Skip to main content

विराणी

म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 06/12/2015 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
चांदोबा असतोच तसा आजन्म उपाशी तुपात पडलीयेना त्याच्या माशी ! तुपरोटी तो कसला खातो चिरेबंदी गाण्यातली अंगाई ऐकत मामा होऊन भटकत राहतो ! निंबोणीच्या झाडात गंधर्व होऊन विराणी कुठलीशी गात राहतो. बाबा ?, की आईनेच चांदोबाचा भागाकार केला, म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ? * माझ्या उपरोक्त विडंबनास खरे तर एका पेक्षा अधिक शीर्षके सुचत होती, तुम्हाला काही चपखल शीर्षक सुचलेतर प्रतिसादातून जरुर नोंदवा. * उपरोक्त विडंबन खालील बडबड गीताचे आहे : चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तूपरोटी खाऊन जा तुप

साकल्यसूक्त

लेखक मितान यांनी शनिवार, 05/12/2015 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!

गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 04/12/2015 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
कलत्या उन्हात, कोण अंगणात? तुळस एकटी, तिची सावली, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण आकाशात? फिरती घार, उडती धूळ, बाकी तसे कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण झाडात? झुलता वारा, हलते पान, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण घरात? चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण उरात? एका वेळी एक श्वास, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण गॅलरीत? असेल कुणी, नसेल कुणी, बाकी मग मी पण नाही!

गॅलरी .....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/11/2015 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
एक हात कठड्यावर ठेऊन, अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन, मी उभा आहे गॅलरीत! तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर मन रमून गेले फार! इथेच बसून नाही का लावत तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला! नाही.....वेडा नव्हतोच कधी समंजस होतो खूप म्हणून गॅलरी नाही ओलांडत आजही! मला नाही जमत लिहायला, तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला! इतकं जग पाहूनही प्रेमबीम पण नाही कळत मला! पण....तू तिथे कुस बदललीस कि इथे माझी झोपमोड होते, एवढेच बारीक जाणवते! अन, अवेळी उठून मी एक हात कठड्यावर ठेऊन उभा राहतो गॅलरीत कुणी हाक मारेपर्यंत.....!

तिथली दिवाळी.....

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 09/11/2015 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
तिथली दिवाळी..... तीरकामठा रंगीत कागद चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का? पहाट झोपेत हळूच उठवून घमघमणारी आंघोळ घालून, फुलबाजांची हजार फुले परत हातात ठेवशील का? रांगोळीतील हुकले ठिपके रेषांमधील नाजूक वळणे, तुळशीमाईचे लगीन लटके परत दणक्यात लावशील का? किणकिण बांगड्या काचेच्या घिरघीर झालरी पोरींच्या! सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या परत उडवण्या येशील का? तिथली दिवाळी धमाल मजा इथली दिवाळी शांत सजा!! आठवणींचे व्याकुळ दिवे परत घरी पोचतील का?

चालत राहू......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 20/10/2015 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
रेषांसंगे चालत आलो, रेषांसोबत चालत राहू, गति नाही, स्थिती नाही, केवळ लय, चालत राहू. उठल्यावरती सूर्य नाही, थकल्यावरती चंद्र नाही कुठला देश, कुठले घरटे, आपली कुडी, चालत राहू. जंजाळाशी रडणे नाही, गुंत्यापाशी थटणे नाही, कोण आले, कोण गेले, कुणी न उरले, चालत राहू. दार लोटले अंधार नाही, दार उघडले प्रकाश नाही, आला दिवस, गेला दिवस, आत्ताचा क्षण, चालत राहू. नाव उलटली आक्रोश नाही, नाव तरली जल्लोष नाही, कुठली लाट, कुठली वाट, आपला किनारा, चालत राहू.

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

चिंब

लेखक अर्व यांनी बुधवार, 20/05/2015 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस झरला कितीदा माझ्या अंगणात मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... पाउस बरसे वरवर पोहचत आत नाही नेईल काळजासी तो तुझा हात नाही एकटाच सोडलीस तु भरल्या संसारात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... उबदार त्या मिठीचा आता ज्वार नाही ईथे श्रावणाला आता धार नाही किती सरी जळाल्या वणवा वादळात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... मी एकला कुठेसा बाकावरी विसावे.. क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे... कमरेत वाकलेला वड उभा अंगणात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... कवी : अर्व ( निशांत तेंडोलकर..)
काव्यरस

(सुचत नाही....)

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 08/05/2015 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा माझा चंद्र आज थांबला आकाशी कसा जाऊ स्वागताला , भिजलेली उशी... तुझ्या माझ्या पावसाने अबोला धरला कसे सांगू जीवनाचा मेघ हरवला... तुझी माझी जाई पाणी असून सुकली कुणी नाही पुसायला मायेने खुशाली... तुझ्या माझ्या वाटेवर माजलेले रान उजाड त्या माळरानी जाय आता कोण ... सखी गेली अर्ध्यावरी सोडूनिया साथ नाव "साफल्य" घराला, वाटतसे व्यर्थ .
काव्यरस

विश्वास वासावरचा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 06/05/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या