नको जीव लाऊ,
नको वाट पाहू,
अता श्वास घेणे
नको वाटते..
कधी आस होती
तुझ्या कौतुकाची,
अता शब्दलेणे
नको वाटते..
कशी चूक झाली,
कुणी चूक केली,
पुन्हा जाब देणे
नको वाटते..
इच्छा निमाल्या.
मनी शांतताहे.
तिला छेद देणे
नको वाटते.
मला साद घाली
खुला पैलतीर,
इथे बंदी होणे
नको वाटते..
(सद्ध्या एक आजी पेशंट म्हणून येतात. त्यांच्या बरोबर येणारे आजोबा अगदी लगबगीने त्यांना हवं, नको ते पहातात. म्हणून कौतुकाने त्या आजीना म्हटले, " आजोबा किती काळजी घेतात तुमची !" त्यावर त्या म्हणाल्या ,"जेव्हा वय , मन तरुण होतं,तेव्हा कधी काही केलं नाही, आता जायची वेळ आली, काय उपयोग या प्रेमाचा?" )