अंबाडा

अंधाराचा अन पहाटेचा तो बंध हळवा सोडला पैलतीरावर त्या घाटावर कुणी अंबाडा सोडला? प्रतिमा मोहक ती अर्पण पाण्याचे त्या होई दर्पण स्पर्शाविना शिरशिरीचा कुणी तरंग लहरता सोडला? दवांसोबत हलके निजेतून बाग पाहते डोकावून दहादिशांना बहकवणारा कुणी गंध नाशिला सोडला? ना अजून भैरवी निजली ना अजून भूपाळी उठली क्षितीजावर सकवार सुरांचा कुणी राग मारवा सोडला? अंधाराचा अन पहाटेचा तो बंध हळवा सोडला पैलतीरावर त्या घाटावर कुणी अंबाडा सोडला? - संदीप चांदणे

हे काय कमी काय?

उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं! वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून घरी परततात माणसं, हे काय कमी काय? सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय? सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय? भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव! मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय? उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

बाय

लेखनविषय:
सकाळी लगबगं भाकऱ्या चुलीवरं धुराड्यात खोकते ही कैदाशिनं. सडा सारवनं धारोष्ण दुध न्हावुन झाली ही अवदसा. धनी शेतावरं हंबरते वासरु भारा ऊचलाया ही सटवायी. पाखरु आभाळी झळुनिया ऊनं फिरे रानोमाळी ही जोगतीनं. आवसं पुनवं संसार सुखाचा माहेरची ओढ रूते काळजातं.

आवर्त

लेखनविषय:
काव्यरस
माझ्या चरचरीत पंज्याला सुखावणारा तुझा चिमुकला मऊसूत तळवा तुला भान देखील नाही बोचऱ्या स्पर्शाचे गाढ झोपेत मंद हसरा तुझा चेहरा इकडे प्रेम आणि तिकडे आधार यांच्या आश्वासक सोबतीत विसावलाय, दिवसभराचे उनाडणे विसरून तुझ्या निर्व्याज निजेची गुंगी मलाही चढू लागली आहे हळूहळू खूप वर्षापूर्वी माझ्या शेजारी अशीच होती शांत निजलेली दोन छोटी पाउले. मला टक्क जागे ठेवून माझी शर्यत सुरू झाली होती त्यांना जिंकविण्याची ती कोमल पाउले, हजारो मैलांचा प्रवास समोर होता त्यांच्या त्यांना बळ देऊ शकणार कां मी? दिशा कशी दाखविणार? कुठे भरकटणार नाहीत नां ती? बिन उत्तराचे प्रश्न पांघरून मी तळमळत, चिमुकली दोन पाउले अ

तू इथे असतीस तर....!

विविधभारतीच्या 'आपकी फर्माईश' मधली 'काही' गाणी इच्छा नसताना ऐकणे; त्यात मध्यरात्री हे कुत्र्यांचे भुंकणे; सर्व बाजूंनी गुणगुणना-या डासांची 'अ'मानवी ठरावी अशीच कत्तल करीत बसणे; मध्येच, बाहेरच्या रस्त्यावर, एखाद्या गाडीच्या चाकाला खड्ड्यात डोकावून पाहताना 'ब्रेक' नावाच्या सद्गृहस्थाने हासडलेली शिवी; अचानक लक्ष वेधून घेत पायाकडील भिंतीवरून सरसरत, जणू 'बोल्ट'चा १०० मीं चा विक्रम मोडीत आडोशाला गडप होणारी पाल; विनाकारण! फक्त त्रास द्यायच्या हेतूनेच, विचारलेलं नसतानाही, प्रत्येक सेकंदाला ओरडून वेळ सांगणारं घड्याळ; काय हिंमत होती या सा-यांची, मला त्रास द्यायची..... ....तू इथे असतीस तर....!

गंड मार्गदर्शन काव्य- मार्फत प्रेरणा दायी हम्मा (आम्ही प्रेरणा देतो :) )

कामधेनु दावणं सोडून केव्हाच गेली काळाच्या पडद्याआड गोठाही केव्हाच गेला न पळी राहिलीए ना पंचपात्र किणकीणाट होतो कधीतरी कुठे कुठे रिकामा किणकीणाट करणारे,तेवढेच त्यांच्या नावे नुसताच टाहो फोडणारे संपत आलेल्या किणकीणाटाला खणखणाट समजून अथवा भासवून उगाच खडे फोडतात कधी कधी शिळ्याकढीला ऊत आणून कधी सत्तेच्या आशेने कधी कल्पवृक्ष मिळवून देण्याच्या मृगजळी स्वप्नाने कधी कामधेनू आपल्याही गोठ्यातून निघून गेली या दु:खाने त्यांनी इतिहासाच्या अभिमानाची रेष जेवढी फुगवून दाखवीली बरोबरीस अन्यायाची रेष तेवढीच फुगवून दाखवतो पण मूळ रेषेत फुगवटा होता हे मी विसरूनच जातो. ते इतिहासात आहेत याचं रडगाण मी गातो पण

हलले "दु"कान

लेखनविषय:

हलले "दु"कान

गर्धभरास नवतज्ञाची फक्क्ड खाशी, वरवर करू रंग-रंगोटी ! राजदरबारी अन शासन्काठी जातीवीण का मिळे लंगोटी ?!! सुग्रासान्नाची मिळता थाळी, लाथाळू करंटे सत्वर ! मिरवावी ओकारी त्रिकाळी, नको दाद नको ढेकर ! द्वादशबुद्धी जाणता मर्दा! बाकी फुटकळ चिल्लर खुर्दा! दुष्काळाची साधून संधी! पित्यांची भरपूर चांदी ! जलशिवाराची येता उग्वण, मारूया मुजोर चौका आपुला व्याही त्यालाच ठेका ! द्वाड देव्याची अजब शिकवण, अड्वा फकस्त पाणी, कसली पोळी कसले शिकरण ! दिव्यमराठीची पळवून लाटी ! जिथे तिथे हळूच वाटी ! भाजे पापड कुर्रम्कुर्रम ! मिळता थापड भुर्रभुर्रम !

किती भाग्यवान आम्ही!

किती भाग्यवान आम्ही, आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले! किती गंडलो आम्ही! मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही, 'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले! उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक! नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच, छातीठोकपणे सांगावेच कुणी! आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या... नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत, असे पाय दाखवावेतच कुणी! प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत? 'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही असा त्रिशंकू भेटावाच कधी! किती भाग्यवान आम्ही, आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!

हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...

लेखनविषय:
पेरणा वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा... निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा.. टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा.. दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा... मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे... हम्माऽऽऽ ...
Subscribe to कविता माझी