मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता माझी

कन्या मानव्याची

gsjendra ·
लेखनविषय:
काव्यरस
मी अधीर मी बधीर मी रुधिर सबंध विश्वाचे मी स्तन्य मी चैतन्य चिवचिवाट अनन्य घरट्यातल्या चिमण्यांचा मी नागीन मी जोगीण मी वाघीण जगातल्या क्रांतीयूद्धाची मी स्वच्छंद मी अनिर्बंध मी मुक्तगंध अपत्य निसर्गाचे मी मोहिनी मी रोहिणी वंश वाहिनी प्रचंड जगपसर्‍याची मी सौंदर्य मी माधूर्य मी चातूर्य घराचे घरपण गजेंद्र भोसले आत्मशोध (काव्यसंग्रह)

तू फूल कुणाचे देखणे?

शिव कन्या ·
तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! रुजताना होईल अंत नसेल कोणास खंत तू जीव कुणा मायेचा? जा निघून हलक्या पायाने.... तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू..... -शिवकन्या

शब्द

अभिषेक पांचाळ ·
लेखनविषय:
काव्यरस
शब्द , नीट वापरले तर सुख नाहीतर दुःखाचे मूळ नीट वापरले तर शहाणपण नाहीतर नुसतेच खुळ शब्द , नीट वापरले तर आनंद अन् चेहऱ्यावर येणारे हसू नाहीतर सारी दारं बंद अन् नुसतेच वाहणारे आसू शब्द , नीट वापरले तर दोन मनातील दुवा नाहीतर तोंडातून वाहणारी नुसतीच कोरडी हवा शब्द , एक असे औषध जे जोडतं मन नाहीतर तेच तोडण्याचं एकमेव साधन - अभिषेक पांचाळ

झेंडूची फुले

सुधीरन ·
लेखनविषय:
काव्यरस
"दाखिव सखया मजला तू काय ठेविलास लपवुनी? आणिलास गेंद गुलाबाचे बागेतुनी कुठल्या (चोरुनी?) गजरा किंवा आणिलास तू (दहा रुपये खर्चूनी?) आणिलास नभिचे तारे वा तव हस्ताने याच तोडूनी?" "काय करायचे त्या गुलाबांचे सजावटी? काय करावे की गजरा अन तो माळुनी? काय करतेस ते नभीचे तारेच आणि? प्रिये तुजसाठीच 'झेंडूची फुले' आणिली वाचू आस्वादू चल तो काव्य रस चाखू न विसरु ते खाण्या आतिल खोबरे परंतु!"

भूक भागत नाही

अभिषेक पांचाळ ·
लेखनविषय:
काव्यरस
आनंदाच्या क्षणांना , लागते संकटांची नजर दु:खाच्या अंधारात , हासु नसतेच हजर दु:ख करते कहर , येतो अश्रुंचा पुर अगदी समोरुन दिसते , सुख जाताना दुर दाटते दु:खाचे धुके , पुढे रस्ता दिसत नाही नेमके अशाच वेळी , काय करु सुचत नाही सुख गेलय पळुन , त्याला शोधू तरी कसे माझं नशिब किती वेड , खुळ माझ्यावरच हसे माझी अशी स्थिती बघता , देव येतो मग धावून माझ्याकडचं थोड दु:ख , संगे निघतो घेउन एक त्यालाच ती चिंता , माझी दशा पहावत नाही संकटात पडल्यावर मी , माझ्यावर हासत नाही देतो पाठीवर थाप , पुढे लढण्यासाठी देव येतो माझ्यासंगे , घेऊन कृपेची काठी देऊन मायेचा आधार , दु:ख बाजुला तो करतो माझ्याच या जन्मासाठी , पुन्हा

कधी कधी

अभिषेक पांचाळ ·
लेखनविषय:
काव्यरस
वास्तवाला स्विकारुन , स्वप्नांना खोटं म्हणावं लागतं दुःख ठेऊन मनात , जगासमोर हसावं लागतं कधी कधी , स्वतःला विसरून , मनाविरुद्ध वागावं लागतं अपेक्षांचं ओझं , डोक्यावरतीच असतं वाईट काळातच , खरं जग दिसतं तरी दुर्लक्ष करून , सारं विसरावं लागतं कधी कधी , ओळख असून सुद्धा , अनोळखी बनावं लागतं पंख असूनसुद्धा , जमिनीवरच घरटे मोकळे ते आकाश , पाहण्यासाठीच उरते कुवत असलीतरी , पिंजऱ्यातच राहावं लागतं कधी कधी , परिस्थितीपुढेसुद्धा , नतमस्तक व्हावं लागतं देती साऱ्या जगा , ते अल्पायुषी झाले देता देता सारे , जरा घाईत मरून गेले चांगलं देण्यासाठी , अपमानाने भरावं लागतं कधी कधी , अमर होण्यासाठी , क्षणोक्षणी म

बोबडी कविता!

चांदणे संदीप ·
बाबाच्या पोटावर झोपतय एक वेडं पिल्लू तोंडामध्ये अंगठा धरून हसतंय हळू खुदूखुदू! इवल्याशा बोटांच्या इवल्या इवल्या मुठीने ढुशी देत सारख्या सारख्या करतयं बाबाला गुदूगुदू! बा - बा - का - का मध्येच हसू खळखळून बोबड्या बोलांच गाणं एक फिरतंय घरभर दुडूदुडू! - संदीप चांदणे

मी अजून जिंकलो नाही

अभिषेक पांचाळ ·
लेखनविषय:
काव्यरस
म्हणतात ना , अंत भला तो सब भला , हेच खरे . सुरुवातीलाच एखाद्या गोष्टीला वाईट न म्हणनेच बरे वाईट शेवट असेल , तर तो शेवट नाही सुरुवात असेल नवी , एक वाईट अंत नाही शेवट हा नेहमी गोड असतो , वाईट नसते काही सुरुवातीलाच शेवट पाहण्याची , आपण करत असतो घाई हरलास तू , असं कुणी बोलत असेल अपयशाच्या तराजुत , तुला तोलत असेल त्याला जिंकलास तू , असं प्रेमाने सांगावं अभिनंदन करुन , थोडंसं समजावावं म्हणावं , जिंकला आहेस तू , मी हरलो नाही शर्यत संपली नाही , कारण मी अजुन जिंकलो नाही - अभिषेक पांचाळ

आम्ही मनमौजी

सुधीरन ·
लेखनविषय:
आला आला वसंत ऋतु आला नाचुया खेळूया झूला झुलूया आम्ही सारे आहो मनमौजी मजेत आपण सारे फिरुया ।।१।। कशास बाळगू तमा जगाची कशास काळजी आज उद्याची दिवस हा आजचा मजेचा रात्र ही धुंद नशेची ।।२।। तरुण आम्ही नव्या युगाचे भोक्ते सा-या सुखांचे नका पाडू बंधनात आम्हा आम्ही चाहते स्वातंत्र्याचे ।।३।। कमी पडेल धरती ही थिटे पडेल आकाश ही मनात आणता आम्ही रूप पालटू या जगाचे ।।४।।

गरिबाला विचार

अभिषेक पांचाळ ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रत्येकाला वाटतं , संघर्ष म्हणजे माझंच जीवन मान-अपमानाने जळतं , ते फक्त माझंच मन कष्टाची भाकर काय ती फक्त मीच कमावतो आणि कमावलेला पैसाही मीच फक्त गमावतो निदान दोन वेळचं जेवण तुला मिळतं गरिबाला विचार , भुकेविन पोट कसं जळतं ? दुःखाचा डोंगर सतत माझ्याच पाठीवर असतो तरी सुद्धा दोन क्षण मी कसा हसतो देव नेहमी संकटे माझ्याच पदरात टाकतो काही न देता , नुसतं माझ्याकडूनच मागतो हे असं वाटत असेल , तर गरिबाला विचार सुखाचं घर कसं मोडतं ? नुसते डोळेच नाही , तर त्यासोबत मन कसं रडतं ? - अभिषेक पांचाळ