Skip to main content

मत

लै समस्या

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 14/02/2011 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
शेतीची मशागत करतांना, ती फुलवताना फळवतांना अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की वाफ्याचा बांध फुटणे. ही एक नेहमी आढळणारी कॉमन समस्या आहे. जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून असलं तरी योग्य प्रयत्नांनी आपल्याला आपले अवखळ पाणी थोपवून ठेवणे जमू शकते. बांध फुटणे ही एक नैसर्गिक प्रक्रियाच. पाण्याचा लोड वाढला, पाटातून पाणी बेफाम वाहू लागले किंवा वाफाच जर कमी उंचीचा असेल तर बांध हा फुटणारच. कमालीचा उमाळा येऊन किंवा भुसभुशीत मातीचा संग लाभल्यामुळे पाणी थोपवून धरणे जिकीरीचे बनते. अशा उस्फुर्त प्रसंगी बांध फटाफट फुटणे अपरिहार्य ठरते.

लोकशाहीच्या वाटेवर...

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 26/01/2011 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज आपला प्रजासत्ताक दिन आहे. त्यांनिमित्त सर्वांना शुभकामना. भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीची सुरुवात आज झाली. आपण खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालो आणि सार्वभौम झालो. आज थोड्या थोड्या कारणाने वैतागलेल्या मित्रांना देशाला आणि येथील व्यवस्थेला शिव्या देताना बघतो आणि कित्येकदा मीसुद्धा त्यात सामील होतो. मात्र एक जाणीव कायम असते की सध्या भारतात अस्तित्वात असलेली राजकीय/ प्रशासकीय व्यवस्था अत्यंत संतुलित व नवीन बदलांना सामावून घेणारी आहे.

झेंडा

लेखक प्रसाद_डी यांनी शुक्रवार, 21/01/2011 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
लाल चौकात तिरंगा फडकवल्य मुळे त्या अशांत कश्मीराची शांती भंग होइल त्यमुळे तीथे तीरंगा नको फडकवायला म्हनुण हे ओमर साहेब(मुख्य मंत्री आहे म्हनुन नहितर कसला सहेब अन कस्ल काय) बोंबलत आहेत. का कश्मीर भारताचा भाग नाही का? बर ईतीहास बघता कश्मीरी रजा ने त्याचे राज्य हिंदुस्थानात विलिन केले होते. मग आता तिथे सत्ता आपली, सुवीधा आपली (ज्या कही कगदा वर असतील नसतील त्या.... च्यायला या राजकारनी लोकांनी अस काही बोलायची सोयच ठेवली नाही) , सुरक्षा व्यवसस्था आपली , अजुन बरेच काय काय ते तीथे आपलच मग ती लोक का नको का म्हणतात ध्वजारोहनाला? हे सगळे आप-आपल्या पोळ्या शेकुन घेत आहेत.

[आघात ] : एक उल्लेखनीय प्रयत्न

लेखक पारा यांनी मंगळवार, 18/01/2011 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच विक्रम जोशी दिग्दर्शित 'आघात' हा चित्रपट पाहण्याचा योग आला. ज्यांना तो पाहायचा होता त्यांनी आत्ता पर्यंत तो पहिला असेलच असे गृहीत धरून मी विषयाला हात घालणार आहे. आजकाल अनेक ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या इस्पितळाच्या तोडफोडीच्या अनेक घटना आपण ऐकतो. त्यावर त्यांच्या असंस्कृतपणाबद्दल त्यांना बोलही लावतो.

आमंत्रण सहलीचं

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 14/01/2011 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपावर आल्यानंतर काही दिवसातच माझ्या भुलेश्वरच्या सहलीचा व्रुतांत इथे टाकला होता, त्यावर ब-याच प्रतिसाद्कांनी या ठिकाणी जाण्यांत इंटरेस्ट दाखवला होता. काही मिपाकरां बरोबर खव मधुन चर्चा झाली होती, आज श्री. गणेशा बरोबर बोलुन १६.०१. २०११ रविवार रोजी सकाळी भुलेश्वरला जायचं ठरलं आहे. काही मिपाकरांना खव व व्यनितुन कळवलं आहे, तरी ही नविन मित्र मॅत्रिणि जोडायची हॉस भारी म्हणुन खुलं आमंत्रण देतो आहे. साधारण प्लॅन असा आहे, १६.०१.२०११ ला सकाळी पुण्यातुन १०च्या सुमारास निघुन भुलेश्वर येथे जाणे , अर्थात जाताना वाटेत काहीतरी खाणं होईलच.

१२७ अवर्स

लेखक सेरेपी यांनी मंगळवार, 11/01/2011 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
एका मित्राने काही दिवसांपूर्वी अचानक विचारलं, '१२७ अवर्स' च्या प्रायवेट स्क्रीनिंगचे पासेस आहेत. मला जायला जमणार नाही, तुला जायचं असेल तर सांग'. त्या क्षणापर्यंत मला हि काय भानगड आहे पत्ता नव्हता. तशी मी काही फार 'मूव्ही बफ' वगैरे म्हणण्यासारखी नाही, पण एका कंटाळवाण्या संध्याकाळी कोणी फुकट पास देत असेल तर नाही का म्हणा? म्हटलं दे. तर संध्याकाळी घाईघाईने थेटरात. कसला चित्रपट, कोणाचा काही माहित नव्हतं. शेवटी २-३ मिनिटं उशिराने पळत पळत जाऊन बसलो.

वन लाइनर्स

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 07/01/2011 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभुमी : हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व) व.पु. काळे हे माझे आवडते लेखक, त्यांच्या मुळे वाचनाचे वेड आनखिन वाढले होते .. त्यांच्या कथा कादंबरी आणि त्यातील वाक्य म्हणजे ग्रेटच त्यातल्ता त्यात पार्टनर .. आपण सारे अर्जुन.. तु भ्रमत आहासी वाया .. हय कादंबर्या म्हणजे कळसच . त्यांच्याच प्रेरणेतुन काही तरी लिखान हाती घेतले आणि त्यात आलेली माझी वाक्य मलाच आवडुन गेली.. कविता ह्या आत्मकेंद्रीत असल्याने सार्वभौमत्व लवकर मिळत नाहि त्यांना.

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 05/01/2011 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली. जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला.