मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता माझी

असतं

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
काव्यरस
आयुष्य जरी असलं अवघड खूप काही शिकवत असतं उतरत्या चंद्रकले प्रमाणे जीवन आपलं सरत असत नवी दोस्ती नवं नात जोडणं जरी सोपं असत एकदा जोडल्यानंतर मात्र टिकवणं मोठं कसब असत बघू-करू म्हणता म्हणता आयुष्य सर्रकन सरकत असत  आठवणींचे मोती ओवता ओवता म्हातारपण येत असत सरणावर देह विसावतो तेव्हा जगणं आपलं संपत असतं तिथवर पोहोचण्याआधी मात्र माणूस म्हणून जगायचं असतं ---------- 149

जगणे...!

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो मरता इथे जरासा, थोडा जगून गेलो. ती वेल अमृताची, मीहि तृषार्त होतो गोडीस चाखताना, पुरता भिजून गेलो. लागून आस तेंव्हा, त्या मोहमयं क्षणांची जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो. ते वेड जन्मपंथी, त्याची मनात दाटी भोगावयास त्याला, मी जन्ममृत्यू झालो. ह्या धाडसास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी! मिटताच त्यात अंती, थोडा शिकून गेलो. जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो...... .... अत्रुप्त...

विस्फोट

योगेश कोकरे ·
लेखनविषय:
काव्यरस
खुप भांडावस वाटत , ओरडावसं वाटत, जेव्हा गरिबांवर होतो अन्याय, सत्य बोलणाऱ्याची जीभ कापली जाते, जिथे कष्टाचे पैसे उन्माद झालेली गिधाडं पळवतात, अशी एकेक ठिणगी पडत राहते, ठिणग्यांचा बनतो अग्नीगोल, अग्नी गोलाचा बनतो ज्वालामुखी, हाच ज्वालामुखी घेऊन जाऊ इच्छितो, अन्याय करणारे,भ्रष्टाचारी,गुंड,माफिया,बलात्कारी, आतंकवादी यांच्या समुहामध्ये आणि ब्रम्हाडाची निर्मिती ज्या शक्तिशाली स्फोटाने झाली तितक्याच ताकतीने तो ज्वालामुखी फोडू इच्छितो, भस्म होउदेंत सगळे भाडखाऊ यांच्याबरोबर मी देखील भस्म होउदे कारण त्या स्फोटानंतर होणाऱ्या नवनिर्मितीचे सुख असेल मला, माहितीय मला एकटा नाही लढू शकणार इतक्या हरामी

नाते

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
काव्यरस
शब्दांच्या पलीकडचे जे नाते जुळले होते आदी असे न अंत तयाला ते कालातीत होते जुळले म्हणून होते म्हणू की होते म्हणून जुळले? प्रवाह होते नाते की ते अथांग सागर होते? पृथ्वीच्या गर्भातील अंकुर आकाशी भिडणारे पाखुर फुलातील मकरंद असे की प्रेमातील एक युगुल? ते आहे जोवर अर्थ जीवना जरी असे ते पलीकडले नाते जुळता शब्द थिटे अन् भावनाच खरी मज भासे! -------------

तृप्ती

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
काव्यरस
कंच हिरव्या ओल्या गाली मधुमती फुलांचा बहर फुलवि मोहक धरती आर्जवि हसती घननिळा बरस..मी एक प्यासी क्षितिजावर मग तो ही झुकला शामल देहि कवळुनि तिजला चुंबुन म्हणे त्या गौरीला तुज ओटी माझा अंकुर रुजला नव यौवना ती धरा बहरली अंग अंग कांतिही भरली पर्जन्याच्या सहस्त्र स्पर्शी  नव जन्माने तृप्त जाहली

जग हे मधुशाला

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
जग हे मधुशाला कुणी न येथे भला चांगला, जो तो पेदाड झिंगलेला ज्याची त्याला प्यारी बाटली बाटली तले सखे सौंगडी देशी असो वा विदेशी, प्रिय हो ज्याची त्याला जो तो अपुल्या जागी लुडके नजर न धावे चकण्या पलीकडे गिल्लासातले सारे बेवडे पिवुनी करिती लीला कुणा न माहीत किती ढोसले ते कोठुन आलो ते नच स्मरते उता-याला मन घाबरते, जो आला तो रमला

मनातले माझ्या

Bhagyashri satish vasane ·
लेखनविषय:
काव्यरस
शांत थंड झुळूक आज खुणवते मजं नवं दिशा मनाचे बांध तुटले अश्रृंचा पुर आला नेत्री भान नव्हते जगाचे मन माझे गहिवरले आयुष्याच्या कुठल्यातरी वाटेवर पुन्हा ते रेंगाळले निशब्द मनातल्या वेदना अश्रृंनी व्यक्त होऊ लागल्यात, आठवूनी आईची माया जाग्या झाल्या आठवणी जुन्या भावनांच्या खोल डोहात तरंग उठले कोणते नवे.......? अंधाराच्या मागे धावणारी मी आज आशेचा किरण शोधु लागले.......

समाधान !

खेडूत ·
कविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच ! पण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय? तरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …! *** होती अमुची प्रिया एक ती आमची मंजे कंपनीची सदैव वाटे तिजला कांही नविन करावे प्रतिमासी कधी कनेक्टे हार्ट आमुचे कधी पॉलीस्यां अपडेटवी तसा एकदा सर्व्हे केला 'समाधान सर्वेक्षण' म्हणुनि ! मनात नसता भाग घेउनि सारे प्रतीसादून आले सर्व्हे झाला पटपट आणिक सार निघाले हो झटपट स्वमनिचे निष्कर्ष घेऊनि छान छान पी पी टी सजवून आली हो ऐटीत पुण्याला प्रिया विमानी त्वरित बसून सगळ्यांना गोळा करूनि पोपटपंची झाली करून सगळे आपण कित्ती ह्याप्पी

वाट पहात आहे.....

शिव कन्या ·
त्या पक्ष्याची वाट पहात आहे..... बसेन ते झाड माझे, शिटेन ती फांदी माझी, असले त्याचे आक्रमण नाही! घरटोघरटी माझी पिले माझ्याच पिढ्या, माझेच वंश असली माणुसकी त्याची नाही! मैत्री कधी कुणाशी केली नाही, पण बुडत्या मुंगीसाठी पान टाकायचे विसरला नाही! चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि तोऱ्याने मान फिरवणे नाही! पंखांचे मिटणे केवळ सुंदर जणू मौनाचे शिल्प पुरातन! पाय कधी दिसू नयेत इतके त्याचे असणे प्रगाढ, युगायुगांची पौर्णिमा उजळावी इतके त्याचे पंख सतेज! स्थलांतरावर जगत रहावे इतकी त्याची तकतक नाही, घिरट्या घ्याव्यात एकाच किनाऱ्यावर इतके उड्डाण तोकडे नाही! किनाऱ्या किनाऱ्या

भूतकाळ सुरु होतो...

अज्ञात ·
लेखनविषय:
काव्यरस
मोकळं आकाश मोकळा तो रस्ता सकाळची वेळ कोवळ्या उन्हाचा तो खेळ सदा सडा प्राजक्ताचा त्यांवर राज्य ते दवाचं कंसात काळजी त्या फुलांची बळी जाई पावली नकळत मागे अंगणात वृंदावनं मुंग्या जणू देती पहारे कधी साखर कधी नारळाचे कधी ताट नैवेद्याचे मागे विहीर दगडी अखंड थंडगार त्यात पाणी काठावर शेवाळं सुंदर जणू सांगे विहिरीची कहाणी गोठ्यात जीव काळे हंबरती तहानेने जोरात साखळी सोडता हळूच वाट जाई थेट हौदात त्यात ठप्प-ठप्प आवाज कधी कैऱ्या कधी नारळ कधी पक्षांचा जीर्ण पानांचा असं शांत ते वादळ अश्या ह्या आठवणी आता झाली ती स्वप्न भूतकाळ सुरु होतो वर्तमान ठेऊन गहाण #सशुश्रीके । ८ जून २०१६