सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
2 Sep 2016 - 11:43 pm | रातराणी
कशाला करायचा वेगळा? चिमण्यांना ठेवायचा खायला ;)
2 Sep 2016 - 11:45 pm | रुपी
छान आहे..
माझा एकांत जरा सध्या चांगला जातो यापेक्षा, पण बर्याच प्रमाणात हे खरे आहे.
बाकी, रवा आणि खसखस यापेक्षा राजगिरा आणि खसखस वेगळे करण्याची शिक्षा जास्त असे माझे मत ;)
3 Sep 2016 - 12:05 pm | नीलमोहर
'राजगिरा आणि खसखस वेगळे करण्याची शिक्षा जास्त'
- त्यात वरई ही असली तर, संपलंच मग,
2 Sep 2016 - 11:45 pm | रातराणी
मुक्तक आवडले हेवेसांनलगे :)
3 Sep 2016 - 12:29 am | चलत मुसाफिर
तसेच लाडू केले, साखर मिसळून, तर बरे नाही लागणार का? (एक पाक-अज्ञानी निरागस प्रश्न)
3 Sep 2016 - 7:07 am | शिव कन्या
जरुर! स्वागत आहे.
फक्त लाडवात खसखस किती हे शुद्धीवर आल्यावर की विचारु नका!
खोडसाळ स्मायली!
3 Sep 2016 - 8:21 am | अंतरा आनंद
फारच छान कविता. खरोखर आपण एकटं असताना वागण्यांचे गुंते मनात सोडवत असतो तेव्हा लक्षात येतं की अतिशय सुक्ष्म फरक असतो . :फार पुर्वी 'कगार' म्हणून एक मालिका लागायची. माणसाची परिस्थिती, वेळ या सगळ्याचा परिपां म्हणून घटना घडत असतात. यापैकी काही थोडंही बदललं तर एखादी आधी घटनाही भयानक स्वरूपाच्या अनेक शक्यता पोटात बाळगून असते; या थीमवर आधारीत.
आपलेच विचार काही जनातल्या समजुतींवर तर काही मनाच्या समजुतींवर आधारित असतात. त्यातला फरक ओळखत रहाणं आणि आपलं एखादं वागणं हा कुठल्या विचारांचा परिपाक होता हे समीकरण सोडवण्यात तासन तास जातात.
3 Sep 2016 - 10:57 am | जव्हेरगंज
शीर्षक फक्त 'रवा आणि खसखस' एव्ढेच पाहीजे होत.
सध्याच्या शीर्षकामुळे शेवटचा पंच हुक्लाय.
3 Sep 2016 - 11:06 am | तिमा
एकांतात असताना काय करावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एकांतात असताना लोकांचा कशाला विचार करायचा ?
फक्त आपला आणि आपल्या प्रिय व्यक्तिचा करायचा. म्हणजे लाडु आणि त्यातील बेदाणा वेगळा करायला कष्टही होणार नाहीत.
3 Sep 2016 - 12:38 pm | ज्ञानोबाचे पैजार
खवा आणि खरवस
जेवणात एकत्र खायची
मजा लुटताना
बुभुक्षीत नजरेने,
एकाग्र चित्ताने,
वेचत राहतो मी
ताटातला कणन कण
तासनतास,
.
.
.
दुसरं काय असत
हावरटपणा म्हणजे तरी!
भीमपुत्र
पैजारबुवा,
3 Sep 2016 - 1:21 pm | प्रभास
माऊली माऊली... __/\__
पैजारबुवांच्या प्रतिसादांचा पंखा...
3 Sep 2016 - 1:22 pm | पैसा
=))
3 Sep 2016 - 2:10 pm | अजया
=)))
3 Sep 2016 - 1:16 pm | अविनाशकुलकर्णी
गुढ...आहे
3 Sep 2016 - 1:29 pm | अभ्या..
गूळ आणि खसखस
अकराच्या पटीत मोजायची
शिक्षा भोगताना,
दीनवाण्या नजरेने,
हरवलेल्या वित्ताने,
वेचत राहते मन
लग्नाआधी आणि नंतरचे साम्यभेद
तासनतास,
.
.
.
दुसरं काय असतो
अधिकमास म्हणजे तरी!
अनारसे खाताना (दाताच्या कन्या) करणारा जावई
3 Sep 2016 - 2:22 pm | ज्ञानोबाचे पैजार
अनारश्या बरोबर चांदीचे ताट नव्हते वाटत?
पैजारबुवा,
4 Sep 2016 - 11:40 am | प्रभाकर पेठकर
सतत 'जनमनातील साम्यभेद' शोधत राहिल्याने विचारांमध्ये परिपक्वता येते. हाही फायदाच आहे. मग त्याला शिक्षा का माना? शिक्षण मानूया की. (अर्थात शालेय शिक्षण ही सुद्धा एक शिक्षाच वाटायची, हिंदीत उगीच नाही त्याला 'शिक्षा' म्हणत).
4 Sep 2016 - 3:31 pm | मारवा
छान आहे कविता
किती कमीत कमी शब्द वापरत टोकदार केलेली आहे.