मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंतरे

परिधी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कधी उमलत्या फुलांची उडून गेली अत्तरे, सोबतीच्या क्षणांची कशी झाली एवढी अंतरे? प्रश्न करून पोरके का निघून गेली उत्तरे, घेतला निरोप ज्या ठिकाणी, का सुन्न तिथले सारे? तू जाता सांग का आठवणींचे मृगजळ पाझरे वेचले जिथे मोती, का उद्विग्न आज ते किनारे? तुझ्या येण्याने कधीकाळी बहरली जी शहरे, परतून तू जाता घरी,का अनोळखी वाटते मला सारे?

वाचने 1757 वाचनखूण प्रतिक्रिया 2