काय भारी होतं ना बालपण
काही मिळत नसेल तर रडायचं
पाहिजेच असा हट्ट धरून अडायचं
आपली बालिश बुद्धी आईला कळायची
आणि हवी ती गोष्ट लगेच मिळायची
आता कितीतरी रडूनसुद्धा काही भेटत नाही
आपल्यावाचून कुणाचं काहीच अडत नाही
आपली हि बुद्धी आईला अजूनसुद्धा कळते
पण काही देण्याची तिला संधी कुठे मिळते ?
कळते मोठं झाल्यावर , खूप बदललोय आपण
आठवलं कि वाटतं , काय भारी होतं ना बालपण
नवीन खेळण्यांसाठी , हट्ट धरायचा
मिळालं कि एकदम , उर भरायचा
खेळत खेळत कधी , मधेच पडायचं
तुटलं कि खेळणं , जोरात रडायचं
आता वाटतं , तुटणारी खेळणीच बरी होती
परत न मिळायला , ती थोडी खरी होती ?
मोठं झाल्यावर आता , मन तुटतं सारखं
जीवा भावा