उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!
वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून
घरी परततात माणसं, हे काय कमी काय?
सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा
नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय?
सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता
पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय?
भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव!
मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय?
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!
काव्यरस
वाचने
4466
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
चटका लावला.
फारच छान.. आवडली.
भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव!
नाव वाचूनच धागा ओपन करतो. आणि
+१
In reply to नाव वाचूनच धागा ओपन करतो. आणि by मांत्रिक
मांत्रिक.
In reply to नाव वाचूनच धागा ओपन करतो. आणि by मांत्रिक
अहो धन्यवाद आम्हीच देतो! इतकं
In reply to मांत्रिक. by शिव कन्या
सुरेख
खूप छान!
मस्त...
सुंदर!!!!
सुरेख! खूप आवडली.
कमालीची आवडली! काही ओळी तर