Skip to main content

कविता माझी

मी अश्व!!

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 21/04/2016 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित! वेग अफाट शक्ती अचाट अंगी डौल मोल अमोल निष्ठा घोर इतिहास थोर करारी बाणा सखा महाराणा बनता दळ सैन्या बळ आजीचे कथन पऱ्यांचे वाहन नीज गहाण वया परिमाण लौकिकी मती प्राणी जगती अडीच पावली चौसष्ठ आलयी पौरुष नामांकन दिव्य आभूषण मिळता सात तिमिरा मात ऋणी विश्व मी अश्व!! - संदीप चांदणे

चिरंतन भेट

लेखक मनमेघ यांनी मंगळवार, 19/04/2016 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या मिठीचा गर्भरेशमी पोत छळे । नकळत कंठी मौनाचा अन् सूर जुळे ।। तिचे मौनही पल्याड देशी दरवळते । अल्याड देशी एकांताचे निळे तळे ।। दिशा भिन्न जरि, उरी असोशी पाझरते । ओझरती दिसतात डोळियांतील जळे ।। कुणा न कळते मौनाचे तारुण्य असे । क्वचित् कधितरी गाण्याचा त्या सूर गळे ।। तिच्या नि माझ्या मौनाला व्यापेल असा । तानपुरा होऊन सारखा चंद्र जळे ।। चिरंजीव ती मिठी, चिरंतन भेट तिची अंशात्मक ती अंशात्मक मज, पूर्ण मिळे ।। -चैतन्य
काव्यरस

कन्या मानव्याची

लेखक gsjendra यांनी रविवार, 17/04/2016 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी अधीर मी बधीर मी रुधिर सबंध विश्वाचे मी स्तन्य मी चैतन्य चिवचिवाट अनन्य घरट्यातल्या चिमण्यांचा मी नागीन मी जोगीण मी वाघीण जगातल्या क्रांतीयूद्धाची मी स्वच्छंद मी अनिर्बंध मी मुक्तगंध अपत्य निसर्गाचे मी मोहिनी मी रोहिणी वंश वाहिनी प्रचंड जगपसर्‍याची मी सौंदर्य मी माधूर्य मी चातूर्य घराचे घरपण गजेंद्र भोसले आत्मशोध (काव्यसंग्रह)
काव्यरस

तू फूल कुणाचे देखणे?

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 15/04/2016 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू! तू श्वास फुलांचा हलका जा निघून त्यांच्या देशा! रुजताना होईल अंत नसेल कोणास खंत तू जीव कुणा मायेचा? जा निघून हलक्या पायाने.... तू फूल कुणाचे देखणे? नको उन्हात हासत राहू..... -शिवकन्या

शब्द

लेखक अभिषेक पांचाळ यांनी शनिवार, 09/04/2016 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द , नीट वापरले तर सुख नाहीतर दुःखाचे मूळ नीट वापरले तर शहाणपण नाहीतर नुसतेच खुळ शब्द , नीट वापरले तर आनंद अन् चेहऱ्यावर येणारे हसू नाहीतर सारी दारं बंद अन् नुसतेच वाहणारे आसू शब्द , नीट वापरले तर दोन मनातील दुवा नाहीतर तोंडातून वाहणारी नुसतीच कोरडी हवा शब्द , एक असे औषध जे जोडतं मन नाहीतर तेच तोडण्याचं एकमेव साधन - अभिषेक पांचाळ
काव्यरस

झेंडूची फुले

लेखक सुधीरन यांनी शुक्रवार, 08/04/2016 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
"दाखिव सखया मजला तू काय ठेविलास लपवुनी? आणिलास गेंद गुलाबाचे बागेतुनी कुठल्या (चोरुनी?) गजरा किंवा आणिलास तू (दहा रुपये खर्चूनी?) आणिलास नभिचे तारे वा तव हस्ताने याच तोडूनी?" "काय करायचे त्या गुलाबांचे सजावटी? काय करावे की गजरा अन तो माळुनी? काय करतेस ते नभीचे तारेच आणि? प्रिये तुजसाठीच 'झेंडूची फुले' आणिली वाचू आस्वादू चल तो काव्य रस चाखू न विसरु ते खाण्या आतिल खोबरे परंतु!"
काव्यरस

भूक भागत नाही

लेखक अभिषेक पांचाळ यांनी गुरुवार, 07/04/2016 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदाच्या क्षणांना , लागते संकटांची नजर दु:खाच्या अंधारात , हासु नसतेच हजर दु:ख करते कहर , येतो अश्रुंचा पुर अगदी समोरुन दिसते , सुख जाताना दुर दाटते दु:खाचे धुके , पुढे रस्ता दिसत नाही नेमके अशाच वेळी , काय करु सुचत नाही सुख गेलय पळुन , त्याला शोधू तरी कसे माझं नशिब किती वेड , खुळ माझ्यावरच हसे माझी अशी स्थिती बघता , देव येतो मग धावून माझ्याकडचं थोड दु:ख , संगे निघतो घेउन एक त्यालाच ती चिंता , माझी दशा पहावत नाही संकटात पडल्यावर मी , माझ्यावर हासत नाही देतो पाठीवर थाप , पुढे लढण्यासाठी देव येतो माझ्यासंगे , घेऊन कृपेची काठी देऊन मायेचा आधार , दु:ख बाजुला तो करतो माझ्याच या जन्मासाठी , पुन्हा
काव्यरस

कधी कधी

लेखक अभिषेक पांचाळ यांनी बुधवार, 06/04/2016 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तवाला स्विकारुन , स्वप्नांना खोटं म्हणावं लागतं दुःख ठेऊन मनात , जगासमोर हसावं लागतं कधी कधी , स्वतःला विसरून , मनाविरुद्ध वागावं लागतं अपेक्षांचं ओझं , डोक्यावरतीच असतं वाईट काळातच , खरं जग दिसतं तरी दुर्लक्ष करून , सारं विसरावं लागतं कधी कधी , ओळख असून सुद्धा , अनोळखी बनावं लागतं पंख असूनसुद्धा , जमिनीवरच घरटे मोकळे ते आकाश , पाहण्यासाठीच उरते कुवत असलीतरी , पिंजऱ्यातच राहावं लागतं कधी कधी , परिस्थितीपुढेसुद्धा , नतमस्तक व्हावं लागतं देती साऱ्या जगा , ते अल्पायुषी झाले देता देता सारे , जरा घाईत मरून गेले चांगलं देण्यासाठी , अपमानाने भरावं लागतं कधी कधी , अमर होण्यासाठी , क्षणोक्षणी म
काव्यरस

बोबडी कविता!

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 05/04/2016 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
बाबाच्या पोटावर झोपतय एक वेडं पिल्लू तोंडामध्ये अंगठा धरून हसतंय हळू खुदूखुदू! इवल्याशा बोटांच्या इवल्या इवल्या मुठीने ढुशी देत सारख्या सारख्या करतयं बाबाला गुदूगुदू! बा - बा - का - का मध्येच हसू खळखळून बोबड्या बोलांच गाणं एक फिरतंय घरभर दुडूदुडू! - संदीप चांदणे

मी अजून जिंकलो नाही

लेखक अभिषेक पांचाळ यांनी शनिवार, 02/04/2016 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणतात ना , अंत भला तो सब भला , हेच खरे . सुरुवातीलाच एखाद्या गोष्टीला वाईट न म्हणनेच बरे वाईट शेवट असेल , तर तो शेवट नाही सुरुवात असेल नवी , एक वाईट अंत नाही शेवट हा नेहमी गोड असतो , वाईट नसते काही सुरुवातीलाच शेवट पाहण्याची , आपण करत असतो घाई हरलास तू , असं कुणी बोलत असेल अपयशाच्या तराजुत , तुला तोलत असेल त्याला जिंकलास तू , असं प्रेमाने सांगावं अभिनंदन करुन , थोडंसं समजावावं म्हणावं , जिंकला आहेस तू , मी हरलो नाही शर्यत संपली नाही , कारण मी अजुन जिंकलो नाही - अभिषेक पांचाळ
काव्यरस