Skip to main content

मत

आता गरज पाचव्या स्तंभाची

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 28/06/2011 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आता गरज पाचव्या स्तंभाची सन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही.

निरागस चेहेर्‍याआडचे धर्मांतर

लेखक आंसमा शख्स यांनी गुरुवार, 23/06/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही संस्था फार मोठ्या असतात. त्यांची पोहोच ही मोठी असते. कायदेशीर आणि बेकायदेशीर अशी अनेक हत्यारे त्यांच्याकडे असतात. अशा संस्थांविषयी लिखाण करतांना कसे करावे हा मोठा पेच आहे. कारण मी एक सामान्य माणूस आहे. मला अचानकपणे रहस्यमय रित्या गायब व्हायचे नाही. किंवा माझा अचानक अपघाती मृत्युही घडायला नको आहे. अशा परिस्थितीत मी एखाद्या बलाढ्य संस्थेच्या धर्मांतराच्या कामाच्या स्वरूपाचे अवलोकन कसे करणार? वल्ड विजन या संस्थेच्या स्वरूपाबद्दल माहिती देणारे काही लेखन मी केले होते. ते माझा हेतु फक्त पॉलिटिकली करेक्ट स्वरूपात लेखन करण्याचा होता.

रेडी ? नो रेडी ssSSsss ...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 21/06/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती.

दमलेला बाबा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 19/06/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रत्येक घराच्या दारात एक दमलेला बाबा आपल्या चिमण्यांची वाट पाहतांना दिसून येतो. घरच्या होममिनिस्टर त्यांच्याच तोऱ्यात असतात. त्या अन् त्यांचं ऑफिस यातच गुरफटलेल्या असतात. त्यांचं करिअर इतकं मोठ्ठं की सर्व भार बाबाच्या खांद्यावर येऊन तो धापाच टाकीत राहतो. वाणसामान, दुधबील, लाईटबील असे किरकोळ खर्च बाईसाहेबांच्या पेमेंट मधून तर फ्लॅटचा हप्ता, गाडीचा इ.एम्.आय. असे आकडे बाबाच्या खात्यातून परस्पर परागंदा होण्याची तरतूद बाबाने स्वीकारलेली असते. आणि मग तरीही त्याला वाढदिवसाची साडी, दिवाळीचा रत्नहार, मकरसंक्रांतीचा नेकलेस अशाची जुळवाजुळव आपल्याच खात्यातून करण्याची गोडगुलाबी सक्ती केली जाते.

यू टू, क्रान्तिताई?

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 16/06/2011 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
शत्रूंच्या तलवारींना मी कधीच नाही भ्यालो मित्रांच्या टपल्यांनी पण मी अनन्वीत टेंगुळलो असं एका थोर कवीने म्हणून ठेवलेलंच आहे. तशीच काहीशी टेंगुळलेली अवस्था तुमची 'वड बोलला यमाला' ही कविता वाचून झाली. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली, स्वतःला कलाकार म्हणवून घेणाऱ्यांची जी मनमानी चाललेली आहे ती पाहून वीट यायला लागला आहे. सर्वसामान्य ज्यांना वंदनीय समजतात त्या व्यक्ती, संकल्पना, विभूती, परंपरा यांच्यावर हल्ला केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही असं यांना वाटत असावं. अशा विचारजंतांची यादी मोठी आहे.

'लोक'मत

लेखक निखिल देशपांडे यांनी मंगळवार, 07/06/2011 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात सुरु झालेल्या पेपर वॉरची गंमत आमच्या घरा पर्यंतही पोहचली. शनिवार रविवार औरंगाबादला पोहचल्यावर जाणवलेला सगळ्यात सुखद बदल म्हणजे लोकमतची घरातून हकालपट्टी झालेली होती. लोकमतच्या साथीला किती तरी पेपर आले आणि गेले, तरी पण आमच्या घरातून निदान गेली १५ वर्ष तरी लोकमत काही हलत नव्हता. दिव्य मराठीने हे काम करुन दाखवले. दिव्य मराठीच्या लॉन्चची तशीही जोरदार तयारी करण्यात आली होती. वातावरण निर्मितीचे प्रयत्न जोरदार होते. सुरवातीला आलेला सर्व्हे, त्यानंतर वाटलेली औरंगाबादची माहिती सांगणारी डायरी, २०० रुपयांत वार्षिक नोंदणी, असे एक ना अनेक मार्केटिंग गिमिक्स वापरण्यात आले.

आपण असे कसे?

लेखक समीरसूर यांनी रविवार, 22/05/2011 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
"नमस्कार! मी समीर बोलतोय व्यंकटेश रेसिडन्सीमधून. आमच्या बिल्डिंगची लिफ्ट संध्याकाळी सात वाजल्यापासून बंद आहे. ज्येष्ठ मंडळी खाली फिरायला गेली आणि नंतर त्यांना चौथ्या-पाचव्या मजल्यावर जिन्याने जायला लागले. माझा वेगवेगळ्या नंबरवर मिळून हा पाचवा फोन आहे. कुणी येणार आहे का लिफ्ट दुरुस्त करायला?" "अर्ध्या तासात येतो साहेब." "असं आश्वासन तुमच्या कंपनीतल्या अजून कुणीतरी मला दोन तासांपूर्वी देखील दिलं होतं; त्यांचा अर्धा तास किती तासांचा आहे मला माहित नाही." "नाही, नाही...मी येतो नक्की" "ठीक आहे. मी वाट बघतो." अजून एक तासाने मी पुन्हा फोन लावतो. रात्रीचे दहा वाजलेले असतात.