Skip to main content

कविता माझी

ठिकरी

राजेंद्र देवी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
ठिकरी पडू दे चांगले दान मिळू दे यशाची शिडी नकोत ते सर्प जागोजागी आयुष्याची सापशिडी सापडू दे लगेचच लपलेले सुख नकोच सापडू दे दुःख आयुष्याचा लपंडाव मिळू दे सुखाचा झेल जिंकेन सर्वदा मी जाऊ दे दुःखाची विकेट आयुष्याच्या सामन्यात पडू दे चांगल्या घरात या देहाची ठिकरी नको होऊ दे स्पर्श या दुर्भाग्याच्या रेषांचा राजेंद्र देवी

व्यथा

राजेंद्र देवी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
व्यथा भावनेचा कोंडमारा घाव जे जिव्हारा कसा आवरू आता आयुष्याचा पसारा सांगू व्यथा कोणाला आहे कोण ऐकणारा कसा आळवू न कळे सुना सुना देव्हारा गुंतलास कोठे तू कोणास उध्धारा व्याकुळले नयन दे दर्शन परमेश्वरा राजेंद्र देवी

साम दाम दंड भेद

राजेंद्र देवी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
साम दाम दंड भेद आमच्या घामाला दाम नाही हे रामा, आता जगण्यात राम नाही किती हि कष्ट केले तरी कनवटीला छदाम नाही नियतीला पण काही ना वाटे परिस्थितीशी साम नाही अहोरात्र धडपडतो पण वेदनेला बाम नाही भरल्या गोकुळात भरकटतो भेटत अजून श्याम नाही गतजन्मीच्या कर्माचा दंड हा ह्यात काही भेद नाही जगण्याशिवाय तरी आता या जगात दुसरे काम नाही राजेंद्र देवी

अनाठाई

सुमित_सौन्देकर यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
निशाचर ह्रिदयाला, जाग या जन्माची जुडली कित्येकदा ही जणू... निद्रेची नशा सारून गेली अबोला थोडासा... आणि निराशेच्या सानिध्यात जगतो दिवस बाकी ... आतल्याआत घुटमळण्यात जातो बेधुंध होता कोणे एके काळी... आपल्याच ठोक्यांसवे आता हरवतो... शोधतो... अनोळखी स्पंदने उजाडता लागतो वेध तारकां परतण्याचा चंद्राच्या प्रकाशात छंद ... सूख वेचण्याचा विरळ होणारे छापिल नाव जपण्याची धडपड जरा कुठे पुसटता रेघ... अवेळी धडधड तिच स्पंदने , श्वासांची घालमेल हवीशी ठोका चुकावा पून्हा एकदा... भेटण्यापूर्वी शेवटाशी

स्वप्न मनाचे

माहीराज यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
काव्यरस
असंख्य स्वप्ने मनी उद्याची पंख जरी हे इवले इवले, ध्येय गाठण्या आतुरलेले हृदयाचे पाऊल कोवळे.. तरूणपणाची चढता झालर मुक्त मनाला बसे ना आवर, स्वप्न कुठे अन मार्ग कुठे उगाच अंगी नसती पावर.. तिशी उलटता भरते अंगण गळ्यात पडते नसते बंधन, सांभाळताना नाती गोती करी स्वप्नांना दुरून वंदन.. वर्षा मागुन वर्षही सरते, स्वप्नांची ती यादच उरते, मुलाबाळांचे स्वप्न उद्याचे पुन्हा नव्याने मनात भरते.. कसले स्वप्न नी कसली आस उगाच मनाचे सारे भास जीवन सुंदर जगण्याचा हा मात्र एक स्वच्छंद प्रवास...           -  महेश नायकुडे

राया...

राजेंद्र देवी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
राया... मखमली मंचकी पसरली, मखमली काया, नका सोडून जाऊ, नका ना जाऊ राया ॥ध्रु॥ करून बसले मंचकी थाट किती दिवस पाहिली वाट उगवेल आता चैत्री पहाट सोनचाफ्याचा सुटेल घमघमाट अत्तराच्या लावल्या या समया नका सोडून जाऊ.... ॥१॥ ल्याले शालू भरजरी देह झाला आज शेवरी ठेवा बाजूला तुम्ही शेला घ्या अलगद कवेत मजला जाईल ज्वानी माझी वाया नका सोडून जाऊ.... ॥२॥ राजेंद्र देवी

मनाचा एकांत - चिमण्या

शिव कन्या यांनी या दिवशी प्रकाशित केले.
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या हा हा करतात या जीवघेण्या ओसाडीत.... कुठे दाणे टिपत असतील? कुठे पाणी शोधत असतील? घरटे कुठल्या आडोशाला असेल? यांच्यात यांचे दफन कसे करत असतील? कोण करत असेल? चिमण्या निमित्त असतात............ आपल्याच छाटलेल्या मनाचे हे तासनतास भिरभिरणे असते..... . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! ---- शिवकन्या

हेमलकसा

राजेंद्र देवी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
हेमलकसा रंजले गांजले आदिवासी जमात त्यांची माडीया लुटुनी त्यांचे अनुदान अधिकाऱ्यांनी बांधल्या माड्या नक्षलवादाचा घेऊन संशय मांडला त्यांचा छळ जन्मताच ज्यांची ठेचली गेली नाळ जगण्यासाठी करती कसबसे मेळ वर्दीतील जनावरे करिती शरीराशी खेळ निबिड अरण्यात शिरला प्रकाशाचा एक कवडसा घेऊन मानवतेचा वसा गाव वसवले हेमलकसा अनाथ प्राण्यांसाठी काढले त्यांनी निवास बनले प्राणिमित्र गौरविले त्यांस भारतरत्न सहकारी भेटले सारे होते ध्येयाने भारलेली सहचरी पण अद्वितीय भुवरी देवमाणसे पेरलेली राजेंद्र देवी

श्वास...

राजेंद्र देवी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
श्वास... जीर्ण झाली सारी पाने आता हवा एक देठ नवा तिच फुले अन तेच वारे आता हवा गंध नवा सावल्यांनी घेरले आहे आता हवा एक सूर्य नवा ओशटलेली सारी नाती आता हवा एक बंध नवा जुने झाले श्वास सारे आता हवा एक श्वास नवा राजेंद्र देवी

... असंही होतं ना कधी कधी....

शिव कन्या यांनी या दिवशी प्रकाशित केले.
... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ...