Skip to main content

(दोन दिवस मुंबईत गेले,दोन दिल्लीत गेले)

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 04/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून..... (मुळ काव्य : दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे) ------------------------------------------------------ दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली मंत्रीपदाच्या भरोशावर जिंदगी बर्बाद झाली जे होते माझे चिन्ह , जनतेकडेच गहाण राहिले कधी झेंडा उंचावलेले हात, कलम झालेले पाहिले दरवेळी बंडखोर वळविले असे नाही,पण असेही क्षण आले तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले. भोळ्या जनतेचा विचार हरघडी केला अन नेता झालो पडणारी सीट,कशी जिंकून द्यावी,याच निवडणूकीत शिकलो झोपडपट्टीतील दादाने इलेक्शनचे धनुष्य छान पेलले दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले (बिन खात्याचा मंत्री) अमोल केळकर ४/११/२०१४ मला इथे भेटा
लेखनविषय:

वाचने 2151
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

२००४ मध्ये नवे केंद्र सरकार स्थानापन्न झाल्यावर रामदास आठवले व थोरले साहेब यांच्याबद्दल एकदम फर्मास दोन फुल एक हाफ आले होते. सदर विडंबन वाचून त्याचे स्मरण झाले.

छानजमालि आहे कविता...आवडलि