मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भावकविता

प्रीत धुंदी

ज्योति अळवणी ·
लेखनविषय:
काव्यरस
कैफ होता धुंदीचा... अन् धुंद होती रात ही हवा-हवासा स्पर्श होता... अतृप्त प्रीत बहरली कमनिय तू कामिनी ग अन्.. पुरुरवा मी तुझा चुंबिता ती नयनपुष्पे चंद्रही नाभिचा लाजला ये प्रिये.. नच दूर लोटु मी चकोर तू चांदणी गगन भरल्या चांद राति विरघळू दे तुझ्यात मी

ll गंगास्मरण ll

शिव कन्या ·
सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो. (जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे! तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती तू कल्याणी, नीरदायिनी तुलाच नमितो सांबसदाशिव, हरहर गंगे तुलाच स्मरती भगिरथाचे पुत्र चिरंजीव प्रकटयोगिनी बिकटगामिनी तुझ्या तटाचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या किनारी शांत निमाले प्रयागसंगम अलख निरंजन तुझ्यात फिरते चक्र चिरंतन विशालसुंदर तरल निरंतर तुझ्यात विरते माझे अ

तुकारामा-

शशीभूषण_देशपाण्डे ·
लेखनविषय:
तुकारामा, तुझ्यावाचून जगाचे काय अडले होते? -तरी इंद्रायणी काठी प्राण तुझे भिडले होते? नसतास तरी सुखेनैव आम्ही गजर केला असता तुझ्यावाचून विठूराया बेवारस मेला नसता कशासाठी आकांताचा एवढा धरला होता सोस? पंढरीचा वाडा काही अगदीच पडला नव्हता ओस टाळ वाजत होते, पखवाज नित्य दंगा करीत होता.. कशासाठी वाळवंटात तूच उर भरत होता? माहित नाही? ज्ञानोबाला आळंदीत गाडले होते! नामा फिरून आला देश, तरी पायरीत चिणले होते! चोखोबाच्या अंगावरती वेस पडली, हाडे उरली... एका जनार्दनी काया गोदावरीत होती बुडली... कुणी परागंदा झाले अंगावरती विजा झेलून खरे वाटले?.....

राधा कृष्ण....... जर...

शशीभूषण_देशपाण्डे ·
लेखनविषय:
काव्यरस
"राधा" घननीळा, का अवेळीच तू या राधेला परत भेटला? विराण आता झाले गोकुळ जुना पुराणा कदंब वठला अता न उरली स्वप्नामधली तरल अनामिक धूसर नाती कुठे पाहसी कृष्णा मधुबन भयाण या अवसेच्या राती कालिंदीचे उदासले जळ अता लोपली त्याची खळखळ नि:शब्दाचे पिसाट वारे ठेवून फिरते उरात खळबळ अता न उरल्या काठावरच्या कुरणातिल चरणाऱ्या गायी टपोर त्यांच्या डोळ्या मधली दूर हरवली वत्सल आई तुझ्या करातील सुस्वर मुरली आठवते केवळ प्राचीनता चैतन्याचा सूर हरवूनी फक्त विराणी गाते आता सांग, कशी मग मी तरी येऊ आठवुनी मागिल संमोहन अता कुठे उरला राधेचा तो पूर्वीचा घननिळ मोहन?

अंबाडा

चांदणे संदीप ·
अंधाराचा अन पहाटेचा तो बंध हळवा सोडला पैलतीरावर त्या घाटावर कुणी अंबाडा सोडला? प्रतिमा मोहक ती अर्पण पाण्याचे त्या होई दर्पण स्पर्शाविना शिरशिरीचा कुणी तरंग लहरता सोडला? दवांसोबत हलके निजेतून बाग पाहते डोकावून दहादिशांना बहकवणारा कुणी गंध नाशिला सोडला? ना अजून भैरवी निजली ना अजून भूपाळी उठली क्षितीजावर सकवार सुरांचा कुणी राग मारवा सोडला? अंधाराचा अन पहाटेचा तो बंध हळवा सोडला पैलतीरावर त्या घाटावर कुणी अंबाडा सोडला? - संदीप चांदणे

राधा कृष्ण

शशीभूषण_देशपाण्डे ·
लेखनविषय:
काव्यरस
अजून म्हणती फिरते राधा यमुनेच्या निर्जन काठावर अजून वाटते तिला सख्याच्या ऐकू येतिल मुरलीचे स्वर !! आणिक इकडे तीरावरती लाटा उठती सुन्या सागरी, बुडून गेली भग्न द्वारका जिथे विसर्जित शाम मुरारी!

हे काय कमी काय?

शिव कन्या ·
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं! वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून घरी परततात माणसं, हे काय कमी काय? सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय? सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय? भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव! मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय? उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

वैराग्याकडे पाउले

शेखरमोघे ·
लेखनविषय:
काव्यरस
छंद लावला, जोपासला जोपासला वेल, बाग लावला, फुलवला, वाढवला पक्षी आले, आनंदले, वसले, वाढले सर्वां जसे नंदनवनच मिळाले पण आता … नद्या, तळी, निर्झर आटले, टिपूसभर पाणी मिळेनासे झाले आज जरी पक्षांना उडवून घालवले, अखेरचे बागेत पाणी शिंपले, तरी डोळा टिपूस न आले, हीच का वैराग्याकडे पाउले?

किती भाग्यवान आम्ही!

शिव कन्या ·
किती भाग्यवान आम्ही, आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले! किती गंडलो आम्ही! मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही, 'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले! उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक! नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच, छातीठोकपणे सांगावेच कुणी! आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या... नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत, असे पाय दाखवावेतच कुणी! प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत? 'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही असा त्रिशंकू भेटावाच कधी! किती भाग्यवान आम्ही, आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!

हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...

माहितगार ·
लेखनविषय:
पेरणा वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा... निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा.. टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा.. दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा... मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे... हम्माऽऽऽ ...