जमलंच तूला तर....!!

लेखनविषय:
जमलंच तुला...... तर जमलंच तुला...... तर करुण दू: खानं ओथंबलेल्या डोळ्यांना धागा (सुखाचा) दे विसावण्यासाठी या लोकशाहीला थोड़ी जागा दे प्रसवण्यासाठी त्यामुळं उघड्यावर होणारे तिचे प्रसव टळतील नाहीतर उगाच लोक बड़बड़तील काहीही अन कुठेही ? जमलंच तुला...... तर कान फूंक त्या बलातकाय्रांचे दे पाणी त्यांना मर्दानी कर्तुत्वाचं ! एरवी गंज चढलाय त्यांच्या माणूसपणाला पौरुषत्वाची एक ठिणगी असते कायम पण तीही पेट घेते फ़क्त वासनेच्या वाय्रानेच त्यांचा पुरुषार्थ शोभून दिसतो टेबलावरच्या कागदी फुलांच्या ताटव्यांत अगदी गुबगुबीत, गुलाबासारखा ना गंध, ना वास! फूल आहे, तेवढा भास ! जमलंच तुला......

टीव्ही वरची धूळ

लेखनविषय:
काव्यरस
टीव्ही वरची धूळ नेहमीच्या भांडणाला कारण मिळाल पण देव-दयेने त्याच टीव्हीतल्या सासू-सुना योग्यवेळी भांडल्या अन त्या रोजच्या भांडणात आमच भांडण विरलं तीच वाढत वजन आमच्या भांडणाला पुन्हा एक कारण बनल पण त्याच वेळी पिझ्झा हट वाल्यांची फ्री होम डिलिव्हरी मी स्मरली अन आमच भांडण विरलं फिरायला जाऊया म्हणे गमतीत गाडी पेट्रोल पंपावर टाकली नेहमीचं भांडणाला कारण बनलं अन त्याच वेळी नेमका गाडीनी ड्रायचा दिवा लावला त्या क्षीण प्रकाशात आमच भांडण विरलं आमच्या भांडणाच सदाहरित कारण तिच्या दिसण्यावर मी दिलेली कॉमेंट पुन्हा एकदा कारण बनल पण नेमका त्याच वेळी आय सर्जन मित्राचा फोन यावा तिच्या

जगावेगळी ती

लेखनविषय:
काव्यरस
जगावेगळी ती स्वप्न असतो एक अजोडसा ठेवा कोणत्याही क्षणी आठवणीला एकटे सुटू देत नाही स्वप्नांचे असते सगळ्यांशीच सख्य हा आपला अन तो परका असा भेदभाव तिथे होत नाही 'ती' हा व्यक्तिविशेष कोणी न कोणी प्रत्येकच तरुणाच्या स्वप्नात असेल तरीही कवितेत सही पण 'माझी ती' वेगळीच वाटो या अट्टाहासाला अजिबात तळ मिळत नसेल प्रेम हि कल्पना प्रत्येकच जण अनुभवतो हातात हात घेऊन नशिबाशी भांडाया बघतो पण 'जिचा' हात 'माझ्या' हातात आहे तीच जगावेगळी या अन यासम मान्यतेला अजिबातच अंत नसतो वेगळेपणा तिचा कुठे नि कसा स्मरावा??

जुळयांचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

जुळयाचे नव्हे जुळ(व्)लेले दुखणे

जुळे १: सासं नसूनही तबला तू सकल मिपाचा झमेला तू धाग्यवरील सैरभैर (चि)चुंद्र अन्... सुप्त बोक्याची जागा तू मोकळाढाकळा रांगडा तू रे सुमडीत सोपान डोम ही तू ज्वर धाग्याचे आरोळी कधी तू कधी फसलेली चारोळी तू मिपात असूनही..

म्हणता म्हणता ......

लेखनविषय:
काहीच नाही म्हणता म्हणता चंद्राभवती पडले खळे, खळेच पडले इतके सुंदर चंद्र दिसेना त्यानंतर! काहीच नाही म्हणता म्हणता चाफ्याभवती पान उमटले पानच इतके गर्भरेशमी, फूल दिसेना त्यानंतर! काहीच नाही म्हणता म्हणता बागेभवती जडली माया माया इतकी गर्दसावळी बाग दिसेना त्यानंतर! काहीच नाही, काहीच नाही कशी म्हणू मी यानंतर? तव श्वासांचे गान ऐकते इथले तिथले मिळून अंतर!

प्रेमाचा वर्षाव

लेखनविषय:
काव्यरस
व्याकूळ चातक विरही मीरा दग्ध धरती भूक बळीची. आसुसलेल्या डोळ्यांना एकच आस प्रेमाचा वर्षाव.

तिला काट्यात घर सापडले

लेखनविषय:
काव्यरस
तिला काट्यात घर सापडले बाभळ तिथे गवसतो म्हणे... गिधाडांची काळी ज्वाला सतत असतो लचक्याचा घाला.... तिचा आत्मा गुहेत अडकून राहिला काळ सरून देऊळ पडून गेला... तिने हाती मग फुल उजळले त्यात आत्मीक अत्तर गवसले… सोडविना तो गंध नेई चंद्रापलीकडे तेथे असतो राणा सांगती सगळे…. ती निघाली लाटेच्या हाकेवरती जो घेऊन गेला कमळ डोईवरती… तिच्यात आला निघून काळ आडोश्याला पाझर फुटला चंद्र माखला आज वसुंधरेला…

ll गंगास्मरण ll

सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो. (जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे! तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती तू कल्याणी, नीरदायिनी तुलाच नमितो सांबसदाशिव, हरहर गंगे तुलाच स्मरती भगिरथाचे पुत्र चिरंजीव प्रकटयोगिनी बिकटगामिनी तुझ्या तटाचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या किनारी शांत निमाले प्रयागसंगम अलख निरंजन तुझ्यात फिरते चक्र चिरंतन विशालसुंदर तरल निरंतर तुझ्यात विरते माझे अ

तुकारामा-

लेखनविषय:
तुकारामा, तुझ्यावाचून जगाचे काय अडले होते? -तरी इंद्रायणी काठी प्राण तुझे भिडले होते? नसतास तरी सुखेनैव आम्ही गजर केला असता तुझ्यावाचून विठूराया बेवारस मेला नसता कशासाठी आकांताचा एवढा धरला होता सोस? पंढरीचा वाडा काही अगदीच पडला नव्हता ओस टाळ वाजत होते, पखवाज नित्य दंगा करीत होता.. कशासाठी वाळवंटात तूच उर भरत होता? माहित नाही? ज्ञानोबाला आळंदीत गाडले होते! नामा फिरून आला देश, तरी पायरीत चिणले होते! चोखोबाच्या अंगावरती वेस पडली, हाडे उरली... एका जनार्दनी काया गोदावरीत होती बुडली... कुणी परागंदा झाले अंगावरती विजा झेलून खरे वाटले?.....

|| सांगा आता आम्ही काय करायचं? ||

लेखनविषय:
काव्यरस
कॉलेजला जाण्यासाठी बस stop वर तीन बस ची वाट बघत थांबायचं, थोड्याच अंतरावर आम्ही नुस्त तिच्याकड बघत थांबायचं. बस आल्यावर तीन पटकन बस मधी चढायच, तिच्याकड बघण्याच्या नादात आम्ही आपल सगळ्यात शेवटी बस मधी चढायच. आता मुलगी असल्या मुळ तिला बसायला जागा कुणीपण द्यायचं, आम्हाला आपल उभच रहाव लागायचं. सांगा आता आम्ही काय करायचं? बस स्टोपवर उतरल्यावर मैत्रिणींसोबत तीन कॉलेज कड निघायचं, आम्हीपण उगाचच आपल तिच्या मग मग जायचं. जाताना वळून तीन आमच्याकड बघायचं, हळूच मैत्रिणींच्या कानात आमच्याविषयी काहीतरी सांगायचं, त्या मैत्रिणीनीसुधा आमच्याकड बघून हसायचं, हासत हासत त्यांनी वर्गात सुद्धा निघून जायचं. सांगा आता
Subscribe to कविता माझी