मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी स्वप्न पाहत नाही

खिलजि ·

खिलजि 26/04/2018 - 17:28
मला खरंच स्वप्न का पडत नाही हा मोठा यक्ष प्रश्न सध्या माझ्यासमोर आहे . मी सध्या त्याचे उत्तर शोधतोय पण अजून काही सापडले नाही आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर

चित्रगुप्त 27/04/2018 - 05:23
मी स्वप्न पाहत नाही... कारण , मला ते पडत नाही
-- भाग्यवान आहात.
मागू नको तू देवापाशी कधीही स्वप्नाचा तो ठेवा .... निद्रेचा तू भोग घेत जा , समजून अनमोल मेवा
.... अगदी बरोबर.

खिलजि 26/04/2018 - 17:28
मला खरंच स्वप्न का पडत नाही हा मोठा यक्ष प्रश्न सध्या माझ्यासमोर आहे . मी सध्या त्याचे उत्तर शोधतोय पण अजून काही सापडले नाही आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर

चित्रगुप्त 27/04/2018 - 05:23
मी स्वप्न पाहत नाही... कारण , मला ते पडत नाही
-- भाग्यवान आहात.
मागू नको तू देवापाशी कधीही स्वप्नाचा तो ठेवा .... निद्रेचा तू भोग घेत जा , समजून अनमोल मेवा
.... अगदी बरोबर.
मी स्वप्न पाहत नाही कारण , मला ते पडत नाही नेहेमी ठरवतो आज झोपल्यावर स्वप्न बघायचे काहीतरी वेगळंच बनायचे मी पडतो , लकटतो त्या पलंगावर विचार हाच असतो , कि आज स्वप्न बघायचे डोळे काही मिटत नसतात स्वप्न कुठले बघायचे नि कसे ? याचेच विचार मनात घोळत असतात हळूहळू झापड यायला लागते डोळे जड होत जातात , निद्रादेवी प्रसन्न होते मिट्ट काळोख , कसलीही आठवण नाही , कसलीच साठवण नाही डोळे उघडतात , पण तोंडावर पाणी शिंपडून पुन्हा एक तासभर पलंगावर तस्साच पडून राहतो काही स्वप्न पडलं का ?

दोन भिकारी भीक मागती, पुलाखाली करिती वस्ती

खिलजि ·

लहानपणी च्या विनोदावर बेतलेली भन्नाट कविता अवांतर-- छंद, मात्रा वृत्ते सगळयाचे आयझेड केली आहे. सुरुवातीला दुरुस्त्ती करता येईल का बघत होतो पण नंतर च्या ओळींमध्ये प्रकरण हाताबहेर जात चालले म्हणुन नाद सोडुन दिला.

In reply to by मार्मिक गोडसे

अभ्या.. 23/04/2018 - 18:35
अजुन पंख लागले नाही ह्यातच सर्व काही आलं.
हा ना, चांदण्या टाकून शिव्या घालायच्या, डॅश टाकून काहीहि लिहायचे हे राजमान्य झालेय वाट्ते आता. साहित्यात बोलीभाषेचे उल्लेख टाकताना काही अपरिहार्य शिव्या वगैरे ठिकाय पण जुने जोक असे डॅश टाकून मिपावर टाकलेले चालतात काय?

गामा पैलवान 23/04/2018 - 17:41
सिद्धेश्वर विलास पाटणकर, अहाहा! काय कविता आहे. प्रज्ञा व प्रतिभा पिचकारीसारखी नुसती फसफसून वाहत आहे. फक्त ते नावाचं जरा मनावर घ्या हो. ते कवितेचाच भाग वाटतं. अलगत्वनिदर्शक पाचर ठोकाच. बाकी, काव्यास्वाद घेताघेता विसंगतीमुळे किंचित रसभंग झाला. हेच ते विसंगत कडवं :
फुटताक्षणी तोंडून शब्द निघाले " च्यामायला _ वडे लागले " क्षणभर काही सुचेनासे झाले बघता बघता अंग भरून गेले
भिकाऱ्यास _वडे कसे लागले? त्याच्या मायला लागायला हवेत ना? पण असो. बाकी कविता (अगदी विसंगतीसहित) चिंतनीय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नीट वाचा (रिडिंग बिटवीन द लाईन्स किवा गाळलेल्या जागा भरा) उलट तुम्ही सुचवताय त्यातच विसंगती आहे.

राजकीय धाग्यांवर ,अहाहा काय ती भाषा म्हणणाऱ्यांना ही भाषा चालते का? आम्हालाही मुभा द्या ,मग बघा हावडा एक्सप्रेस कशी सुसाट पळेल ती.

In reply to by गामा पैलवान

खरं सांगा मा.गो., तुम्हाला _वडा एक्सप्रेस म्हणायचं होतं नं? आम्ही कसं ओळखलं!! तुमच्या तोंडातलं बाहेर काढायची काय गरज होती?

In reply to by मार्मिक गोडसे

गामा पैलवान 24/04/2018 - 20:19
मा.गो., आता मात्र हद्द झाली. माझ्याच नायतर काय इतरांच्या तोंडातलं काढीत बसू म्हणता? ते महत्कार्य करणारी माणसे वेगळी आहेत. स्वत:स पुरोगामी म्हणवून घेतात ती. आ.न., -गा.पै.

खिलजि 24/04/2018 - 13:06
जाऊ द्या हि कल्पना .. सोडून द्या गंगेला .. चूभूद्याघ्या .. कृपा करून आता अभिप्रायांची देणी घेणी थांबवा इथे .. दुसरी मजेदार कल्पना सादर होत आहे ... ती वाचावी हि वाचकांना नम्र विनंती ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

बिटाकाका 24/04/2018 - 14:05
माफ करा खिलजी साहेब, अजिबात आवडली नाही कविता. मुळात अश्लील विनोदाला ओढूनताणून कवितेत बसवायची गरजच काय? तुमची कल्पनाशक्ती चांगलीय, पण हे काहीही आहे असे वाटते. फक्त फुल्या लाईनी टाकून अश्लील शब्द नाचवावेत असे तुम्हाला खरेच वाटते?

जेम्स वांड 24/04/2018 - 15:09
मिपावर 'मराठीत सकस' लेखन करण्याची संकल्पना आहे असे आम्हाला वाटत असे, सकस काही सुचत नाही तोवर गप बसावे हे आम्ही पाळत आलोय. पण हे असले थिल्लर प्रकार चालणार असतील तर आम्ही साक्षात कामदेव लाजेल असलं 'लिखाण'(?) करावं काय? लेखन करा टॅब आम्हालाही मिळालाय सभासदत्व घेतल्यावर!

लहानपणी च्या विनोदावर बेतलेली भन्नाट कविता अवांतर-- छंद, मात्रा वृत्ते सगळयाचे आयझेड केली आहे. सुरुवातीला दुरुस्त्ती करता येईल का बघत होतो पण नंतर च्या ओळींमध्ये प्रकरण हाताबहेर जात चालले म्हणुन नाद सोडुन दिला.

In reply to by मार्मिक गोडसे

अभ्या.. 23/04/2018 - 18:35
अजुन पंख लागले नाही ह्यातच सर्व काही आलं.
हा ना, चांदण्या टाकून शिव्या घालायच्या, डॅश टाकून काहीहि लिहायचे हे राजमान्य झालेय वाट्ते आता. साहित्यात बोलीभाषेचे उल्लेख टाकताना काही अपरिहार्य शिव्या वगैरे ठिकाय पण जुने जोक असे डॅश टाकून मिपावर टाकलेले चालतात काय?

गामा पैलवान 23/04/2018 - 17:41
सिद्धेश्वर विलास पाटणकर, अहाहा! काय कविता आहे. प्रज्ञा व प्रतिभा पिचकारीसारखी नुसती फसफसून वाहत आहे. फक्त ते नावाचं जरा मनावर घ्या हो. ते कवितेचाच भाग वाटतं. अलगत्वनिदर्शक पाचर ठोकाच. बाकी, काव्यास्वाद घेताघेता विसंगतीमुळे किंचित रसभंग झाला. हेच ते विसंगत कडवं :
फुटताक्षणी तोंडून शब्द निघाले " च्यामायला _ वडे लागले " क्षणभर काही सुचेनासे झाले बघता बघता अंग भरून गेले
भिकाऱ्यास _वडे कसे लागले? त्याच्या मायला लागायला हवेत ना? पण असो. बाकी कविता (अगदी विसंगतीसहित) चिंतनीय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नीट वाचा (रिडिंग बिटवीन द लाईन्स किवा गाळलेल्या जागा भरा) उलट तुम्ही सुचवताय त्यातच विसंगती आहे.

राजकीय धाग्यांवर ,अहाहा काय ती भाषा म्हणणाऱ्यांना ही भाषा चालते का? आम्हालाही मुभा द्या ,मग बघा हावडा एक्सप्रेस कशी सुसाट पळेल ती.

In reply to by गामा पैलवान

खरं सांगा मा.गो., तुम्हाला _वडा एक्सप्रेस म्हणायचं होतं नं? आम्ही कसं ओळखलं!! तुमच्या तोंडातलं बाहेर काढायची काय गरज होती?

In reply to by मार्मिक गोडसे

गामा पैलवान 24/04/2018 - 20:19
मा.गो., आता मात्र हद्द झाली. माझ्याच नायतर काय इतरांच्या तोंडातलं काढीत बसू म्हणता? ते महत्कार्य करणारी माणसे वेगळी आहेत. स्वत:स पुरोगामी म्हणवून घेतात ती. आ.न., -गा.पै.

खिलजि 24/04/2018 - 13:06
जाऊ द्या हि कल्पना .. सोडून द्या गंगेला .. चूभूद्याघ्या .. कृपा करून आता अभिप्रायांची देणी घेणी थांबवा इथे .. दुसरी मजेदार कल्पना सादर होत आहे ... ती वाचावी हि वाचकांना नम्र विनंती ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

बिटाकाका 24/04/2018 - 14:05
माफ करा खिलजी साहेब, अजिबात आवडली नाही कविता. मुळात अश्लील विनोदाला ओढूनताणून कवितेत बसवायची गरजच काय? तुमची कल्पनाशक्ती चांगलीय, पण हे काहीही आहे असे वाटते. फक्त फुल्या लाईनी टाकून अश्लील शब्द नाचवावेत असे तुम्हाला खरेच वाटते?

जेम्स वांड 24/04/2018 - 15:09
मिपावर 'मराठीत सकस' लेखन करण्याची संकल्पना आहे असे आम्हाला वाटत असे, सकस काही सुचत नाही तोवर गप बसावे हे आम्ही पाळत आलोय. पण हे असले थिल्लर प्रकार चालणार असतील तर आम्ही साक्षात कामदेव लाजेल असलं 'लिखाण'(?) करावं काय? लेखन करा टॅब आम्हालाही मिळालाय सभासदत्व घेतल्यावर!
दोन भिकारी भीक मागती पुलाखाली करिती वस्ती नेहेमी नेहेमी करुन याचना भुलवी फसवी पांथस्थांना एके दिवशी सांज वेळी अशीच होती रीती झोळी कोसुनी त्या चंद्रमौळी करिती याचना भरण्या झोळी धूर प्रकटला, डोळे दिपले शिवशंभोने दर्शन दिधले दोघांसी तीन अंडे दिले इच्छा धरुनी फोड तयासी इप्सित मिळेल त्वरित तुम्हांसी दोघेही ते खुश जाहले परतीच्या प्रवासा निघाले दोघांच्याही दोन वेगळ्या वाटा जाण्यापूर्वी गळाभेटा वर्षानंतर भेटू पुन्हा आपण देऊ यथेच्छ एकमेका आलिंगन काळ लोटला एक वर्षाचा शोधत शोधत पहिला आला त्याच जागेवर दुसरा नव्हता पुलाखाली तो उभा सापडला तीच याचना तीच झोळी तोच भि

हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं

खिलजि ·

गामा पैलवान 18/04/2018 - 23:53
सिद्धेश्वर विलास पाटणकर, हाहाहा ! ज्याम आवडली कविता. प्रेम च्या जागी प्रेमकविता असं कल्पून पहा. सोन्याहून पिवळं ! आ.न., -गा.पै. जाताजाता : तुमच्या नावाचं काही करा हो. कवितेचा भाग वाटतो. मध्ये अलगत्वनिर्देशक पाचर माराच अशी : ---------------------------------------------------------

गामा पैलवान 18/04/2018 - 23:53
सिद्धेश्वर विलास पाटणकर, हाहाहा ! ज्याम आवडली कविता. प्रेम च्या जागी प्रेमकविता असं कल्पून पहा. सोन्याहून पिवळं ! आ.न., -गा.पै. जाताजाता : तुमच्या नावाचं काही करा हो. कवितेचा भाग वाटतो. मध्ये अलगत्वनिर्देशक पाचर माराच अशी : ---------------------------------------------------------
तिच्या आवडीनिवडीसाठीच मी मैत्रीलाच गहाण ठेवलं ते बोलावयाचे नेहेमी मजला यायला सांगायचे नाक्यावर एकही धड वाटत नव्हता तिला एकेकाचं हळूहळू शिरकाण करून टाकलं शिकाऱ्यावानी माग काढत होती माझा नजरेत असावं म्हणून समोरच मचाण बांधून टाकलं त्यांना खबर पोहोचताच याची सुटकेसाठी त्यांनी जीवाचं रान करून टाकलं लग्नाआधीच तिच्याविरुद्ध माझं कान भरून टाकलं चंडी रूप धारण करून मग तिनं सर्वांचंच पायताण करून टाकलं प्रत्येक चीअर्सबरोबर एकेक थेम्ब सर्वानी ओवाळून टाकला अश्या मित्रापेक्षा सर्वाना वेटरच बरा वाटला नशेत साऱ्यांनी फोन करून शिव्यांचं दान वाटलं उमजता मज मेख सारी सालं प्रेमाचं

तुमच्या देशात....

शिव कन्या ·

मर्द मराठा 13/04/2018 - 14:52
कोर्‍या बातमी नुसार.. फाशीची शिक्षा होणारेय.. कायद्यात बदल वगैरे वगैरे .. होय शिवाय 'केन्डल मार्च' आहेच. फाशी देणार म्हणजे.. ज्याने 'तिला' मरणप्राय यातना दिल्या सलग काही दिवस..मग तिच्या कुटुंबाला... त्याला फक्त ५-१० सेकन्दात संपवणार ?

अर्धवटराव 13/04/2018 - 21:19
माझं पिल्लू जर अशा परिस्थितीत सापडलं तर... कल्पना देखील करवत नाहि. व्हिक्टीम कुटुंबाला कुठल्या तोंडाने कायद्याच्या गोष्टी सांगणार आपण :( आपले भिकारचोट राजकारणी या परिस्थितीचासुद्धा फायदा करुन घ्यायला बघतील. खरच मेरा भारत महान.

सांरा 14/04/2018 - 11:52
जेव्हा या अत्याचाराचा बदला म्हणून लहान मुलांना तुरुंगात छळले जाते, कुटुंबांना घर सोडून पळून जावे लागते तेव्हाही मला असाच संताप येतो.... जेव्हा एका बलात्कारी पुरुषालाच तपासाची सूत्रे देण्यात येतात तेव्हाही मला असाच संताप येतो... आसामात एका महिन्या पूर्वीच एका पाचवीतल्या मुलीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळण्यात आले होते तेव्हा मला पण असाच संताप आला होता... जेव्हा लोक मुलींमुलींमध्ये भेदभाव करतात आणि दुसऱ्यांना दांभिक म्हणतात तेव्हाही मला असाच संताप येतो....

गामा पैलवान 14/04/2018 - 12:54
शिवकन्या, वेदना पोहोचली. आयसिसवाल्यांचे हातपाय तोडायला हवेत. बघा ना त्यांचीच अवलाद कशी फोफावलीये अल हिंद मध्ये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शिव कन्या 15/04/2018 - 12:09
हो ना गामा पैलवान. त्यांचे तर आधी तोडायला पाहिजेत. त्यांचेच काय, जगभरात वेगवेगळ्या नावाने पसरलेल्या अशा सगळ्यांच्याच अवलादी नामशेष व्हायला पाहिजेत बघा.

In reply to by प्राची अश्विनी

पैसा 14/04/2018 - 18:08
जे झाले ते फार वाईट, पण isis active असलेल्या देशात मुली जास्त सुरक्षित आहेत आणि भारतात मात्र रस्तोरस्ती बायकांवर अत्याचार होत आहेत असा काहीसा अर्थ लेखातून निघतो आहे. त्याशिवाय लेखाचे शीर्षक सुद्धा जरा खटकले. मान्य की समोरच्या मुलीच्या नजरेतून अल हिंद "तुमचा देश" आहे, तरी...

In reply to by पैसा

शिव कन्या 15/04/2018 - 12:50
माझ्या लेखनात एक चुकले. मी ज्या देशात राहते, त्या ओमानचा उल्लेख केला नाही. हा अरब राष्ट्रातील सर्वात शांतता प्रिय, आणि मध्य आशियातील घडोघडीला युद्ध उकरून काढणाऱ्या देशांमध्ये शांतीदूताची भूमिका बजावणारा देश म्हणून ओळखला जातो. सध्याचे सुल्तान असेपर्यंत तरी हे आहे (हे सुल्तान १९७५ पासून आजपर्यंत कार्यरत आहेत).... पुढचे माहित नाही. बाकी सरसकट सगळ्याच अरब राष्ट्रांना ईसीसच्या रांगेत बसवणे गैर. त्यातून कुणी कसा अर्थ काढायचा याची मोकळीक ज्याला त्याला आहेच. दुसऱ्याच्या नजरेतून बघताना, कितीही कळले तरी आपल्या देशावरचे प्रेम आपल्याला तसे वळू देत नाही, हे ही समजण्या सारखेच. माझे हेच झाले, आणि अगतिकतेने शेवटी त्या शाळकरी मुलीला सांगितले, 'कुठेही जा, पण माझ्या देशात जाऊ नको.' खाली एका प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे , आत्मताडनात आपला हात धरणारे कुणी नाही. नसावेच. शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो.

In reply to by शिव कन्या

शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो. हे ठीक आहे. फक्त असे करताना, "आपण स्वतःच्याच देशाची आणि नागरिकांची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) नाचक्की करू नये", किमान इतका सारासारविवेक बाळगावा ही अपेक्षा अवाजवी नाही. एखाद्या दुर्दैवी घटनेसाठी सगळ्या देशाला जबाबदार धरून, तो परदेशी प्रवाश्यांसाठी असुरक्षित आहे, अशी अतिशयोक्ती करणे कितीसे बरोबर आहे ? प्रत्येक प्रवासी/अनिवासी व्यक्ती, प्रवास/वास्तव्य करत असलेल्या देशात, आपापल्या देशाची अनधिकृत (unofficial) प्रतिनिधी असते. तिच्या वागण्या-बोलण्यावरून इतरांच्या मनात तिच्या देशाची भली-बुरी प्रतिमा तयार होत असते. या जबाबदारीची जाणीव असणे ही सुजाण नागरीकत्वाची खूण आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

Nitin Palkar 15/04/2018 - 20:38
शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो. हे ठीक आहे. फक्त असे करताना, "आपण स्वतःच्याच देशाची आणि नागरिकांची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) नाचक्की करू नये", किमान इतका सारासारविवेक बाळगावा ही अपेक्षा अवाजवी नाही. एखाद्या दुर्दैवी घटनेसाठी सगळ्या देशाला जबाबदार धरून, तो परदेशी प्रवाश्यांसाठी असुरक्षित आहे, अशी अतिशयोक्ती करणे कितीसे बरोबर आहे ? अनंत वेळा सहमत

In reply to by शिव कन्या

पैसा 15/04/2018 - 23:58
पण ओमान gender ineqality इंडेक्स मध्ये युनो आकडेवारीत भारताहून वरच्या नंबरला आहे. एकूण लोकसंख्या फक्त ४४ लाख. याहून जास्त लोक मुंबईत राहतात. गुन्ह्यांच्या प्रमाणात तुलना अशक्य आहे. तुम्ही ओमानला गेलात. तुमच्या बाकी नातेवाईक मित्र मैत्रिणींचे काय? त्यातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या तुमच्या मते या नरकात राहत आहेत. कोणी सुहृद पुरुष असतील त्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार का? आरोपी पकडले गेलेत. तपास करणारा स्वतः बेघर झालेला हिंदू पंडित आहे. जात धर्म मध्ये कोण आणतोय? गुन्हेगारांना शिक्षा होईल. एवढी वाट तर न्यायपालिकेवर विश्वास ठेवून बघितली पाहिजे. आपल्या देशात कसाबला सुद्धा बचावाची संधी पुरेपूर दिली गेली होती.

In reply to by शिव कन्या

prasanna_kop 19/04/2018 - 16:51
शिव कन्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे ओमान शांती प्रिय आहे हे ठीक तसेच शांतिदूतांची भूमिका साकारणारा देश आहे तेही योग्य आहे पण ओमान मध्येही मुली आणि विशेषतः स्थानिक सोडून इतर देशीय स्त्रिया सुरक्षित नाहीत. तेथे हुकूमशाही असल्यामुळे असले झालेले प्रकार वार्तापात्रात चर्चिले जात नाहीत. सलालाह च्या नर्सची हत्या व बलात्कार विसरलात का? तिच्या हत्येवरून तिच्या नवऱ्यालाच ६ महिने कैदेत ठेवले होते शेवटी सुषमा स्वराज ना मध्यस्थी करून त्याला सोडवावे लागले. घाला मधील फिलिपिनो हत्या व बलात्कारासाठी तिच्या मित्रालाच अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला. मुक्त विचारांच्या फिलिपिनो स्त्री पुरुषांना बलात्कार करायची गरज नसते, सर्वाना माहित आहे कि हे गुन्हे स्थानिकांनी केले होते पण देशाचे नाव खराब होते म्हणून भारतीय/बांगलादेशी/पाकिस्तानी इत्यादींवर हे गुन्हे टाकले जातात दगडाने चेचणे हात पाय छाटणे तर दूरच राहिले तुम्ही तुमच्या ओमानी मैत्रिणीला एक गोष्ट जरूर विचारा कि ओमानमध्ये असली शिक्षा किती वर्षांपूर्वी दिली होती. तुम्ही कधी ओमान मध्ये ऑरेंज टॅक्सीने ड्राइवर च्या बाजूला बसून प्रवास केला आहे का? अशावेळी ९०% टॅक्सीवाले स्त्रीवर हात फिरवतातच यामध्ये त्यांना स्वतःच्या (८० +) किंवा स्त्री व मुलगी हिच्या वयाचहि (५ ते ६०) बंधन नसते कधी कधी तर जाणून बुजून आडबाजूला घेऊन जातात अशा वेळी कित्येक भगिनींनी चालत्या गाडीतून उडया घेतल्या आहेत. कधीतरी रुवी मध्ये शुक्रवारी फिरणाऱ्या घरकाम करणाऱ्या स्त्रियांची कैफियत ऐका म्हणजे येथे या बायकांवर त्यांचे स्थानिक मालक कोणत्या थराचे अत्याचार करतात ते समजेल बिचार्या भारतातील कुटुंब सांभाळायचे असते म्हणून मुकाट्याने सहन करत असतात. अशा दुधाने न्हालेल्या देशात (येथे मला ओमानची बदनामी करायची नाही आहे) स्वतःच्या सवंग प्रसिद्धी साठी तुम्ही आपल्या देशाची बदनामी करत फिरत आहात . मान्य आहे कि आसिफावर झालेला अत्याचार घृणास्पद व निंदनीय आहे व कायदा तिला योग्य न्याय मिळवून देईल व अपराध्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी माझ्या देशाचे नाव बदनाम करत फिरणे मलातरी योग्य वाटत नाही.

In reply to by prasanna_kop

arunjoshi123 19/04/2018 - 17:06
मान्य आहे कि आसिफावर झालेला अत्याचार घृणास्पद व निंदनीय आहे व कायदा तिला योग्य न्याय मिळवून देईल व अपराध्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी माझ्या देशाचे नाव बदनाम करत फिरणे मलातरी योग्य वाटत नाही.
+११ =============== ही सर्व मंडळी शुद्ध कांगावेखोर आहे. भारतात दरवर्षी अमानुष बलात्कारांच्या घटना शेकडोंनी होतात, यांना नेमकी स्वतःची परंपरा, संस्कृती, देव, धर्म आणि देश बदनाम करायला पुरेशी संधी असते त्यावेळीच जाग येते. आणि इतके भावनात्मक लोक होतात कि .... बस्स..... समस्येबद्दल बोलायचंच नाही.

In reply to by प्राची अश्विनी

शिव कन्या 15/04/2018 - 12:32
जरा उलटा प्रवास .... मी जेव्हा इकडे (ओमान) यायचे ठरवत होते, तेव्हा 'अय्या, नको बाई तिकडे जाऊ, फार बंधने बायकांवर !' असे भारताची हद्द कधीच न ओलांडलेली मंडळी सांगत होती. तर आधीच या देशात राहणारे, नेट वरून जोडलेली मंडळी सांगत होती, 'या, काहीच problem नाही. सौदीसारखी बंधने नाहीत. ओमान लिबरल आहे.' मला ठरवता येत नव्हते बरेच दिवस. पण शेवटी विचार केला, 'नाही पटले तर निघून येऊ.' आले , राहिले , अजून रहात आहे. होय, मला, माझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटते. कारण कायद्याचा बडगा. एकूण सुरक्षेची आकडेवारी मला मिळाली तर इथे नक्कीच टाकेन. म्हणजे तुलनेला बरे जाईल. भारतच काय पण जगातल्या कोणत्याही देशातली मुलींच्या सुरक्षितेतची टक्केवारी वाढती रहावी यासाठी त्या त्या देशातील महिला संघटना, सरकारे कायकाय करतात, ते पाहणेही या निमित्ताने मोलाचे ठरेल. पण शेवटी, आपल्या घरात जळत असेल, तर जास्त दुखते, प्राची.

In reply to by शिव कन्या

हे आधीचे संदर्भ लेखात स्पष्ट होत नसल्याने सद्ध्याच्या घटनेशी तुलना होते. असो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे freedom of expression. रेप किंवा स्त्रियांवरील अत्याचारांच्या किती घटना गुन्हा म्हणून नोंदवल्या जातात आणि किती प्रत्यक्ष घडतात यात प्रचंड तफावत असू शकते. ज्या देशात धर्माधिष्ठित सत्ता आहे. आणि मिडीयाला freedom of expression नाही तिथे हे गुन्हे बाहेर येतील का याबाबत शंकाच आहे. त्यामुळे अशा अमानुष घटना घडूनही भारत आणि इतर अरब देश यामध्ये स्त्रियांची सुरक्षितता incomparable आहे.

तेजस आठवले 14/04/2018 - 20:01
लेख पटला नाही. घडलेली घटना वाईट आहे पण त्यासंबंधित ह्या लेखातले चित्रण एकांगी आहे.तुम्ही कळत नकळत काळे/पांढरे अशी विभागणी करून टाकली आहे असं वाटतंय.दुसऱ्या कुठल्याही देशात जा म्हणताय तर असं एखादा देश सांगू शकाल का की जिथे सगळे काही आलबेल आहे ?बरं हे सगळं एका अश्या देशातल्या मुलीला तुम्हाला सांगावसं वाटतंय की ज्या देशाच्या अधिकृत धर्मात एक स्त्री म्हणून तिचं स्थान नगण्य आहे ?नात्यातल्या पुरुषाला बरोबर घेतल्याशिवाय तिला घराबाहेरही पडता येत नाही का तिला कसलेही अधिकार नाहीत. बलात्कारासारख्या गुन्ह्यात साक्ष देताना तिची एकटीची साक्ष पुरी ठरू शकत नाही? माझा हा प्रतिसाद सरसकटीकरण करणारा वाटत असला तर तुमच्या ह्या लेखात पण असेच सरसकटीकरण होते आहे असे वाटते.

"एखाद्या एकेरी मुद्द्याचा पर्वत बनवून स्वताडन करणे" या प्रकारात भारतियांचा हात धरणारा दुसरा जनसमुदाय जगभरात सापडणे कठीण आहे. (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी) :(

नाखु 14/04/2018 - 22:27
इथं सगळं आलबेल आणि सुसंस्कृत आहे असं भाबडा आशावाद व्यक्त करणं जितकं बिनडोक आणि शहामृगावस्था आहे, तितकं किंबहुना काकणभर अधिकच सगळं नासल्यात जमा करणे आणि अतिरंजित प्रकटीकरण करणे आहे वास्तव या दोन्हींच्या मध्ये अगदी अंग चोरुन उभं राहिलं आहे,ते ना कुणाला दिसत नाही का दखलपात्र नाही हेच कळेना. अदखलपात्र नाखु खिजगणतीतही नसलेला

In reply to by नाखु

शिव कन्या 15/04/2018 - 13:01
जे मधलं चांगलं वास्तव आहे, ते तरी कुठं समोर येतं? भाबड्या आशावादातून बाहेर येईना आणि शहामृग अवस्थेतून कोण डोकं वर काढेना, ही गत अशा प्रसंगी आणखी बळजोर होते.

In reply to by शिव कन्या

नाखु 16/04/2018 - 09:21
प्रत्यक्ष आरोपी असलेल्या व्यक्तीच्या मुलीची प्रतिक्रिया आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रात छापून आली आहे.ती वाचली तर कदाचित या प्रकरणी आणखी काही बाजू असेलही असे वाटते

आरोपी कोणीही , कुठल्याही धर्माचे, पक्षाचे असो तरी कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि तीही जलदगतीने निकाली निघाली पाहिजे हीच मनापासून इच्छा.

नाखु पांढरपेशा

ट्रेड मार्क 15/04/2018 - 07:05
डॉक्टर म्हात्रे वर म्हणालेत तसं स्वताडन करण्यात भारतीयांचा हात धरणारे दुसरे कोणी नाही. घडलेली घटना नक्कीच दुर्दैवी आणि संतापजनक आहे. पण लगेच हिंदू असल्याची लाज वाटते, भारत स्त्रियांसाठी कसा असुरक्षित आहे याची चर्चा जोरात होते. तरी अजून गुन्हा सिद्ध व्हायचाय. पण नेहमीप्रमाणे आरोपी मुस्लिम असले की गुन्हा सिद्ध झाला तरी त्यात धर्म आणला जात नाही. पण हिंदू आरोपी असले की मात्र संपूर्ण हिंदू धर्मच दोषी असतो. जगातले कुठले देश स्त्रियांसाठी सुरक्षित आहेत? स्त्रियांना अगदी नखशिखांत झाकून ठेवणाऱ्या देशांमध्ये स्त्रिया अगदी सुरक्षित आहेत का? इंग्लंड सारख्या देशात झालेले Rotherham Scandal आणि Rochdale Grooming Scandal हे माहित आहेत का? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या दोन आणि इतरही काउंटीमधल्या वय वर्षे ८ ते ५० मधील एकही स्त्री अशी नव्हती की जिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नव्हता. अमेरिकेत ओप्रा विन्फ्रे, मॅडोना सारख्या प्रथितयश स्त्रियांनी जाहीरपणे त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांविषयी सांगितलंय. सामान्य स्त्रियांची परिस्थिती काय असेल बघा. जगात कुठेही कुठल्याही वयाच्या मुली/ स्त्रियांवर सतत अत्याचार होत असतात, पण त्याला इतर कुठल्याही देशात धार्मिक किंवा देशाशी संबंधित रंग दिला जात नाही. पण जर वर दिलेल्या बातम्या नीट वाचल्यात तर त्यात अत्याचार करणारे पाकिस्तानी/ बांग्लादेशी आहेत. पण बातमीत मात्र एशियन म्हणलं गेलंय. आता समस्त भारतीय हिंदू पण एशियन आहेत, मग म्हणजे त्यांचा पण सहभाग गृहीत धरला गेलाय का? या बाबतीत पाकिस्तानी मुस्लिम असं का नीट म्हणलं गेलं नाही? या घटनेबद्दल भारतातील किंवा इतर देशातील मुस्लिमांनी काही बोलल्याचं सुद्धा आठवत नाही. जर्मनी सारख्या स्त्रियांसाठी अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देशात सुद्धा घडलेली ही घटना बघा. अगदी अँजेला मर्केलनी सुद्धा या घटनेबाबत पुरोगामी पवित्र घेतला. हे आणि हे वाचा. यात उल्लेखलेल्या इतर घटना गेल्या २-३ महिन्यातल्याच आहेत आणि तितक्याच घृणास्पद आहेत. मग फक्त मुस्लिम मुलीवर हिंदू पुरुषांनी केलेल्या अत्याचाराची घटना का सगळीकडे एवढी पुढे आणली जातेय? फक्त काश्मीर मध्ये घडलेल्या घटनेची या पुरोगाम्यांना आणि कलाकारांना लाज वाटते? जिथे हिंदू मुलगी आणि मुस्लिम बलात्कारी आहेत तिथे एकाही मुस्लिम कलाकाराने किंवा विचारवंताने मुस्लिम असल्याची लाज वाटते म्हणलं नाही. किंवा हिंदूंना नावं ठेवणाऱ्या एकही हिंदू पुरोगाम्याने मुस्लिम धर्मावर निशाणा साधला नाही. आहे काही स्पष्टीकरण?

In reply to by ट्रेड मार्क

शिव कन्या 15/04/2018 - 12:57
आपण विपुल माहिती पुरवलीत. धन्यवाद. माझ्या स्वतः च्या लेखात मी कुठेही हिंदू असल्याची लाज म्हटलेले नाही, वा अमुक एक आहे, त्याचा अभिमान आहे असे म्हटलेलं नाही..... पण स्वतः च्या घरात जळत असले कि कुणाचे जळते, यापेक्षा घरचे जळते, हे जास्त सलते बघा साहेब. आणि, बाई म्हणून जास्त दुखते. म्हणून इरीशिरीत सांगते, जा बाई कुठेही, पण जाऊ नको माझ्या देशात. बाकी चर्चा, वाद चालू द्या.....

In reply to by शिव कन्या

ट्रेड मार्क 16/04/2018 - 05:01
तुम्ही म्हणताय ओमान तुम्हाला सगळ्यात सुरक्षित देश वाटतोय. ४४ लाख लोकसंख्या असणाऱ्या देशाची तुलना तुम्ही १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाबरोबर करताय. ओमान मध्ये गुन्हे होत नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? गूगल सर्च केलात तरी कळेल. त्यातूनही किती घटना रिपोर्ट होतात आणि किती बाहेर येतात ही अजूनच वेगळी गोष्ट आहे. या रिपोर्ट मधील ओमान मधलेच स्त्रियांचे हक्क बघा. ओमान मध्ये तर घरगुती हिंसा आणि मॅरिटल रेप साठी काही कायदा सुद्धा नाहीये. याच रिपोर्ट मध्ये ओमान मधील १४०००० स्थलांतरित घरगुती काम करणाऱ्या (मुख्यतः स्त्रिया) या अत्याचाराच्या बळी आहेत, ज्यात लैंगिक अत्याचार सुद्धा आला. इथे वाचा. मग आता ओमान सुद्धा असुरक्षित मानायचा का? एखाद्या अर्धवट वयाच्या मुलीला तुम्ही ज्या देशात जन्माला, वाढलात त्याच देशाबद्दल इतकी निगेटिव्ह इन्फॉर्मेशन देताय. घटना घृणास्पद आहे हे मान्यच आहे, पण म्हणून संपूर्ण देश इतका वाईट आहे का? पुढचा प्रश्न विचारायला सुद्धा मला अप्रशस्त वाटतंय, पण मुद्दा सिद्ध करण्यासाठी नाईलाजाने विचारायला लागतोय, त्याबद्दल आधीच माफी मागतो. तुमच्या ओळखीच्या भारतात राहणाऱ्या सगळ्या स्त्रियानी असा कुठला अत्याचार प्रत्यक्ष अनुभवलाय का? आता तुम्ही या एका घटनेवरून भारत असुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढलात. तर तोच तर्क पुढे वाढवून मी म्हणतो की भारतात स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये मुस्लिम पुढे आहेत. सन २०१८ मध्ये आत्तापर्यंत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या ६-७ घटना बघितल्या तर किमान ५ घटनांमध्ये मुस्लिम आरोपी आहेत. तसेच जगभरात झालेल्या बहुतांशी अतिरेकी कारवाया मुस्लिमांनीच केलेल्या आहेत. मग ओमान मध्ये हे उघडपणे तुम्ही तिथल्या लोकांना सांगू शकता का? या मुलीच्या पालकांना तुम्ही सांगितलं का की सन २०१८ मध्ये आत्तापर्यंत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या बहुतांश घटनांमध्ये मुस्लिम आरोपी आहेत. भारत असुरक्षित झालाय कारण मुस्लिमांची संख्या वाढते आहे? असो, आता तुम्ही भारत असुरक्षित असल्याचा निर्णय देऊनच टाकलाय तर तुमचे मत बदलणे अवघड दिसते आहे.

Topi 15/04/2018 - 11:55
As a Hindu I'm scared of Muslim in India. I'm sad my Religion Hinduism is declining and other religion are growing. I'm sad that people can nowadays can mock Hinduism and get away with that. Yes you heard it right this is thought of Most of Hindus nowadays. In name of Secularism Hinduism will die soon. Islam is taking over watch and see. All the Muslim actors are marrying Hindu girls that is nothing more than a love jihad. Islam is taking over India making me sad. Nobody can speak against Islam in India. So many rape happened against Hindu girls but no Bollywood and Tv serial actors can hold a sheet of paper or do Candle march. It's sad whatever happened to Asifa i condemned it. I'm worry about my children who will suffer in future because of this so called politician who are mocking Hinduism. Islam is taking over India sooner you realize would be better. Not only Islam I'm scared of every religion because every other religion is growing but Hinduism not. A Muslim guy us mocking Hinduism by this Post. But no one can do anything. Actors like SRK, Salman, Aamir can't attend Event when Netanyahu came. Reason Religion is more important. There is page called Humans of Hinduism in FB where so many jokes are made even my hindu friends are liking and laughing. I reported that page guess what my appeal rejected. I see many Anti Islam page are getting banned.

बलात्काराच्या केसमधे पिडीत व्यक्ती किंवा कुटुंबातील व्यक्तींची ओळख उघड करीत असतात का ? यासंबंधी काही लिखीत वा स्विकृत नियम आहेत का ?

In reply to by उगा काहितरीच

Section 228 A of the Indian Penal Code lays down the provisions barring the disclosure of identity of the victim of certain offences. It say that: “Whoever prints or publishes the name or any matter which may make known the identity of any person against whom an offence under section 376 (rape), section 376A (rape leading to death or making victim go into a permanent vegetative state), section 376B (sexual intercourse by husband upon his wife during separation) , section 376C (sexual intercourse by person in authority) or section 376D (gang rape) is alleged or found to have been committed (hereafter in this section referred to as the victim) shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years and shall also be liable to fine.” The only circumstances under which the identity can be revealed is either (a) by or under the order in writing of the officer-in-charge of the police station or the police officer making the investigation into such offence acting in good faith for the purposes of such investigation; or (b) by, or with the authorisation in writing of, the victim; or (c) where the victim is dead or minor or of unsound mind, by, or with the authorisation in writing of, the next of kin of the victim. In the case of the third exception it is further stated that it only applies “provided that no such authorisation shall be given by the next of kin to anybody other than the chairman or the secretary, by whatever name called, of any recognised welfare institution or organization”. Even in the case of printing or publishing “any matter in relation to any proceeding before a court” in these offences, without the previous permission of the court, punishment can mean imprisonment of up to two years along and a fine. As these sections clearly lay out, it is wiser not to report the name of a rape victim or a victim of any kind of sexual assault under any circumstances. दुवा : https://thewire.in/law/identity-of-rape-victims

माहितगार 15/04/2018 - 18:07
ईतर इस्लामिक देशांपेक्षा अल्पसंख्य धर्मीयांशी चांगली वागणूक ठेवणारा देश म्हणून ओमान कौतुकास पात्र आहेच. प्रोटेस्टन्ट जसे इतरांशी वागताना जसे अधिक सौजन्यपूर्ण असतात पण तत्वज्ञानानी कदाचित कॅथॉलिकांपेक्षा कट्टर असत (चुभूदेघे प्रोटेस्टन्ट तत्वज्ञानाबद्दल हे माझे व्यक्तीगत इम्प्रेशन आहे) तसेच काहीसे ओमानीन्चे असावे . त्यांच्या स्वतःच्या नागरीक मुस्लीम लोकांसाठी ते कट्टरच असावेत. (एकदा कट्टरतेची सवय झाली की कट्टरता वाटत नाही) पण लेखिकेने लेख टाकण्या आधी गूगलवर पुरेसा अभ्याकरुन लेख टाकला की बातम्यांच्या प्रभावात भावनेने ?
शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
लेखिका नेमकी कसली फेकुगिरी करत आहेत ? ओमान मध्ये 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' ह्या जावई शोधाचा नेमका संदर्भ कोणता ? गूगलल्यावर मला दिसणारी माहिती ओमान मध्ये ओमान पिनल कोड आहे, कोर्ट आहे आणि बलात्काराच्या गुन्ह्यास अधिकतम शिक्षा १५ वर्षान्ची जेल आहे. तुर्तास तरी भारतात अधिक शिक्षेची तरतूद असावी. इंग्रजी विकिपीडियातील Human rights in Oman लेखातून
Rape is punishable by up to 15 years in prison, and for cultural and social reasons many rapes probably go unreported. Domestic violence complaints are generally handled by authorities. Female genital mutilation is permitted and widely accepted and practiced, सम्दर्भ Human rights in Oman. In Wikipedia, The Free Encyclopedia. Retrieved 12:36, April 15, 2018, from https://en.wikipedia.org/w/index.php?title=Human_rights_in_Oman&oldid=828306826
खालील बातम्यांच्या लिन्का आपल्या अभ्यासासाठी * Oman crime: Filipina expat body found, rape and murder suspected * Rape in Oman * Omani national arrested for raping expat woman * RAPE IN OMAN: Men Pretend to be ROP and Kidnap a Woman for the Purposes of Rape * Outrage erupts in Oman after judge gives child rapist minimum sentence * Oman police arrest 20 expat women for wearing 'inappropriate' clothes * Ugandan women recount ordeal in Oman. भारतीय हैदराबादेत दुसरी पत्नी ठेऊन ओमानी शेखाने फोनवर ट्रिपल तलाक दिल्याचे उदाहरनाची बातमी मागे होती जरा अधिक गूगलल्यास मिळून जाईल . *

nanaba 15/04/2018 - 23:29
I am a Hindu. I love my religion. But a 8 Ur old gets gang raped. Is tortured.. killed.. and people talk abt religion? This is beyond me! She is 8 Ur old defense less child bloody hell. Stop defending what has happened.what happens in Oman or other countries doesn't make it better in India. Any lady & parents of any kids that step out of home have constant fear in their mind. Isn't that bad enough? What will make u say - it's not that bad? Just because this lady is staying abroad? I live here, in india & I feel ashamed that every single person doesn't condemn this, but brings religion in picture instead.

In reply to by nanaba

माहितगार 16/04/2018 - 00:10
अहो मॅकॉले पूत्र आम्ही म्राठीतन लिवा विन्ग्रजीतन लिवून आपण शाने हो नाई, असल्ये पाष्कळ इचार आपल्या पाशीच ठिवा . वाईट गोष्टीला कोणी बी डिफेंड केल नाय . धागा लेखिकेनेच धर्माचे नाव न घेता फसवा धार्मीक आधार घेतल्याचे संदर्भा सहित सिद्ध केले हाय. आमचा देश इतरांपेक्षा लाखपटीने चांगला हाय हे आकडेवारीने बी सिद्ध व्हतय .

In reply to by माहितगार

छ्या, छ्या ! विंग्लिशम्द्ये लिवलं म्हंजे कसं एकदम इम्प्रेशिव वाट्टं नाय का ? विंग्लिशम्दी आणि वर उद्धट भाषेत काहीही दामटून सांगितले व त्यात आस्तित्वात नसलेले आरोप बेमालूमपणे मिसळले (दुसर्‍या कोणी असे केले की त्याला, गोल पोस्ट बदलणे, असे म्हटले जाते, ती गोष्ट वेगळी) की मग एकदम भारी वैश्विक सत्य सांगण्याचा आव आणता येतो ! ;) :)

In reply to by माहितगार

nanaba 16/04/2018 - 10:44
अहो, असे वैयक्तिक होण्या पूर्वी इतर शक्य तांचा विचार केलात का? ब्राऊजर इश्युज वगैरे ऐकलेत का? वर २-३ इन्ग्रंजी प्रतिसाद आहेत, त्यां च्या अंगावर तुटून पडलात का? असो,वि षयांतर नको. तुम्ही स्त्री आहात का? तुम्हाला लहान मुले आहेत का? घरातील स्त्री शी बोलून बघा. जाऊन निवांत टेकडीवर एकटं बसलीये, नदीकिनारी बसलीये, हे करण्याची हिम्मत आज त्या करू शकतात का? किती बेसिक गोष्ट आहे ही! ओमान मधे काय घडतय ह्याच्या शी मला काय घेणं देणं आहे? माझ्या देशात मला सुरक्षित वाटत नाही हे सत्य पुरेसं त्रासदायक आहे. रोजच्या बेसिस वर. ह्यात धर्म, देश हे मुद्दे ये ऊच शकत नाहीत. एका प्रति कारासाठी सक्षम नसलेल्या जीवाब रोबर असे ८ -८ जण एकत्र ये ऊन वागतात तेव्हा लाज, वाझोंटा संताप, ते आपण /आपल्या घ रातलं नसावं म्हणून प्रार्थ ना, सततची काळजी, खबरदारी - हे किती भया नक आहे, हे एखाद्याला का कळू नये? मिपा सोडा, बाहेर तरी धार्मिक समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरली आहेत ना? हे तरी पुरेसं लाजीरवाणं वाटतं का नाही? अशांना (ब लात्कारी) खरोखरच दगडाने ठेचून मारावे , ती ही शिक्षा कमीच होईल असे वाटते.

In reply to by nanaba

I live here, in india & I feel ashamed that every single person doesn't condemn this, but brings religion in picture instead. तुमची गल्ली पार चुकली आहे (पक्षी: मुद्दा ध्यानात आलेला नाही) हे खेदाने सांगत आहे. बालकांवर अत्याचार आणि तेही लैंगीक अत्याचार असलेल्या निर्घृण गुन्ह्याचे समर्थन होऊच शकत नाही, याबद्दल इथेतरी कोणाचेच दुमत होण्याचे कारण नाही. अश्या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कायद्यांत अनुकरणीय (exemplary) शिक्षेची तरतूद करावी असे मला स्वतःला वाटते. याशिवाय, धर्म हा मुद्दा तर इथे तरी, एखादा चुकार प्रतिसाद सोडता, तुम्हीच इतक्या टोकाच्या स्वरूपात अध्याहृत धरून घुसवलेला आहे ! तुमच्या ध्यानात आले नसले तर... मुख्य मुद्दा असा आहे की, "एखादा गुन्हा घडला म्हणून सगळ्या देशाला वेठीस धरण्याचा आणि सरसकट सगळ्या परदेशी नागरिकांसाठी देश असुरक्षित आहे, असे म्हणणे चूक आहे." कारण तसे करणे, देशाची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) बदनामी होईल इतपत अतिशयोक्ती करणे होते. जणू काय, त्या मुलीने "ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असलं" तरी तिला भारतात निर्घृण गुन्ह्यांशिवाय इतर काहीच बघायला मिळणार नाही, अशी लेखिकेची खात्री झालेली आहे ! अश्या एखाद्या दुर्दैवी घटनेच्या पायावर परदेशप्रवासाचे निर्णय केले तर सर्व जगभरचे आंतरराष्ट्रीय दळणवळण बंद करावे लागेल, नाही का ?! तसेही, "काहीही कारण असो वा नसो, आपल्या देशाबद्दल अपमानास्पद लिहिणे-बोलणे हा भारतीय घटनेने दिलेला अधिकार आहे" असे म्हणणारे बरेच उदारमतवादी लोक भारतात आहेतच, तर मग परदेशात राहून असे केले तर काय बिघडले !" :( ================== अवांतर : मी स्वतः ओमानमध्ये १४ वर्षे वास्तव्य केलेले आहे. तेथिल जमिनी वस्तूस्थितीबद्दल मला चांगली माहिती आहे. सर्व स्तरांच्या ओमानी नागरिकांबरोबर माझे व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर सौहार्दाचे संबंध होते/आहेत. सर्वसाधारण ओमानी माणसाला भारताबद्दल आणि भारतिय माणसाबद्दल ममत्व व आदर आहे... आणि त्यांचे ते मत ओमानमध्ये काम करणार्‍या भारतिय नागरिकांशी आलेल्या संबंधातून आणि त्यांच्या भारतभेटींच्या अनुभवातून बनलेले आहे. तसेही भारत देशाशी ओमानचे व्यापारी संबंध आजचे नसून, शेकडो वर्षांचे आहेत... ब्रिटिश भारतात येण्याच्या बर्‍याच अगोदरपासूनचे. किंबहुना, ओमानमध्ये खनिज तेलाचा शोध लागण्याअगोदर भारतात येऊन काम करणारे अनेक ओमानी लोक (किंवा त्याचे पालक) मला तेथे भेटले आहेत. त्यामुळे, जेव्हा लेखिकेने "एक आडनीड्या वयातली शाळकरी पोरीला" भारताबद्दल प्रतिकुल मत सांगितले तेव्हा, इतर कोणापेक्षा, तिला आणि तिच्या पालकांना जास्त आश्चर्य वाटले असेल, असे मला वाटते. तरीही, 'कुर्‍हाडीचा दांडा...' बनणे टाळणे तर बरे होईल, असेच वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

nanaba 16/04/2018 - 10:46
सरसकट सगळ्या परदेशी नागरिकांसाठी देश असुरक्षित आहे, >> अहो परदेशी सोडा हो. देशी बायकांसाठी तरी सरसकट सेफ आहे का? पब्लिक ट्रांसपोर्ट ने प्रवास केलेल्या कुठल्याही बाईला विचारा!

In reply to by nanaba

परत गल्ली चुकली ! देशी बायकांसाठी तरी सरसकट सेफ आहे का? पब्लिक ट्रांसपोर्ट ने प्रवास केलेल्या कुठल्याही बाईला विचारा! १, पर्यटनासाठी भारतात आलेले किती परदेशी लोक पब्लिक ट्रांसपोर्टने प्रवास करतात ? २. पब्लिक ट्रांसपोर्टमधल्या समस्येचा उपाय काय ? इथे देशात असे प्रसंग होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायचे, की त्याचे सरसकटीकरण करून आपला देश अत्यंत धोकादायक आहे अशी परदेशात जाहिरात करायची ? "आग रामेश्वरी सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी" असा प्रकार नाही काय हा ?! विकृत लोक ही काही केवळ भारताची खासियत नाही. अश्या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वच सुजाण लोकांच्या मनात चीड आहे, परंतू, त्यामुळे सर्व देशाची (आणि पर्यायाने सर्व भारतियांची ज्यात लेखिका, तुम्ही व आम्ही सर्वच गणले जातो) प्रतिमा मलिन करण्याने काय साधणार आहे ??? तसे करणे समतोल विचार/कृती करणे होईल का ? भारताची परदेशात नाचक्की करून परिस्थिती सुधारणार आहे की मुळ समस्या तशीच राहील आणि त्यावर अजून भारताची प्रतिमा खराब झाल्यामुळे अनेक नवीन समस्या निर्माण होतील ? किंबहुना, अशी नाचक्की करणार्‍या भारतियांकडे परदेशी लोकांनी संशयाने/तिरस्काराने/चेष्टेने पहायला सुरुवात केली तर ते त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे असेल... पण अश्या कृतीमुळे इतर भारतियांना झळ पोचली तर त्याची जबाबदारीही नि:संशय नाचक्की करणार्‍यांवरच असेल. विशेषतः, संस्कारक्षम वयाच्या परदेशी नागरिक मुलीसमोर आपल्या देशाची प्रतिमा खराब करण्याच्या कृतीत कितीसा समतोलपणा आहे ? अशी अस्थायी आणि अप्रमाणबध्द (out of proportion) स्वताडन कृती करून वर तिची प्रसिद्धी करणे व तिचे समर्थन करत राहणे, यामुळे अश्या कृतीमागच्या कारणपरंपरेबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले तर आश्चर्य वाटू नये !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पुंबा 16/04/2018 - 12:18
इथे धर्माचा इश्यु मध्ये आणला गेला नाही हे खरे आहे. परंतू, जर बातम्या नीट वाचल्या तर या घृणास्पद गुन्ह्याचं समर्थन करणारे कुठल्या आधारे करताहेत हे लगेच कळून येईल. गेले अनेक दिवस हिंदू एकता मंच नावाची संघटना गुन्हा दडपून टाकण्याचा, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा जो प्रयत्न करते आहे, सत्ताधारी भाजपचे लोक ज्या घाणेरड्या प्रकारे पिडितेवर जरासुद्धा सहानुभुती न दाखवता गुन्हेगारांना अटक न करावी यासाठी प्रयत्न करताहेत त्याचा निषेध इथे करायचा नाही? ८ वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर इतक्या अमानुष पद्धतीने बलात्कार करणार्‍या नराधमाचे समर्थन धर्माच्या आधारे केलं जात असेल तर त्याची प्रतिक्रिया उमटणार नाही का? आज चक्क तिला न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढणार्‍यांना पाकिस्तानी म्हटले जात आहे पेड ट्रोलांकडून हे सगळं खरंच इतकं लाईटली घेण्यासारखं वाटतं तुम्हाला? माझ्या मते नानबांच्या म्हणण्यावर इतकी टोकाची प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे..

In reply to by पुंबा

बाकी मुद्द्यांबद्दल मतभेत नाहीतच. पण... मात्र, "परदेशात भारताची नाचक्की करणे हा त्यावरचा दुरान्वयानेही उपाय होऊ शकत नाही" हे माझे म्हणणे आहे. त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की एका संस्कारक्षम वयाच्या परदेशी मुलीपुढे करणे म्हणजे,... असो.

In reply to by पुंबा

nanaba 17/04/2018 - 07:38
मी एक स्त्री आहे. हे होताना दिसत तेव्हा आतून काय वाटत ते कदाचित पुरुषान्ना त्या प्रमाणात कळत नसाव अस वरच्या रिअ‍ॅक्शन्स वरून वाट ले. उद्वी ग्न. I read this need first when I read this article (limited tv, news paper). Felt so devastated,couldn't sleep! Irrespective of what they do in Oman, irrespective of any details about involved , this is terrible. Can't express what I feel.

मला कोणत्याही आकडेवारी मध्ये आणि राजकारणात पडायचं नाही, पण आपला देश बायकांसाठी फार बेक्कार होत चालला आहे हे माझंही मत आहे. प्रश्न स्वातंत्र्य वगैरे नसून एकंदरीत बायकांना बघण्याची, वागवण्याची पद्धत गचाळ आहे. फेसबुक वगैरे वर कित्येकदा कुणी पुरुषाने काही केलं की ट्रॉल्स असतील भले, पण ह्याच्या घरातल्या बायकांचा रेप केला पाहिजे असं लोक खुले आम लिहितात. गर्दीच्या जागी काय प्रकार होतात हे वेगळं लिहायला नको. कपडे हा तर भलता सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. फॉरेनर येतात त्या बायकांच्या मागे कसे लागतात ह्या बातम्या आता दुर्मिळ नाहीत. रात्री बेरात्री निर्धास्त फिरण्याची सोय नाही. कुठं एकटं असण्याची सोय नाही. रेप हा फिजकली दिसतो, पण रोजच्या आयुष्यात जे घडतं ते सांगताही येत नाही. त्यामुळे बाकीचे देश काही का करत असेनात, भारत बायकांसाठी अवघड देश आहे हे मला मान्य आहे. आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे.

In reply to by पिलीयन रायडर

अशी मानसिकता ही भारतात एक मोठी समस्या आहे यात वाद नाहीच. त्यासाठी भारतातच काही कडक उपाय करणे योग्य असेल. मात्र, "परदेशात भारताची नाचक्की करणे हा त्यावरचा दुरान्वयानेही उपाय होऊ शकत नाही" हे माझे म्हणणे आहे. त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की एका संस्कारक्षम वयाच्या परदेशी मुलीपुढे करणे म्हणजे,... असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विशुमित 16/04/2018 - 12:31
त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की एका संस्कारक्षम वयाच्या परदेशी मुलीपुढे करणे म्हणजे,... असो.>> ==>> म्हात्रे साहेब, परदेशात जाऊन संस्कारक्षम पब्लिक समोर देशाची नाच्चकी करण्यात "एक" व्यक्ती अव्वल स्थानी आहे. उगाच एक आठवण आली. असो..

In reply to by विशुमित

गाडी नको नको म्हणता राजकारणावर आलीच ना शेवटी ?! (कपाळावर हात मारणारी स्मायली) वादासाठी तुमच्या मनात काय आहे ते खरे मानले तरी, दुसर्‍या चुकीने पहिली चुक सुधारते का... विशेषतः त्यांचे संदर्भ फार वेगवेगळे असले तरी केवळ मुद्दा जिंकण्यासाठी त्यांची तुलना करण्याच्या मोहात पडावे काय ? नाही असे माझे मत आहे. तुमचे काय म्हणणे आहे ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विशुमित 16/04/2018 - 12:55
गाडी नको नको म्हणता राजकारणावर आलीच ना शेवटी ?>> ==>> ह्या प्रकरणावर राजकारण सुरु झाले म्हणूनच तर देशातील सर्व स्तरातून लोक पेटून उठून आवाज उठवायला लागले. नाहीतर ही चर्चा कठुआ आणि जम्मू पुरतीच सीमित राहिली असती. === वादासाठी तुमच्या मनात काय आहे ते खरे मानले तरी,>> ==>> ह्या वादात काहीच हाशील नाही हे मला चांगले ठाऊक आहे. === विशेषतः त्यांचे संदर्भ फार वेगवेगळे असले तरी केवळ मुद्दा जिंकण्यासाठी त्यांची तुलना करण्याच्या मोहात पडावे काय ? नाही असे माझे मत आहे. तुमचे काय म्हणणे आहे ?>> ==>> मुद्दा जिंकण्यासाठी तुलनात्मक मतमतांतरे कोठून सुरु झाली हे वाचकांना अगदी स्पष्ट दिसत आहे. माझे म्हणणे मांडण्याची आवशक्यता वाटत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

पुंबा 16/04/2018 - 12:24
अगदी सहमत. आपल्या देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्‍यांना खरेच देशात सुधारणा व्हाव्यात असे वाटते की नाही याबद्दल निश्चितच संदेह निर्माण होतो. आज, कठुवा रेपबद्दल ज्या निर्विकारपणे, निर्लज्जपणे पिडितेच्या मुस्लिम असण्याबद्दल आनंद व्यक्त होतो किंवा विरोध करणार्‍यांबद्दल पाकिस्तानचे हस्तक असल्याचे आरोप केले जातात त्यावरून अ॑अम्ही जो देश आपला मानतो तो हा नाही अशी भावना मनात येणे अस्वाभाविक नाहीच. निर्भया हत्याकांडातील आरोपींचा निषेध करणारे आज 'नाही पण या प्रकरणात दुसरी बाजू असू शकते' असा कांगावा करतात तेव्हा यांना 'न्याय' होण्यापेक्षा धर्म-र्धर्म खेळण्यातच रस आहे हे सिद्ध होतं..

In reply to by पुंबा

प्रसाद_१९८२ 16/04/2018 - 13:18
आपल्या देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्‍यांना खरेच देशात सुधारणा व्हाव्यात असे वाटते की नाही याबद्दल निश्चितच संदेह निर्माण होतो. -- एक वेळ असे मानून चालू की देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्‍यांनी देशात सुधारणा घडवण्यात काहीच हातभार लावला नाही, बर मग तुम्ही देशाला नावे ठेवणार्‍यांनी देशात सुधारणा घडवायला किती हातभार लावलाय ?

रेप हा फिजकली दिसतो, पण रोजच्या आयुष्यात जे घडतं ते सांगताही येत नाही. त्यामुळे बाकीचे देश काही का करत असेनात, भारत बायकांसाठी अवघड देश आहे हे मला मान्य आहे. ह्यापेक्षा अधिक पुरावा कोणता असू शकेल?

In reply to by मार्मिक गोडसे

गामा पैलवान 16/04/2018 - 02:27
मा.गो. भारतात बायकांना वावरणं उत्तरोत्तर कठीण होत चाललंय हे खरं! मात्र तरीही भारतातल्या बलात्कारांची दरडोई संख्या उर्वरित जगाच्या मानाने नगण्य आहे. अर्थात हे भारतातल्या अनागोंदीचे समर्थन नाही. सांगायचा मुद्दा इतकाच की ठोस पुरावा वेगळा आणि सर्वसाधारण आकलन (=परसेप्शन) वेगळं. आ.न. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सांगायचा मुद्दा इतकाच की ठोस पुरावा वेगळा आणि सर्वसाधारण आकलन (=परसेप्शन) वेगळं. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? कुलाब्या पासून फोर्ट पर्यंतच्या फुटपाथवर परदेशी स्त्रियांना किंचाळताना व त्यांच्याकडून आपल्या देशबांधवांना मिळालेला प्रसाद प्रत्यक्ष बघितला आहे. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये आपल्याबरोबर स्त्रीला घेवून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य प्रकार असतो. प्रत्येक घटनेची नोंद होतेच असं नाही.तुलनेनं बलात्कारांच प्रमाण कमी आहे म्हणून ह्या देशात स्त्री सुरक्षित आहे असं म्हणणाऱ्यास दंडवत! विकृत पुरुषांपासून मुबईत फक्त स्त्रीच नव्हे , तर तरुण मुलंही सुरक्षित नाहीत. हां, मुंबई भारतात येत नसेल तर गोष्ट वेगळी.

In reply to by मार्मिक गोडसे

गामा पैलवान 16/04/2018 - 12:23
मा.गो., 'भारत हा असुरक्षित देश वाटंत असेल तर खुशाल सोडून जावे' असा आडमुठा प्रतिसाद देणं सोपं आहे. मात्र तसा देत नाही. जे तुम्ही बघितलंय तेच मीही बघितलंय. पण चर्चा करतांना भावनांच्या आधारे करता येत नाही ना. त्यासाठी ठोस आकडेवारी लागते. सर्वात गंभीर अपराध अधोरेखित होईल अशी आकडेवारीच जमवायला हवी ना? जेणेकरून सत्वर तोडगा निघेल. अशी आकडेवारी जमवतांना प्रस्तुत स्त्रीकडे वैयक्तिक लक्ष देणं जमणार नाही. पण तो काही मलीन हेतू नव्हे. तसंच स्त्रियांविरुद्धच्या गुन्ह्याच्या दरडोई आकडेवारीनुसार भारतात जास्त सुरक्षितता आहे हे देखील मलीन विधान धरण्यात येऊ नये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्यासाठी ठोस आकडेवारी लागते. सर्वात गंभीर अपराध अधोरेखित होईल अशी आकडेवारीच जमवायला हवी ना? हे काम कोणाचे आहे? करताहेत का ते काम जबाबदारीने?का आमच्या आयाभगिनींनी रोज घरातून बाहेर पडलं की कामावर पोचण्यापूर्वी आणि कामावरून घरी परतन्यापूर्वी पो. स्टे. तक्रार नोंदवावी अशी आपली अपेक्षा आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये CCTV लावा आपोआप डाटा मिळेल. 'भारत हा असुरक्षित देश वाटंत असेल तर खुशाल सोडून जावे' असा आडमुठा प्रतिसाद देणं सोपं आहे. मात्र तसा देत नाही. उपकार करत नाही तुम्ही. घटनेनं कोणाला तसा अधिकार दिलेला नाहीये.

In reply to by मार्मिक गोडसे

गामा पैलवान 16/04/2018 - 18:25
मा.गो.,
उपकार करत नाही तुम्ही. घटनेनं कोणाला तसा अधिकार दिलेला नाहीये.
मला नेमकं हेच बरळायची इच्छा नव्हती. ती तुम्ही पुरी केलीत. याचसाठी थांबलो होतो. त्याबद्दल धन्यवाद! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मला नेमकं हेच बरळायची इच्छा नव्हती. ती तुम्ही पुरी केलीत. याचसाठी थांबलो होतो. मला तुमच्या सापळ्यात अडकवल्याबद्दल तुमचे अभिनंदन! मला वाटलं होतं महिला अत्याचार आकडेवारी संकलन ह्यावर तुम्ही काहीतरी उपाय सुचवाल.

अंतरा आनंद 16/04/2018 - 06:33
लेखातल्या वेदना पोचल्या. लेखात कुठेही ठराविक कोणावर दोषारोप नसतानाही ’अल हिंद’ वरून देशभक्त लोकांच्या भावना दुखावलेल्या दिसता आहेत. थोडा ललित अंगाने लिहीलय हे लक्षात न घेता लेखिकेनं आपल्या राष्ट्राची मुस्लीम देशातल्या लहान मुली जवळ बदनामी केली ह्यावर दु:ख, संताप व्यक्त करणारी मेंबरं बघून वाईट वाटलं. आपल्या देशाच्या बदनामीनं खूपच दु:ख झालेलं दिसतय लोकांना. एवढंच दु:ख लोकांना, " हिंदू एकता मंच" आरोपींना पाठिंबा देण्यासाठी तिरंगा फडकवत निदर्शनं करते, या मोर्च्यात सरकारमधील दोन मंत्री सहभागी होतात, हे बघून होतय की नाही? जबाबदार अधिकारपदावर (राजस्व अधिकारी) , पोलीस यासारख्या व्यक्ती या घटनेत आरोपी-सहअरोपी आहेत याचं वाईट वाटतय की नाही? अर्थात, मुलीचं चित्र आणि नाव उघड होणं हे मिडीया किती नीच पातळीला पोहोचू शकतो याचं उदाहरण आहे, यात वाद नाही. आणि हो, सिरिया, पाकिस्तान, इराण, इराक या मुस्लिम देशांशी तुलना करता आपण खूपच मागे आहोत. लाजच वाटली पाहिजे याची आपल्याला. अर्थात उनाव, कथुआ आणि आता सूरत या सारखा अनेक घटना , मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा करण्या ऐवजी विचारी नागरीकही कथुआ प्रकरणी हिंदू -मुस्लीम धुळवडीत ज्या हिरीरीनं सहभागी झालेय ते बघून आपण आपलं ध्येय्य लवकर गाठू खात्री पटतेय .

In reply to by अंतरा आनंद

माहितगार 16/04/2018 - 09:05
@ अंतरा आनंद दुसर्‍यांकडे बोट दाखवताना तीन बोटे आपल्या बाजूला आहेत का ? हे तपासण्याची आपणास आणि धागा लेखिकेस गरज असावी असे प्रांजळ मत आहे . जिथ पर्यंत अत्याचाराची निंदाकरणे असो की स्त्रीयांना सामोरे जावयास लागणार्‍या वीषमते बाबत या पुर्वी वेळोवेळी लिहून झाले आहे -धर्मावरुन या विषयात फरक करु नये या विषयावरही यशस्वीपणे बाजू मिपावर यापुर्वी मांडून झाली आहे, ते प्रतिसाद शोधावयास वेळ लागेल- तसे ते इतर मिपाकरांनी ही लेखन केले असणार आहे. याच धाग्याला समांतर सुधीर देवरेंचा धागा आला आहे आणि इथे ज्या साशंकता व्यक्त केल्या जात आहेत त्या देवरेंच्या लेखावर अद्यापतरी केल्या गेलेल्या दिसत नाहीत.
आणि हो, सिरिया, पाकिस्तान, इराण, इराक या मुस्लिम देशांशी तुलना करता आपण खूपच मागे आहोत. लाजच वाटली पाहिजे याची आपल्याला.
आणि धागा लेखिका
'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
या लेखनातील आपलेच अंतरंग धार्मीक फरक विवादात आणणारे आहेत आणि आपणच उपस्थीत केलेल्या वादाच्या विरोधात ससंदर्भ असंख्य पुरावे उभे करता येतात . आणि तसे पुरावे उपस्थित केले की "मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा " मुद्याच्या आधारे गोलपोस्ट शीफ्ट केला जतोय किंवा कसे ? मला वाटले ओमान मधलीच उदाहरणे पुरेसे ठरावे पण तेवढ्याने विरुद्ध बाजूच्या धर्मांधांचे डोळे उघडलेले दिसत नाहीत, सौदी अरेबीयाच्या राजदूतांवर आरोप झाले आहेत त्यांच्यावर झालेल्या आरोप बद्दल सौदी अरेबीयाने कोणत्या शीक्षा दिल्या ? हा प्रश्न तुमचे मुद्दे खोदण्यास पुरेसा असावा नसेल तर सांगा ईस्लामिक देशातील स्त्रीयांची स्थिती हा वेगळा धागा लेख असंख्य पुरावे आणि संदर्भांच्या आधारावर उभा करुन दाखवेन . मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा " एवढ्या मुद्यावर चर्चा करावयाची असेल तर धागा लेख तेव्ढ्याच मुद्यावर काढावा , ईस्लामीक अथवा अगदी युरोमेरिकी किंवा इतर देशांशी तुलना अस्थानी आहे. तुलना आपण चालू केली तर प्रतिवाद झेलण्यास तयारही असावे . अतार्कीक युक्तीवादाच्या मागे लपू नये असे वाटते.

In reply to by माहितगार

अंतरा आनंद 16/04/2018 - 10:25
शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
या शिक्षा इतर मुस्लिम देशात आहेत, वा शरियतमध्येआहेत या माहितीवरून त्या मुलीने हा प्रश्न केला अस्ण्याची शक्यता नाही वाटत का? लेखिकेनं कोणतही धार्मिक दृष्टओकोन व्यकत केलेला नाही पण इतर प्रतिक्रिया मात्र विनाकारण तो रंग देतायत याचा खेद वाटतो. "हे इथे नाही का होत? " असं विचारण्यापेक्षा "हे असं माझ्या देशात होतय याची मला लाज वाटते ' यावर सहमत का असू नये? इतर राजकारण करत आहेत असं म्हणत " मुस्लिम देशांकडे बघा" असं म्हणताना घटनेकडे बघण्याचा दूषित नजर देतोय असं नाही का वाटत? हे करताना आपण राजकारण्यांपेक्षा ( कारण त्यांना मतं तरी मिळवायची असतात आपण कुठलेही हेतू नसताना हे करतो ते) चुकीचं करत आहोत असं नाही का वाटत? कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?

In reply to by अंतरा आनंद

माहितगार 16/04/2018 - 10:37
कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?
१) आपणच चुकीचा गोलपोस्ट उभा केला तर गोल करणारे त्या दिशेने येतात त्यावर टिका केली तरी तार्कीकता शिल्लक रहत नाही. योग्य गोल पोस्टचा नवा चर्चा धागा मी काढला आहे तिकडे चर्चा सहभागाचे स्वागत आहे . २) भावनांचा आदर न करणारे इथे कुणीच नाही. भावना आहेत म्हणून त्यातील अज्ञान आणि चुकीच्या माहिती आणि चुकीच्या दृष्टीकोणांची चिकित्सा एकदा पब्लिक फोरम मध्ये होणार नाही होऊ नये अशी अपेक्षा चुकीची असावी . सदर लेखिका स्ट्राँग चर्चांना तोंड देऊ शकणार्‍ञा जुन्या मिपाकर आहेत तेव्हा चिकित्सेत काहीही गैर नाही.
या शिक्षा इतर मुस्लिम देशात आहेत, वा शरियतमध्येआहेत या माहितीवरून त्या मुलीने हा प्रश्न केला अस्ण्याची शक्यता नाही वाटत का?
लेखिका अप्रत्यक्सपणे अवजवी शिक्षांचे आणि अवाजवी स्त्रीयांवर अन्याय्य संस्कृती आणि ग्रंथाचे समर्थन करत आहेत

In reply to by अंतरा आनंद

@अंतरा आनंद, जे घडलंय त्याबद्दल सात्त्विक संताप, लाज वाटणं सगळं मान्य. तुमच्या भावनाही पोचलेल्या. पटल्या. पण जेव्हा तुलना होते तेव्हा ती योग्य अयोग्य अशा प्रतिक्रिया येणारच. " कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?" हेका नाहीच. पण त्याविरोधात कुणी बोलूच नये असाही हेका नसावा. इथे तर या घटनेबद्दल, आपल्या समाजाला सुधारणेची अत्यंत गरज आहे इ.वर कुणाचेही दुमत नाही. तुलना चुकीची आहे असं म्हणणं आहे. उदा. " तुमच्या गावात दारू पिऊन नव-याने बायकोचा गळा दाबून जीव घेतला. त्यापेक्षा आमच्याकडे बरं , दारू पिऊन नवरा बायकोला मारझोड करतो, कोंडून ठेवतो पण जीव नाही घेत हो." असं म्हणण्यासारखं आहे. तेही भयंकर पण हेही भयंकरच.

In reply to by प्राची अश्विनी

अंतरा आनंद 16/04/2018 - 11:20
होय, मला, माझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटते. कारण कायद्याचा बडगा.
हे धागाकर्तीने स्पष्ट केल्यावरही आपल्या आणि त्या देशाच्या लोकसंख्येची तुलना करणे, ओमानच्या कट्टरतेची मापे काढणे, यातून काय साध्य होणार ? धागाकर्तीनं एखाद दुसर वावगं वाटणारं लिहीलंही असेल तरी या घटनेत कोणत्याही कारणास्तव एका अजाण मुलीचा असा घृणास्पद वापर, आरोपीँच्या बाबतीत सुरु असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न याचा निषेध करण्याकडे चर्चा वळवणे एक सामान्य, प्रामाणिक नागरीक म्हणून आपलं कर्तव्य नाही का ? त्याऐवजी घटनेला कोणत्याही तुलनेकडे वऴवून आपण या प्रकरणी सुरू असलेल्या राजकारणातलं एक अगदी नगण्य का होईना प्यादं बनतोय हे लक्षात घ्यायला नको का? या अश्या भावनाप्रधानतेमुळेच राजकारणी आपाआपली पोळी भाजून घेतात आणि देश्यातल्या कायदासुव्यवस्था असूनही नसल्यासारख्या अवस्थेत काहीही बदल होत नाहीय.

In reply to by अंतरा आनंद

माहितगार 16/04/2018 - 11:41
...भावनाप्रधानतेमुळेच ..... पुन्हा तीन बोटे आपल्याकडे आहेत. ( इथे राजकरण्यांच्या तमाशांचे स्वागत कुणीच करत नाही हे वे सानल )
....तुलनेकडे वऴवून ....
पुन्हा तीन बोटे , चुकीचे गोलपोस्ट उभारण्याची जबबदारी किती नाकारली तरी तर्क सुसंगत ठरत नाही.
....आरोपीँच्या बाबतीत सुरु असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न याचा निषेध करण्याकडे चर्चा वळवणे एक सामान्य, प्रामाणिक नागरीक म्हणून आपलं कर्तव्य नाही का ?
आपण स्वतः ह्या चर्चा मुद्यावर चर्चा मर्यादीत ठेवल्ली तर चर्चा तिकडे जाण्याच्या सम्धी वाढल्या असत्या . अपणही लेखिकेच्या चुकीच्या गोलपोस्ट जवळ अजून एक चुकीचे गोलपोस्ट उभे करता आणि गोल दुसरी कडे करा म्हणता याला काय अर्थ आहे ? इथेही तीन बोटे आपल्या स्वतःकडे आहेत
होय, मला, माझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटते. कारण कायद्याचा बडगा. ....हे धागाकर्तीने स्पष्ट केल्यावरही
ओमान मधल्या आणि भारतातल्या कायद्याच्या बडग्यात फारसा फरक नाही हे संदर्भासहीत सिद्ध करुनही चुकीच्या इंप्रेशन मध्ये रहाण्याचा आणि तुलना नको म्हणत तुलना ओढवून घेणारे प्रतिसाद आणि उपप्रतिसाद देत चुकीचा गोलपोस्ट सांभाळत बसणारी बोटे आपलीच आपल्याच दिशेस निर्देश करतात किंवा कसे ?

In reply to by अंतरा आनंद

भंकस बाबा 20/04/2018 - 23:27
शरीयतनुसार दंड देणार असतील तर एका स्त्री ची साक्ष प्रमाण मानण्यात येणार नाही आहे, म्हणजे पीडित स्त्रीने तक्रार करताना साक्षिदार पण घेऊन जावा मुस्लिम देशात स्त्रियावर अत्याचार म्हणजे लाहोलबिलाकुवत !

यशवंत पाटील 16/04/2018 - 08:38
ताई, तुम्हारा चुक्याच.. तुम्हाला काय वाटल तरी मेरा देश महान असच बोलायला पाहिजे - अस सांगणारे आयडी थोर आहेत. औघड आहे. तुम्ही लिहिल ते पोचल आणि पटल. बायांची आबाळ पाहिलेला...

In reply to by यशवंत पाटील

विशुमित 16/04/2018 - 11:45
प्रॉब्लेम काय झालाय माहिती का, या प्रकरणात भाजपचे २ आमदार, हिंदू एकता मंच, आरोपी हिंदू, नरेंद्र मोदींचे बराच वेळ धरलेले मौन (उपोषण) आणि तुम्ही म्हणता तसे "मेरा राष्ट्र (?) महान" या सर्व गोष्टींना डिफेन्ड करायचे म्हंटल्यावर तुलनात्मक (?) मतमतांतरं होणारच. (हिंदू आरोपीना डिफेन्ड करतात हे म्हणणे अतार्तीक होईल पण विरुद्ध बाजूला बकरवाल आहेत म्हंटल्यावर चर्चा तर होणारच ना पाटील)

In reply to by माहितगार

यशवंत पाटील 16/04/2018 - 13:43
साहेब, जरा थंड घ्या. मनात आलं ते त्यांनी लिहिलं ते कुणाला पटल, कुणाला नाही. लगे त्यांना नागरिक शास्त्र शिकवायला लागले लोकं... अहो, त्यांना बी कळत असणार की. तस बघायला गेल तर काथ्याकूटमधी लेख नसताना इतकी चर्चा कशापायी? तुमच्यावाणी काय मला जास्ती लिहता येत नाही. समजुन घ्या जराशीक.

In reply to by यशवंत पाटील

माहितगार 16/04/2018 - 14:12
तस बघायला गेल तर काथ्याकूटमधी लेख नसताना इतकी चर्चा कशापायी?
अंशतःच बरोबर , सार्वजनिक मंच आहे, प्रतिसाद सुविधा समीक्षेसाठीच दिलेली आहे . आमचा आक्षेप नसलेला स्वतंत्र धागा चर्चा सुद्धा चालू केली आहे . आक्षेप तुलनेचा चुकीचा मुद्दा लावून धरण्यावर आहे . लेखिका चर्चेत अनुभवी आहेत ज्यांना तुलनेचा मुद्दा लावून धरायचा आहे त्यांच्या मुद्याची योथोचीत चिकित्सा ओघाने येतेच . आज माझ्या घरातील स्त्रिया बाहेर सुरक्षित पाने वावरून आल्या आहेतच बाकीच्यां कोट्यावधी स्त्रिया बाहेर या क्षणी भारतात सुरक्षित पाने वावरत असतील , काळजीच्या गोष्टी भारतात नाही असे नाही पण काळजीच्या गोष्टींची काळजी सुरक्षे विषयी चर्चा करून करणार कि stereotype तयार करून भीती चे वातावरण वाढवण्यात हात भार लावणार नेमके काय तर्क सुसंगत आहे ? हे आपणच सांगा

वीणा३ 16/04/2018 - 09:22
" मी दरवाजे लावून बसते."तुम्हाला काय म्हणायचं आहे ते नीट कळलं. इथल्या वादात नाही पडणार, पण असं काही वाचलं ना कि घरातून बाहेर पडायची सुद्धा भीती वाटते. ८ वर्षाच्या मुलीचे (खरंतर कोणाचेही) हाल करणाऱ्याची "जनावर" हि एकाच जात / धर्म असतो. मीडिया वर असले फोटो दाखवण्यासाठी अतिशय स्ट्रिक्ट नियम केले पाहिजेत, विचारही करवत नाहीये त्या मुलीचा आणि तिच्या घरच्यांचा, माझा ८ महिन्याचा मुलगा घरात झोपला होता, हि बातमी वाचल्यावर ४ वेळा त्याच्या कडे बघून आले. "त्यामुळे बाकीचे देश काही का करत असेनात, भारत बायकांसाठी अवघड देश आहे हे मला मान्य आहे. आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे. " अतीवेळा सहमत. मध्ये एक बातमी अली होती कि लो वेस्ट जीन घालून बाईक वर बसलेल्या एका मुलीच्या जीन्स मध्ये जळती सिगारेट टाकली. ओळखीतल्या कित्येक "बायकांची" प्रतिक्रिया होती कि असे कपडे घातले कि असंच होणार, नीट कपडे घालावे. काय बोलावं कळत नाही.

In reply to by वीणा३

माहितगार 16/04/2018 - 11:52
...माझा ८ महिन्याचा मुलगा घरात झोपला होता, हि बातमी वाचल्यावर ४ वेळा त्याच्या कडे बघून आले.
आपण आपल्या मुलावर सुयोग्य संस्कार नेमके कसे कराल ? की पुढेचालून तो योग्य मार्गावर राहील
...मी दरवाजे लावून बभित"तुम्हाल काय म्हणायचं आहे ते नीट कळलं. इथल्या वादात नाही पडणार, पण असं काही वाचलं ना कि घरातून बाहेर पडायची सुद्धा भीती वाटते.
.. लेखिका आणि लेखिकेचे समर्थक चर्चा सुरक्षा कशी वाढवता येईल एवजी स्वतःला आणि इतरांना भितीच्या वातवरणात गुरफटवत तर नाही आहेत. आपण वर्णन केलेल्या कपडे कसे घालावे सांगणार्‍या स्त्रीयाही भितीच्या वातावरन निर्मितीत गुरफटवून घेत नाही किंवा कसे ?

गामा पैलवान 16/04/2018 - 12:26
अंतरा आनंद,
आपल्या देशाच्या बदनामीनं खूपच दु:ख झालेलं दिसतय लोकांना.
खरंय हे. देशात बायका सुद्धा येतात. त्या स्त्रियांचीही नाहक बदनामी होतेय. आ.न., -गा.पै.

गवि 16/04/2018 - 12:52
भावनेच्या भरात काहीसा आमिर खान इफेक्ट (देशात असुरक्षित वाटतं, देश सोडण्याविषयी) घडून गेला असावा. त्यात उद्वेगाचा भर हा फॅक्टर जास्त असावा. भावना समजल्या.

म्हात्रे काका, आपल्या देशाची बदनामी परदेशी लोकांसमोर करु नये हे तत्वतः मान्य असलं तरी जर एखादी परदेशी स्त्री भारतात येणार असेल तर मी तिला ह्या वास्तवाची नक्कीच जाणीव करून देईन. ह्याचं कारण सध्या सतत कानावर येणाऱ्या ह्या रेपच्या बातम्या इतकं मर्यादित नाही. भारतात सगळीकडेच स्त्रियांना निर्धोक फिरता येत नाही. परिस्थिती कमी अधिक प्रमाणात वाईट असेल पण वाईट आहे हे नक्की. एकंदरीतच स्त्रियांना कमी लेखणे पासून ते निव्वळ उपभोगाची वस्तू समजणे ह्या सर्रास घडणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याची नोंद ठेवून आकडेवारी तयार केली जाते का ते माहीत नाही, पण हे सत्य आहे. म्हणजे बाईशी बोलताना नजर कुठे असावी इतके साधे संकेत सुद्धा सहज मोडले जातात, अगदी चकचकीत कॉर्पोरेट मध्ये सुद्धा. ही गोष्ट कुणी रिपोर्ट करणार नसलं तरी ती किती किळसवाणी आहे हे स्त्री झाल्याशिवाय कळणार नाही. (पण अंदाज येऊ शकतोच). पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये तर मन निगरगट्ट करूनच जावं लागतं. अगदी शाळकरी पोरं सुद्धा वाट्टेल तसे हात लावतात. मुळात आपण कोणत्याही बाईला कुठेही हात लावू शकतो असं वाटणं हेच किती विकृत आहे.. आता मी फक्त अमेरीका हा देश पाहिला आहे. तो ही फार थोडासा. किमान न्यू यॉर्क मेट्रो मध्ये तरी, कितीही गर्दी असली तरी तुम्हाला किळसवाणे स्पर्श होत नाहीत. तुम्ही वीतभर कपडे घालून फिरलात तरी कुणी नजरही वर करून बघत नाही. स्विमिंग पूल मध्ये अमेरिकन पुरुष असेल तर तो आहे की नाही हे ही लक्षात येणार नाही अशा बेताने अलुफ राहून पोहत असेल. तेच तिथे भारतीय पुरुष असेल तर एका क्षणात माझे सेन्सेस अलर्ट व्हायचे. सरसकटीकरण करायच नाहीये मला, पण एकुणात परिस्थिती अशी आहे... असावी.. तिथेही रेप होतात ना, पण बायका ते खुले आम सांगतात की माझ्यावर रेप झाला होता. समाज त्यांना वेगळं वागवत नाही. अर्थात भारत आणि अमेरिकेत फार फार फरक आहेत. संस्कृतीच वेगळी. पण उद्या एखादी अमेरिकन बाई भारतात येणार असेल तर स्त्री म्हणून मी तिला ह्या फरकांची जाणीव करून देईनच. देशाच्या वगैरे पलीकडच्या गोष्टी आहेत ह्या. मेरा भारत महान वगैरे भ्रम मला तसेही नाहीचेत, आणि स्त्री असणं हे माझ्यासाठी जास्त मोठं कनेक्शन आहे. तेव्हा ओमान बद्दलचे तांत्रिक मुद्दे चुकले असतीलही, पण भावना नीट समजल्यात मला लेखातल्या.

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 16/04/2018 - 13:58
आपल्या भावना लक्षात घेऊन अपल्याच विधाना वर आधारीत वेगळा चर्चा धागा भारत बायकांसाठी अवघड देश आहे ... ... काढला आहे, आपले त्या चर्चेत स्वागत आहे. तुलनेचा गोलपोस्ट वर चर्चा केंद्रित करणे आपली प्रायोरिटी असेल ससंदर्भ तर्कसुसंगत अभ्यासपूर्ण चर्चेची तयारी आहेच . पण आधीच्या सदस्यांप्रमाणे तुलनेच्या गोलपोस्ट ला का फोकस केले म्हणू नका, ते गोलपोस्ट आपणण स्वत: उभे केलेले आहेत आणि आपण त्या गोलपोस्ट ला सांभाळू इच्छित आहात हे लक्षात घ्यावे हि नम्र विनंती

In reply to by पिलीयन रायडर

श्वेता२४ 16/04/2018 - 14:34
आपल्य मताशी मीही सहमत आहे. चर्चा करणाऱ्यांनी दुसऱाय देशासमोर आपल्या देशाची बदनामी, आकडेवारी इ. पोकळ चर्चेत न पडता देशात जे भयानक घडत आहे त्यावर लक्ष देणे अधीक महत्वाचे. मिपावर बऱ्याच स्त्रिया कामानिमित्त घराबाहेर पडत असतील तशाच या देशातीलही कामानिमित्त रोज घराबाहेर वावरतात याचा अर्थ बाहेरचे वातावरण सुरक्षित आहे म्हणून त्या बाहेर पडतात असे नाही. बाहेर पडताना त्यातील किती जणींना बिनधास्त वाटत असेल याचा विचार करणे ही खरी गरज आहे. आणि याचे मूळ कुठेतरी पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात आहे. तसा दृष्टीकोन का तयार होतो याचा विचार करावा लागेल.

In reply to by श्वेता२४

माहितगार 16/04/2018 - 16:29
आणि याचे मूळ कुठेतरी पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात आहे. तसा दृष्टीकोन का तयार होतो याचा विचार करावा लागेल.
अगदी पिलीयन रायडर यांच्याच विधानावर आधारीत भारत बायकांसाठी अवघड देश आहे ... हा धागा फिअर मॉन्गरीन्ग न करता रचनात्म्क चर्चा व्हावी म्हणून काढला आहे . त्या धाग्यात आपल्या उपरोक्त विधाना संदर्भाने चर्चेत स्वागत आहे.

In reply to by पिलीयन रायडर

राही 16/04/2018 - 14:47
प्रतिसाद आवडला. पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते. भारतात मात्र ती सतत वखवखलेली असते. कुलाबा फोर्ट भागात फेरीवाले टॅक्सीवाले परदेशी बायकांशी किती विकृत वागतात ते पाहिले आहे. एक तर कुठल्याही महिलेशी सभ्य रीतीने वागावे ही इथली संस्कृतीच नसावी किंवा असलीच तर ती धुडकावण्यात काही गैर वाटत नसावे.

In reply to by राही

टवाळ कार्टा 16/04/2018 - 17:58
पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते.
हे फार चुकीचे वाक्य आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो....बहुतेकवेळा (प्रत्येकवेळा नाही) प्रत्येक पुरुष कोणत्याही स्त्रीशी बोलताना एकदातरी "natural attraction to opposite sex" या नजरेने बघतोच....फक्त ते बघणे "काही सेकंद ते नजरेसमोर असेपर्यंत" यामध्ये कुठेही असू शकते...पाश्चात्य देशांत लोकांना शारिरीक जवळीक फार लवकर आणि जास्त वारंवारीतेने मिळते त्यामुळे "तसे" बघणे जास्त वेळ लांबत नाही...मध्य-पुर्वेत किंवा आशियायी देशांत (Indian subcontinent) असा प्रकार नसल्याने बहुतेकदा "जमेल तितके आणि जमेल तेव्हा" काहीतरी बघावे/मिळावे याची तीव्रता जास्त असते...अर्थात परस्पर संमतीशिवाय अथवा समोरच्या व्यक्तीला uncomfortable काहिहि करणे हे चूकच आहे त्यामुळे "पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते." हे सरसकटीकरण करुन काळ्या-पांढर्यात विभागणी करणे चूक

In reply to by टवाळ कार्टा

बिटाकाका 16/04/2018 - 19:19
काही अंशी सहमत. पण मुळात ते पण तेच करतात असं म्हणणं तितकंच चूक आहे जितकं इथले पुरुष करतात असं म्हणणं आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. -------------------------------- ही अशी सरसकटीकरण आणि एक प्रकारचा उपहास यांनी भरलेली वाक्ये ऐकली की वाटतं "इतर स्त्रियांकडे, माझा भाऊ फार वखवखलेल्या नजरेने बघतो, माझे वडील फार वखवखलेल्या बघतात, माझा नवरा फार वखवखलेल्या नजरेने बघतो, माझा मुलगा फार वखवखलेल्या नजरेने बघतो" वगैरे वाक्ये सर्रास कानावर पडू लागतील की काय. आणि मग एक खिन्नता आणि उदासीनता वाटते.

In reply to by बिटाकाका

माझा भाऊ बघतही असेल, उद्या मुलगा विचित्र वागेलही. नाही कोण म्हणतंय? हे बलात्कारी लोक कुणाचे न कुणाचे नातेवाईक आहेतच की! बिटकाका, बहुतांश वेळा घरातच असे प्रसंग घडतात. एखादा अनामिक सर्व्हे घेऊन पहा, अनेक जणी कबूल करतील की घरातल्याच कुणीतरी त्यांना त्रास दिलेला आहे. अगदी मुलीवर अत्याचार करणारे बाप ह्या जगात आहेत. माझं असं मत आहे की बायकांना बाप, भाऊ, नवरा हे कसे आहेत हे नीट माहिती असतं. फक्त त्या बोलायला घाबरतात. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं कुणी बोलताना सापडणार नाही, पण घडत आहेच.

In reply to by पिलीयन रायडर

बिटाकाका 16/04/2018 - 21:48
त्याचं प्रमाण नावाची गोष्ट असेलच की? ******************** स्टेरिओटाइप करताना थोडाही विचार केला जाऊ नये? माझ्या आजूबाजूच्या लोकांपैकी ०.५ टक्केही अशी वखवखलेली नजर घेऊन फिरत नाहीत. तुमचेही प्रमाण हेच असावे असे मत नाही, पण वरील वक्तव्य १००% प्रमाण गृहीत धरतंय आणि ते अतिशय खेदजनक तर आहेच शिवाय संतापजनकही आहे असे मला वाटते. माझ्या सज्जनपणावर असा सरसकट हल्ला करण्याचा अधिकार (किंवा स्वातंत्र्य) कोणी का घ्यावा? मला माझी सज्जनता आणि माझे संस्कार कुणासमोरही सिद्ध करण्याची तिळमात्रही गरज वाटत नाही. आणि माझ्यासारखेच बहुतेक सगळे वडील, भाऊ, नवरा मुलगा बाजूला असतात. कुठल्या मोजक्या नतद्रष्ट नीच लोकांसाठी सगळ्या पुरुषजातीवर आसूड उगारणे अजिबात योग्य नाही. याउपरही कोणी, कदाचित वैयक्तिक अनुभवांमुळे, असे स्वातंत्र्य उपयोगी आणत असल्यास अशा वक्तव्यांना फाट्यावर मारण्याशिवाय काय पर्याय उरतो? ************************* माझ्या मतातून कोणाला उद्धटपणा किंवा महिलांबद्दल अनादर भासत असल्यास, फारफारतर मी आगाऊ दिलगिरी व्यक्त करू शकतो, तसा हेतू असणे कदापि शक्य नाही.

In reply to by बिटाकाका

तुम्ही वैयक्तिक का घेताय हे? आपण जनरल मानसिकतेबद्दल बोलत आहोत. भारतात स्त्रियांना कमी लेखले जाते असं जेव्हा विधान केलं जातं तेव्हा माझ्या घरातल्या स्त्रियांना तर मी मनाने वागवतो ह्या प्रतिवादाला अर्थ नसतो. हे विधान स्त्रिया करतात तेव्हा त्याला अनेक अनुभवांची जोड असते आणि त्यातून त्या हे बोलतात. आम्ही जेव्हा म्हणतोय की भारतात पुरुष स्त्रियांकडे विचित्र नजरेने बघतात तेव्हा सगळेच्या सगळे भारतीय असेच आहेत असा अर्थ नसतोच. पण बहुतांश जागी स्त्रियांना हा अनुभव येतो. चांगल्या घरातले, एरवी सभ्य वाटणारे पुरुषही विचित्र वागू बोलू शकतात. पण ह्याचा अर्थ तमाम जनता अशीच आहे आणि तमाम बायका अत्यन्त पवित्र आणि सात्विक आहेत असाही होत नाही. हे चर्चेचे अध्याहृत संकेत आहेत असं मला वाटतं. भारतात कठुआ, उन्नव, आसाम, सुरत अशा अनेक ठिकाणी पाशवी बलात्काराच्या बातम्या एकत्र कानावर येत असताना स्त्रियांनी त्यांचा उद्वेग मांडला तर त्यात असे तांत्रिक मुद्दे का काढले जावेत? आपल्या देशात स्त्रियांची सुरक्षितता हा मोठा चिंतेचा विषय आहे हे मान्य करायला इतका त्रास का होत असावा? इतर देशातल्या ह्या संदर्भातल्या काही चार दोन भल्या गोष्टी इथे मांडल्या तर त्याचा त्रास का व्हावा? इथे कुणी कुणावर वैयक्तिक बोट दाखवत नाहीये आणि चांगले सभ्य पुरुष जगात नाहीतच असंही म्हणत नाहीये. पण दैनंदिन आयुष्यात "ट्रॉमा" वाटावा इतका त्रास मुली रोज सहन करतात. मनोरुग्ण माणसाने वागावं तसे विकृत बलात्कार भारतात होतात, घरातल्या माणसानेच वर्षानुवर्षे त्रास दिल्याच्या घटना सुद्धा इथे घडतात. काही मोजक्या पुरुषांचा सभ्यपणा इतका महत्वाचा वाटतो तिथे ह्या मुलींचा त्रास नगण्य आहे का? मी भारताबद्दल देशप्रेमाची भावना समजू शकते, पण ह्या नादात आपण प्रचंड शाररिक आणि मानसिक त्रासाला सामोऱ्या गेलेल्या स्त्रियांना विसरत आहोत का? चर्चेचा मुद्दा हाच आहे ना?

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 16/04/2018 - 22:20
चर्चेचा मुद्दा हाच आहे ना?
मॅडम, तुमचंच बरोबर आहे , आपल्याशी चर्चा करताना 'वुमेन आर फ्रॉम व्हीनस'चा अनुभव आला आणि अधिक शहाणा झालो. खाली सुखी माणूसचा प्रतिसाद सुद्धा बरोबर आहे की काय अशी भावना होते आहे.

In reply to by पिलीयन रायडर

बिटाकाका 17/04/2018 - 08:00
१. माझी वाक्ये तुम्ही तरी का वैयक्तिक म्हणून घेताय? मी भारतातील एक पुरुषांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय असं समजा की! २. आपण मुद्द्याभोवती गोल गोल फिरक्त आहोत. किती टक्के पुरुष तुम्ही म्हणता तसे आहेत? ही टक्केवारी अजिबात महत्वाची नाही असे गृहीत धरून वारंवार "सर्व पुरुष" असा उल्लेख अत्यंत खटकणारा आहे. काही पुरुष म्हणण्यात नेमकी अडचण काय? ३. इथे स्त्रियांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय नाहीये असं म्हणणारा कुठल्या आणि कुणाच्या प्रतिसादाचा संदर्भ आपण देताय? मला तरी असं सुचवणार कुठला प्रतिसाद दिसला नाही, तुम्ही दाखवून देता का? ४. काही मोजक्या पुरुषांचा सभ्यपणा? तुम्ही मुद्दा सोडताय. माझा मुद्दा काही मोजक्या लोकांचा नतद्रष्टपणा आहे. मुलींचा त्रास नगण्य वगैरे कोणालाच वाटत नसतो पण म्हणून सरसकट पुरुषांवर का दोषारोप? आणि यात देशभक्तीचा काय संबंध? स्त्रियांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांवर पण असेच लेबल लावले जाते का? ५. माझं तर उलट मत आहे की भारतातील पुरुष हा दिवसेंदिवस स्त्रियांबद्दल अतिशय संवेदनशील बनत चालला आहे आणि हे चांगले लक्षण आहे. त्याबरोबरच स्त्रियाही सेल्फ डिपेंडंट आणि कॉन्फिडन्ट होत चालल्या आहेत. यामुके खरतर काही दशकांपूर्वीपेक्षा अतिशय आशादायक चित्र आहे. हे सगळं बाजूला ठेवून वारंवार हा समाज स्त्रियांसाठी धोकादायक आहे म्हणणं अजिबात पटत नाही आणि खासकरून यासाठी समस्त पुरुषवर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे क्लेशदायक आहे.

In reply to by पिलीयन रायडर

nanaba 17/04/2018 - 12:18
ज्याच जळत त्यालाच कळत ही म्हण आठवतेय इथले प्रतिसाद वाचून. जे चा न्गले आहेत त्यान्नी विरो धी पक्शात न जाता , आम्हाला ज्या मानसिक त्रासातून जाव लागतय असल्या सततच्या बातम्या वाचून त्याबद्दल तुम्ही आमच्या बरोबर आहात. तुम्ही स्वतः चा न्गले असल्याने असे वागणार नाही. ़ऊनी क वागताना दि सले तर यथा शक्ती ते वू थाम्बवू , असे म्हणायला काय हरकत आहे. आअपण विरोधी पक्शात असण्याची गरज नाहीये

मर्द मराठा 13/04/2018 - 14:52
कोर्‍या बातमी नुसार.. फाशीची शिक्षा होणारेय.. कायद्यात बदल वगैरे वगैरे .. होय शिवाय 'केन्डल मार्च' आहेच. फाशी देणार म्हणजे.. ज्याने 'तिला' मरणप्राय यातना दिल्या सलग काही दिवस..मग तिच्या कुटुंबाला... त्याला फक्त ५-१० सेकन्दात संपवणार ?

अर्धवटराव 13/04/2018 - 21:19
माझं पिल्लू जर अशा परिस्थितीत सापडलं तर... कल्पना देखील करवत नाहि. व्हिक्टीम कुटुंबाला कुठल्या तोंडाने कायद्याच्या गोष्टी सांगणार आपण :( आपले भिकारचोट राजकारणी या परिस्थितीचासुद्धा फायदा करुन घ्यायला बघतील. खरच मेरा भारत महान.

सांरा 14/04/2018 - 11:52
जेव्हा या अत्याचाराचा बदला म्हणून लहान मुलांना तुरुंगात छळले जाते, कुटुंबांना घर सोडून पळून जावे लागते तेव्हाही मला असाच संताप येतो.... जेव्हा एका बलात्कारी पुरुषालाच तपासाची सूत्रे देण्यात येतात तेव्हाही मला असाच संताप येतो... आसामात एका महिन्या पूर्वीच एका पाचवीतल्या मुलीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळण्यात आले होते तेव्हा मला पण असाच संताप आला होता... जेव्हा लोक मुलींमुलींमध्ये भेदभाव करतात आणि दुसऱ्यांना दांभिक म्हणतात तेव्हाही मला असाच संताप येतो....

गामा पैलवान 14/04/2018 - 12:54
शिवकन्या, वेदना पोहोचली. आयसिसवाल्यांचे हातपाय तोडायला हवेत. बघा ना त्यांचीच अवलाद कशी फोफावलीये अल हिंद मध्ये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

शिव कन्या 15/04/2018 - 12:09
हो ना गामा पैलवान. त्यांचे तर आधी तोडायला पाहिजेत. त्यांचेच काय, जगभरात वेगवेगळ्या नावाने पसरलेल्या अशा सगळ्यांच्याच अवलादी नामशेष व्हायला पाहिजेत बघा.

In reply to by प्राची अश्विनी

पैसा 14/04/2018 - 18:08
जे झाले ते फार वाईट, पण isis active असलेल्या देशात मुली जास्त सुरक्षित आहेत आणि भारतात मात्र रस्तोरस्ती बायकांवर अत्याचार होत आहेत असा काहीसा अर्थ लेखातून निघतो आहे. त्याशिवाय लेखाचे शीर्षक सुद्धा जरा खटकले. मान्य की समोरच्या मुलीच्या नजरेतून अल हिंद "तुमचा देश" आहे, तरी...

In reply to by पैसा

शिव कन्या 15/04/2018 - 12:50
माझ्या लेखनात एक चुकले. मी ज्या देशात राहते, त्या ओमानचा उल्लेख केला नाही. हा अरब राष्ट्रातील सर्वात शांतता प्रिय, आणि मध्य आशियातील घडोघडीला युद्ध उकरून काढणाऱ्या देशांमध्ये शांतीदूताची भूमिका बजावणारा देश म्हणून ओळखला जातो. सध्याचे सुल्तान असेपर्यंत तरी हे आहे (हे सुल्तान १९७५ पासून आजपर्यंत कार्यरत आहेत).... पुढचे माहित नाही. बाकी सरसकट सगळ्याच अरब राष्ट्रांना ईसीसच्या रांगेत बसवणे गैर. त्यातून कुणी कसा अर्थ काढायचा याची मोकळीक ज्याला त्याला आहेच. दुसऱ्याच्या नजरेतून बघताना, कितीही कळले तरी आपल्या देशावरचे प्रेम आपल्याला तसे वळू देत नाही, हे ही समजण्या सारखेच. माझे हेच झाले, आणि अगतिकतेने शेवटी त्या शाळकरी मुलीला सांगितले, 'कुठेही जा, पण माझ्या देशात जाऊ नको.' खाली एका प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे , आत्मताडनात आपला हात धरणारे कुणी नाही. नसावेच. शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो.

In reply to by शिव कन्या

शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो. हे ठीक आहे. फक्त असे करताना, "आपण स्वतःच्याच देशाची आणि नागरिकांची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) नाचक्की करू नये", किमान इतका सारासारविवेक बाळगावा ही अपेक्षा अवाजवी नाही. एखाद्या दुर्दैवी घटनेसाठी सगळ्या देशाला जबाबदार धरून, तो परदेशी प्रवाश्यांसाठी असुरक्षित आहे, अशी अतिशयोक्ती करणे कितीसे बरोबर आहे ? प्रत्येक प्रवासी/अनिवासी व्यक्ती, प्रवास/वास्तव्य करत असलेल्या देशात, आपापल्या देशाची अनधिकृत (unofficial) प्रतिनिधी असते. तिच्या वागण्या-बोलण्यावरून इतरांच्या मनात तिच्या देशाची भली-बुरी प्रतिमा तयार होत असते. या जबाबदारीची जाणीव असणे ही सुजाण नागरीकत्वाची खूण आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

Nitin Palkar 15/04/2018 - 20:38
शेवटी प्रत्येकजण आपापला राग, चीड, संताप व्यक्त करायचा मार्ग आपापल्या परीने शोधतो. हे ठीक आहे. फक्त असे करताना, "आपण स्वतःच्याच देशाची आणि नागरिकांची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) नाचक्की करू नये", किमान इतका सारासारविवेक बाळगावा ही अपेक्षा अवाजवी नाही. एखाद्या दुर्दैवी घटनेसाठी सगळ्या देशाला जबाबदार धरून, तो परदेशी प्रवाश्यांसाठी असुरक्षित आहे, अशी अतिशयोक्ती करणे कितीसे बरोबर आहे ? अनंत वेळा सहमत

In reply to by शिव कन्या

पैसा 15/04/2018 - 23:58
पण ओमान gender ineqality इंडेक्स मध्ये युनो आकडेवारीत भारताहून वरच्या नंबरला आहे. एकूण लोकसंख्या फक्त ४४ लाख. याहून जास्त लोक मुंबईत राहतात. गुन्ह्यांच्या प्रमाणात तुलना अशक्य आहे. तुम्ही ओमानला गेलात. तुमच्या बाकी नातेवाईक मित्र मैत्रिणींचे काय? त्यातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या तुमच्या मते या नरकात राहत आहेत. कोणी सुहृद पुरुष असतील त्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार का? आरोपी पकडले गेलेत. तपास करणारा स्वतः बेघर झालेला हिंदू पंडित आहे. जात धर्म मध्ये कोण आणतोय? गुन्हेगारांना शिक्षा होईल. एवढी वाट तर न्यायपालिकेवर विश्वास ठेवून बघितली पाहिजे. आपल्या देशात कसाबला सुद्धा बचावाची संधी पुरेपूर दिली गेली होती.

In reply to by शिव कन्या

prasanna_kop 19/04/2018 - 16:51
शिव कन्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे ओमान शांती प्रिय आहे हे ठीक तसेच शांतिदूतांची भूमिका साकारणारा देश आहे तेही योग्य आहे पण ओमान मध्येही मुली आणि विशेषतः स्थानिक सोडून इतर देशीय स्त्रिया सुरक्षित नाहीत. तेथे हुकूमशाही असल्यामुळे असले झालेले प्रकार वार्तापात्रात चर्चिले जात नाहीत. सलालाह च्या नर्सची हत्या व बलात्कार विसरलात का? तिच्या हत्येवरून तिच्या नवऱ्यालाच ६ महिने कैदेत ठेवले होते शेवटी सुषमा स्वराज ना मध्यस्थी करून त्याला सोडवावे लागले. घाला मधील फिलिपिनो हत्या व बलात्कारासाठी तिच्या मित्रालाच अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला. मुक्त विचारांच्या फिलिपिनो स्त्री पुरुषांना बलात्कार करायची गरज नसते, सर्वाना माहित आहे कि हे गुन्हे स्थानिकांनी केले होते पण देशाचे नाव खराब होते म्हणून भारतीय/बांगलादेशी/पाकिस्तानी इत्यादींवर हे गुन्हे टाकले जातात दगडाने चेचणे हात पाय छाटणे तर दूरच राहिले तुम्ही तुमच्या ओमानी मैत्रिणीला एक गोष्ट जरूर विचारा कि ओमानमध्ये असली शिक्षा किती वर्षांपूर्वी दिली होती. तुम्ही कधी ओमान मध्ये ऑरेंज टॅक्सीने ड्राइवर च्या बाजूला बसून प्रवास केला आहे का? अशावेळी ९०% टॅक्सीवाले स्त्रीवर हात फिरवतातच यामध्ये त्यांना स्वतःच्या (८० +) किंवा स्त्री व मुलगी हिच्या वयाचहि (५ ते ६०) बंधन नसते कधी कधी तर जाणून बुजून आडबाजूला घेऊन जातात अशा वेळी कित्येक भगिनींनी चालत्या गाडीतून उडया घेतल्या आहेत. कधीतरी रुवी मध्ये शुक्रवारी फिरणाऱ्या घरकाम करणाऱ्या स्त्रियांची कैफियत ऐका म्हणजे येथे या बायकांवर त्यांचे स्थानिक मालक कोणत्या थराचे अत्याचार करतात ते समजेल बिचार्या भारतातील कुटुंब सांभाळायचे असते म्हणून मुकाट्याने सहन करत असतात. अशा दुधाने न्हालेल्या देशात (येथे मला ओमानची बदनामी करायची नाही आहे) स्वतःच्या सवंग प्रसिद्धी साठी तुम्ही आपल्या देशाची बदनामी करत फिरत आहात . मान्य आहे कि आसिफावर झालेला अत्याचार घृणास्पद व निंदनीय आहे व कायदा तिला योग्य न्याय मिळवून देईल व अपराध्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी माझ्या देशाचे नाव बदनाम करत फिरणे मलातरी योग्य वाटत नाही.

In reply to by prasanna_kop

arunjoshi123 19/04/2018 - 17:06
मान्य आहे कि आसिफावर झालेला अत्याचार घृणास्पद व निंदनीय आहे व कायदा तिला योग्य न्याय मिळवून देईल व अपराध्याला कठोरातील कठोर शासन व्हायलाच पाहिजे. पण त्याच्यासाठी माझ्या देशाचे नाव बदनाम करत फिरणे मलातरी योग्य वाटत नाही.
+११ =============== ही सर्व मंडळी शुद्ध कांगावेखोर आहे. भारतात दरवर्षी अमानुष बलात्कारांच्या घटना शेकडोंनी होतात, यांना नेमकी स्वतःची परंपरा, संस्कृती, देव, धर्म आणि देश बदनाम करायला पुरेशी संधी असते त्यावेळीच जाग येते. आणि इतके भावनात्मक लोक होतात कि .... बस्स..... समस्येबद्दल बोलायचंच नाही.

In reply to by प्राची अश्विनी

शिव कन्या 15/04/2018 - 12:32
जरा उलटा प्रवास .... मी जेव्हा इकडे (ओमान) यायचे ठरवत होते, तेव्हा 'अय्या, नको बाई तिकडे जाऊ, फार बंधने बायकांवर !' असे भारताची हद्द कधीच न ओलांडलेली मंडळी सांगत होती. तर आधीच या देशात राहणारे, नेट वरून जोडलेली मंडळी सांगत होती, 'या, काहीच problem नाही. सौदीसारखी बंधने नाहीत. ओमान लिबरल आहे.' मला ठरवता येत नव्हते बरेच दिवस. पण शेवटी विचार केला, 'नाही पटले तर निघून येऊ.' आले , राहिले , अजून रहात आहे. होय, मला, माझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटते. कारण कायद्याचा बडगा. एकूण सुरक्षेची आकडेवारी मला मिळाली तर इथे नक्कीच टाकेन. म्हणजे तुलनेला बरे जाईल. भारतच काय पण जगातल्या कोणत्याही देशातली मुलींच्या सुरक्षितेतची टक्केवारी वाढती रहावी यासाठी त्या त्या देशातील महिला संघटना, सरकारे कायकाय करतात, ते पाहणेही या निमित्ताने मोलाचे ठरेल. पण शेवटी, आपल्या घरात जळत असेल, तर जास्त दुखते, प्राची.

In reply to by शिव कन्या

हे आधीचे संदर्भ लेखात स्पष्ट होत नसल्याने सद्ध्याच्या घटनेशी तुलना होते. असो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे freedom of expression. रेप किंवा स्त्रियांवरील अत्याचारांच्या किती घटना गुन्हा म्हणून नोंदवल्या जातात आणि किती प्रत्यक्ष घडतात यात प्रचंड तफावत असू शकते. ज्या देशात धर्माधिष्ठित सत्ता आहे. आणि मिडीयाला freedom of expression नाही तिथे हे गुन्हे बाहेर येतील का याबाबत शंकाच आहे. त्यामुळे अशा अमानुष घटना घडूनही भारत आणि इतर अरब देश यामध्ये स्त्रियांची सुरक्षितता incomparable आहे.

तेजस आठवले 14/04/2018 - 20:01
लेख पटला नाही. घडलेली घटना वाईट आहे पण त्यासंबंधित ह्या लेखातले चित्रण एकांगी आहे.तुम्ही कळत नकळत काळे/पांढरे अशी विभागणी करून टाकली आहे असं वाटतंय.दुसऱ्या कुठल्याही देशात जा म्हणताय तर असं एखादा देश सांगू शकाल का की जिथे सगळे काही आलबेल आहे ?बरं हे सगळं एका अश्या देशातल्या मुलीला तुम्हाला सांगावसं वाटतंय की ज्या देशाच्या अधिकृत धर्मात एक स्त्री म्हणून तिचं स्थान नगण्य आहे ?नात्यातल्या पुरुषाला बरोबर घेतल्याशिवाय तिला घराबाहेरही पडता येत नाही का तिला कसलेही अधिकार नाहीत. बलात्कारासारख्या गुन्ह्यात साक्ष देताना तिची एकटीची साक्ष पुरी ठरू शकत नाही? माझा हा प्रतिसाद सरसकटीकरण करणारा वाटत असला तर तुमच्या ह्या लेखात पण असेच सरसकटीकरण होते आहे असे वाटते.

"एखाद्या एकेरी मुद्द्याचा पर्वत बनवून स्वताडन करणे" या प्रकारात भारतियांचा हात धरणारा दुसरा जनसमुदाय जगभरात सापडणे कठीण आहे. (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी) :(

नाखु 14/04/2018 - 22:27
इथं सगळं आलबेल आणि सुसंस्कृत आहे असं भाबडा आशावाद व्यक्त करणं जितकं बिनडोक आणि शहामृगावस्था आहे, तितकं किंबहुना काकणभर अधिकच सगळं नासल्यात जमा करणे आणि अतिरंजित प्रकटीकरण करणे आहे वास्तव या दोन्हींच्या मध्ये अगदी अंग चोरुन उभं राहिलं आहे,ते ना कुणाला दिसत नाही का दखलपात्र नाही हेच कळेना. अदखलपात्र नाखु खिजगणतीतही नसलेला

In reply to by नाखु

शिव कन्या 15/04/2018 - 13:01
जे मधलं चांगलं वास्तव आहे, ते तरी कुठं समोर येतं? भाबड्या आशावादातून बाहेर येईना आणि शहामृग अवस्थेतून कोण डोकं वर काढेना, ही गत अशा प्रसंगी आणखी बळजोर होते.

In reply to by शिव कन्या

नाखु 16/04/2018 - 09:21
प्रत्यक्ष आरोपी असलेल्या व्यक्तीच्या मुलीची प्रतिक्रिया आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रात छापून आली आहे.ती वाचली तर कदाचित या प्रकरणी आणखी काही बाजू असेलही असे वाटते

आरोपी कोणीही , कुठल्याही धर्माचे, पक्षाचे असो तरी कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि तीही जलदगतीने निकाली निघाली पाहिजे हीच मनापासून इच्छा.

नाखु पांढरपेशा

ट्रेड मार्क 15/04/2018 - 07:05
डॉक्टर म्हात्रे वर म्हणालेत तसं स्वताडन करण्यात भारतीयांचा हात धरणारे दुसरे कोणी नाही. घडलेली घटना नक्कीच दुर्दैवी आणि संतापजनक आहे. पण लगेच हिंदू असल्याची लाज वाटते, भारत स्त्रियांसाठी कसा असुरक्षित आहे याची चर्चा जोरात होते. तरी अजून गुन्हा सिद्ध व्हायचाय. पण नेहमीप्रमाणे आरोपी मुस्लिम असले की गुन्हा सिद्ध झाला तरी त्यात धर्म आणला जात नाही. पण हिंदू आरोपी असले की मात्र संपूर्ण हिंदू धर्मच दोषी असतो. जगातले कुठले देश स्त्रियांसाठी सुरक्षित आहेत? स्त्रियांना अगदी नखशिखांत झाकून ठेवणाऱ्या देशांमध्ये स्त्रिया अगदी सुरक्षित आहेत का? इंग्लंड सारख्या देशात झालेले Rotherham Scandal आणि Rochdale Grooming Scandal हे माहित आहेत का? स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या दोन आणि इतरही काउंटीमधल्या वय वर्षे ८ ते ५० मधील एकही स्त्री अशी नव्हती की जिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नव्हता. अमेरिकेत ओप्रा विन्फ्रे, मॅडोना सारख्या प्रथितयश स्त्रियांनी जाहीरपणे त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांविषयी सांगितलंय. सामान्य स्त्रियांची परिस्थिती काय असेल बघा. जगात कुठेही कुठल्याही वयाच्या मुली/ स्त्रियांवर सतत अत्याचार होत असतात, पण त्याला इतर कुठल्याही देशात धार्मिक किंवा देशाशी संबंधित रंग दिला जात नाही. पण जर वर दिलेल्या बातम्या नीट वाचल्यात तर त्यात अत्याचार करणारे पाकिस्तानी/ बांग्लादेशी आहेत. पण बातमीत मात्र एशियन म्हणलं गेलंय. आता समस्त भारतीय हिंदू पण एशियन आहेत, मग म्हणजे त्यांचा पण सहभाग गृहीत धरला गेलाय का? या बाबतीत पाकिस्तानी मुस्लिम असं का नीट म्हणलं गेलं नाही? या घटनेबद्दल भारतातील किंवा इतर देशातील मुस्लिमांनी काही बोलल्याचं सुद्धा आठवत नाही. जर्मनी सारख्या स्त्रियांसाठी अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या देशात सुद्धा घडलेली ही घटना बघा. अगदी अँजेला मर्केलनी सुद्धा या घटनेबाबत पुरोगामी पवित्र घेतला. हे आणि हे वाचा. यात उल्लेखलेल्या इतर घटना गेल्या २-३ महिन्यातल्याच आहेत आणि तितक्याच घृणास्पद आहेत. मग फक्त मुस्लिम मुलीवर हिंदू पुरुषांनी केलेल्या अत्याचाराची घटना का सगळीकडे एवढी पुढे आणली जातेय? फक्त काश्मीर मध्ये घडलेल्या घटनेची या पुरोगाम्यांना आणि कलाकारांना लाज वाटते? जिथे हिंदू मुलगी आणि मुस्लिम बलात्कारी आहेत तिथे एकाही मुस्लिम कलाकाराने किंवा विचारवंताने मुस्लिम असल्याची लाज वाटते म्हणलं नाही. किंवा हिंदूंना नावं ठेवणाऱ्या एकही हिंदू पुरोगाम्याने मुस्लिम धर्मावर निशाणा साधला नाही. आहे काही स्पष्टीकरण?

In reply to by ट्रेड मार्क

शिव कन्या 15/04/2018 - 12:57
आपण विपुल माहिती पुरवलीत. धन्यवाद. माझ्या स्वतः च्या लेखात मी कुठेही हिंदू असल्याची लाज म्हटलेले नाही, वा अमुक एक आहे, त्याचा अभिमान आहे असे म्हटलेलं नाही..... पण स्वतः च्या घरात जळत असले कि कुणाचे जळते, यापेक्षा घरचे जळते, हे जास्त सलते बघा साहेब. आणि, बाई म्हणून जास्त दुखते. म्हणून इरीशिरीत सांगते, जा बाई कुठेही, पण जाऊ नको माझ्या देशात. बाकी चर्चा, वाद चालू द्या.....

In reply to by शिव कन्या

ट्रेड मार्क 16/04/2018 - 05:01
तुम्ही म्हणताय ओमान तुम्हाला सगळ्यात सुरक्षित देश वाटतोय. ४४ लाख लोकसंख्या असणाऱ्या देशाची तुलना तुम्ही १३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाबरोबर करताय. ओमान मध्ये गुन्हे होत नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? गूगल सर्च केलात तरी कळेल. त्यातूनही किती घटना रिपोर्ट होतात आणि किती बाहेर येतात ही अजूनच वेगळी गोष्ट आहे. या रिपोर्ट मधील ओमान मधलेच स्त्रियांचे हक्क बघा. ओमान मध्ये तर घरगुती हिंसा आणि मॅरिटल रेप साठी काही कायदा सुद्धा नाहीये. याच रिपोर्ट मध्ये ओमान मधील १४०००० स्थलांतरित घरगुती काम करणाऱ्या (मुख्यतः स्त्रिया) या अत्याचाराच्या बळी आहेत, ज्यात लैंगिक अत्याचार सुद्धा आला. इथे वाचा. मग आता ओमान सुद्धा असुरक्षित मानायचा का? एखाद्या अर्धवट वयाच्या मुलीला तुम्ही ज्या देशात जन्माला, वाढलात त्याच देशाबद्दल इतकी निगेटिव्ह इन्फॉर्मेशन देताय. घटना घृणास्पद आहे हे मान्यच आहे, पण म्हणून संपूर्ण देश इतका वाईट आहे का? पुढचा प्रश्न विचारायला सुद्धा मला अप्रशस्त वाटतंय, पण मुद्दा सिद्ध करण्यासाठी नाईलाजाने विचारायला लागतोय, त्याबद्दल आधीच माफी मागतो. तुमच्या ओळखीच्या भारतात राहणाऱ्या सगळ्या स्त्रियानी असा कुठला अत्याचार प्रत्यक्ष अनुभवलाय का? आता तुम्ही या एका घटनेवरून भारत असुरक्षित असल्याचा निष्कर्ष काढलात. तर तोच तर्क पुढे वाढवून मी म्हणतो की भारतात स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये मुस्लिम पुढे आहेत. सन २०१८ मध्ये आत्तापर्यंत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या ६-७ घटना बघितल्या तर किमान ५ घटनांमध्ये मुस्लिम आरोपी आहेत. तसेच जगभरात झालेल्या बहुतांशी अतिरेकी कारवाया मुस्लिमांनीच केलेल्या आहेत. मग ओमान मध्ये हे उघडपणे तुम्ही तिथल्या लोकांना सांगू शकता का? या मुलीच्या पालकांना तुम्ही सांगितलं का की सन २०१८ मध्ये आत्तापर्यंत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या बहुतांश घटनांमध्ये मुस्लिम आरोपी आहेत. भारत असुरक्षित झालाय कारण मुस्लिमांची संख्या वाढते आहे? असो, आता तुम्ही भारत असुरक्षित असल्याचा निर्णय देऊनच टाकलाय तर तुमचे मत बदलणे अवघड दिसते आहे.

Topi 15/04/2018 - 11:55
As a Hindu I'm scared of Muslim in India. I'm sad my Religion Hinduism is declining and other religion are growing. I'm sad that people can nowadays can mock Hinduism and get away with that. Yes you heard it right this is thought of Most of Hindus nowadays. In name of Secularism Hinduism will die soon. Islam is taking over watch and see. All the Muslim actors are marrying Hindu girls that is nothing more than a love jihad. Islam is taking over India making me sad. Nobody can speak against Islam in India. So many rape happened against Hindu girls but no Bollywood and Tv serial actors can hold a sheet of paper or do Candle march. It's sad whatever happened to Asifa i condemned it. I'm worry about my children who will suffer in future because of this so called politician who are mocking Hinduism. Islam is taking over India sooner you realize would be better. Not only Islam I'm scared of every religion because every other religion is growing but Hinduism not. A Muslim guy us mocking Hinduism by this Post. But no one can do anything. Actors like SRK, Salman, Aamir can't attend Event when Netanyahu came. Reason Religion is more important. There is page called Humans of Hinduism in FB where so many jokes are made even my hindu friends are liking and laughing. I reported that page guess what my appeal rejected. I see many Anti Islam page are getting banned.

बलात्काराच्या केसमधे पिडीत व्यक्ती किंवा कुटुंबातील व्यक्तींची ओळख उघड करीत असतात का ? यासंबंधी काही लिखीत वा स्विकृत नियम आहेत का ?

In reply to by उगा काहितरीच

Section 228 A of the Indian Penal Code lays down the provisions barring the disclosure of identity of the victim of certain offences. It say that: “Whoever prints or publishes the name or any matter which may make known the identity of any person against whom an offence under section 376 (rape), section 376A (rape leading to death or making victim go into a permanent vegetative state), section 376B (sexual intercourse by husband upon his wife during separation) , section 376C (sexual intercourse by person in authority) or section 376D (gang rape) is alleged or found to have been committed (hereafter in this section referred to as the victim) shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to two years and shall also be liable to fine.” The only circumstances under which the identity can be revealed is either (a) by or under the order in writing of the officer-in-charge of the police station or the police officer making the investigation into such offence acting in good faith for the purposes of such investigation; or (b) by, or with the authorisation in writing of, the victim; or (c) where the victim is dead or minor or of unsound mind, by, or with the authorisation in writing of, the next of kin of the victim. In the case of the third exception it is further stated that it only applies “provided that no such authorisation shall be given by the next of kin to anybody other than the chairman or the secretary, by whatever name called, of any recognised welfare institution or organization”. Even in the case of printing or publishing “any matter in relation to any proceeding before a court” in these offences, without the previous permission of the court, punishment can mean imprisonment of up to two years along and a fine. As these sections clearly lay out, it is wiser not to report the name of a rape victim or a victim of any kind of sexual assault under any circumstances. दुवा : https://thewire.in/law/identity-of-rape-victims

माहितगार 15/04/2018 - 18:07
ईतर इस्लामिक देशांपेक्षा अल्पसंख्य धर्मीयांशी चांगली वागणूक ठेवणारा देश म्हणून ओमान कौतुकास पात्र आहेच. प्रोटेस्टन्ट जसे इतरांशी वागताना जसे अधिक सौजन्यपूर्ण असतात पण तत्वज्ञानानी कदाचित कॅथॉलिकांपेक्षा कट्टर असत (चुभूदेघे प्रोटेस्टन्ट तत्वज्ञानाबद्दल हे माझे व्यक्तीगत इम्प्रेशन आहे) तसेच काहीसे ओमानीन्चे असावे . त्यांच्या स्वतःच्या नागरीक मुस्लीम लोकांसाठी ते कट्टरच असावेत. (एकदा कट्टरतेची सवय झाली की कट्टरता वाटत नाही) पण लेखिकेने लेख टाकण्या आधी गूगलवर पुरेसा अभ्याकरुन लेख टाकला की बातम्यांच्या प्रभावात भावनेने ?
शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
लेखिका नेमकी कसली फेकुगिरी करत आहेत ? ओमान मध्ये 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' ह्या जावई शोधाचा नेमका संदर्भ कोणता ? गूगलल्यावर मला दिसणारी माहिती ओमान मध्ये ओमान पिनल कोड आहे, कोर्ट आहे आणि बलात्काराच्या गुन्ह्यास अधिकतम शिक्षा १५ वर्षान्ची जेल आहे. तुर्तास तरी भारतात अधिक शिक्षेची तरतूद असावी. इंग्रजी विकिपीडियातील Human rights in Oman लेखातून
Rape is punishable by up to 15 years in prison, and for cultural and social reasons many rapes probably go unreported. Domestic violence complaints are generally handled by authorities. Female genital mutilation is permitted and widely accepted and practiced, सम्दर्भ Human rights in Oman. In Wikipedia, The Free Encyclopedia. Retrieved 12:36, April 15, 2018, from https://en.wikipedia.org/w/index.php?title=Human_rights_in_Oman&oldid=828306826
खालील बातम्यांच्या लिन्का आपल्या अभ्यासासाठी * Oman crime: Filipina expat body found, rape and murder suspected * Rape in Oman * Omani national arrested for raping expat woman * RAPE IN OMAN: Men Pretend to be ROP and Kidnap a Woman for the Purposes of Rape * Outrage erupts in Oman after judge gives child rapist minimum sentence * Oman police arrest 20 expat women for wearing 'inappropriate' clothes * Ugandan women recount ordeal in Oman. भारतीय हैदराबादेत दुसरी पत्नी ठेऊन ओमानी शेखाने फोनवर ट्रिपल तलाक दिल्याचे उदाहरनाची बातमी मागे होती जरा अधिक गूगलल्यास मिळून जाईल . *

nanaba 15/04/2018 - 23:29
I am a Hindu. I love my religion. But a 8 Ur old gets gang raped. Is tortured.. killed.. and people talk abt religion? This is beyond me! She is 8 Ur old defense less child bloody hell. Stop defending what has happened.what happens in Oman or other countries doesn't make it better in India. Any lady & parents of any kids that step out of home have constant fear in their mind. Isn't that bad enough? What will make u say - it's not that bad? Just because this lady is staying abroad? I live here, in india & I feel ashamed that every single person doesn't condemn this, but brings religion in picture instead.

In reply to by nanaba

माहितगार 16/04/2018 - 00:10
अहो मॅकॉले पूत्र आम्ही म्राठीतन लिवा विन्ग्रजीतन लिवून आपण शाने हो नाई, असल्ये पाष्कळ इचार आपल्या पाशीच ठिवा . वाईट गोष्टीला कोणी बी डिफेंड केल नाय . धागा लेखिकेनेच धर्माचे नाव न घेता फसवा धार्मीक आधार घेतल्याचे संदर्भा सहित सिद्ध केले हाय. आमचा देश इतरांपेक्षा लाखपटीने चांगला हाय हे आकडेवारीने बी सिद्ध व्हतय .

In reply to by माहितगार

छ्या, छ्या ! विंग्लिशम्द्ये लिवलं म्हंजे कसं एकदम इम्प्रेशिव वाट्टं नाय का ? विंग्लिशम्दी आणि वर उद्धट भाषेत काहीही दामटून सांगितले व त्यात आस्तित्वात नसलेले आरोप बेमालूमपणे मिसळले (दुसर्‍या कोणी असे केले की त्याला, गोल पोस्ट बदलणे, असे म्हटले जाते, ती गोष्ट वेगळी) की मग एकदम भारी वैश्विक सत्य सांगण्याचा आव आणता येतो ! ;) :)

In reply to by माहितगार

nanaba 16/04/2018 - 10:44
अहो, असे वैयक्तिक होण्या पूर्वी इतर शक्य तांचा विचार केलात का? ब्राऊजर इश्युज वगैरे ऐकलेत का? वर २-३ इन्ग्रंजी प्रतिसाद आहेत, त्यां च्या अंगावर तुटून पडलात का? असो,वि षयांतर नको. तुम्ही स्त्री आहात का? तुम्हाला लहान मुले आहेत का? घरातील स्त्री शी बोलून बघा. जाऊन निवांत टेकडीवर एकटं बसलीये, नदीकिनारी बसलीये, हे करण्याची हिम्मत आज त्या करू शकतात का? किती बेसिक गोष्ट आहे ही! ओमान मधे काय घडतय ह्याच्या शी मला काय घेणं देणं आहे? माझ्या देशात मला सुरक्षित वाटत नाही हे सत्य पुरेसं त्रासदायक आहे. रोजच्या बेसिस वर. ह्यात धर्म, देश हे मुद्दे ये ऊच शकत नाहीत. एका प्रति कारासाठी सक्षम नसलेल्या जीवाब रोबर असे ८ -८ जण एकत्र ये ऊन वागतात तेव्हा लाज, वाझोंटा संताप, ते आपण /आपल्या घ रातलं नसावं म्हणून प्रार्थ ना, सततची काळजी, खबरदारी - हे किती भया नक आहे, हे एखाद्याला का कळू नये? मिपा सोडा, बाहेर तरी धार्मिक समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरली आहेत ना? हे तरी पुरेसं लाजीरवाणं वाटतं का नाही? अशांना (ब लात्कारी) खरोखरच दगडाने ठेचून मारावे , ती ही शिक्षा कमीच होईल असे वाटते.

In reply to by nanaba

I live here, in india & I feel ashamed that every single person doesn't condemn this, but brings religion in picture instead. तुमची गल्ली पार चुकली आहे (पक्षी: मुद्दा ध्यानात आलेला नाही) हे खेदाने सांगत आहे. बालकांवर अत्याचार आणि तेही लैंगीक अत्याचार असलेल्या निर्घृण गुन्ह्याचे समर्थन होऊच शकत नाही, याबद्दल इथेतरी कोणाचेच दुमत होण्याचे कारण नाही. अश्या प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कायद्यांत अनुकरणीय (exemplary) शिक्षेची तरतूद करावी असे मला स्वतःला वाटते. याशिवाय, धर्म हा मुद्दा तर इथे तरी, एखादा चुकार प्रतिसाद सोडता, तुम्हीच इतक्या टोकाच्या स्वरूपात अध्याहृत धरून घुसवलेला आहे ! तुमच्या ध्यानात आले नसले तर... मुख्य मुद्दा असा आहे की, "एखादा गुन्हा घडला म्हणून सगळ्या देशाला वेठीस धरण्याचा आणि सरसकट सगळ्या परदेशी नागरिकांसाठी देश असुरक्षित आहे, असे म्हणणे चूक आहे." कारण तसे करणे, देशाची अनावश्यक व बेहिशेबी (unproportionate) बदनामी होईल इतपत अतिशयोक्ती करणे होते. जणू काय, त्या मुलीने "ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असलं" तरी तिला भारतात निर्घृण गुन्ह्यांशिवाय इतर काहीच बघायला मिळणार नाही, अशी लेखिकेची खात्री झालेली आहे ! अश्या एखाद्या दुर्दैवी घटनेच्या पायावर परदेशप्रवासाचे निर्णय केले तर सर्व जगभरचे आंतरराष्ट्रीय दळणवळण बंद करावे लागेल, नाही का ?! तसेही, "काहीही कारण असो वा नसो, आपल्या देशाबद्दल अपमानास्पद लिहिणे-बोलणे हा भारतीय घटनेने दिलेला अधिकार आहे" असे म्हणणारे बरेच उदारमतवादी लोक भारतात आहेतच, तर मग परदेशात राहून असे केले तर काय बिघडले !" :( ================== अवांतर : मी स्वतः ओमानमध्ये १४ वर्षे वास्तव्य केलेले आहे. तेथिल जमिनी वस्तूस्थितीबद्दल मला चांगली माहिती आहे. सर्व स्तरांच्या ओमानी नागरिकांबरोबर माझे व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर सौहार्दाचे संबंध होते/आहेत. सर्वसाधारण ओमानी माणसाला भारताबद्दल आणि भारतिय माणसाबद्दल ममत्व व आदर आहे... आणि त्यांचे ते मत ओमानमध्ये काम करणार्‍या भारतिय नागरिकांशी आलेल्या संबंधातून आणि त्यांच्या भारतभेटींच्या अनुभवातून बनलेले आहे. तसेही भारत देशाशी ओमानचे व्यापारी संबंध आजचे नसून, शेकडो वर्षांचे आहेत... ब्रिटिश भारतात येण्याच्या बर्‍याच अगोदरपासूनचे. किंबहुना, ओमानमध्ये खनिज तेलाचा शोध लागण्याअगोदर भारतात येऊन काम करणारे अनेक ओमानी लोक (किंवा त्याचे पालक) मला तेथे भेटले आहेत. त्यामुळे, जेव्हा लेखिकेने "एक आडनीड्या वयातली शाळकरी पोरीला" भारताबद्दल प्रतिकुल मत सांगितले तेव्हा, इतर कोणापेक्षा, तिला आणि तिच्या पालकांना जास्त आश्चर्य वाटले असेल, असे मला वाटते. तरीही, 'कुर्‍हाडीचा दांडा...' बनणे टाळणे तर बरे होईल, असेच वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

nanaba 16/04/2018 - 10:46
सरसकट सगळ्या परदेशी नागरिकांसाठी देश असुरक्षित आहे, >> अहो परदेशी सोडा हो. देशी बायकांसाठी तरी सरसकट सेफ आहे का? पब्लिक ट्रांसपोर्ट ने प्रवास केलेल्या कुठल्याही बाईला विचारा!

In reply to by nanaba

परत गल्ली चुकली ! देशी बायकांसाठी तरी सरसकट सेफ आहे का? पब्लिक ट्रांसपोर्ट ने प्रवास केलेल्या कुठल्याही बाईला विचारा! १, पर्यटनासाठी भारतात आलेले किती परदेशी लोक पब्लिक ट्रांसपोर्टने प्रवास करतात ? २. पब्लिक ट्रांसपोर्टमधल्या समस्येचा उपाय काय ? इथे देशात असे प्रसंग होऊ नयेत यासाठी प्रयत्न करायचे, की त्याचे सरसकटीकरण करून आपला देश अत्यंत धोकादायक आहे अशी परदेशात जाहिरात करायची ? "आग रामेश्वरी सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी" असा प्रकार नाही काय हा ?! विकृत लोक ही काही केवळ भारताची खासियत नाही. अश्या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वच सुजाण लोकांच्या मनात चीड आहे, परंतू, त्यामुळे सर्व देशाची (आणि पर्यायाने सर्व भारतियांची ज्यात लेखिका, तुम्ही व आम्ही सर्वच गणले जातो) प्रतिमा मलिन करण्याने काय साधणार आहे ??? तसे करणे समतोल विचार/कृती करणे होईल का ? भारताची परदेशात नाचक्की करून परिस्थिती सुधारणार आहे की मुळ समस्या तशीच राहील आणि त्यावर अजून भारताची प्रतिमा खराब झाल्यामुळे अनेक नवीन समस्या निर्माण होतील ? किंबहुना, अशी नाचक्की करणार्‍या भारतियांकडे परदेशी लोकांनी संशयाने/तिरस्काराने/चेष्टेने पहायला सुरुवात केली तर ते त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे असेल... पण अश्या कृतीमुळे इतर भारतियांना झळ पोचली तर त्याची जबाबदारीही नि:संशय नाचक्की करणार्‍यांवरच असेल. विशेषतः, संस्कारक्षम वयाच्या परदेशी नागरिक मुलीसमोर आपल्या देशाची प्रतिमा खराब करण्याच्या कृतीत कितीसा समतोलपणा आहे ? अशी अस्थायी आणि अप्रमाणबध्द (out of proportion) स्वताडन कृती करून वर तिची प्रसिद्धी करणे व तिचे समर्थन करत राहणे, यामुळे अश्या कृतीमागच्या कारणपरंपरेबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले तर आश्चर्य वाटू नये !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पुंबा 16/04/2018 - 12:18
इथे धर्माचा इश्यु मध्ये आणला गेला नाही हे खरे आहे. परंतू, जर बातम्या नीट वाचल्या तर या घृणास्पद गुन्ह्याचं समर्थन करणारे कुठल्या आधारे करताहेत हे लगेच कळून येईल. गेले अनेक दिवस हिंदू एकता मंच नावाची संघटना गुन्हा दडपून टाकण्याचा, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा जो प्रयत्न करते आहे, सत्ताधारी भाजपचे लोक ज्या घाणेरड्या प्रकारे पिडितेवर जरासुद्धा सहानुभुती न दाखवता गुन्हेगारांना अटक न करावी यासाठी प्रयत्न करताहेत त्याचा निषेध इथे करायचा नाही? ८ वर्षांच्या चिमुरड्या मुलीवर इतक्या अमानुष पद्धतीने बलात्कार करणार्‍या नराधमाचे समर्थन धर्माच्या आधारे केलं जात असेल तर त्याची प्रतिक्रिया उमटणार नाही का? आज चक्क तिला न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढणार्‍यांना पाकिस्तानी म्हटले जात आहे पेड ट्रोलांकडून हे सगळं खरंच इतकं लाईटली घेण्यासारखं वाटतं तुम्हाला? माझ्या मते नानबांच्या म्हणण्यावर इतकी टोकाची प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे..

In reply to by पुंबा

बाकी मुद्द्यांबद्दल मतभेत नाहीतच. पण... मात्र, "परदेशात भारताची नाचक्की करणे हा त्यावरचा दुरान्वयानेही उपाय होऊ शकत नाही" हे माझे म्हणणे आहे. त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की एका संस्कारक्षम वयाच्या परदेशी मुलीपुढे करणे म्हणजे,... असो.

In reply to by पुंबा

nanaba 17/04/2018 - 07:38
मी एक स्त्री आहे. हे होताना दिसत तेव्हा आतून काय वाटत ते कदाचित पुरुषान्ना त्या प्रमाणात कळत नसाव अस वरच्या रिअ‍ॅक्शन्स वरून वाट ले. उद्वी ग्न. I read this need first when I read this article (limited tv, news paper). Felt so devastated,couldn't sleep! Irrespective of what they do in Oman, irrespective of any details about involved , this is terrible. Can't express what I feel.

मला कोणत्याही आकडेवारी मध्ये आणि राजकारणात पडायचं नाही, पण आपला देश बायकांसाठी फार बेक्कार होत चालला आहे हे माझंही मत आहे. प्रश्न स्वातंत्र्य वगैरे नसून एकंदरीत बायकांना बघण्याची, वागवण्याची पद्धत गचाळ आहे. फेसबुक वगैरे वर कित्येकदा कुणी पुरुषाने काही केलं की ट्रॉल्स असतील भले, पण ह्याच्या घरातल्या बायकांचा रेप केला पाहिजे असं लोक खुले आम लिहितात. गर्दीच्या जागी काय प्रकार होतात हे वेगळं लिहायला नको. कपडे हा तर भलता सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. फॉरेनर येतात त्या बायकांच्या मागे कसे लागतात ह्या बातम्या आता दुर्मिळ नाहीत. रात्री बेरात्री निर्धास्त फिरण्याची सोय नाही. कुठं एकटं असण्याची सोय नाही. रेप हा फिजकली दिसतो, पण रोजच्या आयुष्यात जे घडतं ते सांगताही येत नाही. त्यामुळे बाकीचे देश काही का करत असेनात, भारत बायकांसाठी अवघड देश आहे हे मला मान्य आहे. आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे.

In reply to by पिलीयन रायडर

अशी मानसिकता ही भारतात एक मोठी समस्या आहे यात वाद नाहीच. त्यासाठी भारतातच काही कडक उपाय करणे योग्य असेल. मात्र, "परदेशात भारताची नाचक्की करणे हा त्यावरचा दुरान्वयानेही उपाय होऊ शकत नाही" हे माझे म्हणणे आहे. त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की एका संस्कारक्षम वयाच्या परदेशी मुलीपुढे करणे म्हणजे,... असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विशुमित 16/04/2018 - 12:31
त्यापुढे जाऊन, अशी नाचक्की एका संस्कारक्षम वयाच्या परदेशी मुलीपुढे करणे म्हणजे,... असो.>> ==>> म्हात्रे साहेब, परदेशात जाऊन संस्कारक्षम पब्लिक समोर देशाची नाच्चकी करण्यात "एक" व्यक्ती अव्वल स्थानी आहे. उगाच एक आठवण आली. असो..

In reply to by विशुमित

गाडी नको नको म्हणता राजकारणावर आलीच ना शेवटी ?! (कपाळावर हात मारणारी स्मायली) वादासाठी तुमच्या मनात काय आहे ते खरे मानले तरी, दुसर्‍या चुकीने पहिली चुक सुधारते का... विशेषतः त्यांचे संदर्भ फार वेगवेगळे असले तरी केवळ मुद्दा जिंकण्यासाठी त्यांची तुलना करण्याच्या मोहात पडावे काय ? नाही असे माझे मत आहे. तुमचे काय म्हणणे आहे ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विशुमित 16/04/2018 - 12:55
गाडी नको नको म्हणता राजकारणावर आलीच ना शेवटी ?>> ==>> ह्या प्रकरणावर राजकारण सुरु झाले म्हणूनच तर देशातील सर्व स्तरातून लोक पेटून उठून आवाज उठवायला लागले. नाहीतर ही चर्चा कठुआ आणि जम्मू पुरतीच सीमित राहिली असती. === वादासाठी तुमच्या मनात काय आहे ते खरे मानले तरी,>> ==>> ह्या वादात काहीच हाशील नाही हे मला चांगले ठाऊक आहे. === विशेषतः त्यांचे संदर्भ फार वेगवेगळे असले तरी केवळ मुद्दा जिंकण्यासाठी त्यांची तुलना करण्याच्या मोहात पडावे काय ? नाही असे माझे मत आहे. तुमचे काय म्हणणे आहे ?>> ==>> मुद्दा जिंकण्यासाठी तुलनात्मक मतमतांतरे कोठून सुरु झाली हे वाचकांना अगदी स्पष्ट दिसत आहे. माझे म्हणणे मांडण्याची आवशक्यता वाटत नाही.

In reply to by पिलीयन रायडर

पुंबा 16/04/2018 - 12:24
अगदी सहमत. आपल्या देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्‍यांना खरेच देशात सुधारणा व्हाव्यात असे वाटते की नाही याबद्दल निश्चितच संदेह निर्माण होतो. आज, कठुवा रेपबद्दल ज्या निर्विकारपणे, निर्लज्जपणे पिडितेच्या मुस्लिम असण्याबद्दल आनंद व्यक्त होतो किंवा विरोध करणार्‍यांबद्दल पाकिस्तानचे हस्तक असल्याचे आरोप केले जातात त्यावरून अ॑अम्ही जो देश आपला मानतो तो हा नाही अशी भावना मनात येणे अस्वाभाविक नाहीच. निर्भया हत्याकांडातील आरोपींचा निषेध करणारे आज 'नाही पण या प्रकरणात दुसरी बाजू असू शकते' असा कांगावा करतात तेव्हा यांना 'न्याय' होण्यापेक्षा धर्म-र्धर्म खेळण्यातच रस आहे हे सिद्ध होतं..

In reply to by पुंबा

प्रसाद_१९८२ 16/04/2018 - 13:18
आपल्या देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्‍यांना खरेच देशात सुधारणा व्हाव्यात असे वाटते की नाही याबद्दल निश्चितच संदेह निर्माण होतो. -- एक वेळ असे मानून चालू की देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्‍यांनी देशात सुधारणा घडवण्यात काहीच हातभार लावला नाही, बर मग तुम्ही देशाला नावे ठेवणार्‍यांनी देशात सुधारणा घडवायला किती हातभार लावलाय ?

रेप हा फिजकली दिसतो, पण रोजच्या आयुष्यात जे घडतं ते सांगताही येत नाही. त्यामुळे बाकीचे देश काही का करत असेनात, भारत बायकांसाठी अवघड देश आहे हे मला मान्य आहे. ह्यापेक्षा अधिक पुरावा कोणता असू शकेल?

In reply to by मार्मिक गोडसे

गामा पैलवान 16/04/2018 - 02:27
मा.गो. भारतात बायकांना वावरणं उत्तरोत्तर कठीण होत चाललंय हे खरं! मात्र तरीही भारतातल्या बलात्कारांची दरडोई संख्या उर्वरित जगाच्या मानाने नगण्य आहे. अर्थात हे भारतातल्या अनागोंदीचे समर्थन नाही. सांगायचा मुद्दा इतकाच की ठोस पुरावा वेगळा आणि सर्वसाधारण आकलन (=परसेप्शन) वेगळं. आ.न. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सांगायचा मुद्दा इतकाच की ठोस पुरावा वेगळा आणि सर्वसाधारण आकलन (=परसेप्शन) वेगळं. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? कुलाब्या पासून फोर्ट पर्यंतच्या फुटपाथवर परदेशी स्त्रियांना किंचाळताना व त्यांच्याकडून आपल्या देशबांधवांना मिळालेला प्रसाद प्रत्यक्ष बघितला आहे. गर्दीच्या वेळी लोकलमध्ये आपल्याबरोबर स्त्रीला घेवून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य प्रकार असतो. प्रत्येक घटनेची नोंद होतेच असं नाही.तुलनेनं बलात्कारांच प्रमाण कमी आहे म्हणून ह्या देशात स्त्री सुरक्षित आहे असं म्हणणाऱ्यास दंडवत! विकृत पुरुषांपासून मुबईत फक्त स्त्रीच नव्हे , तर तरुण मुलंही सुरक्षित नाहीत. हां, मुंबई भारतात येत नसेल तर गोष्ट वेगळी.

In reply to by मार्मिक गोडसे

गामा पैलवान 16/04/2018 - 12:23
मा.गो., 'भारत हा असुरक्षित देश वाटंत असेल तर खुशाल सोडून जावे' असा आडमुठा प्रतिसाद देणं सोपं आहे. मात्र तसा देत नाही. जे तुम्ही बघितलंय तेच मीही बघितलंय. पण चर्चा करतांना भावनांच्या आधारे करता येत नाही ना. त्यासाठी ठोस आकडेवारी लागते. सर्वात गंभीर अपराध अधोरेखित होईल अशी आकडेवारीच जमवायला हवी ना? जेणेकरून सत्वर तोडगा निघेल. अशी आकडेवारी जमवतांना प्रस्तुत स्त्रीकडे वैयक्तिक लक्ष देणं जमणार नाही. पण तो काही मलीन हेतू नव्हे. तसंच स्त्रियांविरुद्धच्या गुन्ह्याच्या दरडोई आकडेवारीनुसार भारतात जास्त सुरक्षितता आहे हे देखील मलीन विधान धरण्यात येऊ नये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्यासाठी ठोस आकडेवारी लागते. सर्वात गंभीर अपराध अधोरेखित होईल अशी आकडेवारीच जमवायला हवी ना? हे काम कोणाचे आहे? करताहेत का ते काम जबाबदारीने?का आमच्या आयाभगिनींनी रोज घरातून बाहेर पडलं की कामावर पोचण्यापूर्वी आणि कामावरून घरी परतन्यापूर्वी पो. स्टे. तक्रार नोंदवावी अशी आपली अपेक्षा आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये CCTV लावा आपोआप डाटा मिळेल. 'भारत हा असुरक्षित देश वाटंत असेल तर खुशाल सोडून जावे' असा आडमुठा प्रतिसाद देणं सोपं आहे. मात्र तसा देत नाही. उपकार करत नाही तुम्ही. घटनेनं कोणाला तसा अधिकार दिलेला नाहीये.

In reply to by मार्मिक गोडसे

गामा पैलवान 16/04/2018 - 18:25
मा.गो.,
उपकार करत नाही तुम्ही. घटनेनं कोणाला तसा अधिकार दिलेला नाहीये.
मला नेमकं हेच बरळायची इच्छा नव्हती. ती तुम्ही पुरी केलीत. याचसाठी थांबलो होतो. त्याबद्दल धन्यवाद! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मला नेमकं हेच बरळायची इच्छा नव्हती. ती तुम्ही पुरी केलीत. याचसाठी थांबलो होतो. मला तुमच्या सापळ्यात अडकवल्याबद्दल तुमचे अभिनंदन! मला वाटलं होतं महिला अत्याचार आकडेवारी संकलन ह्यावर तुम्ही काहीतरी उपाय सुचवाल.

अंतरा आनंद 16/04/2018 - 06:33
लेखातल्या वेदना पोचल्या. लेखात कुठेही ठराविक कोणावर दोषारोप नसतानाही ’अल हिंद’ वरून देशभक्त लोकांच्या भावना दुखावलेल्या दिसता आहेत. थोडा ललित अंगाने लिहीलय हे लक्षात न घेता लेखिकेनं आपल्या राष्ट्राची मुस्लीम देशातल्या लहान मुली जवळ बदनामी केली ह्यावर दु:ख, संताप व्यक्त करणारी मेंबरं बघून वाईट वाटलं. आपल्या देशाच्या बदनामीनं खूपच दु:ख झालेलं दिसतय लोकांना. एवढंच दु:ख लोकांना, " हिंदू एकता मंच" आरोपींना पाठिंबा देण्यासाठी तिरंगा फडकवत निदर्शनं करते, या मोर्च्यात सरकारमधील दोन मंत्री सहभागी होतात, हे बघून होतय की नाही? जबाबदार अधिकारपदावर (राजस्व अधिकारी) , पोलीस यासारख्या व्यक्ती या घटनेत आरोपी-सहअरोपी आहेत याचं वाईट वाटतय की नाही? अर्थात, मुलीचं चित्र आणि नाव उघड होणं हे मिडीया किती नीच पातळीला पोहोचू शकतो याचं उदाहरण आहे, यात वाद नाही. आणि हो, सिरिया, पाकिस्तान, इराण, इराक या मुस्लिम देशांशी तुलना करता आपण खूपच मागे आहोत. लाजच वाटली पाहिजे याची आपल्याला. अर्थात उनाव, कथुआ आणि आता सूरत या सारखा अनेक घटना , मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा करण्या ऐवजी विचारी नागरीकही कथुआ प्रकरणी हिंदू -मुस्लीम धुळवडीत ज्या हिरीरीनं सहभागी झालेय ते बघून आपण आपलं ध्येय्य लवकर गाठू खात्री पटतेय .

In reply to by अंतरा आनंद

माहितगार 16/04/2018 - 09:05
@ अंतरा आनंद दुसर्‍यांकडे बोट दाखवताना तीन बोटे आपल्या बाजूला आहेत का ? हे तपासण्याची आपणास आणि धागा लेखिकेस गरज असावी असे प्रांजळ मत आहे . जिथ पर्यंत अत्याचाराची निंदाकरणे असो की स्त्रीयांना सामोरे जावयास लागणार्‍या वीषमते बाबत या पुर्वी वेळोवेळी लिहून झाले आहे -धर्मावरुन या विषयात फरक करु नये या विषयावरही यशस्वीपणे बाजू मिपावर यापुर्वी मांडून झाली आहे, ते प्रतिसाद शोधावयास वेळ लागेल- तसे ते इतर मिपाकरांनी ही लेखन केले असणार आहे. याच धाग्याला समांतर सुधीर देवरेंचा धागा आला आहे आणि इथे ज्या साशंकता व्यक्त केल्या जात आहेत त्या देवरेंच्या लेखावर अद्यापतरी केल्या गेलेल्या दिसत नाहीत.
आणि हो, सिरिया, पाकिस्तान, इराण, इराक या मुस्लिम देशांशी तुलना करता आपण खूपच मागे आहोत. लाजच वाटली पाहिजे याची आपल्याला.
आणि धागा लेखिका
'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
या लेखनातील आपलेच अंतरंग धार्मीक फरक विवादात आणणारे आहेत आणि आपणच उपस्थीत केलेल्या वादाच्या विरोधात ससंदर्भ असंख्य पुरावे उभे करता येतात . आणि तसे पुरावे उपस्थित केले की "मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा " मुद्याच्या आधारे गोलपोस्ट शीफ्ट केला जतोय किंवा कसे ? मला वाटले ओमान मधलीच उदाहरणे पुरेसे ठरावे पण तेवढ्याने विरुद्ध बाजूच्या धर्मांधांचे डोळे उघडलेले दिसत नाहीत, सौदी अरेबीयाच्या राजदूतांवर आरोप झाले आहेत त्यांच्यावर झालेल्या आरोप बद्दल सौदी अरेबीयाने कोणत्या शीक्षा दिल्या ? हा प्रश्न तुमचे मुद्दे खोदण्यास पुरेसा असावा नसेल तर सांगा ईस्लामिक देशातील स्त्रीयांची स्थिती हा वेगळा धागा लेख असंख्य पुरावे आणि संदर्भांच्या आधारावर उभा करुन दाखवेन . मुख्य घटनेतल्या कौर्याची निखालसपणे निंदा " एवढ्या मुद्यावर चर्चा करावयाची असेल तर धागा लेख तेव्ढ्याच मुद्यावर काढावा , ईस्लामीक अथवा अगदी युरोमेरिकी किंवा इतर देशांशी तुलना अस्थानी आहे. तुलना आपण चालू केली तर प्रतिवाद झेलण्यास तयारही असावे . अतार्कीक युक्तीवादाच्या मागे लपू नये असे वाटते.

In reply to by माहितगार

अंतरा आनंद 16/04/2018 - 10:25
शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
या शिक्षा इतर मुस्लिम देशात आहेत, वा शरियतमध्येआहेत या माहितीवरून त्या मुलीने हा प्रश्न केला अस्ण्याची शक्यता नाही वाटत का? लेखिकेनं कोणतही धार्मिक दृष्टओकोन व्यकत केलेला नाही पण इतर प्रतिक्रिया मात्र विनाकारण तो रंग देतायत याचा खेद वाटतो. "हे इथे नाही का होत? " असं विचारण्यापेक्षा "हे असं माझ्या देशात होतय याची मला लाज वाटते ' यावर सहमत का असू नये? इतर राजकारण करत आहेत असं म्हणत " मुस्लिम देशांकडे बघा" असं म्हणताना घटनेकडे बघण्याचा दूषित नजर देतोय असं नाही का वाटत? हे करताना आपण राजकारण्यांपेक्षा ( कारण त्यांना मतं तरी मिळवायची असतात आपण कुठलेही हेतू नसताना हे करतो ते) चुकीचं करत आहोत असं नाही का वाटत? कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?

In reply to by अंतरा आनंद

माहितगार 16/04/2018 - 10:37
कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?
१) आपणच चुकीचा गोलपोस्ट उभा केला तर गोल करणारे त्या दिशेने येतात त्यावर टिका केली तरी तार्कीकता शिल्लक रहत नाही. योग्य गोल पोस्टचा नवा चर्चा धागा मी काढला आहे तिकडे चर्चा सहभागाचे स्वागत आहे . २) भावनांचा आदर न करणारे इथे कुणीच नाही. भावना आहेत म्हणून त्यातील अज्ञान आणि चुकीच्या माहिती आणि चुकीच्या दृष्टीकोणांची चिकित्सा एकदा पब्लिक फोरम मध्ये होणार नाही होऊ नये अशी अपेक्षा चुकीची असावी . सदर लेखिका स्ट्राँग चर्चांना तोंड देऊ शकणार्‍ञा जुन्या मिपाकर आहेत तेव्हा चिकित्सेत काहीही गैर नाही.
या शिक्षा इतर मुस्लिम देशात आहेत, वा शरियतमध्येआहेत या माहितीवरून त्या मुलीने हा प्रश्न केला अस्ण्याची शक्यता नाही वाटत का?
लेखिका अप्रत्यक्सपणे अवजवी शिक्षांचे आणि अवाजवी स्त्रीयांवर अन्याय्य संस्कृती आणि ग्रंथाचे समर्थन करत आहेत

In reply to by अंतरा आनंद

@अंतरा आनंद, जे घडलंय त्याबद्दल सात्त्विक संताप, लाज वाटणं सगळं मान्य. तुमच्या भावनाही पोचलेल्या. पटल्या. पण जेव्हा तुलना होते तेव्हा ती योग्य अयोग्य अशा प्रतिक्रिया येणारच. " कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त करताना तुम्हाला हवे तेच शब्द तोलून मापूनच बोलावं या हेका का असावा?" हेका नाहीच. पण त्याविरोधात कुणी बोलूच नये असाही हेका नसावा. इथे तर या घटनेबद्दल, आपल्या समाजाला सुधारणेची अत्यंत गरज आहे इ.वर कुणाचेही दुमत नाही. तुलना चुकीची आहे असं म्हणणं आहे. उदा. " तुमच्या गावात दारू पिऊन नव-याने बायकोचा गळा दाबून जीव घेतला. त्यापेक्षा आमच्याकडे बरं , दारू पिऊन नवरा बायकोला मारझोड करतो, कोंडून ठेवतो पण जीव नाही घेत हो." असं म्हणण्यासारखं आहे. तेही भयंकर पण हेही भयंकरच.

In reply to by प्राची अश्विनी

अंतरा आनंद 16/04/2018 - 11:20
होय, मला, माझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटते. कारण कायद्याचा बडगा.
हे धागाकर्तीने स्पष्ट केल्यावरही आपल्या आणि त्या देशाच्या लोकसंख्येची तुलना करणे, ओमानच्या कट्टरतेची मापे काढणे, यातून काय साध्य होणार ? धागाकर्तीनं एखाद दुसर वावगं वाटणारं लिहीलंही असेल तरी या घटनेत कोणत्याही कारणास्तव एका अजाण मुलीचा असा घृणास्पद वापर, आरोपीँच्या बाबतीत सुरु असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न याचा निषेध करण्याकडे चर्चा वळवणे एक सामान्य, प्रामाणिक नागरीक म्हणून आपलं कर्तव्य नाही का ? त्याऐवजी घटनेला कोणत्याही तुलनेकडे वऴवून आपण या प्रकरणी सुरू असलेल्या राजकारणातलं एक अगदी नगण्य का होईना प्यादं बनतोय हे लक्षात घ्यायला नको का? या अश्या भावनाप्रधानतेमुळेच राजकारणी आपाआपली पोळी भाजून घेतात आणि देश्यातल्या कायदासुव्यवस्था असूनही नसल्यासारख्या अवस्थेत काहीही बदल होत नाहीय.

In reply to by अंतरा आनंद

माहितगार 16/04/2018 - 11:41
...भावनाप्रधानतेमुळेच ..... पुन्हा तीन बोटे आपल्याकडे आहेत. ( इथे राजकरण्यांच्या तमाशांचे स्वागत कुणीच करत नाही हे वे सानल )
....तुलनेकडे वऴवून ....
पुन्हा तीन बोटे , चुकीचे गोलपोस्ट उभारण्याची जबबदारी किती नाकारली तरी तर्क सुसंगत ठरत नाही.
....आरोपीँच्या बाबतीत सुरु असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न याचा निषेध करण्याकडे चर्चा वळवणे एक सामान्य, प्रामाणिक नागरीक म्हणून आपलं कर्तव्य नाही का ?
आपण स्वतः ह्या चर्चा मुद्यावर चर्चा मर्यादीत ठेवल्ली तर चर्चा तिकडे जाण्याच्या सम्धी वाढल्या असत्या . अपणही लेखिकेच्या चुकीच्या गोलपोस्ट जवळ अजून एक चुकीचे गोलपोस्ट उभे करता आणि गोल दुसरी कडे करा म्हणता याला काय अर्थ आहे ? इथेही तीन बोटे आपल्या स्वतःकडे आहेत
होय, मला, माझ्या कुटुंबाला सुरक्षित वाटते. कारण कायद्याचा बडगा. ....हे धागाकर्तीने स्पष्ट केल्यावरही
ओमान मधल्या आणि भारतातल्या कायद्याच्या बडग्यात फारसा फरक नाही हे संदर्भासहीत सिद्ध करुनही चुकीच्या इंप्रेशन मध्ये रहाण्याचा आणि तुलना नको म्हणत तुलना ओढवून घेणारे प्रतिसाद आणि उपप्रतिसाद देत चुकीचा गोलपोस्ट सांभाळत बसणारी बोटे आपलीच आपल्याच दिशेस निर्देश करतात किंवा कसे ?

In reply to by अंतरा आनंद

भंकस बाबा 20/04/2018 - 23:27
शरीयतनुसार दंड देणार असतील तर एका स्त्री ची साक्ष प्रमाण मानण्यात येणार नाही आहे, म्हणजे पीडित स्त्रीने तक्रार करताना साक्षिदार पण घेऊन जावा मुस्लिम देशात स्त्रियावर अत्याचार म्हणजे लाहोलबिलाकुवत !

यशवंत पाटील 16/04/2018 - 08:38
ताई, तुम्हारा चुक्याच.. तुम्हाला काय वाटल तरी मेरा देश महान असच बोलायला पाहिजे - अस सांगणारे आयडी थोर आहेत. औघड आहे. तुम्ही लिहिल ते पोचल आणि पटल. बायांची आबाळ पाहिलेला...

In reply to by यशवंत पाटील

विशुमित 16/04/2018 - 11:45
प्रॉब्लेम काय झालाय माहिती का, या प्रकरणात भाजपचे २ आमदार, हिंदू एकता मंच, आरोपी हिंदू, नरेंद्र मोदींचे बराच वेळ धरलेले मौन (उपोषण) आणि तुम्ही म्हणता तसे "मेरा राष्ट्र (?) महान" या सर्व गोष्टींना डिफेन्ड करायचे म्हंटल्यावर तुलनात्मक (?) मतमतांतरं होणारच. (हिंदू आरोपीना डिफेन्ड करतात हे म्हणणे अतार्तीक होईल पण विरुद्ध बाजूला बकरवाल आहेत म्हंटल्यावर चर्चा तर होणारच ना पाटील)

In reply to by माहितगार

यशवंत पाटील 16/04/2018 - 13:43
साहेब, जरा थंड घ्या. मनात आलं ते त्यांनी लिहिलं ते कुणाला पटल, कुणाला नाही. लगे त्यांना नागरिक शास्त्र शिकवायला लागले लोकं... अहो, त्यांना बी कळत असणार की. तस बघायला गेल तर काथ्याकूटमधी लेख नसताना इतकी चर्चा कशापायी? तुमच्यावाणी काय मला जास्ती लिहता येत नाही. समजुन घ्या जराशीक.

In reply to by यशवंत पाटील

माहितगार 16/04/2018 - 14:12
तस बघायला गेल तर काथ्याकूटमधी लेख नसताना इतकी चर्चा कशापायी?
अंशतःच बरोबर , सार्वजनिक मंच आहे, प्रतिसाद सुविधा समीक्षेसाठीच दिलेली आहे . आमचा आक्षेप नसलेला स्वतंत्र धागा चर्चा सुद्धा चालू केली आहे . आक्षेप तुलनेचा चुकीचा मुद्दा लावून धरण्यावर आहे . लेखिका चर्चेत अनुभवी आहेत ज्यांना तुलनेचा मुद्दा लावून धरायचा आहे त्यांच्या मुद्याची योथोचीत चिकित्सा ओघाने येतेच . आज माझ्या घरातील स्त्रिया बाहेर सुरक्षित पाने वावरून आल्या आहेतच बाकीच्यां कोट्यावधी स्त्रिया बाहेर या क्षणी भारतात सुरक्षित पाने वावरत असतील , काळजीच्या गोष्टी भारतात नाही असे नाही पण काळजीच्या गोष्टींची काळजी सुरक्षे विषयी चर्चा करून करणार कि stereotype तयार करून भीती चे वातावरण वाढवण्यात हात भार लावणार नेमके काय तर्क सुसंगत आहे ? हे आपणच सांगा

वीणा३ 16/04/2018 - 09:22
" मी दरवाजे लावून बसते."तुम्हाला काय म्हणायचं आहे ते नीट कळलं. इथल्या वादात नाही पडणार, पण असं काही वाचलं ना कि घरातून बाहेर पडायची सुद्धा भीती वाटते. ८ वर्षाच्या मुलीचे (खरंतर कोणाचेही) हाल करणाऱ्याची "जनावर" हि एकाच जात / धर्म असतो. मीडिया वर असले फोटो दाखवण्यासाठी अतिशय स्ट्रिक्ट नियम केले पाहिजेत, विचारही करवत नाहीये त्या मुलीचा आणि तिच्या घरच्यांचा, माझा ८ महिन्याचा मुलगा घरात झोपला होता, हि बातमी वाचल्यावर ४ वेळा त्याच्या कडे बघून आले. "त्यामुळे बाकीचे देश काही का करत असेनात, भारत बायकांसाठी अवघड देश आहे हे मला मान्य आहे. आणि ह्याचं मूळ आपल्या विचारसरणीत आहे. " अतीवेळा सहमत. मध्ये एक बातमी अली होती कि लो वेस्ट जीन घालून बाईक वर बसलेल्या एका मुलीच्या जीन्स मध्ये जळती सिगारेट टाकली. ओळखीतल्या कित्येक "बायकांची" प्रतिक्रिया होती कि असे कपडे घातले कि असंच होणार, नीट कपडे घालावे. काय बोलावं कळत नाही.

In reply to by वीणा३

माहितगार 16/04/2018 - 11:52
...माझा ८ महिन्याचा मुलगा घरात झोपला होता, हि बातमी वाचल्यावर ४ वेळा त्याच्या कडे बघून आले.
आपण आपल्या मुलावर सुयोग्य संस्कार नेमके कसे कराल ? की पुढेचालून तो योग्य मार्गावर राहील
...मी दरवाजे लावून बभित"तुम्हाल काय म्हणायचं आहे ते नीट कळलं. इथल्या वादात नाही पडणार, पण असं काही वाचलं ना कि घरातून बाहेर पडायची सुद्धा भीती वाटते.
.. लेखिका आणि लेखिकेचे समर्थक चर्चा सुरक्षा कशी वाढवता येईल एवजी स्वतःला आणि इतरांना भितीच्या वातवरणात गुरफटवत तर नाही आहेत. आपण वर्णन केलेल्या कपडे कसे घालावे सांगणार्‍या स्त्रीयाही भितीच्या वातावरन निर्मितीत गुरफटवून घेत नाही किंवा कसे ?

गामा पैलवान 16/04/2018 - 12:26
अंतरा आनंद,
आपल्या देशाच्या बदनामीनं खूपच दु:ख झालेलं दिसतय लोकांना.
खरंय हे. देशात बायका सुद्धा येतात. त्या स्त्रियांचीही नाहक बदनामी होतेय. आ.न., -गा.पै.

गवि 16/04/2018 - 12:52
भावनेच्या भरात काहीसा आमिर खान इफेक्ट (देशात असुरक्षित वाटतं, देश सोडण्याविषयी) घडून गेला असावा. त्यात उद्वेगाचा भर हा फॅक्टर जास्त असावा. भावना समजल्या.

म्हात्रे काका, आपल्या देशाची बदनामी परदेशी लोकांसमोर करु नये हे तत्वतः मान्य असलं तरी जर एखादी परदेशी स्त्री भारतात येणार असेल तर मी तिला ह्या वास्तवाची नक्कीच जाणीव करून देईन. ह्याचं कारण सध्या सतत कानावर येणाऱ्या ह्या रेपच्या बातम्या इतकं मर्यादित नाही. भारतात सगळीकडेच स्त्रियांना निर्धोक फिरता येत नाही. परिस्थिती कमी अधिक प्रमाणात वाईट असेल पण वाईट आहे हे नक्की. एकंदरीतच स्त्रियांना कमी लेखणे पासून ते निव्वळ उपभोगाची वस्तू समजणे ह्या सर्रास घडणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याची नोंद ठेवून आकडेवारी तयार केली जाते का ते माहीत नाही, पण हे सत्य आहे. म्हणजे बाईशी बोलताना नजर कुठे असावी इतके साधे संकेत सुद्धा सहज मोडले जातात, अगदी चकचकीत कॉर्पोरेट मध्ये सुद्धा. ही गोष्ट कुणी रिपोर्ट करणार नसलं तरी ती किती किळसवाणी आहे हे स्त्री झाल्याशिवाय कळणार नाही. (पण अंदाज येऊ शकतोच). पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये तर मन निगरगट्ट करूनच जावं लागतं. अगदी शाळकरी पोरं सुद्धा वाट्टेल तसे हात लावतात. मुळात आपण कोणत्याही बाईला कुठेही हात लावू शकतो असं वाटणं हेच किती विकृत आहे.. आता मी फक्त अमेरीका हा देश पाहिला आहे. तो ही फार थोडासा. किमान न्यू यॉर्क मेट्रो मध्ये तरी, कितीही गर्दी असली तरी तुम्हाला किळसवाणे स्पर्श होत नाहीत. तुम्ही वीतभर कपडे घालून फिरलात तरी कुणी नजरही वर करून बघत नाही. स्विमिंग पूल मध्ये अमेरिकन पुरुष असेल तर तो आहे की नाही हे ही लक्षात येणार नाही अशा बेताने अलुफ राहून पोहत असेल. तेच तिथे भारतीय पुरुष असेल तर एका क्षणात माझे सेन्सेस अलर्ट व्हायचे. सरसकटीकरण करायच नाहीये मला, पण एकुणात परिस्थिती अशी आहे... असावी.. तिथेही रेप होतात ना, पण बायका ते खुले आम सांगतात की माझ्यावर रेप झाला होता. समाज त्यांना वेगळं वागवत नाही. अर्थात भारत आणि अमेरिकेत फार फार फरक आहेत. संस्कृतीच वेगळी. पण उद्या एखादी अमेरिकन बाई भारतात येणार असेल तर स्त्री म्हणून मी तिला ह्या फरकांची जाणीव करून देईनच. देशाच्या वगैरे पलीकडच्या गोष्टी आहेत ह्या. मेरा भारत महान वगैरे भ्रम मला तसेही नाहीचेत, आणि स्त्री असणं हे माझ्यासाठी जास्त मोठं कनेक्शन आहे. तेव्हा ओमान बद्दलचे तांत्रिक मुद्दे चुकले असतीलही, पण भावना नीट समजल्यात मला लेखातल्या.

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 16/04/2018 - 13:58
आपल्या भावना लक्षात घेऊन अपल्याच विधाना वर आधारीत वेगळा चर्चा धागा भारत बायकांसाठी अवघड देश आहे ... ... काढला आहे, आपले त्या चर्चेत स्वागत आहे. तुलनेचा गोलपोस्ट वर चर्चा केंद्रित करणे आपली प्रायोरिटी असेल ससंदर्भ तर्कसुसंगत अभ्यासपूर्ण चर्चेची तयारी आहेच . पण आधीच्या सदस्यांप्रमाणे तुलनेच्या गोलपोस्ट ला का फोकस केले म्हणू नका, ते गोलपोस्ट आपणण स्वत: उभे केलेले आहेत आणि आपण त्या गोलपोस्ट ला सांभाळू इच्छित आहात हे लक्षात घ्यावे हि नम्र विनंती

In reply to by पिलीयन रायडर

श्वेता२४ 16/04/2018 - 14:34
आपल्य मताशी मीही सहमत आहे. चर्चा करणाऱ्यांनी दुसऱाय देशासमोर आपल्या देशाची बदनामी, आकडेवारी इ. पोकळ चर्चेत न पडता देशात जे भयानक घडत आहे त्यावर लक्ष देणे अधीक महत्वाचे. मिपावर बऱ्याच स्त्रिया कामानिमित्त घराबाहेर पडत असतील तशाच या देशातीलही कामानिमित्त रोज घराबाहेर वावरतात याचा अर्थ बाहेरचे वातावरण सुरक्षित आहे म्हणून त्या बाहेर पडतात असे नाही. बाहेर पडताना त्यातील किती जणींना बिनधास्त वाटत असेल याचा विचार करणे ही खरी गरज आहे. आणि याचे मूळ कुठेतरी पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात आहे. तसा दृष्टीकोन का तयार होतो याचा विचार करावा लागेल.

In reply to by श्वेता२४

माहितगार 16/04/2018 - 16:29
आणि याचे मूळ कुठेतरी पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात आहे. तसा दृष्टीकोन का तयार होतो याचा विचार करावा लागेल.
अगदी पिलीयन रायडर यांच्याच विधानावर आधारीत भारत बायकांसाठी अवघड देश आहे ... हा धागा फिअर मॉन्गरीन्ग न करता रचनात्म्क चर्चा व्हावी म्हणून काढला आहे . त्या धाग्यात आपल्या उपरोक्त विधाना संदर्भाने चर्चेत स्वागत आहे.

In reply to by पिलीयन रायडर

राही 16/04/2018 - 14:47
प्रतिसाद आवडला. पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते. भारतात मात्र ती सतत वखवखलेली असते. कुलाबा फोर्ट भागात फेरीवाले टॅक्सीवाले परदेशी बायकांशी किती विकृत वागतात ते पाहिले आहे. एक तर कुठल्याही महिलेशी सभ्य रीतीने वागावे ही इथली संस्कृतीच नसावी किंवा असलीच तर ती धुडकावण्यात काही गैर वाटत नसावे.

In reply to by राही

टवाळ कार्टा 16/04/2018 - 17:58
पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते.
हे फार चुकीचे वाक्य आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो....बहुतेकवेळा (प्रत्येकवेळा नाही) प्रत्येक पुरुष कोणत्याही स्त्रीशी बोलताना एकदातरी "natural attraction to opposite sex" या नजरेने बघतोच....फक्त ते बघणे "काही सेकंद ते नजरेसमोर असेपर्यंत" यामध्ये कुठेही असू शकते...पाश्चात्य देशांत लोकांना शारिरीक जवळीक फार लवकर आणि जास्त वारंवारीतेने मिळते त्यामुळे "तसे" बघणे जास्त वेळ लांबत नाही...मध्य-पुर्वेत किंवा आशियायी देशांत (Indian subcontinent) असा प्रकार नसल्याने बहुतेकदा "जमेल तितके आणि जमेल तेव्हा" काहीतरी बघावे/मिळावे याची तीव्रता जास्त असते...अर्थात परस्पर संमतीशिवाय अथवा समोरच्या व्यक्तीला uncomfortable काहिहि करणे हे चूकच आहे त्यामुळे "पाश्चात्य देशांत महिलांशी बोलताना पुरुषांची नजर बहुतेक वेळा नितळ आणि सभ्य असते." हे सरसकटीकरण करुन काळ्या-पांढर्यात विभागणी करणे चूक

In reply to by टवाळ कार्टा

बिटाकाका 16/04/2018 - 19:19
काही अंशी सहमत. पण मुळात ते पण तेच करतात असं म्हणणं तितकंच चूक आहे जितकं इथले पुरुष करतात असं म्हणणं आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. -------------------------------- ही अशी सरसकटीकरण आणि एक प्रकारचा उपहास यांनी भरलेली वाक्ये ऐकली की वाटतं "इतर स्त्रियांकडे, माझा भाऊ फार वखवखलेल्या नजरेने बघतो, माझे वडील फार वखवखलेल्या बघतात, माझा नवरा फार वखवखलेल्या नजरेने बघतो, माझा मुलगा फार वखवखलेल्या नजरेने बघतो" वगैरे वाक्ये सर्रास कानावर पडू लागतील की काय. आणि मग एक खिन्नता आणि उदासीनता वाटते.

In reply to by बिटाकाका

माझा भाऊ बघतही असेल, उद्या मुलगा विचित्र वागेलही. नाही कोण म्हणतंय? हे बलात्कारी लोक कुणाचे न कुणाचे नातेवाईक आहेतच की! बिटकाका, बहुतांश वेळा घरातच असे प्रसंग घडतात. एखादा अनामिक सर्व्हे घेऊन पहा, अनेक जणी कबूल करतील की घरातल्याच कुणीतरी त्यांना त्रास दिलेला आहे. अगदी मुलीवर अत्याचार करणारे बाप ह्या जगात आहेत. माझं असं मत आहे की बायकांना बाप, भाऊ, नवरा हे कसे आहेत हे नीट माहिती असतं. फक्त त्या बोलायला घाबरतात. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं कुणी बोलताना सापडणार नाही, पण घडत आहेच.

In reply to by पिलीयन रायडर

बिटाकाका 16/04/2018 - 21:48
त्याचं प्रमाण नावाची गोष्ट असेलच की? ******************** स्टेरिओटाइप करताना थोडाही विचार केला जाऊ नये? माझ्या आजूबाजूच्या लोकांपैकी ०.५ टक्केही अशी वखवखलेली नजर घेऊन फिरत नाहीत. तुमचेही प्रमाण हेच असावे असे मत नाही, पण वरील वक्तव्य १००% प्रमाण गृहीत धरतंय आणि ते अतिशय खेदजनक तर आहेच शिवाय संतापजनकही आहे असे मला वाटते. माझ्या सज्जनपणावर असा सरसकट हल्ला करण्याचा अधिकार (किंवा स्वातंत्र्य) कोणी का घ्यावा? मला माझी सज्जनता आणि माझे संस्कार कुणासमोरही सिद्ध करण्याची तिळमात्रही गरज वाटत नाही. आणि माझ्यासारखेच बहुतेक सगळे वडील, भाऊ, नवरा मुलगा बाजूला असतात. कुठल्या मोजक्या नतद्रष्ट नीच लोकांसाठी सगळ्या पुरुषजातीवर आसूड उगारणे अजिबात योग्य नाही. याउपरही कोणी, कदाचित वैयक्तिक अनुभवांमुळे, असे स्वातंत्र्य उपयोगी आणत असल्यास अशा वक्तव्यांना फाट्यावर मारण्याशिवाय काय पर्याय उरतो? ************************* माझ्या मतातून कोणाला उद्धटपणा किंवा महिलांबद्दल अनादर भासत असल्यास, फारफारतर मी आगाऊ दिलगिरी व्यक्त करू शकतो, तसा हेतू असणे कदापि शक्य नाही.

In reply to by बिटाकाका

तुम्ही वैयक्तिक का घेताय हे? आपण जनरल मानसिकतेबद्दल बोलत आहोत. भारतात स्त्रियांना कमी लेखले जाते असं जेव्हा विधान केलं जातं तेव्हा माझ्या घरातल्या स्त्रियांना तर मी मनाने वागवतो ह्या प्रतिवादाला अर्थ नसतो. हे विधान स्त्रिया करतात तेव्हा त्याला अनेक अनुभवांची जोड असते आणि त्यातून त्या हे बोलतात. आम्ही जेव्हा म्हणतोय की भारतात पुरुष स्त्रियांकडे विचित्र नजरेने बघतात तेव्हा सगळेच्या सगळे भारतीय असेच आहेत असा अर्थ नसतोच. पण बहुतांश जागी स्त्रियांना हा अनुभव येतो. चांगल्या घरातले, एरवी सभ्य वाटणारे पुरुषही विचित्र वागू बोलू शकतात. पण ह्याचा अर्थ तमाम जनता अशीच आहे आणि तमाम बायका अत्यन्त पवित्र आणि सात्विक आहेत असाही होत नाही. हे चर्चेचे अध्याहृत संकेत आहेत असं मला वाटतं. भारतात कठुआ, उन्नव, आसाम, सुरत अशा अनेक ठिकाणी पाशवी बलात्काराच्या बातम्या एकत्र कानावर येत असताना स्त्रियांनी त्यांचा उद्वेग मांडला तर त्यात असे तांत्रिक मुद्दे का काढले जावेत? आपल्या देशात स्त्रियांची सुरक्षितता हा मोठा चिंतेचा विषय आहे हे मान्य करायला इतका त्रास का होत असावा? इतर देशातल्या ह्या संदर्भातल्या काही चार दोन भल्या गोष्टी इथे मांडल्या तर त्याचा त्रास का व्हावा? इथे कुणी कुणावर वैयक्तिक बोट दाखवत नाहीये आणि चांगले सभ्य पुरुष जगात नाहीतच असंही म्हणत नाहीये. पण दैनंदिन आयुष्यात "ट्रॉमा" वाटावा इतका त्रास मुली रोज सहन करतात. मनोरुग्ण माणसाने वागावं तसे विकृत बलात्कार भारतात होतात, घरातल्या माणसानेच वर्षानुवर्षे त्रास दिल्याच्या घटना सुद्धा इथे घडतात. काही मोजक्या पुरुषांचा सभ्यपणा इतका महत्वाचा वाटतो तिथे ह्या मुलींचा त्रास नगण्य आहे का? मी भारताबद्दल देशप्रेमाची भावना समजू शकते, पण ह्या नादात आपण प्रचंड शाररिक आणि मानसिक त्रासाला सामोऱ्या गेलेल्या स्त्रियांना विसरत आहोत का? चर्चेचा मुद्दा हाच आहे ना?

In reply to by पिलीयन रायडर

माहितगार 16/04/2018 - 22:20
चर्चेचा मुद्दा हाच आहे ना?
मॅडम, तुमचंच बरोबर आहे , आपल्याशी चर्चा करताना 'वुमेन आर फ्रॉम व्हीनस'चा अनुभव आला आणि अधिक शहाणा झालो. खाली सुखी माणूसचा प्रतिसाद सुद्धा बरोबर आहे की काय अशी भावना होते आहे.

In reply to by पिलीयन रायडर

बिटाकाका 17/04/2018 - 08:00
१. माझी वाक्ये तुम्ही तरी का वैयक्तिक म्हणून घेताय? मी भारतातील एक पुरुषांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय असं समजा की! २. आपण मुद्द्याभोवती गोल गोल फिरक्त आहोत. किती टक्के पुरुष तुम्ही म्हणता तसे आहेत? ही टक्केवारी अजिबात महत्वाची नाही असे गृहीत धरून वारंवार "सर्व पुरुष" असा उल्लेख अत्यंत खटकणारा आहे. काही पुरुष म्हणण्यात नेमकी अडचण काय? ३. इथे स्त्रियांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय नाहीये असं म्हणणारा कुठल्या आणि कुणाच्या प्रतिसादाचा संदर्भ आपण देताय? मला तरी असं सुचवणार कुठला प्रतिसाद दिसला नाही, तुम्ही दाखवून देता का? ४. काही मोजक्या पुरुषांचा सभ्यपणा? तुम्ही मुद्दा सोडताय. माझा मुद्दा काही मोजक्या लोकांचा नतद्रष्टपणा आहे. मुलींचा त्रास नगण्य वगैरे कोणालाच वाटत नसतो पण म्हणून सरसकट पुरुषांवर का दोषारोप? आणि यात देशभक्तीचा काय संबंध? स्त्रियांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांवर पण असेच लेबल लावले जाते का? ५. माझं तर उलट मत आहे की भारतातील पुरुष हा दिवसेंदिवस स्त्रियांबद्दल अतिशय संवेदनशील बनत चालला आहे आणि हे चांगले लक्षण आहे. त्याबरोबरच स्त्रियाही सेल्फ डिपेंडंट आणि कॉन्फिडन्ट होत चालल्या आहेत. यामुके खरतर काही दशकांपूर्वीपेक्षा अतिशय आशादायक चित्र आहे. हे सगळं बाजूला ठेवून वारंवार हा समाज स्त्रियांसाठी धोकादायक आहे म्हणणं अजिबात पटत नाही आणि खासकरून यासाठी समस्त पुरुषवर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे क्लेशदायक आहे.

In reply to by पिलीयन रायडर

nanaba 17/04/2018 - 12:18
ज्याच जळत त्यालाच कळत ही म्हण आठवतेय इथले प्रतिसाद वाचून. जे चा न्गले आहेत त्यान्नी विरो धी पक्शात न जाता , आम्हाला ज्या मानसिक त्रासातून जाव लागतय असल्या सततच्या बातम्या वाचून त्याबद्दल तुम्ही आमच्या बरोबर आहात. तुम्ही स्वतः चा न्गले असल्याने असे वागणार नाही. ़ऊनी क वागताना दि सले तर यथा शक्ती ते वू थाम्बवू , असे म्हणायला काय हरकत आहे. आअपण विरोधी पक्शात असण्याची गरज नाहीये
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?' 'शिक्षा होते...' 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?' 'नाही.' 'मग काय करतात?' 'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.' '........' ------ 'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही. 'काय पाहणार हिंदमध्ये?' तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते.

असेहि एकदा व्हावे

खिलजि ·

एस 10/04/2018 - 20:08
कसेही करून खा हीच संस्कृती झाली आहे प्रत्येकाची. बाकी कोण कुठल्या पक्षात आहे ह्याने आता तर काहीच फरक पडत नाही. इकडचा वाल्या तिकडं गेला की वाल्मिकी होतोय. चांगलंय. बाकी कविता आवडली. खून माणुसकीचा असो वा पर्यावरणाचा; तोही सेलिब्रेट करावा, झालं.

खिलजि 11/04/2018 - 18:40
सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार .... अजूनहि डोंगर फोडले जात आहेत ... डोळ्यादेखत खारफुटीच्या नाश केला जात आहे .... हे सर्व थांबू शकते जर सरकारने मनात आणले तर .... पण नाही .. आता काय तर मिठागरांवर डोळा आहे ... गिधाडं आहेत सारे .... सिद्धेश्वर विलास पाटणकर

मदनबाण 11/04/2018 - 20:53

खिलजि 12/04/2018 - 13:40
प ग भाऊ .. अहो निवडणूक लढवायला काय त्यात ? लढवू कि ... पण पक्षाचं नाव मात्र तुम्ही ठरवा.. हि एक नम्र विनंती ... मला कि नाही हि कविता टाकल्यावर एक प्रश्न पडलाय ... तो हा कि आपण ( अर्थात सरकार ?) ... असा एखादा उपग्रह पाठवू शकतो का .. कि ज्यात क्लोरोफिल डिटेक्टर असेल .. नाही म्हणजे होईल काय कि खरंच किती हिरवीगार झाड अस्तित्वात आहेत आणि त्याअनुषंगाने प्रदूषणाची पातळी किंवा त्याची गुणवत्ता याचे निकष तरी निदान समोर येतील ... इथे वृक्षारोपणाचे भरगोस कार्यक्रम होतात पण त्यामधील किती झाडे जगतात हा वादाचा प्रश्न आहे ... अजून एक मागे फक्त एकदाच पेपरमध्ये बातमी वाचली होती .. कि खारफुटीच्या जंगलात आफ्रिकन ग्रासचा भयानक विळखा ... ह्या अश्या बातम्या फक्त एकदाच वाचायला मिळतात .. परत नाही ... हे असं चाललंय सगळं .... सिद्धेश्वर विलास पाटणकर

एस 10/04/2018 - 20:08
कसेही करून खा हीच संस्कृती झाली आहे प्रत्येकाची. बाकी कोण कुठल्या पक्षात आहे ह्याने आता तर काहीच फरक पडत नाही. इकडचा वाल्या तिकडं गेला की वाल्मिकी होतोय. चांगलंय. बाकी कविता आवडली. खून माणुसकीचा असो वा पर्यावरणाचा; तोही सेलिब्रेट करावा, झालं.

खिलजि 11/04/2018 - 18:40
सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार .... अजूनहि डोंगर फोडले जात आहेत ... डोळ्यादेखत खारफुटीच्या नाश केला जात आहे .... हे सर्व थांबू शकते जर सरकारने मनात आणले तर .... पण नाही .. आता काय तर मिठागरांवर डोळा आहे ... गिधाडं आहेत सारे .... सिद्धेश्वर विलास पाटणकर

मदनबाण 11/04/2018 - 20:53

खिलजि 12/04/2018 - 13:40
प ग भाऊ .. अहो निवडणूक लढवायला काय त्यात ? लढवू कि ... पण पक्षाचं नाव मात्र तुम्ही ठरवा.. हि एक नम्र विनंती ... मला कि नाही हि कविता टाकल्यावर एक प्रश्न पडलाय ... तो हा कि आपण ( अर्थात सरकार ?) ... असा एखादा उपग्रह पाठवू शकतो का .. कि ज्यात क्लोरोफिल डिटेक्टर असेल .. नाही म्हणजे होईल काय कि खरंच किती हिरवीगार झाड अस्तित्वात आहेत आणि त्याअनुषंगाने प्रदूषणाची पातळी किंवा त्याची गुणवत्ता याचे निकष तरी निदान समोर येतील ... इथे वृक्षारोपणाचे भरगोस कार्यक्रम होतात पण त्यामधील किती झाडे जगतात हा वादाचा प्रश्न आहे ... अजून एक मागे फक्त एकदाच पेपरमध्ये बातमी वाचली होती .. कि खारफुटीच्या जंगलात आफ्रिकन ग्रासचा भयानक विळखा ... ह्या अश्या बातम्या फक्त एकदाच वाचायला मिळतात .. परत नाही ... हे असं चाललंय सगळं .... सिद्धेश्वर विलास पाटणकर
नष्ट केलेल्या डोंगराचेही स्मारक व्हावे तत्कालीन पक्षाचे नाव त्यावर असावे उदघाटन सोहळ्याची गाथा लिहावे डोंगर दर्या खोरे फक्त पुस्तकातच उरावे असेही एकदा व्हावे नदीजोड प्रकल्पात मस्त हात धुवून घ्यावे नवीन काहीतरी समोर आणून जुन्यावाणीच हादडावे स्वतःच्या कर्तृत्वाचेच फक्त ढोल बडवावे लोकांना परत नव्याने चुना लावावे असेही एकदा व्हावे रस्ते पुन्हा नव्याने उखडावे त्याच जोमाने परत बांधावे काळ्या कंत्राटदारांना दुसऱ्या नगरात वसवावे त्या नगरातही जोमाने हादडावे होतच होते आधीही ,, असेही पुन्हा एकदा व्हावे कधी हात व्हावे , कधी कमळ व्हावे कुठे शिवधनुष्य तर कुठे आप व्हावे एक

ती जशी जशी जुनी होत गेली

खिलजि ·
ती जशी जशी जुनी होत गेली हळूहळू माझी सोनी बनत गेली वाईनवानी कडुशार होती नंतर मधाचे पाणी बनत गेली रंगढंग बघूनच तर जवळ गेलो होतो खटके उडायचे अधूनमधून पुढे नवीन कहाणी घडत गेली या एकल्या जीवाची ती राणी बनत गेली आधी जे मिळेल ते खायचो नि राहायचो मग हवी होती कशाला बायको ? डोळे सताड उघडे असायचे, राव या डोळ्यांचीच जणू पापणी बनत गेली कधी आत हृदयात बसली ते समजलंच नाही आत सळसळणाऱ्या रक्ताची वाहिनी बनत गेली बायको आधी नकोशी वाटत होती यार आता मात्र माझ्यासाठी अमृत संजीवनी बनत गेलीय ... सिद्धेश्वर विलास पाटणकर

बे एरिया मध्ये भाषण : भारतीय शिक्षण धोरण बदल आणि RTE कायदा - प्रा. भरत गुप्त

साहना ·
इंडो-अमेरिकन डेव्हलोपमेंट कौन्सिल मधील काही मित्र खालील इव्हेंट घडवून आणत आहेत. प्रा. भरत गुप्त ह्यांना मी भारतात असताना ओळखत होते. ते चांगले वक्ते असून शैक्षणिक धोरण ह्या विषयावर त्यांनी खूप काम केले आहे. मिपा वरील मंडळी जर बे एरिया मध्ये असेल तर त्यांनी ऐकायला जायला हरकत नाही. "Education in India - Scope for Reforms and Right to Education" A talk and discussion with Prof.

लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी

खिलजि ·
लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी निर्व्यसनी असाल तर वाईट सवय लावून घ्यावी व्यसनांनुसार टाकावा एकेक थेम्ब लाळेचा लिटमस पेपरवरी जर सामू आला सात लग्नास नसावी काही बात त्यामध्ये असेल चढउतार घ्यावी सरळ माघार , लग्नकार्यातूनी सवयीनुसार सामूची वर्गवारी तंबाखू असे तीनवरी सुपारीसहित तोच बैसे पाचावरी सोडामिश्रित आठवरी तर ऑन दि रॉक्स ती दहावरी देशीसाठी नसे चाचणी देशी असे जनावरी लक्षात ठेवा नवरोबानो अर्धांगिनी पण लिटमस परी सुटणार नाहीत नाद कुणाचे असाल कायम रडारवरी व्यर्थ नका मरू दादा घ्या लिटमस पेपर साधा व्यसनांती पण सामू जर "सात " असेल तरच निवडा आपली राधा

भाग १ : शेतकर्यांच्या हितासाठी काय गरजेचे आहे - पायाभूत सुविधा

विवेकपटाईत ·

सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लवकरात लवकर अमलात आणाव्यात. ह्या शिफारसी शेतकऱ्याच्या व सरकारच्या फायद्याच्याच आहे. २०२४ पर्यंत हेच सरकार असावे हया मताशी सहमत.

जेम्स वांड 24/03/2018 - 17:04
म्हणजे एक विनोद आहे, त्यात तो डोक्यात जाणारा हिंदी ऍकसेन्ट कश्याला घुसडलाय ते लेखकालाच माहिती.

In reply to by जेम्स वांड

लेखक महाशयांना केद्रिय सचिवालयातल्या प्रत्यक्ष कामाचा दीर्घ अनुभव आहे. ते मराठी असले तरी ते अनेक दशके दिल्लीत राहत आहेत. त्यांच्या लेखनावर (अभावितपणे) हिंदीचा प्रभाव दिसतो, त्यामागे ही पार्श्वभूमी आहे. :)

In reply to by जेम्स वांड

आनन्दा 24/03/2018 - 17:19
तुम्ही कदाचित लेखकाला ओळखत नाही.. लेखक बालपणापासून दिल्लीत राहतात. त्यामुळे हिंदी एकसेंट आणि कामाला बहुधा पीएमओ मध्ये आहेत.

In reply to by जेम्स वांड

पुंबा 02/04/2018 - 14:19
+११ यांचे लेख हिंदीमुळे वाचवत नाहीत. लेखक दिल्लीत राहिलेले महाविद्वान अधिकारी असले तरीही व्यक्तिशः मला तरी असले लिखाण वाचणे पसंत नाही.

In reply to by पुंबा

अनवाणी पायांनी शेतात काम करताना धसकटे पायात घुसल्या मुळे होणाऱ्या वेदना AC बसून काम करणाऱ्याना नाही कळणार . 70 टक्के लोकसंख्या ही गरीब आहे व ती शेतीवरच अवलंबून आहे . तरी पण शेतकऱ्यां च्या समस्या वर या निमित्ताने चर्चा होतेय यातच समाधान .

बहुतेक भारतिय आंदोलने अभ्यास करून एखाद्या गोष्टीतील मूलदोष काढून टाकण्याच्या उपायाबद्दल असण्याऐवजी, "लोकांना विनाश्रम फायद्याची लालूच" आणि "चमको फॅक्टर" या मुद्द्यांना महत्व देवून "बनवलेली" असतात असेच दिसते. काही काळाने माध्यमांत चमकणे कमी झाले की ते आंदोलन आणि त्याचे फलित यांचे कोणाला काही घेणेदेणे आहे असे दिसत नाही. गेल्या काही आंदोलनांच्या पाठपुराव्याची (फॉलो अप) काय गत झाली आहे हे पाहिले तर त्यापासून बराच बोध होईल.

अश्फाक 24/03/2018 - 21:44
माझा शेतकऱ्यांशी जवळचा संबंध येतो वर्षां नुवर्षे शेतीत होणारे बदल बघत आहे. एक उपाय जो मला सुचला आहे तो असा ज्या शेतमालाची जितकी आवश्यकता आहे तितकाच तो पिकवला जावा म्हणजे समजा भारताची तूर डाळीची आवश्यकता 10 मेट्रिक टन आहे आणि भारत 10 मे टन निर्यात करू शकतो तर सर्व देशात मिळून 20 मे टन उत्पन्न होईल तितक्याच शेतजमिनीवर तूर पेरली जावी फायदे 1 मर्यादित उत्पन्न झाल्यास भाव फिक्स राहतील याचा सर्वात मोठा फायदा शेतकऱयांना होईल सिजन मध्ये भाव पडल्याने शेतकऱयांना मातीमोल भावात माल विकावा लागतो आणि कधी कधी आवक कमी झाल्याने लिमिटेड शेतकऱयांचा फायदा होतो(टमाटे100/kg) यावर आळा बसेल 2 सरकारला हमी भाव देने फार सुलभ होऊन जाईल(गरजच पडणार नाही) 3समजा 2017 मध्ये तुरीचे बंपर उत्पादन आले आणि 5 मी टन शिल्लक राहिले तर 2018 मध्ये तितके पेरणी क्षेत्र कमी करता येईल 4 कमी पाणी च्या क्षेत्रात त्या प्रमाणे पीक देता येतील ५ ६ 7 वगैरे आता हे साध्य करण्या साठी सरकारी यंत्रणा कामाला लावता येईल जसे जिल्हाप्रमाणे पीक उद्दीष्ट देने त्यावर कठोर अंमलबजावणी करणे सरकारला जितके एकर लागवड अपेक्षित आहे तितकेच बियाणे उपलब्ध /उत्पादित करणे(ex20000 कापुस बियाणे पाकीट) मिपा वर जे तज्ञ असतील त्यांनी पुढे सुचवावे आणि जे लोग नीती ठरवू शकतात किंवा सुचवू शकतात त्यांनी संबंधित खात्याला सुचवावे (pmo कर्मचारी) क्रमश:

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीत उल्लेख केल्याप्रमाणे शेतीमालाच्या वायदे व्यवहारातील उलाढाल व भाव शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्याला कोणते उत्पन्न घ्यावे हे ठरवता येईल.

मनो 25/03/2018 - 07:50
किमान १० कोटी शेतकरी पेन्शन मागतील. वर्षाचे ६ लाख कोटी कुठून येतील कदाचित अण्णांना हि याचे उत्तर माहित नसेल.
मान्य करूयात
शेती असो व उद्योग. रस्ते, रेल्वे आणि वीज या पायाभूत सुविधा दाराशी पोहचल्या पाहिजे.
आता याच १० कोटी शेतकऱ्यांच्या दाराशी सुविधा पोचवायच्या म्हणजे हा खर्च दरडोई महिना ५००० रुपयांपेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणजे हा प्रस्ताव अण्णा हजारेंपेक्षाही जास्त अव्यवहार्य नाही का ?

In reply to by मनो

आता याच १० कोटी शेतकऱ्यांच्या दाराशी सुविधा पोचवायच्या म्हणजे हा खर्च दरडोई महिना ५००० रुपयांपेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणजे हा प्रस्ताव अण्णा हजारेंपेक्षाही जास्त अव्यवहार्य नाही का ? नाही. सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याचा पर्यायच जास्त व्यवहार्य, जनतेच्या फायद्याचा आणि देशाला विकसित बनविण्यास उपयोगी आहे. एखाद्या माणसाच्या हातात दिलेले पैसे (उदा: पेन्शन) त्याचे वैयक्तिक उत्पन्न होते. अश्या पैशाच्या विनियोगावर कोणतेच बंधन नसल्याने, त्या पैश्याचा उपयोग त्या माणसाच्या दीर्घकालीन वैयक्तिक फायद्यासाठी होईलच याची खात्री देता येत नाही. शिवाय, पेन्शन ही वर्षानुवर्षे सतत चालू असणारी व वेळेबरोबर वाढत्या खर्चाची अनुत्पादक गोष्ट आहे. पुढच्या केवळ ५-१० वर्षांचा पेन्शनवर होणारा खर्च, स्थानिक पायाभूत सुविधांवर आवश्यक असलेल्या खर्चापेक्षा जास्त होईल, नंतर सतत वाढत जाईल आणि तरीही थांबवता येणार नाही ! याविरुद्ध, रस्ते, रेल्वे, वीज, इत्यादी पायाभूत सुविधा सर्व जनतेच्या उपयोगी असतातच पण त्यांच्यामुळे जे लहानमोठे स्थानिक सेवा-व्यवसाय-उद्योगधंदे निर्माण होतात (रिपल इफेक्ट्स), ते त्या विभागाचा सर्वांगिण विकास करण्यास आणि स्थानिक लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत करतात. हे परिणाम दीर्घकालीन असतात आणि त्यांच्यातून निर्माण होणारे स्थानिक उत्पन्न, पायाभूत सुविधांवर सरकारने केलेल्या खर्चापेक्षा अनेक पटींनी अधिक असते, जे सर्वसामान्य लोकांच्या हातात येते. उदाहरणादाखल, "मुंबई व पुणे या दोन शहरांना जोडणार्‍या भूभागांतील आणि खुद्द पुण्याच्या काही भागांतील", मुंबई-पुणे महामार्ग होण्याच्या अगोदर आणि नंतर असलेला विकासदर, तेथे निर्माण झालेली साधनसंपत्ती आणि त्यामुळे निर्माण झालेले दीर्घकालीन आर्थिक उत्पन्न यांची तुलना केली तर हे अधिक स्पष्ट होईल. या महामार्गाने त्याच्यावर खर्च झालेल्या १६३० कोटी रुपयांपेक्षा कित्येक पटींनी जास्त उत्पन्न दरवर्षी वाढवले आहे. शिवाय, या हिशेबात सर्वसामान्य जनतेला मिळणारा सुलभ आणि सुखद वाहतूक व्यवस्थेचा रोजचा फायदा धरलेला नाही. हे काहीसे लोकांना लोकांना "दररोज मासे पुरवणे" आणि "मासेमारीची उपकरणे पुरवणे" यातील फरकासारखे आहे. सतत मासे पुरवविण्याने लोकांना आपल्यावर कायमचे अवलंबून (खरे तर, मिंधे) ठेवता येते आणि वर्षानुवर्षे राजकिय स्वार्थ साधता येतो. मासेमारीची उपकरणे पुरवण्याने लोक स्वावलंबी होतात व लोककल्याण साधते. नेता यातला कोणता उपाय स्विकारेल हे त्याच्या "राजकारणाच्या उद्येशावर" अवलंबून असते ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१००% सहमत... पण कसं आहे ना डॉक्टर साहेब, इथे लोकांना दीर्घकालीन उपाययोजना व त्यातुन होणारी प्रगती नकोय. त्यासाठी थोडी कळ काढायची तयारी नाहीये .

In reply to by उगा काहितरीच

इथे लोकांना दीर्घकालीन उपाययोजना व त्यातुन होणारी प्रगती नकोय. त्यासाठी थोडी कळ काढायची तयारी नाहीये . इतर कोणत्या शैक्षणिक/बौद्धीक बाबतीत राजकारणी कमी असले तरी त्यांचा भावनिक भागफल (EQ उर्फ Emotional Quotient) फार मोठे असते. दीर्घकालीन उपाययोजनेसाठी खूप जास्त वेळ, श्रम आणि पैसे लागतात, त्यापेक्षा लोकांना थोडे काही पैसे देण्याने (किंवा, बहुतेक वेळेस पैसे देण्याच्या योजनेचे लालूच/आश्वासनही पुरेसे ठरते !) मते पदरात पडली, तर तो जास्त "कॉस्ट एफेक्टिव्ह" पर्याय नाही का ? कमीत कमी (किंवा शून्य) श्रमात जास्त फायदा मिळवणे हा मूळ मानवी स्वभावातला कमकुवतपणा आहे. वैयक्तिक राजकिय-सामाजिक-आर्थिक हितसंबंध मजबूत करण्यासाठी या गुणधर्माचा उपयोग करण्यात भारतिय राजकारण्यांचा हात धरणारे इतर कोणी जगभर सापडणे जरा कठीणच आहे. सर्वसामान्य जनतेला आपला दीर्घकालीन फायदा व विकास कळत नाही हे एक वेळ मानले, तरी जेव्हा तथाकथित विचारवंत अशा विसंगत आणि जनतेला भुलभुलैयात गुंतवून तिचा गैरफायदा घेणार्‍या व्यवस्थेची तळी उचलून धरतात तेव्हा, त्या विसंगतीचे जरासे आश्चर्य वाटते. पण जरासेच... कारण, जरा विचार केला की ध्यानात येते की त्या गटातले विचारवंत मुळात सामान्य मानवच असतात आणि "कमीत कमी (किंवा शून्य) श्रमात जास्त फायदा मिळवणे हा मूळ मानवी स्वभावातला कमकुवतपणा" त्यांच्याकडेही भरपूर प्रमाणात असतो. फक्त, त्याचबरोबर, आपले फसवे मत पटकन पटेल अश्या वेस्टनात गुंडाळून सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्याचे असामान्य कसब त्यांच्यात असते आणि ते विकून फायदा कमावायला त्यांची तयारी असते... आणि त्याचबरोबर "वैयक्तिक फायद्यासाठी आपण इतर माणसांचे अक्षम्य नुकसान करत आहोत" अशी रुखरुख लावणार्‍या उच्च मानवी भावनेचा स्वतःच्या मनावर परिणाम न होऊ देण्याचे अजब कसबही त्यांच्यात असते. काही दिवसांच्या हे कसब "कायमच्या जाड कातडीत" रुपांतरीत होते आणि मग स्वतःच्या हितसंबंधांपुढे कशाचेच काही वाटणे बंद होते... बराच वेळ असे चालल्यावर एक वेळ अशी येते की "आता आपले खोटेपणाचे गुपित फुटले तर किती उंचावरून खाली पडू ?" या प्रश्नाने परतीचे सगळे मार्ग खुंटतात. अर्थातच, तथाकथित विचारवंतांच्या या कमकुवतपणाचा आणि कौशल्यांचा फायदा घेण्यातही राजकारणी तरबेज असतात. त्यासाठी, जनतेच्याच पैशाने तयार केलेली मानसन्मानाची आणि आर्थिक फायदे देणारी पदे, मानसिक गंड कुरवाळणारे किताब, इत्यादी अनेक बाण त्यांच्या भात्यात असतात. आपल्या बाजून लढणरी अशी दमदार फौज तयार केली की मग ती सामान्य जनतेच्या अनेक पिढ्यांच्या स्वाभिमानी मानसिकतेला गारद करून टाकते. एकदा ही "सिस्टिम" सर्वसामान्य जनतेच्या मानसिकतेतही पक्की रुजली/बसली की जनतेलाही फुकटफौजदारी गुलामगिरीची इतकी सवय लागते की आपण आपले सर्व आयुष्य दुसर्‍या कोणाच्या पायी गहाण टाकले आहे याचेही भान शिल्लक उरत नाही... नंतर तर त्याचा अभिमानही वाटू लागतो. असो.

जानु 25/03/2018 - 10:38
या सुविधा निर्माण झाल्यावर सर्व जनतेसाठी वापरल्या जाणार आहेत. समृध्दी महामार्ग काही फक्त शेतीसाठीच नाही. त्यामुळे खर्च समस्त जनतेसाठी असेल. त्यातुन शेतकर्‍यांचे अपेक्षित भले लवकर होणार असे वाटते.

डँबिस००७ 25/03/2018 - 17:35
विवेक पटाईत साहेब, योग्य वेळी लिहीलेल्या लेखा बद्दल धन्यवाद !! भारतात पायाभुत सुविधांचा आभाव किती व कसा आहे हे सांगण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा आहे. जगातल्या टॉप ५० बंदरात भारतातल्या एकाही बंदराच नाव नाही, पण यु ए ई च्या दोन बंदरांच , श्रीलंकेच्या कोलंबो बंदराच तसेच चीनच्या १२ ते १५ बंदरांचा समवेश ह्या ५० बंदरात होतो. जगभरात आंतर्गत वहातुकीचा खर्च उत्पादन मुल्यावर १२% धरला जातो, चीन मध्ये हा ८% पर्यंत खा ली आणलेला आहे, पण भारतात तो १८% च्या आसपास आहे. हा आंतर्गत वहातुकीचा खर्च जगाच्या लेव्हल ला आणण्याचा संकल्प ह्या सरकारने केलेला आहे. ह्या सरकारच्या खाली सागर माला, डेडीकेटेड फ्रेट कॉरीडोर वेस्ट आणि ईस्ट , नॅशनल हाय वे असे प्रोजेक्ट चालु आहेत. येत्या १० -१५ वर्षांत पुर्ण चित्र पालटलेल असेल.

म्हणे 'त्याची एक हास्यास्पद मागणी , ६० वरील शेतकर्याला ५००० रुपये महिना पेन्शन मिळाली पाहिजे ' शेतात कष्ट करतो , घाम गाळतो तो पेन्शन रुपी भीक कशी मागेल ?. हां ! पण आमच्या कडे हरामखोर कर्ज बुडव्या नीं बुडवले 8 / 10 लाख करोड स्क्वेअर ऑफ करायला मात्र पैसे आहेत .

In reply to by सोमनाथ खांदवे

विशुमित 09/04/2018 - 10:10
मी म्हणतो सरकारी नोकरांना पेन्शन द्याची काय कारण ? प्रोडूक्टिव्ह योगदान काय त्यांचे ??

In reply to by विशुमित

मी म्हणतो सरकारी नोकरांना पेन्शन द्याची काय कारण ? सगळ्याच नोकरदारांचे महागाई भत्ते बंद केले पाहिजे. महागाईची झळ फक्त ह्यानाच बसते का? शेतकऱ्याला बसत नाही का?

In reply to by मार्मिक गोडसे

विशुमित 09/04/2018 - 12:08
आणखी पुढे जाऊन मी हे म्हणू इच्छितो कॉर्पोरेट/ आय टी क्षेत्रात वातानुलुकीत सर्वसोयीयुक्त पॉश ऑफिसेस ची खरंच गरज आहे का ? या पॉश ऑफिसेस चे डेप्रीसिएशन आणि इतर खर्च प्रॉडक्टच्या माथी मारून महागाई वाढवली जाते असे कोणाच्या लक्ष्यात कसे येत नाही. ..... प्रायव्हेट कंपनीतील कर्मचारी कामानिमित्त इतर राज्यात ट्रेन ने प्रवास करताना स्लीपर क्लास ऐवजी ३ AC - २ AC चा हट्ट का करत असतात. अंतर राज्यिय विमान प्रवास तर वर्ज्य केला पाहिजे. ज्याला जास्त घाई आहे त्याने वयक्तिक खर्च करून जावे. मार्केटिंग टीमची सोय महागड्या हॉटेलात करण्याचे प्रयोजन काय आहे? कॉस्ट वाढत नाही का ? मी म्हणतो घर ते ऑफिस ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी का म्हणून कंपनी ने द्यायची. कॉस्ट वाढत नाही का ? यांच्या लक्सेरि मुळे ग्राहकाला मग वस्तू महाग घ्यावी लागते. .......... (टीप : मी कंपनीने दिलेल्या वरील सगळ्या सोयी सुविधा नाईलाजास्तव वापरात आहे)

In reply to by arunjoshi123

विशुमित 10/04/2018 - 16:07
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय देवा. देव धर्माला आपला विरोध नाही. मी घरातल्या पूजेला सकाळी बसलो तर बायको दुपारी जेवायच्या टायमाला हाक मारते, "बास करा आता, निरंजन लावा आणि जेवायला बसा."

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 09/04/2018 - 23:18
सरकार स्वत:च्या खिशातून पेन्शन देत नाही. पेन्शन कर्मचा-यांच्याच पगारातून नियमित कापल्या गेलेल्या पैशाची (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) परतफेड असते. जर सरकारने पेन्शन देऊ नये अशी इच्छा असेल तर, सरकारने पगारातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी साठी पैसे न कापता संपूर्ण पगार कर्मचा-यांना द्यावा.

In reply to by श्रीगुरुजी

श्वेता२४ 10/04/2018 - 13:59
सरकारी नोकरदारांच्या बाबतीत पेन्शनचे अंशदान याआधी पूर्णपणे सरकारच करत असे. त्याला जुनी पेन्शन योजना म्हणतात. आता नव्या पेन्शन योजनेत जेवढा हप्ता कर्मचाऱ्याचा जातो तेवढेच अंशदान सरकारही करते. त्यामुळे सरकारवर आर्थिक भार येतोच.

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी 10/04/2018 - 15:01
अहो पोकळ बांबूधारी, Salary package काय असते याचा अभ्यास करा आणि कृपया आपल्या पोकळ बांबूसारखे पोकळ प्रतिसाद देणे बंद करा.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 10/04/2018 - 15:13
ते बांबू प्रकरण सोडून दिले तर चालणार नाही का? त्याचा उल्लेख न करता तुम्ही काय सांगायचे ते सागु शकताच. इथे त्यांनी न म्हटलेलं आणणे हेही ट्रोलिग सदरात येते.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 10/04/2018 - 15:39
आणि तुम्ही फ्रॉड लोकांच्या ठगबंधनाचे अध्यक्ष असल्यागत मिपावर वावरतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 10/04/2018 - 15:57
झोंबले वाटते. तज्ज्ञ सदस्य ते ट्रोल अध्यक्षांकडे वाटचाल. पण तुम्ही हाताने करून घेतले आहे हे. त्याला आमचा नाईलाज आहे.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 10/04/2018 - 17:44
झोंबले बिंबले अजिबात नाही. जोवर प्रतिसाद सरळ आहे तोवर आम्ही सरळ उत्तर देतो. कोणी वाकड्यात शिरायला लागला तर निव्वळ नाईलाजाने आम्हास वाकड्यात शिरावे लागते. तुमचा प्रवास सुद्धा तज्ज्ञ फ्रॉड ते फ्रॉड अध्यक्षांकडे वाटचाल असा आहे व तुम्ही ते हाताने करून घेतले आहे. त्याला आमचा नाईलाज आहे.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 10/04/2018 - 18:10
खुद्ध जेष्ठ सदस्या पैसा ताईंनी तुमच्या ट्रॉलिंग बद्दल काळजी व्यक्त केली आहे, अजून काय मी स्पष्टीकरण देऊ? ==== आता सांगा मी कुठे फ्रॉड केला ?

In reply to by विशुमित

पैसा 10/04/2018 - 18:47
मी गुरुजींना ट्रोल्ल म्हटले नाही. कोणाचेही असे पाठपुरावा करणे ट्रोलिंग सदरात येते एवढेच मत व्यक्त केले. निदान समजदार लोकांनी ट्रोळ म्हणून नाव कमावू नये एवढीच इचछा.

In reply to by पैसा

विशुमित 11/04/2018 - 11:21
तुम्ही जरी थेट त्यांना ट्रोल म्हंटले नसले तरी त्यांचा प्रतिसाद ट्रोलिंग सदरात येतो याबद्दल काळजी व्यक्त केलेली सरळ सरळ दिसते. त्यामुळे ही वाटचाल ट्रोल अध्यक्ष बने पर्यंत पोहोचू नये याबद्दल मला देखील काळजी वाटते. ==== @गुरुजी- मी काय फ्रॉड केला तेवढे सांगा की ? तुमच्या या आरोपामुळे काळजी करत रात्री मी डाराडूर झोपलो होतो.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 11/04/2018 - 14:17
तुमची वाटचाल फ्रॉड अध्यक्ष बने पर्यंत पोहोचू नये ही काळजी करत रात्री मी सुद्धा डाराडूर झोपलो होतो.

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 10/04/2018 - 15:36
माझे आधीचे प्रतिसाद पहा. व्यवस्थित उत्तरे दिली आहेत. परंतु त्यांनी एका प्रतिसादात विनाकारण घोडा दामटवल्याने निव्वळ नाईलाजाने मला पोकळ बांबू आणावा लागला. घोडा दामटवला नसता तर बांबूही आला नसता.

सरकार स्वत:च्या खिशातून पेन्शन देत नाही. पेन्शन कर्मचा-यांच्याच पगारातून नियमित कापल्या गेलेल्या पैशाची (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) परतफेड असते. असं असेल तर one rank one pension द्यायला सरकार खळखळ का करत होतं?

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी 09/04/2018 - 23:50
तो पूर्ण वेगळा मुद्दा आहे. एकाच rank वरून निवृत्त झालेल्या वेगवेगळ्या सैनिकांच्या पेन्शन मध्ये प्रचंड फरक होता व सैनिकांना समानता हवी होती. ४२ वर्षे हा प्रश्न प्रलंबित राहिल्यानंतर २०१५ मध्ये त्यावर बराचसा सर्वमान्य तोडगा काढण्यात आला.

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी 10/04/2018 - 09:05
ज्याप्रमाणे सहावा वेतन आयोग किंवा सातवा वेतन आयोग किंवा कर्जमाफी इ. साठी वेगळ्या मार्गाने तरतूद केली जाते तशीच या वाढीव खर्चासाठीही तरतूद केली जाते.

In reply to by मार्मिक गोडसे

अनुप ढेरे 10/04/2018 - 11:00
ओआरओपी हा सैनिकांनाच लागु आहे. इतर सरकारी कर्मचार्‍यांना नाही. नक्की मुद्दा काये तुमचा गोडसे?

In reply to by मार्मिक गोडसे

अनुप ढेरे 10/04/2018 - 12:15
सरकारी कर्मचार्‍यांचा विषय होता त्यात सैनिक कुठुन आले म. केवळ वादासाठी सैनिकांना इतर सरकारी कर्मचार्‍यांच्याच लायनीत बसवणं नाही आवडलं.

In reply to by अनुप ढेरे

पगला गजोधर 10/04/2018 - 15:58
केवळ वादासाठी सैनिकांना इतर सरकारी कर्मचार्‍यांच्याच लायनीत बसवणं नाही आवडलं.
पहिली गोष्ट प्रश्न मूळचा किसान संबंधित आहे, सरकारी खर्चाच्या (सरकारी कर्मचाऱ्यांचे) उदा दाखल दिले गेले काय हे तपासून पाहावयास हवे. दुसरी गोष्ट तुम्हाला फक्त, "जय जवान" अशी अर्धी घोषणा द्यायला आवडते का सर ?

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी 10/04/2018 - 14:23
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही वाहती गंगाजळी असते. कर्मचा-यांना पेन्शन किंवा साचलेली संपूर्ण रक्कम एकरकमी/अंशत: देताना त्याच गंगाजळीतून दिली जाते.

धागालेखकाचा शेतकर्‍यास सरकारकडून पेंशन मिळण्यास विरोध आहे. त्यावरुन सरकारी नोकरांना पेन्शन कशाला? असा विशुमित ह्यांनी प्रश्न केला. गुरुजी म्हणाले सरकार स्वतःच्या खिशातुन पेन्शन देत नाही. त्यावरुन मी orop चा विषय काढला. सरकार जर सैनिकांना स्वतःच्या खिशातुन पैसे देत असेल तर शेतकर्‍यास का देत नाही? हा मला पडलेला प्रश्न. आता शेतकर्‍यास सैनिकाच्या लायनीत बसवणं तुम्हाला आवडलं नसेल, तरी माजी पं.प्र. लालबहादूर शास्त्रींना आवडलं होतं. कानाला गोड लागावं म्हणून त्यांनी ती घोषणा केली नव्हती.देशातील जनतेने दोघांच्याही योगदानाचा सारखाच सन्मान करावा असा त्यांचा हेतू होता.

In reply to by मार्मिक गोडसे

अनुप ढेरे 10/04/2018 - 13:37
शेतकरी हे व्यवसाय करतात. इतर व्यवसायिकांसारखा. वर आयकरपण देत नाहीत. तरी पेंशन द्यायची? मग इतर व्यवसायिकांनी काय घोडं मारलय? सरकारी कर्मचारी आणि सैनिकदेखील आयकर भरतात. (इतर कर भरतात शेतकरी हे आर्ग्युमेंट चूक आहे कारण ते कर सगळेच भरतात. )

In reply to by विशुमित

जय जवान जय किसान ज्याला कळत नाही ,त्याने कीतीही अभ्यास केला तरी तो अपुराच पडेल. सरकार जेव्हा आयात करुन महाग झालेले अन्नधान्य स्वस्त करतो, ज्यामुळे शेतकर्‍याचे नुकसान होते तेव्हा ह्यांना मागणी पुरवट्याचा सोयिस्कर विसर पडतो. हमिभाव मागितला तर लगेच ईतर व्यावसायिकांशी तुलना करतात.

In reply to by मार्मिक गोडसे

अनुप ढेरे 10/04/2018 - 13:49
आयकराच्या मर्यादेत नसलेल्या शेतकर्‍यांनी सोडुन इतरांनी एखाद्या व्यवसायाप्रमाणे आयकर भरणं सुरू करु देत मग पेंशनची मागणी रास्तं ठरेल. ( खरं तर तरीही नाही कारण इतर व्यवसायिकांनी काय घोडं मारलय?)

तुमचा गोंधळ मी समजू शकतो.:) शेतकरी संघटीत नसल्यामुळे त्याचे आर्थिक शोषण जितके होते तितके कोणत्याही व्यावसायिकाचे होत नसावे. सरकारने त्यास पेन्शनही देऊ नये, सरकारने शेतमालाला दिडपट हमीभाव दिल्यास महागाई भडकेल असा आरबीआय इशारा देऊ लागली.सरकारी कर्मचार्‍यांना वेतन आयोग लावल्याने महागाई वाढत नाही. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले की रिक्षा,टॅक्सीवाले संप करुन आपल्या मागण्या मान्य करुन घेतात. तेथे मागणी पुरवठा लागू होत नाही. जय जवान, मर किसान.

पैसा 10/04/2018 - 14:43
लेख आवडला. सर्वसामान्य माणसाला सुचणारे लिहिले आहे तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही सकारात्मक विचार आहे. पेंशन देण्यापेक्षा शेतीला उद्योग मानले जावे. लघु किंवा मोठे उद्योग यांना त्यांच्या आकाराप्रमाणे मिळणाऱ्या सोयी व सवलती मिळाव्यात. सरकारी पेंशन ज्यांना मिळते ते सरकारचे थेट नोकर असतात. त्यांनी केलेल्या कामावर सरकारची मालकी असते. शेतकऱ्यांनी केलेल्या कामावर सरकारची मालकी नसते. त्यासाठी शेतीचे राष्ट्रीयीकरण करावे लागेल. ही उलटी गंगा झाली. असे तर मग शेतकऱ्यांनी शेतमजुरांना फंड व पेंशन द्यावे लागेल. या मागण्यांना अंत नाही. तेव्हा मासे देण्यापेक्षा जाळे आणि होडी उपलब्ध करून द्यावी हेच खरे.

In reply to by पैसा

सुबोध खरे 10/04/2018 - 19:52
काही स्पष्टीकरण सरकारी नोकरांना निवृत्तीवेतन मिळते ते सरकार गोळा करत असणाऱ्या करातूनच जाते. याचा भविष्यनिर्वाह निधीही काहीही संबंध नाही आणि हा बोजा विविध वेतन आयोगांनी भरमसाट पगार वाढवल्यामुळे अधिकच वाढत गेला. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) साधारण १४ टक्के इतका पैसा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनात खर्च होत आहे(२०१६). २०१४ मध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी ३५ लाख होते आणि निवृत्ती वेतन धारक ५२ लाख होते. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड असा हा प्रकार होत होता. यात राज्यसरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्था मिळवल्या तर हा एकदा किती होईल ते लक्षात घ्या. यामुळे २००४ नंतर सरकार मध्ये भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतः भरतील त्याच पैशात निवृत्तीवेतन मिळणार आहे. आणि याचा फायदा २०२४ नंतर दृश्यमान होऊ लागेल ( लोक २० वर्षांनी मुदतपूर्व निवृत्त होऊ लागतील तेंव्हा त्यांना त्यांचेच पैसे परत दिले जातील (यास फक्त लष्करी आणि निमलष्करी दले अपवाद आहेत. कारण त्यांनी मिळवलेल्या कौशल्याचा नागरी जगात काहीच उपयोग नसतो आणि त्यांना वयाच्या ३३ पासून ते ५० पर्यंत निवृत्त केले जाते )

In reply to by मार्मिक गोडसे

अनुप ढेरे 10/04/2018 - 15:01
का बुवा आयात करू नये? निर्यात करू द्यावी पाहिजे ती. आयात देखील करता यावी पाहिजे तेवढी.

In reply to by मार्मिक गोडसे

पैसा 10/04/2018 - 15:03
एखादा शेतीमाल महाग झाला तर तो न पिकविणारे अन्य शेतकरी व इतर गरीब उपभोक्ता यांच्या हिताची काळजी सरकारने घेणे अभिप्रेत असते. आपल्याकडे मुक्त बाजारपेठ अस्तित्वात नाही. प्रत्येक गोष्टीत manipulation असते.

श्वेता२४ 10/04/2018 - 15:39
मुळात लेखाचा रोख हा पायाभूत सुविधा उलब्ध करुन दिल्यास शेती व उद्योग दोघांनाही याचा फायदा होईल परंतु दुर्दैवाने याचे राजकारण होत आहे, हा आहे. त्यामुळे इथे सरकारी नोकरांचे पेंशन, महागाई भत्ता यांची सैनिक, शेतकरी व व्यापारी यांच्याशी करणे अप्रस्तुत आहे. प्रत्येकजण उदरनिर्वाहाचा मार्ग स्वतच्या क्षमतेनुसार व आवडीनुसार स्वताच निवडत असतो. त्यातील फायद्यातोट्ाचा विचार करुनच. त्यामुळे कोणालाही एखादा पेशा स्विकारल्यामुले मिळणारे लाभ इतरांशी तुलना का करता. मुळात शेती हा सुद्धा एक व्यवसाय आहे हे वास्तव आहे. परंतु शेती हा अत्ावश्यक व्यावसाय असून त्याच्या विकासाकरीता आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देणे हे सरकारचे इतिकर्तव्यच ठरते. याबाबत दुमत नाही. परंतु शेतकऱ्यांनी देखील याबाबत व्यावसायिक दुष्टीकोन स्वीकारला पाहिजे. आधुनिक तंत्रजज्ञान न मार्केटींग याचा अभ्यास केला पाहिजे. सर्वच शेतकरी केविलवाणे व बापुडे नाहीत. बरेच शेतकरी हे यशस्वी व्यावसायिक आहेत. मुळात स्वातंत्र्योत्तर भारताला अन्नधान्याची गरज भागविणे आवश्यक होते परंतु हरीत क्रांतीनंतर आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत. त्यामुळे इतर देशांसारखा आता आपलादेखील शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यावसायिक झाला पाहिजे. आणि इथेच सरकारने अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारुन शेतीला एक व्यवसाय म्हणून भरभराटीस आणणे आवश्यक आहे.

In reply to by श्वेता२४

विशुमित 10/04/2018 - 15:54
शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यावसायिक झाल्यामुळेच तर ते आणखी तीव्र आवाज उठवत आहेत. कष्ट तर सर्वच क्षेत्रातील लोक करत असतात आणि कमीअधिक प्रमाणात मोबदला देखील तेवढाच मिळवत असतात. यात दुमत नाही. साधी शेतमजुरी करणारी महिला ५ तासाचे २०० रुपये मोजून घेते आणि ते पण आठवड्याच्या आठवड्याला. मग शेतकऱ्यांनी त्याने पिकवलेल्या माला चा रास्त मोबदला मागितला म्हणून काय झाले ? भले तो दयनीय शेतकरी असो किंवा यशस्वी शेतकरी.

In reply to by विशुमित

श्वेता२४ 10/04/2018 - 16:05
शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे. मग शेतकरी कोणताही असो. इथे सरकारी हस्तक्षेप आवश्यक ठरतो. मधल्या दलालांची साखळी उच्चाटन करणे, तसेच शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विकता येईल अशई व्यवस्था करणे. शेतीमाल हातात असणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या जागेवरच कळले पाहिजे कि त्याच्या शेतमालाला कुठे मागणी आहे आणि त्याला सर्वोत्तम भाव कुठे मिळू शकतो. आणि त्याला त्याचाा शेतमाल त्या ठिकाण पाठवून योग्य भआव मिळवता आला पाहिजे. यासाठीच पायाभूत सुविधा हव्यात. मग त्यात पाणी, रस्ते, गोदामे, वीज अगदी इंटरनेट सेवादेखील आली.

In reply to by श्वेता२४

विशुमित 10/04/2018 - 16:16
मधल्या दलालांची साखळी उच्चाटन करणे, तसेच शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विकता येईल अशई व्यवस्था करणे.>> ==>> रोगा पेक्षा इलाज महाभयंकर वाटतो. शेतकऱ्यांचा मधल्या साखळी वरती सुद्धा जास्त आक्षेप नाही आहे. तेच खरे डिस्ट्रीबुट करतात शेत मालाला. त्यांची जोखीम सुद्धा मान्य केली पाहिजे. भारतीय शेतकऱ्याचे मूळ काम उत्पादन करणे आहे, मार्केटिंग आणि डिस्ट्रिबुटिंग नव्हे. त्याने ते औटसोअर्स करणेच त्यांच्यासाठी इष्ट आहे. डिस्ट्रिब्युशन चे काम शेतकऱ्याने हाती घेतले की तो शेती सोडून दलाली सुरु करतो.

In reply to by विशुमित

पैसा 10/04/2018 - 16:33
शेतकऱ्याला गव्हाचे १६ रुपये मिळाले तर ग्राहक त्याच गव्हाला ३५ रुपये मोजतो. हे १९ २० रुपये कमी करणे शक्य आहे का?

In reply to by पैसा

विशुमित 10/04/2018 - 16:41
ट्रान्सपोर्ट, लोडींग अनलोडींग, ट्रान्सीट लॉस, पिलफेरेज, माथाडी-कामगारांचे पगार, धान्य साफ करणे-वाळवणे , तेथील प्रोसेस लॉस, एक्सटेर्नल मार्केट फोर्सेस, गाळ्यांचे डेप्रीसिएशन, इंटरेस्ट कॉस्ट आणि सर्वात शेवटी प्रॉफिट मार्जिन. एवढे सगळे फॅक्टर असल्यावर रु. ३५ प्रति किलो च्या आसपास जाणारच ना. === रु. १६ पाहिजे ना. गाडी करून या आमच्या शेतावर. एकदम वर्षभराचे धान्य भरून घेऊन जा. ऍग्रो ट्रिप पण होईल धान्य पण स्वतः दरात मिळेल.

In reply to by विशुमित

पैसा 10/04/2018 - 17:01
मागे नाखु सुद्धा बोलले ते हेच. शेतकरी आणि ग्राहक यांच्यात जास्तीत जास्त थेट व्यवहार होणे गरजेचे आहे.

In reply to by पैसा

विशुमित 10/04/2018 - 17:09
काय सांगता येते की तुम्ही इतक्या लांबून आमच्या वस्तीवर आल्यावर मी म्हंटले रु. ३५ ने घायचे असेल तर घ्या नाहीतर चहापाणी/जेवण करून तुम्ही निघू शकता. (हा फायदा आहे शेताच्या बांधावर व्यवहार करण्याने. मला वाटते इथे भावनिक वगैरे वागण्यात काही हशील नाही आहे.)

In reply to by पैसा

विशुमित 10/04/2018 - 17:32
जर तुम्ही काही कारणास्तव नाही आलात किंवा तुम्हाला तुमच्या गावा नजीकच रु.१६ ने गहू मिळाला तर मला दुसरा तिसरा पर्याय उपलब्ध पाहिजे ना. भले त्यांनी नफेखोरी केली तरी माझी अपेक्षित किंमत मला मिळ्ण्याशी मतलब. आणि माझी होल्डिंग पावर जास्त असेल तर घरीच खाईल गहू सगळा. पुढच्या वर्षी त्या जागी दुसरे पीक घेईन. ==== एथिक्स टू वे असेल तर ठरल्या प्रमाणे मी रु.१६ नेच तुम्हाला गहू देणार. पण कोणी चलाखी करण्याचा प्रयत्न केला तर मोनोपॉली केलीच पाहिजे. ते करण्यासाठी स्ट्रॅटेजिकली माझ्या एरियात असाल तर दवाब आणणे मला सोपे जाईल.

In reply to by विशुमित

विशुमित 10/04/2018 - 17:34
दवाब आणणे वगैरे तुमच्यासाठी नव्हते, व्यापारी-अडते -इतर दलाल यांच्यासाठी होते. कृपया गैरसमज नसावा.

In reply to by विशुमित

पैसा 10/04/2018 - 16:12
निव्वळ भावनिक कोनातुन बघणे योग्य नाही. मोबदला मागणे एक गोष्ट आहे. मिळणे आजच्या परिस्थितीत शक्य आहे का? मधले अडते दलाल यांना बाजूला कसे सारता येईल, त्यांचे महत्त्व कसे कमी करता येईल हे पाहावे लागेल. पायाभूत सुविधा, जोडधंदे, शेती आधारित उद्योग यावर जास्त लक्ष दिले तर शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे फायदे होतील.

सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लवकरात लवकर अमलात आणाव्यात. ह्या शिफारसी शेतकऱ्याच्या व सरकारच्या फायद्याच्याच आहे. २०२४ पर्यंत हेच सरकार असावे हया मताशी सहमत.

जेम्स वांड 24/03/2018 - 17:04
म्हणजे एक विनोद आहे, त्यात तो डोक्यात जाणारा हिंदी ऍकसेन्ट कश्याला घुसडलाय ते लेखकालाच माहिती.

In reply to by जेम्स वांड

लेखक महाशयांना केद्रिय सचिवालयातल्या प्रत्यक्ष कामाचा दीर्घ अनुभव आहे. ते मराठी असले तरी ते अनेक दशके दिल्लीत राहत आहेत. त्यांच्या लेखनावर (अभावितपणे) हिंदीचा प्रभाव दिसतो, त्यामागे ही पार्श्वभूमी आहे. :)

In reply to by जेम्स वांड

आनन्दा 24/03/2018 - 17:19
तुम्ही कदाचित लेखकाला ओळखत नाही.. लेखक बालपणापासून दिल्लीत राहतात. त्यामुळे हिंदी एकसेंट आणि कामाला बहुधा पीएमओ मध्ये आहेत.

In reply to by जेम्स वांड

पुंबा 02/04/2018 - 14:19
+११ यांचे लेख हिंदीमुळे वाचवत नाहीत. लेखक दिल्लीत राहिलेले महाविद्वान अधिकारी असले तरीही व्यक्तिशः मला तरी असले लिखाण वाचणे पसंत नाही.

In reply to by पुंबा

अनवाणी पायांनी शेतात काम करताना धसकटे पायात घुसल्या मुळे होणाऱ्या वेदना AC बसून काम करणाऱ्याना नाही कळणार . 70 टक्के लोकसंख्या ही गरीब आहे व ती शेतीवरच अवलंबून आहे . तरी पण शेतकऱ्यां च्या समस्या वर या निमित्ताने चर्चा होतेय यातच समाधान .

बहुतेक भारतिय आंदोलने अभ्यास करून एखाद्या गोष्टीतील मूलदोष काढून टाकण्याच्या उपायाबद्दल असण्याऐवजी, "लोकांना विनाश्रम फायद्याची लालूच" आणि "चमको फॅक्टर" या मुद्द्यांना महत्व देवून "बनवलेली" असतात असेच दिसते. काही काळाने माध्यमांत चमकणे कमी झाले की ते आंदोलन आणि त्याचे फलित यांचे कोणाला काही घेणेदेणे आहे असे दिसत नाही. गेल्या काही आंदोलनांच्या पाठपुराव्याची (फॉलो अप) काय गत झाली आहे हे पाहिले तर त्यापासून बराच बोध होईल.

अश्फाक 24/03/2018 - 21:44
माझा शेतकऱ्यांशी जवळचा संबंध येतो वर्षां नुवर्षे शेतीत होणारे बदल बघत आहे. एक उपाय जो मला सुचला आहे तो असा ज्या शेतमालाची जितकी आवश्यकता आहे तितकाच तो पिकवला जावा म्हणजे समजा भारताची तूर डाळीची आवश्यकता 10 मेट्रिक टन आहे आणि भारत 10 मे टन निर्यात करू शकतो तर सर्व देशात मिळून 20 मे टन उत्पन्न होईल तितक्याच शेतजमिनीवर तूर पेरली जावी फायदे 1 मर्यादित उत्पन्न झाल्यास भाव फिक्स राहतील याचा सर्वात मोठा फायदा शेतकऱयांना होईल सिजन मध्ये भाव पडल्याने शेतकऱयांना मातीमोल भावात माल विकावा लागतो आणि कधी कधी आवक कमी झाल्याने लिमिटेड शेतकऱयांचा फायदा होतो(टमाटे100/kg) यावर आळा बसेल 2 सरकारला हमी भाव देने फार सुलभ होऊन जाईल(गरजच पडणार नाही) 3समजा 2017 मध्ये तुरीचे बंपर उत्पादन आले आणि 5 मी टन शिल्लक राहिले तर 2018 मध्ये तितके पेरणी क्षेत्र कमी करता येईल 4 कमी पाणी च्या क्षेत्रात त्या प्रमाणे पीक देता येतील ५ ६ 7 वगैरे आता हे साध्य करण्या साठी सरकारी यंत्रणा कामाला लावता येईल जसे जिल्हाप्रमाणे पीक उद्दीष्ट देने त्यावर कठोर अंमलबजावणी करणे सरकारला जितके एकर लागवड अपेक्षित आहे तितकेच बियाणे उपलब्ध /उत्पादित करणे(ex20000 कापुस बियाणे पाकीट) मिपा वर जे तज्ञ असतील त्यांनी पुढे सुचवावे आणि जे लोग नीती ठरवू शकतात किंवा सुचवू शकतात त्यांनी संबंधित खात्याला सुचवावे (pmo कर्मचारी) क्रमश:

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीत उल्लेख केल्याप्रमाणे शेतीमालाच्या वायदे व्यवहारातील उलाढाल व भाव शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्याला कोणते उत्पन्न घ्यावे हे ठरवता येईल.

मनो 25/03/2018 - 07:50
किमान १० कोटी शेतकरी पेन्शन मागतील. वर्षाचे ६ लाख कोटी कुठून येतील कदाचित अण्णांना हि याचे उत्तर माहित नसेल.
मान्य करूयात
शेती असो व उद्योग. रस्ते, रेल्वे आणि वीज या पायाभूत सुविधा दाराशी पोहचल्या पाहिजे.
आता याच १० कोटी शेतकऱ्यांच्या दाराशी सुविधा पोचवायच्या म्हणजे हा खर्च दरडोई महिना ५००० रुपयांपेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणजे हा प्रस्ताव अण्णा हजारेंपेक्षाही जास्त अव्यवहार्य नाही का ?

In reply to by मनो

आता याच १० कोटी शेतकऱ्यांच्या दाराशी सुविधा पोचवायच्या म्हणजे हा खर्च दरडोई महिना ५००० रुपयांपेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणजे हा प्रस्ताव अण्णा हजारेंपेक्षाही जास्त अव्यवहार्य नाही का ? नाही. सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याचा पर्यायच जास्त व्यवहार्य, जनतेच्या फायद्याचा आणि देशाला विकसित बनविण्यास उपयोगी आहे. एखाद्या माणसाच्या हातात दिलेले पैसे (उदा: पेन्शन) त्याचे वैयक्तिक उत्पन्न होते. अश्या पैशाच्या विनियोगावर कोणतेच बंधन नसल्याने, त्या पैश्याचा उपयोग त्या माणसाच्या दीर्घकालीन वैयक्तिक फायद्यासाठी होईलच याची खात्री देता येत नाही. शिवाय, पेन्शन ही वर्षानुवर्षे सतत चालू असणारी व वेळेबरोबर वाढत्या खर्चाची अनुत्पादक गोष्ट आहे. पुढच्या केवळ ५-१० वर्षांचा पेन्शनवर होणारा खर्च, स्थानिक पायाभूत सुविधांवर आवश्यक असलेल्या खर्चापेक्षा जास्त होईल, नंतर सतत वाढत जाईल आणि तरीही थांबवता येणार नाही ! याविरुद्ध, रस्ते, रेल्वे, वीज, इत्यादी पायाभूत सुविधा सर्व जनतेच्या उपयोगी असतातच पण त्यांच्यामुळे जे लहानमोठे स्थानिक सेवा-व्यवसाय-उद्योगधंदे निर्माण होतात (रिपल इफेक्ट्स), ते त्या विभागाचा सर्वांगिण विकास करण्यास आणि स्थानिक लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत करतात. हे परिणाम दीर्घकालीन असतात आणि त्यांच्यातून निर्माण होणारे स्थानिक उत्पन्न, पायाभूत सुविधांवर सरकारने केलेल्या खर्चापेक्षा अनेक पटींनी अधिक असते, जे सर्वसामान्य लोकांच्या हातात येते. उदाहरणादाखल, "मुंबई व पुणे या दोन शहरांना जोडणार्‍या भूभागांतील आणि खुद्द पुण्याच्या काही भागांतील", मुंबई-पुणे महामार्ग होण्याच्या अगोदर आणि नंतर असलेला विकासदर, तेथे निर्माण झालेली साधनसंपत्ती आणि त्यामुळे निर्माण झालेले दीर्घकालीन आर्थिक उत्पन्न यांची तुलना केली तर हे अधिक स्पष्ट होईल. या महामार्गाने त्याच्यावर खर्च झालेल्या १६३० कोटी रुपयांपेक्षा कित्येक पटींनी जास्त उत्पन्न दरवर्षी वाढवले आहे. शिवाय, या हिशेबात सर्वसामान्य जनतेला मिळणारा सुलभ आणि सुखद वाहतूक व्यवस्थेचा रोजचा फायदा धरलेला नाही. हे काहीसे लोकांना लोकांना "दररोज मासे पुरवणे" आणि "मासेमारीची उपकरणे पुरवणे" यातील फरकासारखे आहे. सतत मासे पुरवविण्याने लोकांना आपल्यावर कायमचे अवलंबून (खरे तर, मिंधे) ठेवता येते आणि वर्षानुवर्षे राजकिय स्वार्थ साधता येतो. मासेमारीची उपकरणे पुरवण्याने लोक स्वावलंबी होतात व लोककल्याण साधते. नेता यातला कोणता उपाय स्विकारेल हे त्याच्या "राजकारणाच्या उद्येशावर" अवलंबून असते ! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

१००% सहमत... पण कसं आहे ना डॉक्टर साहेब, इथे लोकांना दीर्घकालीन उपाययोजना व त्यातुन होणारी प्रगती नकोय. त्यासाठी थोडी कळ काढायची तयारी नाहीये .

In reply to by उगा काहितरीच

इथे लोकांना दीर्घकालीन उपाययोजना व त्यातुन होणारी प्रगती नकोय. त्यासाठी थोडी कळ काढायची तयारी नाहीये . इतर कोणत्या शैक्षणिक/बौद्धीक बाबतीत राजकारणी कमी असले तरी त्यांचा भावनिक भागफल (EQ उर्फ Emotional Quotient) फार मोठे असते. दीर्घकालीन उपाययोजनेसाठी खूप जास्त वेळ, श्रम आणि पैसे लागतात, त्यापेक्षा लोकांना थोडे काही पैसे देण्याने (किंवा, बहुतेक वेळेस पैसे देण्याच्या योजनेचे लालूच/आश्वासनही पुरेसे ठरते !) मते पदरात पडली, तर तो जास्त "कॉस्ट एफेक्टिव्ह" पर्याय नाही का ? कमीत कमी (किंवा शून्य) श्रमात जास्त फायदा मिळवणे हा मूळ मानवी स्वभावातला कमकुवतपणा आहे. वैयक्तिक राजकिय-सामाजिक-आर्थिक हितसंबंध मजबूत करण्यासाठी या गुणधर्माचा उपयोग करण्यात भारतिय राजकारण्यांचा हात धरणारे इतर कोणी जगभर सापडणे जरा कठीणच आहे. सर्वसामान्य जनतेला आपला दीर्घकालीन फायदा व विकास कळत नाही हे एक वेळ मानले, तरी जेव्हा तथाकथित विचारवंत अशा विसंगत आणि जनतेला भुलभुलैयात गुंतवून तिचा गैरफायदा घेणार्‍या व्यवस्थेची तळी उचलून धरतात तेव्हा, त्या विसंगतीचे जरासे आश्चर्य वाटते. पण जरासेच... कारण, जरा विचार केला की ध्यानात येते की त्या गटातले विचारवंत मुळात सामान्य मानवच असतात आणि "कमीत कमी (किंवा शून्य) श्रमात जास्त फायदा मिळवणे हा मूळ मानवी स्वभावातला कमकुवतपणा" त्यांच्याकडेही भरपूर प्रमाणात असतो. फक्त, त्याचबरोबर, आपले फसवे मत पटकन पटेल अश्या वेस्टनात गुंडाळून सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्याचे असामान्य कसब त्यांच्यात असते आणि ते विकून फायदा कमावायला त्यांची तयारी असते... आणि त्याचबरोबर "वैयक्तिक फायद्यासाठी आपण इतर माणसांचे अक्षम्य नुकसान करत आहोत" अशी रुखरुख लावणार्‍या उच्च मानवी भावनेचा स्वतःच्या मनावर परिणाम न होऊ देण्याचे अजब कसबही त्यांच्यात असते. काही दिवसांच्या हे कसब "कायमच्या जाड कातडीत" रुपांतरीत होते आणि मग स्वतःच्या हितसंबंधांपुढे कशाचेच काही वाटणे बंद होते... बराच वेळ असे चालल्यावर एक वेळ अशी येते की "आता आपले खोटेपणाचे गुपित फुटले तर किती उंचावरून खाली पडू ?" या प्रश्नाने परतीचे सगळे मार्ग खुंटतात. अर्थातच, तथाकथित विचारवंतांच्या या कमकुवतपणाचा आणि कौशल्यांचा फायदा घेण्यातही राजकारणी तरबेज असतात. त्यासाठी, जनतेच्याच पैशाने तयार केलेली मानसन्मानाची आणि आर्थिक फायदे देणारी पदे, मानसिक गंड कुरवाळणारे किताब, इत्यादी अनेक बाण त्यांच्या भात्यात असतात. आपल्या बाजून लढणरी अशी दमदार फौज तयार केली की मग ती सामान्य जनतेच्या अनेक पिढ्यांच्या स्वाभिमानी मानसिकतेला गारद करून टाकते. एकदा ही "सिस्टिम" सर्वसामान्य जनतेच्या मानसिकतेतही पक्की रुजली/बसली की जनतेलाही फुकटफौजदारी गुलामगिरीची इतकी सवय लागते की आपण आपले सर्व आयुष्य दुसर्‍या कोणाच्या पायी गहाण टाकले आहे याचेही भान शिल्लक उरत नाही... नंतर तर त्याचा अभिमानही वाटू लागतो. असो.

जानु 25/03/2018 - 10:38
या सुविधा निर्माण झाल्यावर सर्व जनतेसाठी वापरल्या जाणार आहेत. समृध्दी महामार्ग काही फक्त शेतीसाठीच नाही. त्यामुळे खर्च समस्त जनतेसाठी असेल. त्यातुन शेतकर्‍यांचे अपेक्षित भले लवकर होणार असे वाटते.

डँबिस००७ 25/03/2018 - 17:35
विवेक पटाईत साहेब, योग्य वेळी लिहीलेल्या लेखा बद्दल धन्यवाद !! भारतात पायाभुत सुविधांचा आभाव किती व कसा आहे हे सांगण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा आहे. जगातल्या टॉप ५० बंदरात भारतातल्या एकाही बंदराच नाव नाही, पण यु ए ई च्या दोन बंदरांच , श्रीलंकेच्या कोलंबो बंदराच तसेच चीनच्या १२ ते १५ बंदरांचा समवेश ह्या ५० बंदरात होतो. जगभरात आंतर्गत वहातुकीचा खर्च उत्पादन मुल्यावर १२% धरला जातो, चीन मध्ये हा ८% पर्यंत खा ली आणलेला आहे, पण भारतात तो १८% च्या आसपास आहे. हा आंतर्गत वहातुकीचा खर्च जगाच्या लेव्हल ला आणण्याचा संकल्प ह्या सरकारने केलेला आहे. ह्या सरकारच्या खाली सागर माला, डेडीकेटेड फ्रेट कॉरीडोर वेस्ट आणि ईस्ट , नॅशनल हाय वे असे प्रोजेक्ट चालु आहेत. येत्या १० -१५ वर्षांत पुर्ण चित्र पालटलेल असेल.

म्हणे 'त्याची एक हास्यास्पद मागणी , ६० वरील शेतकर्याला ५००० रुपये महिना पेन्शन मिळाली पाहिजे ' शेतात कष्ट करतो , घाम गाळतो तो पेन्शन रुपी भीक कशी मागेल ?. हां ! पण आमच्या कडे हरामखोर कर्ज बुडव्या नीं बुडवले 8 / 10 लाख करोड स्क्वेअर ऑफ करायला मात्र पैसे आहेत .

In reply to by सोमनाथ खांदवे

विशुमित 09/04/2018 - 10:10
मी म्हणतो सरकारी नोकरांना पेन्शन द्याची काय कारण ? प्रोडूक्टिव्ह योगदान काय त्यांचे ??

In reply to by विशुमित

मी म्हणतो सरकारी नोकरांना पेन्शन द्याची काय कारण ? सगळ्याच नोकरदारांचे महागाई भत्ते बंद केले पाहिजे. महागाईची झळ फक्त ह्यानाच बसते का? शेतकऱ्याला बसत नाही का?

In reply to by मार्मिक गोडसे

विशुमित 09/04/2018 - 12:08
आणखी पुढे जाऊन मी हे म्हणू इच्छितो कॉर्पोरेट/ आय टी क्षेत्रात वातानुलुकीत सर्वसोयीयुक्त पॉश ऑफिसेस ची खरंच गरज आहे का ? या पॉश ऑफिसेस चे डेप्रीसिएशन आणि इतर खर्च प्रॉडक्टच्या माथी मारून महागाई वाढवली जाते असे कोणाच्या लक्ष्यात कसे येत नाही. ..... प्रायव्हेट कंपनीतील कर्मचारी कामानिमित्त इतर राज्यात ट्रेन ने प्रवास करताना स्लीपर क्लास ऐवजी ३ AC - २ AC चा हट्ट का करत असतात. अंतर राज्यिय विमान प्रवास तर वर्ज्य केला पाहिजे. ज्याला जास्त घाई आहे त्याने वयक्तिक खर्च करून जावे. मार्केटिंग टीमची सोय महागड्या हॉटेलात करण्याचे प्रयोजन काय आहे? कॉस्ट वाढत नाही का ? मी म्हणतो घर ते ऑफिस ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी का म्हणून कंपनी ने द्यायची. कॉस्ट वाढत नाही का ? यांच्या लक्सेरि मुळे ग्राहकाला मग वस्तू महाग घ्यावी लागते. .......... (टीप : मी कंपनीने दिलेल्या वरील सगळ्या सोयी सुविधा नाईलाजास्तव वापरात आहे)

In reply to by arunjoshi123

विशुमित 10/04/2018 - 16:07
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय देवा. देव धर्माला आपला विरोध नाही. मी घरातल्या पूजेला सकाळी बसलो तर बायको दुपारी जेवायच्या टायमाला हाक मारते, "बास करा आता, निरंजन लावा आणि जेवायला बसा."

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 09/04/2018 - 23:18
सरकार स्वत:च्या खिशातून पेन्शन देत नाही. पेन्शन कर्मचा-यांच्याच पगारातून नियमित कापल्या गेलेल्या पैशाची (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) परतफेड असते. जर सरकारने पेन्शन देऊ नये अशी इच्छा असेल तर, सरकारने पगारातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी साठी पैसे न कापता संपूर्ण पगार कर्मचा-यांना द्यावा.

In reply to by श्रीगुरुजी

श्वेता२४ 10/04/2018 - 13:59
सरकारी नोकरदारांच्या बाबतीत पेन्शनचे अंशदान याआधी पूर्णपणे सरकारच करत असे. त्याला जुनी पेन्शन योजना म्हणतात. आता नव्या पेन्शन योजनेत जेवढा हप्ता कर्मचाऱ्याचा जातो तेवढेच अंशदान सरकारही करते. त्यामुळे सरकारवर आर्थिक भार येतोच.

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी 10/04/2018 - 15:01
अहो पोकळ बांबूधारी, Salary package काय असते याचा अभ्यास करा आणि कृपया आपल्या पोकळ बांबूसारखे पोकळ प्रतिसाद देणे बंद करा.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 10/04/2018 - 15:13
ते बांबू प्रकरण सोडून दिले तर चालणार नाही का? त्याचा उल्लेख न करता तुम्ही काय सांगायचे ते सागु शकताच. इथे त्यांनी न म्हटलेलं आणणे हेही ट्रोलिग सदरात येते.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 10/04/2018 - 15:39
आणि तुम्ही फ्रॉड लोकांच्या ठगबंधनाचे अध्यक्ष असल्यागत मिपावर वावरतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 10/04/2018 - 15:57
झोंबले वाटते. तज्ज्ञ सदस्य ते ट्रोल अध्यक्षांकडे वाटचाल. पण तुम्ही हाताने करून घेतले आहे हे. त्याला आमचा नाईलाज आहे.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 10/04/2018 - 17:44
झोंबले बिंबले अजिबात नाही. जोवर प्रतिसाद सरळ आहे तोवर आम्ही सरळ उत्तर देतो. कोणी वाकड्यात शिरायला लागला तर निव्वळ नाईलाजाने आम्हास वाकड्यात शिरावे लागते. तुमचा प्रवास सुद्धा तज्ज्ञ फ्रॉड ते फ्रॉड अध्यक्षांकडे वाटचाल असा आहे व तुम्ही ते हाताने करून घेतले आहे. त्याला आमचा नाईलाज आहे.

In reply to by श्रीगुरुजी

विशुमित 10/04/2018 - 18:10
खुद्ध जेष्ठ सदस्या पैसा ताईंनी तुमच्या ट्रॉलिंग बद्दल काळजी व्यक्त केली आहे, अजून काय मी स्पष्टीकरण देऊ? ==== आता सांगा मी कुठे फ्रॉड केला ?

In reply to by विशुमित

पैसा 10/04/2018 - 18:47
मी गुरुजींना ट्रोल्ल म्हटले नाही. कोणाचेही असे पाठपुरावा करणे ट्रोलिंग सदरात येते एवढेच मत व्यक्त केले. निदान समजदार लोकांनी ट्रोळ म्हणून नाव कमावू नये एवढीच इचछा.

In reply to by पैसा

विशुमित 11/04/2018 - 11:21
तुम्ही जरी थेट त्यांना ट्रोल म्हंटले नसले तरी त्यांचा प्रतिसाद ट्रोलिंग सदरात येतो याबद्दल काळजी व्यक्त केलेली सरळ सरळ दिसते. त्यामुळे ही वाटचाल ट्रोल अध्यक्ष बने पर्यंत पोहोचू नये याबद्दल मला देखील काळजी वाटते. ==== @गुरुजी- मी काय फ्रॉड केला तेवढे सांगा की ? तुमच्या या आरोपामुळे काळजी करत रात्री मी डाराडूर झोपलो होतो.

In reply to by विशुमित

श्रीगुरुजी 11/04/2018 - 14:17
तुमची वाटचाल फ्रॉड अध्यक्ष बने पर्यंत पोहोचू नये ही काळजी करत रात्री मी सुद्धा डाराडूर झोपलो होतो.

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 10/04/2018 - 15:36
माझे आधीचे प्रतिसाद पहा. व्यवस्थित उत्तरे दिली आहेत. परंतु त्यांनी एका प्रतिसादात विनाकारण घोडा दामटवल्याने निव्वळ नाईलाजाने मला पोकळ बांबू आणावा लागला. घोडा दामटवला नसता तर बांबूही आला नसता.

सरकार स्वत:च्या खिशातून पेन्शन देत नाही. पेन्शन कर्मचा-यांच्याच पगारातून नियमित कापल्या गेलेल्या पैशाची (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) परतफेड असते. असं असेल तर one rank one pension द्यायला सरकार खळखळ का करत होतं?

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी 09/04/2018 - 23:50
तो पूर्ण वेगळा मुद्दा आहे. एकाच rank वरून निवृत्त झालेल्या वेगवेगळ्या सैनिकांच्या पेन्शन मध्ये प्रचंड फरक होता व सैनिकांना समानता हवी होती. ४२ वर्षे हा प्रश्न प्रलंबित राहिल्यानंतर २०१५ मध्ये त्यावर बराचसा सर्वमान्य तोडगा काढण्यात आला.

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी 10/04/2018 - 09:05
ज्याप्रमाणे सहावा वेतन आयोग किंवा सातवा वेतन आयोग किंवा कर्जमाफी इ. साठी वेगळ्या मार्गाने तरतूद केली जाते तशीच या वाढीव खर्चासाठीही तरतूद केली जाते.

In reply to by मार्मिक गोडसे

अनुप ढेरे 10/04/2018 - 11:00
ओआरओपी हा सैनिकांनाच लागु आहे. इतर सरकारी कर्मचार्‍यांना नाही. नक्की मुद्दा काये तुमचा गोडसे?

In reply to by मार्मिक गोडसे

अनुप ढेरे 10/04/2018 - 12:15
सरकारी कर्मचार्‍यांचा विषय होता त्यात सैनिक कुठुन आले म. केवळ वादासाठी सैनिकांना इतर सरकारी कर्मचार्‍यांच्याच लायनीत बसवणं नाही आवडलं.

In reply to by अनुप ढेरे

पगला गजोधर 10/04/2018 - 15:58
केवळ वादासाठी सैनिकांना इतर सरकारी कर्मचार्‍यांच्याच लायनीत बसवणं नाही आवडलं.
पहिली गोष्ट प्रश्न मूळचा किसान संबंधित आहे, सरकारी खर्चाच्या (सरकारी कर्मचाऱ्यांचे) उदा दाखल दिले गेले काय हे तपासून पाहावयास हवे. दुसरी गोष्ट तुम्हाला फक्त, "जय जवान" अशी अर्धी घोषणा द्यायला आवडते का सर ?

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी 10/04/2018 - 14:23
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही वाहती गंगाजळी असते. कर्मचा-यांना पेन्शन किंवा साचलेली संपूर्ण रक्कम एकरकमी/अंशत: देताना त्याच गंगाजळीतून दिली जाते.

धागालेखकाचा शेतकर्‍यास सरकारकडून पेंशन मिळण्यास विरोध आहे. त्यावरुन सरकारी नोकरांना पेन्शन कशाला? असा विशुमित ह्यांनी प्रश्न केला. गुरुजी म्हणाले सरकार स्वतःच्या खिशातुन पेन्शन देत नाही. त्यावरुन मी orop चा विषय काढला. सरकार जर सैनिकांना स्वतःच्या खिशातुन पैसे देत असेल तर शेतकर्‍यास का देत नाही? हा मला पडलेला प्रश्न. आता शेतकर्‍यास सैनिकाच्या लायनीत बसवणं तुम्हाला आवडलं नसेल, तरी माजी पं.प्र. लालबहादूर शास्त्रींना आवडलं होतं. कानाला गोड लागावं म्हणून त्यांनी ती घोषणा केली नव्हती.देशातील जनतेने दोघांच्याही योगदानाचा सारखाच सन्मान करावा असा त्यांचा हेतू होता.

In reply to by मार्मिक गोडसे

अनुप ढेरे 10/04/2018 - 13:37
शेतकरी हे व्यवसाय करतात. इतर व्यवसायिकांसारखा. वर आयकरपण देत नाहीत. तरी पेंशन द्यायची? मग इतर व्यवसायिकांनी काय घोडं मारलय? सरकारी कर्मचारी आणि सैनिकदेखील आयकर भरतात. (इतर कर भरतात शेतकरी हे आर्ग्युमेंट चूक आहे कारण ते कर सगळेच भरतात. )

In reply to by विशुमित

जय जवान जय किसान ज्याला कळत नाही ,त्याने कीतीही अभ्यास केला तरी तो अपुराच पडेल. सरकार जेव्हा आयात करुन महाग झालेले अन्नधान्य स्वस्त करतो, ज्यामुळे शेतकर्‍याचे नुकसान होते तेव्हा ह्यांना मागणी पुरवट्याचा सोयिस्कर विसर पडतो. हमिभाव मागितला तर लगेच ईतर व्यावसायिकांशी तुलना करतात.

In reply to by मार्मिक गोडसे

अनुप ढेरे 10/04/2018 - 13:49
आयकराच्या मर्यादेत नसलेल्या शेतकर्‍यांनी सोडुन इतरांनी एखाद्या व्यवसायाप्रमाणे आयकर भरणं सुरू करु देत मग पेंशनची मागणी रास्तं ठरेल. ( खरं तर तरीही नाही कारण इतर व्यवसायिकांनी काय घोडं मारलय?)

तुमचा गोंधळ मी समजू शकतो.:) शेतकरी संघटीत नसल्यामुळे त्याचे आर्थिक शोषण जितके होते तितके कोणत्याही व्यावसायिकाचे होत नसावे. सरकारने त्यास पेन्शनही देऊ नये, सरकारने शेतमालाला दिडपट हमीभाव दिल्यास महागाई भडकेल असा आरबीआय इशारा देऊ लागली.सरकारी कर्मचार्‍यांना वेतन आयोग लावल्याने महागाई वाढत नाही. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले की रिक्षा,टॅक्सीवाले संप करुन आपल्या मागण्या मान्य करुन घेतात. तेथे मागणी पुरवठा लागू होत नाही. जय जवान, मर किसान.

पैसा 10/04/2018 - 14:43
लेख आवडला. सर्वसामान्य माणसाला सुचणारे लिहिले आहे तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही सकारात्मक विचार आहे. पेंशन देण्यापेक्षा शेतीला उद्योग मानले जावे. लघु किंवा मोठे उद्योग यांना त्यांच्या आकाराप्रमाणे मिळणाऱ्या सोयी व सवलती मिळाव्यात. सरकारी पेंशन ज्यांना मिळते ते सरकारचे थेट नोकर असतात. त्यांनी केलेल्या कामावर सरकारची मालकी असते. शेतकऱ्यांनी केलेल्या कामावर सरकारची मालकी नसते. त्यासाठी शेतीचे राष्ट्रीयीकरण करावे लागेल. ही उलटी गंगा झाली. असे तर मग शेतकऱ्यांनी शेतमजुरांना फंड व पेंशन द्यावे लागेल. या मागण्यांना अंत नाही. तेव्हा मासे देण्यापेक्षा जाळे आणि होडी उपलब्ध करून द्यावी हेच खरे.

In reply to by पैसा

सुबोध खरे 10/04/2018 - 19:52
काही स्पष्टीकरण सरकारी नोकरांना निवृत्तीवेतन मिळते ते सरकार गोळा करत असणाऱ्या करातूनच जाते. याचा भविष्यनिर्वाह निधीही काहीही संबंध नाही आणि हा बोजा विविध वेतन आयोगांनी भरमसाट पगार वाढवल्यामुळे अधिकच वाढत गेला. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) साधारण १४ टक्के इतका पैसा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनात खर्च होत आहे(२०१६). २०१४ मध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी ३५ लाख होते आणि निवृत्ती वेतन धारक ५२ लाख होते. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड असा हा प्रकार होत होता. यात राज्यसरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्था मिळवल्या तर हा एकदा किती होईल ते लक्षात घ्या. यामुळे २००४ नंतर सरकार मध्ये भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतः भरतील त्याच पैशात निवृत्तीवेतन मिळणार आहे. आणि याचा फायदा २०२४ नंतर दृश्यमान होऊ लागेल ( लोक २० वर्षांनी मुदतपूर्व निवृत्त होऊ लागतील तेंव्हा त्यांना त्यांचेच पैसे परत दिले जातील (यास फक्त लष्करी आणि निमलष्करी दले अपवाद आहेत. कारण त्यांनी मिळवलेल्या कौशल्याचा नागरी जगात काहीच उपयोग नसतो आणि त्यांना वयाच्या ३३ पासून ते ५० पर्यंत निवृत्त केले जाते )

In reply to by मार्मिक गोडसे

अनुप ढेरे 10/04/2018 - 15:01
का बुवा आयात करू नये? निर्यात करू द्यावी पाहिजे ती. आयात देखील करता यावी पाहिजे तेवढी.

In reply to by मार्मिक गोडसे

पैसा 10/04/2018 - 15:03
एखादा शेतीमाल महाग झाला तर तो न पिकविणारे अन्य शेतकरी व इतर गरीब उपभोक्ता यांच्या हिताची काळजी सरकारने घेणे अभिप्रेत असते. आपल्याकडे मुक्त बाजारपेठ अस्तित्वात नाही. प्रत्येक गोष्टीत manipulation असते.

श्वेता२४ 10/04/2018 - 15:39
मुळात लेखाचा रोख हा पायाभूत सुविधा उलब्ध करुन दिल्यास शेती व उद्योग दोघांनाही याचा फायदा होईल परंतु दुर्दैवाने याचे राजकारण होत आहे, हा आहे. त्यामुळे इथे सरकारी नोकरांचे पेंशन, महागाई भत्ता यांची सैनिक, शेतकरी व व्यापारी यांच्याशी करणे अप्रस्तुत आहे. प्रत्येकजण उदरनिर्वाहाचा मार्ग स्वतच्या क्षमतेनुसार व आवडीनुसार स्वताच निवडत असतो. त्यातील फायद्यातोट्ाचा विचार करुनच. त्यामुळे कोणालाही एखादा पेशा स्विकारल्यामुले मिळणारे लाभ इतरांशी तुलना का करता. मुळात शेती हा सुद्धा एक व्यवसाय आहे हे वास्तव आहे. परंतु शेती हा अत्ावश्यक व्यावसाय असून त्याच्या विकासाकरीता आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा देणे हे सरकारचे इतिकर्तव्यच ठरते. याबाबत दुमत नाही. परंतु शेतकऱ्यांनी देखील याबाबत व्यावसायिक दुष्टीकोन स्वीकारला पाहिजे. आधुनिक तंत्रजज्ञान न मार्केटींग याचा अभ्यास केला पाहिजे. सर्वच शेतकरी केविलवाणे व बापुडे नाहीत. बरेच शेतकरी हे यशस्वी व्यावसायिक आहेत. मुळात स्वातंत्र्योत्तर भारताला अन्नधान्याची गरज भागविणे आवश्यक होते परंतु हरीत क्रांतीनंतर आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आहोत. त्यामुळे इतर देशांसारखा आता आपलादेखील शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यावसायिक झाला पाहिजे. आणि इथेच सरकारने अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारुन शेतीला एक व्यवसाय म्हणून भरभराटीस आणणे आवश्यक आहे.

In reply to by श्वेता२४

विशुमित 10/04/2018 - 15:54
शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यावसायिक झाल्यामुळेच तर ते आणखी तीव्र आवाज उठवत आहेत. कष्ट तर सर्वच क्षेत्रातील लोक करत असतात आणि कमीअधिक प्रमाणात मोबदला देखील तेवढाच मिळवत असतात. यात दुमत नाही. साधी शेतमजुरी करणारी महिला ५ तासाचे २०० रुपये मोजून घेते आणि ते पण आठवड्याच्या आठवड्याला. मग शेतकऱ्यांनी त्याने पिकवलेल्या माला चा रास्त मोबदला मागितला म्हणून काय झाले ? भले तो दयनीय शेतकरी असो किंवा यशस्वी शेतकरी.

In reply to by विशुमित

श्वेता२४ 10/04/2018 - 16:05
शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे. मग शेतकरी कोणताही असो. इथे सरकारी हस्तक्षेप आवश्यक ठरतो. मधल्या दलालांची साखळी उच्चाटन करणे, तसेच शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विकता येईल अशई व्यवस्था करणे. शेतीमाल हातात असणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या जागेवरच कळले पाहिजे कि त्याच्या शेतमालाला कुठे मागणी आहे आणि त्याला सर्वोत्तम भाव कुठे मिळू शकतो. आणि त्याला त्याचाा शेतमाल त्या ठिकाण पाठवून योग्य भआव मिळवता आला पाहिजे. यासाठीच पायाभूत सुविधा हव्यात. मग त्यात पाणी, रस्ते, गोदामे, वीज अगदी इंटरनेट सेवादेखील आली.

In reply to by श्वेता२४

विशुमित 10/04/2018 - 16:16
मधल्या दलालांची साखळी उच्चाटन करणे, तसेच शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विकता येईल अशई व्यवस्था करणे.>> ==>> रोगा पेक्षा इलाज महाभयंकर वाटतो. शेतकऱ्यांचा मधल्या साखळी वरती सुद्धा जास्त आक्षेप नाही आहे. तेच खरे डिस्ट्रीबुट करतात शेत मालाला. त्यांची जोखीम सुद्धा मान्य केली पाहिजे. भारतीय शेतकऱ्याचे मूळ काम उत्पादन करणे आहे, मार्केटिंग आणि डिस्ट्रिबुटिंग नव्हे. त्याने ते औटसोअर्स करणेच त्यांच्यासाठी इष्ट आहे. डिस्ट्रिब्युशन चे काम शेतकऱ्याने हाती घेतले की तो शेती सोडून दलाली सुरु करतो.

In reply to by विशुमित

पैसा 10/04/2018 - 16:33
शेतकऱ्याला गव्हाचे १६ रुपये मिळाले तर ग्राहक त्याच गव्हाला ३५ रुपये मोजतो. हे १९ २० रुपये कमी करणे शक्य आहे का?

In reply to by पैसा

विशुमित 10/04/2018 - 16:41
ट्रान्सपोर्ट, लोडींग अनलोडींग, ट्रान्सीट लॉस, पिलफेरेज, माथाडी-कामगारांचे पगार, धान्य साफ करणे-वाळवणे , तेथील प्रोसेस लॉस, एक्सटेर्नल मार्केट फोर्सेस, गाळ्यांचे डेप्रीसिएशन, इंटरेस्ट कॉस्ट आणि सर्वात शेवटी प्रॉफिट मार्जिन. एवढे सगळे फॅक्टर असल्यावर रु. ३५ प्रति किलो च्या आसपास जाणारच ना. === रु. १६ पाहिजे ना. गाडी करून या आमच्या शेतावर. एकदम वर्षभराचे धान्य भरून घेऊन जा. ऍग्रो ट्रिप पण होईल धान्य पण स्वतः दरात मिळेल.

In reply to by विशुमित

पैसा 10/04/2018 - 17:01
मागे नाखु सुद्धा बोलले ते हेच. शेतकरी आणि ग्राहक यांच्यात जास्तीत जास्त थेट व्यवहार होणे गरजेचे आहे.

In reply to by पैसा

विशुमित 10/04/2018 - 17:09
काय सांगता येते की तुम्ही इतक्या लांबून आमच्या वस्तीवर आल्यावर मी म्हंटले रु. ३५ ने घायचे असेल तर घ्या नाहीतर चहापाणी/जेवण करून तुम्ही निघू शकता. (हा फायदा आहे शेताच्या बांधावर व्यवहार करण्याने. मला वाटते इथे भावनिक वगैरे वागण्यात काही हशील नाही आहे.)

In reply to by पैसा

विशुमित 10/04/2018 - 17:32
जर तुम्ही काही कारणास्तव नाही आलात किंवा तुम्हाला तुमच्या गावा नजीकच रु.१६ ने गहू मिळाला तर मला दुसरा तिसरा पर्याय उपलब्ध पाहिजे ना. भले त्यांनी नफेखोरी केली तरी माझी अपेक्षित किंमत मला मिळ्ण्याशी मतलब. आणि माझी होल्डिंग पावर जास्त असेल तर घरीच खाईल गहू सगळा. पुढच्या वर्षी त्या जागी दुसरे पीक घेईन. ==== एथिक्स टू वे असेल तर ठरल्या प्रमाणे मी रु.१६ नेच तुम्हाला गहू देणार. पण कोणी चलाखी करण्याचा प्रयत्न केला तर मोनोपॉली केलीच पाहिजे. ते करण्यासाठी स्ट्रॅटेजिकली माझ्या एरियात असाल तर दवाब आणणे मला सोपे जाईल.

In reply to by विशुमित

विशुमित 10/04/2018 - 17:34
दवाब आणणे वगैरे तुमच्यासाठी नव्हते, व्यापारी-अडते -इतर दलाल यांच्यासाठी होते. कृपया गैरसमज नसावा.

In reply to by विशुमित

पैसा 10/04/2018 - 16:12
निव्वळ भावनिक कोनातुन बघणे योग्य नाही. मोबदला मागणे एक गोष्ट आहे. मिळणे आजच्या परिस्थितीत शक्य आहे का? मधले अडते दलाल यांना बाजूला कसे सारता येईल, त्यांचे महत्त्व कसे कमी करता येईल हे पाहावे लागेल. पायाभूत सुविधा, जोडधंदे, शेती आधारित उद्योग यावर जास्त लक्ष दिले तर शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे फायदे होतील.
(शेती व्यतिरिक्त अनेक कारक आहे, ज्याच्या परिणाम शेती व शेतकर्यांंवर होतो. यावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपद्व्याप). आज दिनांक २५.३.२०१८. दिल्लीत रामलीला मैदानात तथाकथित शेतकर्यांचा हितेशी अण्णा हजारे उपोषणावर बसले आहेत. त्यांची एक हास्यास्पद मागणी ६० वरील शेतकर्याला ५००० रुपये महिना पेन्शन मिळाली पाहिजे. आपल्या देशात अधिकांश शेतकरी अल्पभूधारक आणि पार्ट टाईम शेतकरी आहेत. किमान १० कोटी शेतकरी पेन्शन मागतील. वर्षाचे ६ लाख कोटी कुठून येतील कदाचित अण्णांना हि याचे उत्तर माहित नसेल. दुसरी मांग उत्पादन लागत वर ५० टक्के नफा. कोण ठरविणार आणि कोण विकत घेणार. अण्णा सांगू शकत नाही.

सामाजिक उपक्रम -२०१८

निशदे ·
सामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम आता मिपाला नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. मिपाकरांनीही गेल्या वर्षी भरभरून साथ दिली. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो. ह्या वर्षी ५ पैकी 2 संस्था ह्या नोंदणी झालेल्या असल्या तरी त्यांना देणगी दिल्यावर अजून ८०जी कर सवलत मिळत नाही.