Skip to main content

कविता माझी

श्वास...

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 21/09/2016 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास... जीर्ण झाली सारी पाने आता हवा एक देठ नवा तिच फुले अन तेच वारे आता हवा गंध नवा सावल्यांनी घेरले आहे आता हवा एक सूर्य नवा ओशटलेली सारी नाती आता हवा एक बंध नवा जुने झाले श्वास सारे आता हवा एक श्वास नवा राजेंद्र देवी

... असंही होतं ना कधी कधी....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 17/09/2016 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
... असंही होतं ना कधी कधी.... अंगणातलं सुखाचं बी बहरातली पाखरांची गाणी हरवून जातात कुठंकुठं.... पण मनाचा सर्च कायम असतो दिसलं जरी एखादं पातं हिरवंगार मनातलं मांजर हसतंच कि मजेदार! ... असंही होतं ना कधी कधी.... बियांना कोंब येईपर्यंत आपलाच नसतो पेशन्स ! दु:खाच्या माजणार्या ताणावर आपलाच नसतो कंट्रोल! वैफल्याने सगळंच उकरून फेकून देतो, पण तशा वैराण रानातही एखादे रानफुल हसून बोलतंच कि एखादा निळा पक्षी गिरक्या घेतोच कि! ...

दारी श्रावण दारी साजण....

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 14/09/2016 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
दारी श्रावण दारी साजण.... पाऊस आला पाऊस आला जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सरींवर सरी अशा कोसळल्या डोळ्याच्या कडा ढासळल्या असा काही बरसला श्रावण न्हाऊन निघाली तुझी आठवण रोज खेळते आठवणींची भातुकली वाट पाहते तुझी एकली, तुझी एकली कळलेच नाही कधी ठाकला दारी श्रावण दारी साजण.... राजेंद्र देवी

नाही पुरेसे....

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
नाही पुरेसे.... जगात शर्यती खूप आहेत नाही पुरेसे चपळपण सशांचे नको राहूस आळशी ठेव आदर्श कासवांचे चांगुलपणाचे दाखले नुसते नाही पुरेसे दाखवायचे लाव हातभार तू पण जग हे आसवांचे विझण्यास सूर्य नाही पुरेसे ढग पावसांचे नको राहूस कोरडा ढाळ चार दोन थेंब आसवांचे राजेंद्र देवी

दिशा

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
दिशा स्थापना तुझी करतात गणेशा पण मागत नाहीत बुद्धी हे ईशा धांगडधिंगा अन सैराट वागणे लाज वाटत नाही लवलेशा कोठे चाललो आहोत आपण सारे कधी करणार विचार हे गणेशा तूच कर आता चमत्कार काही थांबव या मानवाच्या विनाशा ढोल, ताशे, डिजे कल्लोळ नुसता फाटून गेले कर्ण या कर्कशा नाही ठेवीत पावित्र्य सणांचे सापडत नाही यांना योग्य दिशा राजेंद्र देवी

मनाचा एकांत - cursor च्या सुईने

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 13/09/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
cursor च्या सुईने inbox मधील पत्रे क्लीक्लिक्लीक्लिकत शेवटी हव्या त्या पत्राशी आल्यावर, अत्तराच्या डोळ्यांनी पहातवाचत, blank page वर नजर खिळवून काय काय लिहून पाठवायचे परत याचे तासनतास जाळे विणतेच कि मन! . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी? शिवकन्या

श्रावणभुल

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणभुल एक शलाका नभास छेदून गेली तुझ्या आगमनाची वर्दी देऊन गेली विचाराने तुझ्या, हृदयी धडधड वाढली जणू ज्वालामुखीने धरणी कंप पावली तुझ्या आगमनाची सारी तयारी झाली मेघांनी सारी सृष्टी न्हाऊन गेली सारे रस्ते सजले फुलांनी श्वासात सारे वास मिसळून गेली ऊन सावलीचे खेळ खेळता श्रावणभुल पण हरखून गेली राजेंद्र देवी

आठवणींचा वसंत

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 13/09/2016 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींचा वसंत वेळी अवेळी भासे मज चाहूल वाजे तुझे पैंजणांविना पाऊल लागताच तुझी चाहूल मम हृदयी भृंगारव झाला आठवणींची पाणगळ झडली फुटली पालवी चैत्राला शोभून दिसते गळ्यात तुझ्या पर्णफुलांची माला संपले बळ पंखातले नाही मिळाले घरटे या पाखराला काय नेणार बरोबर मज पुसशी नेणार मी या आठवणींच्या वसंताला राजेंद्र देवी

मनात असावा सतत श्रावण....

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 12/09/2016 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
मनात असावा सतत श्रावण.... तुझे येणे जणू असते वादळ, ऐनभरातले तुझे बोलणे जणू असते गीत, सुरातले तुझी ओढ असते जणू पाणी, पुरातले तुझे रुसणे असते जणू लटके, प्रेमज्वरातले तुझे लाजणे उधळत असते रंग, गुलाबातले तुझी आठवण येणे असते जणू ऊन, श्रावणातले एवढेच असावे मनात असावा सतत श्रावण जरी दीस असले ग्रीष्मातले..... राजेंद्र देवी

रहाटगाडगं.

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/09/2016 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज जरा निवांत वाटतय.. सीझन संपला म्हणूनंही, आणी पुढचा येणार.. म्हणूनंही.! रहाटगाडगं म्हणतात ना हो या चक्राला? बराच वेळ करकचूsssन फिरल्यावर मग ते शां...त होतं , पुन्हा फिरण्यासाठी...!? हे टळणारं नाही, हे नीट माहित असूनंही स्विकारत नाही मनाला. हे ठिकच. पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला. असं का वाटत नाही? ? ? पॉझिटिव्ह एप्रोचवाले २०० मार्क देतील माझ्या या दुसय्रा भावनेला. ! पण पहिलीचं निराकरण त्यांनाही झटकन सुचायचं नाही, हे माहिती आहे मला! असो... चालायचंच. पाणी वहातं राहिलं पाहिजे. रहाटगाडगं फिरवलं पाहिजे!