्लेख नसल्यास उत्पादक कायद्यात सापडणार नाही. असली तरीही मर्यादेचे उल्लंघन झाल्यास होणारी अन्न निरीक्षकाची कारवाई कोणताही शहाणा उत्पादक ओढवून घेणार नाही. शिवाय उत्पादनाची प्रतिष्ठा, ब्रॅन्ड व्हॅल्यू कोणीही निष्कारण पणाला लावणार नाही.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 14/07/2018 - 09:53
कोणत्याही अन्नपदार्थात असलेले पोषक घटक हे त्याच्या कच्च्या मालात नव्हे तर जे उत्पादन विकले जाते त्यात असणे आवश्यक आहे. याच्या प्रत्येक घटकाचे पृथक्करण करून त्याचे प्रमाण ठरवलेले असते. उदा. येथे बी १२ जीवनसत्वाचे पृथक्करण करायचे असेल तर १० ग्रामचे बिस्कीट पाण्यात पूर्ण विरघळवून त्या पाण्याचे स्पेकट्रोफोटोमीटर मध्ये प्रमाणित बी १२ च्या द्रावणाशी तुलना करून प्रमाण ठरवता येते. किंवा एलिसा Enzyme-linked immunosorbent assay या तंत्राने अन्न घटकातील बी १२ चे प्रमाण ठरवता येते http://www.rapidtest.com/index.php?i=Food-ELISA-test-kits&id=196&cat=104 किंवा NMR SPECTROSCOPY या तंत्राने त्यातील कोबाल्टचे प्रमाण ( बी १२ म्हणजे सायनोकॉबालमिन हे कोबाल्टचे एक संयुग आहे) ठरवता येते. आणि या कोबाल्टच्या प्रमाणावरून त्यातील बी १२ ची मात्र ठरवता येते.

हेमंतकुमार 14/07/2018 - 11:15
या लेखमालेदरम्यान खाद्यान्नातील “जीवनसत्वांचा उष्णतेने होणारा नाश (heat stability )” हा मुद्दा चर्चेत येणार आहे. हा विषय रसायनशास्त्राच्या अखत्यारीत येतो. वरवर गुगलून येणारे संदर्भ वाचून नीटसे समजत नाही. काहीसा गोंधळही होतो. तरी आपले अनुभवी मत वाचायला आवडेल.

या विषयावरील माझा अनुभव शून्य आहे. माझ्या सर्वसामान्य नजरेतून प्रामुख्याने घटकांच्या विघटनासाठी तीन घटक कारण असलेले दिसतात. १. भोवतालचे माध्यम (गोळी मध्ये स्टार्च, टाल्कम, इ. द्रव्ये, प्यावयाच्या औषधात पाणी, अल्कोहोल, साखर इ. द्रव्ये, पेरेन्टरल्समध्ये मॅनिटॉलसारखी द्रव्ये आणि पीएच राखण्यासाठी घातलेली द्रव्ये) तापमान आणि आर्द्रता. २. विशिष्ट सहघटकांचे अस्तित्त्व. घटकांचे स्थैर्य दोन प्रमुख कारणांमुळे धोक्यात येऊ शकते. १. उष्णतेमुळे वाफ होऊन उडून जाणे. २. उष्णता, प्रकाश, आर्द्रता वा इतर कारणांमुळे रेणूंचे विघटन होणे. जसे अ‍ॅस्पिरीनच्या बाबतीत अ‍ॅसिटाईल सॅलिसायलीक अ‍ॅसिडचे पाण्याच्या रेणूमुळे हायड्रोलायसीस होऊन सॅलिसायलिक अ‍ॅसिड हे घातक द्रव्य तयार होणे. व्हिटॅमीन अ चा उष्णतेमुळे र्‍हास होतो असे वाचल्याचे आठवते परंतु कायिक की रासायनिक आणि रासायनिक असेल तर रासायनिक सूत्रे आठवत नाहीत. एका कंपनीत केलेला एक अभ्यास आठवतो. त्यांनी जुनी तीन वर्षांपूर्वीची कन्ट्रोल सॅम्पल्स काढून त्यांच्या चाचण्या घेतल्या होत्या. %ज र्‍हास काढून टाईम स्केलवर ग्राफ काढला होता. आणि नंतर नवीन उत्पादन ४५ अंश सें तापमानात अतिआर्द्रतेसाठी डब्यात पाणी घालून सील करून ठेवली होती (अ‍ॅक्सीलरेटेड डायनॅमिक कन्डीशन्स). नंतर दर तीन महिन्याने ते (या स्टोरेज कन्डीशन्समधल्या नमुन्यांच्या) चाचण्या घेऊन निष्कर्ष काढणार होते. र्‍हासाची टक्केवारी नंतर त्यांनी अभ्यासली असेलच. निष्कर्ष बहुधा खाजगी असलयामुळे मी त्यात कुतूहल वाटूनही फाजील स्वारस्य दाखवले नव्हते. गुगलून बघितल्यावर In general, many physical and chemical factors can have a negative effect on stability of vitamins. Water-soluble vitamins are prone to degradation in solutions, particularly when exposed to light. B Vitamins are sensitive to factors such as: light, heat, moisture, oxidizing and reducing agents, acids and or bases. There is plenty of literature concerning the poor stability of vitamin B12 and it has been reported that the optimum pH for stability of this vitamin is 4-6.5 pH value.2-13 It is well known that aqueous solutions of cyanocobalamin are photoliable and some B and C vitamins accelerate the photodegradation. हा प्रमुख निष्कर्ष आढळला. सर्वसामान्यांसाठी (डॉक्टर्ससाठी नाही) तात्पर्य काय तर प्यावयाचे जीवनसत्त्वांचे अर्भकासाठींचे थेंब आणि छोट्यांसाठीचे औषध हे गडद रंगाच्या बाटलीतले असावे, थंड, कोरड्या जागी प्रकाशापासून दूर ठेवावे आणि डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण झाल्यानंतर फेकून द्यावे. एक्सपायरी तारीख पुढची असली तरी उघडलेली बाटली कोर्स पूर्ण झाल्यानंतर काही कालावधीनंतर पुन्हा वापरायची गरज पडल्यास नवे औषध आणावे. मोठ्यांनी गोळ्यास खाव्यात आणि प्यावयाचे औषध लिहून द्या असा डॉ. कडे हट्ट धरू नये. असो. लेखक डॉक्टरसाहेब आपली जिज्ञासा पूर्ण करू शकेल असा अनुभव माझ्यापाशी नसल्यामुळे मनात निराशा दाटली.

In reply to by सुधीर कांदळकर

खिलजि 17/07/2018 - 19:00
मला हा प्रतिसाद आवडला सुधीरसाहेबांचा . मी स्वतः अस्पिरीनवर काम केलेले आहे . ते एका ठराविक तापमानावरच नियंत्रि राहते अन्यथा त्याचे त्वरित सॅलिसिलिक ऍसिडमध्ये रूपांतर होते . सुमारे २०१० मध्ये हा प्रोजेक्ट आला होता आणि मी स्वतः त्यावर काम करत होतो . जवळजवळ सहा महिने काम झाल्यावर आम्हाला असे आढळले कि एका नियंत्रित तापमानात आणि एका विशिष्ट सामूमध्येच ऍस्पिरिन राहू शकतो . आता सांगायची गोष्ट अशी कि आम्ही आमच्या परीने तो प्रोजेक्ट पूर्ण केला आणि सूपूर्दही केला आणि नंतर तो एफ दि ए ला मान्यही झाला . सांगायची मेख अशी कि ऍस्पिरिन जो घेत असेल त्याने जर ते व्यवस्थित शीतकपाटात ठेवले नाही तर सर्व गोंधळच आहे . तो नक्की काय खात असेल ऍस्पिरिन कि त्याचा मेटॅबोलाईट सॅलिसिलिक ऍसिड हा देखील संशोधनाचा मुद्दा आहे .

In reply to by खिलजि

सुबोध खरे 17/07/2018 - 20:39
मुळात ऍस्पिरिन हे ऍसेटील सॅलिसिलिक ऍसिड आहे. ते तयार करतात ते सुद्धा सॅलिसिलिक ऍसिड आणि ऍसेटिक ऍनहायड्राइड याच्या संयोगाने. ते जठरात / आतड्यात/ यकृतात सॅलिसिलिक ऍसिड मध्ये आणि ऍसेटिक ऍसिड मध्ये विघटन पावते. सॅलिसिलिक ऍसिड हेच मुळात औषध आहे. त्यामुळे जरी ऍस्पिरिन विघटन पावलेले असले तरी मागे राहणाऱ्या सॅलिसिलिक ऍसिडमुळे रुग्णाला फायदा सुद्धा मिळतोच. फरक एवढाच आहे कि नुसत्या सॅलिसिलिक ऍसिडमुळे जठराचा दाह ऍस्पिरिनपेक्षा जास्त होतो

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 17/07/2018 - 20:40
Aspirin is used in the treatment of mild to moderate pain, inflammation, and fever. It is also used as an antiplatelet agent to prevent myocardial infarction, stroke and transient ischemic episodes. Aspirin is absorbed rapidly from the stomach and intestine by passive diffusion. Aspirin is a prodrug, which is transformed into salicylate in the stomach, in the intestinal mucosa, in the blood and mainly in the liver. Salicylate is the active metabolite responsible for most anti-inflammatory and analgesic effects (but acetylsalicylate is the active moiety for the antiplatelet-aggregating effect). Gastrointestinal intolerance to salicylate observed in some patients has prompted the development of formulations with enteric coating. Salicylate distributes rapidly into the body fluid compartments. It binds to albumin in the plasma. With increasing total plasma salicylate concentrations, the unbound fraction increases. Salicylate may cross the placental barrier and distributes into breast milk. https://sepia.unil.ch/pharmacology/index.php?id=83

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार 17/07/2018 - 21:06
एक विनंती… चर्चेदरम्यान जालावरचे इंग्लिश परिच्छेद इथे जसेच्या तसे डकवणे टाळल्यास बरे होईल अपरिहार्य तांत्रिक शब्द वगळता मराठीतच लिहावे ही विनंती. आपल्या संस्थळाचे मराठीपण आपणच जपूयात. धन्यवाद

हेमंतकुमार 15/07/2018 - 08:10
आपण कोणीच परिपूर्ण नाही. जे काही अनुभवाचे बोल असतात ते एकमेकास जरूर सांगायचे. काही विषय हे २-३ ज्ञानशाखांच्या सीमेवरील असतात. तिथे वाचकाच्या प्रत्येक शंकेला एकच तज्ञ उत्तर नाही देऊ शकत. दरवेळेस त्या ‘गुगलराजा’तून बोध होतोच असे नाही. तेव्हा एकमेकांची मदत घेण्यात आनंद वाटतो. धन्यवाद !

खिलजि 17/07/2018 - 18:50
कुमारसाहेब आपले लेख फारच छान असतात . मला खरंच खूप खूप आवडतात . मुळात आपली लेखन शैली इतकी सहज आहे कि मी ते व्यवस्थितपणे माझ्या बायकोला देखील समजावून सांगू शकतो . मागे मी नमूद केल्याप्रमाणे हे आपले लिखाण म्हणजे एक उत्कृष्ट समाजसेवा आहे असे माझे पक्के मत बनत चाललेय . धन्यवाद कुमारसाहेब

In reply to by खिलजि

हेमंतकुमार 17/07/2018 - 19:11
तुमचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन माझ्या भावी लेखनासाठी उर्जा पुरवते. तुमच्यासारख्या अभ्यासू वाचकांच्या सहभागानेच ही चर्चा परिपूर्ण होते.

ट्रेड मार्क 20/07/2018 - 02:48
आणि चांगली माहिती आहे. दुकानात मिळणाऱ्या गोळ्या किंवा द्रावण स्वरूपातील व्हिटॅमिन बी१२ मध्ये दोन वेगवेगळे मूलभूत घटक असतात. जे सर्वसाधारण सहज आणि कमी किमतीत उपलब्ध असते त्यात Cyanocobalamin असते. हे प्रयोगशाळेत तयार केलेले बी१२ आहे. तर दुसऱ्या प्रकारात Methylcobalamin असते जे प्राकृतिक स्वरूपात मिळवले जाते असे म्हणतात. त्यामुळे याची किंमत थोडी जास्त असते. या दोन्हीपैकी कुठलं चांगलं यावरून डॉक्टर मंडळींमध्ये मतभिन्नता आहे. डॉ. कुमार, डॉ. खरे किंवा मिपावर अजून कोणी औषधशास्त्रातले असतील त्यांनी कृपया यावर थोडी अधिक माहिती द्यावी.

In reply to by ट्रेड मार्क

सुबोध खरे 20/07/2018 - 09:20
सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दोन्हीच्या कार्यक्षमते मध्ये फारसा फरक नाही. दोनातील कोणतेहि द्रव्य घ्या. काही फरक पडणार नाही. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5370327/

हेमंतकुमार 20/07/2018 - 08:01
Methyl C हे प्रत्यक्ष पेशींत काम करणारे सह-एंझाइम आहे. त्यामुळे वरवर पाहता ते श्रेष्ठ असेल असे वाटते. तरी पण दोहोंची तुलना करण्यासाठी औषध शास्त्रातील व्यक्ती चे मत घ्यावे लागेल.

Rajesh188 28/04/2019 - 09:27
वर्णनाच्या सुलभतेकरिता जीवनसत्त्वांचे विद्राव्यतेप्रमाणे वर्गीकरण सर्वसामान्य झालेले आहे. परंतु ते अगदी काटेकोर आहे असे नव्हे. कारण काहींची विद्राव्यता मेद व जल या दोन्हींतही आढळली आहे. ‘जलविद्राव्य ब’ हा एकच पदार्थ नसून आणखी काही विशिष्ट पदार्थांचा मिळून बनल्याचे समजल्यानंतर त्याला ‘जीवनसत्त्व ब समूह’ असे नाव मिळाले. या समूहास थायामीन (ब१ जीवनसत्त्व किंवा ॲन्युरीन), रिबोफ्लाविन (ब२ जीवनसत्त्व ), निॲसीन (निॲसीनामाइड किंवा निकोटिनिक अम्ल), ब६ जीवनसत्त्व, पँटोथेनिक अम्ल, बायोटीन, फॉलिक अम्ल, ब१२ जीवनसत्त्व, इनॉसिटॉल, कोलीन इ. पदार्थांचा समावेश होतो. या लेखात फक्त प्रचलित नावांचाच उल्लेख करण्यात आला आहे.

हेमंतकुमार 28/04/2019 - 09:58
जीवनसत्वांच्या ‘ब’ गटात एकूण ८ घटक आहेत : थायमिन, रिबोफ्लाविन, निअसीन, पायरीडोक्सीन, बायोटीन, pantothenic acid, फोलिक a व कोबालामीन. इनॉसिटॉल व कोलीन यांना जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत स्थान दिलेले नाही. असे बरेच पदार्थ ‘जीवनसत्वासारखे’ (vitamin-like sub.) म्हणून ओळखले जातात. त्यांची यादी बरीच आहे. एकूण अधिकृत जीवनसत्वे १३ च आहेत. ( ‘ब’ गटाची ८, क आणि अ, ड, इ आणि K).

हेमंतकुमार 14/11/2022 - 12:33
B12 च्या उपयुक्ततेसंबंधी नवे संशोधन सतत चालू असते. अलीकडच्या काही संशोधनानुसार या जीवनसत्त्वाचा खालील आजारांमध्ये उपयोग होऊ शकतो: विषाणू संसर्ग : पूरक उपचार पार्किन्सन आजार: प्रतिबंधात्मक उपचार
‘ब’ गटातले हे जीवनसत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये कोबाल्ट हे मूलद्रव्य असून अशा प्रकारचे ते आपल्या शरीरातील एकमेव संयुग आहे. त्याचा शोध १९४८ मध्ये लागला आणि त्यानंतर जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत एकाचीही भर पडलेली नाही. निसर्गातील विशिष्ट जीवाणूच ते तयार करू शकतात. आपल्या मोठ्या आतड्यांत तसे काही उपयुक्त जीवाणू असतात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला थोडे ब-१२ मिळते. अर्थात तेवढ्याने आपली गरज भागू शकत नसल्याने आपल्याला ते आहारातूनही घ्यावे लागते. ब-१२ चे आहारस्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाची कारणे व परिणाम यांचा आढावा लेखात घेतला आहे.

मला भेटलेले रुग्ण - १७

डॉ श्रीहास ·

धडपड्या 02/07/2018 - 09:09
छान... नेहमी काहीतरी गंभिर, विचार करायला वगैरे लावणारं लिहिता... आज असं हलकं फुलक वाचून बरं वाटलं...

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2018 - 13:57
हो. अगदी अगदी. जनरली लोकांना असं वाटतं की डॉक्टरने सांगितल्यावरच तो /ती ऐकेल. अशावेळी डॉक्टरने सांगावं असं माझं मत आहे. आईवडिलांनी चूक केली किंवा करताहेत (म्हणजे आपल्या तीसचाळीस वर्षांच्या संग्रहित चुकांना ते आता चाळीशीत अचानक "सुधारून दाखवू" शकत नाही आहेत म्हणून त्यांचं ताडन करून नवीन पिढीला छद्मी हास्य करण्याची संधी देण्यापेक्षा डॉक्टर म्हणून नवीन पिढीतल्या पोराला व्यायाम कर असं डॉक्टरांनी सांगणं (व्यायामाच्या फायद्यांसाहित) हे सकारात्मक वाटतं. आईबापांना चार फटके देऊन पोराला खुदुखुदू हसू येणं हा पोराने व्यायाम आवडीने करावा यासाठी योग्य उपाय नव्हे. डॉ. खरे सर, मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमचं याआधीचं लिखाण वाचताना लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. पण प्लीज पालकांचं फेल्युअर त्यांच्या पुढच्या पिढीवर कंपल्सरी लादून स्वतःला सोपं सोल्युशन करून घेऊ नका. किमान नव्या पिढीला वाचवा आपले शब्द वापरून. आम्ही पालक आदर्श व्यायाम करणारे नाही आहोत, फोतले, युसलेस आहोत म्हणून पुढच्या पिढीला वाचवणं सोयीस्कर आर्ग्युमेन्ट करून टाळू नका ही हात जोडून विनंती सर्व डॉक्टर्सना. आम्ही नालायक पालक असणं म्हणजे आमच्या पोरांची लायकीच लठ्ठ होऊन अकाली मरण्याची, असं मत असेल तर बोलणं खुंटलं. पण एक प्रोफेशनल मेडिकल व्यक्ती ब्लेमगेमपेक्षा जितके नवीन पिढीतले जीव चांगल्या मार्गाला लावता येतील तितके (चार जास्त शब्द, फीच्या बाहेरचे) ऐकवून मदत करतील अशी आशा. अल्कोहॉलिक मनुष्याच्या मुलाला अल्कोहोलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्याच्या बेवड्या बापाला "आधी तू स्वतः सुधार, मग पोराकडून अपेक्षा कर" असं तुम्ही सांगणार का? Please be new generation saviors first than taking easy "parent basher" route. अप्रिय विनंती आहे. आगोदरच माफी मागतो.

In reply to by गवि

गवि 02/07/2018 - 14:04
हे कधीच स्वीकारलं जाणार नाही आणि उलट ऑफेन्स समजून डिफेन्सीव्ह, वैट्ट वैट्ट पालकांना आणखी युसलेस ठरवणारे रिस्पॉन्स येऊ शकण्याची रिस्क गृहीत धरूनही विनंतीचं धारिष्ट्य दाखवतोय. __/\__

In reply to by Nitin Palkar

नाखु 02/07/2018 - 23:19
पालकांची परिस्थिती (कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि जैविक ही) पाहीली जात नाही. एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि आईला सकाळपासूनच घबडग्यात जुंपून घ्यावं लागतं ती मुलीबरोबर कधी प्राणायामाचा श्वास घेणार? काही वेळा अगदी अल्प प्रमाणात खाणे असले तरी बांधा सुदृढता सोडत नाही अगदी व्यायाम करून ही त्यांची कुचंबणा. फक्त संस्कार, वागणूक व सर्वांशी संवाद हा पालकांनी मुलांना आपल्या वागण्यातून शिकवले जातात आधिक उणे क्षमा बालक असलेला नाखु पालक (भाजीपाला)

In reply to by नाखु

डॉ श्रीहास 04/07/2018 - 14:48
नाखु साहेब अनेक चांगल्या गोष्टी संस्काराच्या व्याख्येत येत नसल्या तरी पुढच्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे... In short we are on the same page !!

In reply to by गवि

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:35
माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की सिग्नल पाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचरा कुंडीत टाकणे हे सुद्धा संस्कारच आहेत. त्याच प्रमाणे व्यायाम करणे हा देखील संस्कारच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.... वजन कमी करण्यापेक्षा फिटनेस वाढावा मी ह्या मतावर येऊन पोहोचलो आहे माझं स्वत:चं वजन हव्या त्या कक्षेत (parameter) मध्ये बसत नाही पण माझी क्षमता (कमावलेली) बरीच बरी आहे. तुमच्या मतामागे कदाचीत काही अप्रिय/वाईट अनुभव असावेत परंतू माझं म्हणणं पूर्णपणे वेगळ्या अर्थाचं आहे.

In reply to by गवि

सुबोध खरे 03/07/2018 - 13:08
लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. गवि साहेब हि जजमेंट मी त्या पालकाला सांगितली नाही पण जो विचार मनात आला तो केवळ मी लिहून दाखवला तर त्यावर बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही. १५ वर्षाच्या मुलीचे वजन ९६ किलो आहे तिला ६ महिने पाळी आली नाही म्हणून डॉक्टरकडे येणार बाप तिच्या हातावर पडणारे "स्ट्रेच मार्क्स" पाहू शकत नाही का? तिचे सुटलेले पोट दिसत नाही का? वर तिला "नॉन व्हेज खायला फार आवडतं आणि ती चिकन शिवाय दुसऱ्या कशाला हात लावत नाही" म्हणून तिचं कौतुक करत असेल तर काय म्हणायचं? ज्या मुलीला हात असलेल्या खुर्चीत बसताना किंवा उठताना ऍडजस्ट ( योग्य शब्द सुचत नाहीये) करावे लागते. अशा बापाच्या बाबत माझ्या मनात (तुम्ही ९६ किलो वजन होईपर्यंत काय गोट्या खेळत होता का?) हाच विचार आला होता असे मी लिहिलेले हि होते. आणि याबद्दल मला आजही अजिबात खेद वाटत नाही. कारण या माणसाला तुम्ही आज पर्यंत काय करत होता असे विचारल्यावर आम्ही तिला सांगतोय, ती ऐकतच नाही. मी विचारले कि तुम्ही चिकन आणून देणे बंद करा. यावर हा माणूस फक्त हसला. कारण नंतर त्याच्या बायकोने सांगितले ह्यांना रोज चिकन लागतं. तुकाराम महाराजांकडे एक स्त्री आली आणि म्हणाली कि महाराज आमचा मुलगा रोज गूळ खातो. यावर तुकाराम महाराज म्हणाले कि तू एक आठवड्याने ये. एक आठवड्याने ती स्री आली तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्याला गूळ खाऊ नको म्हणून उपदेश केला. तेंव्हा ती स्री म्हणाली महाराज हा उपदेश तुम्ही एक आठवड्यापूर्वी देऊ शकला असतात. त्यावर तुकाराम महाराजांनि सांगितले कि मी पण रोज गूळ खात होतो. प्रथम मी गूळ खाणे थांबवले मगच उपदेश केला. आधी केले मग सांगितले हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे. आपली जबाबदारी डॉक्टरवर टाकणारे पालक रोजच पाहायला मिळत आहेत हि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. चार वर्षाच्या नातवाला (acidity) आम्लपित्त होते म्हणून घेऊन येणारे आजोबा वर "तो रोज कुरकुरे खाल्ल्याशिवाय मागत नाही"म्हणून ते कौतुक करत असताना डॉक्टरने काय करावे अशी अपेक्षा आहे? मी आजोबाना म्हणालो अहो तो स्वतः दुकानातून आणतो का? त्यावर ते म्हणाले कि "नाही दिले तर तो रडतो", यावर मी त्यांना विचारले कि अहो उद्या तो (ड्रग्स) अमली पदार्थ मागू लागला तर तुम्ही देणार का? यावर हॅ हॅ हॅ डॉक्टर तुम्ही जोक करताय म्हणून आजोबा हसतात. आता याबद्दल काय म्हणावे? बारावीतील मुलगी ८७ किलो वजन आणि आई तिचे कौतुक करते कि "तिचे पप्पा तिचे लाड करतात तिला रोज दोन वडा पाव आणून देतात" आता अशा पालकांचे काय करायचं? वर "डॉक्टर तुम्हीच सांगा तिला"? वजन जास्त झाल्यामुळे पाळी न येणाऱ्या मुली माझ्याकडे रोजच येतात. (PCOS https://en.wikipedia.org/wiki/Polycystic_ovary_syndrome.) त्यांना तू वजन कमी केले नाहीस तर तुझी त्वचा मुलांसारखी राठ होईल, ओठावर लव (मिशी) येईल. हात पायाचे वॅक्सिन्ग सारखे सारखे करावे लागेल. असे मी रोजच्या रोजच समजावून देत असतो. परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो. वयात येणारी मुले आईबापांचे ऐकत नाहीत हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे मुलाना सौम्य पण परखड शब्दात सांगणे हा तर आमच्या व्यवसायाचा भागच आहे पण आपण चांगले पालक होऊन वाईट पणा फक्त डॉक्टरने घ्यायचा हे पटत नाही. स्वतःची प्रौढी म्हणून सांगत नाही परंतु आपल्याला काय आजार झाला आहे हे ९० % रेडिओलॉजिस्ट सांगतच नाहीत. केवळ अहवाल (रिपोर्ट आणि चित्रे) देतात आणि आपल्या डॉक्टरांना विचारा म्हणून सांगतात. मी सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो त्यात "अशा" लोकांना रसच नसतो.

In reply to by सुबोध खरे

गवि 03/07/2018 - 13:18
बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही.
डॉक, त्यावेळी भावनेच्या भरात जे काही लिहून गेलो ते गेलो. माफी करा. नाराज होऊ नका. हेमंतला सुरमई थाळी खात पुढील चर्चा करू. डॉ. श्रीहास येणार असतील तरी वेलकम.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:47
एक वयस्क बाईंना त्यांचं वय किती हा प्रश्न विचारल्यावर , तुम्हीच बघा बरं (म्हणजे मी सांगावं असं म्हणणं होतं).... मी निर्विकार चेहेऱ्यानी म्हटलं १०० वर्षे लिहीतो... मग काय बाई एकदम खडबडून म्हणाल्या नाही हो डाॅक्टर ७०-७२ असेल.. मग केबिन मध्ये असलेले नातेवाईक , पेशंट आणि मी खळखळून हसलो.

Nitin Palkar 02/07/2018 - 14:27
मुलाने जिमची पूर्ण वर्षाची फी भरली आणि चार दिवसात त्याचा उत्साह का मावळला ते आत्ता कळले. अनेकदा तुमचे किस्से वाचतांना इसाप नीती मधल्या छोट्या छोट्या बोधकथा वाचत असल्याचा feel येतो. आणि तुम्ही न लिहिलेले तात्पर्य अपोआप मनात उमटते. काही वाचक तुमचे किस्से लहान असतात अशी तक्रार करतात, मला तसे वाटत नाही... ते तसेच असोत... आखूड नसतात. असेच लिहित राहा.

१. व्यायामाबद्दल लिहिलेले अगदी मनोमन पटले. व्यायाम (वा कोणतीही आवश्यक गोष्ट) न करण्याबद्दल कारणे देणे चूकच. तासनतास मोबाईलवर वा टीव्हीसमोर घालवणार्‍यांना व्यायामाला वेळ नसतो. २. आमच्या एका मित्राचा १६वा वाढदिवस आम्ही गेली ३०-४० वर्षे दरवर्षी नेमाने साजरा करीत आहोत. ३. १५ वा भाग नजरेतून सुटला होता तो आताच वाचला. आता संगणक/लॅपटॉप सर्रास वापरले जातात. फाईल जशी विसरली जाते तसे त्यातला एखादा कागद देखील पेशन्ट गहाळ करू शकतो. माझ्या मते निदान आता तरी प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्येक पेशन्टसाठी संगणकात एकेक फाईल उघडून त्यात पेशन्टच्या शारिरिक/मानसिक तक्रारी, स्वत: तसे अगोदरच्या डॉक्टरांनी केलेले निदान, सुचवलेली औषधे आणि पथ्यादी इतर उपचार अशा शिस्तबद्ध प्रारूपात नोंदी घ्याव्यात. कागद खरडायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात हे होऊ शकते. फक्त केसपेपरसाठी ए४ आकाराचा एक आणि प्रिस्क्रीप्शनसाठी दुसरा छोटा असे दोन प्रिन्टर वापरावे लागतील आणि दोन्ही प्रिन्टर्सच्या शाईचे एकेक जादा कार्ट्रीज बाळगावे लागेल. सध्या बरेच डॉक्टर्स आपली जबाबदारी टाळण्यासाठी कागदवर मोघम काहीतरी खरडतात ते बरोबर नाही असे वाटते. मग मारहाणीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते. एमबीबीबीएस च्या शिक्षणात सध्या असा अभिलेख ठेवण्यासंबंधी उल्लेख आहे की नाही ठाऊक नाही पण आवश्यक आहे असे वाटते. त्याचबरोबर तत्संबंधी कायद्याच्या प्रशि़क्षणाचा अंतर्भाव असावा. कुणी पेशन्टने वा सरकारने खटला भरल्यास अशा अभिलेखाचा उपयोग होईल. हे सारे मेडिकल कौन्सिलला कळत नसेल असे वाटत नाही. त्यामागे आणखी (रास्त असलेली वा नसलेली) कारणे असू शकतात. तसेच डॉक्टरांना हाणामारी करण्यापूर्वी पेशन्टच्या नातेवाईकांना विचार करावा लागेल असे वाटते. संगणक/मॉनिटर्/लॅअपटॉप फोडला तरी त्यातला डाटा बहुतेक सुरक्षित राहील.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 03/07/2018 - 13:24
कांदळकर साहेब माझ्या कडे गेल्या साडे आठ वर्षात आलेल्या प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक अहवाल (रिपोर्ट) आणि चित्रफिती सुरक्षित आहेत. शिवाय याच गोष्टी कागदोपत्री सुद्धा नोंद (रजिस्टर) आहे. दुर्दैवाने आजकाल मेडिकल शॉपिंग फार वाढले आहे. रुग्ण एका डॉक्टर कडून दुसरीकडे मग तिसरीकडे असे जाणे बरेच वाढले आहे. त्यातून मग अगोदर दुसऱ्या पॅथीकडे गेल्याने रोग बळावला हे लपवण्याची मनस्थिती असतेच. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असलेल्या रुग्णाचीसुद्धा उपचाराची फाईल लोक घरी ठेवून येतात आणि आल्यावर तुम्ही सोनोग्राफी करा फाईल मग आणून दाखवतो म्हणून सांगतात. त्यांना समजवावे लागते कि रोग अगोदर कुठे होता आणि किती कमी झाला आहे यासाठी अगोदरची स्थिती पाहावी लागते. तरीही एखादा माणूस हलत नाही. मेडिकल रेकॉर्ड्स हे वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थित शिकवले जाते. आणि आपले रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवा हे परत परत सांगितले जाते. कारण उद्या खटला झाला असेल तर तुमचे रेकॉर्डस च तुमच्या साहाय्याला येतील. रुग्ण टाके नको म्हणून सांगतात किंवा अमुक तमुक चाचणी करणार नाही म्हणून सांगतात ते व्यवस्थित लिहून ठेवलेले असले कि नंतर येऊन उलटतपासणी करण्याचे प्रमाण लक्षणीय दृष्ट्या कमी होते. अर्थात असा अभिलेख ठेवण्यासाठी लागणारी साधन सामुग्री आणि त्याला लागणारा काळ ( resources & time value) याचे मूल्य देण्याची समाजाची तयारी आणि मनोवृत्ती नाही हि वस्तुस्थिती आहे.

नितीन पाठक 03/07/2018 - 16:21
डॉ़क, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आधी स्वतः केले तर आपण दुस-यांना अधिकाराने सांगू शकतो. लेख नेहमीप्रमाणे मस्त, वाचनीय .......

गामा पैलवान 03/07/2018 - 17:09
डॉक्टर श्रीहास, मस्त किस्से आहेत. काही भाष्य करेन म्हणतो. १.
हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....
आधारला पंजीकरण जोडलं तर त्या क्रमांकाने डॉक्टरशी संपर्क साधण्याची सुविधा प्राप्त होईल. पण देव करो आणि अशी काही वेळ न येवो. कारण बिग ब्रदर इज वॉचिंग यू. २.
.... मग त्याच्या पालकांना विचारलं मी तुम्ही करता का काही व्यायाम ?
प्रश्न रास्त आहे. फक्त तो लहान मुलासमोर उच्चारायला नको होता. पश्चातबुद्धीने म्हणता येईल की, 'घरातल्या सगळ्यांनी व्यायाम केलेला चांगला असतो' असं बोलायला हवं होतं. ३.
ह्यावर त्यांचा मुलगा पण चिडून म्हणाला अग ३५ वर्ष !! मीच तर ३६ चा आहे .....
यावरून शाळेतल्या वडीलमुलग्यांच्या वयांच्या गणिताची आठवण झाली. :-) एकाने उत्तर काढलं होतं बाप ३० वर्षांचा आणि मुलगा २५ वर्षांचा. छान! म्हणजे बापाने पाचव्या वर्षी पोरास जन्म दिला की काय! आ.न., -गा.पै.

रायनची आई 04/07/2018 - 10:12
माझ्या सासूबाई पण अशाच; कोणत्याही डॉक्टर कडे जाऊन घरी आल्यावर सांगतात की मी डॉक्टरना माझ वय सांगितल तर डॉक्टरना पटतच नाही... त्या जेव्हा 64 वर्षाची होत्या तेव्हा म्हणायच्या की आज मी डॉक्टरना माझ वय सांगितले तर ते म्हणाले की काहीतरीच काय? 46 वाटतय फारफार तर.. :))

In reply to by रायनची आई

डॉ श्रीहास 04/07/2018 - 15:01
सांगायचं झालं तर , कधीच शाळेत न गेल्यामुळे वयाचा दाखला अंदाजे बनवलेला असतो. असे पेशंट त्यांचं वय किती हे नक्की सांगूच शकत नाहीत म्हणून डॉक्टर नी अंदाजानी वय लिहावं अशी भाबडी अपेक्षा असते. तर काही पेशंट वय सांगतांना ५० / ६० असं मोघम उत्तर देतात तेव्हा त्यांना सांगावं लागतं की दहा वर्षांचा फरक आहे दोन्ही आकड्यांमध्ये ... तेव्हा त्यांना गडबड लक्षात येते आणि ५५ लिहा असं ॲव्हरेज काढून देतात ..... :))

गामा पैलवान 04/07/2018 - 12:17
खरे डॉक्टर,
परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो.
तुम्ही डॉक्टर आहात ना मग मुलाचं मन तुम्हाला तरी वळवता येतंय का ते बघूया अशी पालकांची अगतिकता असते. असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत होत असे. शालेय परीक्षांत 'हुशार' विद्यार्थी असल्याने माझ्या सांगण्याचा काही परिणाम होईल या आशेने ओळखीचे लोकं त्यांच्या मुलांना घेऊन माझ्या भेटीस येत. पण शालेय अभ्यास कधीही मन लावून केलेला नसल्याने मार्कांचे चार तुकडे प्रगतीपुस्तकावर फेकले की सुटलो तिच्यायला, अशी अस्मादिकांची धारणा असे. मुलांना काय घंटा उपदेश द्यायचा मी? सांगायचा मुद्दा असा की पालकांचं सोडून द्या, इथं सोळासतरा वर्षांचा उपदेशक म्हणजे मीच अगतिक होतो. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही कदाचित अधिक सुस्थितीत असाल म्हणून हा संदेशप्रपंच. पालक तुमच्याकडे अंतिम उपाय म्हणून आलेले दिसतात. पण तो अंतिम उपाय तुम्ही अंमलात आणायचा नसून पालकांनीच आणायचा आहे. हे कान डॉक्टरांनी टोचलेले बरे म्हणावेत का? आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 04/07/2018 - 13:28
तसं नाहीये हे रुग्ण माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी आलेले नसून पाळी येत नाही म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा त्यांचे फॅमिली डॉक्टर यांनी सोनोग्राफीसाठी पाठवलेले रुग्ण असतात. आपल्या मुलीची/ बायकोची पाळी न येण्याचे कारण त्यांचे वाढलेले वजन हे मी समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना मनापासून तसे करायचे असते आणि जमत नाही अशाना मी (फुकट) समुपदेशनही करतो. परंतु आम्ही काहीच करणार नाही जे काय करायचे ते डॉक्टरने केले पाहिजे असे १० % रुग्ण असतात( आम्ही पैसे फेकायला तयार आहोत पण हे खाणं कमी करा म्हणून सांगू नका काही गोळी असेल तर सांगा). अशा लोकांचा अविर्भाव पाहून डोकं फिरतं. लग्न झाल्यावर वर्षभरात दहा पंधरा किलो वजन वाढलेली किती तरी उदाहरणे समोर येतात. सुरुवातीला पाळी आली नाही म्हणून काही तरी "गोड बातमी" साठी येतात. प्रत्यक्षात PCOS हा आजार झालेला आढळतो. वर वजन कमी करा सांगितले तर "आम्ही काही खातच नाही" हे पालुपद असतेच. अशा बरीच मुलींना मी समजावून देण्याचा प्रयत्न करतो. पण यात काही अशा आडमुठ्या मुली असतातच कि डॉक्टर खाणं कमी करायला सांगू नका. आता अशांना काय सांगणार. मी निष्काम वृत्तीने सांगतो वजन कमी केले नाहीत तर मूल व्हायला त्रास होईल आणि वंध्यत्वाचा उपचार अतिशय खर्चिक आहे. बऱ्यचशा मुली ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात. ( काय डॉक्टर पकवतो आहे असा भाव चेहऱ्यावर असतो) "कर्मण्येवाधिकारस्ते" हेच खरं.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 04/07/2018 - 17:44
खरे डॉक्टर, माझं एकंदरीत मत सांगतो. हे तुम्हाला उद्देशून असं काही नाही. सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्याचं काय आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांचं काम म्हणजे रोगास पिटाळून लावणे. हे सांघिक कार्य आहे. कुण्या एकावर जबाबदारी टाकता येत नाही. मिळून मिसळून काम करायचं आहे तेव्हा परस्परांत सहकार्य हवंच. रुग्णांची ही जाणीव आताशा लोप पावंत चाललीये. माझ्या अंदाजानुसार कौटुंबिक वैद्य (= फ्यामिली डॉक्टर) ही जमात नाहीशी झाल्यापासनं अशी गडबड होऊ लागलीये. तुमचं भाष्य ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 04/07/2018 - 21:09
अवांतर : एक कोडं : एक बाई डॉक्टरकडे जाते. डॉक्टरांना तिचं 53 वर्षं वय माहित असतं. तरीपण खात्री करून घेण्यासाठी तिच्याकडून फॉर्म भरून घेतात. त्यात ती लिहिते 35. ते वाचून डॉक्टर मिश्कीलपणे हसतात आणि म्हणतात की वय बरोबर लिहिलंय. त्यावर बाई म्हणते, मग काय तर, नव्या युगाची परिभाषा आहे ही. तर तिने वयाच्या रकान्यात काय लिहिलं असेल? -आ.पै.

धडपड्या 02/07/2018 - 09:09
छान... नेहमी काहीतरी गंभिर, विचार करायला वगैरे लावणारं लिहिता... आज असं हलकं फुलक वाचून बरं वाटलं...

In reply to by सुबोध खरे

गवि 02/07/2018 - 13:57
हो. अगदी अगदी. जनरली लोकांना असं वाटतं की डॉक्टरने सांगितल्यावरच तो /ती ऐकेल. अशावेळी डॉक्टरने सांगावं असं माझं मत आहे. आईवडिलांनी चूक केली किंवा करताहेत (म्हणजे आपल्या तीसचाळीस वर्षांच्या संग्रहित चुकांना ते आता चाळीशीत अचानक "सुधारून दाखवू" शकत नाही आहेत म्हणून त्यांचं ताडन करून नवीन पिढीला छद्मी हास्य करण्याची संधी देण्यापेक्षा डॉक्टर म्हणून नवीन पिढीतल्या पोराला व्यायाम कर असं डॉक्टरांनी सांगणं (व्यायामाच्या फायद्यांसाहित) हे सकारात्मक वाटतं. आईबापांना चार फटके देऊन पोराला खुदुखुदू हसू येणं हा पोराने व्यायाम आवडीने करावा यासाठी योग्य उपाय नव्हे. डॉ. खरे सर, मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमचं याआधीचं लिखाण वाचताना लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. पण प्लीज पालकांचं फेल्युअर त्यांच्या पुढच्या पिढीवर कंपल्सरी लादून स्वतःला सोपं सोल्युशन करून घेऊ नका. किमान नव्या पिढीला वाचवा आपले शब्द वापरून. आम्ही पालक आदर्श व्यायाम करणारे नाही आहोत, फोतले, युसलेस आहोत म्हणून पुढच्या पिढीला वाचवणं सोयीस्कर आर्ग्युमेन्ट करून टाळू नका ही हात जोडून विनंती सर्व डॉक्टर्सना. आम्ही नालायक पालक असणं म्हणजे आमच्या पोरांची लायकीच लठ्ठ होऊन अकाली मरण्याची, असं मत असेल तर बोलणं खुंटलं. पण एक प्रोफेशनल मेडिकल व्यक्ती ब्लेमगेमपेक्षा जितके नवीन पिढीतले जीव चांगल्या मार्गाला लावता येतील तितके (चार जास्त शब्द, फीच्या बाहेरचे) ऐकवून मदत करतील अशी आशा. अल्कोहॉलिक मनुष्याच्या मुलाला अल्कोहोलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्याच्या बेवड्या बापाला "आधी तू स्वतः सुधार, मग पोराकडून अपेक्षा कर" असं तुम्ही सांगणार का? Please be new generation saviors first than taking easy "parent basher" route. अप्रिय विनंती आहे. आगोदरच माफी मागतो.

In reply to by गवि

गवि 02/07/2018 - 14:04
हे कधीच स्वीकारलं जाणार नाही आणि उलट ऑफेन्स समजून डिफेन्सीव्ह, वैट्ट वैट्ट पालकांना आणखी युसलेस ठरवणारे रिस्पॉन्स येऊ शकण्याची रिस्क गृहीत धरूनही विनंतीचं धारिष्ट्य दाखवतोय. __/\__

In reply to by Nitin Palkar

नाखु 02/07/2018 - 23:19
पालकांची परिस्थिती (कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि जैविक ही) पाहीली जात नाही. एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि आईला सकाळपासूनच घबडग्यात जुंपून घ्यावं लागतं ती मुलीबरोबर कधी प्राणायामाचा श्वास घेणार? काही वेळा अगदी अल्प प्रमाणात खाणे असले तरी बांधा सुदृढता सोडत नाही अगदी व्यायाम करून ही त्यांची कुचंबणा. फक्त संस्कार, वागणूक व सर्वांशी संवाद हा पालकांनी मुलांना आपल्या वागण्यातून शिकवले जातात आधिक उणे क्षमा बालक असलेला नाखु पालक (भाजीपाला)

In reply to by नाखु

डॉ श्रीहास 04/07/2018 - 14:48
नाखु साहेब अनेक चांगल्या गोष्टी संस्काराच्या व्याख्येत येत नसल्या तरी पुढच्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे... In short we are on the same page !!

In reply to by गवि

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:35
माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की सिग्नल पाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचरा कुंडीत टाकणे हे सुद्धा संस्कारच आहेत. त्याच प्रमाणे व्यायाम करणे हा देखील संस्कारच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.... वजन कमी करण्यापेक्षा फिटनेस वाढावा मी ह्या मतावर येऊन पोहोचलो आहे माझं स्वत:चं वजन हव्या त्या कक्षेत (parameter) मध्ये बसत नाही पण माझी क्षमता (कमावलेली) बरीच बरी आहे. तुमच्या मतामागे कदाचीत काही अप्रिय/वाईट अनुभव असावेत परंतू माझं म्हणणं पूर्णपणे वेगळ्या अर्थाचं आहे.

In reply to by गवि

सुबोध खरे 03/07/2018 - 13:08
लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. गवि साहेब हि जजमेंट मी त्या पालकाला सांगितली नाही पण जो विचार मनात आला तो केवळ मी लिहून दाखवला तर त्यावर बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही. १५ वर्षाच्या मुलीचे वजन ९६ किलो आहे तिला ६ महिने पाळी आली नाही म्हणून डॉक्टरकडे येणार बाप तिच्या हातावर पडणारे "स्ट्रेच मार्क्स" पाहू शकत नाही का? तिचे सुटलेले पोट दिसत नाही का? वर तिला "नॉन व्हेज खायला फार आवडतं आणि ती चिकन शिवाय दुसऱ्या कशाला हात लावत नाही" म्हणून तिचं कौतुक करत असेल तर काय म्हणायचं? ज्या मुलीला हात असलेल्या खुर्चीत बसताना किंवा उठताना ऍडजस्ट ( योग्य शब्द सुचत नाहीये) करावे लागते. अशा बापाच्या बाबत माझ्या मनात (तुम्ही ९६ किलो वजन होईपर्यंत काय गोट्या खेळत होता का?) हाच विचार आला होता असे मी लिहिलेले हि होते. आणि याबद्दल मला आजही अजिबात खेद वाटत नाही. कारण या माणसाला तुम्ही आज पर्यंत काय करत होता असे विचारल्यावर आम्ही तिला सांगतोय, ती ऐकतच नाही. मी विचारले कि तुम्ही चिकन आणून देणे बंद करा. यावर हा माणूस फक्त हसला. कारण नंतर त्याच्या बायकोने सांगितले ह्यांना रोज चिकन लागतं. तुकाराम महाराजांकडे एक स्त्री आली आणि म्हणाली कि महाराज आमचा मुलगा रोज गूळ खातो. यावर तुकाराम महाराज म्हणाले कि तू एक आठवड्याने ये. एक आठवड्याने ती स्री आली तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्याला गूळ खाऊ नको म्हणून उपदेश केला. तेंव्हा ती स्री म्हणाली महाराज हा उपदेश तुम्ही एक आठवड्यापूर्वी देऊ शकला असतात. त्यावर तुकाराम महाराजांनि सांगितले कि मी पण रोज गूळ खात होतो. प्रथम मी गूळ खाणे थांबवले मगच उपदेश केला. आधी केले मग सांगितले हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे. आपली जबाबदारी डॉक्टरवर टाकणारे पालक रोजच पाहायला मिळत आहेत हि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. चार वर्षाच्या नातवाला (acidity) आम्लपित्त होते म्हणून घेऊन येणारे आजोबा वर "तो रोज कुरकुरे खाल्ल्याशिवाय मागत नाही"म्हणून ते कौतुक करत असताना डॉक्टरने काय करावे अशी अपेक्षा आहे? मी आजोबाना म्हणालो अहो तो स्वतः दुकानातून आणतो का? त्यावर ते म्हणाले कि "नाही दिले तर तो रडतो", यावर मी त्यांना विचारले कि अहो उद्या तो (ड्रग्स) अमली पदार्थ मागू लागला तर तुम्ही देणार का? यावर हॅ हॅ हॅ डॉक्टर तुम्ही जोक करताय म्हणून आजोबा हसतात. आता याबद्दल काय म्हणावे? बारावीतील मुलगी ८७ किलो वजन आणि आई तिचे कौतुक करते कि "तिचे पप्पा तिचे लाड करतात तिला रोज दोन वडा पाव आणून देतात" आता अशा पालकांचे काय करायचं? वर "डॉक्टर तुम्हीच सांगा तिला"? वजन जास्त झाल्यामुळे पाळी न येणाऱ्या मुली माझ्याकडे रोजच येतात. (PCOS https://en.wikipedia.org/wiki/Polycystic_ovary_syndrome.) त्यांना तू वजन कमी केले नाहीस तर तुझी त्वचा मुलांसारखी राठ होईल, ओठावर लव (मिशी) येईल. हात पायाचे वॅक्सिन्ग सारखे सारखे करावे लागेल. असे मी रोजच्या रोजच समजावून देत असतो. परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो. वयात येणारी मुले आईबापांचे ऐकत नाहीत हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे मुलाना सौम्य पण परखड शब्दात सांगणे हा तर आमच्या व्यवसायाचा भागच आहे पण आपण चांगले पालक होऊन वाईट पणा फक्त डॉक्टरने घ्यायचा हे पटत नाही. स्वतःची प्रौढी म्हणून सांगत नाही परंतु आपल्याला काय आजार झाला आहे हे ९० % रेडिओलॉजिस्ट सांगतच नाहीत. केवळ अहवाल (रिपोर्ट आणि चित्रे) देतात आणि आपल्या डॉक्टरांना विचारा म्हणून सांगतात. मी सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो त्यात "अशा" लोकांना रसच नसतो.

In reply to by सुबोध खरे

गवि 03/07/2018 - 13:18
बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही.
डॉक, त्यावेळी भावनेच्या भरात जे काही लिहून गेलो ते गेलो. माफी करा. नाराज होऊ नका. हेमंतला सुरमई थाळी खात पुढील चर्चा करू. डॉ. श्रीहास येणार असतील तरी वेलकम.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 02/07/2018 - 14:47
एक वयस्क बाईंना त्यांचं वय किती हा प्रश्न विचारल्यावर , तुम्हीच बघा बरं (म्हणजे मी सांगावं असं म्हणणं होतं).... मी निर्विकार चेहेऱ्यानी म्हटलं १०० वर्षे लिहीतो... मग काय बाई एकदम खडबडून म्हणाल्या नाही हो डाॅक्टर ७०-७२ असेल.. मग केबिन मध्ये असलेले नातेवाईक , पेशंट आणि मी खळखळून हसलो.

Nitin Palkar 02/07/2018 - 14:27
मुलाने जिमची पूर्ण वर्षाची फी भरली आणि चार दिवसात त्याचा उत्साह का मावळला ते आत्ता कळले. अनेकदा तुमचे किस्से वाचतांना इसाप नीती मधल्या छोट्या छोट्या बोधकथा वाचत असल्याचा feel येतो. आणि तुम्ही न लिहिलेले तात्पर्य अपोआप मनात उमटते. काही वाचक तुमचे किस्से लहान असतात अशी तक्रार करतात, मला तसे वाटत नाही... ते तसेच असोत... आखूड नसतात. असेच लिहित राहा.

१. व्यायामाबद्दल लिहिलेले अगदी मनोमन पटले. व्यायाम (वा कोणतीही आवश्यक गोष्ट) न करण्याबद्दल कारणे देणे चूकच. तासनतास मोबाईलवर वा टीव्हीसमोर घालवणार्‍यांना व्यायामाला वेळ नसतो. २. आमच्या एका मित्राचा १६वा वाढदिवस आम्ही गेली ३०-४० वर्षे दरवर्षी नेमाने साजरा करीत आहोत. ३. १५ वा भाग नजरेतून सुटला होता तो आताच वाचला. आता संगणक/लॅपटॉप सर्रास वापरले जातात. फाईल जशी विसरली जाते तसे त्यातला एखादा कागद देखील पेशन्ट गहाळ करू शकतो. माझ्या मते निदान आता तरी प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्येक पेशन्टसाठी संगणकात एकेक फाईल उघडून त्यात पेशन्टच्या शारिरिक/मानसिक तक्रारी, स्वत: तसे अगोदरच्या डॉक्टरांनी केलेले निदान, सुचवलेली औषधे आणि पथ्यादी इतर उपचार अशा शिस्तबद्ध प्रारूपात नोंदी घ्याव्यात. कागद खरडायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात हे होऊ शकते. फक्त केसपेपरसाठी ए४ आकाराचा एक आणि प्रिस्क्रीप्शनसाठी दुसरा छोटा असे दोन प्रिन्टर वापरावे लागतील आणि दोन्ही प्रिन्टर्सच्या शाईचे एकेक जादा कार्ट्रीज बाळगावे लागेल. सध्या बरेच डॉक्टर्स आपली जबाबदारी टाळण्यासाठी कागदवर मोघम काहीतरी खरडतात ते बरोबर नाही असे वाटते. मग मारहाणीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते. एमबीबीबीएस च्या शिक्षणात सध्या असा अभिलेख ठेवण्यासंबंधी उल्लेख आहे की नाही ठाऊक नाही पण आवश्यक आहे असे वाटते. त्याचबरोबर तत्संबंधी कायद्याच्या प्रशि़क्षणाचा अंतर्भाव असावा. कुणी पेशन्टने वा सरकारने खटला भरल्यास अशा अभिलेखाचा उपयोग होईल. हे सारे मेडिकल कौन्सिलला कळत नसेल असे वाटत नाही. त्यामागे आणखी (रास्त असलेली वा नसलेली) कारणे असू शकतात. तसेच डॉक्टरांना हाणामारी करण्यापूर्वी पेशन्टच्या नातेवाईकांना विचार करावा लागेल असे वाटते. संगणक/मॉनिटर्/लॅअपटॉप फोडला तरी त्यातला डाटा बहुतेक सुरक्षित राहील.

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 03/07/2018 - 13:24
कांदळकर साहेब माझ्या कडे गेल्या साडे आठ वर्षात आलेल्या प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक अहवाल (रिपोर्ट) आणि चित्रफिती सुरक्षित आहेत. शिवाय याच गोष्टी कागदोपत्री सुद्धा नोंद (रजिस्टर) आहे. दुर्दैवाने आजकाल मेडिकल शॉपिंग फार वाढले आहे. रुग्ण एका डॉक्टर कडून दुसरीकडे मग तिसरीकडे असे जाणे बरेच वाढले आहे. त्यातून मग अगोदर दुसऱ्या पॅथीकडे गेल्याने रोग बळावला हे लपवण्याची मनस्थिती असतेच. कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असलेल्या रुग्णाचीसुद्धा उपचाराची फाईल लोक घरी ठेवून येतात आणि आल्यावर तुम्ही सोनोग्राफी करा फाईल मग आणून दाखवतो म्हणून सांगतात. त्यांना समजवावे लागते कि रोग अगोदर कुठे होता आणि किती कमी झाला आहे यासाठी अगोदरची स्थिती पाहावी लागते. तरीही एखादा माणूस हलत नाही. मेडिकल रेकॉर्ड्स हे वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थित शिकवले जाते. आणि आपले रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवा हे परत परत सांगितले जाते. कारण उद्या खटला झाला असेल तर तुमचे रेकॉर्डस च तुमच्या साहाय्याला येतील. रुग्ण टाके नको म्हणून सांगतात किंवा अमुक तमुक चाचणी करणार नाही म्हणून सांगतात ते व्यवस्थित लिहून ठेवलेले असले कि नंतर येऊन उलटतपासणी करण्याचे प्रमाण लक्षणीय दृष्ट्या कमी होते. अर्थात असा अभिलेख ठेवण्यासाठी लागणारी साधन सामुग्री आणि त्याला लागणारा काळ ( resources & time value) याचे मूल्य देण्याची समाजाची तयारी आणि मनोवृत्ती नाही हि वस्तुस्थिती आहे.

नितीन पाठक 03/07/2018 - 16:21
डॉ़क, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आधी स्वतः केले तर आपण दुस-यांना अधिकाराने सांगू शकतो. लेख नेहमीप्रमाणे मस्त, वाचनीय .......

गामा पैलवान 03/07/2018 - 17:09
डॉक्टर श्रीहास, मस्त किस्से आहेत. काही भाष्य करेन म्हणतो. १.
हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....
आधारला पंजीकरण जोडलं तर त्या क्रमांकाने डॉक्टरशी संपर्क साधण्याची सुविधा प्राप्त होईल. पण देव करो आणि अशी काही वेळ न येवो. कारण बिग ब्रदर इज वॉचिंग यू. २.
.... मग त्याच्या पालकांना विचारलं मी तुम्ही करता का काही व्यायाम ?
प्रश्न रास्त आहे. फक्त तो लहान मुलासमोर उच्चारायला नको होता. पश्चातबुद्धीने म्हणता येईल की, 'घरातल्या सगळ्यांनी व्यायाम केलेला चांगला असतो' असं बोलायला हवं होतं. ३.
ह्यावर त्यांचा मुलगा पण चिडून म्हणाला अग ३५ वर्ष !! मीच तर ३६ चा आहे .....
यावरून शाळेतल्या वडीलमुलग्यांच्या वयांच्या गणिताची आठवण झाली. :-) एकाने उत्तर काढलं होतं बाप ३० वर्षांचा आणि मुलगा २५ वर्षांचा. छान! म्हणजे बापाने पाचव्या वर्षी पोरास जन्म दिला की काय! आ.न., -गा.पै.

रायनची आई 04/07/2018 - 10:12
माझ्या सासूबाई पण अशाच; कोणत्याही डॉक्टर कडे जाऊन घरी आल्यावर सांगतात की मी डॉक्टरना माझ वय सांगितल तर डॉक्टरना पटतच नाही... त्या जेव्हा 64 वर्षाची होत्या तेव्हा म्हणायच्या की आज मी डॉक्टरना माझ वय सांगितले तर ते म्हणाले की काहीतरीच काय? 46 वाटतय फारफार तर.. :))

In reply to by रायनची आई

डॉ श्रीहास 04/07/2018 - 15:01
सांगायचं झालं तर , कधीच शाळेत न गेल्यामुळे वयाचा दाखला अंदाजे बनवलेला असतो. असे पेशंट त्यांचं वय किती हे नक्की सांगूच शकत नाहीत म्हणून डॉक्टर नी अंदाजानी वय लिहावं अशी भाबडी अपेक्षा असते. तर काही पेशंट वय सांगतांना ५० / ६० असं मोघम उत्तर देतात तेव्हा त्यांना सांगावं लागतं की दहा वर्षांचा फरक आहे दोन्ही आकड्यांमध्ये ... तेव्हा त्यांना गडबड लक्षात येते आणि ५५ लिहा असं ॲव्हरेज काढून देतात ..... :))

गामा पैलवान 04/07/2018 - 12:17
खरे डॉक्टर,
परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो.
तुम्ही डॉक्टर आहात ना मग मुलाचं मन तुम्हाला तरी वळवता येतंय का ते बघूया अशी पालकांची अगतिकता असते. असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत होत असे. शालेय परीक्षांत 'हुशार' विद्यार्थी असल्याने माझ्या सांगण्याचा काही परिणाम होईल या आशेने ओळखीचे लोकं त्यांच्या मुलांना घेऊन माझ्या भेटीस येत. पण शालेय अभ्यास कधीही मन लावून केलेला नसल्याने मार्कांचे चार तुकडे प्रगतीपुस्तकावर फेकले की सुटलो तिच्यायला, अशी अस्मादिकांची धारणा असे. मुलांना काय घंटा उपदेश द्यायचा मी? सांगायचा मुद्दा असा की पालकांचं सोडून द्या, इथं सोळासतरा वर्षांचा उपदेशक म्हणजे मीच अगतिक होतो. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही कदाचित अधिक सुस्थितीत असाल म्हणून हा संदेशप्रपंच. पालक तुमच्याकडे अंतिम उपाय म्हणून आलेले दिसतात. पण तो अंतिम उपाय तुम्ही अंमलात आणायचा नसून पालकांनीच आणायचा आहे. हे कान डॉक्टरांनी टोचलेले बरे म्हणावेत का? आ.न., -गा.पै.

सुबोध खरे 04/07/2018 - 13:28
तसं नाहीये हे रुग्ण माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी आलेले नसून पाळी येत नाही म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा त्यांचे फॅमिली डॉक्टर यांनी सोनोग्राफीसाठी पाठवलेले रुग्ण असतात. आपल्या मुलीची/ बायकोची पाळी न येण्याचे कारण त्यांचे वाढलेले वजन हे मी समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना मनापासून तसे करायचे असते आणि जमत नाही अशाना मी (फुकट) समुपदेशनही करतो. परंतु आम्ही काहीच करणार नाही जे काय करायचे ते डॉक्टरने केले पाहिजे असे १० % रुग्ण असतात( आम्ही पैसे फेकायला तयार आहोत पण हे खाणं कमी करा म्हणून सांगू नका काही गोळी असेल तर सांगा). अशा लोकांचा अविर्भाव पाहून डोकं फिरतं. लग्न झाल्यावर वर्षभरात दहा पंधरा किलो वजन वाढलेली किती तरी उदाहरणे समोर येतात. सुरुवातीला पाळी आली नाही म्हणून काही तरी "गोड बातमी" साठी येतात. प्रत्यक्षात PCOS हा आजार झालेला आढळतो. वर वजन कमी करा सांगितले तर "आम्ही काही खातच नाही" हे पालुपद असतेच. अशा बरीच मुलींना मी समजावून देण्याचा प्रयत्न करतो. पण यात काही अशा आडमुठ्या मुली असतातच कि डॉक्टर खाणं कमी करायला सांगू नका. आता अशांना काय सांगणार. मी निष्काम वृत्तीने सांगतो वजन कमी केले नाहीत तर मूल व्हायला त्रास होईल आणि वंध्यत्वाचा उपचार अतिशय खर्चिक आहे. बऱ्यचशा मुली ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात. ( काय डॉक्टर पकवतो आहे असा भाव चेहऱ्यावर असतो) "कर्मण्येवाधिकारस्ते" हेच खरं.

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 04/07/2018 - 17:44
खरे डॉक्टर, माझं एकंदरीत मत सांगतो. हे तुम्हाला उद्देशून असं काही नाही. सर्वसाधारण निरीक्षण आहे. त्याचं काय आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांचं काम म्हणजे रोगास पिटाळून लावणे. हे सांघिक कार्य आहे. कुण्या एकावर जबाबदारी टाकता येत नाही. मिळून मिसळून काम करायचं आहे तेव्हा परस्परांत सहकार्य हवंच. रुग्णांची ही जाणीव आताशा लोप पावंत चाललीये. माझ्या अंदाजानुसार कौटुंबिक वैद्य (= फ्यामिली डॉक्टर) ही जमात नाहीशी झाल्यापासनं अशी गडबड होऊ लागलीये. तुमचं भाष्य ऐकायला आवडेल. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान 04/07/2018 - 21:09
अवांतर : एक कोडं : एक बाई डॉक्टरकडे जाते. डॉक्टरांना तिचं 53 वर्षं वय माहित असतं. तरीपण खात्री करून घेण्यासाठी तिच्याकडून फॉर्म भरून घेतात. त्यात ती लिहिते 35. ते वाचून डॉक्टर मिश्कीलपणे हसतात आणि म्हणतात की वय बरोबर लिहिलंय. त्यावर बाई म्हणते, मग काय तर, नव्या युगाची परिभाषा आहे ही. तर तिने वयाच्या रकान्यात काय लिहिलं असेल? -आ.पै.
https://www.misalpav.com/node/42846 अहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला ....... मी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये !! .... कारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता.... _/\_.... __________________•______________ हा ७ वर्षाचा मुलगा माझा पेशंट आहे, आई बाबांसोबत नियमित येतो. मागच्या भेटीत विचारलं त्याला काही व्यायाम करतोस का ?

‘क’ जीवनसत्व : आंबट फळांची दणकट देणगी !

हेमंतकुमार ·

हेमंतकुमार 28/06/2018 - 10:20
मा. सा. सं, माझा हा लेख यापूर्वीच्या ‘ड’ जीवनसत्वांच्या २ लेखांस जोडून अनुक्रमणिका करावी ही विनंती. एकूण ५ जीवनसत्वांवर लेख लिहिणार आहे. आभार !

जेम्स वांड 28/06/2018 - 12:08
सुटसुटीत अन फुकट फाफटपसारा नसलेला लेख आवडला डॉक्टर कुमार. व्हिटॅमिन सी खरोखर जीवनरक्षण करणारा देवदूत म्हणता येईल. मला काही प्रश्न आहेत. म्हणजे बघा व्हिटॅमिन सीचे व्यवच्छेदक म्हणता येईल असे लक्षण म्हणजे "आंबट चव" (त्याला कारणीभूत असलेलं आम्ल तत्व ह्यावर तुम्ही चांगले लिहिले आहे) आंबट चव असणाऱ्या इतर पदार्थात (रासायनिक नाही तर जैव-रासायनिक) ते आढळते का? उदाहरण द्यायचे झाले तर इडली डोश्याचे आंबवलेले पीठ, इतर आंबवलेले खाद्यपदार्थ, यीस्टमुळे येणारा पदार्थातील आंबटपणा, किंवा बियर, रेड वाईन सारखी आंबवून तयार केलेली पेये, थोडक्यात काय, तर व्हिटॅमिन सी फक्त नैसर्गिक स्रोतांत सापडते की आंबवणे वगैरे प्रक्रिया वापरून पाकसिद्धी केलेल्या पदार्थांत त्याचा काही लवलेश उपलब्ध असतो?

हेमंतकुमार 28/06/2018 - 12:18
यीस्टमुळे येणारा पदार्थातील आंबटपणा, किंवा बियर, रेड वाईन सारखी आंबवून तयार केलेली पेये,>>>>>>> नाही , हा आंबूसपणा 'ब-१' या जीवनसत्वाने येतो. त्याचे अधिक विवेचन लेखमालेत पुढे येईलच. क = ताजी आंबट फळे. इडलीबद्दल माहीत नाही, वाचून बघतो

In reply to by हेमंतकुमार

जेम्स वांड 28/06/2018 - 12:27
इडली संबंधी काही सापडले तर नक्की कळवा. प्रश्न वैयक्तिक आहे! हायपर ऍसिडिटीचा त्रास असल्यामुळे इडली खाऊच शकत नाही, खाल्ली की भयानक आंबट ढेकर, पोटात मरणाची जळजळ वगैरे सुरू होऊन जातं. तसेच हायपर ऍसिडिटी पेशंट्सने व्हिटॅमिन सी सिव्हीयर ऍसिड रिफ्लक्सेस टाळून कसे घ्यावे ह्यावरही थोडे सांगाल ही नम्र विनंती.

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 28/06/2018 - 13:00
यीस्ट किंवा किंवा यात अजीबात क जीवनसत्त्व नाही. त्यामुळे आंबवून केलेल्या पदार्थात उदा इडली किंवा बियर यात क जीवनसत्त्व अजिबात मिळत नाही. पदार्थास आंबट चव असली कि त्यात क जीवनसत्त्व असते यास कोणताही आधार नाही. आंबट गोड बोरे किंवा चिंच यात फारसे क जीवनसत्त्व नाही.( यात इतर अनेक खनिजे असतात हा भाग वेगळा) बाकी वर म्हटल्याप्रमाणे आवळा किंवा पेरू भरपूर खा.

हेमंतकुमार 28/06/2018 - 12:47
@जेम्स, थोडेफार गुगलल्यावर असे वाटते: १. नैसर्गिकरीत्या पदार्थ आम्बावल्यावर त्यात विविध ‘ब’ आणि ‘K’ जीवनसत्वे तयार होतात. २. ‘क’ आपण जैवतंत्रज्ञानाने करू शकतो. त्यात रासायनिक क्रिया अधिक आंबवणे असे करतात. (https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/1368195) म्हणून इडली करताना ‘क’ होत नाही हेमावैम. तरीही आहारतज्ञांचे मत वाचायला आवडेल.

सुबोध खरे 28/06/2018 - 12:55
"क" जीवनसत्त्व यासाठी रोजचे प्रमाण साधारण ४० ते ६० मिग्रॅ आहे. तर गरोदर स्त्रीला हीच गरज ९० मिग्रॅ पर्यंत असते. गमतीची गोष्ट म्हणजे साधारण पणे लिंबू किंवा संत्रे यात भरपूर क जीवन सत्त्व असते असे सांगितले किंवा शिकवले जाते परंतु १०० मिली लिंबाच्या/ संत्र्याच्या रसात ५५ मिग्रॅ क जीवन सत्त्व असते. १०० मिली लिम्बाचा रस काही कुणाला खाणे शक्य नाही. त्यामानाने एक संत्रे खाणे शक्य आहे. याउलट १०० ग्राम आवळ्यात १००० ते १८०० मिग्रॅ असते म्हणजेच आवळ्याच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी त्यात आपल्याला भरपूर क जीवन सत्त्व मिळते. एक महत्त्वाचे पण दुर्लक्षित फळ म्हणजे पेरू. यात १०० ग्राम मध्ये २२५ मिग्रॅ क जीवन सत्त्व मिळते. म्हणजेच पेरूच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी पुरेसे क जीवन सत्त्व मिळू शकते. आणि १०० ग्राम पेरू किंवा आवळे तर कोणालाही जाता जाता खाणे शक्य आहे( गरोदर स्त्री सुद्धा). आणि ज्यांना ऍसिडिटी/ आम्लपित्त आहे अशा लोकांना सुद्धा आवळा किंवा पेरू खाणे शक्य आहे.

In reply to by सुबोध खरे

जेम्स वांड 28/06/2018 - 21:31
याउलट १०० ग्राम आवळ्यात १००० ते १८०० मिग्रॅ असते म्हणजेच आवळ्याच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी त्यात आपल्याला भरपूर क जीवन सत्त्व मिळते. हे म्हणजे लैच सणसणीत सांगितलं पाहा तुम्ही खरे साहेब. आवळा सहज आजकालच्या सॅव्ही भाषेत म्हणतात तसं "सुपर फूड" म्हणायला हरकत नसावी नाही का?

In reply to by सुबोध खरे

सस्नेह 29/06/2018 - 17:07
याउलट १०० ग्राम आवळ्यात १००० ते १८०० मिग्रॅ असते म्हणजेच आवळ्याच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी त्यात आपल्याला भरपूर क जीवन सत्त्व मिळते.
आवळा शिजवून केलेल्या मोरावळ्यातून क जीवनसत्व याच प्रमाणात मिळते का ?

In reply to by सस्नेह

सुबोध खरे 29/06/2018 - 20:25
क जीवनसत्व (ऍस्कॉर्बिक ऍसिड) हे १९० अंश सेल्सियस ला वितळते आणि त्याच्यावर उष्णतेचा परिणाम फारसा होत नाही परंतु ते पाण्यात विद्राव्य असल्यामुळे तुम्ही जर आवळे उकडून पाणी फेकून दिलेत तर ४५ ते ६० % क जीवनसत्व त्या पाण्यातून बाहेर जाईल. तेंव्हा मोरावळा जर पाणी फेकून न देता तयार केला तर क जीवनसत्व व्यवस्थित शिल्लक राहील.( मोरावळा कसा करतात हे माहित नाही त्याबद्दल क्षमस्व) खालील दुवा पहा. https://cooking.stackexchange.com/questions/17379/how-does-boiling-remove-vitamin-c-from-food

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार 29/06/2018 - 21:01
१. सर्व जीवनसत्वांमध्ये ते उष्णतेने सर्वात जास्त अस्थिर होते. (most unstable) ( Handbook of Vitamins textbook : लेखक सध्या आठवत नाही). २. ७० C तापमानाला ते नाश पावते (http://www.dietitian.com/vitaminc.html#.WzZMFtUzaUk) ३. ‘क’ असलेल्या भाज्या शिजवायच्याच असतील तर मंद आचेवर, खूप कमी पाण्यात आणि कमीतकमी वेळ शिजवावे. (http://www.ijstr.org/final-print/nov2013/Effect-Of-Heating-On-Vitamin-C-Content-Of-Some-Selected-Vegetables.pdf) ४. तेव्हा कच्ची फळेच उत्तम हेमावैम. ५. आवळा शिजवाण्याबाब्त काही वेगळी मते आहेत पण मूळ संदर्भ मला मिळालेला नाही म्हणून मत देत नाही.

In reply to by हेमंतकुमार

सस्नेह 30/06/2018 - 11:46
मोरावळा करताना आवळे वाफवून त्याच पाण्यात साखर घालतात व साधारण वीस मिनिटे उकळतात. अर्थात १०० डिग्रीला. पण पाणी टाकले जात नाही. आवळा पेठा किंवा कँडी करताना मात्र वाफवलेल्या आवळ्याचे पाणी बाजूला काढून त्याचे सरबत केले जाते.

टर्मीनेटर 28/06/2018 - 13:04
छान माहिती कुमारजी....@ जेम्स वांड , दक्षिण भारतातील शाकाहारी लोकांचे मुख्य अन्न भात आहे. त्यातून शरीराची जीवनसत्वांची गरज भागात नसल्याने त्यांच्या आहारात चिंच व आंबवलेल्या डाळ आणि तंदुळाच्या पीठापासून तयार केलेल्या ईडली डोसा सारख्या पदार्थांचा समावेश असतो असे कुठेतरी वाचल्या सारखे आठवतंय.

अनिंद्य 28/06/2018 - 15:57
@ कुमार१, नेहेमीप्रमाणेच अभ्यासू, समजण्यास सोपा, सुटसुटीत वगैरे लेख. ‘bachelor’s scurvy’ वाचले होते. स्वतःला पेरू, संत्री, आवळा फारच आवडत असल्यामुळे आणि भरपूर खातही असल्यामुळे बहुतेक 'क' कमी कसावे सॉरी नसावे :-) पु भा प्र, अनिंद्य

झेन 28/06/2018 - 17:41
तुमचे लिखाण नेहमीच सुटसुटीत, माहितीपूर्ण आणि उपयोगी असते. आवळ्याच्या रसाने आवळ्या इतका नसला तरी फायदा होतो का ?

हेमंतकुमार 28/06/2018 - 18:00
आवळ्याच्या रसाने आवळ्या इतका नसला तरी फायदा होतो का ?>>> 'क' मिळण्याबाबत नक्कीच होईल. बस्स, तो शुद्ध मिळावा इतकेच .

वाह ! खुपच माहीतीपुर्ण लेख ! लहानपणी आज्जी सकाळी सकाळी मोरावळा खायला द्यायची त्याची आठवण झाली :)

हेमंतकुमार 28/06/2018 - 19:54
स्वतःला पेरू, संत्री, आवळा फारच आवडत असल्यामुळे >>>>>>> चांगले आहेत हे डोहाळे ! कायम चालू ठेवा.... लहानपणी आज्जी सकाळी सकाळी मोरावळा खायला द्यायची त्याची आठवण झाली >>>>> अगदी अगदी ! माझी आज्जी पण....

होण्यास मदत झाली. लिंबात आवळ्यात व्हिटॅमीन सी असते हे शालेय पुस्तकात वाचले आहे. पण पेरूत इतके भरपूर असते हे ठाऊक नव्हते. डॉ. खरेंनी तर नेमके प्रमाणही दिलेले आहे. शालेय पाठ्यपुस्तकातली माहिती प्रमाणासह अपडेट करणे आवश्यक दिसते आहे. मोरावळा आणि च्यवनप्राश यातले व्हिटॅमीन सी कसकसे कमी होत जाते याचा तक्ता संशोधन करून बनवणे आवश्यक आहे. असो छान लेखाबद्दल आपल्याला आणि उत्कृष्ट पूरक माहितीबद्दल डॉ खरेंना अनेक धन्यवाद.

पॅपिलॉन या गाजलेल्या कादंबरीत तुरुंगातला एक कैदी व्हिटॅमीन सी मिळावे म्हणून भरपूर लिंबे खायला घातल्यावर काय झाले ते डॉक्टरना एका मस्त विनोदातून सांगतात ते आठवले. तो कैदी स्वतःच्या पार्श्वभागात लिंबाच्या झाडाची फांदी घालतो आणि तुमच्या शिफारसीवरून तुरुंग प्रशासनाने लिंबे जास्त खायला घातल्यामुळे हे असे इथे लिंबाचे झाड उगवले म्हणून डॉक्टरांना सांगतो.

हेमंतकुमार 29/06/2018 - 10:27
पोहे हा आपल्यापैकी बहुतेकांचा आवडता न्याहारीचा पदार्थ. त्यांत काही प्रमाणात लोह असते. आता आपली फोडणीचे पोहे खाण्याची पारंपरिक पद्धत पहा. बशीत घेतल्यावर आपण त्यावर लिंबू पिळतो. लिंबातील ‘क’ मुळे पोह्यातील लोहाचे शोषण वाढते. मात्र एक काळजी घ्यायची. गरम पोहे कढईत असताना त्यावर नाही लिंबू पिळायचे; ते बशीत वाढून घेतल्यावर काहीसे कोमट झाल्यावर त्यावर पिळायचे.

सुबोध खरे 29/06/2018 - 20:34
एक विशेष सूचना-- क जीवनसत्व (ऍस्कॉर्बिक ऍसिड) हे Ascorbic acid is a six carbon compound related to glucose, and strong reducing agent असल्याने आपण मूत्राची तपासणी करण्याच्या अगोदर भरपूर आवळे किंवा पेरू खाऊन गेला असाल किंवा क जीवनसत्व याची गोळी घेऊन गेला असाल तर आपल्या "लघवीत साखर" आहे असा निष्कर्ष येऊ शकतो. साधारण पणे लघवीत साखर नसते. लघवीत साखर येणे म्हणजे आपली रक्तातील साखर हि १८० पेक्षा वर जाणे असा अर्थ आहे. मधुमेही व्यक्तींनी याबद्दल सावधान राहणे आवश्यक आहे. पहा-- Influence of Vitamin C on Urine Dipstick Test Results. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/26275689

In reply to by सुबोध खरे

असेच व्हिटॅमिन्स्च्या अतिसेवनाचे दुष्परिणाम्ही असतात ना , त्या विषयीही लिहावे ही नम्र विनंती . " अति" म्हणजे किती ? सी व्हिटॅमिन वॉटर सोल्युबल असते ना , त्याच्या अतिसेवनचेही काही तोटे होतात कि अति शरीराबाहेर आपोआप फेकले जाते ?

हेमंतकुमार 29/06/2018 - 21:41
१३ जीवनसत्वांचे २ गटांत वर्गीकरण: १. मेदात विरघळणारी : A, D, E, K. ही यकृतात वा मेदात साठवली जातात. म्हणून गरज नसताना त्याच्या गोळ्या दीर्घकाळ खाल्ल्यास नक्की दुष्परिणाम होतात. २. पाण्यात विरघळणारी : सर्व B आणि C. इथे B-१२ चा अपवाद वगळता ती साठवली जात नाहीत. म्हणून गरज नसतानाही जास्त खाल्लीत तर नको तो भाग सरळ लघवीतून बाहेर जातो. त्यामुळे या गटाचे सहसा दुष्परिणाम नाहीत. ३. पण, ‘क’ बाबत थोडा इशारा: शरीरात त्याचे oxalate मध्ये रुपांतर होते. हे संयुग मूतखडे होण्याशी निगडीत आहे. तेव्हा संबंधित संवेदनशील व्यक्तींनी आणि मूत्रपिंडाचे आजार असलेल्यांनी जरा जपून राहावे इतकेच. ४. मुळात पाण्यात विरघळतेय म्हणून उगाचच गोळ्या दीर्घकाळ कधीही खाऊ नयेत.

अस वाटतय डॉक्टरचं साहित्य संमेलन भरले आहे , वाचकांच्या निरोगी आयुष्या साठी शांततेत चर्चा चालू आहे , बरेचसे वाचक मूकपणे माहितीपूर्ण चर्चेचा आस्वाद घेऊन स्वतः च्या ज्ञानात भर घालत आहेत. पण या साहित्य संमेलनात एक ही श्रीपाल सबनीस नाही ही आनंदाची बाब आहे .

नाखु 30/06/2018 - 11:42
त्या (फुकाच्या) तात्विक वाद चर्चांपेक्षा या तात्विक ( सत्व युक्त) चर्चा मिपाचे आरोग्यासाठी लाभदायक ठरेल असे वाटते सात्विक आहार प्रेमी नाखु पांढरपेशा

हेमंतकुमार 30/06/2018 - 12:20
या विषयावरील अनेक संस्थलांचा धांडोळा घेतल्यावर एक सोपा निष्कर्ष निघतो. तो म्हणजे भाज्या ‘उकळून शिजवण्या’ ऐवजी वाफावून (steaming) घेणे चांगले. ‘क’ च्या बाबतीत हे अधिकच लागू होते.

श्वेता२४ 05/07/2018 - 16:27
तुमचे लेख व त्यावरील चर्चा वाचून ज्ञानात खूप भर पडतेय. ही माहीती सर्वांना असणे गरजेचे आहे. इतक्या साध्या सोप्या भाषेत असा विषय मांडल्याबद्दल तुमचे आभारच मानायला हवेत.

हेमंतकुमार 05/07/2018 - 17:13
अभिप्रायाबद्दल आभार. तुमचेही चर्चेत स्वागत. तुमच्यासारख्या उत्साही वाचकांचे प्रतिसाद मला जीवनसत्त्वासमान आहेत . ☺

charming atheist 05/07/2018 - 17:25
Metabolic acidosis हा आजार सध्या मोठ्या प्रमाणात दिसतो.यात किडनीचे फंक्शनींग बिघडल्याने किंवा इतर कारणाने रक्ताची आम्लता वाढते. यावर citric acid + sodium bicarbonate (baking soda) म्हणजेच लिंबाचा रस आणि खाण्याचा सोडा असे मी दिवसातून दोनदा घेतो .सोडीयम बायकार्बोनेटपेक्षा sodium citrate सेफ आहे असे वाचल्याने हा उपाय नुकताच सुरु केला आहे.माझा प्रश्न असा आहे की हा उपाय करणे सुरक्षीत आहे का.? रोज दोन छोटे चमचे सोडा आणि एका लिंबाच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब वाढू शकतो का? माझा थोडा जास्त येत आहे. एकंदर लाँग टर्ममध्ये कितपत सेफ आहे?

In reply to by charming atheist

सुबोध खरे 05/07/2018 - 19:42
आपल्यास ऍसिडिटीचा त्रास आहे कि ऍसिडोसिसचा हे नक्की खात्री करून घ्या. कारण ऍसिडिटी हा आजार सामान्य आहे आणि ऍसिडोसिस हा गंभीर आजार आहे. Metabolic acidosis is a condition that occurs when the body produces excessive quantities of acid or when the kidneys are not removing enough acid from the body. If unchecked, metabolic acidosis leads to acidemia, i.e., blood pH is low (less than 7.35) due to increased production of hydrogen ions by the body or the inability of the body to form bicarbonate (CO3−) in the kidney. Its causes are diverse, and its consequences can be serious, including coma and death. Together with respiratory acidosis, it is one of the two general causes of acidemia.

हेमंतकुमार 05/07/2018 - 18:21
आहार ॲसिडीक असल्याने ॲसिडोसीसचा त्रास होत आहे. >>>> हे विधान तितकेसे पटले नाही. अमोनियम क्लोराईड आणि तत्सम रसायने बरीच acidic आहेत. पण, sodium citrate तितके नसावे असे वाटते. आपल्या रक्ताचा pH ही खूप critical बाब आहे. तो दीर्घकाळ ७.३५ पेक्षा कमी राहिल्यासच Acidosis झालाय असे म्हणतात. तुम्हाला मोठा आजार नाही असे म्हणताय. मग खरेच रक्त-pH मोजलाय का रुग्णालयात जाऊन ? कारण ही सामान्य (ओपीडी) पातळीवरची तपासणी नाही. त्यासाठी “रोहिणी” तून रक्त काढावे लागते ! की तुम्हाला निव्वळ जठरातील acidity म्हणायचे आहे? Metabolic acidosis आणि पोटातील acidity यात महदंतर आहे ! याचा खुलासा व्हावा. मग मी sodium citrate बद्दल वाचून बघतो. चमचे सोडा आणि एका लिंबाच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब वाढू शकतो का? >>> निरोगी अवस्थेत नाही. रुग्णाचे बाबतीत तपासणी करून उत्तर द्यावे लागेल. मुद्दा NaHCO३ चा आहे. लिंबाच्या रसाचा याच्याशी संबंध नाही.

In reply to by हेमंतकुमार

charming atheist 05/07/2018 - 20:11
मला पोटातील आम्लता म्हणायचे नाही आहे .मला रक्तातील आम्लता म्हणायचे आहे. Metabolic acidosis ची लक्षणे मला आहेत .सांधेदुखी ,श्वसनाचा जास्तीचा वेग आणि आहाराच्या बाबतीत पालेभाज्या अजिबात नसणे ,सतत मीट आणि आम्लीय पदार्थ खाणे असं एकंदर आहे. Self diagnosis करणे घातक आहे मान्य पण मी बायो केमिस्ट्रीचा अभ्यास कॉलेजमध्ये केला असल्याने थोडे ज्ञान आहे. Sodium citrate हे ॲसिड सॉल्ट असल्याने रक्तात शोषले गेल्यास बेसिसीटी वाढवण्यास् मदत करते असे मी ncbi मध्ये असलेल्या स्टडीजमध्ये वाचले आहे.ब्लड pH नॉर्मल रहाण्यास मदत होते असे वाचले आहे. Oral sodium citrate चे स्टडीजही पोझिटीव्ह आहेत. तुमचे कुमार१ आणि खरे ,दोघांचे काय मत आहे हे मला विचारायचे आहे. मी इथे ncbi ची लिंक देतो.

In reply to by charming atheist

सुबोध खरे 05/07/2018 - 20:36
जालावर मी अभिप्राय देत नाही. असे करणे धोक्याचे आहे. आपण आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा असाच कळकळीचा सल्ला देईन. जालावर केलेलं स्वनिदान धोक्याचे असते https://www.misalpav.com/node/31038

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार 05/07/2018 - 20:49
सहमत. तसेच या मुद्द्यावर अधिक चर्चा करत बसलो तर धाग्याचा मूळ हेतू ('क ' ची उपयुक्तता ) पासून आपण फार भरकटू. अन्य वाचकांना ते अस्थानी वाटेल. लोभ असावा

डॉ श्रीहास 11/07/2018 - 12:28
सर्वात महत्वाचा मुद्दा : सर्दीसाठीबद्दल चा गैरसमज दूर केलात, कारण किमान १० जणांना तरी रोज सांगतो की लिंबं, आवळे आणि पेरू खात जा !!

In reply to by हेमंतकुमार

जागु 11/07/2018 - 16:33
ओके. मला ही शंका आली कारण हाडांसाठी आंबट चांगल आहे हे वाचल पण संधीवातात आंबट खायला बंदी असते. कदाचीत वात हा आजार वेगळा असेल व वाताला आंबट चालत नसेल.

In reply to by जागु

हेमंतकुमार 11/07/2018 - 16:55
या शब्दांमुळे घोळ होतो खरे ! Arthritis = सांध्यांचा दाह , असे साधारण भाषांतर. या आजाराची कारणे असंख्य. 'वात' हा आयुर्वेदिक शब्द. दोन भिन्न शास्त्रांची सांगड घालणे तसेच इंग्लिश चे मराठी करताना घोळ होतो. पथ्याच्या कल्पनाही भिन्न असतात.

माहितगार 11/07/2018 - 16:23
आंबट = क जिवनसत्व असे सरळसोट विधान होऊ शकते की काही अपवाद आहेत. कारण वर मर्यादीत फळांची चर्चा झाल्याचे दिसते. आहारातील टमाटे, चिंच, आमसूल , आंबट चुका, आंबट झालेले दही/ताक आणि क जिवनसत्व याबद्दल या निमित्ताने माहिती मिळावी हि विनंती. आहार विषयक चांगल्या चर्चा मालिकेसाठी धागा लेखकाचे अनेक आभार.

हेमंतकुमार 11/07/2018 - 16:49
आंबट = क जिवनसत्व असे सरळसोट विधान होऊ शकते की >>>> नाही होऊ शकत. आंबटपणा अनेक प्रकारच्या आम्लांमुळे असू शकतो. पण ज्यांत Ascorbic acid आहे तेच फक्त ‘क’ होय. दही- ताकाचा आंबटपणा Lactic acid मुळे आहे.

In reply to by हेमंतकुमार

माहितगार 11/07/2018 - 17:55
ओह ओह, मला वाटायचे कोणतेही आंबट खाल्ले की येत असणार क जिवनसत्व मी तर आंबट चिक्कार खातो, आणि मला काय क जिवनसत्वाची फिकिर, सुरवातीस धागा उघडण्याचेही कष्ट घेतले नव्हते :) बरे झाले प्रश्न विचारला. माझी अनेक वर्षांची चुकीची समजून दूर केल्या बद्दल खूप खूप आभार.

In reply to by माहितगार

सुबोध खरे 11/07/2018 - 18:54
पदार्थास आंबट चव असली कि त्यात क जीवनसत्त्व असते यास कोणताही आधार नाही. आंबट गोड बोरे किंवा चिंच यात फारसे क जीवनसत्त्व नाही.( यात इतर अनेक खनिजे असतात हा भाग वेगळा)

हेमंतकुमार 13/07/2018 - 08:03
सध्या पेरुचा हंगाम आहे. तेव्हा मस्तपैकी पेरुंचा आस्वाद घ्या आणि ‘क’-समृद्ध व्हा ! या सदिच्छा सह इथला समारोप करतो. सर्वांचे आभार . या मालेतले पुढचे जीवनसत्व (ब१२) इथे आहे : https://www.misalpav.com/node/42982

हेमंतकुमार 27/09/2022 - 12:32
तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या या लेखात खालील उल्लेख आहे औषधरूपातील ‘क’ आणि मोतीबिंदू प्रतिबंध >>> या संदर्भातील काही नवीन संशोधनाची भर घालतो. मोतीबिंदू होण्याची अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख म्हणजे वाढत्या वयानुसार होणारा. यात डोळ्याच्या भिंगातील दीर्घकालीन ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे मोतीबिंदू होण्याची प्रक्रिया सुरू होते असे मानतात. क जीवनसत्वाला ऑक्सिडेशन विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर केल्यास ही प्रक्रिया मंद करता येईल का आणि त्यामुळे मोतीबिंदू १० वर्षांनी पुढे ढकलला जाईल का हा उत्सुकतेचा विषय आहे.परंतु अलीकडील संशोधनानुसार असा निष्कर्ष निघालेला नाही. मोतीबिंदू होण्याच्या अन्य एका कारणाबाबत आशादायक परिस्थिती आहे. दृष्टीदोषाच्या काही रुग्णांवर डोळ्यांची एक विशिष्ट शस्त्रक्रिया केली जाते (vitrectomy). त्याचा दुष्परिणाम म्हणून पुढे मोतीबिंदू होतो. अशा रुग्णांना जर शस्त्रक्रियेनंतर क जीवनसत्व औषध रूपात दिले तर दुष्परिणामामुळे होणारा मोतीबिंदू टाळता येईल.

हेमंतकुमार 28/06/2018 - 10:20
मा. सा. सं, माझा हा लेख यापूर्वीच्या ‘ड’ जीवनसत्वांच्या २ लेखांस जोडून अनुक्रमणिका करावी ही विनंती. एकूण ५ जीवनसत्वांवर लेख लिहिणार आहे. आभार !

जेम्स वांड 28/06/2018 - 12:08
सुटसुटीत अन फुकट फाफटपसारा नसलेला लेख आवडला डॉक्टर कुमार. व्हिटॅमिन सी खरोखर जीवनरक्षण करणारा देवदूत म्हणता येईल. मला काही प्रश्न आहेत. म्हणजे बघा व्हिटॅमिन सीचे व्यवच्छेदक म्हणता येईल असे लक्षण म्हणजे "आंबट चव" (त्याला कारणीभूत असलेलं आम्ल तत्व ह्यावर तुम्ही चांगले लिहिले आहे) आंबट चव असणाऱ्या इतर पदार्थात (रासायनिक नाही तर जैव-रासायनिक) ते आढळते का? उदाहरण द्यायचे झाले तर इडली डोश्याचे आंबवलेले पीठ, इतर आंबवलेले खाद्यपदार्थ, यीस्टमुळे येणारा पदार्थातील आंबटपणा, किंवा बियर, रेड वाईन सारखी आंबवून तयार केलेली पेये, थोडक्यात काय, तर व्हिटॅमिन सी फक्त नैसर्गिक स्रोतांत सापडते की आंबवणे वगैरे प्रक्रिया वापरून पाकसिद्धी केलेल्या पदार्थांत त्याचा काही लवलेश उपलब्ध असतो?

हेमंतकुमार 28/06/2018 - 12:18
यीस्टमुळे येणारा पदार्थातील आंबटपणा, किंवा बियर, रेड वाईन सारखी आंबवून तयार केलेली पेये,>>>>>>> नाही , हा आंबूसपणा 'ब-१' या जीवनसत्वाने येतो. त्याचे अधिक विवेचन लेखमालेत पुढे येईलच. क = ताजी आंबट फळे. इडलीबद्दल माहीत नाही, वाचून बघतो

In reply to by हेमंतकुमार

जेम्स वांड 28/06/2018 - 12:27
इडली संबंधी काही सापडले तर नक्की कळवा. प्रश्न वैयक्तिक आहे! हायपर ऍसिडिटीचा त्रास असल्यामुळे इडली खाऊच शकत नाही, खाल्ली की भयानक आंबट ढेकर, पोटात मरणाची जळजळ वगैरे सुरू होऊन जातं. तसेच हायपर ऍसिडिटी पेशंट्सने व्हिटॅमिन सी सिव्हीयर ऍसिड रिफ्लक्सेस टाळून कसे घ्यावे ह्यावरही थोडे सांगाल ही नम्र विनंती.

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे 28/06/2018 - 13:00
यीस्ट किंवा किंवा यात अजीबात क जीवनसत्त्व नाही. त्यामुळे आंबवून केलेल्या पदार्थात उदा इडली किंवा बियर यात क जीवनसत्त्व अजिबात मिळत नाही. पदार्थास आंबट चव असली कि त्यात क जीवनसत्त्व असते यास कोणताही आधार नाही. आंबट गोड बोरे किंवा चिंच यात फारसे क जीवनसत्त्व नाही.( यात इतर अनेक खनिजे असतात हा भाग वेगळा) बाकी वर म्हटल्याप्रमाणे आवळा किंवा पेरू भरपूर खा.

हेमंतकुमार 28/06/2018 - 12:47
@जेम्स, थोडेफार गुगलल्यावर असे वाटते: १. नैसर्गिकरीत्या पदार्थ आम्बावल्यावर त्यात विविध ‘ब’ आणि ‘K’ जीवनसत्वे तयार होतात. २. ‘क’ आपण जैवतंत्रज्ञानाने करू शकतो. त्यात रासायनिक क्रिया अधिक आंबवणे असे करतात. (https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/1368195) म्हणून इडली करताना ‘क’ होत नाही हेमावैम. तरीही आहारतज्ञांचे मत वाचायला आवडेल.

सुबोध खरे 28/06/2018 - 12:55
"क" जीवनसत्त्व यासाठी रोजचे प्रमाण साधारण ४० ते ६० मिग्रॅ आहे. तर गरोदर स्त्रीला हीच गरज ९० मिग्रॅ पर्यंत असते. गमतीची गोष्ट म्हणजे साधारण पणे लिंबू किंवा संत्रे यात भरपूर क जीवन सत्त्व असते असे सांगितले किंवा शिकवले जाते परंतु १०० मिली लिंबाच्या/ संत्र्याच्या रसात ५५ मिग्रॅ क जीवन सत्त्व असते. १०० मिली लिम्बाचा रस काही कुणाला खाणे शक्य नाही. त्यामानाने एक संत्रे खाणे शक्य आहे. याउलट १०० ग्राम आवळ्यात १००० ते १८०० मिग्रॅ असते म्हणजेच आवळ्याच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी त्यात आपल्याला भरपूर क जीवन सत्त्व मिळते. एक महत्त्वाचे पण दुर्लक्षित फळ म्हणजे पेरू. यात १०० ग्राम मध्ये २२५ मिग्रॅ क जीवन सत्त्व मिळते. म्हणजेच पेरूच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी पुरेसे क जीवन सत्त्व मिळू शकते. आणि १०० ग्राम पेरू किंवा आवळे तर कोणालाही जाता जाता खाणे शक्य आहे( गरोदर स्त्री सुद्धा). आणि ज्यांना ऍसिडिटी/ आम्लपित्त आहे अशा लोकांना सुद्धा आवळा किंवा पेरू खाणे शक्य आहे.

In reply to by सुबोध खरे

जेम्स वांड 28/06/2018 - 21:31
याउलट १०० ग्राम आवळ्यात १००० ते १८०० मिग्रॅ असते म्हणजेच आवळ्याच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी त्यात आपल्याला भरपूर क जीवन सत्त्व मिळते. हे म्हणजे लैच सणसणीत सांगितलं पाहा तुम्ही खरे साहेब. आवळा सहज आजकालच्या सॅव्ही भाषेत म्हणतात तसं "सुपर फूड" म्हणायला हरकत नसावी नाही का?

In reply to by सुबोध खरे

सस्नेह 29/06/2018 - 17:07
याउलट १०० ग्राम आवळ्यात १००० ते १८०० मिग्रॅ असते म्हणजेच आवळ्याच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी त्यात आपल्याला भरपूर क जीवन सत्त्व मिळते.
आवळा शिजवून केलेल्या मोरावळ्यातून क जीवनसत्व याच प्रमाणात मिळते का ?

In reply to by सस्नेह

सुबोध खरे 29/06/2018 - 20:25
क जीवनसत्व (ऍस्कॉर्बिक ऍसिड) हे १९० अंश सेल्सियस ला वितळते आणि त्याच्यावर उष्णतेचा परिणाम फारसा होत नाही परंतु ते पाण्यात विद्राव्य असल्यामुळे तुम्ही जर आवळे उकडून पाणी फेकून दिलेत तर ४५ ते ६० % क जीवनसत्व त्या पाण्यातून बाहेर जाईल. तेंव्हा मोरावळा जर पाणी फेकून न देता तयार केला तर क जीवनसत्व व्यवस्थित शिल्लक राहील.( मोरावळा कसा करतात हे माहित नाही त्याबद्दल क्षमस्व) खालील दुवा पहा. https://cooking.stackexchange.com/questions/17379/how-does-boiling-remove-vitamin-c-from-food

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार 29/06/2018 - 21:01
१. सर्व जीवनसत्वांमध्ये ते उष्णतेने सर्वात जास्त अस्थिर होते. (most unstable) ( Handbook of Vitamins textbook : लेखक सध्या आठवत नाही). २. ७० C तापमानाला ते नाश पावते (http://www.dietitian.com/vitaminc.html#.WzZMFtUzaUk) ३. ‘क’ असलेल्या भाज्या शिजवायच्याच असतील तर मंद आचेवर, खूप कमी पाण्यात आणि कमीतकमी वेळ शिजवावे. (http://www.ijstr.org/final-print/nov2013/Effect-Of-Heating-On-Vitamin-C-Content-Of-Some-Selected-Vegetables.pdf) ४. तेव्हा कच्ची फळेच उत्तम हेमावैम. ५. आवळा शिजवाण्याबाब्त काही वेगळी मते आहेत पण मूळ संदर्भ मला मिळालेला नाही म्हणून मत देत नाही.

In reply to by हेमंतकुमार

सस्नेह 30/06/2018 - 11:46
मोरावळा करताना आवळे वाफवून त्याच पाण्यात साखर घालतात व साधारण वीस मिनिटे उकळतात. अर्थात १०० डिग्रीला. पण पाणी टाकले जात नाही. आवळा पेठा किंवा कँडी करताना मात्र वाफवलेल्या आवळ्याचे पाणी बाजूला काढून त्याचे सरबत केले जाते.

टर्मीनेटर 28/06/2018 - 13:04
छान माहिती कुमारजी....@ जेम्स वांड , दक्षिण भारतातील शाकाहारी लोकांचे मुख्य अन्न भात आहे. त्यातून शरीराची जीवनसत्वांची गरज भागात नसल्याने त्यांच्या आहारात चिंच व आंबवलेल्या डाळ आणि तंदुळाच्या पीठापासून तयार केलेल्या ईडली डोसा सारख्या पदार्थांचा समावेश असतो असे कुठेतरी वाचल्या सारखे आठवतंय.

अनिंद्य 28/06/2018 - 15:57
@ कुमार१, नेहेमीप्रमाणेच अभ्यासू, समजण्यास सोपा, सुटसुटीत वगैरे लेख. ‘bachelor’s scurvy’ वाचले होते. स्वतःला पेरू, संत्री, आवळा फारच आवडत असल्यामुळे आणि भरपूर खातही असल्यामुळे बहुतेक 'क' कमी कसावे सॉरी नसावे :-) पु भा प्र, अनिंद्य

झेन 28/06/2018 - 17:41
तुमचे लिखाण नेहमीच सुटसुटीत, माहितीपूर्ण आणि उपयोगी असते. आवळ्याच्या रसाने आवळ्या इतका नसला तरी फायदा होतो का ?

हेमंतकुमार 28/06/2018 - 18:00
आवळ्याच्या रसाने आवळ्या इतका नसला तरी फायदा होतो का ?>>> 'क' मिळण्याबाबत नक्कीच होईल. बस्स, तो शुद्ध मिळावा इतकेच .

वाह ! खुपच माहीतीपुर्ण लेख ! लहानपणी आज्जी सकाळी सकाळी मोरावळा खायला द्यायची त्याची आठवण झाली :)

हेमंतकुमार 28/06/2018 - 19:54
स्वतःला पेरू, संत्री, आवळा फारच आवडत असल्यामुळे >>>>>>> चांगले आहेत हे डोहाळे ! कायम चालू ठेवा.... लहानपणी आज्जी सकाळी सकाळी मोरावळा खायला द्यायची त्याची आठवण झाली >>>>> अगदी अगदी ! माझी आज्जी पण....

होण्यास मदत झाली. लिंबात आवळ्यात व्हिटॅमीन सी असते हे शालेय पुस्तकात वाचले आहे. पण पेरूत इतके भरपूर असते हे ठाऊक नव्हते. डॉ. खरेंनी तर नेमके प्रमाणही दिलेले आहे. शालेय पाठ्यपुस्तकातली माहिती प्रमाणासह अपडेट करणे आवश्यक दिसते आहे. मोरावळा आणि च्यवनप्राश यातले व्हिटॅमीन सी कसकसे कमी होत जाते याचा तक्ता संशोधन करून बनवणे आवश्यक आहे. असो छान लेखाबद्दल आपल्याला आणि उत्कृष्ट पूरक माहितीबद्दल डॉ खरेंना अनेक धन्यवाद.

पॅपिलॉन या गाजलेल्या कादंबरीत तुरुंगातला एक कैदी व्हिटॅमीन सी मिळावे म्हणून भरपूर लिंबे खायला घातल्यावर काय झाले ते डॉक्टरना एका मस्त विनोदातून सांगतात ते आठवले. तो कैदी स्वतःच्या पार्श्वभागात लिंबाच्या झाडाची फांदी घालतो आणि तुमच्या शिफारसीवरून तुरुंग प्रशासनाने लिंबे जास्त खायला घातल्यामुळे हे असे इथे लिंबाचे झाड उगवले म्हणून डॉक्टरांना सांगतो.

हेमंतकुमार 29/06/2018 - 10:27
पोहे हा आपल्यापैकी बहुतेकांचा आवडता न्याहारीचा पदार्थ. त्यांत काही प्रमाणात लोह असते. आता आपली फोडणीचे पोहे खाण्याची पारंपरिक पद्धत पहा. बशीत घेतल्यावर आपण त्यावर लिंबू पिळतो. लिंबातील ‘क’ मुळे पोह्यातील लोहाचे शोषण वाढते. मात्र एक काळजी घ्यायची. गरम पोहे कढईत असताना त्यावर नाही लिंबू पिळायचे; ते बशीत वाढून घेतल्यावर काहीसे कोमट झाल्यावर त्यावर पिळायचे.

सुबोध खरे 29/06/2018 - 20:34
एक विशेष सूचना-- क जीवनसत्व (ऍस्कॉर्बिक ऍसिड) हे Ascorbic acid is a six carbon compound related to glucose, and strong reducing agent असल्याने आपण मूत्राची तपासणी करण्याच्या अगोदर भरपूर आवळे किंवा पेरू खाऊन गेला असाल किंवा क जीवनसत्व याची गोळी घेऊन गेला असाल तर आपल्या "लघवीत साखर" आहे असा निष्कर्ष येऊ शकतो. साधारण पणे लघवीत साखर नसते. लघवीत साखर येणे म्हणजे आपली रक्तातील साखर हि १८० पेक्षा वर जाणे असा अर्थ आहे. मधुमेही व्यक्तींनी याबद्दल सावधान राहणे आवश्यक आहे. पहा-- Influence of Vitamin C on Urine Dipstick Test Results. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/26275689

In reply to by सुबोध खरे

असेच व्हिटॅमिन्स्च्या अतिसेवनाचे दुष्परिणाम्ही असतात ना , त्या विषयीही लिहावे ही नम्र विनंती . " अति" म्हणजे किती ? सी व्हिटॅमिन वॉटर सोल्युबल असते ना , त्याच्या अतिसेवनचेही काही तोटे होतात कि अति शरीराबाहेर आपोआप फेकले जाते ?

हेमंतकुमार 29/06/2018 - 21:41
१३ जीवनसत्वांचे २ गटांत वर्गीकरण: १. मेदात विरघळणारी : A, D, E, K. ही यकृतात वा मेदात साठवली जातात. म्हणून गरज नसताना त्याच्या गोळ्या दीर्घकाळ खाल्ल्यास नक्की दुष्परिणाम होतात. २. पाण्यात विरघळणारी : सर्व B आणि C. इथे B-१२ चा अपवाद वगळता ती साठवली जात नाहीत. म्हणून गरज नसतानाही जास्त खाल्लीत तर नको तो भाग सरळ लघवीतून बाहेर जातो. त्यामुळे या गटाचे सहसा दुष्परिणाम नाहीत. ३. पण, ‘क’ बाबत थोडा इशारा: शरीरात त्याचे oxalate मध्ये रुपांतर होते. हे संयुग मूतखडे होण्याशी निगडीत आहे. तेव्हा संबंधित संवेदनशील व्यक्तींनी आणि मूत्रपिंडाचे आजार असलेल्यांनी जरा जपून राहावे इतकेच. ४. मुळात पाण्यात विरघळतेय म्हणून उगाचच गोळ्या दीर्घकाळ कधीही खाऊ नयेत.

अस वाटतय डॉक्टरचं साहित्य संमेलन भरले आहे , वाचकांच्या निरोगी आयुष्या साठी शांततेत चर्चा चालू आहे , बरेचसे वाचक मूकपणे माहितीपूर्ण चर्चेचा आस्वाद घेऊन स्वतः च्या ज्ञानात भर घालत आहेत. पण या साहित्य संमेलनात एक ही श्रीपाल सबनीस नाही ही आनंदाची बाब आहे .

नाखु 30/06/2018 - 11:42
त्या (फुकाच्या) तात्विक वाद चर्चांपेक्षा या तात्विक ( सत्व युक्त) चर्चा मिपाचे आरोग्यासाठी लाभदायक ठरेल असे वाटते सात्विक आहार प्रेमी नाखु पांढरपेशा

हेमंतकुमार 30/06/2018 - 12:20
या विषयावरील अनेक संस्थलांचा धांडोळा घेतल्यावर एक सोपा निष्कर्ष निघतो. तो म्हणजे भाज्या ‘उकळून शिजवण्या’ ऐवजी वाफावून (steaming) घेणे चांगले. ‘क’ च्या बाबतीत हे अधिकच लागू होते.

श्वेता२४ 05/07/2018 - 16:27
तुमचे लेख व त्यावरील चर्चा वाचून ज्ञानात खूप भर पडतेय. ही माहीती सर्वांना असणे गरजेचे आहे. इतक्या साध्या सोप्या भाषेत असा विषय मांडल्याबद्दल तुमचे आभारच मानायला हवेत.

हेमंतकुमार 05/07/2018 - 17:13
अभिप्रायाबद्दल आभार. तुमचेही चर्चेत स्वागत. तुमच्यासारख्या उत्साही वाचकांचे प्रतिसाद मला जीवनसत्त्वासमान आहेत . ☺

charming atheist 05/07/2018 - 17:25
Metabolic acidosis हा आजार सध्या मोठ्या प्रमाणात दिसतो.यात किडनीचे फंक्शनींग बिघडल्याने किंवा इतर कारणाने रक्ताची आम्लता वाढते. यावर citric acid + sodium bicarbonate (baking soda) म्हणजेच लिंबाचा रस आणि खाण्याचा सोडा असे मी दिवसातून दोनदा घेतो .सोडीयम बायकार्बोनेटपेक्षा sodium citrate सेफ आहे असे वाचल्याने हा उपाय नुकताच सुरु केला आहे.माझा प्रश्न असा आहे की हा उपाय करणे सुरक्षीत आहे का.? रोज दोन छोटे चमचे सोडा आणि एका लिंबाच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब वाढू शकतो का? माझा थोडा जास्त येत आहे. एकंदर लाँग टर्ममध्ये कितपत सेफ आहे?

In reply to by charming atheist

सुबोध खरे 05/07/2018 - 19:42
आपल्यास ऍसिडिटीचा त्रास आहे कि ऍसिडोसिसचा हे नक्की खात्री करून घ्या. कारण ऍसिडिटी हा आजार सामान्य आहे आणि ऍसिडोसिस हा गंभीर आजार आहे. Metabolic acidosis is a condition that occurs when the body produces excessive quantities of acid or when the kidneys are not removing enough acid from the body. If unchecked, metabolic acidosis leads to acidemia, i.e., blood pH is low (less than 7.35) due to increased production of hydrogen ions by the body or the inability of the body to form bicarbonate (CO3−) in the kidney. Its causes are diverse, and its consequences can be serious, including coma and death. Together with respiratory acidosis, it is one of the two general causes of acidemia.

हेमंतकुमार 05/07/2018 - 18:21
आहार ॲसिडीक असल्याने ॲसिडोसीसचा त्रास होत आहे. >>>> हे विधान तितकेसे पटले नाही. अमोनियम क्लोराईड आणि तत्सम रसायने बरीच acidic आहेत. पण, sodium citrate तितके नसावे असे वाटते. आपल्या रक्ताचा pH ही खूप critical बाब आहे. तो दीर्घकाळ ७.३५ पेक्षा कमी राहिल्यासच Acidosis झालाय असे म्हणतात. तुम्हाला मोठा आजार नाही असे म्हणताय. मग खरेच रक्त-pH मोजलाय का रुग्णालयात जाऊन ? कारण ही सामान्य (ओपीडी) पातळीवरची तपासणी नाही. त्यासाठी “रोहिणी” तून रक्त काढावे लागते ! की तुम्हाला निव्वळ जठरातील acidity म्हणायचे आहे? Metabolic acidosis आणि पोटातील acidity यात महदंतर आहे ! याचा खुलासा व्हावा. मग मी sodium citrate बद्दल वाचून बघतो. चमचे सोडा आणि एका लिंबाच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब वाढू शकतो का? >>> निरोगी अवस्थेत नाही. रुग्णाचे बाबतीत तपासणी करून उत्तर द्यावे लागेल. मुद्दा NaHCO३ चा आहे. लिंबाच्या रसाचा याच्याशी संबंध नाही.

In reply to by हेमंतकुमार

charming atheist 05/07/2018 - 20:11
मला पोटातील आम्लता म्हणायचे नाही आहे .मला रक्तातील आम्लता म्हणायचे आहे. Metabolic acidosis ची लक्षणे मला आहेत .सांधेदुखी ,श्वसनाचा जास्तीचा वेग आणि आहाराच्या बाबतीत पालेभाज्या अजिबात नसणे ,सतत मीट आणि आम्लीय पदार्थ खाणे असं एकंदर आहे. Self diagnosis करणे घातक आहे मान्य पण मी बायो केमिस्ट्रीचा अभ्यास कॉलेजमध्ये केला असल्याने थोडे ज्ञान आहे. Sodium citrate हे ॲसिड सॉल्ट असल्याने रक्तात शोषले गेल्यास बेसिसीटी वाढवण्यास् मदत करते असे मी ncbi मध्ये असलेल्या स्टडीजमध्ये वाचले आहे.ब्लड pH नॉर्मल रहाण्यास मदत होते असे वाचले आहे. Oral sodium citrate चे स्टडीजही पोझिटीव्ह आहेत. तुमचे कुमार१ आणि खरे ,दोघांचे काय मत आहे हे मला विचारायचे आहे. मी इथे ncbi ची लिंक देतो.

In reply to by charming atheist

सुबोध खरे 05/07/2018 - 20:36
जालावर मी अभिप्राय देत नाही. असे करणे धोक्याचे आहे. आपण आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा असाच कळकळीचा सल्ला देईन. जालावर केलेलं स्वनिदान धोक्याचे असते https://www.misalpav.com/node/31038

In reply to by सुबोध खरे

हेमंतकुमार 05/07/2018 - 20:49
सहमत. तसेच या मुद्द्यावर अधिक चर्चा करत बसलो तर धाग्याचा मूळ हेतू ('क ' ची उपयुक्तता ) पासून आपण फार भरकटू. अन्य वाचकांना ते अस्थानी वाटेल. लोभ असावा

डॉ श्रीहास 11/07/2018 - 12:28
सर्वात महत्वाचा मुद्दा : सर्दीसाठीबद्दल चा गैरसमज दूर केलात, कारण किमान १० जणांना तरी रोज सांगतो की लिंबं, आवळे आणि पेरू खात जा !!

In reply to by हेमंतकुमार

जागु 11/07/2018 - 16:33
ओके. मला ही शंका आली कारण हाडांसाठी आंबट चांगल आहे हे वाचल पण संधीवातात आंबट खायला बंदी असते. कदाचीत वात हा आजार वेगळा असेल व वाताला आंबट चालत नसेल.

In reply to by जागु

हेमंतकुमार 11/07/2018 - 16:55
या शब्दांमुळे घोळ होतो खरे ! Arthritis = सांध्यांचा दाह , असे साधारण भाषांतर. या आजाराची कारणे असंख्य. 'वात' हा आयुर्वेदिक शब्द. दोन भिन्न शास्त्रांची सांगड घालणे तसेच इंग्लिश चे मराठी करताना घोळ होतो. पथ्याच्या कल्पनाही भिन्न असतात.

माहितगार 11/07/2018 - 16:23
आंबट = क जिवनसत्व असे सरळसोट विधान होऊ शकते की काही अपवाद आहेत. कारण वर मर्यादीत फळांची चर्चा झाल्याचे दिसते. आहारातील टमाटे, चिंच, आमसूल , आंबट चुका, आंबट झालेले दही/ताक आणि क जिवनसत्व याबद्दल या निमित्ताने माहिती मिळावी हि विनंती. आहार विषयक चांगल्या चर्चा मालिकेसाठी धागा लेखकाचे अनेक आभार.

हेमंतकुमार 11/07/2018 - 16:49
आंबट = क जिवनसत्व असे सरळसोट विधान होऊ शकते की >>>> नाही होऊ शकत. आंबटपणा अनेक प्रकारच्या आम्लांमुळे असू शकतो. पण ज्यांत Ascorbic acid आहे तेच फक्त ‘क’ होय. दही- ताकाचा आंबटपणा Lactic acid मुळे आहे.

In reply to by हेमंतकुमार

माहितगार 11/07/2018 - 17:55
ओह ओह, मला वाटायचे कोणतेही आंबट खाल्ले की येत असणार क जिवनसत्व मी तर आंबट चिक्कार खातो, आणि मला काय क जिवनसत्वाची फिकिर, सुरवातीस धागा उघडण्याचेही कष्ट घेतले नव्हते :) बरे झाले प्रश्न विचारला. माझी अनेक वर्षांची चुकीची समजून दूर केल्या बद्दल खूप खूप आभार.

In reply to by माहितगार

सुबोध खरे 11/07/2018 - 18:54
पदार्थास आंबट चव असली कि त्यात क जीवनसत्त्व असते यास कोणताही आधार नाही. आंबट गोड बोरे किंवा चिंच यात फारसे क जीवनसत्त्व नाही.( यात इतर अनेक खनिजे असतात हा भाग वेगळा)

हेमंतकुमार 13/07/2018 - 08:03
सध्या पेरुचा हंगाम आहे. तेव्हा मस्तपैकी पेरुंचा आस्वाद घ्या आणि ‘क’-समृद्ध व्हा ! या सदिच्छा सह इथला समारोप करतो. सर्वांचे आभार . या मालेतले पुढचे जीवनसत्व (ब१२) इथे आहे : https://www.misalpav.com/node/42982

हेमंतकुमार 27/09/2022 - 12:32
तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या या लेखात खालील उल्लेख आहे औषधरूपातील ‘क’ आणि मोतीबिंदू प्रतिबंध >>> या संदर्भातील काही नवीन संशोधनाची भर घालतो. मोतीबिंदू होण्याची अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख म्हणजे वाढत्या वयानुसार होणारा. यात डोळ्याच्या भिंगातील दीर्घकालीन ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे मोतीबिंदू होण्याची प्रक्रिया सुरू होते असे मानतात. क जीवनसत्वाला ऑक्सिडेशन विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर केल्यास ही प्रक्रिया मंद करता येईल का आणि त्यामुळे मोतीबिंदू १० वर्षांनी पुढे ढकलला जाईल का हा उत्सुकतेचा विषय आहे.परंतु अलीकडील संशोधनानुसार असा निष्कर्ष निघालेला नाही. मोतीबिंदू होण्याच्या अन्य एका कारणाबाबत आशादायक परिस्थिती आहे. दृष्टीदोषाच्या काही रुग्णांवर डोळ्यांची एक विशिष्ट शस्त्रक्रिया केली जाते (vitrectomy). त्याचा दुष्परिणाम म्हणून पुढे मोतीबिंदू होतो. अशा रुग्णांना जर शस्त्रक्रियेनंतर क जीवनसत्व औषध रूपात दिले तर दुष्परिणामामुळे होणारा मोतीबिंदू टाळता येईल.
सामान्यजनांना ‘क’(C) या एकाक्षरी नावाने परिचित असलेल्या या जीवनसत्वाचे अधिकृत नाव Ascorbic acid असे आहे. त्याच्या नावाप्रमाणे ते आम्लधर्मीय असून ते आंबट फळांमध्ये विपुल प्रमाणात असते. आवळा, लिंबू व संत्रे हे त्याचे सहज उपलब्ध असणारे स्त्रोत. त्यातून लिंबू हे बारमाही फळ असल्याने आपण त्याचा रोजच्या आहारात समावेश करतो. शरीराच्या बळकटीसाठी आवश्यक असणाऱ्या ‘क’चा शोध १९३०मध्ये लागला.

एटलस सायकलीवर योग यात्रा- भाग ११ मंठा- मानवत

मार्गी ·

एस 26/06/2018 - 20:18
प्रत्येक भागावर प्रतिसाद देत नाही. पण आवर्जून वाचतो. तुमच्या सायकल सफरी निव्वळ सायकलिंगचा आनंद देणाऱ्या नसतात तर त्यात तुमच्या जीवनाचे तत्त्वज्ञानही खुबीने गुंफलेले असते. फार प्रसन्न वाटतं वाचताना. पुभाप्र.

एस 26/06/2018 - 20:18
प्रत्येक भागावर प्रतिसाद देत नाही. पण आवर्जून वाचतो. तुमच्या सायकल सफरी निव्वळ सायकलिंगचा आनंद देणाऱ्या नसतात तर त्यात तुमच्या जीवनाचे तत्त्वज्ञानही खुबीने गुंफलेले असते. फार प्रसन्न वाटतं वाचताना. पुभाप्र.

मला भेटलेले रुग्ण - १६

डॉ श्रीहास ·

धडपड्या 19/06/2018 - 16:03
काहीतरी छान घडतय जाणवत राहीलंय.... खूप लोकांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी...

In reply to by धडपड्या

डॉ श्रीहास 19/06/2018 - 16:16
एस, विशुमित आणि धडपड्या .... तुमचे आभार...... हा भाग संपादित झाल्याच्या निमीत्तानी हे सांगू ईच्छीतो की हे सगळे भाग फेसबुकवर मिपाकर शिवकन्या शशी ह्यांनी मिशी नावाच्या ब्लाॅग (काय म्हणावं हे कळत नाहीये ) मध्ये पुर्नसंपादित करून अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवले .... त्याबद्दल त्यांचे पण अनेक आभार _/\_ .

नाखु 19/06/2018 - 17:25
सन्गोवांगीच्या कथांपेक्शा असे सिद्ध्हस्त लिखाण जवळच वाट्ते. नियमित लिहित रहा. नियमित वाचक नाखु, वाचकांचीही पत्रेवाला

सुबोध खरे 19/06/2018 - 19:12
हे सगळं बोलूनही काहीही फरक पडणार नाही समजून चुकलं होतं डॉक्टर साहेब एक उदाहरण देतो आहे. दारू मुळे पायाला आणि चेहऱ्याला सूज आलेल्या आणि लिव्हर सिर्र्होसीस झालेल्या रुग्णाला त्याच्या नातेवाईकांच्या समोर स्वच्छ शब्दात सांगतो "मला जितकं कळतंय त्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे कि दारू पूर्णपणे सोडा आणि चांगल्या यकृत रोग तज्ज्ञाला दाखवा" अन्यथा मी माझ्या भिंतीवर असलेली श्री गणपतीची २ फूट आकाराची तसबीर दाखवून सांगतो कि एवढा मोठा फोटो काढून ठेवा. केंव्हा भिंतीवर लावायला लागेल ते सांगता येणार नाही. मागच्या वर्षी दोन रुग्णांनी या नंतर दारू सोडली. परंतु बरेच रुग्ण अजूनही दारु न सोडता परत परत आता स्थिती कशी आहे हे पाहायला येतात. लोक केंव्हा उलटून तुम्हाला बोलतील कि "तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगितलं नाही" याचा नेम नाही. मुतखडा, हृदयविकार, अतिरक्तदाब, कर्करोग यांचे निदान झाल्यावरहि हयगय करणारे आणि त्यामुळे रोग बळावणारे रुग्ण रोजच दिसतात. "कर्मण्येवाधिकारस्ते" चा खोल अर्थ असा आहे.

नेहमीप्रमाणे हृदयस्पर्शी लेखन. पण माझी एक विनंती आहे हो. अस्वस्थ करणारे अनुभव शक्यतो मध्ये आणि शेवट गोड असलेले शेवटी टाका. अस्वस्थतेचा ठसा खोलवर उमटतो. बराच वेळ सुन्नतेत जातो. असो. सुंदर लेखनाबद्दल अनेक धन्यवाद

शाली 20/06/2018 - 09:23
वा! अजुन वाचायला आवडेल तुम्ही लिहिलेलं. पुलेशु!!

लई भारी 20/06/2018 - 10:05
पहिल्या प्रतिक्रियेलाच अनुमोदन. दुसरा शब्द सुचत नाही. अशीच रुग्णसेवा होत राहो आपल्याकडून. आणि लिहीत राहाच :) _/\_

धडपड्या 19/06/2018 - 16:03
काहीतरी छान घडतय जाणवत राहीलंय.... खूप लोकांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी...

In reply to by धडपड्या

डॉ श्रीहास 19/06/2018 - 16:16
एस, विशुमित आणि धडपड्या .... तुमचे आभार...... हा भाग संपादित झाल्याच्या निमीत्तानी हे सांगू ईच्छीतो की हे सगळे भाग फेसबुकवर मिपाकर शिवकन्या शशी ह्यांनी मिशी नावाच्या ब्लाॅग (काय म्हणावं हे कळत नाहीये ) मध्ये पुर्नसंपादित करून अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवले .... त्याबद्दल त्यांचे पण अनेक आभार _/\_ .

नाखु 19/06/2018 - 17:25
सन्गोवांगीच्या कथांपेक्शा असे सिद्ध्हस्त लिखाण जवळच वाट्ते. नियमित लिहित रहा. नियमित वाचक नाखु, वाचकांचीही पत्रेवाला

सुबोध खरे 19/06/2018 - 19:12
हे सगळं बोलूनही काहीही फरक पडणार नाही समजून चुकलं होतं डॉक्टर साहेब एक उदाहरण देतो आहे. दारू मुळे पायाला आणि चेहऱ्याला सूज आलेल्या आणि लिव्हर सिर्र्होसीस झालेल्या रुग्णाला त्याच्या नातेवाईकांच्या समोर स्वच्छ शब्दात सांगतो "मला जितकं कळतंय त्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे कि दारू पूर्णपणे सोडा आणि चांगल्या यकृत रोग तज्ज्ञाला दाखवा" अन्यथा मी माझ्या भिंतीवर असलेली श्री गणपतीची २ फूट आकाराची तसबीर दाखवून सांगतो कि एवढा मोठा फोटो काढून ठेवा. केंव्हा भिंतीवर लावायला लागेल ते सांगता येणार नाही. मागच्या वर्षी दोन रुग्णांनी या नंतर दारू सोडली. परंतु बरेच रुग्ण अजूनही दारु न सोडता परत परत आता स्थिती कशी आहे हे पाहायला येतात. लोक केंव्हा उलटून तुम्हाला बोलतील कि "तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगितलं नाही" याचा नेम नाही. मुतखडा, हृदयविकार, अतिरक्तदाब, कर्करोग यांचे निदान झाल्यावरहि हयगय करणारे आणि त्यामुळे रोग बळावणारे रुग्ण रोजच दिसतात. "कर्मण्येवाधिकारस्ते" चा खोल अर्थ असा आहे.

नेहमीप्रमाणे हृदयस्पर्शी लेखन. पण माझी एक विनंती आहे हो. अस्वस्थ करणारे अनुभव शक्यतो मध्ये आणि शेवट गोड असलेले शेवटी टाका. अस्वस्थतेचा ठसा खोलवर उमटतो. बराच वेळ सुन्नतेत जातो. असो. सुंदर लेखनाबद्दल अनेक धन्यवाद

शाली 20/06/2018 - 09:23
वा! अजुन वाचायला आवडेल तुम्ही लिहिलेलं. पुलेशु!!

लई भारी 20/06/2018 - 10:05
पहिल्या प्रतिक्रियेलाच अनुमोदन. दुसरा शब्द सुचत नाही. अशीच रुग्णसेवा होत राहो आपल्याकडून. आणि लिहीत राहाच :) _/\_
https://www.misalpav.com/node/42489 मुलगी आणि वडील दोघही पेशंट , दुसऱ्या व्हिसीटला आले होते.

'ड' जीवनसत्व : उपयुक्तता आणि वादग्रस्तता (पूर्वार्ध)

हेमंतकुमार ·

In reply to by दीपक११७७

अनिंद्य 11/06/2018 - 12:03
+ १ हे जीवनसत्व डबाबंद पावडर / गोळ्या इत्यादी स्वरूपात प्रभावी नसते त्यामुळे याच्यावर संशोधन करण्यास औषधी कंपन्या फारश्या उत्सुक नसतात असे वाचले आहे, कितपत खरे आहे ?

एस 11/06/2018 - 12:10
'ड' जीवनसत्त्वाविषयी हल्ली बरेच संशोधन होत आहे आणि बरीच नवीन माहिती पुढे येत आहे. एकंदरीत सामान्य व्यक्तींसाठी गोंधळाची परिस्थिती म्हणावी लागेल. याविषयी विस्तृत लिहा ही विनंती.

हेमंतकुमार 11/06/2018 - 12:25
सर्वांचे मनापासून आभार! अनिंद्य, प्रभावी नसते असे नाही म्हणता येणार. बाजारातील brand नुसार त्या औषधरूपाची क्षमता ठरते. अलीकडे असा मतप्रवाह आहे की रोगप्रतिबंधासाठी ‘ड’ हे आहारातून घेतलेले अधिक चांगले. पण रोग तीव्र असेल तर औषधरुपात दयावे लागते. एस, लेखाच्या उत्तरार्धात ते सर्व येणार आहे, काळजी नसावी.

लई भारी 11/06/2018 - 12:49
अजून एका चांगल्या विषयाबद्दल विस्तृत माहिती देत असल्याबद्दल आभार.

हेमंतकुमार 12/06/2018 - 08:41
वीणा व निशाचर, नियमित प्रतिसादाबद्दल आभार. नीलातीत >>>>> ‘अति’ पेक्षा ‘अतीत’ हा ultra साठी योग्य शब्द वाटतो. हा जालकोशात आहे. तसेही ‘नीलातीत’ नादमधुर आहे !

In reply to by हेमंतकुमार

Nitin Palkar 13/06/2018 - 19:58
१९६६ - ६७ साली सहावी,सातवीत असणाऱ्या मुलांना सामान्य विज्ञानाच्या पुस्तकांत 'सूर्य प्रकाशातील अतिनील किरणे' असा शब्दप्रयोग होता. त्या वेळेस अणू आणि रेणू होते कालांतराने ते रेणू आणि परमाणू झाले....असो. वैज्ञानिक संज्ञांमध्ये नादमाधुर्यापेक्षा अचूक अर्थ अधिक महत्वाचा. लेख नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण आहे. पुभाप्र.

खिलजि 12/06/2018 - 14:08
छान माहितीपूर्ण लेख डॉक्टर साहेब . धन्यवाद . अशा उपयुक्त लेखमालिकांमुळे आपण एक प्रकारे समाजप्रबोधनाचेच कार्य करत आहात . सिद्धेश्वर विलास पाटणकर

हेमंतकुमार 13/06/2018 - 20:10
झेन व नितीन, अभिप्रायाबद्दल आभार. वैज्ञानिक संज्ञांमध्ये नादमाधुर्यापेक्षा अचूक अर्थ अधिक महत्वाचा. >>>> अगदी बरोबर ! तसे infrared चे अवरक्त हे भाषांतर फारसे मनाला भिडत नाही. कोणी अजून छान शब्द सुचवेल का ?

माहितगार 14/06/2018 - 10:29
माझ्या या धागा लेखाचा अंशतः 'ड' जिवनसत्वाशी येतो पण त्या लेखात फारशी चर्चा होऊ शकली नाही, एनीवे 'ड' जीवनसत्वा अभावी होणर्‍या परिणामा बाबत हा ७ जूनचा टाईम्स ऑफ ईंडिया वृत्त दुवा

palambar 15/06/2018 - 00:27
सध्या हा अगदी माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, सहा महिन्यापूर्वी जिना उतरतांंना अचानक गुडघा फिरल्यासारखा झाला व चालता येईना, डाॅॅक नी सांंगितले, डी, बी12व कॅॅल्शिअम तिन्हीची कमतरता आहे, मग आधी इंंजक्शनचा कोर्स करावा लागला.

हेमंतकुमार 15/06/2018 - 11:17
साधारण पन्नाशी नंतर बऱ्याच जणांना हा त्रास होतो. तुमच्या उपचारांचा फायदा कसा आहे ते बघा: १. ब १२ हाडातील अस्थीजनक पेशींना मजबूत करेल. २. 'ड' आहारातील कॅल्शियम चे शोषण वाढवेल आणि ३. कॅल्शियम हाडांना मजबूत करेल. असा सुरेख त्रिवेणी संगम आहे !

कालिंदी 15/06/2018 - 21:19
तुम्हि व्यवस्थित आढावा घेतला आहे. फक्त , हया विधानात थोडी भर घआलावी असे सुचवीन."‘ड’ भरपूर तयार होण्यासाठी त्वचेचा जास्तीत जास्त भाग उघडा असायला हवा. त्यावर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंतचे उन किमान २० मिनिटे पडणे आवश्यक असते. या वेळेतील उन्हात नीलातीत किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते." २० मि. कॉकेशिअन (गोर्‍या वंशासाठी). भारतीय त्वचेसाठी त्याच्या दुप्पट ते तिप्पट म्हणजे ४५ मि ते १ तास एवढा वेळ लागेल. त्वचेतील मेलॅनिन चे प्रमाण जितके ज्यास्त तितका हा वेळ वाढत जाइल कारण मेलॅनिन हे नैसर्गिक सन्स्क्रीन आहे जे अतिनिल किरणांना अटकाव करते. संदर्भः Vitamin D and Child Health in the 21st Century NARENDRA RATHI AND *AKANKSHA RATHI

charming atheist 06/07/2018 - 14:54
UV penetration च्या बाबतीत गोरा रंग आणि भारतीय रंग असे वर प्रतिसादात वाचले.तो अगदी योग्य मुद्दा होता. पुरुषांची त्वचा स्त्रीयांपेक्षा जास्त जाड असते(३०%) त्यामुळे पुरुषांना जास्त वेळ उन्हात काढावा लागेल असे माझ्या मंदबुद्धीला वाटत आहे. स्त्रीयांसाठी जो वेळ ४५ मिनिटे आहे तो पुरुषांसाठी ६० मिनीटे असू शकतो. vitamin D poisoning विषयी ऐकले होते ,ते काय आहे ? पुढल्या भागात येणार आहे का?

हेमंतकुमार 06/07/2018 - 15:29
तो अनुक्रमणिकेतून पाहता येईल. तुम्ही म्हणता त्याला poisoning नाही म्हणत; त्याला Hyper vitaminosis D म्हणतात. त्यात Caचे अतिरिक्त शोषण होऊन त्याची रक्तपातळी वाढते. परिणामी मुतखडे इ होऊ शकते.

ड जीवनसत्वासाठी कोवळ्या उन्हात बसावे (सकाळी १० पर्यन्त आणि सन्ध्याकाळी ५ नन्तरचे उन्ह) असे नेहमी ऐकत आलोय. वैयक्तिक मला, कोवळे उन्ह घेणे किन्वा जास्त वेळ घेणे शक्य आहे. कोवळे उन्ह आणि ११ ते ३चे उन्ह, यातला फरक, फायदेतोटे समजले तर बरे होईल. धन्यवाद! वयानुसार उन्हाची जास्त फायदेशीर वेळ, असे काही असते का?

In reply to by Yesnee

हेमंतकुमार 14/06/2020 - 07:25
दुपारी ११ ते २ या वेळेतील उन्हात नीलातीत- ब (UV-B) या प्रकारच्या किरणांचे प्रमाण जास्त असते. म्हणून ही वेळ फायदेशीर. युरोपीय वंशाच्या त्वचेला रोज वीस मिनिटे पुरे, पण आपल्यासारख्या त्वचेला 30 ते ४० मिनिटे वेळ असावा.

चामुंडराय 14/06/2020 - 04:44
मश्रुम स्लाइस करून कडक उन्हात वाळवायचे आणि त्याचे सूप करून प्यायचे असा डी जिवनसत्वासाठी उपाय एका ठिकाणी वाचण्यात आला. हे खरे आहे का?

In reply to by चामुंडराय

हेमंतकुमार 14/06/2020 - 07:39
सहमत. shiitake हा कच्चा मशरूमचा विशिष्ट प्रकार औषधी म्हणून पूर्व आशियात प्रसिद्ध आहे. त्यात चांगले ‘ड’ असते. ते बऱ्यापैकी वाळल्यानंतर त्यातील ड चे प्रमाण बऱ्यापैकी वाढते. Shiitake मशरूम : चित्र ok

In reply to by दीपक११७७

अनिंद्य 11/06/2018 - 12:03
+ १ हे जीवनसत्व डबाबंद पावडर / गोळ्या इत्यादी स्वरूपात प्रभावी नसते त्यामुळे याच्यावर संशोधन करण्यास औषधी कंपन्या फारश्या उत्सुक नसतात असे वाचले आहे, कितपत खरे आहे ?

एस 11/06/2018 - 12:10
'ड' जीवनसत्त्वाविषयी हल्ली बरेच संशोधन होत आहे आणि बरीच नवीन माहिती पुढे येत आहे. एकंदरीत सामान्य व्यक्तींसाठी गोंधळाची परिस्थिती म्हणावी लागेल. याविषयी विस्तृत लिहा ही विनंती.

हेमंतकुमार 11/06/2018 - 12:25
सर्वांचे मनापासून आभार! अनिंद्य, प्रभावी नसते असे नाही म्हणता येणार. बाजारातील brand नुसार त्या औषधरूपाची क्षमता ठरते. अलीकडे असा मतप्रवाह आहे की रोगप्रतिबंधासाठी ‘ड’ हे आहारातून घेतलेले अधिक चांगले. पण रोग तीव्र असेल तर औषधरुपात दयावे लागते. एस, लेखाच्या उत्तरार्धात ते सर्व येणार आहे, काळजी नसावी.

लई भारी 11/06/2018 - 12:49
अजून एका चांगल्या विषयाबद्दल विस्तृत माहिती देत असल्याबद्दल आभार.

हेमंतकुमार 12/06/2018 - 08:41
वीणा व निशाचर, नियमित प्रतिसादाबद्दल आभार. नीलातीत >>>>> ‘अति’ पेक्षा ‘अतीत’ हा ultra साठी योग्य शब्द वाटतो. हा जालकोशात आहे. तसेही ‘नीलातीत’ नादमधुर आहे !

In reply to by हेमंतकुमार

Nitin Palkar 13/06/2018 - 19:58
१९६६ - ६७ साली सहावी,सातवीत असणाऱ्या मुलांना सामान्य विज्ञानाच्या पुस्तकांत 'सूर्य प्रकाशातील अतिनील किरणे' असा शब्दप्रयोग होता. त्या वेळेस अणू आणि रेणू होते कालांतराने ते रेणू आणि परमाणू झाले....असो. वैज्ञानिक संज्ञांमध्ये नादमाधुर्यापेक्षा अचूक अर्थ अधिक महत्वाचा. लेख नेहमी प्रमाणेच माहितीपूर्ण आहे. पुभाप्र.

खिलजि 12/06/2018 - 14:08
छान माहितीपूर्ण लेख डॉक्टर साहेब . धन्यवाद . अशा उपयुक्त लेखमालिकांमुळे आपण एक प्रकारे समाजप्रबोधनाचेच कार्य करत आहात . सिद्धेश्वर विलास पाटणकर

हेमंतकुमार 13/06/2018 - 20:10
झेन व नितीन, अभिप्रायाबद्दल आभार. वैज्ञानिक संज्ञांमध्ये नादमाधुर्यापेक्षा अचूक अर्थ अधिक महत्वाचा. >>>> अगदी बरोबर ! तसे infrared चे अवरक्त हे भाषांतर फारसे मनाला भिडत नाही. कोणी अजून छान शब्द सुचवेल का ?

माहितगार 14/06/2018 - 10:29
माझ्या या धागा लेखाचा अंशतः 'ड' जिवनसत्वाशी येतो पण त्या लेखात फारशी चर्चा होऊ शकली नाही, एनीवे 'ड' जीवनसत्वा अभावी होणर्‍या परिणामा बाबत हा ७ जूनचा टाईम्स ऑफ ईंडिया वृत्त दुवा

palambar 15/06/2018 - 00:27
सध्या हा अगदी माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, सहा महिन्यापूर्वी जिना उतरतांंना अचानक गुडघा फिरल्यासारखा झाला व चालता येईना, डाॅॅक नी सांंगितले, डी, बी12व कॅॅल्शिअम तिन्हीची कमतरता आहे, मग आधी इंंजक्शनचा कोर्स करावा लागला.

हेमंतकुमार 15/06/2018 - 11:17
साधारण पन्नाशी नंतर बऱ्याच जणांना हा त्रास होतो. तुमच्या उपचारांचा फायदा कसा आहे ते बघा: १. ब १२ हाडातील अस्थीजनक पेशींना मजबूत करेल. २. 'ड' आहारातील कॅल्शियम चे शोषण वाढवेल आणि ३. कॅल्शियम हाडांना मजबूत करेल. असा सुरेख त्रिवेणी संगम आहे !

कालिंदी 15/06/2018 - 21:19
तुम्हि व्यवस्थित आढावा घेतला आहे. फक्त , हया विधानात थोडी भर घआलावी असे सुचवीन."‘ड’ भरपूर तयार होण्यासाठी त्वचेचा जास्तीत जास्त भाग उघडा असायला हवा. त्यावर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंतचे उन किमान २० मिनिटे पडणे आवश्यक असते. या वेळेतील उन्हात नीलातीत किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते." २० मि. कॉकेशिअन (गोर्‍या वंशासाठी). भारतीय त्वचेसाठी त्याच्या दुप्पट ते तिप्पट म्हणजे ४५ मि ते १ तास एवढा वेळ लागेल. त्वचेतील मेलॅनिन चे प्रमाण जितके ज्यास्त तितका हा वेळ वाढत जाइल कारण मेलॅनिन हे नैसर्गिक सन्स्क्रीन आहे जे अतिनिल किरणांना अटकाव करते. संदर्भः Vitamin D and Child Health in the 21st Century NARENDRA RATHI AND *AKANKSHA RATHI

charming atheist 06/07/2018 - 14:54
UV penetration च्या बाबतीत गोरा रंग आणि भारतीय रंग असे वर प्रतिसादात वाचले.तो अगदी योग्य मुद्दा होता. पुरुषांची त्वचा स्त्रीयांपेक्षा जास्त जाड असते(३०%) त्यामुळे पुरुषांना जास्त वेळ उन्हात काढावा लागेल असे माझ्या मंदबुद्धीला वाटत आहे. स्त्रीयांसाठी जो वेळ ४५ मिनिटे आहे तो पुरुषांसाठी ६० मिनीटे असू शकतो. vitamin D poisoning विषयी ऐकले होते ,ते काय आहे ? पुढल्या भागात येणार आहे का?

हेमंतकुमार 06/07/2018 - 15:29
तो अनुक्रमणिकेतून पाहता येईल. तुम्ही म्हणता त्याला poisoning नाही म्हणत; त्याला Hyper vitaminosis D म्हणतात. त्यात Caचे अतिरिक्त शोषण होऊन त्याची रक्तपातळी वाढते. परिणामी मुतखडे इ होऊ शकते.

ड जीवनसत्वासाठी कोवळ्या उन्हात बसावे (सकाळी १० पर्यन्त आणि सन्ध्याकाळी ५ नन्तरचे उन्ह) असे नेहमी ऐकत आलोय. वैयक्तिक मला, कोवळे उन्ह घेणे किन्वा जास्त वेळ घेणे शक्य आहे. कोवळे उन्ह आणि ११ ते ३चे उन्ह, यातला फरक, फायदेतोटे समजले तर बरे होईल. धन्यवाद! वयानुसार उन्हाची जास्त फायदेशीर वेळ, असे काही असते का?

In reply to by Yesnee

हेमंतकुमार 14/06/2020 - 07:25
दुपारी ११ ते २ या वेळेतील उन्हात नीलातीत- ब (UV-B) या प्रकारच्या किरणांचे प्रमाण जास्त असते. म्हणून ही वेळ फायदेशीर. युरोपीय वंशाच्या त्वचेला रोज वीस मिनिटे पुरे, पण आपल्यासारख्या त्वचेला 30 ते ४० मिनिटे वेळ असावा.

चामुंडराय 14/06/2020 - 04:44
मश्रुम स्लाइस करून कडक उन्हात वाळवायचे आणि त्याचे सूप करून प्यायचे असा डी जिवनसत्वासाठी उपाय एका ठिकाणी वाचण्यात आला. हे खरे आहे का?

In reply to by चामुंडराय

हेमंतकुमार 14/06/2020 - 07:39
सहमत. shiitake हा कच्चा मशरूमचा विशिष्ट प्रकार औषधी म्हणून पूर्व आशियात प्रसिद्ध आहे. त्यात चांगले ‘ड’ असते. ते बऱ्यापैकी वाळल्यानंतर त्यातील ड चे प्रमाण बऱ्यापैकी वाढते. Shiitake मशरूम : चित्र ok
शरीराच्या पोषणासाठी आपण आहारातून विविध पोषण-घटक दररोज घेत असतो. त्यापैकी कर्बोदके, मेद व प्रथिने ही मोठ्या प्रमाणात (ग्रॅममध्ये) लागतात. याउलट काही पोषण-घटक हे अल्प प्रमाणात (मिलिग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम) जरुरीचे असतात. अशा सूक्ष्म पोषणद्रव्यांमध्ये जीवनसत्वांचा(Vitamins) समावेश होतो. आजपर्यंत एकूण १३ जीवनसत्वे माहित आहेत. त्यांना ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ अशी एकाक्षरी नावे का दिली असावीत याचे वाचकांना कुतूहल असते. गेल्या १-२ शतकांत जेव्हा त्यांचा टप्प्याटप्प्याने शोध लागला, तेव्हा त्या प्रत्येकाचे रासायनिक सूत्र निश्चित माहित नव्हते. त्यामुळे त्यांना शोधक्रमाने अ, ब, क अशी नावे दिली गेली.

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा

मार्गी ·

भुजंगराव 13/06/2018 - 17:35
आपल्या मोहिमेत खूप काही आहे ,पर्यटनस्थळे ,योग ,ध्यान अन सगळ्यात महत्वाचे लोकांशी आपण जुडतात त्यांच्या स्तरावर देवगिरीच्या किल्ला आधी बघितला तरी परत पाहावा वाटतोच .......

भुजंगराव 13/06/2018 - 17:35
आपल्या मोहिमेत खूप काही आहे ,पर्यटनस्थळे ,योग ,ध्यान अन सगळ्यात महत्वाचे लोकांशी आपण जुडतात त्यांच्या स्तरावर देवगिरीच्या किल्ला आधी बघितला तरी परत पाहावा वाटतोच .......

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर (६३ किमी)

मार्गी ·

निशाचर 29/05/2018 - 04:38
पण तेव्हा मग ठरवलं की, आत्ता पूर्ण प्रवासाचा विचारच करणार नाही. फक्त त्या त्या वेळच्या स्थितीवर लक्ष देईन.
हे बर्‍याच बाबतीत उपयोगी आहे. प्रत्येक भागावर प्रतिसाद द्यायला जमेल असं नाही. पण वाचत आहे.

मार्गी 29/05/2018 - 17:37
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल खूप धन्यवाद! निशाचर जी, खरंच धन्यवाद! :)

भुजंगराव 03/06/2018 - 11:44
खूप विलक्षण प्रवास वर्णन आहे वाचताना आनंद वाटते पण अनुभव घेताना कट येतो . या साठी हे गीत आठवले वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुलाफुलांत चाललो मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी आपुलीच साथ कधी करित चाललो आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद नादातच शीळ वाजवीत चाललो चुकली तालात चाल, लागला जिवास बोल ढळलेला तोल सावरीत ...

निशाचर 29/05/2018 - 04:38
पण तेव्हा मग ठरवलं की, आत्ता पूर्ण प्रवासाचा विचारच करणार नाही. फक्त त्या त्या वेळच्या स्थितीवर लक्ष देईन.
हे बर्‍याच बाबतीत उपयोगी आहे. प्रत्येक भागावर प्रतिसाद द्यायला जमेल असं नाही. पण वाचत आहे.

मार्गी 29/05/2018 - 17:37
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल खूप धन्यवाद! निशाचर जी, खरंच धन्यवाद! :)

भुजंगराव 03/06/2018 - 11:44
खूप विलक्षण प्रवास वर्णन आहे वाचताना आनंद वाटते पण अनुभव घेताना कट येतो . या साठी हे गीत आठवले वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुलाफुलांत चाललो मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी आपुलीच साथ कधी करित चाललो आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद नादातच शीळ वाजवीत चाललो चुकली तालात चाल, लागला जिवास बोल ढळलेला तोल सावरीत ...
३: जिंतूर- परतूर (६३ किमी) एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी १२ मे ला पहाटे साडेपाच ला जिंतूरवरून निघालो. रात्री चांगली झोप झाल्यामुळे फ्रेश वाटत आहे. आज ६२ किलोमीटर सायकल चालवायची आहे. माझ्यामुळे जिंतूरला डॉ. पारवेंना पहाटे लवकर उठावं लागलं व मला निरोप द्यायला ते रस्त्यापर्यंत आले. सकाळच्या प्रसन्न वेळेत सायकल चालवणं खूप मोठं सुख आहे! चांगली झोप झाल्यामुळे कालचा थकवा दूर झाला आहे.

रसायनांचा पूर आणि हॉर्मोन्सचा बिघडलेला सूर

हेमंतकुमार ·

In reply to by विजुभाऊ

मदनबाण 30/06/2019 - 10:37
इजूभाऊ अणूबॉम्ब पण वरदान म्हणायचा का ? नाही तो वापरुन मोठ्या लोकसंख्येची लगेच डायरेक्ट वाफ करण्याची सोय करता येते !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant

हेमंतकुमार 27/05/2018 - 19:31
नवीन प्रतिसादकांचे आभार. @ एस, प्रतिबंधात्मक उपाय लेखातील तक्त्यात दिलेले आहेत. शिसे संबंधी दोन मुद्दे अधोरेखित करतो. १. पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळण्याच्या उद्दिष्टापासून आपण अजून बरेच दूर आहोत. २. वृत्तपत्राच्या कागदात खाद्यपदार्थ विकणे ही तर आपल्याकडची अत्यंत वाईट खोड आहे. अशा कागदात घेऊन वडापाव वा भेळ मिटक्या मारत खाताना बरेच सुशिक्षितही दिसतात. ते विकणाऱ्यांचे प्रबोधन हेही व्हायला हवे. अन्य पर्यायी कागद वापरला पाहिजे. काही लोक तर पेपराच्या कागदात गुंडाळून शिरा व साखरफुटाणेही देतात. याची सुधारणा तर वैयक्तिक पातळीवरच आहे.

अनिंद्य 28/05/2018 - 11:03
उत्तम माहिती आणि आखीव-रेखीव लेख. 'प्लास्टिक सर्वव्यापी' ते 'प्लास्टिक बंदी' असे एक आवर्तन पूर्ण झाले आहे, उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खते-पीक सुरक्षा ते परत जुनीच सेंद्रिय शेती असेही होत आहे. उशिरा का होईना योग्य दिशेनी पडणारी पावले महत्वाची. रसायनांचा पूर थोडा ओसरावा हीच कामना. पु ले शु

शाली 28/05/2018 - 16:26
आपल्या हातात आता काही राहीले नाही हो. साधं ऊदाहरण: माझी शेती आहे चार-साडेचार एकर. भरपुर पाणी. नकाशावर आलय माझं गाव शेतीसाठी. मी गेली आठ दहा वर्षे सेंद्रीय शेती करतोय. पण मी काढलेल्या भाजीपाल्यात सगळे दुर्गूण असतात जे रासायणीक खते वगैरे वापरल्यावर येतात. मी तज्ञाला विचारलं तर तो म्हणाला "तुम्ही सेंद्रीय शेती करुन काय ऊपयोग? आजुबाजूला जे वापरलं जातं ते तुमच्या शेतात कुठल्या ना कुठल्या मार्गाने येणारच. मग ते पर्क्युलेशन असो, हवेतुन येणारी औषधे असोत आणि अजुन अनेक कारणे. म्हणजे मला दोष नसलेले ऊत्पन्न घ्यायचे असेल तर दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागेल. आणि ते कधिच सुधारणार नाही हे मला पक्के माहित आहे. मग काय करावे?

In reply to by शाली

पण मी काढलेल्या भाजीपाल्यात सगळे दुर्गूण असतात जे रासायणीक खते वगैरे वापरल्यावर येतात
पण तुमच्या उत्पादनांत या दुर्गुणांचे प्रमाण तरी बरेच कमी असेल ..तसे असले तरी खूप काही मिळवले असे म्हणता येईल.

In reply to by शाली

अनिंद्य 29/05/2018 - 11:13
@शाली, बरोबर आहे. निसर्ग गुन्हा आणि शिक्षा यांच्यात तारतम्य ठेवणारच. मानवाने काही दशकं ओरबाडलेल्या पृथ्वीला एकदाच 'सॉरी' म्हणून सगळे पूर्वीसारखे होणे अवघड आहे. योग्य दिशेने वाटचाल करीत राहणे महत्वाचे आहे, ते तुम्ही करता आहेत.

हेमंतकुमार 28/05/2018 - 17:37
अनिंद्य, उत्तम प्रतिसाद. सहमत. शाली, बरोबर आहे तुमचे. हताश व्हायला होते पण जेवढे शक्य आहे तेवढे तरी करावे असे वाटते.

तेजस आठवले 28/05/2018 - 19:31
चांगला लेख.पण थोडा त्रोटक झाला आहे.अजून भर घातलीत तर चांगले होईल. प्लास्टिक ह्या गोष्टीने आता आयुष्य इतके व्यापले आहे की त्यापासून आता सुटका नाही. सकाळी आणि रात्री दात घासताना वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या टूथब्रश पासून ते प्यायच्या पाण्यापासून सगळीकडेच. पिण्याचे पाणी अथवा शीतपेये प्लॅस्टिकच्या बाटल्यात असतात, रोजचे सकाळचे दूध प्लास्टिक पिशवीत असते, ऑफिसचा डबा पण प्लास्टिकचाच. वर्तमानपत्रात गुंडाळलेले पदार्थ उदा फरसाण, भेळ, वडे, भजी.ह्यात कितीतरी वेळा त्या पदार्थावर शाई उमटलेली दिसते. आपण हे टाळू शकतो पण आपली सर्वच बाबतीतली अनास्था हे एक वेगळेच प्रकरण आहे. अर्थात ऍसिडिटीचा त्रास असून चमचमीत मिसळ खाऊन लगेच पुढच्या मिनिटाला अँटासिड घेणारी लोकं या जगात असल्याने कोणी कोणाला काय समजवावे हा एक गहन प्रश्न आहे. रसायनं इतकी सर्वव्यापी झाली आहेत की त्यांचा अंश नसलेली वस्तू सापडणे कठीण.

हेमंतकुमार 29/05/2018 - 07:36
नवीन प्रतिसादकांचे आभार. हॉर्मोनचा बिघाड करणारी रसायने शरीरात दोन प्रकारे वावरतात: १. काही आपल्या मेदाशी एकरूप होतात आणि त्यामुळे शरीरात दीर्घकाळ साठून राहतात. मग ती सतत रक्तात सोडली जातात. याची ठळक उदाहरणे म्हणजे कीटकनाशके आणि PCBs. PCBs ही मत्स्याहारातून शिरतात. २. तर इतर काही लगेच विघटीत होणारी असल्याने साठून राहत नाहीत. प्लास्टिकमधून येणारे Bisphenol A हे याचे उदा.

चामुंडराय 29/05/2018 - 07:56
या रसायनांनी अगदी उच्छाद मांडला आहे. प्रोसेस फूड मधून प्रिझर्व्हेटिव्ह्ज् शरीरात जातात त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची समस्या पुढे आली आहे. मृत्यू नंतर पुरलेल्या शरीराचे लवकर विघटन होत नाही त्यामुळे स्मशानभूमी मध्ये जागेचा मोठा प्रॉब्लेम होत आहे असे समजते. या कारणास्तव अनेक लोकं ग्रँड फिनाली बार्बेक्यूला प्राधान्य देत आहेत.

In reply to by चामुंडराय

अनिंद्य 29/05/2018 - 11:21
@ चामुंडराय, ग्रँड फिनाली बार्बेक्यू :-) आपल्या देशात ते शतकानुशतकं होतेच आहे. धार्मिक कारणे बाजूला ठेवली तरी प्रेतांच्या विल्हेवाटीचा शवदहन हा मार्ग सर्वोत्तम आहे. शॉर्ट स्वीट अँड सिम्पल ! आता रसायनांमुळे शव जाळायला काही अडचणी येत असतील तर माहित नाही :-)

In reply to by अनिंद्य

हेमंतकुमार 29/05/2018 - 11:38
शव दहनाच्या बाबत " बार्बेक्यू" हा शब्द खटकतो. शब्दकोशा नुसार ती अन्न शिजवायची (cook) पद्धत आहे. स्पष्टीकरण वाचण्यास उत्सुक.

In reply to by हेमंतकुमार

चामुंडराय 30/05/2018 - 07:43
बार्बेक्यू करताना मांस अग्नीवर भाजतात तर शवदहन करताना मांस अग्नीने जाळतात म्हणून बार्बेक्यू हा शब्द वापरला. शब्दकोशातील शब्दशः अर्थ लागू होणार नाही हे मान्यच (या निमित्ताने शब्दकोशांवरील तुमचा धागा आठवला).

In reply to by अनिंद्य

चामुंडराय 30/05/2018 - 07:35
जन्म घेतेवेळी जी काही एलेमेंट्स (पंचमहाभूते) निसर्गाकडून घेतलेली असतात त्यातील बहुतांश शवदहन करते वेळी निसर्गाला ताबडतोब परत दिली जातात, अगदी आजकालच्या इन्स्टंट्च्या जमान्याला साजेसे. आणि सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळे बरीच मंडळी अतिरिक्त चरबी बाळगून असतात (फॅट या अर्थाने) त्यामुळे एकदा पेटवलं कि भरभर राख होते हा एक फायदा...

चौकटराजा 29/05/2018 - 11:26
सद्या मी घरात इन्वरटर बसवू पहात आहे . त्याच्या बॅटरीतून शिसेयुक्त वाफा बाहेर पडतात का ? घरातील सर्वात कमी वापर ड्राय बाल्कनीचा असल्याने व त्या जागी वायू विजन उत्तम आल्याने तिथे ती बॅटरी ठेवावी काय ?

चौकटराजा 29/05/2018 - 11:26
सद्या मी घरात इन्वरटर बसवू पहात आहे . त्याच्या बॅटरीतून शिसेयुक्त वाफा बाहेर पडतात का ? घरातील सर्वात कमी वापर ड्राय बाल्कनीचा असल्याने व त्या जागी वायू विजन उत्तम आल्याने तिथे ती बॅटरी ठेवावी काय ?

In reply to by चौकटराजा

सुबोध खरे 30/05/2018 - 20:26
बॅटरीतुन शिसे युक्त वाफ बाहेर पडत असण्याची शक्यता नाही कारण शिशाचे बाष्पीभवन तापमान १७४९ अंश सेल्सियस आहे. बॅटरीतून ओव्हर चार्जिंग मुले किंवा पाणी जास्त झाल्यामुळे त्यातील इलेक्ट्रोलाईट बाहेर येऊन सल्फ्युरिक आम्लाच्या वाफ बाहेर पडू शकतात. यासाठी बॅटरी जेथे मोकळी हवा आहे अशा ठिकाणी ठेवणे श्रेयस्कर आहे.

खिलजि 31/05/2018 - 18:06
डॉक्टरसाहेब मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत . नाराज होऊ नका पण मी ते या लेखात विचारतोय . सर्वप्रथम मी आपल्या लेखांचा पंखा आहे हे सांगतो . आपले बहुतेक लेख मी साठवतो आणि इतरांना पाठवतो . तर पडलेले प्रश्न कर्करोगासंबंधित आहेत १ कर्करोग हा उपचारानंतर पुन्हा बळावू नये म्हणून कुठली उपाययोजना आहे का ? २ कर्करोग टाळण्यासाठी खानपानामध्ये आधीच कुठल्या विशेष आहाराला महत्व द्यावे का ? ३ कर्करोग झाला आहे कि नाही ते समजण्यासाठी कुठल्या चाचण्या आवश्यक आहे ? मी हे सर्व विचारतोय कारण माझ्या अवतीभवती मी बरीच या रोगाशी निगडित उदाहरण बघितली आहेत . कैक लोकांना आयुष्यातून उठताना बघितलं आहे . त्यांची होणारी हेळसांड आणि तो खर्च , आम्ही केलेल्या मदतीसमोर अफाट होता . जर आपण थोडा वेळ असेल आणि यावर विस्तृत प्रकाश टाकलात तर फार उपकार होतील . सिद्धेश्वर विलास पाटणकर

हेमंतकुमार 31/05/2018 - 19:38
कर्करोग हा उपचारानंतर पुन्हा बळावू नये म्हणून कुठली उपाययोजना आहे का ?>>> उपचारानंतर तो पुन्हा उदभवतोय का ते पाहण्यासाठी त्याच्या प्रकारानुसार काही चाचण्या नियमित करून पहायच्या असतात. जर त्या होकारत्मक आल्या तर उपचार करता येतील. ते रोगाचे इंद्रिय व प्रकार यानुसार भिन्न असतील. इथे १-२ वाक्यात नाही लिहिता येणार. २ कर्करोग टाळण्यासाठी खानपानामध्ये आधीच कुठल्या विशेष आहाराला महत्व द्यावे का ? >>> जीवनसत्वे अ आणि क ही प्रतिबंधात्मक आहेत. त्यासाठी गाजर व लिंबू व्यवस्थित खात राहावे. काहींच्या प्रतिबंधासाठी लाल मांस न खाणे फायद्याचे. धूम्रपान बंद व मद्यपान कमीत कमी असावे. ३ कर्करोग झाला आहे कि नाही ते समजण्यासाठी कुठल्या चाचण्या आवश्यक आहे >>>> हे मी सविस्तर माझ्या ‘तंदुरुस्त की नादुरुस्त’ या लेखमालेत लिहिले आहे. ती बघावी.

In reply to by हेमंतकुमार

खिलजि 02/06/2018 - 13:34
धन्यवाद डॉक्टरसाहेब . मी आपला प्रतिसाद उशिरा वाचला . दिलगिरी व्यक्त करतो , मान्य असावी . ‘तंदुरुस्त की नादुरुस्त’ हि वाचाखुन पहिलीच साठवली आहे त्यातील मजकूर पुन्हा एकदा वाचून घेईन म्हणतोय . सिद्धेश्वर विलास पाटणकर

हेमंतकुमार 05/09/2018 - 15:38
भारतातील बऱ्याच branded मिठांत सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण आढळून आले आहेत. अलीकडेच आय आय टी, मुंबई च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याचे मूळ कारण म्हणजे समुद्रात होणारे प्लॅस्टिक-प्रदूषण हे होय.

हेमंतकुमार 27/06/2019 - 16:28
'दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर महिन्याभरात बंदी लागू करण्यात येणार आहे. मात्र दुधाच्या पिशव्या पूर्णपणे बंद करण्यात येणार नाहीत, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत जाहीर केलं…..' ( बातमी इथे: https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/plastic-ban).

In reply to by हेमंतकुमार

दुधाच्या पिशव्यांचा उल्लेख आला म्हणून त्यासंबंधातील एक खूप महत्वाची गोष्ट आठवली... दुधाची आणि इतर कोणतीही प्लस्टिकची पिशवी उघडताना आपण सहजपणे तिच्या एका टोकाचा छोटा त्रिकोणी भाग कापतो. शेकडो-हजारो-लाखोंच्या संखेने असे छोटे त्रिकोण दररोज कचर्‍यात टाकले जातात. पाईप्स किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या छोट्या तोंडांत/छिद्रात या अश्या अनेक छोट्या त्रिकोणांचा बोळा बसतो व तो साफ करणे कठीण असते. आख्ख्या प्लस्टिकच्या पिशव्या पाण्याच्या प्रवाहात असल्या किंवा पाण्याचा निचरा करणार्‍या छिद्राच्या तोंडाबर अडकल्या तरी त्या तुलनेने सहजपणे साफ करता येतात. एकंदरीत, व्यवहारात, प्लस्टिकच्या पिशव्या धोकादायक आहेतच, पण त्यांच्या टोकांचे कापलेले छोटे त्रिकोण जास्त धोकादायक आहेत, ज्यांचा धोका प्लास्टिकच्या पिशवीची योग्य विल्हेवाट लावली तरी कायम राहतो... कारणे हे त्रिकोण सर्वसामान्य कचर्‍यातून निचरा होणार्‍या पाण्याच्या जातात. यावर उपाय म्हणून, प्लास्टिकची पिशवी उघडताना, पिशवीचे टोक पूर्णपणे कापून वेगळे करण्याऐवजी, तेथे एक छोटा काप द्यावा आणि मग कात्रीचे एक टोक पिशवीत घालून बनवलेले छिद्र मोठे करावे. प्रत्येकाने एवढे केले तरी प्लस्टिकच्या पिशवीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. ****** हे इथे एवढ्यासाठी लिहिले आहे की, व्यवहारात, प्लस्टिक आपल्या जीवनातून पूर्णपणे नाहीसे होणे शक्य नाही. तेव्हा त्याचा योग्य वापर करून फायदा मिळवणे आणि जबाबदारपणे विल्हेवाट लावणे, हेच अंतिम फायद्याचे होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यावर उपाय म्हणून, प्लास्टिकची पिशवी उघडताना, पिशवीचे टोक पूर्णपणे कापून वेगळे करण्याऐवजी, तेथे एक छोटा काप द्यावा आणि मग कात्रीचे एक टोक पिशवीत घालून बनवलेले छिद्र मोठे करावे
पण त्यामुळे दुधाच्या धारेवर परिणाम होणार नाही का ओतताना?

In reply to by प्रकाश घाटपांडे

पण त्यामुळे दुधाच्या धारेवर परिणाम होणार नाही का ओतताना? पुरेसे मोठे (सुमारे १ सेमी लांबीचे) छिद्र केल्यास दुधाची योग्य धार पडते, हे स्वानुभवावरून सांगू शकतो. एकदा करून पहा, अजिबात कठीण अथवा गैरसोईचे नाही... प्रश्न फक्त सुयोग्य सवयीचा आहे.

Rajesh188 28/06/2019 - 13:24
प्लास्टिक ही आता लोकांची गरज झाली आहे .आणि प्लास्टिक चे दुष्परिणाम जो वापरतो त्याच्या वर ताबतोब होत नाही त्या मुळे लोक बेफिकीर झाली आहेत . पर्यावरणाची हानी हा विषय बहुसंख्य लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय नाही . त्या मुळे वापरावर बंदी खालून किंवा जनजागृती होईल अशी खोटी आशा ठेवून प्लास्टिक पासून मुक्ती मिळणार नाही . प्लास्टिक ला पर्याय म्हणून उपयोग plastic सारखाच पण सहज नष्ट होणार पदार्थ पर्याय म्हणून उपलब्ध करणे हा कायमस्वरूपी पर्याय आहे . आणि नेहमी माज हेच मत असतं की जेव्हा नवीन शोध लागतात तेव्हा त्याचे फायदे आणि तोटे असे दोन्ही प्रसिद्ध केले पाहिजेत . पण फक्त फायदे च सांगायचे आणि तोटे लपवून ठेवते ही वृत्ती नंतर घातक परिस्थितीत निर्माण करते .

चौकस२१२ 28/06/2019 - 15:31
बहुतेक मक्याच्या पिठापासून बनलेले प्लास्टिक सदृश आवरण वापरात दिसते , एक म्हणजे पुस्तकांची आवरणे आणि दुसरे डिश वॉशर साबण वड्यांची आवरणे दुसरा उपाय म्हणजे "एकदाच वापरून फेकून देण्याचं" प्लास्टिक पिशव्यावर बंदी म्हणजे ठराविक जाडीच्या महाग पिशव्याच उपलब्ध ठेवायच्या कि ज्या विकत घ्याव्या लागतात म्हणजे माणूस तो सहज रित्या टाकून देत नाही अशी कल्पना !

Rajesh188 30/06/2019 - 10:18
गरीब बापाचं पोर म्हणून आपण प्लास्टिक ला अट्टल गुन्हेगार ठरवलं आहे .पण ज्याला आपण अट्टल गुन्हेगार समजत आहे तो भु रटा चोर आहे . विविध ठिकाणी वापरली जाणारी रसायने आणि त्या पासून jya वस्तू बनतात त्याला असलेले ग्लॅमरस ह्यामुळे ह्या रसायानाना अभयदान मिळत आहे आणि तेच खरे अट्टल गुन्हेगार आहेत . पाण्याचे स्तोत्र ,प्रदूषित करणारी रसायने. जमीन नापीक करणारी रसायने, हवेचे प्रदूषण करणारे घटक हे प्लास्टिक पेक्षा मानवजाती ला लवकर विनाशाकडे नेतील . पण त्या कडे दुर्लक्ष करून प्लास्टिक वरच लक्ष केंद्रित करण्यामागे काय कारण असेल

हेमंतकुमार 23/06/2020 - 09:26
PFAS प्रकारची रसायने आणि आरोग्य यावर अधिक संशोधन होत आहे. ही रसायने खालील गोष्टींच्या वापरातून शरीरात जातात: १. नॉनस्टिक भांडी २. डाग न पडणारे गालिचे ३. मायक्रोवेव्हसाठीच्या पॉपकोर्न पिशव्या ४. अग्निशमन साहित्य ५. काही पिण्याच्या पाण्याचे साठे या रसायनांचा शरीरात चयापचय होत नसल्याने ती कायमची ठाण मांडतात. त्यांचा स्त्रीच्या अंडाशयावर दुष्परिणाम होतो. यामुळे अनेक स्त्रियांना वेळेपूर्वी रजोनिवृत्ती ( सुमारे २ वर्षे ) येत असल्याचे एका अभ्यासात आढळले.

हेमंतकुमार 23/07/2021 - 13:58
अन्न संशोधनासाठी काम करणाऱ्यांपैकी एक म्हणजे केंद्रीय सागरी मच्छीमारी संशोधन संस्थेतील मुख्य वैज्ञानिक डॉ. काजल चक्रबर्ती! त्यांना भारतीय अन्न संशोधन परिषदेचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार नुकताच जाहीर झाला. अभिनंदन !

हेमंतकुमार 25/09/2021 - 11:26
आपल्या थायरॉइड ग्रंथींना घातक असणाऱ्या chlorpyrifos या कीटकनाशकावर नुकतीच अमेरिकेच्या EPA या पर्यावरण संरक्षण संघटनेने बंदी घातली आहे. https://earthjustice.org/brief/2021/chlorpyrifos-ban-pesticide-industry-pressure-epa तसेच PFAS हे घातक रसायन अन्न-पॅकेजिंगसाठी बऱ्याच मॉल्समध्ये वापरले जात होते. त्याचा वापरही जाणीवपूर्वक कमी करण्यात आलेला आहे.

हेमंतकुमार 02/11/2021 - 10:39
वापरून झालेल्या सॅनिटरी पॅडसचा कचरा ही एक मोठी पर्यावरणीय समस्या आहे. त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी पॅड labs या कंपनीने एक चांगला उद्योग उभारला आहे. यामध्ये घराच्या स्वच्छतागृहालाच एक विशिष्ट कचरा पेटी बसवण्यात येते. त्यामध्ये टाकलेली पॅडस एका मध्यवर्ती यंत्रणेला पोचतात. तिथल्या यंत्रात खालील घटना घडतात : १. पॅडचे निर्जंतुकीकरण २. त्यांचे बारीक तुकडे करणे ३. त्यातील पॉलिमरचे विघटन करून सेल्युलोज मिळतो. ४. या सेल्युलोजचा पुनर्वापर पॅकेजिंग उद्योगांसाठी करता येतो. धारिया नावाच्या तरुणाने चालू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.

हेमंतकुमार 03/07/2022 - 11:50
३ जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन प्लास्टिकच्या संपर्कातील खाद्य-पेय पदार्थ व पाणी शक्य तितके टाळण्याचे आवाहन .

हेमंतकुमार 03/09/2022 - 10:37
सध्या शेती उद्योगातील रसायने, अनेक प्रकारचे रंग, सौंदर्यप्रसाधने आणि डिटर्जंट यामध्ये सूक्ष्म प्लास्टिकचा वापर केलेला असतो. प्लॅस्टिकच्या या सूक्ष्मकणांनी मोठी पर्यावरणीय समस्या निर्माण केलेली आहे. म्हणून त्याला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सतत चालू आहेत. अलीकडे एका संशोधनातून रेशीम हा पर्याय पुढे आलेला आहे. हलक्या दर्जाच्या रेशमापासून कपडे बनवत नाहीत आणि असे हे रेशीम खूप मोठ्या प्रमाणावर सध्या फेकून दिले जाते. त्यातील प्रथिन वेगळे काढून त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ते सूक्ष्म-प्लास्टिकला पर्याय म्हणून वापरता येईल असा प्रस्ताव आहे. याचे नैसर्गिक विघटन होते.

हेमंतकुमार 22/03/2023 - 13:42
Trichloroethylene (TCE) या रसायनाच्या शरीरावरील घातक परिणामांबाबत दीर्घकाळ संशोधन झालेले आहे. त्याचे कर्करोगकारक परिणाम पूर्वीपासून माहित आहेत. परंतु त्याचा मेंदूतील चेतातंतूवर होणारा परिणाम अलीकडेच उजेडात येतो आहे, तो म्हणजे मेंदूतील डोपामीन निर्मिती करणाऱ्या चेतंतूंना इजा पोचवणे. यातूनच पुढे पार्किन्सन आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी (५००%) वाढते असे एक गृहीतक अलीकडे मांडले गेलेले आहे : https://content.iospress.com/articles/journal-of-parkinsons-disease/jpd225047 या आजाराची कारणमीमांसा गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये आधुनिक काळातील अनेक रसायनांचा हात असण्याची शक्यता आहे. TCE हे रसायन अनेक दशकांपासून वापरात आहे. त्याचे उपयोग दैनंदिन वापरातील वस्तू, औद्योगिक उत्पादने व कारखाने, एकेकाळी वैद्यकातील भूल देण्याचे साधन आणि लष्करी विभागांमध्ये होत आलेले आहेत. सध्या हे रसायन खालील गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते: 1. धातुंवरील ग्रीज काढण्यासाठी 2. कपड्यांचे ड्रायक्लीनिंग 3. रंगकाम आणि तत्सम कामे 4. टंकलिखित मजकूर खोडण्यासाठीच्या द्रावणात 5. लष्करात बंदुका साफ करण्यासाठी या रसायनाचा एकंदरीत संचार बघता एव्हाना ते हवा आणि भूजलात देखील बऱ्यापैकी प्रमाणात आढळत आहे. प्रस्तुत संशोधनात सात रुग्णांचा सखोल अभ्यास केला गेलेला आहे. त्यातून संशोधकांनी हे गृहीतक मांडलेले आहे. भविष्यात यावर अधिक संशोधनाची गरज आहे. .... पार्किन्सनच्या कारणमीमांसेत अनेक तण व बुरशीनाशकांतअसणाऱ्या रसायनांचा हात आहे. उदा: Paraquat, maneb / mancozeb. MPTP या वातावरणीय टॉक्सिनसंबंधी बराच अभ्यास झालेला आहे

हेमंतकुमार 05/06/2023 - 09:22
शिफारस प्लास्टिकमुक्ती गरजेचीच आजच्या ( ५ जून) ‘जागतिक पर्यावरण दिना’चे घोषवाक्य आहे, ‘प्लास्टिकच्या प्रदूषणाला जोरदार तडाखा देऊन त्याचा पराभव करा’

In reply to by विजुभाऊ

मदनबाण 30/06/2019 - 10:37
इजूभाऊ अणूबॉम्ब पण वरदान म्हणायचा का ? नाही तो वापरुन मोठ्या लोकसंख्येची लगेच डायरेक्ट वाफ करण्याची सोय करता येते !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant

हेमंतकुमार 27/05/2018 - 19:31
नवीन प्रतिसादकांचे आभार. @ एस, प्रतिबंधात्मक उपाय लेखातील तक्त्यात दिलेले आहेत. शिसे संबंधी दोन मुद्दे अधोरेखित करतो. १. पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळण्याच्या उद्दिष्टापासून आपण अजून बरेच दूर आहोत. २. वृत्तपत्राच्या कागदात खाद्यपदार्थ विकणे ही तर आपल्याकडची अत्यंत वाईट खोड आहे. अशा कागदात घेऊन वडापाव वा भेळ मिटक्या मारत खाताना बरेच सुशिक्षितही दिसतात. ते विकणाऱ्यांचे प्रबोधन हेही व्हायला हवे. अन्य पर्यायी कागद वापरला पाहिजे. काही लोक तर पेपराच्या कागदात गुंडाळून शिरा व साखरफुटाणेही देतात. याची सुधारणा तर वैयक्तिक पातळीवरच आहे.

अनिंद्य 28/05/2018 - 11:03
उत्तम माहिती आणि आखीव-रेखीव लेख. 'प्लास्टिक सर्वव्यापी' ते 'प्लास्टिक बंदी' असे एक आवर्तन पूर्ण झाले आहे, उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खते-पीक सुरक्षा ते परत जुनीच सेंद्रिय शेती असेही होत आहे. उशिरा का होईना योग्य दिशेनी पडणारी पावले महत्वाची. रसायनांचा पूर थोडा ओसरावा हीच कामना. पु ले शु

शाली 28/05/2018 - 16:26
आपल्या हातात आता काही राहीले नाही हो. साधं ऊदाहरण: माझी शेती आहे चार-साडेचार एकर. भरपुर पाणी. नकाशावर आलय माझं गाव शेतीसाठी. मी गेली आठ दहा वर्षे सेंद्रीय शेती करतोय. पण मी काढलेल्या भाजीपाल्यात सगळे दुर्गूण असतात जे रासायणीक खते वगैरे वापरल्यावर येतात. मी तज्ञाला विचारलं तर तो म्हणाला "तुम्ही सेंद्रीय शेती करुन काय ऊपयोग? आजुबाजूला जे वापरलं जातं ते तुमच्या शेतात कुठल्या ना कुठल्या मार्गाने येणारच. मग ते पर्क्युलेशन असो, हवेतुन येणारी औषधे असोत आणि अजुन अनेक कारणे. म्हणजे मला दोष नसलेले ऊत्पन्न घ्यायचे असेल तर दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागेल. आणि ते कधिच सुधारणार नाही हे मला पक्के माहित आहे. मग काय करावे?

In reply to by शाली

पण मी काढलेल्या भाजीपाल्यात सगळे दुर्गूण असतात जे रासायणीक खते वगैरे वापरल्यावर येतात
पण तुमच्या उत्पादनांत या दुर्गुणांचे प्रमाण तरी बरेच कमी असेल ..तसे असले तरी खूप काही मिळवले असे म्हणता येईल.

In reply to by शाली

अनिंद्य 29/05/2018 - 11:13
@शाली, बरोबर आहे. निसर्ग गुन्हा आणि शिक्षा यांच्यात तारतम्य ठेवणारच. मानवाने काही दशकं ओरबाडलेल्या पृथ्वीला एकदाच 'सॉरी' म्हणून सगळे पूर्वीसारखे होणे अवघड आहे. योग्य दिशेने वाटचाल करीत राहणे महत्वाचे आहे, ते तुम्ही करता आहेत.

हेमंतकुमार 28/05/2018 - 17:37
अनिंद्य, उत्तम प्रतिसाद. सहमत. शाली, बरोबर आहे तुमचे. हताश व्हायला होते पण जेवढे शक्य आहे तेवढे तरी करावे असे वाटते.

तेजस आठवले 28/05/2018 - 19:31
चांगला लेख.पण थोडा त्रोटक झाला आहे.अजून भर घातलीत तर चांगले होईल. प्लास्टिक ह्या गोष्टीने आता आयुष्य इतके व्यापले आहे की त्यापासून आता सुटका नाही. सकाळी आणि रात्री दात घासताना वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या टूथब्रश पासून ते प्यायच्या पाण्यापासून सगळीकडेच. पिण्याचे पाणी अथवा शीतपेये प्लॅस्टिकच्या बाटल्यात असतात, रोजचे सकाळचे दूध प्लास्टिक पिशवीत असते, ऑफिसचा डबा पण प्लास्टिकचाच. वर्तमानपत्रात गुंडाळलेले पदार्थ उदा फरसाण, भेळ, वडे, भजी.ह्यात कितीतरी वेळा त्या पदार्थावर शाई उमटलेली दिसते. आपण हे टाळू शकतो पण आपली सर्वच बाबतीतली अनास्था हे एक वेगळेच प्रकरण आहे. अर्थात ऍसिडिटीचा त्रास असून चमचमीत मिसळ खाऊन लगेच पुढच्या मिनिटाला अँटासिड घेणारी लोकं या जगात असल्याने कोणी कोणाला काय समजवावे हा एक गहन प्रश्न आहे. रसायनं इतकी सर्वव्यापी झाली आहेत की त्यांचा अंश नसलेली वस्तू सापडणे कठीण.

हेमंतकुमार 29/05/2018 - 07:36
नवीन प्रतिसादकांचे आभार. हॉर्मोनचा बिघाड करणारी रसायने शरीरात दोन प्रकारे वावरतात: १. काही आपल्या मेदाशी एकरूप होतात आणि त्यामुळे शरीरात दीर्घकाळ साठून राहतात. मग ती सतत रक्तात सोडली जातात. याची ठळक उदाहरणे म्हणजे कीटकनाशके आणि PCBs. PCBs ही मत्स्याहारातून शिरतात. २. तर इतर काही लगेच विघटीत होणारी असल्याने साठून राहत नाहीत. प्लास्टिकमधून येणारे Bisphenol A हे याचे उदा.

चामुंडराय 29/05/2018 - 07:56
या रसायनांनी अगदी उच्छाद मांडला आहे. प्रोसेस फूड मधून प्रिझर्व्हेटिव्ह्ज् शरीरात जातात त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची समस्या पुढे आली आहे. मृत्यू नंतर पुरलेल्या शरीराचे लवकर विघटन होत नाही त्यामुळे स्मशानभूमी मध्ये जागेचा मोठा प्रॉब्लेम होत आहे असे समजते. या कारणास्तव अनेक लोकं ग्रँड फिनाली बार्बेक्यूला प्राधान्य देत आहेत.

In reply to by चामुंडराय

अनिंद्य 29/05/2018 - 11:21
@ चामुंडराय, ग्रँड फिनाली बार्बेक्यू :-) आपल्या देशात ते शतकानुशतकं होतेच आहे. धार्मिक कारणे बाजूला ठेवली तरी प्रेतांच्या विल्हेवाटीचा शवदहन हा मार्ग सर्वोत्तम आहे. शॉर्ट स्वीट अँड सिम्पल ! आता रसायनांमुळे शव जाळायला काही अडचणी येत असतील तर माहित नाही :-)

In reply to by अनिंद्य

हेमंतकुमार 29/05/2018 - 11:38
शव दहनाच्या बाबत " बार्बेक्यू" हा शब्द खटकतो. शब्दकोशा नुसार ती अन्न शिजवायची (cook) पद्धत आहे. स्पष्टीकरण वाचण्यास उत्सुक.

In reply to by हेमंतकुमार

चामुंडराय 30/05/2018 - 07:43
बार्बेक्यू करताना मांस अग्नीवर भाजतात तर शवदहन करताना मांस अग्नीने जाळतात म्हणून बार्बेक्यू हा शब्द वापरला. शब्दकोशातील शब्दशः अर्थ लागू होणार नाही हे मान्यच (या निमित्ताने शब्दकोशांवरील तुमचा धागा आठवला).

In reply to by अनिंद्य

चामुंडराय 30/05/2018 - 07:35
जन्म घेतेवेळी जी काही एलेमेंट्स (पंचमहाभूते) निसर्गाकडून घेतलेली असतात त्यातील बहुतांश शवदहन करते वेळी निसर्गाला ताबडतोब परत दिली जातात, अगदी आजकालच्या इन्स्टंट्च्या जमान्याला साजेसे. आणि सध्याच्या बैठ्या जीवनशैलीमुळे बरीच मंडळी अतिरिक्त चरबी बाळगून असतात (फॅट या अर्थाने) त्यामुळे एकदा पेटवलं कि भरभर राख होते हा एक फायदा...

चौकटराजा 29/05/2018 - 11:26
सद्या मी घरात इन्वरटर बसवू पहात आहे . त्याच्या बॅटरीतून शिसेयुक्त वाफा बाहेर पडतात का ? घरातील सर्वात कमी वापर ड्राय बाल्कनीचा असल्याने व त्या जागी वायू विजन उत्तम आल्याने तिथे ती बॅटरी ठेवावी काय ?

चौकटराजा 29/05/2018 - 11:26
सद्या मी घरात इन्वरटर बसवू पहात आहे . त्याच्या बॅटरीतून शिसेयुक्त वाफा बाहेर पडतात का ? घरातील सर्वात कमी वापर ड्राय बाल्कनीचा असल्याने व त्या जागी वायू विजन उत्तम आल्याने तिथे ती बॅटरी ठेवावी काय ?

In reply to by चौकटराजा

सुबोध खरे 30/05/2018 - 20:26
बॅटरीतुन शिसे युक्त वाफ बाहेर पडत असण्याची शक्यता नाही कारण शिशाचे बाष्पीभवन तापमान १७४९ अंश सेल्सियस आहे. बॅटरीतून ओव्हर चार्जिंग मुले किंवा पाणी जास्त झाल्यामुळे त्यातील इलेक्ट्रोलाईट बाहेर येऊन सल्फ्युरिक आम्लाच्या वाफ बाहेर पडू शकतात. यासाठी बॅटरी जेथे मोकळी हवा आहे अशा ठिकाणी ठेवणे श्रेयस्कर आहे.

खिलजि 31/05/2018 - 18:06
डॉक्टरसाहेब मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत . नाराज होऊ नका पण मी ते या लेखात विचारतोय . सर्वप्रथम मी आपल्या लेखांचा पंखा आहे हे सांगतो . आपले बहुतेक लेख मी साठवतो आणि इतरांना पाठवतो . तर पडलेले प्रश्न कर्करोगासंबंधित आहेत १ कर्करोग हा उपचारानंतर पुन्हा बळावू नये म्हणून कुठली उपाययोजना आहे का ? २ कर्करोग टाळण्यासाठी खानपानामध्ये आधीच कुठल्या विशेष आहाराला महत्व द्यावे का ? ३ कर्करोग झाला आहे कि नाही ते समजण्यासाठी कुठल्या चाचण्या आवश्यक आहे ? मी हे सर्व विचारतोय कारण माझ्या अवतीभवती मी बरीच या रोगाशी निगडित उदाहरण बघितली आहेत . कैक लोकांना आयुष्यातून उठताना बघितलं आहे . त्यांची होणारी हेळसांड आणि तो खर्च , आम्ही केलेल्या मदतीसमोर अफाट होता . जर आपण थोडा वेळ असेल आणि यावर विस्तृत प्रकाश टाकलात तर फार उपकार होतील . सिद्धेश्वर विलास पाटणकर

हेमंतकुमार 31/05/2018 - 19:38
कर्करोग हा उपचारानंतर पुन्हा बळावू नये म्हणून कुठली उपाययोजना आहे का ?>>> उपचारानंतर तो पुन्हा उदभवतोय का ते पाहण्यासाठी त्याच्या प्रकारानुसार काही चाचण्या नियमित करून पहायच्या असतात. जर त्या होकारत्मक आल्या तर उपचार करता येतील. ते रोगाचे इंद्रिय व प्रकार यानुसार भिन्न असतील. इथे १-२ वाक्यात नाही लिहिता येणार. २ कर्करोग टाळण्यासाठी खानपानामध्ये आधीच कुठल्या विशेष आहाराला महत्व द्यावे का ? >>> जीवनसत्वे अ आणि क ही प्रतिबंधात्मक आहेत. त्यासाठी गाजर व लिंबू व्यवस्थित खात राहावे. काहींच्या प्रतिबंधासाठी लाल मांस न खाणे फायद्याचे. धूम्रपान बंद व मद्यपान कमीत कमी असावे. ३ कर्करोग झाला आहे कि नाही ते समजण्यासाठी कुठल्या चाचण्या आवश्यक आहे >>>> हे मी सविस्तर माझ्या ‘तंदुरुस्त की नादुरुस्त’ या लेखमालेत लिहिले आहे. ती बघावी.

In reply to by हेमंतकुमार

खिलजि 02/06/2018 - 13:34
धन्यवाद डॉक्टरसाहेब . मी आपला प्रतिसाद उशिरा वाचला . दिलगिरी व्यक्त करतो , मान्य असावी . ‘तंदुरुस्त की नादुरुस्त’ हि वाचाखुन पहिलीच साठवली आहे त्यातील मजकूर पुन्हा एकदा वाचून घेईन म्हणतोय . सिद्धेश्वर विलास पाटणकर

हेमंतकुमार 05/09/2018 - 15:38
भारतातील बऱ्याच branded मिठांत सूक्ष्म प्लॅस्टिकचे कण आढळून आले आहेत. अलीकडेच आय आय टी, मुंबई च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याचे मूळ कारण म्हणजे समुद्रात होणारे प्लॅस्टिक-प्रदूषण हे होय.

हेमंतकुमार 27/06/2019 - 16:28
'दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर महिन्याभरात बंदी लागू करण्यात येणार आहे. मात्र दुधाच्या पिशव्या पूर्णपणे बंद करण्यात येणार नाहीत, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत जाहीर केलं…..' ( बातमी इथे: https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/plastic-ban).

In reply to by हेमंतकुमार

दुधाच्या पिशव्यांचा उल्लेख आला म्हणून त्यासंबंधातील एक खूप महत्वाची गोष्ट आठवली... दुधाची आणि इतर कोणतीही प्लस्टिकची पिशवी उघडताना आपण सहजपणे तिच्या एका टोकाचा छोटा त्रिकोणी भाग कापतो. शेकडो-हजारो-लाखोंच्या संखेने असे छोटे त्रिकोण दररोज कचर्‍यात टाकले जातात. पाईप्स किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या छोट्या तोंडांत/छिद्रात या अश्या अनेक छोट्या त्रिकोणांचा बोळा बसतो व तो साफ करणे कठीण असते. आख्ख्या प्लस्टिकच्या पिशव्या पाण्याच्या प्रवाहात असल्या किंवा पाण्याचा निचरा करणार्‍या छिद्राच्या तोंडाबर अडकल्या तरी त्या तुलनेने सहजपणे साफ करता येतात. एकंदरीत, व्यवहारात, प्लस्टिकच्या पिशव्या धोकादायक आहेतच, पण त्यांच्या टोकांचे कापलेले छोटे त्रिकोण जास्त धोकादायक आहेत, ज्यांचा धोका प्लास्टिकच्या पिशवीची योग्य विल्हेवाट लावली तरी कायम राहतो... कारणे हे त्रिकोण सर्वसामान्य कचर्‍यातून निचरा होणार्‍या पाण्याच्या जातात. यावर उपाय म्हणून, प्लास्टिकची पिशवी उघडताना, पिशवीचे टोक पूर्णपणे कापून वेगळे करण्याऐवजी, तेथे एक छोटा काप द्यावा आणि मग कात्रीचे एक टोक पिशवीत घालून बनवलेले छिद्र मोठे करावे. प्रत्येकाने एवढे केले तरी प्लस्टिकच्या पिशवीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. ****** हे इथे एवढ्यासाठी लिहिले आहे की, व्यवहारात, प्लस्टिक आपल्या जीवनातून पूर्णपणे नाहीसे होणे शक्य नाही. तेव्हा त्याचा योग्य वापर करून फायदा मिळवणे आणि जबाबदारपणे विल्हेवाट लावणे, हेच अंतिम फायद्याचे होईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

यावर उपाय म्हणून, प्लास्टिकची पिशवी उघडताना, पिशवीचे टोक पूर्णपणे कापून वेगळे करण्याऐवजी, तेथे एक छोटा काप द्यावा आणि मग कात्रीचे एक टोक पिशवीत घालून बनवलेले छिद्र मोठे करावे
पण त्यामुळे दुधाच्या धारेवर परिणाम होणार नाही का ओतताना?

In reply to by प्रकाश घाटपांडे

पण त्यामुळे दुधाच्या धारेवर परिणाम होणार नाही का ओतताना? पुरेसे मोठे (सुमारे १ सेमी लांबीचे) छिद्र केल्यास दुधाची योग्य धार पडते, हे स्वानुभवावरून सांगू शकतो. एकदा करून पहा, अजिबात कठीण अथवा गैरसोईचे नाही... प्रश्न फक्त सुयोग्य सवयीचा आहे.

Rajesh188 28/06/2019 - 13:24
प्लास्टिक ही आता लोकांची गरज झाली आहे .आणि प्लास्टिक चे दुष्परिणाम जो वापरतो त्याच्या वर ताबतोब होत नाही त्या मुळे लोक बेफिकीर झाली आहेत . पर्यावरणाची हानी हा विषय बहुसंख्य लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय नाही . त्या मुळे वापरावर बंदी खालून किंवा जनजागृती होईल अशी खोटी आशा ठेवून प्लास्टिक पासून मुक्ती मिळणार नाही . प्लास्टिक ला पर्याय म्हणून उपयोग plastic सारखाच पण सहज नष्ट होणार पदार्थ पर्याय म्हणून उपलब्ध करणे हा कायमस्वरूपी पर्याय आहे . आणि नेहमी माज हेच मत असतं की जेव्हा नवीन शोध लागतात तेव्हा त्याचे फायदे आणि तोटे असे दोन्ही प्रसिद्ध केले पाहिजेत . पण फक्त फायदे च सांगायचे आणि तोटे लपवून ठेवते ही वृत्ती नंतर घातक परिस्थितीत निर्माण करते .

चौकस२१२ 28/06/2019 - 15:31
बहुतेक मक्याच्या पिठापासून बनलेले प्लास्टिक सदृश आवरण वापरात दिसते , एक म्हणजे पुस्तकांची आवरणे आणि दुसरे डिश वॉशर साबण वड्यांची आवरणे दुसरा उपाय म्हणजे "एकदाच वापरून फेकून देण्याचं" प्लास्टिक पिशव्यावर बंदी म्हणजे ठराविक जाडीच्या महाग पिशव्याच उपलब्ध ठेवायच्या कि ज्या विकत घ्याव्या लागतात म्हणजे माणूस तो सहज रित्या टाकून देत नाही अशी कल्पना !

Rajesh188 30/06/2019 - 10:18
गरीब बापाचं पोर म्हणून आपण प्लास्टिक ला अट्टल गुन्हेगार ठरवलं आहे .पण ज्याला आपण अट्टल गुन्हेगार समजत आहे तो भु रटा चोर आहे . विविध ठिकाणी वापरली जाणारी रसायने आणि त्या पासून jya वस्तू बनतात त्याला असलेले ग्लॅमरस ह्यामुळे ह्या रसायानाना अभयदान मिळत आहे आणि तेच खरे अट्टल गुन्हेगार आहेत . पाण्याचे स्तोत्र ,प्रदूषित करणारी रसायने. जमीन नापीक करणारी रसायने, हवेचे प्रदूषण करणारे घटक हे प्लास्टिक पेक्षा मानवजाती ला लवकर विनाशाकडे नेतील . पण त्या कडे दुर्लक्ष करून प्लास्टिक वरच लक्ष केंद्रित करण्यामागे काय कारण असेल

हेमंतकुमार 23/06/2020 - 09:26
PFAS प्रकारची रसायने आणि आरोग्य यावर अधिक संशोधन होत आहे. ही रसायने खालील गोष्टींच्या वापरातून शरीरात जातात: १. नॉनस्टिक भांडी २. डाग न पडणारे गालिचे ३. मायक्रोवेव्हसाठीच्या पॉपकोर्न पिशव्या ४. अग्निशमन साहित्य ५. काही पिण्याच्या पाण्याचे साठे या रसायनांचा शरीरात चयापचय होत नसल्याने ती कायमची ठाण मांडतात. त्यांचा स्त्रीच्या अंडाशयावर दुष्परिणाम होतो. यामुळे अनेक स्त्रियांना वेळेपूर्वी रजोनिवृत्ती ( सुमारे २ वर्षे ) येत असल्याचे एका अभ्यासात आढळले.

हेमंतकुमार 23/07/2021 - 13:58
अन्न संशोधनासाठी काम करणाऱ्यांपैकी एक म्हणजे केंद्रीय सागरी मच्छीमारी संशोधन संस्थेतील मुख्य वैज्ञानिक डॉ. काजल चक्रबर्ती! त्यांना भारतीय अन्न संशोधन परिषदेचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार नुकताच जाहीर झाला. अभिनंदन !

हेमंतकुमार 25/09/2021 - 11:26
आपल्या थायरॉइड ग्रंथींना घातक असणाऱ्या chlorpyrifos या कीटकनाशकावर नुकतीच अमेरिकेच्या EPA या पर्यावरण संरक्षण संघटनेने बंदी घातली आहे. https://earthjustice.org/brief/2021/chlorpyrifos-ban-pesticide-industry-pressure-epa तसेच PFAS हे घातक रसायन अन्न-पॅकेजिंगसाठी बऱ्याच मॉल्समध्ये वापरले जात होते. त्याचा वापरही जाणीवपूर्वक कमी करण्यात आलेला आहे.

हेमंतकुमार 02/11/2021 - 10:39
वापरून झालेल्या सॅनिटरी पॅडसचा कचरा ही एक मोठी पर्यावरणीय समस्या आहे. त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी पॅड labs या कंपनीने एक चांगला उद्योग उभारला आहे. यामध्ये घराच्या स्वच्छतागृहालाच एक विशिष्ट कचरा पेटी बसवण्यात येते. त्यामध्ये टाकलेली पॅडस एका मध्यवर्ती यंत्रणेला पोचतात. तिथल्या यंत्रात खालील घटना घडतात : १. पॅडचे निर्जंतुकीकरण २. त्यांचे बारीक तुकडे करणे ३. त्यातील पॉलिमरचे विघटन करून सेल्युलोज मिळतो. ४. या सेल्युलोजचा पुनर्वापर पॅकेजिंग उद्योगांसाठी करता येतो. धारिया नावाच्या तरुणाने चालू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे.

हेमंतकुमार 03/07/2022 - 11:50
३ जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन प्लास्टिकच्या संपर्कातील खाद्य-पेय पदार्थ व पाणी शक्य तितके टाळण्याचे आवाहन .

हेमंतकुमार 03/09/2022 - 10:37
सध्या शेती उद्योगातील रसायने, अनेक प्रकारचे रंग, सौंदर्यप्रसाधने आणि डिटर्जंट यामध्ये सूक्ष्म प्लास्टिकचा वापर केलेला असतो. प्लॅस्टिकच्या या सूक्ष्मकणांनी मोठी पर्यावरणीय समस्या निर्माण केलेली आहे. म्हणून त्याला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सतत चालू आहेत. अलीकडे एका संशोधनातून रेशीम हा पर्याय पुढे आलेला आहे. हलक्या दर्जाच्या रेशमापासून कपडे बनवत नाहीत आणि असे हे रेशीम खूप मोठ्या प्रमाणावर सध्या फेकून दिले जाते. त्यातील प्रथिन वेगळे काढून त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ते सूक्ष्म-प्लास्टिकला पर्याय म्हणून वापरता येईल असा प्रस्ताव आहे. याचे नैसर्गिक विघटन होते.

हेमंतकुमार 22/03/2023 - 13:42
Trichloroethylene (TCE) या रसायनाच्या शरीरावरील घातक परिणामांबाबत दीर्घकाळ संशोधन झालेले आहे. त्याचे कर्करोगकारक परिणाम पूर्वीपासून माहित आहेत. परंतु त्याचा मेंदूतील चेतातंतूवर होणारा परिणाम अलीकडेच उजेडात येतो आहे, तो म्हणजे मेंदूतील डोपामीन निर्मिती करणाऱ्या चेतंतूंना इजा पोचवणे. यातूनच पुढे पार्किन्सन आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी (५००%) वाढते असे एक गृहीतक अलीकडे मांडले गेलेले आहे : https://content.iospress.com/articles/journal-of-parkinsons-disease/jpd225047 या आजाराची कारणमीमांसा गुंतागुंतीची आहे. त्यामध्ये आधुनिक काळातील अनेक रसायनांचा हात असण्याची शक्यता आहे. TCE हे रसायन अनेक दशकांपासून वापरात आहे. त्याचे उपयोग दैनंदिन वापरातील वस्तू, औद्योगिक उत्पादने व कारखाने, एकेकाळी वैद्यकातील भूल देण्याचे साधन आणि लष्करी विभागांमध्ये होत आलेले आहेत. सध्या हे रसायन खालील गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते: 1. धातुंवरील ग्रीज काढण्यासाठी 2. कपड्यांचे ड्रायक्लीनिंग 3. रंगकाम आणि तत्सम कामे 4. टंकलिखित मजकूर खोडण्यासाठीच्या द्रावणात 5. लष्करात बंदुका साफ करण्यासाठी या रसायनाचा एकंदरीत संचार बघता एव्हाना ते हवा आणि भूजलात देखील बऱ्यापैकी प्रमाणात आढळत आहे. प्रस्तुत संशोधनात सात रुग्णांचा सखोल अभ्यास केला गेलेला आहे. त्यातून संशोधकांनी हे गृहीतक मांडलेले आहे. भविष्यात यावर अधिक संशोधनाची गरज आहे. .... पार्किन्सनच्या कारणमीमांसेत अनेक तण व बुरशीनाशकांतअसणाऱ्या रसायनांचा हात आहे. उदा: Paraquat, maneb / mancozeb. MPTP या वातावरणीय टॉक्सिनसंबंधी बराच अभ्यास झालेला आहे

हेमंतकुमार 05/06/2023 - 09:22
शिफारस प्लास्टिकमुक्ती गरजेचीच आजच्या ( ५ जून) ‘जागतिक पर्यावरण दिना’चे घोषवाक्य आहे, ‘प्लास्टिकच्या प्रदूषणाला जोरदार तडाखा देऊन त्याचा पराभव करा’
सध्याच्या युगात विविध रसायने ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. त्यातील काही नैसर्गिक आहेत तर काही मानवनिर्मित. आज माणसाने विविध कारणांसाठी बनवलेल्या रसायनांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे! ती बनवण्यामागे विविध उद्देश होते खरे पण, त्यांच्या बेलगाम वापरामुळे तीच आता आपल्यावर बूमरॅंग झाली आहेत. त्याचे अनेक दुष्परिणाम आपण सध्या भोगत आहोत. त्यामध्ये श्वसनविकार, कर्करोग आणि हॉर्मोन्सची बिघडलेली यंत्रणा अशा अनेक आजारांचा समावेश होतो. रसायने आणि कर्करोग या विषयावरील विवेचन माझ्या मिपावरील पूर्वीच्या एका लेखात (http://www.misalpav.com/node/41581) केलेले आहे.

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी

मार्गी ·

भुजंगराव 26/05/2018 - 17:20
सर खरच खूपच रोमांचकारी सफर आहे , कारण या उन्हात घराबाहेर पडणे मुश्कील पण आपण ध्येयापोटी व सायकलवरून फिरण्याचा ध्यास (ध्यान) हे धाडस केले खूप कमाल न सलाम सुद्धा ...........

भुजंगराव 26/05/2018 - 17:20
सर खरच खूपच रोमांचकारी सफर आहे , कारण या उन्हात घराबाहेर पडणे मुश्कील पण आपण ध्येयापोटी व सायकलवरून फिरण्याचा ध्यास (ध्यान) हे धाडस केले खूप कमाल न सलाम सुद्धा ...........
२: परभणी- जिंतूर- नेमगिरी एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना ११ मे ला पहाटे साडेपाचला परभणीतून निघालो. अनेक जण निरोप देण्यासाठी आले, त्यामुळे उत्साह आणखी वाढला. अनेक जणांनी मॅसेजवरही शुभेच्छा दिल्या. काही अंतरापर्यंत माझे प्रिय सायकल मित्र आणि माझे रनिंगचे गुरू बनसकर सरसुद्धा सोबत आले. मी चालवतोय ती एटलस सायकल त्यांचीच तर आहे! पाय दुखत असूनही ते काही अंतर सोबतीला आले. थोडा वेळ त्यांची सोबत मिळाली व मग पुढे निघालो. योग प्रसार हेतु सायकलिंगच्या ग्रूपवर माझं लाईव्ह लोकेशन टाकलं आहे.