हाबिणंदण

आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625 "काण्या तू ? वहिनी कुठाय" या तुझ्या टोकदार प्रश्नानं तु माझ्या पोटाचं मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं टचकन फुटून गेलं, आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालास.. अभिनंदन!!!

धोतर आणि तांब्या

लेखनविषय:
हाति घेतला तांब्या वेळ पहाटेची रेल्वे ट्र्ॅकही पाहतो वाट आमच्या आगमनाची सावरुन बैसोनि धोतर होते सोडलेले अचानक गुडगुड आवाज कानी पडले कालचे जेवण बहुतेक नव्हते पचलेले पण पुन्हा ट्र्ॅकही थरथरताना दिसले रेल्वे मजकडे येताना अखेरीस पाहिले धोतर जीव तांब्यापैकी काय वाचवावे गुंडाळुनि धोतर बाजुस उडि ठोकली त्यांब्याने माझ्या रेल्वेखाली मान दिली उडुनी त्यांब्याने मस्तकाचे चुंबन घेतले त्याचक्षणी शौचालय बांधण्याचे मी ठरवले त्वरेने बाजारात जावोनि नवे तांब्ये आणले नव तांब्यासमवेत शौचालयात आगमन केले आजवर कैकवार धोतर बाहेर सोडले एका अपघाताने शहाणपण आज सुचल

वात्रटिका- अभियान स्वच्छता

लेखनविषय:
आज एक ब्रेकिंग न्यूज पाहिली – दिल्लीत एके ठिकाणी आधी कचरा पसरविला आणि नंतर गाजा-बाज्या सहित तो स्वच्छ केला आधी शुभ्र वस्त्र धारण करावे एक डिझाईनर झाडू आणावे मग मिडीयाला बोलवावे स्मायली फोटो चमकावे. रस्त्यावरी कचरा पसरविला तोची झाडून स्वच्छ केला असा स्वच्छता अभियानाचा नेत्यांनी बोऱ्या वाजविला.

(दोन दिवस मुंबईत गेले,दोन दिल्लीत गेले)

लेखनविषय:
कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून..... (मुळ काव्य : दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे) ------------------------------------------------------ दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच गहाण राहिले कधी झेंडा उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले दरवेळी बंडखोर वळविले असे नाही,पण असेही क्षण आले तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले. भोळ्या जनतेचा विचार हरघडी केला अन नेता झाल

<दबंग>

लेखनविषय:
लिहीतानाच हसायला येत आहे, कारण 'मुद्दाम' लिहितोय. ---दबंग--- हुडहुड दबंग हुडहुड दबंग ये आरोळी थेटरात मग अनेक शिट्ट्या एका वेळी पोलिसाच्या वेशामध्ये सल्लूभाई थेटर फुल्ल प्रेक्षक मुग्ध त्याच्या पायी बघतो पिक्चर बाजूला मी डोके ठेवुनि येते गम्मत मारामारी ऐसी बघुनि मनोरंजना कमी न पडती सल्लूभाई अन भार्येचा हट्टच असता इलाज नाही -------------- -----------

<पतंग>

लेखनविषय:
काव्यरस
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी

काय रे देवा… (संदीप खरे यांची माफी मागून )

लेखनविषय:
आता पुन्हा निवडणुका येणार तेच उमेदवार हात जोडत येणार मग आपण खोटं खोटं हसणार मग मधेच डोक्यात प्रश्न येणार हे आज इथे कशाला येणार ? काय रे देवा.… मग तो पडलेला प्रश्न विचारता नाही येणार मग आम्ही तो गिळणार मग गिळूनही तो पुन्हा विचारावासा वाटणार मग समोरच्या उमेदवाराच्या डोळ्यातही तो दिसणार तो निर्लज्ज असेल तर त्यावर हसणार त्याच्याही मनाला टोचत असेल तर नजर चुकवणार मग नसताच बघितलं तसं तर बरं झालं असतं असं वाटणार आणि ह्या सगळ्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसणार मग त्यावेळी नेमकी दुसरी प्रचारटोळी येणार मग त्यात मागच्या वेळी निवडून दिलेला उमेदवार असणार मग त्याने तेव्हा बरीच आश्वासनं दिलेली

सरडा- काही क्षणिका काही म्हणी

लेखनविषय:
महाराष्ट्रात सरड्यांचे अच्छे दिन आलेले आहे, सरडे या झाडावरून त्या झाडावर उडी मारीत आहे. (१) जेंव्हा त्यांच्या झाडावर होता तेंव्हा सरडा भ्रष्टाचारी होता. जेंव्हा सरडा अमुच्या झाडावर आला आमच्याच सारखा इमानदार झाला. (२) जिभेच्या स्वाद पायी मधुर फळांची मैत्री जोडी. अहंता स्वताची त्यागुनी सरडा झाला रंगनिरपेक्षी. काही म्हणी:
  1. जिथे सरडा, तिथे सत्ता
  2. उंदीर आणि सरडा, बुडते जहाज सोडती
  3. सरडा येई घरा, तोच दिवाळी दसरा
  4. सरड्याचे अनुकरण करा, सत्तेचे सुख भोगा.

मलई!

.........................आत्मूज जिल्बी भांडार......................... जिल्बी क्रमांकः- ............. अशीच!* =)) (*-चे.पु.वर आमच्या-पाठी :p दुर्बिण घेऊन फिरणार्‍या एका मित्राच्या ग्रहास्तव,सदर जिल्बी तळायला :D सोडत आहोत!यथायोग्य आस्वाद घ्यावा. आणि आकारापेक्षा चविशी सलगी साधावी...ही विणम्र विणंती! =)) ..) सदर जिल्बीमधे:- व्यवसायात नविन पडलेल्या,किंवा वर्षानुवर्ष नविनच राहिलेल्या एका विक्रेत्याची कैफियत मांडायचा प्रयत्न केला आहे.

बाबूंचे अच्छे दिन आले

लेखनविषय:
(बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट.
Subscribe to काहीच्या काही कविता