श्रीगणेशोत्सव - एक ऐतिहासिक कविता
श्रीगणेशोत्सवानिमित्त महात्मा फुले ह्यांचा एक सुप्रसिध्द अखंड
श्रीगणेशोत्सवानिमित्त महात्मा फुले ह्यांचा एक सुप्रसिध्द अखंड
इथल्या वास्तव्यात 'प्लीज, इफ यू डोन्ट माईंड..कॅन आय आस्क यु ए क्वेश्चन?' अशी प्रांजळ आवाजात विनंती करून काही जणांना/जणींना मी काही प्रश्न विचारले. माझा हेतू हा होता की, मानसतज्ञ म्हणून काम करताना अन्य देशांत आणि प्रामुख्याने भारतात वयाची 18 ते 21 वर्षे घालवलेली मुलं/मुली इथे येतात. त्यांना किती आणि कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं? भारतात असणाऱ्या पालकांचा रोल काय असावा..काय नसावा? त्यांच्याकडे पाहणाऱ्या शालेय मित्र-मैत्रिणींपासून, नातेवाईकांचा दृष्टिकोन बदलतो का? हा बदल त्यांना कसा सलतो? इ..इ..
अमेरिकेत अनोळखी माणसे एकमेकांना सुहास्य वदनाने हाय-हॅलो म्हणतात पण ते हवाई सुंदर्यांसारखं नाटकी किंवा बेगडी वाटतं. प्रत्येक अनोळखी व्यक्ती इथे सहजपणे 'कसे आहात' असे विचारते आणि उत्तर देणाराही 'छान..मस्त' असे वापरून गुळगुळीत झालेले खोटे उत्तर चिकटवतो. इथे कामाला किंवा घरकामाला माणसं सहज मिळत नाहीत आणि मिळाली तर ती परवडतीलच असेही नाही. घरातली रोजची भांडी-कपडे अथवा साप्ताहिक कामात घर - गाडीची स्वच्छता स्वतःच करावी लागते. इथल्या लोकांना घरकाम - छंद - नोकरी यातून पुरेसा वेळ मिळत नाही अशी तक्रार ऐकू येते आणि त्याचवेळी इथे वेळ घालवायला आणि एकटेपणावर मात करायला कुत्रं पाळायचा सल्लाही दिला जातो.
शितावरून भाताची परीक्षा करता येते, पण सुगरणीची करता येईलच असं नाही. त्याच धर्तीवर इथं एका भूभागावरून देशाची परीक्षा होऊच शकत नाही. प्रत्यक्ष भारतात ज्याप्रमाणे एका राज्यावरून सार्वत्रिक मत भारताबद्दल करताच येणार नाही. काहीसे तसेच इथेही आहे. अमेरिकेतल्या लोकांनी उत्सुकतेपोटी 'भारतात कुठे राहता?' या प्रश्नाला आम्ही 'सांगली-महाराष्ट्र..10 अवर्स फ्रोॅम मुंबई..बाॅम्बे!' असं सांगितल्यावर 'तुमच्याकडे बर्फ पडतो का?' असा प्रश्न विचारून गार केलं. हिमाचल-काश्मीर-लेह लडाख आणि महाराष्ट्र शेजारीच असल्यासारखे जसं त्यांना वाटू शकतं, तसंच काहीसं आपलेही होते.
इथल्या वास्तव्यात काही एटिकेट्स कानाला खडा लावून पाळायचे असतात...नव्हे ते तुम्हांला पाळावेच लागतात. इथे कुणाकडेही टक लावून पाहता येत नाही. आपल्याकडे काहीजण याला सौंदर्याला दाद देणे म्हणतील, तारुण्याचा सन्मान समजतील पण इथे मात्र देखणं ते कुरूप कुणाकडेही पाहणे त्यांना अवमानकारक वाटते. आपल्याकडे ट्रकच्या मागे सुद्धा 'पहा.. पण प्रेमाने' अशी सूचना मुद्दाम लिहिलेली असते. इथे गाड्यांकडे फार काळ प्रेमाने पाहताच येणार नाही अशा सुसाट स्पीडनं त्या जात असतात. बालिका - ललना - कुमारी - तरुणी - काकू - ताई - माई - आक्का - आजी कुणाकुणाकडेही अन्य स्त्री वर्गानेही पाहणे प्रशस्त नाही.
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.
गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो.
तो – आज काय सुट्टी आहे का?
ते – नाही.
तो – मग कामावर का जात नाही ?
ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ?
तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे….
ते – बरं पुढे ?
तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल….
ते –बरं मग?
तो – मग काय, निवान्त बसता येईल ..
मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय.
प्रस्तावना :
सर्वप्रथम म्हणजे मी काही उच्च शिक्षित गणितज्ञ वगैरे नाहीये, थोडंफार स्टॅटिस्टिक्स शिकलो आहे, अॅप्लाईड मॅथेमॅटिक्स नाही, प्युअर तर नाहीच नाही. ह्या आधी केलेले अन अन ह्यानंतर होणारे सर्व लेखन हे वरवरील आकलनावर आधारित असुन हेच अंतिम सत्य आहे असा काही माझा दावा नाही. कोणी वेल ट्रेन्ड गणितज्ञ यदाकदाचित हे वाचेल अन ह्या अर्धवट ज्ञानाची खिल्ली उडवेल तर त्याला काही ही हरकत नाही.
आम्ही मुलीकडे ज्या भागात राहतोय तिथं खरोखरच केवळ अठरापगड जातीच्या नाही तर अनेक विविध देशांमधून लोक रहायला येतात. इथल्या काही राज्यात तर मूळ अमेरिकन फारच कमी आणि बाहेर देशातून वेगवेगळ्या कारणांसाठी येणारे आणि आता इथेच स्थायिक होऊन इथलेच झालेले रहिवासी नागरिक जास्त आहेत. मेक्सिको - एशिया मधून हे प्रमाण अधिक आहे. त्यातही कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा, न्यूयॉर्क, न्यू जर्सी ह्या राज्यांमध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आहे. इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते की भारतातून येणाऱ्यांचे प्रमाण 6% आहे, तर मेक्सिकन लोकांचे 24% आहे.