विचार

अंतरंग - भगवद्गीता - भाग २

शीतलउवाच's picture
शीतलउवाच in जनातलं, मनातलं
10 Feb 2022 - 1:32 pm

प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही!

अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले.

संस्कृतीधर्मप्रकटनविचारलेख

"त्या" सिनेमातून आपोआप दिसणारा "तो" काळ

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
22 Jan 2022 - 1:12 pm

"हम आपके है कौन" म्हणजे "नदीया के पार" चा remake हे अनेकांना माहीतच असेल इथं. तो बघताना काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणवल्या. त्यांची इथं नोंद,यादी करतोय. हम आपके है कौन १९९४चा. त्याचे बडजात्या निर्माते (राजश्री प्रॉडक्शन). हा बॉक्स ऑफिसवर सुपर्डुपर हिट असला तरी मुळात ह्याच राजश्री प्रॉडक्शनच्याच १९७०च्या काळात आलेल्या सिनेमाचा रिमेक आहे. तो मूळ सिनेमाही भारतभर गाजला. विशेषत: उत्तर भारतात किंवा इतरत्रही ग्रामीण पार्श्वभूमीच्या कथा,जाणीवांशी जोडून घेणारं पब्लिक जिथं आहे, अशा ठिकाणी. टीनेजरी,नवतरुण दिसणारा "सचिन" त्यात आहे (म्हणजे सध्याचे टि व्ही वरचे "महागुरु").

इतिहाससमाजजीवनमानविचारलेख

सरकार

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
11 Jan 2022 - 7:41 pm

"कुटायस रे ल*ड्या? कार्पोरेशनला ये. 'संगम'ला बसू." सरकारांचा मेसेज.
आता तुम्ही म्हणाल की बरं मग?
तर मग वगैरे काही नाही. सरकार म्हणजे आमचे जुने हितसंबंधी. या शहरात उगवतात अधूनमधून आणि मग काढतात आमची आठवण. आकस्मिक येऊन चकित करण्याची त्यांची पद्धत आहे.
आपणही समजा अशा ऑफरला नाही म्हणत नाही.
अर्थात कामं वगैरे नाचत असतातच पुढ्यात. पण त्याचं काय एवढं..! आख्खं आयुष्य त्यासाठीच पडलेलं आहे..! आज नाही केली तर उद्या करता येतील. किंवा परवा करता येतील.
किंवा करू करू म्हणता येईल.

कथाजीवनमानस्थिरचित्रविचारअनुभवविरंगुळा

*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम*

srahul's picture
srahul in जनातलं, मनातलं
11 Jan 2022 - 3:31 pm

*भारतीय चित्रपटात सर्वप्रथम*
आता पर्यँत जी भारतीय चित्रपटाची वाटचाल झाली त्याला मुकपटा पासून धरलं तर १०० वर्षे पूर्ण होऊन गेली , बोलपटा पासून धरलं तर साधारण ७५ वर्षे पूर्ण होऊन गेली. या काळात प्रतिथयश लोकांनी या क्षेत्रात नवे नवे प्रयोग केले.या अस्थिर व्यवसायात रुळलेली वाट सोडून नवा रस्ता बनवणे हे जोखमीचे काम.पण तरी सुद्धा काही जिद्दी लोकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि तो धोका पत्करला. काही यशस्वी झाले , काही अपयशी झाले. पण या साऱ्या धकाधकीतून आपण जो आजचा सिनेमा पाहतोय तो घडला.
एखादी गोष्ट जेव्हा प्रथम घडते तेव्हा तीन शक्यता असतात

चित्रपटविचार

लक्ष्मणपूर, एक पडाव........३

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
6 Jan 2022 - 3:50 pm

https://www.misalpav.com/node/49710 लक्ष्मणपूर १
https://www.misalpav.com/node/49726/backlinks लक्ष्मणपूर २

चार बाग रेल्वे स्टेशन

चार बाग रेल्वे स्टेशन

नोकरीविचार

शुभेच्छा २०२२

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
2 Jan 2022 - 2:05 pm

या नव्या वर्षात मोरासारखं जगायला शिकायचं. कितीही नितांतसुंदर गोष्ट आपल्याला गवसली तरी त्यावर आपली मालकी अनंतकाळ नाही याचं भान तसंच ठेवायचं. शक्यतो ती मालकी योग्य वेळी आपणहून सोडायची. मोरपीस किती सुंदर असतात! कधी एखादा हाती लागला तर आपण हावरटा सारखे जपून ठेवतो तो ठेवा. मोराकडे तर गुच्छच असतो तशा‌ पिसांचा. त्या मनमोहक पिसाऱ्याचा करायचा तो वापर तोही करतोच. पण नंतर त्या‌ पिसाऱ्याचा गुलाम होत नाही.‌ हिवाळ्याच्या सुरूवातीला सगळे मोरपीस झाडून टाकायला सुरुवात होते. मग निसर्ग अशा निर्लोभी जीवांना 'ते' सौंदर्याचं दान दरवर्षी देतो‌. तुमच्याकडे अशी मोरपंखी माणसं, आठवणी, वस्तू इ.इ. बरंच काही असेल.

मांडणीजीवनमानप्रकटनविचारशुभेच्छा

"८३" च्या निमित्ताने - ८३ च्या आठवणी

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
31 Dec 2021 - 2:46 am

"...इंग्लैंड मे चल रहे विश्वकप के अपने पहले मॅच मे भारत ने वेस्ट इंडिज को हरा दिया है..."

१९८३ च्या जून मधल्या कोणत्यातरी दिवशी संध्याकाळच्या बातम्यांमधे ही बातमी रेडिओवर ऐकली. तोपर्यंत अशी एक काहीतरी टुर्नामेण्ट इंग्लंड मधे होत आहे, त्यातील सामने एका दिवसाचे असतात, त्यांची रेकॉर्ड कसोटी तर सोडाच, पण "फर्स्ट क्लास" मधेही धरली जात नाहीत, भारताने याआधीच्या टुर्नामेन्ट्स मधे फारसे काही केलेले नाही. फास्ट खेळणे वगैरे आपल्याला जमणारे नाही अशा विविध गोष्टी आमच्या गप्पांमधे ऐकल्या होत्या. त्यामुळे काहीतरी नवीन प्रकार आहे इतकेच माहीत होते.

क्रीडाविचार

लिहिणं

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
29 Dec 2021 - 10:04 pm

लिहिणं म्हणजे नेमकं काय आणि मी का लिहितो या प्रश्नांचं उत्तर शोधावसं वाटतं कधी कधी, आणि मी लिहायला घेतो. खरं तर, एवढं सांगून हे लिहिणं संपू शकतं एवढं सोपं आणि सहज आहे, किंवा असायला हवं, लिहिणं!

एकटेपणा ते एकांत अशा प्रवासात सोबत म्हणून असेल कदाचित, लिहिणं मला जवळचं वाटलं. आणि लिखाणाशी झालेली मैत्री व जवळीक जास्त प्रकर्षाने जाणवली. मी पाहिलेलं आणि पाहत असलेलं भोवतालचं विश्व माझ्या शब्दात मांडणं, आठवणींमध्ये रमणं, आणि त्या लिहिणं मला भावलं. खूप काही वाचायचं राहून गेलं, अशी खंतही वाटते, पण जे थोडं फार वाचता आणि वेचता आलं, त्यातून लिहिण्यासाठी ऊर्जा मिळाली.

मांडणीसाहित्यिकप्रकटनविचारलेखमत

मनोनाट्य

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
24 Dec 2021 - 4:37 pm

कशाला त्या सायकियाट्रिस्टच्या डोंबल्यावर पैसे घालायचे? घडा घडा बोलावं. धडाधडा काम करावीत. रिकाम मन सैतानाचे घर. रिकामटेकडेपणातून हे नसते उद्योग सुचतात. तो काय सांगणार? आम्ही जे सांगतो तेच ना! मित्रमंडळींशी, घरच्यांशी शेअर करा, बोला. कामात गुंतवून घ्या! पण फी देउन हेच ऐकल की बरं वाटत. आम्ही सांगितलं तर त्याची किंमत नाही. प्रत्येक गोष्टीवर शंका घेत बसले की मग नस्ते आजार मागे लागतात. हे होतय ते होतयं. लवंग खाल्ली कि उष्णता होती आन वेलची खाल्ली की सर्दी होते. आम्ही बघा! जातो का उठसुट डॉक्टर कडे? आपली रोगप्रतिकार शक्ती असतेच ना! एकदा औषध गोळ्या मागे लागल्या कि घेत बसा आयुष्यभर.

जीवनमानप्रकटनविचार