मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

बोबडी कविता!

चांदणे संदीप ·
बाबाच्या पोटावर झोपतय एक वेडं पिल्लू तोंडामध्ये अंगठा धरून हसतंय हळू खुदूखुदू! इवल्याशा बोटांच्या इवल्या इवल्या मुठीने ढुशी देत सारख्या सारख्या करतयं बाबाला गुदूगुदू! बा - बा - का - का मध्येच हसू खळखळून बोबड्या बोलांच गाणं एक फिरतंय घरभर दुडूदुडू! - संदीप चांदणे

प्राजक्त

विशाल कुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
कसे पारिजातास सांगू सख्यांनो जरा आवरी रे गंधा तुझ्या सखी मोगरीही धुंदावली बघ विसरून अस्तित्वगंधा तिच्या नको देखणे ते सडे सोनपुष्पी, नसे रातराणी ध्यानीमनी प्राजक्त दारी ओघळावा, दरवळ रुजावा मुग्ध मातीतुनी फुलावे किती सडे मौक्तिकांचे जणू प्रित तुजवर मोगरीची जडे कधी सांडती आंसवे दोन, पाठी कधी थाप ती कौतुकाची पडे इथे आज शब्दांत घडे आगळे शिल्प सुखे मोहरे ताज स्वप्नांतला नसे शाश्वती श्वास कुठवर टिकावा? फुले नित्य प्राजक्त दारातला . विशाल कुलकर्णी

देवाचे स्थान कुठे ।।

माहीराज ·
लेखनविषय:
काव्यरस
मान कुठे, सन्मान कुठे, सद्भावाचे भान कुठे, ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे.. पुजा आमची नित्याची, नैवेद्य ही नित्याचेच श्रद्धेपोटी उगाच आमुचे वादविवाद ही नित्याचेच वाटून घेतले देवही आम्ही माणुसकीचे गान कुठे ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे.. जाती धर्माची वर्गवारी करून घेतली आम्ही जागा प्रत्येक मंदिराची वाटून घेतली आम्ही एक नियती सार्‍यांसाठी आम्हा त्याचे भान कुठे ज्याने निर्मिली सारी सृष्टी त्या देवाचे स्थान कुठे..

सावल्यांची सरमिसळ होते ..

drsunilahirrao ·
काव्यरस
एक ना कारण सबळ होते पण तुझे जाणे अटळ होते हे कसे नाते दुराव्याचे जे कधीकाळी जवळ होते कोणता येथे ऋतू आहे देहभर ही पानगळ होते चेततो वणवा फुलापासुन नी झुळुकही वावटळ होते रोषणाई केवढी आहे सावल्यांची सरमिसळ होते डॉ. सुनील अहिरराव

मी अजून जिंकलो नाही

अभिषेक पांचाळ ·
लेखनविषय:
काव्यरस
म्हणतात ना , अंत भला तो सब भला , हेच खरे . सुरुवातीलाच एखाद्या गोष्टीला वाईट न म्हणनेच बरे वाईट शेवट असेल , तर तो शेवट नाही सुरुवात असेल नवी , एक वाईट अंत नाही शेवट हा नेहमी गोड असतो , वाईट नसते काही सुरुवातीलाच शेवट पाहण्याची , आपण करत असतो घाई हरलास तू , असं कुणी बोलत असेल अपयशाच्या तराजुत , तुला तोलत असेल त्याला जिंकलास तू , असं प्रेमाने सांगावं अभिनंदन करुन , थोडंसं समजावावं म्हणावं , जिंकला आहेस तू , मी हरलो नाही शर्यत संपली नाही , कारण मी अजुन जिंकलो नाही - अभिषेक पांचाळ

आम्ही मनमौजी

सुधीरन ·
लेखनविषय:
आला आला वसंत ऋतु आला नाचुया खेळूया झूला झुलूया आम्ही सारे आहो मनमौजी मजेत आपण सारे फिरुया ।।१।। कशास बाळगू तमा जगाची कशास काळजी आज उद्याची दिवस हा आजचा मजेचा रात्र ही धुंद नशेची ।।२।। तरुण आम्ही नव्या युगाचे भोक्ते सा-या सुखांचे नका पाडू बंधनात आम्हा आम्ही चाहते स्वातंत्र्याचे ।।३।। कमी पडेल धरती ही थिटे पडेल आकाश ही मनात आणता आम्ही रूप पालटू या जगाचे ।।४।।

गरिबाला विचार

अभिषेक पांचाळ ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रत्येकाला वाटतं , संघर्ष म्हणजे माझंच जीवन मान-अपमानाने जळतं , ते फक्त माझंच मन कष्टाची भाकर काय ती फक्त मीच कमावतो आणि कमावलेला पैसाही मीच फक्त गमावतो निदान दोन वेळचं जेवण तुला मिळतं गरिबाला विचार , भुकेविन पोट कसं जळतं ? दुःखाचा डोंगर सतत माझ्याच पाठीवर असतो तरी सुद्धा दोन क्षण मी कसा हसतो देव नेहमी संकटे माझ्याच पदरात टाकतो काही न देता , नुसतं माझ्याकडूनच मागतो हे असं वाटत असेल , तर गरिबाला विचार सुखाचं घर कसं मोडतं ? नुसते डोळेच नाही , तर त्यासोबत मन कसं रडतं ? - अभिषेक पांचाळ

काळ असा.......

शिव कन्या ·
[अरबी साहित्यातील निजार कब्बानी या नामवंत सिरीयन कवीच्या काही कवितांचा स्वैर अनुवाद! त्यातील ‘ A Lesson in Drawing!’ या कवितेचा अनुवाद मिपाकरांसाठी! बाकी माहिती Google वर आहेच!] माझ्या मुलाने माझ्यासमोर रंगांचा बॉक्स ठेवला, म्हणाला, ‘बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’ मी करड्या रंगात ब्रश बुडवला, गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला. त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले, ‘............. पण बाबा, हा तर तुरुंग आहे!

बीज

gsjendra ·
लेखनविषय:
काव्यरस
ज्या बीजाला अंकूरायचे असते प्रसवायचे असते ते पाहत नाही तापमान किती डिग्री हवेत आर्द्रता किती पावसाची काही शक्यता वा मातीचा ओलसरपणा ते मातीत ढेकळात खडकाच्या फटीत इवल्या पालवीने उभारते अस्तित्वाची दखल आपल्या जगाला घ्यायला लावते