मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता माझी

स्वप्नातली शामली

दिनु गवळी ·
तुझी आठवण आता येतच नाही , समजावलय मी या वेड्या मनाला. पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे, पण या काळजावर दगड ठेवला .. तुझा तो हसरा चेहरा खरच खुप आवडत होता ग मला , मग का नकार दिलास तु या वेड्या जीवाला. तुझ्या डोळ्यातील ती काजळ मला क्षणात घायाळ करायची सखे. पण हळुहळु ती काजळ फिकी पडली. आता तुला माझी नजर नाही शोधणार .. कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार. तुझ्या विना खरचं मी काहीच नाही . पण आता अस वाटतय मी एकटा आहे हेच बरं आहे. तु माझी मी तुझा हे आता होणे अशक्यच आहे. ( स्वप्नातली शामली)

गेले मोदी कुणीकडे

anilchembur ·
स्वप्नांचा पाऊस पडे सारखा महागाईलाही पूर चढे विमान उडवीत चहूकडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे शिक्षण खोटे पदवी खोटी मंत्रीणबाई तुळशी झाली केजरीवालची पडता बिजली दचकून तीचा ऊर उडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे पैसा काळा आणू म्हणुनी ठोकूनी भाषण दाही दिशांनी चाय - गाय पे चर्चा करूनी मनकी बाता देश बुडे , गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे चीनमध्ये झोपाळ्यावरुनी दाढीवाले बिंब बघूनी हसता संघ भगव्या रानी धर्म अफूचे ऊन पडे गं बाई ....

समरस व्हावे ऐसे

चांदणे संदीप ·
थांबल्या पळी या प्रेमाच्या क्षण एक तू डोळ्यांत पहा कृत्रीमतेचा उतरवून साज रेशमी मिठीत सजून पहा दे शब्दांना आधार तुझ्या गंधीत मौनाच्या साथीचा दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे थरथरत्या हळव्या अधरांचा शीतल छाया, मी घनदाट तरू तू वळणारी खळखळ सरिता मी एक डोलता प्राण अचल तुज पाहून, अविचल वाहता मी धागा अतूट प्रितीचा तू फूल एक नाजूकसे गुंफता प्रित, गुंतता हृदय प्रेममाला सुरेख शोभतसे परिणीती, धुंद श्वासांची लयदार काव्यात व्हावी सूर जुळता ही तमवसने कोमल स्वरात न्हावी मी स्वत:स विसरून जावे तू असे मला निरखावे डोळ्यांनी तन्मयतेने मग युगल गीत गावे संकोच मनी, भारल्या क्षणी ना स्पर्शे उभय चित्तांशी तू अवघी तुल

नाडलेल्या लोकांची कहाणी .............

माम्लेदारचा पन्खा ·
मागून मागून थकलेली माणसं आली कोणी , उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी ला ला ला ला , ला ..ला ला गेलेच आहेत पैसे आता खिशात काही नाही पैसे कुणा मागू आता मला कोण देई बडबडत बसतो सारखा गेले पैसे पाण्यात व्याज गेले माझे तरी मुद्दल द्या हातात सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ..... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला....

असा कसा काळ आला

gsjendra ·
लेखनविषय:
काव्यरस
असा कसा काळ आला बापाआधी बाळ गेला असा कसा काळ आला धर्माच्या नावाखाली घोळ साला असा कसा काळ आला खरं बोलणारा वाळ झाला असा कसा काळ आला काळा कावळा शहाळं प्याला असा कसा काळ आला गाढवाच्या गळ्यात माळ घाला असा कसा काळ आला पैसा जगण्याचं मूळ झाला असा कसा काळ आला माणूसच कूठे गहाळ झाला भोसले जी.डी. आत्मशोध काव्यसंग्रह

बीज

gsjendra ·
लेखनविषय:
काव्यरस
ज्या बीजाला अंकूरायचे असते प्रसवायचे असते ते पाहत नाही तापमान किती डिग्री हवेत आर्द्रता किती पावसाची काही शक्यता वा मातीचा ओलसरपणा ते मातीत ढेकळात खडकाच्या फटीत इवल्या पालवीने उभारते अस्तित्वाची दखल आपल्या जगाला घ्यायला लावते भोसले जी.डी. आत्मशोध काव्यसंग्रह

येते आठवण अधून -मधून ....

अविनाश लोंढे. ·
लेखनविषय:
काव्यरस
येते आठवण अधून -मधून , पहिल्या भेटीची , तहानलेल्या स्पर्शाची , तुझ्या नाजूक हातांची , अन त्यावर कोरलेल्या स्वप्नांची … येते आठवण अधून -मधून , पहिल्या चुंबनाची , निसटलेल्या ओठांची , तुझ्या डोळ्यातील आसवांची , अन एकाचवेळी बघितलेल्या चंद्राची ….

मी अश्व!!

चांदणे संदीप ·
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित! वेग अफाट शक्ती अचाट अंगी डौल मोल अमोल निष्ठा घोर इतिहास थोर करारी बाणा सखा महाराणा बनता दळ सैन्या बळ आजीचे कथन पऱ्यांचे वाहन नीज गहाण वया परिमाण लौकिकी मती प्राणी जगती अडीच पावली चौसष्ठ आलयी पौरुष नामांकन दिव्य आभूषण मिळता सात तिमिरा मात ऋणी विश्व मी अश्व!! - संदीप चांदणे

चिरंतन भेट

मनमेघ ·
लेखनविषय:
काव्यरस
तिच्या मिठीचा गर्भरेशमी पोत छळे । नकळत कंठी मौनाचा अन् सूर जुळे ।। तिचे मौनही पल्याड देशी दरवळते । अल्याड देशी एकांताचे निळे तळे ।। दिशा भिन्न जरि, उरी असोशी पाझरते । ओझरती दिसतात डोळियांतील जळे ।। कुणा न कळते मौनाचे तारुण्य असे । क्वचित् कधितरी गाण्याचा त्या सूर गळे ।। तिच्या नि माझ्या मौनाला व्यापेल असा । तानपुरा होऊन सारखा चंद्र जळे ।। चिरंजीव ती मिठी, चिरंतन भेट तिची अंशात्मक ती अंशात्मक मज, पूर्ण मिळे ।। -चैतन्य