कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून.....
(मुळ काव्य : दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे)
------------------------------------------------------
दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले
हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले
शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली
मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली
जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच गहाण राहिले
कधी झेंडा उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले
दरवेळी बंडखोर वळविले असे नाही,पण असेही क्षण आले
तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.
भोळ्या जनतेचा विचार हरघडी केला अन नेता झालो
पडणारी सीट,कशी जिंकून द्यावी,याच निवडणूकीत शिकलो
झोपडपट्टीतील दादाने इलेक्शनचे धनुष्य छान पेलले
दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले
(बिन खात्याचा मंत्री)
अमोल केळकर
४/११/२०१४
मला इथे भेटा
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2151
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिल्लीची वारी फुकट गेली वाटते
नेमकी !
धन्यवाद अमोल केळकर
विडंबन आवडले
दो आरजू में
सुन्दर
भट्टी जमलिय.