विडंबीत अंडे - भाग 1
'विडंबीत अंडे' हा वाक्प्रचार मराठी भाषेला अर्पण करणार्या समस्त गुरुजनांना म्हणजे मला स्वतःलाच कोपरापासून नमस्कार करून ह्या लेखमालेतील पहिले ख्याल आपल्यासमोर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
'विडंबीत अंडे' हा वाक्प्रचार मराठी भाषेला अर्पण करणार्या समस्त गुरुजनांना म्हणजे मला स्वतःलाच कोपरापासून नमस्कार करून ह्या लेखमालेतील पहिले ख्याल आपल्यासमोर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
काल: क्रीडति (भाग १) - आठवड्याचे सात दिवस.
आठवड्याच्या सात दिवसांची व्यवस्था आहे तशी का आहे ह्याचा विचार करायला कोणी कधी थांबतो काय? रविवारनंतर सोमवार, त्यानंतर मंगळवार इत्यादि सात दिवसांच्या परंपरेचे रहाटगाडगे आपल्या विचारांचा इतका अविभाज्य भाग झाले आहे की आहे ते तसे का आहे हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे हेहि आपणास सुचत नाही. आठवड्यात दिवस सात का, रविवारनंतर सोमवार यावा, सोमवारनंतर मंगळवार यावा ही व्यवस्था कोणी, कधी आणि कोठे निर्माण केली असे प्रश्न विचार केल्यास निर्माण होतात. ह्या प्रश्नांची उत्तरे, मला माहीत आहेत तशी, देण्याचा प्रयत्न ह्या लेखामध्ये केला आहे.
'दवणीय अंडे' हा वाक्प्रचार मराठी भाषेला अर्पण करणार्या समस्त गुरुजनांच्या उलट्या पायांना कोपरापासून नमस्कार करून ह्या लेखमालेतील पहिले अंडे आपल्यासमोर घालताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
अंडे १ले - एक कॉल स्वतःला
- डॉ. सुधीर रा. देवरे
(साडेपाच वर्षातून पहिल्यांदा एक ब्लॉग वेळेवर ठरलेल्या दिवशी देता आला नाही. 15-10-2017 पासूनचा पंधरवाडा खाडा गेला.)
“काही तरीच बरका ! तुमच वय ९० वर्षे असणे शक्यच नाही”, रामा धनगराला मध्येच थांबवत मी जरा मिश्किलपणे म्हंटले. त्यावर रामा धनगर थोडा थबकला. आता त्याच्या पुढे प्रश्न होता की कस काय पटवुन द्यायचे की त्याचे वय ९० ची आसपासच आहे असे.
आजपासून सुरू झालेल्या तुलसी विवाहासाठी मी खालील कविता लिहिली आहे...
||तुलसी विवाह ||
चला चला रे आता होऊया
सोहळ्यात रे मग्न
वाद्ये वाजवू नाचू गाऊ
असे हे तुळशीचे लग्न ||धृ ||
जालंदर दैत्य मातला
सुरगण करिती त्यासवे युद्ध
वृंदा भार्या त्याची असे ही
पतिव्रता अन् शरीरशुद्ध ||१ ||
जालंधर रूप घेऊनी श्रीहरी
नष्ट करी तिच्या पातिव्रत्यासी
दैत्य संहारी हरी वदे वृंदे
होशील तू पृथ्वीवरी तुळशी ||२ ||
काय लिहावे तुझ्याचसाठी, मी घेऊन कागद तयार आहे
असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे विचार आहे!
असेच होते हरेक वेळी, लिहायचे तर बरेच असते
चंद्र, तारे, नदी, कालवे सामावयाचे सारेच असते!
पण जशी लेखणी येते हाती, कुणास ठाऊक कोठे जाती
कागद राहतो तसाच कोरा अन शब्दही मजला सोडून जाती
मग राहतो मीच एकटा, पण सोबत करते तुझी आठवण
आठवणींच्या राज्यामधुनी तुझ्याच प्रेमाची साठवण
मग मिठीत घेईन म्हणतो तुजला, पण अंतर मधले फार आहे
हृदयापर्यंत पोहोचायासाठी, सध्या शब्दांचाच आधार आहे
रेशमी साड्यांच्या बासनात
मोरपिशी साडीच्या घडीत
अलगद ठेवलेलं, ते पत्र..
तिथून बाहेर नाही काढत कधी
हलकेच चाचपडते अधूनमधून
त्याचं तिथं असणंच पुरेसं आहे...
त्यातला शब्दंशब्द पाठ आहे
लिहून खोडलेला ,
पाण्याने पुसटलेला...
किती मिनतवा-या. हट्ट,
रुसवे फुगवे काय अन् काय
हातानं लिहिलेल्या त्या एका कागदासाठी..
आपल्यामधे जे काही होतं नव्हतं,
(नव्हतं तेच जास्त खरंतर)
ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र...
काही कविता अशा..तर काही तशा...भाग १
काही कविता स्वप्नात जगतात, हलकेच हसतात, प्रेमात पडतात...
काही कविता पटकन समजतात, चालीत बसतात आणि लयीत गातात!
काही कविता शब्दांचे पोकळ डोलारे, बिन मूर्त्यांचे देव्हारे असतात
भावनांचे उगाच कढ आणि ढसढसा ग्लिसरिनचे अश्रू सांडतात!
काही कविता उन्मुक्त अवखळ आपल्याच मस्तीत
तर काही नाकासमोर चालणार्या.. यमकाच्या शिस्तीत!